* प्रतिनिधी

मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले की, जर श्वेता तिवारी व्यस्त अभिनेत्री असेल आणि ती आपल्या ५ वर्षांच्या मुलाची काळजी स्वत: घेऊ शकत नसेल तर हे चुकीचे आहे. श्वेता तिवारीचा तिचे पती अभिनव कोहली याच्यासोबत मुलाच्या ताब्यावरून वाद सुरू आहे आणि दोघांमध्ये घटस्फोटाचा खटला सुरू आहे. मुलगा सध्या श्वेता तिवारीसोबत राहत आहे आणि अभिनव त्याला भेटूही शकत नाही.

अभिनवचे म्हणणे होते की, त्याच्याजवळ मुलाला सांभाळण्याइतका भरपूर वेळ आहे. श्वेता मात्र तिच्या चित्रिकरणामध्ये कायम व्यस्त असते. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. एस. शिंदे आणि एन. जे. जामदार यांनी मुलाला आठवडयातून २ तासांसाठी भेटण्याची आणि ३० मिनिटांसाठी व्हिडीओ कॉल करण्याची मुभा अभिनव यांना दिली, पण त्यापेक्षा जास्त वेळ दिला नाही.

आई अनेकदा आपल्या पतीला त्रास देण्यासाठी मुलावर संपूर्ण अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करत असते. ती विविध प्रकारचे आरोप करून पतीचा पिता असल्याचा अधिकारही हिरावून घेऊ इच्छित असते. हीच अशा विवाहातील सर्वात मोठी शोकांतिका असते.

एकदा मूल झाल्यानंतर पित्याच्या मनात मुलासाठी एक स्वाभाविक आणि नैसर्गिक ओढ निर्माण होते. जगातील सर्व दु:ख विसरून, आपली सर्व संपत्ती देऊन त्याला फक्त मुलाची सोबत हवी असते. आईला मात्र त्या पित्याला त्रास दिल्याचे सुख मिळते. आई या नात्याने जिने ९ महिने मुलाला गर्भात वाढवले, त्याला आपले दूध पाजले, जिने रात्रभर जागून त्याचे लंगोट बदलले तिला मुलाचा संपूर्ण अधिकार स्वत:कडे हवा असतो आणि त्यासाठीच ती मुलाच्या पित्याला त्रास देते.

जिथे गोष्ट पैशांची येते तिथे थोडाफार मान ठेवला जातो, पण जिथे पत्नी चांगली कमावती असते तिथे पतीकडून मिळालेल्या पैशांच्या मोबदल्यात मुलासोबत राहण्याचा हक्क तिला गमवायचा नसतो. जेव्हा की, मूल त्या दोघांचेही असते.

पिता मोजकेच बोलतो, मोजकेच ऐकतो. आई सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काही ऐकून घ्यायला तयार असते. आईच्या प्रेमात वात्सल्य दडलेले असते. याउलट पित्याचे प्रेम तार्किक, व्यावहारिक, थोडेसे रुक्ष वाटते. जरी आईने दुसरे लग्न केले असले आणि दुसऱ्या नवऱ्यापासून तिला मुले झाली असली तरीही पित्यासोबत राहणारी मुलेही सतत पळून आईकडेच धाव घेतात. मुलींना तर पित्याबाबत खूपच उशिरा ओढ निर्माण होते, तीही जेव्हा त्यांना एखाद्या संरक्षकाची गरज असते तेव्हाच ही ओढ जाणवते.

मुंबई उच्च न्यायालयाचा सल्ल त्यांच्या दृष्टीने योग्य आहे की, नोकरी करणारी व्यस्त आईही आपल्या मुलाची काळजी चांगल्या प्रकारे घेऊ शकते. तिच्याकडे पैसे असतील तर ती मुलाची सुरक्षा आणि त्याची देखभाल करणाऱ्यांची व्यवस्था करू शकते. जर पतीपत्नी सुसंवादाने संसार करत असतील आणि दोघेही नोकरीला जात असतील तर त्यांच्या मुलांना स्वयंपाकी आणि आयाच तर सांभाळतात. आजकाल मुलाची आजीही मग ती आईची आई असो किंवा वडिलांची आई असो, ती नातवंडाचा सांभाळ करायला नकार देते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...