महिलांचे शोषण

* प्रतिनिधी

मुलगा जन्माला घालण्यासाठी महिलांवर किती दबाव असतो याचा नमुना दिल्लीतील एका गावात पाहायला मिळाला, ज्यामध्ये एका आईने आपल्या 2 महिन्यांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आणि नंतर तिला सुचले नाही तर तिला खराब ओव्हनमध्ये लपवले. तिने मूल चोरीला गेल्याचे नाटक करायला सुरुवात केली. या महिलेला आधीच एक मुलगा होता आणि सामान्यतः स्त्रिया एका मुलानंतर मुलीसह आनंदी असतात.

आपला समाज थोडाफार सुशिक्षित झाला असेल, पण आजही धार्मिक कथांचे दडपण इतके वाढले आहे की जन्माला येणारी प्रत्येक मुलगी ही एक ओझं वाटू लागते. आपल्या पौराणिक कथांमध्ये, मुलींना इतका शाप दिला जातो की प्रत्येक गर्भवती स्त्रीला मुलगा होण्याची कल्पना येऊ लागते.

या कथा आता आपल्या शिक्षणाचा भाग बनत चालल्या आहेत. स्त्रियांना त्यागाची देवता म्हणून संबोधून त्यांचे प्रचंड शोषण केले जाते आणि त्या आयुष्यभर रडत कल्पती राहतात. काँग्रेसच्या राजवटीत केलेल्या कायद्यात महिलांना हक्क तर मिळतातच, पण त्याचाही फटका महिलांना सहन करावा लागतो, कारण प्रत्येक हक्काचा उपभोग घेण्यासाठी त्यांना पोलीस आणि न्यायालयाचा दरवाजा ठोठावावा लागतो आणि जर भाऊ किंवा वडील त्यांच्याबरोबर जाण्यासाठी, नंतर मुलगी जन्माला आल्यावर ते शिव्याशाप देतात. प्रत्येक स्त्रीच्या अवचेतन मनात या पौराणिक कथा आणि स्त्रियांच्या व्रत-उत्सवांमुळे आपण हीन आहोत आणि आपल्या सुखाचा त्याग करावा लागतो, असा विचार निर्माण झाला आहे.

गमतीची गोष्ट म्हणजे धर्माचे वर्चस्व असलेल्या जवळपास सर्वच सुसंस्कृत समाजात स्त्रिया कोणत्या ना कोणत्या अत्याचाराला बळी पडतात. पाश्चिमात्य श्रीमंत देशांमध्येही महिलांचा दर्जा पुरुषांच्या तुलनेत कमकुवत आहे आणि समान पात्रता असूनही त्या विशेष बिलिंगला बळी पडतात आणि एका आवाजानंतर त्यांची बढती थांबते. संपूर्ण जगावर पुरुषांचे वर्चस्व असताना, दिल्लीच्या चिराग दिल्ली गावातील नवख्या आईला मुलगा जन्माला आल्यावर आपली चूक दिसू लागली आणि चूक सुधारण्यासाठी त्याने त्याची हत्या केली यात नवल नाही.

आता या महिलेला शिक्षा करण्यापेक्षा तिला काही दिवस मानसिक रुग्णालयात ठेवावे. ती गुन्हेगार आहे पण तिला पळवून नेल्याप्रकरणी तुरुंगात पाठवले तर पती आणि मुलाचे जगणे कठीण होईल. नवरा दुसरं लग्न करू शकत नाही किंवा एकटा घरही चालवू शकत नाही.

 

हेच पुरूषत्व आहे का?

* सुधा गोयल 

कोणत्याही वयोगटातील स्त्रीपासून आनंद मिळेल असा कुठलाच क्षण कुठल्याच वयोगटातील पुरुषाला गमवायचा नसतो. तिच्याशी गप्पा मारुन, तिच्याकडून नकळत झालेल्या चुकीतून किंवा तिला स्पर्श करुन तो स्वत:चे भरपूर मनोरंजन करुन घेत असतो आणि असा समज करुन घेतो की, त्याने स्त्रीला मूर्ख बनवून आपले पुरुषत्व दाखवून दिले. स्त्री केवळ मनोरंजनासाठी किंवा मजा घेण्यासाठी आहे, असे त्याला वाटते. स्त्रीची असहायता पुरुषाच्या कथित मजेच्या संकल्पनेला प्रोत्साहन देते आणि तो अधिकच मजा घेऊ लागतो.

सुशिक्षित पुरुष सभ्यतेच्या वेषात स्वत:ला शांत ठेवण्याचा जीव तोडून प्रयत्न करतो. पण त्याला यश मिळत नाही. काही प्रसंगी, त्याच्या सभ्यतेचा मुखवटा गळून पडतोच. त्यामुळेच तर विनयभंग आणि बलात्काराच्या बऱ्याच घटना या तथाकथित सुशिक्षित समाजात घडलेल्या दिसतात. द्विअर्थी बोलण्यातून, डोळयांमधील अश्लील इशाऱ्यांतून, हावभावातून, अश्लील संवादातून हे सर्व घडत असते. अशावेळी त्यांच्यात आणि कमी शिकलेल्या, अशिक्षितांमध्ये काहीच फरक उरत नाही. प्रत्येक पुरुष केवळ आपली आई, बहीण, पत्नी आणि मुलीला सुरक्षित ठेवू इच्छितो, मात्र अन्य स्त्रियांना एखादी बाजारातील वस्तू समजतो.

घाणेरडी वृत्ती

स्त्रीच्या नजरेत जितकी असहायता दिसेल तितकीच तिची मजा घेण्याची वृत्ती पुरुषांमध्ये वाढते. प्रसंगी आई, बहीण आणि मुलीच्या शरीराचे लचके तोडायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. आता तर अशा घटना सर्वांसमोर येतही आहेत. मर्यादा आणि संस्कारांच्या नावाखाली स्त्री तग धरू शकत नाही. टिकतात ती केवळ नाती. म्हणूनच तर एखाद्याची आई, बहीण किंवा मुलगी ही कुणा दुसऱ्याच्या मनोरंजनाचे साधन ठरते.

कार्यालयात जिथे स्त्री-पुरुष एकत्र काम करतात तिथे अशी मजा घेणे सामान्य बाब आहे. पांढऱ्या केसांचे वृद्ध आणि प्रौढ पुरुषही लंपटपणा करताना दिसतात. बागेत अशा वृद्धांचे टोळके फिरायला आलेल्या महिलांना पाहून अश्लील शेरेबाजी करताना दिसतात. त्यांना बारकाईने न्यहाळून मजा घेतात.

चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे द्वितीय श्रेणी महिला कर्मचाऱ्यांच्या असहायतेचा आनंद टाळीवर टाळी देवून, पान चावून किंवा पानाची पिचकारी उडवून सामूहिकरित्या लूटतात. उदाहरणार्थ ब्राचा हुक निघाला, साडी खांद्यावरुन सरकली, आंबाडा सुटला किंवा अचानक पर्स खाली पडून उघडली आणि ती उचलताना खाली वाकलेल्या तिच्या ब्लाउजमधून आत डोकवायला मिळाले की त्यांना आनंद होतो. कोणत्या स्त्रीला पीरियड आले आहेत आणि कोणाच्या पीरियडची तारीख काय आहे, यावरून तर ऑफिसमध्ये पैजही लावली जाते. जणू स्त्री त्यांच्या पुढयात विवस्त्रच फिरत असते.

कुप्रथांच्या नावाखाली शोषण

देशाच्या ग्रामीण भागात अजूनही तेथील प्रथेनुसार, मुलीचे लग्न मुलाच्या शर्टासोबत लावून दिले जाते. म्हणजेच मुलीचे महत्त्व शर्टा इतकेही नसते. किती क्रुर थट्टा आहे ही? राजपुतांच्या काळात, राजामहाराजांच्य वेळी युद्धावर गेलेल्या राजपूत राजाचे लग्न त्याच्या गैरहजेरीत त्याची कटयार किंवा तलवारीसोबत लावून दिले जात असे. त्यावेळीही एक हास्यास्पद परिस्थिती होती, ती म्हणजे हे लग्न पुजारी लावून देत असत, जे स्वत:ला विद्वान समजत.

हा कसला समाज आहे जो याच समाजाचा एक भाग असलेल्या स्त्रीसोबत इतक्या निष्ठूरपणे वागतो. नवरा गैरहजर असतानाही लग्न लावण्याची इतकी घाई कशासाठी? स्त्रीच्या स्त्रीत्वाला नेस्तानाबूत करुन नेमके काय सिद्ध होते? इतिहासात कधीच (मातृसत्ता असतानाही) एखाद्या पुरुषाचे लग्न मुलीच्या साडी किंवा चोळीशी लावून देण्यात आले नाही. पुरुषांसोबत असे निष्ठूरपणे कधीच वागण्यात आले नाही. परंतु महिला शिक्षणाच्या नावाखाली आजही अशा कुप्रथा मजा घेऊन वाचल्या जातात. आजही मुलीचा मृत्यू झाल्यास अश्रू ढाळले जात नाहीत.

माणूस ही जगातली सर्वश्रेष्ठ रचना म्हणून ओळखला जातो. कारण त्याच्याकडे सारासार विचार करण्याची क्षमता आहे, बुद्धी आणि विवेक आहे. तरीही यातील केवळ एका वर्गाच्या सुखासाठी, भोगविलासासाठी अगदी सहजपणे एखाद्या स्त्रीकडे वस्तू म्हणून पाहिले जाते. विविध युक्त्या लढवून पुरुष स्त्रीला आपल्या जाळयात फसवतो, गुरफटून टाकतो. इतकी हीन प्रवृत्ती तर पशू समजल्या जाणाऱ्या जनावरांमध्येही नसते. प्राणी हे प्राण्यांना प्राणीच मानतात, मग तो नर असो की मादी. मग माणसाच्या या पाशवी प्रवृत्तीला काय म्हणायचे? हा प्रश्न त्या प्रत्येक माणसासाठी आहे, ज्याला खरे पुरुषत्व म्हणजे काय हे माहीत आहे.

कधी सुधारणार समाज?

एकटी राहणारी अविवाहित, घटस्फोटित, विधवा किंवा कुमारिका, जिचा कोणाशी काहीही संबंध नाही, ती समाजात केवळ खेळणे किंवा मनोरंजनाची वस्तू बनून जाते. तिचे दु:ख, अश्रू हे सर्व हरवून जाते. ती स्वत: मूल्यहिन ठरते. उरते ते फक्त शरीर आणि तसेही स्त्रीचे शरीर संवेदनशूल्य समजले जाते. त्याचा हवा तेव्हा वापर केला जातो.

जत्रा, सार्वजनिक जागी, गर्दीच्या ठिकाणी पुरुष स्त्रीची मजा घेतात. तिच्या छातीवर मारणे, नितंबावर चिमटा काढणे, स्कार्फ किंवा साडी ओढणे, अशी अश्लील कृत्ये सर्रास केली जातात. तरी बरे, आपल्या देशात सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेण्याची प्रथा नाही. नदी, कालवे किंवा तलावाच्या काठावर स्नान करून कपडे बदलणाऱ्या स्त्रियांना अनेक जण लपून पाहतात. अंधारात शौचास बसलेल्या महिलेवर वाहनाची लाईट मारून ट्रक किंवा बसचालक मजा घेताना अनेकदा दिसतात.

बसमध्ये अचानक ब्रेक लावून महिला प्रवाशाला पुरुष प्रवाशाच्या अंगावर पडायला भाग पाडणे, महिला प्रवाशाच्या सीटवर टेकून उभे राहून इतर प्रवाशांना तिकीट देणे, हे सर्व नित्याचेच झाले आहे.

संस्कृती आणि संस्कारांच्या नावाखाली महिलांसाठी वेगळे निकर्ष तयार करण्यात आले आहेत. जे काम केल्याने समाजाची गुन्हेगार आहे असे समजून त्या स्त्रीकडे पाहिले जाते तेच काम पुरुष मात्र ताठ मानेने करू शकतो. धुळीत पडल्याने स्त्री गलिच्छ होते, कारण तिच्या कपडयांना लागलेली धूळ झटकण्याची परवानगी समाज तिला देत नाही. अशा या दुतोंडी सामाजिक मर्यादांच्या पाशातून स्त्री कधी मुक्त होणार?

महिलेच्या माथी प्रत्येक दोषाची जबाबदारी

* रोचिका अरुण शर्मा

आजही स्त्रियांसमोर सामाजिक तसेच धार्मिक बंधने अशा प्रकारे आवासून उभी आहेत की ती कधीही त्यांना गिळंकृत करतील. अनेक योजना येतात, लेख लिहिले जातात, कथा तयार होतात, स्पर्धांचे आयोजन केले जाते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी ‘महिला दिवस’ही साजरा केला जातो. प्रत्यक्षात बाल्यावस्थेपासून ते वृद्धावस्थेपर्यंत समाज आणि धर्माच्या बंधनात बांधल्या गेल्यामुळे महिला घराच्या चार भिंतींआड उसासे टाकत कशाबशा जगत आहेत.

कुमारी मुलगी आणि विधवा दोष

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. झुणझुणवाला यांच्या २५ वर्षीय मुलीचे लग्न ठरवले जात होते. मुलगा-मुलगी दोघांनी एकमेकांना पसंत केले होते. त्यानंतर मात्र पुढे काहीच घडले नाही. मिठाई कधी देणार, असे झुणझुणवाला यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘मिठाई खाऊ घालायला आम्ही तयार आहोत, पण मुलीच्या पत्रिकेतच दोष आहे. त्यामुळे कुठलेच स्थळ जमत नाही.’’

कसला दोष? असे विचारताच म्हणाल्या, मुलाकडच्यांनी भटाला मुलीची पत्रिका दाखवली होती. त्यांनी सांगितले की, पत्रिकेतील ग्रहांच्या स्थितीनुसार मुलीला वैधव्य योग आहे. लग्नानंतर काही वर्षांतच ती विधवा होईल. असे असताना कोण आपल्या मुलाचे लग्न आमच्या मुलीशी लावून देईल? त्यांच्या कपाळावर चिंतेच्या आठया स्पष्ट दिसत होत्या.

अविवाहित मुलीला मंगळ दोष

पुण्यात राहणारी स्मिता सांगते की, तिचे लग्न वय उलटून गेल्यावर झाले, कारण तिच्या पत्रिकेत मंगळ दोष होता. असे म्हटले जाते की, मंगळ असलेल्या मुलीचे लग्न मंगळ असलेल्या मुलाशीच लावून द्यावे लागते, तरच ते यशस्वी होऊ शकते. तसे न झाल्यास दोघांपैकी एकाचा मृत्यू किंवा घटस्फोट होतो. अशा मुलाच्या शोधात अनेकदा मंगळ असलेल्या मुली वय होऊनही कुमारिकाच राहतात किंवा मंगळ दोष दूर करण्यासाठी पूजा अथवा उपाय सांगितले जातात. ते केल्यानंतरच अशा मुलींचे लग्न होते. शिवाय वय वाढूनही लग्न होत नसेल तर समाजाचे टोमणे ठरलेलेच असतात.

घटस्फोटित स्त्री

हैदराबादमध्ये राहणाऱ्या संजनाचा लग्नाच्या ५ वर्षांनंतर वयाच्या ३० व्या वर्षी घटस्फोट झाला. त्यावेळी त्यांना मुलगा होता. मुलाला त्यांनी स्वत:कडे ठेवले. घटस्फोटानंतर काही वर्षांनी त्यांच्या नवऱ्याने पुनर्विवाह केला. त्या मात्र ५० वर्षांच्या झाल्या तरी एकाकी आयुष्य जगत आहेत. त्या स्वत: आयटी इंडस्ट्रीत कामाला आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे.

पुनर्विवाहाबाबाबत त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ‘‘आता या वयात माझ्याशी कोण लग्न करणार? जेव्हा तरुण होते तेव्हा एका मुलाची आई असल्यामुळे माझ्याशी कोण लग्न करणार होते? दुसऱ्याच्या मुलाची जबाबदारी कोण कशाला घेईल?’’

अशा प्रकारची कितीतरी उदाहरणे पाहायला मिळतील जिथे मुलीच्या पत्रिकेत दोष असल्याचे सांगून तिला नाईलाजाने एकाकी, असहाय जीवन जगायला लावले जाते.

विधवा स्त्री

अशाच प्रकारे एक प्रकरण पाहायला मिळाले जिथे एका सुशिक्षित, सुंदर, स्मार्ट महिलेच्या नवऱ्याचा कमी वयातच मृत्यू झाला. नवरा सरकारी नोकरीत असल्यामुळे तिला त्याच्या मृत्यूपश्चात चांगले पैसे मिळाले. तिला लहान बाळही होते.

काही कारणांमुळे सासरच्या माणसांचा आधार न मिळाल्याने ती माहेरी राहू लागली. माहेरी भाऊ-वहिनीला तिचे तिथे राहणे आवडत नव्हते. आईवडिलांनी सुशिक्षित, चांगला कमावणारा, घटस्फोटित मुलगा शोधून तिचे लग्न लावून दिले. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. पुढे तिच्या मुलावरून दोघांमध्ये वाद होऊ लागले. पहिल्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तिला मिळालेल्या पैशांवर तिच्या नव्या सासूचा डोळा होता. विधवा, त्यात एका मुलाची आई तरीही तुझ्याशी लग्न केले, असे टोमणे, भांडण झाल्यावर तिला सतत नवऱ्याकडून ऐकून घ्यावे लागत होते. रोज होणाऱ्या भांडणांना कंटाळून अखेर तिने स्वत:च घटस्फोट घेतला.

येथे विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, ती विधवा झाली यात तिचा दोष काय? मुलगा लग्नानंतर झाला होता. दुसरा नवरा मात्र घटस्फोटित होता. त्याचे किंवा त्याच्या घरच्यांचे वागणे चांगले नसेल म्हणून कदाचित त्याच्या बायकोने घटस्फोट घेतला असेल. यात त्याची चूक असू शकते. तरीही महिलेलाच सतत विधवा झाल्याचा दोष देणे कितपत योग्य आहे?

ती सुशिक्षित, हुशार होती म्हणून तिचा पुनर्विवाह होऊ शकला आणि दुसऱ्या नवऱ्यासोबत पटत नसल्यामुळे ती घटस्फोट घेऊ शकली. तिच्या जागी गावातली, कमी शिकलेली, आर्थिकदृष्टया असहाय मुलगी असती तर तिला जगणे कठीण झाले असते.

सक्षम वीरांगणा

अशाच प्रकारचे आणखी एका महिलेचे उदाहरण आहे, जिचा नवरा सैन्यात होता आणि शहीद झाला. ती महिला सुशिक्षित आहे. तिला एक मुलगा आहे. तिला तिच्या पतीच्या निधनानंतर सैन्यात नोकरी मिळाली. त्यामुळे ती आर्थिकदृष्टया सक्षम आहे. मुलाला तिने प्रेमाने, चांगले संस्कार देऊन वाढवले.

तिला अनेकदा वाईट वाटते, कारण सर्व काही असूनही तिला एकाकी जीवन जगावे लागत आहे. तिला कुठेतरी छानशा ठिकाणी फिरायला जावेसे वाटते, पण कशी आणि कोणाबरोबर जाणार, कारण कमी वयातच पतीचे निधन झाले होते. सुखी वैवाहिक जीवनाचे स्वप्न तिनेही बघितले होते. पतीच्या हातात हात घालून आणि छानसे कपडे घालून एखाद्या सिने अभिनेत्रीप्रमाणे फिरण्याची तिचीही इच्छा होती. तिलाही तिचे खूप सारे सुंदर फोटो काढायचे होते.

सोशल मीडियाचे युग आहे. स्वत:चे फोटो इतरांसोबत शेअर करावे, असे तिलाही वाटत होते. मात्र पती नसल्यामुळे ती मन मारून जगत होती. वय झाल्यावर पतीचे निधन झाले असते तर कदाचित तिचा या सर्व गोष्टींचा आंनद उपभोगून झाला असता. हौस पूर्ण झाली असती. मुलगा लहान असल्यामुळे ती एकटी पडली. मुलाला घेऊन कोणाबरोबर फिरायला जाणार होती, कारण कोणीही नातेवाईक किंवा मित्राला त्याच्या कुटुंबासोबत फिरायला अशी एखादी स्त्री आलेली आवडत नाही. शिवाय कोणीही तिची जबाबदारी घ्यायला तयार नसते.

परितक्ती स्त्री

असेच एक उदाहरण आहे परितक्त्या स्त्रीचे, जिला तिच्या नवऱ्याने भांडण करून घरातून हाकलून दिले. तिची ५ वर्षांची मुलगीही नाईलाजाने आपल्या आईसोबत आजोळी आली. ती महिला माहेरी आल्यानंतर नोकरी करू लागली. आईवडिलांनी विचार केला की, कधीपर्यंत ते तिला आधार देणार? त्यांचेही वय झाले होते. त्यामुळे त्यांनी नातीला तिच्या वडिलांच्या आईवडिलांकडे पाठवले. त्यांना वाटले की, मुलीला आईची गरज भासेलच तेव्हा सासरची मंडळी सुनेला बोलावून घेतील. पण तसे काहीच झाले नाही. अखेर मुलीच्या आईवडिलांनी तिला घटस्फोट मिळवून दिला आणि एका अशा माणसाशी लग्न लावून दिले ज्याच्या पत्नीचे निधन झाले होते. त्याची २ मुले आणि वृद्ध, आजारी आई होती.

हे लग्न झाले, पण ती महिला तिच्या मुलीला स्वत:सोबत ठेवू शकली नाही. जेव्हा ती दुसऱ्या नवऱ्याच्या दोन मुलांना सांभाळत असेल तेव्हा तिला पोटच्या मुलीची आठवण येत नसेल का? त्या ५ वर्षांच्या मुलीवर अन्याय झाला नाही का?

महिलेचे दोन्ही पती त्यांचे आयुष्य अगदी मनासारखे जगत होते. या प्रकरणात मला असे वाटते की, दुसऱ्या लग्नात त्या महिलेला पत्नीचा नाही तर घर सांभाळणाऱ्या बाईचा दर्जा देण्यात आला होता. असे नसते तर दुसऱ्या नवऱ्याने तिच्या मुलीचा स्वीकार केला असता. आई-मुलींची ताटातूट झाली नसती.

पत्रिकेतील दोष आणि उपाय

अनेकदा असेही पाहायला मिळते की, मुलीच्या पत्रिकेत दोष दाखवला जातो. त्यानंतर एखादी पूजा, यज्ञ, होमहवन करून दोषाचे निवारण केले जाते. त्यानंतरच तिच्या लग्नाची पुढची बोलणी केली जातात.

अशाच प्रकारे विधवा महिलांसाठी अनेक नियम तयार करण्यात आले आहेत. या नियमांमुळे त्यांचे जीवन लाचार, दयनीय, नरक बनते. एखाद्या महिलेचे विधवा होणे हा तिच्यासाठी शाप ठरतो.

वैदिक ज्योतिष कुंडलीनुसार, विवाह, वैवाहिक जीवन आणि वैवाहिक स्थितीसाठी सप्तम भावाचा अभ्यास केला जातो. त्यानुसार विवाहानंतर वैवाहिक जीवनात येणाऱ्या परिस्थितीची जाणीव  स्त्री-पुरुष दोघांनाही करून देण्यात येते. पण डोळयावर अंधश्रद्धेची कापडे लावून बुरसटलेल्या प्रथांच्या जास्त अधीन गेल्यास वैवाहिक जीवनातील सुखाला गालबोट लागते.

सप्तम भावाच्या अभ्यासानुसार, या भावातील मंगळ आणि पाप ग्रह मुलीच्या पत्रिकेत असल्यास विधवा योग येतो.

वेगवेगळे भाव, पत्रिकेतील चंद्र्राचे स्थान आणि राहूच्या दशेनुसार मुलगी विधवा होणार, हे निश्चित होते.

पत्रिकेतील काही दोषांमुळे एखादी स्त्री लग्नानंतर ७-८ वर्षांच्या आतच विधवा होते. लग्न आणि सप्तम या दोन्ही घरात पाप ग्रह असतील तर लग्नानंतर ७ व्या वर्षी नवऱ्याचे निधन होते.

अशा प्रकारचे अनेक योग आणि दशा ज्योतिषांनी वेळोवेळी लिहिले आणि सांगितले. आता तर ही माहिती इंटरनेटवरही उपलब्ध आहे.

फक्त एवढेच नाही तर अशा माहितीसोबत वेगवेगळया शहरात राहणाऱ्या महिलांची त्यांच्या नावासह त्यांच्या पत्रिकेतील दोष आणि विधवा होण्याच्या योगाची माहितीही देण्यात आली आहे. जेणेकरून हे सत्य असल्याची लोकांची खात्री होईल आणि पत्रिका पाहण्यावर त्यांचा विश्वास बसेल.

या सर्वांव्यतिरिक्त इंटरनेटवर मेनका गांधी आणि सोनिया गांधींच्या पत्रिकेचा उल्लेख करण्यात आलाय. हेदेखील सांगितले आहे की, त्यांच्या पत्रिकेचा अभ्यास केल्यानानंतर किती कमी वयात त्यांना वैधव्य येणार हे समजले होते आणि तसेच घडले. सोबतच असेही सांगण्यात आले आहे की, जर शनी, मंगळासाठी उपाय केला तर वैधव्य योग टाळता येऊ शकतो.

विधवा स्त्रीसाठी विधवा व्रत

धर्मग्रंथांमध्ये ज्या प्रमाणे स्त्रीसाठी पतिव्रता धर्म आहे त्याचप्रमाणे विधवा स्त्रीसाठी विधवा व्रत असते. या व्रतानुसार, विधवा स्त्रीने कशा प्रकारे जीवन जगावे, हे निश्चित करण्यात आले आहे.

* विधवा स्त्रीने पुरुषासोबत किंवा तिच्या माहेरीच रहायला हवे.

* विधवा स्त्रीने साजशृंगार, दागिने घालणे किंवा केस धुणे सोडून द्यायला हवे.

* विधवा स्त्रीने दिवसातून एकदाच अन्नग्रहण करावे. एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस अन्नाचा त्याग करावा.

* विधवा स्त्रीने आंबट-गोड खाऊ नये. फक्त साधे अन्न खावे.

* सार्वजनिक कार्यक्रम, शुभकार्य, विवाह, गृहप्रवेशावेळी तिने हजर राहू नये.

* विधवा स्त्रीने शंकराची उपासना करावी. आपल्या मुलांची काळजी घ्यावी आणि त्यांच्यासाठी उपवास करावेत.

* विधवेसोबत विवाह करणारा नरकात जातो.

* याशिवाय जर एखादी महिला विधवा नसेल पण तिचा पती परदेशात गेला असेल तर तिनेही विधवा व्रताचेच पालन करावे.

व्हिडीओही उपलब्ध

पत्रिका, ज्योतिष, विधवा व्रत इत्यादींवर लेख उपलब्ध आहेत. सोबतच असे व्हिडीओही आहेत ज्यात विधवा स्त्रीने पुनर्विवाह करावा की नाही, हे सांगितले आहे.

विधवा स्त्रीच्या हातून कोणतेही शुभकार्य का केले जात नाही? विधवा स्त्रीने सफेद साडीच का नेसावी? घरातील दोषांमुळेही स्त्री विधवा कशी होते? इत्यादी माहिती या व्हिडीओतून मिळते.

स्त्रीला आशीर्वाद दिला जातो, ‘अखंड सौभाग्यवती भव’ म्हणजे जोपर्यंत ती जिवंत राहील तिचे सौभाग्य अबाधित रहावे. विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, असा आशीर्वाद एखाद्या पुरुषाला दिला जात नाही, कारण पत्नी मेल्यास त्या पुरुषाला पुनर्विवाहाचा अधिकार असतो. त्याला २-३ मुले असली तरी एखादी स्त्री त्याच्याशी लग्न करतेच. याउलट जर एखादी स्त्री विधवा झाली तर आपला समाज आणि धर्म तिच्यावर असे काही आघात करतो की, तिचे जगणे जणू नरक होते.

विचार करण्यासारखी गोष्ट अशी की, जर पुरुषाचा मृत्यू झाला तर त्याचा दोष स्त्रीच्या पत्रिकेतील ग्रहांना दिला जातो. प्रत्यक्षात हा आपल्या समाजातील बुरसटलेल्या नियमांचा दोष नाही का? हा दोष निवारण्यासाठी उपाय का असू नयेत?

आज एकीकडे आपण विज्ञानातील नवीन शोध, प्रगतीच्या गप्पा मारतो. मग दुसरीकडे विधवा, परितक्त्या, अविवाहित स्त्रीच्या जीवनातील सुधारणेचा विचार दाबून का टाकला जातो. अशा महिलांवर मन मारून जगण्याची वेळ का येते? प्रत्यक्षात फक्त व्यासपीठांवर कायक्रमांचे आयोजन करून काहीच होणार नाही, तर उदार अंतकरणाने त्यांना चांगल्या प्रकारे जगण्याचा हक्क देणे गरजेचे आहे. कारण त्या जशा आहेत, ज्या परिस्थितीत आहेत, पण माणूस तर त्याही आहेत.

लोकशाहीचा अर्थ फक्त मतदान करणे नाही

* प्रतिनिधी

धर्म आणि संस्कृतीच्या नावावर पूर्वापारपासून महिलांचे जे शोषण सुरू होते ते लोकशाही आल्यानंतरच थांबले होते. मात्र आता धर्माचे पाताळयंत्री दुकानदार आपल्या विशिष्ट, सर्वांहून वेगळया प्राचीन संस्कृतीच्या नावावर जुनाट, बुरसटलेले विचार समाजावर पुन्हा थोपवत आहेत, ज्याची पहिली शिकार महिलाच ठरतात.

अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीत हेच पाहायला मिळते. भारतातही मोठया प्रमाणावर करण्यात येणारे यज्ञ, होम-हवन, प्रवचन, तीर्थयात्रा, पूजा, आरती, धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून लोकशाहीने बहाल केलेले स्वातंत्र्य जोरजबरदस्तीने हिरावून घेतले जात आहे.

चर्चच्या मताला दुजोरा देऊन गर्भपातावर नियंत्रण ठेवू इच्छिणाऱ्या अमेरिकेवरही टिकेची झोड उठली आहे, कारण असे निर्बंध म्हणजे महिलेच्या संभोग सुखावर नियंत्रण मिळवण्यासारखे आहे, जे महिलांना सुजाण नागरिक न समजता केवळ मुले जन्माला घालण्याचे मशीन समजते.

हा सर्व नको असलेला खोटा दिखावा नाही, कारण ही सर्व धर्माची दुकाने पुरुषांनी थाटली असून त्यांनीच बनवलेल्या नियमांनुसार ती चालवली जातात आणि यात ज्याची पूजा केली जाते तो एकतर पुरुष असतो किंवा हिंदू धर्मातील पुरुषाचा एखादा पुत्र असतो अथवा त्या पुरुषाची जी पत्नी असते तिची पूजा केली जाते. म्हणजे महिलेला स्वत:ची ओळख नसते, पण तरीही मत मिळवण्यासाठी तिला मतपेटीपर्यंत नेले जाते. प्रत्यक्षात लोकशाही म्हणजे केवळ मत देण्याचा अधिकार नाही. लोकशाहीचा अर्थ आहे सरकार आणि समाज चालवण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीला बहाल करण्यात आलेला अधिकार. या देशात इंदिरा गांधी, जयललिता आणि ममता बॅनजींसारख्या महिला नेत्या असूनही लोकशाही पुरुषांची गुलाम बनून राहिली आहे आणि धर्माच्या आवरणाखाली पुन्हा त्याच बुरसटलेल्या रस्त्यावरून रोज याच चुकीच्या दिशेवरील वाटचाल अव्याहतपणे सुरू आहे.

नरेंद्र मोदी सरकारमध्ये महिलांची संख्या अगदी न असल्यासारखीच आहे. २०१४ मध्ये सुषमा स्वराज यांनी पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यांना परराष्ट्र मंत्री बनवून केवळ व्हिसा मंत्री म्हणून मर्यादित ठेवले आणि दाखवून दिले की, या सरकारमध्ये महिलांना जागा नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या प्रत्येक वाक्यात जय श्रीराम नव्हे तर जय नरेंद्र मोदी म्हणतात, जेणेकरून त्यांचे पद टिकून राहील. या सर्व एका शिकलेल्या, सुंदर, हुशार आणि असेही होऊ शकते की, एका कमावत्या पत्नीसारख्या आहेत ज्यांची गाडी काहीही झाले तरी ‘यांना विचारून सांगते’, असे बोलण्यापलीकडे जात नाही. लोकशाहीचा शेवटचा अर्थ असा आहे की, महिला कामावर असोत, राजकारणात, शिक्षण क्षेत्रात किंवा घरात असोत, स्वत:चे निर्णय स्वत: घेण्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे.

लोकशाहीचा अर्थ आर्थिक स्वातंत्र्य असाही होतो, जो आजच्या घडीला शून्य होत चालला आहे. जिने यशाचे शिखर गाठले त्या प्रत्येक महिलेचे गुणगान गायले जाते, पण हे सर्व पिता किंवा पतीमुळेच शक्य झाले आहे, याची जाणीव तिला पदोपदी करून देण्यात येते. सध्या काही महिला अधिकाऱ्यांविरोधात आर्थिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खोलात जाऊन पाहिल्यास हे स्पष्ट होते की, या गुन्ह्यांमागचे खरे सूत्रधार त्यांचे पतीच होते.

लोकशाहीच्या तत्त्वांना पायदळी तुडवण्यात धर्माचे स्थान सर्वात मोठे आहे, कारण भांडवलशाही महिलांकडे सर्वात मोठे ग्राहक म्हणून पाहते. त्यांचा आदर करते आणि म्हणूनच लोकशाहीचे रक्षण करते. धर्माला मूर्ख महिला अभिप्रेत असतात, ज्या त्यांना हवे त्याप्रमाणे वागतात आणि अशा महिलांना आपले प्रतिनिधी बनवून घराघरात पाठवले जाते. लोकशाहीचा कुणीही एजंट नाही. लोकशाहीची चाळण करण्यासाठी धार्मिक सैनिकांचे मोठे पथक मात्र सज्ज आहे. कधीपर्यंत वाचणार लोकशाही आणि कधीपर्यंत महिला स्वतंत्र असणार, हे पाहावे लागेल. सध्या तरी क्षितिजावर जमा झालेले काळोखे ढग दिसत आहेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें