* पारुल भटनागर

शुभ्राला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला कारण की ती गर्भवती होती आणि डॉक्टरांनीही तिला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. असं असलं तरी, काही कंपन्यांना गर्भवती महिलांना नोकरीवर ठेवण्यास आवडत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे, यापुढे त्या नोकरीकडे पूर्ण लक्ष देण्यास सक्षम राहणार नाहीत, तथापि त्यांना आपल्या घरातील व बाहेरील जबाबदाऱ्या कशा पार पाडाव्यात हे माहित असते. तरीही त्यांचे कौटुंबिक नियोजन हे त्यांच्या कारकीर्दीत अडथळा ठरते. हीच भीती त्यांना कुटुंब नियोजनाबद्दल विचार करू देत नाही.

सर्वेक्षण काय म्हणते

लंडन बिझिनेस स्कूलने केलेल्या नव्या सर्वेक्षणानुसार, ७० टक्के महिला आपल्या करिअरच्या ब्रेकमुळे काळजीत आहेत. त्यांच्यासाठी करिअर ब्रेक घेणे म्हणजे सहसा प्रसूती रजेसाठी वेळ काढून घेणे किंवा मुलांची काळजी घेण्यासाठी कामाच्या ठिकाणाहून मागे हटणे आहे.

गेल्या वर्षी लेबर पार्टीच्या संशोधनानुसार, ५० हजाराहून अधिक महिलांना प्रसूती रजेवरुन परत आल्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.

कंपन्या मोठया प्रतिभा गमावतात

आज केवळ पुरुषच नाही तर स्त्रियादेखील प्रत्येक क्षेत्रात झेंडा फडकवित आहेत. तिने आपल्या प्रतिभेने हे सिद्ध केले आहे की ती एकटयाने सर्व काही करू शकते. त्यांनी आपली घरापर्यंत मर्यादीत असलेली प्रतिमा बदलली आहे. चला, अशा काही व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घेऊया ज्यांचे नाव जगभरात प्रसिद्ध आहे :

इंदिरा नुई, पेप्सीको कंपनीच्या अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहिल्या आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचा गौरवही करण्यात आला आहे.

चंदा कोचर आयसीआयसीआय बँकेच्या एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राहिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात आयसीआयसीआय बँकेने भारतातील सर्वोत्कृष्ट बँक रिटेल पुरस्कार जिंकला आहे. तसे आजकाल चंदा कोचर अनेक घोटाळयांमध्ये आरोपी आहे.

मिताली राज एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी राहिल्या आहेत, त्यासाठी त्यांना अर्जुन पुरस्कार व पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. अशा परिस्थितीत जर आपण स्त्रियांना कमी लेखले असते तर त्या देशात नाव कसे कमवू शकल्या असत्या?

महिलांची विचारसरणी बदलली आहे

पूर्वी, जेथे महिला घराच्या चार भिंतींपर्यंतच मर्यादीत राहत असत आणि घरा-घरातील पुरुषच कुटुंबासाठी जबाबदार असत, परंतु आता वेळ आणि परिस्थिती बदलल्यामुळे महिलांनीही घराच्या आणि बाहेरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास सुरवात केली आहे. आता त्याही कुटुंबियांसमवेत खांद्याला खांदा लावून चालण्यास सुरवात केली आहे, आता त्यांचे लक्ष करियर बनवण्याकडे जास्त आहे.

कुटुंब नियोजनात विलंब

आजच्या महिलेस आपली उच्च पात्रता घरापर्यंतच मर्यादित ठेवणे मुळीच मान्य नाही. तिला पात्र झाल्यावरच लग्न करणे आवडते. कोणत्याही गोष्टीसाठी कोणासमोर गरजू बनणे तिला आवडत नाही. ती तिचा विचार करते आणि आपल्या योग्य जोडीदार शोधते तेव्हाच ती लग्न करते जेणेकरून कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या आडवी येऊ नये.

लग्नानंतर कुटुंबातील सदस्यांच्या वतीने कुटुंब नियोजनाबद्दल विचार करण्याविषयी दबाव वाढू लागतो. पण आजची पिढी यास उशीर करण्यातच समजदारी मानते, विशेषत: कार्यरत महिला. कौटुंबिक नियोजनामुळे त्या नोकरी गमवू इच्छित नाहीत. या भीतीने, त्या यास उशीर करतात.

जास्त पैसे कमविण्याची इच्छा देखील योग्य नाही

दिल्लीच्या केशव पुरम भागात राहणारी प्रीती आयटी क्षेत्रात काम करते. तिचा नवरादेखील याच व्यवसायात आहे. त्यांच्या लग्नाला ६ वर्ष झाली आहेत. आता जेव्हा त्यांना वाटले की त्यांची लाईफ सेटल झाली आहे, तेव्हा त्यांनी मुलं जन्मास घालण्याबद्दल विचार केला. पण त्यांना यश मिळालं नाही. वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांना हे समजले की वय जास्त झाल्याने आणि इतर कारणांमुळे त्यांना आई होण्यास समस्या येत आहे. आता केव्हा ती आई बनू शकेल, याचा विचार करून-करून तिचे आयुष्य तणावग्रस्त झाले आहे.

वर्क ऐट होमचा पर्यायदेखील

जर आपल्याला असे वाटत असेल की नोकरी म्हणजे फक्त ऑफिसमध्ये जाऊन काम करणे असते, तर असे नाही आहे. आपण घरी काम करूनदेखील जॉब सुरू ठेवू शकता.

आज इंटरनेटच्या जगात नोकऱ्यांची कमतरता नाही. फक्त मनात काहीतरी करण्याची उत्कटता होणे आणि आपल्याकडे कौशल्य असणे आवश्यक आहे. याद्वारे आपण आपल्या कारकीर्दीला ब्रेक लागण्यापासून थांबवू शकता आणि याचा कौटुंबिक नियोजनावरही परिणाम होणार नाही. घरातून स्वतंत्रपणे काम करू शकता, टिफिन सिस्टम, शिकवणी घेणे, भाषांतर कार्य, ब्लॉगिंग इ.

तर आता असे समजू नका की लग्न केल्याने आणि मूल जन्मास घातल्याने तुमच्या कारकीर्दिला ब्रेक लागेल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...