* प्रतिनिधी

जगभरात काम करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचं आयुष्य खूपच संघर्षमय असतं, ज्या घरापासून दूर राहून काम करतात, त्यांच्यासाठी ते आव्हानात्मक अधिक असतं, ज्या कधीच हार मानत नाहीत, साधारणपणे स्वभाव हसत मुख असतो, त्यांना पार्टी करणं, पार्टीत जाणं आणि फिरायला खूप आवडतं. त्यांना सर्वांच्या मनावर राज्य करण्याची कला शिकायची असते.

अनेक स्त्रियांना आव्हानात्मक काम मिळतं आणि सोबतच आई-वडिलांच्या देखभालीची जबाबदारी देखील. मात्र नोकरी अशी असते ज्यामध्ये एकटयाने प्रवास करणं देखील गरजेचे असेल तर काही आणखीन आव्हानं येतात.

अनिताला तिच्या नोकरीसाठी दिल्लीहून मुंबईला येजा कराव लागत होतं, कारण ती मार्केटिंग आणि मॅनेजमेंट असं दुहेरी काम सांभाळत होती. ती मूळची हिमाचलची होती आणि ती जेव्हा दिल्लीत आली तेव्हा आई-बाबांना देखील भेटायला जात असे. तिला महाविद्यालयापासूनच नृत्य करण्याची आवड होती आणि कोणत्याही प्रसंगी ती नृत्य करत असे. आतादेखील कोणत्याही पार्टीत ती तासभर नाचू शकते. पूर्वी ती दिल्लीत काम करत असे परंतु नंतर तिला मुंबईमध्ये एका कंपनीने बोलावलं.

पूर्वी ती तिथे एक आठवडाभर काम करायची आणि पुन्हा परत दिल्लीत येत असे, परंतु ती मुंबईत आली आणि इथेच राहू लागली. यादरम्यान तिचं काम एवढं वाढलं की तिला वारंवार येणं जाणं अशक्य होऊ लागलं.

आयुष्य एक संघर्ष आहे

अशा प्रकारची आव्हानं प्रत्येक यशस्वी स्त्रीला अनेकदा झेलावी लागतात. लग्न तर होतं परंतु जर कामाच्यामध्ये जोडीदारामुळे तर चॅलेंजेस अधिक वाढतात. खासकरून तर जेव्हा मुलं होतात, घटस्फोटाचा काळ खूपच संघर्षपूर्ण असतो कारण लोकं या गोष्टींना समजू शकत नाहीत. यामध्ये सर्वात मोठी मदत अनेकदा तिची आई करते, कारण तिला देखील माहित असतं की जगरहाटी काय असते .

साधारणपणे यशस्वी घटस्फोटीत स्त्रिया आपल्या पतीबद्दल अधिक सांगत नाहीत आणि हे खरं देखील आहे, कारण तो एक गेलेला काळ असतो, ज्याची आठवण काढणं त्यांना आवडत नाही. परंतु एवढं नक्की आहे की जी लोकं अशा प्रकारच्या परिस्थितीतून गेली नाही आहेत, त्यांना ती गोष्ट समजत नाही आणि या गोष्टीं देखील आव्हानांच्या यादीशी जोडल्या जातात. लग्न तुटणं हे कायमच सकारात्मकरित्या घ्या. कारण भांडणांच्या लग्नापेक्षा आव्हानांचं एकाकीपण अधिक चांगलं असतं.

सहज सोपं बनवा काम

आजदेखील कोणत्याही एकटया स्त्रीचं काम करणं कठीण आहे. आज प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण सिस्टम बदलत असते. प्रॅक्टिसच्या नादात कंपनीमध्ये रोज नवीन प्रयोग होतात. कामात चुका काढल्या जातात. म्हणून काम सुरू कुठून तरी होतं आणि पुढे काही वेगळंच होत राहतं. त्यामुळे हे सगळं समजणं आणि समजावून घेणं एक चॅलेंजिंग असतं. तुम्हाला जी नोकरी करण्यासाठी ठेवलं जातं, त्याचं प्रोफाइल बदलतं. मॅनेजरच वैयक्तिक आयुष्य राहत नाही. मुलांचे पीटीए अटेंड करणं, नंतर त्यांच्यासोबत फिरणं, त्यांची काळजी घेणं, आई वडिलांची काळजी घेणं सर्व योग्य पद्धतीने करायचं असतं. काम ९ ते ६ वाजेपर्यंत असो वा ९ ते रात्रीचे १२ वाजेपर्यंत सहन करावं लागतं. कामाची गुणवत्ता चांगली व्हावी म्हणून सतत चॅलेंजेस होत असतात.

तू चाल पुढं

प्रत्येक यशस्वी स्त्रीने आपल्या पेहरावावर पूर्ण लक्ष ठेवायला हवं. सगळया प्रकारचे कपडे चांगले नसतात. तिने तेच घालावं जे कम्फर्टेबल असावेत. पार्ट्यांमध्ये जावं, निसर्गाशी एकरूप व्हावं. कामात एक्सप्लायटेशन होत असेल तर गदारोळ माजवू नये.
कामाचं चॅलेंज एक असं क्षेत्र आहे जिथे मरावंदेखील लागतं. जर तुमचा कोणी गॉडफादर असेल तर तुम्ही यशस्वी. तुमचं यश तुमच्या अनेक चुका लपवून ठेवतं. आपल्या मागची कुजबुज दुर्लक्षित करणेदेखील एक चॅलेंज आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...