नोकरदार स्त्रिया कौशल्यांवर ताबा आर्थिक स्वातंत्र्याचा

* गरिमा पंकज

महामारी आणि मंदीमुळे नोकरदार स्त्रियांची संख्या सातत्याने कमी होत आहे. अभ्यासानुसार, आपल्या देशात नोकरदार स्त्रियांची संख्या खूपच कमी आहे. भारतात काम करण्याचे वय असलेल्या ६७ टक्के पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या फक्त ९ टक्के आहे.

स्वातंत्र्याला ७४ वर्षांहून अधिक काळ लोटूनही, रोजगाराच्या क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग खूपच कमी आहे, विशेषत: तरुणींना त्यांच्या करिअरच्या मार्गात अनेक अडथळे आणि आव्हानांना तोंड द्यावे लागते. त्यांच्यासाठी, रोजगाराच्या क्षेत्रात लैंगिक भेदभावाची असलेली स्थिती ही आजही १९५० च्या दशकाच्या सुरुवातीला होती तशीच आहे.

स्त्रियांनी कितीही तांत्रिक किंवा व्यावसायिक प्रशिक्षण घेतले, तरी त्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक असमानतेचा फटका सहन करावा लागतो. आजही त्यांच्या वाटयाला कमी पगाराच्या नोकऱ्या येतात.

महामारीचा फटका नोकरदार स्त्रियांना

आजकाल चांगल्या नोकऱ्या, ज्यामध्ये करिअरच्या चांगल्या संधी आहेत, त्या कमी होत चालल्या आहेत. करारावर आधारित नोकऱ्या अधिक आहेत. सीएमआयईच्या अभ्यासानुसार, नोकरदार स्त्रियांसाठी हा खूप कठीण काळ आहे.

साथीच्या आजारामुळे नोकऱ्या कमी झाल्या आहेत. ७१ टक्के पुरुष, तर ११ टक्के स्त्रिया नोकरी करतात. असे असूनही, स्त्रियांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण तब्बल १७ टक्के आहे, तर पुरुषांमध्ये ते यापेक्षा खूपच कमी म्हणजे फक्त ६ टक्के आहे. याचा अर्थ असा की, नोकरी शोधणाऱ्या खूप कमी स्त्रिया आहेत आणि पुरुषांच्या तुलनेत त्यांना नोकरी मिळणे खूप अवघड आहे. नोकरीच्या क्षेत्रात स्त्रियांशी केल्या जाणाऱ्या भेदभावामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सीएमआयईच्या आकडेवारीनुसार, २०१९-२० मध्ये स्त्री कामगारांची संख्या केवळ १०.७ टक्के होती तर लॉकडाऊनच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल २०२० मध्ये १३.९ टक्के  स्त्रियांना नोकरी गमवावी लागली होती. नोव्हेंबर २०२० पर्यंत, बहुतेक पुरुषांनी त्यांच्या नोकऱ्या परत मिळवल्या होत्या, परंतु स्त्रियांच्या बाबतीत असे होऊ शकले नाही. नोव्हेंबर, २०२० पर्यंत, ४९ टक्के स्त्रियांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या होत्या, मात्र फार कमी स्त्रियांना काम परत मिळू शकले.

ऑनलाइन प्रोफेशनल नेटवर्क ‘लिंक्डइन अपॉर्च्युनिटी-२०२१’ ने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की,  साथीच्या रोगामुळे स्त्रियांवर अधिक परिणाम झाला आहे आणि त्यांना अधिक दबावाचा सामना करावा लागत आहे. हे सर्वेक्षण १८ ते ६५ वर्षे वयोगटातील लोकांवर ऑनलाइन करण्यात आले होते, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, जपानसह ७ देशांतील लोक सहभागी झाले होते.

सर्वेक्षणानुसार, कोरोना महामारीचा परदेशात काम करणाऱ्या स्त्रियांपेक्षा भारतातील नोकरदार स्त्रियांवर जास्त परिणाम झाला. ९० टक्के स्त्रिया कोरोनामुळे दबावाखाली आहेत. संपूर्ण आशिया पॅसिफिक देशांमध्ये स्त्रियांना काम आणि पगारासाठी खूप संघर्ष करावा लागतो आणि अनेक ठिकाणी भेदभावाला सामोरे जावे लागते. २२ टक्के स्त्रियांचे असे म्हणणे आहे की, त्यांना पुरुषांसारखे प्राधान्य दिले जात नाही.

देशातील ३७ टक्के नोकरदार स्त्रियांच्या मते, त्यांना पुरुषांपेक्षा कमी संधी मिळतात. २५ टक्के पुरुषही या मताशी सहमत आहेत. या स्त्रियांचे म्हणणे असे आहे की, त्यांना पुरुषांपेक्षा कमी पगार मिळतो.

कार्यालयीन कामासह घर सांभाळण्याची जबाबदारी

तरुणी जेव्हा नोकरीसाठी बाहेर पडतात तेव्हा सुरुवातीला त्यांना नोकरी मिळणे खूप कठीण होते. घर आणि मातृत्वाच्या जबाबदारीमुळे तिला नोकरी मिळवण्यात अडचणी येऊ लागतात. कुटुंबातील सदस्य तिला घर सांभाळण्याचा सल्ला देतात.

नोकरीच्या ठिकाणी स्त्रीला कराव्या लागणाऱ्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले जाते आणि ती हसतमुख चेहऱ्याने स्वयंपाक करण्यासाठी वेळेवर घरी येईल, घर आणि मुलांची काळजी घेईल, स्वच्छता करेल, अशी अपेक्षा केली जाते. त्यामुळेच मुली नोकरीतील अधिक जबाबदारीचे पद घेणे टाळतात.

कार्यालयातील वरिष्ठही मुलींना महत्त्वाची पदे देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतात. कुठेतरी ते हेही लक्षात ठेवतात की, लग्नानंतर तिला नोकरी करण्यात किंवा नोकरीवरील जबाबदाऱ्या पार पाडण्यात अडचणी येऊ शकतात. म्हणूनच ते तिला कमी महत्त्वाच्या पदावर ठेवतात. स्त्रियांनाही या सर्व परिस्थितीची जाणीव असल्यामुळे त्या साध्या कामाला महत्त्व देतात. जवळपास दोन तृतीयांश नोकरदार स्त्रियांना कौटुंबिक आणि घरगुती जबाबदाऱ्यांमुळे कामाच्या ठिकाणी अशा प्रकारच्या भेदभावाचा सामना करावा लागतो.

कमी पगाराची नोकरी

गृहिणी आपल्या घरच्या सुनेला अशी नोकरी करण्याचा सल्ला देते जिथे कमी वेळ द्यावा लागेल आणि पगार कमी असला तरी कार्यालयही जवळपास असेल. तुझ्या पगारावर घर चालत नाही, मग पगाराच्या मागे लागून घरच्या जबाबदाऱ्यांकडे का पाठ फिरवायची, असा त्यांचा युक्तिवाद असतो.

या सर्व गोष्टींमुळे नकळत स्त्रिया कमी पगाराच्या नोकऱ्यांकडे ढकलल्या जातात. घर आणि मुले सांभाळण्यात गुंतलेल्या स्त्रिया हळूहळू चांगली नोकरी आणि करिअरची स्वप्नं विसरून जातात आणि स्वत:ला कुटुंबात बंदिस्त करायला शिकतात.

लग्नानंतर, बहुतेक स्त्रियांनी नोकरी न करणे किंवा कमी पगाराची नोकरी करणे यामागील एक कारण म्हणजे त्यांना नोकरी करायची असूनही त्यांच्यावर अनेक बंधने लादली जातात. उदाहरणार्थ, घरातील वडीलधारी मंडळी स्त्रीला सल्ला देतात की, तिने संध्याकाळी ७ वाजायच्या आत घरी यायलाच हवे.

अतिआवश्यक असूनही तिला मिटींगसाठी दुसऱ्या शहरात जाण्याची परवानगी कुटुंबाकडून मिळत नाही. याउलट घरातला कोणताही सदस्य आजारी असेल तर सर्वप्रथम तिलाच सुट्टी घ्यावी लागते.

कोणत्याही घरात, पुरुष हा कमावणारा मुख्य सदस्य मानला जातो. स्त्रियांना पुढे येण्याची संधी कमी मिळते. स्त्रीही कमी पगाराची नोकरी करते, कारण ती नोकरी करते की नाही, हे घरच्यांसाठी महत्त्वाचे नसते. त्यामुळेच तिला अनेकदा अशी नोकरी शोधण्याचा सल्ला दिला जातो, जिथे पगार कमी असला तरी घरातली कामेही ती सहज करू शकेल.

शहरांमध्ये जास्त वाईट परिस्थिती

सीएमआयईच्या कंझ्युमर पिरॅमिड्स हाऊसहोल्ड सव्हेमध्ये भारतीय स्त्रीच्या नोकरीमधील सहभागाबाबतचे २ अनपेक्षित पैलू दिसून आले. यातील सर्वात पहिला म्हणजे, शहरांतील सुशिक्षित स्त्रियांपेक्षा ग्रामीण भागातील स्त्रिया जास्त कामाला जातात.

२०१९-२० मध्ये काम करणाऱ्या ग्रामीण महिलांची संख्या ११.३ टक्के तर शहरी महिलांची संख्या केवळ ९.७ टक्के होती. दोन्हीकडची परिस्थिती विभिन्न असली तरी शहरी सुशिक्षित स्त्रियांना नोकरीच्या अधिकाधिक संधींची अपेक्षा असणे स्वाभाविक असते. वास्तव मात्र याच्या उलट आहे. दुसरे म्हणजे, तरुणींना चांगली नोकरी मिळवण्यात अधिक अडचणी येतात.

दुसऱ्या एका अभ्यासानुसार, गावातील स्त्रिया शहरी लोकसंख्येच्या तुलनेत घराबाहेर जास्त काम करतात. गावांमध्ये ३५ टक्के पेक्षा जास्त स्त्रिया शेतात काम करतात आणि यातील ४५ टक्के स्त्रिया वर्षभरात ५० हजार रुपयेही कमवू शकत नाहीत. यातील केवळ २६ टक्के स्त्रिया त्यांच्या इच्छेनुसार पैसे खर्च करण्यास सक्षम असतात.

शहरी भागात, २ ते ५ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबात केवळ १३ टक्के स्त्रिया कामावर जातात, तर ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न गटात ही टक्केवारी केवळ ९ आहे. याचप्रमाणे ५० हजार ते ५ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांमध्ये गावात काम करणाऱ्या महिलांची टक्केवारी १६ ते १९ आहे.

हिंसा आणि लैंगिक शोषण

अलीकडेच ‘हर रिस्पेक्ट’ या स्वयंसेवी संस्थेने भारतीय कारखान्यांतील स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचारावर आधारित डेटा प्रकाशित केला आहे. हा डेटा प्रामुख्याने एका अभ्यासावर आधारित आहे. कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या ११,५०० स्त्री आणि पुरुष तसेच कामावरील त्यांचे व्यवस्थापक यांचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला. या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांना लैंगिक असमानतेचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले. यात रोजगार, वेतनाचाही समावेश आहे. ही आकडेवारी भारतीय समाजात स्त्रीसोबत होणारा भेदभाव, हिंसा आणि लैंगिक शोषण स्पष्टपणे दर्शवते.

या अभ्यासात सहभागी झालेल्या ३४ टक्के पुरुष आणि स्त्री कामगारांनी असे सांगितले की, अनेकदा अशी वेळ येते जेव्हा एखादी स्त्री स्वत:च तिला होणाऱ्या मारहाणीसाठी कारणीभूत असते. इतकेच नाही तर ३६ टक्के कामगारांनी हेदेखील मान्य केले की, जर एखाद्या पर्यवेक्षकाने स्त्री कर्मचाऱ्याकडे संभोगाची इच्छा व्यक्त केली आणि तीही त्यास तयार झाली तर तो लैंगिक छळ नाही. अहवालानुसार, २८ टक्क्यांहून अधिक लोकांनी पतीने पत्नीला मारहाण करणे गैर नसल्याचे सांगितले.

अशी अनेक कारणे या अभ्यासात देण्यात आली आहेत, ज्यामुळे घर किंवा कार्यालयात स्त्रियांवर अत्याचार होतात. याचे श्रेय पुरुषी सामाजिक जीवनसरणी आणि लिंगभेद आहे, जो स्त्रियांना पुरुषांच्या अधीन ठेवतो. सुरुवातीपासूनच असा मतप्रवाह रूढ झाला आहे की, सामाजिक आणि आर्थिकदृष्टया स्त्री ही पुरुषावर अवलंबून असते. अशा परिस्थितीत कुठेतरी स्त्रीला घर आणि कार्यालयात अपमानास्पद परिस्थितीला सामोरे जावे लागते जे अगदी स्वाभाविक आहे. पद असो किंवा पगार, स्त्रीमध्ये पुरुषांइतकीच क्षमता असूनही अनेकदा तिला दुय्यम स्थान दिले जाते.

विचारसरणीत बदल गरजेचा

यूएनडीपी (युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम)च्या अहवालात ७५ देशांतील लोकसंख्येचा अभ्यास करण्यात आला. जगातील सुमारे ८० टक्के लोकसंख्या या देशांमध्ये राहते. या अभ्यासानुसार, असे दिसून आले की, समानतेचा अधिकार मिळवण्यासाठी स्त्रियांना अनेक अदृश्य अडथळयांचा सामना करावा लागतो.

अहवालात सादर केलेल्या आकडेवारीनुसार, त्यात समाविष्ट असलेल्यांपैकी जवळपास निम्म्या लोकांना असे वाटते की, पुरुष हे सर्वोत्तम राजकीय नेते आहेत, तर ४० टक्के पेक्षा जास्त लोकांचे मत होते की, पुरुष चांगले व्यावसायिक, अधिकारी आहेत, म्हणूनच जेव्हा अर्थव्यवस्था मंदावते तेव्हा पुरुषांनाच अशा प्रकारचे काम किंवा नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत.

घरात मुलगा आणि मुलगी दोघेही असतील तर त्या मुलाला दुसऱ्या शहरात नोकरीसाठी पाठवायला कुणाची काहीच हरकत नसते, पण मुलीला मात्र फार तर छोटी-मोठी नोकरी करायला त्याच शहरात पाठवले जाते आणि तेही तिने घरच्यांची खूप समजूत काढल्यानंतर. अशा प्रकारच्या विचारसरणीत बदल होणे अत्यंत गरजेचे आहे.

आजही सामाजिक अडथळयांमुळे स्त्रियांना इच्छा असूनही आर्थिक विकासात हातभार लावता येत नाही. आर्थिक स्वातंत्र्याच्या कितीही गप्पा मारल्या तरी जोपर्यंत स्त्रियांचा विकास आणि स्वातंत्र्याकडे समानतेच्या विचारसरणीतून पाहिले जात नाही तोपर्यंत त्यांना संपूर्ण आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकत नाही.

मातृत्व किंवा करिअर

* पारुल भटनागर

शुभ्राला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला कारण की ती गर्भवती होती आणि डॉक्टरांनीही तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. असं असलं तरी, काही कंपन्यांना गर्भवती महिलांना नोकरीवर ठेवण्यास आवडत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे, यापुढे त्या नोकरीकडे पूर्ण लक्ष देण्यास सक्षम राहणार नाहीत, तथापि त्यांना आपल्या घरातील व बाहेरील जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात हे माहित असते. तरीही त्यांचे कौटुंबिक नियोजन हे त्यांच्या कारकीर्दीत अडथळा ठरते. हीच भीती त्यांना कुटुंब नियोजनाबद्दल विचार करू देत नाही.

सर्वेक्षण काय म्हणते

लंडन बिझिनेस स्कूलने केलेल्या नव्या सर्वेक्षणानुसार, ७० टक्के महिला आपल्या करिअरच्या ब्रेकमुळे काळजीत आहेत. त्यांच्यासाठी करिअर ब्रेक घेणे म्हणजे सहसा प्रसूती रजेसाठी वेळ काढून घेणे किंवा मुलांची काळजी घेण्यासाठी कामाच्या ठिकाणाहून मागे हटणे आहे.

गेल्या वर्षी लेबर पार्टीच्या संशोधनानुसार, ५० हजाराहून अधिक महिलांना प्रसूती रजेवरुन परत आल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.

कंपन्या मोठया प्रतिभा गमावतात

आज केवळ पुरुषच नाही तर स्त्रियादेखील प्रत्येक क्षेत्रात झेंडा फडकवित आहेत. तिने आपल्या प्रतिभेने हे सिद्ध केले आहे की ती एकटयाने सर्व काही करू शकते. त्यांनी आपली घरापर्यंत मर्यादीत असलेली प्रतिमा बदलली आहे. चला, अशा काही व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घेऊया ज्यांचे नाव जगभरात प्रसिद्ध आहे :

इंदिरा नुई, पेप्सीको कंपनीच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहिल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचा गौरवही करण्यात आला आहे.

चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात आयसीआयसीआय बँकेने भारतातील सर्वोत्कृष्ट बँक रिटेल पुरस्कार जिंकला आहे. तसे आजकाल चंदा कोचर अनेक घोटाळयांमध्ये आरोपी आहे.

मिताली राज एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी राहिल्या आहेत, त्यासाठी त्यांना अर्जुन पुरस्कार व पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. अशा परिस्थितीत जर आपण स्त्रियांना कमी लेखले असते तर त्या देशात नाव कसे कमवू शकल्या असत्या?

महिलांची विचारसरणी बदलली आहे

पूर्वी, जेथे महिला घराच्या चार भिंतींपर्यंतच मर्यादीत राहत असत आणि घरा-घरातील पुरुषच कुटुंबासाठी जबाबदार असत, परंतु आता वेळ आणि परिस्थिती बदलल्यामुळे महिलांनीही घराच्या आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सुरवात केली आहे. आता त्याही कुटुंबियांसमवेत खांद्याला खांदा लावून चालण्यास सुरवात केली आहे, आता त्यांचे लक्ष करियर बनवण्याकडे जास्त आहे.

कुटुंब नियोजनात विलंब

आजच्या महिलेस आपली उच्च पात्रता घरापर्यंतच मर्यादित ठेवणे मुळीच मान्य नाही. तिला पात्र झाल्यावरच लग्न करणे आवडते. कोणत्याही गोष्टीसाठी कोणासमोर गरजू बनणे तिला आवडत नाही. ती तिचा विचार करते आणि आपल्या योग्य जोडीदार शोधते तेव्हाच ती लग्न करते जेणेकरून कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या आडवी येऊ नये.

लग्नानंतर कुटुंबातील सदस्यांच्या वतीने कुटुंब नियोजनाबद्दल विचार करण्याविषयी दबाव वाढू लागतो. पण आजची पिढी यास उशीर करण्यातच समजदारी मानते, विशेषत: कार्यरत महिला. कौटुंबिक नियोजनामुळे त्या नोकरी गमवू इच्छित नाहीत. या भीतीने, त्या यास उशीर करतात.

जास्त पैसे कमविण्याची इच्छा देखील योग्य नाही

दिल्लीच्या केशव पुरम भागात राहणारी प्रीती आयटी क्षेत्रात काम करते. तिचा नवरादेखील याच व्यवसायात आहे. त्यांच्या लग्नाला ६ वर्ष झाली आहेत. आता जेव्हा त्यांना वाटले की त्यांची लाईफ सेटल झाली आहे, तेव्हा त्यांनी मुलं जन्मास घालण्याबद्दल विचार केला. पण त्यांना यश मिळालं नाही. वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांना हे समजले की वय जास्त झाल्याने आणि इतर कारणांमुळे त्यांना आई होण्यास समस्या येत आहे. आता केव्हा ती आई बनू शकेल, याचा विचार करून-करून तिचे आयुष्य तणावग्रस्त झाले आहे.

वर्क ऐट होमचा पर्यायदेखील

जर आपल्याला असे वाटत असेल की नोकरी म्हणजे फक्त ऑफिसमध्ये जाऊन काम करणे असते, तर असे नाही आहे. आपण घरी काम करूनदेखील जॉब सुरू ठेवू शकता.

आज इंटरनेटच्या जगात नोकऱ्यांची कमतरता नाही. फक्त मनात काहीतरी करण्याची उत्कटता होणे आणि आपल्याकडे कौशल्य असणे आवश्यक आहे. याद्वारे आपण आपल्या कारकीर्दीला ब्रेक लागण्यापासून थांबवू शकता आणि याचा कौटुंबिक नियोजनावरही परिणाम होणार नाही. घरातून स्वतंत्रपणे काम करू शकता, टिफिन सिस्टम, शिकवणी घेणे, भाषांतर कार्य, ब्लॉगिंग इ.

तर आता असे समजू नका की लग्न केल्याने आणि मूल जन्मास घातल्याने तुमच्या कारकीर्दिला ब्रेक लागेल.

वाचनानेच जाग येते

* भारतभूषण श्रीवास्तव

साधी राहणी उच्च विचारसरणी म्हणजेच साधी राहणी उच्च विचारसरणी मानणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. तरुण राहा, चांगले कपडे घाला, काळानुसार फॅशन करा, या गोष्टी काही अडचण नसतात, पण त्यांची विचारसरणी आणि मानसिकता कोणती असावी जी त्यांना त्यांच्या गंतव्यस्थानावर घेऊन जाऊ शकते, हा धडा 24 वर्षीय जागृती अवस्थीकडून घेतला जाऊ शकतो. भोपाळचा. ज्याने यावर्षी UPSC परीक्षेत देशभरात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

एका मध्यमवर्गीय कुटुंबातील, सडपातळ पण आकर्षक दिसणारी सुंदर जागृती भोपाळच्या शिवाजी नगरमध्ये असलेल्या सरकारी निवासस्थानात राहते. त्यांचे वडील सुरेश अवस्थी हे आयुर्वेदिक महाविद्यालयात होमिओपॅथीचे प्राध्यापक आहेत आणि आई मधुलता गृहिणी आहेत. एकुलता एक भाऊ सुयश मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आहे.

निकालाच्या दिवसापासून जागृतीच्या घरी प्रसारमाध्यमे आणि अभिनंदन करणाऱ्यांची झुंबड उडाली आहे. तिने हे स्थान कसे मिळवले हे प्रत्येकाला तिच्याकडून जाणून घ्यायचे आहे.

शेजारी असल्याने या प्रतिनिधीने त्याला लहानपणापासून पाहिले आहे. जागृती पहिल्यापासूनच सामान्य मुलांपेक्षा वेगळी आहे. त्याचे कुतूहल आणि निरागसपणा त्याला त्या ठिकाणी घेऊन गेला ज्याचे स्वप्न कोणत्याही तरुणाने पाहिले.

या प्रतिनिधीने त्यांच्याशी दीर्घकाळ संवाद साधला तेव्हा अनेक महत्त्वाच्या बाबी समोर आल्या, ज्यावरून असे दिसून येते की, एखादा माणूस केवळ आयएएस अधिकारी बनत नाही. या यशासाठी केवळ कठोर परिश्रम करावे लागत नाहीत तर भरपूर आनंद आणि मजा देखील सोडावी लागते. चला, जाणून घेऊया जागृतीच्या प्रवासाची कहाणी:

उच्च जोखीम उच्च लाभ

भोपाळ येथील एनआयटीमधून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर या सरकारी कंपनीत नोकरी लागल्यावर त्यांनी नागरी सेवांचा विचारही केला नव्हता. 95 हजार महिन्यांची अत्यंत महागडी नोकरी सोडणे ही मोठी जोखीम होती, त्यावर मित्र, नातेवाईक आणि हितचिंतकांनी त्यांच्या निर्णयाला एक प्रकारचा अज्ञान असल्याचे म्हटले होते. नोकरीबरोबरच तयारीही करता येते, म्हणजे नोकरी सोडण्याचा धोका पत्करू नका, असा सल्लाही काहींनी दिला.

पण जागृतीने धोका पत्करला आणि यश मिळवले. तरुणांनी धोका पत्करावा. त्यासाठी स्वत:वर विश्वास असणं गरजेचं असल्याचं ती म्हणते की, तिने जे ध्येय निवडलं आहे ते साध्य करून ते साध्य होईल. जर तुम्ही दृढनिश्चय केला आणि स्वतःला पूर्णपणे फेकून दिले तर जगातील कोणतेही काम कठीण नाही.

मासिके आवश्यक

जागृतीच्या आई-वडिलांनी तिच्या निर्णयावर कधीच आक्षेप घेतला नाही तर तिला नेहमीच प्रोत्साहन दिले. जेव्हा मुलं मोठी होऊ लागली तेव्हा मधुलताने आपल्या चांगल्या अभ्यासासाठी शिक्षकाची नोकरी सोडली. परंतु केवळ अभ्यासात अव्वल असणे हे कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील यशाची हमी म्हणून जागरूकता मानत नाही. त्यानुसार, तुम्ही भरपूर आणि प्रत्येक प्रकारचे साहित्य वाचले पाहिजे जे फक्त मासिके आणि पुस्तकांमध्ये आढळते. तरुणांनी सोशल मीडिया आणि टीव्ही, मोबाईलचा मर्यादित वापर केला पाहिजे.

जागृतीच्या घरातच टीव्ही नाही, त्यामुळे अभ्यासात अडथळा येत असे. ती सांगते की परीक्षेची तयारी करण्यासाठी तिने विविध पुस्तके वाचली, ज्यामुळे तिचे ज्ञान वाढले. ती लहानपणी चंपक खूप आवडीने वाचायची आणि आता सरिता, गृहशोभा यासह कारवां मासिकही वाचते. नियतकालिकांचा अभ्यास केल्याने तो व्यावहारिक आणि तार्किक बनला.

फक्त का आहे

जेव्हा जागृती काम करत होती, तेव्हा तिच्या लक्षात आले की, छोटे कर्मचारी त्यांच्या छोट्या-छोट्या कामांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेत असत. काहींचे काम झाले तर काहींनी केले नाही. या लोकांच्या अडचणी पाहून त्यांच्या मनातही आयएएस होण्याचा विचार आला. ती म्हणते की ती स्वतः बुदेलखंड भागातील छतरपूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातली आहे, त्यामुळे तिच्या बालपणात तिने ग्रामीण जीवनातील दुःख पाहिले आहे. आता त्या महिला व बालविकास विभागाला प्राधान्य ठेऊन काम करणार आहेत.

राजकीय हस्तक्षेप

नोकरशहांना अनेकदा राजकीय दबावाखाली निर्णय घ्यावे लागतात. अशी परिस्थिती कधी आली तर काय कराल? या प्रश्नावर त्या आत्मविश्वासाने म्हणाल्या की, आपण राजकीय दबावाखाली कोणताही निर्णय घेऊ असे वाटत नाही. देशाला संविधान आहे. आपल्या कक्षेत राहून निर्णय घेतील. जागृतीचे मत आहे की, कोणताही निर्णय हा सर्वसामान्य आणि उपेक्षित लोकांच्या हितासाठी संस्थात्मक पद्धतीने घेतला पाहिजे. देश कोणत्याही धर्मादाय संस्थेने नव्हे तर कराच्या पैशावर चालतो, ही बाब प्रत्येकाने लक्षात ठेवावी. जास्तीत जास्त काय बदली होईल, कोणाला पर्वा नाही.

महिला आरक्षण

जागृतीचे लक्ष सरन्यायाधीश एन व्ही रमण यांच्या विधानाकडे वेधण्यात आले ज्यात त्यांनी न्यायव्यवस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याची जोरदार वकिली केली होती, पण आरक्षण असायलाच हवे, पण ते कसे दिले जात आहे हे पाहणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण महिलांना वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागले पाहिजे कारण प्रत्येकाची स्थिती सारखी नसते आणि ती सुधारण्यासाठी स्त्री शिक्षण आणि जागृतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

डॉ भीमराव आंबेडकरांनी जातीवर आधारित आरक्षण देऊन शतकानुशतके शिक्षणापासून वंचित असलेल्या वर्गाचे भले केले होते. शहरांमध्ये परिस्थिती ठीक आहे, परंतु ग्रामीण भागात अद्याप या दिशेने बरेच काम होणे बाकी आहे.

लग्नाबद्दल

जागृतीची लग्नाबद्दलची दृष्टी अगदी स्पष्ट आहे. ती हसते आणि म्हणते की अनेक गोष्टींकडे बघून ती फक्त प्रतिपक्षाशीच लग्न करेल, पण त्यात तिला तिच्या पालकांची संमती असेल. याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्यही त्यांनी दिले आहे. माणसाला माणूस समजून घेण्याची तळमळ असणारा आणि तळागाळातल्या विचारसरणीचा असा जीवनसाथी हवाय.

तरुणांमध्ये संयम आणि समज आहे

आता अनेकांसाठी आदर्श बनलेल्या जागृतीने तोंडी मुलाखतीत एका क्षुल्लक प्रश्नावर अडखळले. प्रश्न असा होता: मध्य प्रदेशचा पिनकोड 4 ने सुरू होतो आणि कोणत्या राज्याचा पिनकोड 4 ने सुरू होतो. छत्तीसगडचे उत्तर अगदी सोपे होते कारण ते मध्य प्रदेशातून कोरले गेले होते. ती सांगते की मुलाखतीत अनेकदा असे घडते की उमेदवाराला अगदी छोट्या प्रश्नांचीही उत्तरे देता येत नाहीत.

ही भीती जागृतीच्या दृष्टीने स्वाभाविक असली, तरी तरुणांनी केवळ कोणत्याही मुलाखतीतच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक लढाईत संयम आणि समजूतदारपणा राखला पाहिजे. आजचा तरुण अनेक अनिश्चिततेत जगत आहे, पण आत्मविश्वास हे असे भांडवल आहे की ते त्यांना कधीही गरीब होऊ देत नाही.

जर तुम्हाला हमी नोकरी हवी असेल, तर करिअरला Apprentice चे चिलखत द्या

* लोकमित्र गौतम

जर तुम्ही अलीकडेच 10 वी किंवा 12 वी उत्तीर्ण असाल किंवा आधीच पदवीधर असाल. या मोठ्या सत्यापलीकडे सत्य. अर्थात, जर तुम्ही शिकाऊ विद्यार्थी असाल तर समजून घ्या की नोकरीची हमी आहे. दुसऱ्या शब्दात जर तुम्हाला हमी नोकरी हवी असेल तर 10 वी नंतर कधीही कोणत्याही प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाचा भाग व्हा आणि तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत नोकरी मिळेल.

बेरोजगारीच्या या भयावह काळातही प्रशिक्षणार्थींना १००% रोजगार मिळत आहे. 24 जून 2021 पर्यंत सुमारे 4000 प्रशिक्षणार्थींची रेल्वेमध्ये भरती होणार आहे. केवळ एक रेल्वेच नाही तर मे आणि जून महिन्यात अशा डझनभर सरकारी, गैरसरकारी, सार्वजनिक उपक्रम आणि बहुराष्ट्रीय कंपन्या प्रशिक्षणार्थीच्या रिक्त जागा काढतात. प्रशिक्षणार्थी म्हणजे एक प्रकारचा प्रशिक्षण कार्यक्रम. या कार्यक्रमांतर्गत पूर्णपणे नवीन लोकांना विशिष्ट क्षेत्रातील कामासाठी प्रशिक्षण दिले जाते.

परंतु हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांप्रमाणे उपलब्ध नाही. हे प्रशिक्षण प्रत्यक्षात प्रशिक्षित लोकांकडे नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे पूर्ण वेळ काम म्हणून उपलब्ध आहे. येथे या प्रशिक्षणार्थींना नियमित कामगार म्हणून पूर्ण वेळ काम करण्यासाठी बनवले जाते. ज्या संस्थेत प्रशिक्षणार्थी असतात, तेथे या प्रशिक्षणार्थींना समान नियम लागू होतात जे वेतनश्रेणी वगळता नियमित कामगारांना लागू होतात. प्रशिक्षणार्थी संस्थेच्या नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच कामावर येतात आणि त्यांना त्यांच्याप्रमाणे सुट्टीही मिळते.

अॅप्रेंटिसशिप सहा महिन्यांपासून चार वर्षांपर्यंत असते. विविध संस्थांमध्ये त्याचे वेगवेगळे नियम असतात. पण साधारणपणे रेल्वे, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया [SAIL] भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड (BHEL) सारख्या संस्थांमध्ये तीन ते चार वर्षांसाठी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण आहे. जर तुमची निवड झाली असेल तर समजून घ्या की आता तुम्हाला नोकरी मिळण्याची हमी आहे.

खरं तर, कोणतीही कंपनी अकुशल कामगारांची निवड करणार नाही जर समोर कुशल कामगार असतील तर त्याला पर्याय म्हणून शिकायला मिळेल. कारण भारतात अनेक चांगल्या तांत्रिक संस्था आहेत, सगळीकडे व्यावहारिक सुविधा जशा असाव्यात तशा नाहीत. पण अॅप्रेंटिसशिपमध्ये अगदी परिपूर्ण प्रशिक्षण आहे.

म्हणूनच प्रशिक्षणार्थीनंतर नोकरी मिळण्याची जवळजवळ हमी असते. जरी प्रशिक्षणार्थी दरम्यान कोणतेही लेखी आश्वासन दिले जात नाही. पण रेल्वे जवळजवळ १०० टक्के प्रशिक्षणार्थींना त्यांच्या नोकऱ्यांमध्ये ठेवते. हीच गोष्ट शिकाऊ शिक्षण देणाऱ्या इतर संस्थांमध्येही होते. ती लागू आहे. पण ती तुम्ही जिथे शिकाल तिथे कायमस्वरूपी नोकरी करणे आवश्यक नाही. ही तुमची निवड आहे. असंख्य इतर खाजगी संस्थादेखील ज्यांना शिकाऊ व्यक्ती आहेत त्यांना नोकऱ्या देतात.

apprenticeship चा एक फायदा म्हणजे तुम्ही काम शिकता, त्या दरम्यान तुम्हाला दरमहा नियमित पगारही मिळतो, जे साधारणपणे 5000 रुपयांपेक्षा जास्त आणि 9 ते 10 हजार रुपये दरमहा असते. बर्‍याच ठिकाणी, थोडे अधिकदेखील उपलब्ध आहे. हे असे म्हणायचे आहे की, प्रशिक्षणार्थी ही एक सुवर्ण संधी आहे, जी तुम्हाला केवळ एका विशिष्ट क्षेत्राचे व्यावहारिक ज्ञान देत नाही, तर या काळात कामासाठी पैसेदेखील देते आणि भविष्यातील कायमस्वरूपी नोकरीची संपूर्ण हमीदेखील देते. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की अनेक कंपन्या फ्रेशरला नोकरी देत ​​नाहीत. खरेतर, ते या प्रशिक्षणार्थींमुळे फ्रेशरला नोकरी न देता त्यांची गरज पूर्ण करतात. कारण जे युवक दरवर्षी लाखोंच्या संख्येने प्रशिक्षणार्थी संपवतात तेही नोकरी शोधणाऱ्यांच्या स्पर्धेत असतात, साहजिकच त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आशा आहे की तुम्हाला अॅप्रेंटिसशिपचे फायदे खूप चांगले समजले असतील.

जवळ राहा किंवा दूर, प्रेमाची जाणीव कायम असू द्या

* पूनम अहमद

जीवनाच्या सफरीत दिर्घकाळ एकमेकांची साथ निभावणं हाच विवाहाचा उद्देश असतो. मात्र, लाँग डिस्टन्स विवाहाचा आपल्या बहरणाऱ्या करिअरवर परिणाम का होऊ द्यावा? आजकालच्या अनेक तरुणींना आपली लाँग डिस्टन्स रिलेशनशिप आपल्या करिअरमध्ये अडथळा ठरावी, असे मुळीच वाटत नाही. या विषयावर अनेक विवाहितांशी बोलल्यावर व त्यांचे विचार जाणून घेतल्यावर, समाजातील बदल आता ठळकपणे दिसून येत आहेत.

वेगळं राहाणे सोपे नाही

मुंबईतील कविता टीव्ही मालिकांमध्ये काम करते. सात वर्षांपूर्वी तिचा विवाह दिल्लीच्या एका बिझनेसमॅनशी झाला होता. ती सांगते, ‘‘वेगळे राहणे सोपे नाही. खूप धाडस असावे लागते. एकमेकांवर विश्वास ठेवावा लागतो आणि एकमेकांना समजून घ्यावे लागते. आम्ही बऱ्याच वेळा फोनवरच बोलत असतो. व्हिडीओ कॉल करतो. आम्ही आमचे नाते आणखी चांगले बनविण्याचा प्रयत्न करतो. आम्ही रोज एकमेकांबद्दल माहिती घेत राहतो. २-३ महिन्यांनंतरच आमची भेट शक्य होते. अधूनमधून काही वेळा काम नसतं, तेव्हा आम्ही एकमेकांसोबत असतो. आम्ही जेव्हा कधी बऱ्याच कालावधीनंतर भेटतो, तेव्हा असे वाटते की, हरविलेले प्रेम परत मिळाले आहे. इथे मुंबईमध्ये मी माझ्या आईवडिलांसोबत राहते. जेव्हा मुंबईमध्ये असते, तेव्हा पती आणि सासरची प्रत्येक गोष्ट आठवत राहते. दिल्लीमध्ये असते, तेव्हा पेरेंट्सची आठवण येते.’’

नात्यात विश्वास आवश्यक

अंधेरी, मुंबई निवासी सीमा बंसलने दुबईचे रहिवासी अनिल मेहरांशी विवाह केला आहे. सीमाने तिकडे जाऊन घरसंसार सांभाळताच, तिला मुंबईमध्ये ड्रेस डिझायनिंगचे एक नवीन काम मिळाले. तेव्हापासून ती दर महिन्याला १५ दिवसांसाठी मुंबईमध्ये येते. सीमाने आपल्या अनुभवांबाबत सांगितले, ‘‘आता जीवन खूप सुंदर वाटते. मी दुबईला शिफ्ट झाले होते. कारण मला माझ्या संसारावर लक्ष केंद्रित करायचे होते, पण मला आलेली ही ऑफर नाकारायला माझे मन मानले नाही. माझ्या सासरची मंडळी आधुनिक आणि विकसित विचारसरणीची आहेत. त्यांना मला पारंपरिक सून बनवून ठेवायचे नव्हते. अनिल माझे सर्वात उत्तम मित्र आहेत. त्यांना चांगल्याप्रकारे माहीत आहे की, ते माझ्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण आहेत आणि तेच माझी दुनिया आहेत. आमचे अफेअर दोन वर्षांपर्यंत चालू होते. तरीही हे लाँग डिस्टन्स रिलेशनच होते. खरे तर दूर राहण्यामुळे आम्ही एकमेकांना चांगल्याप्रकारे जाणू शकलो. आमचे छंदही एकसारखेच आहेत आणि आम्ही एकमेकांच्या स्पेसचा सन्मान करतो. आमच्या नात्यात विश्वास आणि अंडरस्टँडिंगसारख्या या दोन मजबूत गोष्टी आहेत. मी जेव्हा मुंबईत असते, तेव्हा मला त्यांची खूप आठवण येते.’’

एक नवीन अनुभव

गीता देसाई दिल्लीत एक मॉडेल आहे. तिने यूएसला राहणाऱ्या वॉलेंटियोसोबत विवाह केला आहे. तीसुद्धा आता तिथेच राहते, परंतु तिला जेव्हा एखाद्या शोची ऑफर येते, तेव्हा ती दिल्लीला येते. ती सांगते, ‘‘या विवाहाने मला एक ताकद, एक संतुलन दिले आहे. आता मला जास्त सेफ, रिलॅक्स आणि तणावमुक्त वाटते. ते खूप अंडरस्टँडिंग आहेत. मी माझं प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफ ज्या पद्धतीने बॅलन्स करते, हे पाहून ते खूप खूश होतात. खूप दिवसांनंतर होणारी भेट नेहमीच एक वेगळा अनुभव देते. विश्वास आणि सन्मान लाँग डिस्टन्स रिलेशनशिपच्या दोन महत्त्व पूर्ण गोष्टी आहेत. मी स्वत:ला खूप सुखी समजते. मी अनेक प्रकारचे कल्चर, परंपरा, लोक आणि लाइफस्टाईलचा अनुभव घेतेय.’’

आपसातील प्रेम आणि सहयोग आवश्यक

मुंबईची अभिनेत्री नीता बंसलचे म्हणणे आहे, ‘‘माझे पती कोलकातामध्ये राहतात. लग्नानंतर मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला होता, पण माझे पती आणि सासूबाईंनी ६ महिन्यांनंतर मला काम करण्यासाठी सूट दिली. त्यांनी मला माझ्या मर्जीने काम करण्यास सांगितले. त्याच वेळी मला एका मालिकेची ऑफर आली होती, मग मी मुंबईला आले. अर्थात, व्हिडीओ चॅट होत असते, माझ्या पतीचेही मुंबईला कामानिमित्त येणे होत असे. कधी मी तिकडे जाते, तर कधी सर्वांना इकडे बोलावते.’’

या सर्वांचे विचार जाणून घेतल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतरच्या विवाहात सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे, एकमेकांवरील विश्वास आणि अंडरस्टँडिंग. तसे पाहिले तर या गोष्टी प्रत्येक विवाहात आवश्यक आहेत, पण दररोज सोबत राहूनही नात्यात कडवटपणा येतो आणि अनेक वेळा दूर राहूनही प्रेम टिकून राहते. आजकाल तरुणीही आपल्या करिअरसाठी खूप मेहनत करतात. अशा वेळी विवाहानंतर सर्व मेहनतीवर पाणी फेरले जाणे, ही गोष्ट त्यांना आवडत नाही. या स्थितीत जीवनसाथी आणि सासरच्या लोकांकडून थोडा सहयोग मिळाला, तर त्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमध्ये यशस्वी होऊन जीवनाचा आनंद लुटू शकतात. मात्र, आपसातील प्रेम आणि सहयोगावर सर्व अवलंबून असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें