* प्रतिनिधी

  • मी २७ वर्षांची तरुणी आहे. माझा विवाह ८ महिन्यांपूर्वी झाला आहे. मी आपल्या पतिला अजिबात पसंत करत नाही. ते एक उच्च अधिकाऱ्याच्या हुद्दयावर आहेत आणि स्वभावाने सरळही आहेत. मी मुंबईतील एका मल्टिनॅशनल कंपनीत जॉब करते. मुंबईत राहत असतानाच मागच्या ४ वर्षांपासून आपल्या बॉयफ्रेंडबरोबर रिलेशनशिपमध्ये होते. आम्ही एकाच फ्लॅटमध्ये बरोबर राहत होतो. बॉयफ्रेंड बंगालचा निवासी आहे. तर मी उत्तराखंडची राहणारी आहे.

आमच्या संबंधाबद्दल माझ्या पॅरेंट्सना माहिती होती. परंतु त्यांना हे स्थळ मंजूर नव्हते. बॉयफ्रेंड लग्नासाठी तयार होता. त्याच्या घरच्यांचाही विरोध नव्हता. पण माझे घरचे आग्रह करून मला सोबत घेऊन गेले आणि लग्नाचा दबाव टाकू लागले. या दरम्यान त्यांनी मला तयार करण्यासाठी जात-धर्म व सामाजिक बदनामीची भीतीही दाखवली. तरीही मी तयार झाले नाही.

एके दिवशी माझ्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला हॉस्पिटलला अॅडमिट करण्यापर्यंत वेळ आली. घर-कुटुंब, मामा-मामी आणि त्याचबरोबर माझी एक टीचर, जिचा मी खूप सन्मान करते अशा सर्वांकडूनच माझ्यावर दबाव आणला गेला. मी आतून खचले आणि विवाहासाठी हो म्हटले. पती मोकळया मनाचे व विचारांचे वाटले. मी त्यांच्याबरोबर देहरादूनला गेले. जेथे त्यांची पोस्टिंग होती. परंतु रात्रं-दिवस बॉयफ्रेंडच्या आठवणीत गुंतून राहायची. नोकरीचे निमित्त करून नंतर मी मुंबईला येऊ लागले आणि पुन्हा बॉयफ्रेंडबरोबर राहू लागले. बॉयफ्रेंड खूप रडला आणि पतिकडून डिवोर्स घेण्यासाठी जोर देऊ लागला. मी त्याला सांगितले की मी पतिबरोबर सेक्स संबंध ठेवले आहेत, तरीही तो म्हणतो की त्याचा काही आक्षेप नाही आहे आणि तो मला जीवनभर प्रेम करत राहणार. त्याच्या दबावात येऊन मी एके दिवशी पतिला फोनवर सर्व सत्य खरं-खरं सांगितले.

ते काही वेळ तर शांत राहिले, नंतर म्हणाले की तुझे आपले जीवन आहे. तू ज्याच्याबरोबर राहू इच्छिते, राहा. पण मी डिवोर्स देणार नाही आणि तू स्वत: माझ्याकडे परत येशील याची वाट बघेन. मी पतिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी  ऐकले नाही आणि म्हणत राहिले की तू नाही तर कोणीच नाही.

इकडे बॉयफ्रेंडपासून दूर जाण्याची गोष्ट ऐकूनच तो त्रासून जातो आणि कुठल्याही परिस्थितीत साथ न सोडण्याच्या जिद्दीवर अडून बसला आहे. मी खूप अडचणीत आहे. काय करावं ते कळत नाहीए. कृपा करून सल्ला द्या?

आपण आपल्या घरच्यांच्या इमोशनल ब्लॅकमेलिंगच्या शिकार झाल्या आहात, यात काही संशय नाही. जात-धर्म व सामाजिक बदनामीची भीती दाखवून त्यांनी तुम्हाला नाईलाजास्तव लग्न करण्यास तयार केले. ही त्यांची चूक आहे.

दुसरीकडे जर तुम्ही आपल्या बॉयफ्रेंडबरोबर रिलेशनशिपमध्ये एवढया पुढे निघून गेल्या होतात तर आपणही हे लग्न करायला नको होते. आपण व आपला बॉयफ्रेंड दोघे आपल्या स्वत:च्या पायावर उभे होतात आणि सज्ञान होतात. घरचे मानत नव्हते तर आपण कोर्ट मॅरेज करू शकत होतात. नंतर त्यांनी या नात्याला स्वीकारलेच असते.

आता जर तुमचे लग्न झालेच आहे आणि जसे की आपण सांगितले की तुमचे पती मोकळया मनाचे आहेत तर तुम्ही आपल्या पतिबरोबरच राहायला हवे. सद्यस्थितीत बॉयफ्रेंडबरोबरचे नाते बेकायदेशीर मानले जाईल. बरे झाले असते जर आपण बॉयफ्रेंडबरोबरचे नाते पतिला सांगितले नसते आणि सगळे विसरून नवीन जीवनाची चांगल्या पद्धतीने सुरुवात केली असती. आता जर आपण आपल्या पतिला सर्व काही खरे सांगून टाकले आहे आणि असे असूनही ते आपली साथ देण्यासाठी तयार आहेत तर स्पष्ट आहे की ते खरेच मोकळया मनाचे पुरुष आहेत. जे विवाहरूपी संस्थेला कमकुवत होऊ देऊ इच्छित नाहीत. डिवोर्सनंतर त्यांच्यावरसुद्धा दोष ठेवला जाईल, हे ते जाणत असतील.

पती चांगले कमावणारे आहेत, उच्च पदस्थ अधिकारी आहेत आणि आपणास हृदयापासून स्वीकारताहेत तर चांगले होईल, आपण आपल्या पतिकडे परत जावे आणि या बेकायदेशीर नात्याला पूर्णविराम लावावा.

  • मी २५ वर्षीय महिला आहे. नुकतेच लग्न झाले आहे. पती घरातील एकुलते एक अपत्य आहेत आणि सरकारी बँकेत कामाला आहेत. घर सर्व सुखसोयीनीं युक्त आहे. पण सगळयात मोठी अडचण सासूबाईंची आहे. त्यांनी माझ्या आधुनिक कपडे घालणे, टीव्ही बघणे, मोबाईलवर गप्पा मारणे आणि एवढेच नाहीतर माझ्या झोपण्यावरसुद्धा बंदी घातली, जे मला खूप बोचतेय, सांगा मी काय करू?

आपण घरातील एकुलत्या एक सुनबाई आहात. तेव्हा स्पष्ट आहे की पुढे जाऊन आपणास मोठया जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. ही गोष्ट आपल्या सासुबाई चांगल्याप्रकारे जाणून आहेत. म्हणून त्यांची इच्छा असेल की तुम्ही लवकरच आपली जबाबदारी ओळखून घर सांभाळावे. खूप बरे होईल की सासरच्या सर्वांना विश्वासात घेण्याचा तुम्ही प्रयत्न करावा. सासूला आईसारखे समजून, मान-सन्मान द्याल तर लवकरच त्यासुद्धा आपल्याशी मिळून मिसळून राहतील आणि तेव्हा त्या स्वत: आपणास आधुनिक कपडे घालण्यास प्रेरित करतील.

घराचे कामकाज आटपून टीव्ही बघण्यास सासूबाईंचाही काही आक्षेप नसणार. चांगले हे होईल की आपण सासूबाईंबरोबर जास्तीत-जास्त वेळ घालवा, एकसाथ शॉपिंग करायला जा, घरातील जबाबदारी ओळखा, मग बघा आपण दोघी एकत्र एकमेकांच्या पूरक व्हाल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...