* पारुल भटनागर

लग्नाला काही महिने होत नाही तोच नवपरिणीत जोडप्यांना प्रत्येकजण फक्त एकच प्रश्न विचारत राहतं की केव्हा देणार गुड न्यूज, लवकर तोंड गोड करा, आता तर आजीकाकी ऐकायला कान आतुर झालेत. जास्त उशीर करू नका नाहीतर नंतर समस्या निर्माण होतील. अनेकदा अशा गोष्टी ऐकून कान विटतात आणि असे प्रश्न अनेकदा नात्यांमध्ये दरार निर्माण करतात. अशावेळी गरजेचं असतं ते म्हणजे या प्रश्नांची उत्तरं अशा हुशारीने द्यायची की ज्यामुळे कोणाला वाईटही वाटणार नाही आणि तुम्ही स्वत:ला तणावापासून दूर ही ठेवाल.

कसं कराल हुशारीने हॅन्डल

जेव्हा असाल जेवणाच्या टेबलावर : अनेकदा अशा प्रकारच्या गोष्टी जेवणाच्या टेबलावर होतात कारण इथे संपूर्ण कुटुंब एकत्र असतं आणि सगळे आरामात असतात. अशावेळी जेव्हा तुमची आई तुम्हाला बोलेल की आता कुटुंबाबाबत विचार करा तेव्हा तुमचा मूड खराब करून घेऊ नका. कारण मोठयाकडून आपण अशा प्रकारच्या प्रश्नांची आशा करतो. उलट त्यांना होकार देऊन विषय असा बदला की आई आज जेवण जरा जास्तच टेस्टी बनलंय, आई तुम्ही तर जगातल्या सर्वात बेस्ट शेफ आहात वगैरे बोलून विषयांतर करा. यामुळे तुमचा मूडदेखील खराब होणार नाही आणि विषयांतरदेखील होईल.

चेष्टामस्करी करत करा बोलती बंद : भारतीय संस्कृतीत लोकांना स्वत:पेक्षा दुसऱ्यांची चिंता अधिक असते. तुमचा मुलगा वा मुलगी वयाने एवढी मोठी झालीय वा अजून लग्न नाही झालंय. लग्नाला ४ वर्ष झालीत अजून मुलबाळ नाही झालं. अगदी मित्रमैत्रिणीदेखील टोमणे मारल्याशिवाय राहत नाहीत. अशावेळी या गोष्टी मनाला लावून घेऊ नका उलट त्या चेष्टामस्करीत घ्या की तू जर सांभाळणार असशील तर मी आजच सुरुवात करते, बोलून हे बोलून बोलून हसत रहा, यामुळे त्यांची बोलतीदेखील बंद होईल आणि चेष्टामस्करीत तुमचं कामदेखील होईल.

नातेवाईकांसमोर बोल्ड रहा : जेव्हा कुटुंबातील लोक एकत्र येतात तेव्हा मग ती मुलं असो वा मोठे सगळे मजामस्तीच्या मूडमध्ये येतात, कारण दीर्घ कालावधीनंतर सगळे भेटतात. अशावेळी नातेवाईक मूल होण्याबाबत काय ठरवलंय हे विचारल्याशिवाय राहत नाहीत. अशावेळी यागोष्टीवर भडकून वातावरण बिघडवू नका, उलट बोला आम्हीच अजून मुलं आहोत, अजून आमचंच वय मस्ती करण्याचं आहे. तुमचं हे उत्तर ऐकून बोलणारे समजून जातील की यांना याबाबत बोलण्यात काहीच फायदा नाहीये.

स्वत:ला मानसिकरित्या तयार ठेवा : लग्न झालं तर मुलंदेखील होतील आणि याबाबत प्रश्नदेखील विचारले जातीलच. म्हणून जेव्हा केव्हा पण याबाबत विचारलं जाईल तेव्हा उदास होण्याऐवजी त्यांना प्रेमाने सांगा की नुकतंच आमच नवीन आयुष्य सुरु झालंय आणि काही गोष्टी सेटल करण्यात थोडा वेळ लागेल. जेव्हा सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा प्लॅन करण्याबाबत विचार करू. तुमच्या या उत्तरानंतर कोणीदेखील तुम्हाला वारंवार विचारणार नाही.

लाजू नका मोकळेपणाने बोला : जेव्हा पण याविषयावर बोलणं होतं तेव्हा एकतर आपण लाजतो वा त्या जागेतून उठून निघून जातो. भलेही हा विषय थोडा संकोच करण्यासारखा असला तरी तुम्ही तुमचं बोलणं मोकळेपणाने सर्वांसमोर मांडलं नाही तर लोक वेगळाच गैरसमज करून घेतील. एक लक्षात घ्या की याबाबत अंतिम निर्णय तुमचाच असणार, कोणीही तुमच्यावर त्यांचा निर्णय थोपवू शकणार नाही. म्हणून जेव्हा पण याबाबत बोलणं होईल तेव्हा त्यांना सांगा की आम्ही याबाबत विचार नाही करत आहोत, जेव्हा गोड बातमी असेल तेव्हा सर्वात अगोदर तुम्हालाच सांगू.

कायम सोबत करा : लग्नाला अनेक वर्ष झाली आहेत आणि मूल होत नसेल तर पतिपत्नीला आतल्या आत त्रास होतो आणि इतरांनी याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर अनेकदा एवढा संताप येतो की उलट उत्तरं द्यावस वाटतं. परंतु तुम्ही असं चुकूनही करू नका, कारण यामुळे तुमचीच इमेज खराब होईल. म्हणून एकमेकांचा आधार बना आणि ठरवा की जर कोणी याबाबत विचारलं तर काय उत्तर द्यायच आहे.

अशा प्रकारे तुम्ही स्वत:ला तणावमुक्त ठेवू शकाल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...