* प्रतिनिधी

लग्नानंतर पत्नीला घरात गुदमरल्यासारखे वाटत असेल आणि पतीला त्याची जाणीव होत नसेल किंवा काहीच करता येत नसेल तर पत्नीला यातून सुटका करून घेण्यासाठी आजारी पडण्याशिवाय दुसरा मार्ग उरत नाही. ज्या घरांमध्ये पती पत्नीबद्दल खूप उदासीन असतो तिथे पत्नी तणावात राहतात, त्यांना वारंवार डॉक्टरांकडे जावे लागते, पती-पत्नीमध्ये भांडण होते आणि दुसरा पर्याय नसल्यामुळे पत्नीला घर कैदेसारखे वाटू लागते.

अशी परिस्थिती धोकादायक असते. कमी संख्येने महिला या प्रकारची गुदमरल्याची लक्षणे असल्याचे प्रत्यक्ष मान्य करतात, परंतु किती जणींमध्ये ती असतात, हे सांगणे सोपे नाही.

याचे एक मोठे कारण म्हणजे कुटुंब लहान झाल्यापासून काका, मामा सर्वच वेगळे राहू लागले आहेत. विवाहित महिलांचा अनोळखी वाटणाऱ्या किट्टी मैत्रिणींशिवाय कोणाशीही संपर्क नसतो. व्हॉट्सअॅप आणि फेसबुक आहे, पण स्वत:चे दु:ख त्या तिथे जाहीर करू शकत नाहीत. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी उपाय काय असू शकतो हे बहुतेक जणींना माहीत नसते.

शरीराला सुडौल आकार देण्यासाठी जिम आहेत, चेहरा उजळण्यासाठी पार्लर आहेत, लुप्त होत चाललेल्या शरीराला टवटवीत करण्यासाठी कॉस्मेटिक डॉक्टर्स आहेत, पण मानसिक जखमा भरून काढण्यासाठी जे काही थोडे फार तज्ज्ञ आहेत तेही अर्धवट आहेत. असो, ते फक्त तुमचे ऐकू शकतील. ते काहीतरी सल्ला देतील, काही तयार फॉर्म्युला देतील, असे मात्र शक्य नाही.

जीवन जगण्याचा धडा खरंतर लहानपणापासूनच मिळतो, पण आजच्या स्पर्धेच्या जगात, इतरांपेक्षा सरस बनण्याच्या प्रक्रियेत, शिकण्याची प्रथा संपली आहे. आई-वडील नुसते घर आणि पैसे देणारे एटीएम बनले आहेत. मित्र तेवढया पात्रतेचे नाहीत. असो, त्यांना काय करावे हेच कळत नाही, कारण गेली ६०-७० वर्षे जीवनातील शिक्षणाच्या नावाखाली केवळ पूजापाठ शिकवली जात आहे. लोक पर्यटनासाठी कमी आणि तीर्थयात्रेला जास्त जातात.

आयुष्य हे हजारो तुकडयांनी बनलेल्या गोधडीसारखे आहे. कुठेही कोणताही तुकडा विसावला की तो गोधडी खराब करू शकतो. त्यासाठी याची माहिती पहिल्यापासूनच असणे आवश्यक आहे, पण त्याचे शिक्षण पुस्तकांतून मिळत नाही, ते चित्रपटांतून, शेजाऱ्यांकडून किंवा नातेवाईकांकडूनही मिळत नाही.

देशाची उत्पादकता कमी होत आहे. आपण विभागले जात आहोत. न्यायालयात खटल्यांचा ढीग पडत आहे. पूनावाला आणि श्रद्धासारख्या प्रकरणात आपण अडकत चाललो आहोत. श्रद्धासोबत जे काही घडले ते कोणत्याही पत्नीसोबत घडू शकते, हेही सर्वांना माहीत आहे, पण बहुतेक जखमा लपूनच जातात कारण लोक, समाज, सरकार सगळेच जखमेची चेष्टा करतात, मलम लावत नाहीत. जखम होऊ नये याचा धडा कोणीच शिकवत नाही.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...