* शिखा जैन

उत्सव आयुष्य आनंदी आणि नाती मजबूत बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. ते जगण्यात उत्साह आणि उल्हासाचा रंग भरतात. इतकेच नाही तर नटण्यासजण्याची, नवे नवे पदार्थ चाखण्याचीही संधी देतात.

उत्सव सणांमुळे नातेवाईकांच्या भेटीगाठी होतात. नात्यांमध्ये आलेला दुरावासुद्धा या सेलिब्रेशनमुळे दूर होतो. चला मग, या उत्सवांमध्ये जुने मित्र आणि नातेवाईकांपासून नात्यांची नवी सुरूवात करू, जेणेकरून जीवनात फक्त आणि फक्त आनंद आणि प्रेम मिळत राहील.

नात्यांचे महत्त्व

नाती सुगंधी फुलांप्रमाणे असतात, जी आपल्या आयुष्यात टवटवी आणि आनंद भरतात. नाती नसतील तर कुठलाही आनंद व्यक्त करण्याला आणि साजरा करण्याला काही अर्थच उरणार नाही. दु:ख असो की आनंद जोपर्यंत ते आपल्या जिवाभावाच्या माणसासोबत शेअर करत नाही तोवर त्याचे महत्त्व कळत नाही. आपल्या भल्याबुऱ्या काळात आपल्याला सांभाळणारी आणि ही जाणीव निर्माण करून देणारी नातीच तर असतात जी सांगततात की आपण एकटे नाहीत आणि आपल्यासोबत प्रत्येक क्षणी आहेत. आणि हेच कारण आहे की सणावारांच्यावेळी त्यांची कमतरता जाणवते. म्हणून नाती इतकी मजबूत बनवा की प्रत्येक सण उत्साहाने सोबत साजरे कराल.

नातेवाईकांशी संबंध वाढवण्यासाठी सण उत्सव हा उत्तम पर्याय : कधी कोणाला कशा प्रकारे मदतीची गरज भासेल सांगता येत नाही. गरज भासल्यास मित्र आणि नातेवाईकांकडूनच मदतीची अपेक्षा करता येऊ शकते. पण असे तेव्हाच होऊ शकते, जेव्हा त्यांच्याशी आपले संबंध चांगले असतील. मग यावेळी त्यांना आपलेसे करण्यासाठी तुम्हीच पहिले पाऊल उचलावे.

यासाठी सणांच्या दिवशी त्यांच्या घरी मिठाई आणि गिफ्ट घेऊन जा. तुम्ही सणाच्या दिवशी गेलात तर त्यांच्या मनातील कटुता कमी होऊन ते ही झाले गेले विसरून एका नव्या नात्याची सुरूवात करतील.

नात्यांना नवे रूप द्या : आयुष्याच्या गदारोळात अडकल्यामुळे काही नाती मागे राहून जातात. इच्छा असूनही आपण त्यांना जवळ आणू शकत नाही. त्यांच्याशी आपले काही शत्रुत्त्व नसते. उलट संबंध चांगलेच होते, पण तरी ते जवळ नसतात.

आशाचं म्हणणं आहे, ‘‘माझ्या सासरी माझ्या पतीच्या मावशीची मुलगी दिर्घ काळापर्यंत आपल्या शहरात राहिली. तेव्हा प्रत्येक सणाला तिच्या कुटुंबासोबत भेटीगाठी करून एकत्र येऊन सण साजरे करण्याची सवय होती. पण काही वर्षांनंतरच ते दुसऱ्या शहरात राहायला गेले आणि आम्हीही आमच्या व्यापात गुंतलो. अशाप्रकारे सणवार येत जात राहिले. जेणेकरून आम्हा सर्वांनाच जुन्या आठवणींचे स्मरण करता येईल.’’

ही आहे बदल करण्याची संधी : एकत्र कुटुंबात आपल्या माणसांसोबत सण साजरे केल्याने आनंद द्विगुणित होतो. जिथे आजोबा दिवे आणायचे, काका मुलांसाठी फटाके आणायचे, तर आजी, ताई, काकू, आई सर्वजणी मिळून तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ बनवत असत. सर्वत्र आनंदाचे मोहमयी वातावरण असे. आपण आपले बालपण अशाच काहीशाप्रकारे जगलो आहे. पण तुम्हाला असे नाही वाटत की आता आपल्या मुलांनीही आपल्या बालपणीसारखी मौज अनुभवावी?

असे करणे ही काही अवघड बाब नाही. तुम्ही तुमच्या गावी एखादा फोन तर करून पाहा. तिथे तुमच्या स्वागताची तयारी तुम्ही फोन ठेवण्याआधीपासून सुरू होईल. जर तुमचे भाऊ दुसऱ्या शहरात राहत असतील तर त्यांनाही बोलवा. जर गावी संपर्क झाला नाही तरी यावेळी सण एकत्र सजरे करा. विश्वास ठेवा यासाठी तुमचे नातेवाईक कधीही नाही म्हणणार नाहीत.

भेटवस्तू असावी काही विशेष : जर आईवडिलांसाठी काही भेटवस्तू घ्यायची असेल तर त्यांचे वय लक्षात घेता एखादे मसाजर, शुगर टेस्ट करण्याचे मशिन, बीपी मशीन, एखादे हेल्थ पॅकेज इ. अशाच प्रकारे भावंडांसाठीही त्याच्या आवडीच्या भेटवस्तू घ्याव्यात. पैसे खर्च होतील हा विचार करू नका, उलट तुमचे बजेट बनवा आणि त्याप्रमाणे खर्च करा. सणांमध्ये सर्वचजण एकमेकांना भेटवस्तू देतात. यामुळे संबंध दृढ होतात.

सोबतीने जत्रा पाहायला जा : हे गरजेचे नाही की सण आहे तर घरीच भेटले पाहिजे. तुम्ही एखाद्या अशा जागेची निवड करू शकता जी सर्वांना जवळ पडेल. तिथे भेटण्याचा कार्यक्रम ठरवा. उत्सवांमध्ये अशा जत्रा, फनफेअर खूप असतात. तिथेही भेटू शकता. मुलंही तिथे छान मजा करतील.

पूल पार्टी करू शकता : जर तुम्हाला असे वाटत असेल की इतक्या लोकांना घरी बोलावून जेवणाची वगैरे व्यवस्था करणे अवघड होईल तर तुम्ही पुल पार्टीही करू शकता. सर्व नातावाईकांनी आपापल्या घरून एक एक पदार्थ बनवून आणावा आणि एकत्र येऊन खूप मजा करावी.

मित्रमैत्रिणींना भेटायला जावे : फोनवर सणांच्या शुभेच्छा देण्यापेक्षा स्वत: जाऊन एखादी भेटवस्तू देणे सर्वात चांगले म्हणून तुमचे जे मित्रमैत्रिणींनी, नातेवाईक दूर असतील त्यांना भेटायला जावे. सणांच्या एक-दोन आठवडे आधीही जाऊ शकता, कारण सणांच्या दिवसात बाहेर पडणे तुम्हाला कठीण जाऊ शकते आणि त्यांनाही सणासुदीच्या दिवसात तुम्हांला वेळ देणे शक्य होणार नाही.

उत्सवांमध्ये नाती दृढ करण्यासाठी काही टीप्स

* जर तुम्ही बऱ्याच कालावधीपासून आपल्या घरी गेला नसाल तर या उत्सवाला जरूर जा आणि आपल्या भावाबहिणींनाही घरी यायला सांगा. सर्व परिवार एकत्रित सण साजरा करेल, तेव्हा जवळीकता वाढेल आणि प्रेमही, सोबतच तुमच्या मुलांनाही नाती समजू शकतील.

* जर खूप दिवस झाले असतील ते मनात काही द्वेष, अढी ठेवू नका. काहींना अशी सवय असते, त्यामुळे लोक त्यांना आमंत्रित करण्यास धजावत नाहीत.

* जर सर्वजण एकत्र जमले असतील तेव्हा नकारात्मक बोलू नका. सणांच्या आनंदात चांगले सकारात्मक बोलावे. एखाद्यावर टिका करून वातावरण खराब करू नका.

* पूर्वी ताटात घरी बनवलेल्या मिठाया सजवून ठेवल्या जायच्या, छानशा विणलेल्या सुंदर रूमालाने झाकल्या जात व ताटे आपल्या शेजारी दिले जायची.

* सर्व नातवाईकांनी एकत्र बसून जुन्या आठवणींना उजाळा द्यावा. जमल्यास तुमच्या नातेवाईकांना काही जुनी छायाचित्रे फोटो फ्रेम करून याप्रसंगी द्या. सर्वजण जुन्या आठवणींमध्ये रमून जातील.

* सरप्राइज पार्टी द्या. ज्यात सर्व बहिणभाऊ आणि मित्रांना सहभागी करा. दिवाळी, नाताळ, न्यू ईअर वगैरे पार्टी करू शकता.

टीप : सण साजरा करण्याच्या विधिंमध्ये ज्या विकृत पद्धती आल्या आहेत, जसे की नशा करणे, जुगार खेळणे, धार्मिक उन्माद निर्माण करणे, ध्वनि प्रदूषण, वायू प्रदूषण अशा बाबी संपुष्टात आणल्या पाहिजेत. सणउत्सव त्यांच्या मूळ भावनेने साजरे करा म्हणजे सुखशांतीमध्ये वृद्धी होईल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...