– डॉ. साधना सिंघल

स्त्रीरोगतज्ज्ञ, श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली

आई बनणे स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आहे. परंतु अनेकदा काही कारणांमुळे काही स्त्रिया आई बनू शकत नाहीत. अशा परिस्थितीत निराश होणे स्वाभाविक आहे. परंतु बऱ्याचदा काही गोष्टींची काळजी घेऊन आणि वैद्यकीय सल्ला घेऊन उणिवा दूर केल्यास आई बनण्याचे सुख मिळविता येऊ शकते.

जाणून घेऊया प्रेगनन्सीसाठी कोणकोणत्या खास गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सोबतच प्रेगनन्सीची प्रक्रिया आणि त्याच्याशी संबंधित गुंतागुंत याबाबत :

महत्त्वपूर्ण खबरदारी

  • ३२ वर्षांनंतर, स्त्रियांमधील गर्भधारणेची क्षमता कमी होऊ लागते. म्हणूनच जर एखाद्या स्त्रीचे वय ३२ वर्ष झाले असेल तर तिने तिच्या गर्भधारणेस उशीर करू नये. जर ती नैसर्गिकरित्या गर्भवती होऊ शकत नसेल तर तिने त्वरित विशेषज्ञांना दाखवले पाहिजे.
  • धूम्रपान केल्यानेही आई बनण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. इतकेच नाही, यामुळे गर्भपात होण्याचा धोकादेखील असतो, म्हणून स्त्रियांनी धूम्रपान करू नये.
  • खूप जास्त वजन असणेही आई बनण्यासाठी अडथळा ठरू शकते. जर तुम्ही लठ्ठ असाल आणि तुम्हाला गरोदरपणात त्रास होत असेल तर तुम्ही आपले वजन कमी करा.
  • ज्या महिला शाकाहारी असतात, त्यांनी आपल्या आहारात फॉलिक अॅसिड, झिंक आणि व्हिटॅमिन १२ घेण्याची गरज असते. शरीरात या पोषक तत्त्वांचा अभावही गर्भधारणेत अडथळा आणतो.
  • जर तुम्ही एका आठवडयामध्ये ७ तासांपेक्षा जास्त व्यायाम करत असाल तर तो कमी करणे गरजेचे आहे. गरजेपेक्षा जास्त व्यायामामुळे ओव्हुलेशनची समस्या निर्माण होते, ज्यामुळे गर्भधारणेत त्रास होतो.
  • शारीरिक निष्क्रियताही कधीकधी गर्भधारणेत अडथळा आणते. जर तुम्ही खूप आळशी, शारिरीकदृष्टया अॅक्टिव्ह नसाल तर तुम्हाला अॅक्टिव्ह व्हावे लागेल.
  • एसटीआय अर्थात लैंगिक संक्रमणामुळेही गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होतो. तुम्हाला अशी काही समस्या असल्यास त्वरित उपचार करा.
  • पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड्स, धातू यासह काही रासायनिक घटक असे असतात की ज्यांच्या संपर्कात आल्यामुळे गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होतो. म्हणूनच शक्य तितके यांच्या थेट संपर्कात येणे टाळा.
  • मानसिक तणावही गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम करते. म्हणून जर तुम्ही जास्त ताण घेत असाल तर ते टाळा.

 

गर्भधारणा कशी होते

एक स्त्री जिला दरमहा मासिक पाळी येते, तिच गर्भधारणा करू शकते. खरेतर २ मासिक पाळीदरम्यान ओव्हुलेशन कालावधी असतो. हा तो काळ असतो, जेव्हा अंडाशयातून अंडी रिलीज होतात, म्हणजे सोडली जातात. सामान्य स्थितीत एका स्त्रीमध्ये पुढील मासिक पाळीच्या २ आठवडयांपूर्वी ओव्हुलेशन प्रक्रिया सुरू होते. ओव्हुलेशनदरम्यान सोडलेली अंडी २४ तास जिवंत राहतात आणि त्यानंतर मरतात. ओव्हुलेशनदरम्यान पती-पत्नीमध्ये शारीरिक संबंध येतो, तेव्हा अंडी आणि शुक्राणू एकमेकांच्या संपर्कात येतात. त्याच वेळी, शुक्राणूने अंडयाला फर्टिलाइज्ड म्हणजे फलित केल्याने स्त्री गर्भधारण करते.

गर्भधारणेसाठी सर्वोत्तम वेळ

ओव्हुलेशनवेळी शारीरिक संबंध ठेवणे ही गर्भधारणेसाठी सर्वात चांगली वेळ असते. सामान्य स्त्रीमध्ये ओव्हुलेशनचा कालावधी ६ दिवस असतो. ओव्हुलेशननंतर जिथे अंडी फक्त १ दिवस टिकतात, शुक्राणू १ आठवडयापर्यंत टिकतात. अशाप्रकारे ओव्हुलेशन नंतरचे ५ दिवस गर्भधारणेसाठी उत्तम मानले जातात. विशेषज्ञांच्या मते, जर ओव्हुलेशनच्या १-२ दिवस आधी शारीरिक संबंध ठेवले तर गर्भधारणेची क्षमता मोठया प्रमाणात वाढते, कारण यामुळे शुक्राणूंना अंडयांशी संपर्क साधण्यास अधिक वेळ मिळतो.

गर्भधारणेदरम्यान येणाऱ्या समस्या

गर्भधारणेनंतर स्त्रीला खूप काळजी घ्यावी लागते. तसे न केल्यास तिला अनेक समस्या येतात.

उच्च रक्तदाब : गर्भधारणेदरम्यान बऱ्याच महिलांमध्ये उच्च रक्तदाब म्हणजे हाय बीपीची तक्रार असते.

अॅनिमिया : गर्भवती महिलेने पुरेशा लोहाचे सेवन न केल्यास तिच्या शरीरातील हिमोग्लोबिन कमी होते. याकडे दुर्लक्ष केल्यास आई आणि मूल, दोघांचाही जीव जाऊ शकतो.

संसर्ग : गर्भवती महिलेस इन्फ्लूएन्  हॅपिटायटीस ई, हर्पिस सिम्पलेक्स, मलेरिया इत्यादी आजार होण्याचा धोका अधिक असतो. या आजारांवर वेळेवर उपचार करणे फारच गरजेचे असते, अन्यथा आई आणि मूल दोघांचा मृत्यू होऊ शकतो.

मूत्रमार्गातील असंयम : गर्भधारणेदरम्यान बऱ्याचदा मूत्रमार्गातील असंयम म्हणजे मूत्रमार्गाचे विकार होतात. ही समस्या उद्भवते तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

तणाव : गर्भावस्थेदरम्यान आणि नंतर बऱ्याच स्त्रिया प्रचंड मानसिक तणावाखाली येतात. या तणावाचा परिणाम आई आणि मूल दोघांवर होतो. म्हणून शक्य तितक्या लवकर तणावातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...