* पारुल भटनागर

आता ऑनलाईनचा जमाना आहे. तुम्ही एक ऑर्डर करताच तुमचं सामान तुमच्या दरवाज्यावर पोहोचतं. परंतु तुम्ही स्वत:साठी कोणत्याही ऑनलाईन साइटवर ड्रेस ऑर्डर केला, जो इमेजमध्ये तुम्हाला छान वाटत होता, कलरदेखील छान होता, साईजदेखील परिपूर्ण होती, परंतु ड्रेस घरी आला आणि तुम्ही तो ट्राय करुन पाहिलं तेव्हा तुमचा सर्व मूड ऑफ झाला वा मग तुम्ही त्याला पाहूनच तुमचा मूड बदलला कारण विकत घेतेवेळी ती वस्तू जशी दिसत होती तशी ती नव्हती.

अशावेळी तुम्हाला एवढं काळजी करण्याची गरज नसते कारण तुमच्याजवळ तो बदलण्याचा वा तो परत करण्याचा पर्याय असतो. याची पूर्ण प्रक्रिया खूपच सहजसोपी असते आणि तुमचे पैसेदेखील काही दिवसांतच परत येतात. परंतु ही गोष्ट ऑनलाइन नववधू ऑर्डरच्या बाबतीत योग्य नाही आहे कारण कोरोनाच्या संकटाच्या काळात जेव्हा पार्टनरची निवड ऑनलाइनच शक्य होती, तिथे जोडीदारा अदलाबदलीवाला ऑप्शन चालणार नाही. एकदा सामान ऑर्डर केलं आणि तुमचा हमसफर घरी घेऊन आलात की त्याच्याशी तडजोड तर करावीच लागणार, नाहीतर ते भारी पडणार.

पारंपरीक पद्धत व्हीएस नवीन रूप

पूर्वी जिथे जोडीदाराची निवड करताना दोन्ही कुटुंबातील लोकं आपापसात अनेकदा भेटत असत, शेजारीपाजारी चौकशी होत असे, इच्छुक वरवधूदेखील मोकळेपणाने समोरासमोर गप्पा मारत असत, छान भेटीगाठी होत असत म्हणजे योग्य प्रकारे ओळख होई आणि आयुष्यातील या अतूट नात्यांमध्ये बांधल्यानंतर त्रास होता कामा नये. दोन्ही कुटुंबीयदेखील एकमेकांना ओळखण्याचा प्रयत्न करत असंत. म्हणजे पुढे जाऊन कुठे वाद होता कामा नये.

परंतु जेव्हा आता सगळया जगात कोविड १९ मध्ये पसरलेला आहे आणि यामुळे बराच काळापर्यंत लग्नदेखील पुढे ढकलली जात आहेत, ही लग्न पुढे ढकलणं योग्य नाही आहे. अशावेळी मनात नसूनदेखील ऑनलाइनच पार्टनर्स सर्च करावा लागत आहे. केवळ सर्चच नाही तर भेटणंदेखील वर्चुअल झालं आहे. एकदा मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा योग्य वाटल्यावर फोनवर व्हिडिओ कॉलिंगवरती गप्पा चालू होतात. अगदी कुटुंबीयदेखील एकमेकांना फोन वा व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून लग्नाच्या सर्व गप्पा मारतात. कारण यावेळी वारंवार घर बोलावणं व बाहेर भेटणं सेफ नाही आहे. अशावेळी ऑनलाइन सर्व लग्नाची तयारी केली जाते. तर जुन्या पद्धतीत प्रत्येक गोष्टीसाठी समोरासमोर बसून बोलणं योग्य समजलं जात होतं. अशावेळी नवीन पद्धत आपल्यामध्ये नव्या रूपात समोर आली आहे. ज्यामध्ये पावलोपावली सावधानता बाळगण्याचीदेखील गरज आहे.

ऑनलाईन सर्चमध्ये रिस्क

असं म्हणतात ना की जोडया अगोदरच बनलेल्या असतात, म्हणून कोण कोणासाठी बनला आहे, याबद्दल वेळ येताच समजतं. हे गरजेचं नाही की तुम्ही ज्या शहरात रहात आहात तुमचा जोडीदारदेखील त्याच शहरातील असावा. अशावेळी जेव्हा पार्टनर सर्चिंगची ऑनलाइन पद्धत चालू झाली आहे. तेव्हा सर्चच्या दरम्यान तुम्हाला माहीत नसतं की तुमचा पार्टनर तुम्हाला कोणत्या जागी, कोणत्या देशात मिळेल. जर यादरम्यान मनं जुळलीत, परंतु दोघांमध्ये जागेचा अंतर असेल तर लग्नापर्यंत चॅटिंगपासून डेटिंगपर्यंत सगळं ऑनलाइनच्या माध्यमातूनच होणार. अशामध्ये रिक्स अधिक आहे, कारण तुम्ही त्याला ऑनलाईन माध्यमातूनच पहात आहात. कदाचित तुम्हाला जो व्हिडिओ कॉलिंगच्या दरम्यान चांगला वाटला असेल, समोर नाही, कारण आज असे अनेक अॅप्स आले आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचा चेहरामोहरा बदलू  शकता. कदाचित कॉलिंगच्या दरम्यानदेखील याच माध्यमातून लुक बदलला गेला असेल. अशावेळी नंतर तडजोडदेखील करावी लागते म्हणून विचारपूर्वक पुढे जा. समोरासमोर मात्र या गोष्टी जवळून बघण्याची संधी मिळते.

फोटोमध्ये रूप बदलतं

अनेकदा फोटोने खरा चेहरा लपविण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून तर फोटोमध्ये पसंत पडणारे चेहरे समोर आल्यावर अनेकदा पसंतीस येत नाहीत, कारण फोटोमध्ये खरं रूप लपविण्याचा प्रयत्न केला जातो. तर खरं रूप वेगळं असतं म्हणून तर लग्नाच्या बाबतीत समोरासमोर आल्यावर अनेकदा होकार नकारामध्ये बदलतो. परंतु ऑनलाईनमध्ये जवळून पाहण्याचा ऑप्शन नाही आहे, म्हणून गडबडीचे चान्सेस अधिक असतात.

वर्चुअल नातेवाईकांमध्ये ती गोष्ट कुठे

एकदा लग्न ठरल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्यांमध्ये उत्सुकता असते की आपल्या होणाऱ्या ब्राईड या ग्रुमला पाहण्याची. यासाठी फोन व व्हिडिओ कॉल व कॉन्फरन्सच्या माध्यमातून गप्पा मारल्या जातात. अशावेळी दुरून बोलताना एकमेकांच्या जवळ येणारी भावना थोडी कमी होते. त्यामध्ये भलेही समोरून थोडीशी गोष्टींना फोडणीदेखील दिली जाईल. तरीदेखील ती मजा येत नाही जी यायला हवी. अशावेळी समोरासमोर कम्फर्टेबल झोन न मिळाल्यामुळे सर्वजण फक्त हीच संधी शोधतात की लवकरात लवकर कॉल संपावा आणि आपला पिच्छा सुटावा. अशावेळी फोनवर जवळून मनाच्या तारा जुळू शकत नाहीत तर समोरासमोर कुटुंबातील लोक जेव्हा गप्पा मारतात तेव्हा एकमेकांना जवळून पाहिल्यामुळे जास्त जवळीक होते. जे एकमेकांना जवळ आणण्याचं काम करतात, कारण फेस एक्सप्रेशनने व समोरासमोर असल्यामुळे  गोष्टी अधिक समजायला लागतात.

रिटर्नची कोणतीही संधी नाही

आपण असं मानलं की हे कोणतंही सामान नाही आहे की पसंत न पडल्यास बदललं जाईल. एकदा घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला त्याला अॅडजेस्टच नाही तर कुटुंबातील सदस्यदेखील मानावं लागणार. तिची प्रत्येक वाईट गोष्ट स्वीकारावी लागणार. तिचा लुक मग तो तुम्हाला आवडला नसला तरीदेखील स्वीकारावं लागणार. त्याची खाण्याची पद्धत तुम्हाला आवडत नसली तरी ते हसून स्वीकार करावं लागणार. कारण भलेही तुम्ही त्याच्याशी ऑनलाईन का होईना परंतु सोबत जगण्याच्या शपथा दिलेल्या असतात आणि ही गोष्ट मुला-मुली दोघांवरती ही लागू होते. सोबतच त्याच्या कुटुंबाचादेखील स्वीकार करावा लागणार अन्यथा सतत कलहाचं वातावरण बनण्यात उशीर लागणार नाही.

मजेदार डेटिंग नाही ऑनलाईन भेट

एकदा लग्न ठरल्यानंतर कपल्स वेगळयाच दुनियेत असतात. प्रत्येकवेळी केव्हा एकमेकांच्या जवळ येता येईल हीच संधी शोधत असतात. यासाठी दररोज डेटिंग प्लान असतो म्हणजे मोकळेपणाने मस्तीचे क्षण एकत्रित घालवता येतील. एकमेकांच्या डोळयांमध्ये डोळे घालून हरवून जाणं. स्वत:च म्हणणं शेअर करुन, आपला जोडीदार कुठपर्यंत सपोर्ट करू शकतो हि प्रतिक्रिया जाणण्यात सोपं पडतं. एकमेकांचा स्वभाव ओळखता येतो. कारण समोरासमोर असताना भलेही तुम्ही शब्दांवरती कंट्रोल केलं तरी डोळे  खरं सांगतात. अशावेळी समजून घेणं खूपच सहजसोपं होतं. तर ऑनलाईन डेटिंगमध्ये गप्पा मारण्यावरती कोणतीही पाबंदी नसते, परंतु योग्य एक्सप्रेशन न समजल्यावर बराच त्रास होतो. म्हणून यामध्ये रिस्क आहे.

सिक्रेट्स समजण्यासदेखील अवघड

एकदा लग्न ठरल्यानंतर जेव्हा भेटीगाठी सुरू होतात तेव्हा अनेक अशा गोष्टीदेखील समोर येतात ज्यावर आतापर्यंत पडदा पडलेला होता. जसं डेटिंगच्या दरम्यान वारंवार कॉल येणं आणि नंतर एकदम फोनची स्क्रीन लपवत ती बंद करणं आणि विचारल्यावर भीतीने उत्तर देणे की ऑफिसमधून कॉल आला होता. एक दोनदा हा बहाना चालतो, परंतु वारंवार तुमच्या समोर असं झाल्यास तुमच्या मनातदेखील संशय उत्पन्न होऊ शकतो की बोलता बोलता वा रागात एखादं रहस्य समोर येईल. अशावेळी तुम्ही तुमच्या या नात्याच्या अडकण्यापासून वाचू शकता. परंतु ऑनलाईन डेटिंगमध्ये अशा प्रकारच्या गोष्टींवर अगदी सहजपणे पडदा टाकून तुम्हाला मूर्ख बनवलं जाऊ शकतं आणि जेव्हा हे रहस्य उघडतं तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो .

परत केल्यावर नुकसान

लग्न काही मजा नाही, जी मन रिझवण्यासाठी काही क्षणासाठी आलो आणि जेव्हा मन उडालं तेव्हा परत करण्याचं ठरवलं. असं केल्यामुळे जिथे भावना दुखावतात तिथे तुम्हाला याचा मोठा भुर्दंडदेखील भरावा लागू शकतो. यासाठी तुम्हाला तुरुंगातदेखील जावं लागू शकतं आणि अधिक रक्कमदेखील द्यावी लागते, म्हणून विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे.

या संबंधांमध्ये सारथी काऊन्सलिंग सर्विसेसच्या फाउंडर डायरेक्टर शिवानी मिश्री साधूचं म्हणणं आहे,

‘‘जर आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन पार्टनर सर्च करण्याबद्दल बोलत असू तर दोघांमध्ये गॅरंटी नाही आहे की सेपरेशन होणार नाही आणि गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचणार नाही. कारण हे सर्व आपापसातील समजूतदारपणा व पुढाकार या गोष्टींवर अवलंबून असतं. हा, फक्त ऑफलाइन पार्टनर्स सर्च करण्यामध्ये रिस्क थोडी कमी असते. कारण चौकशीबरोबरच सोबत भेटताना थोडया गोष्टी समजतात की ज्या कुटुंबीयांशी आपण जोडणार आहोत त्यांच्याशी आपलं पटणार आहे की नाही.’’

‘‘आजच्या काळात त्यामध्ये ऑनलाईन सर्चिंगमध्ये फिजिकल वेरिफिकेशन करणं खूपच कठीण आहे. कारण यावेळी कोणीही आपल्या जीव डोक्यात टाकणं पसंत करणार नाही. अशावेळी सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून संबंधित व्यक्ती आणि कुटुंबियांची माहिती एकत्र करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जर सोशल मीडियावर एखादे डिटेल्स मिळत नसतील तर ते रेड फ्लॅग समजा. म्हणजेच माहिती लपविण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जर गोष्टी पुढे गेल्या तर त्यांच्या सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांच्या मित्र-मैत्रिणींकडूनदेखील त्यांचं करिअर, नोकरी व त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करा.

‘‘जर सोशल मीडियावर देण्याघेण्या संबंधित मेसेज दिसले तर ते योग्य संकेत नसतात. अशावेळी त्या कुटुंबीयांना स्पष्टपणे विचारायला हवं; म्हणजे पुढे त्रास होणार नाही. कारण हा आयुष्यतील खूप महत्त्वाचा निर्णय असतो. ज्यासाठी तुम्ही स्वत: जबाबदार असता म्हणून वारंवार जेवढं होईल तेवढं क्रॉस चेक करणं गरजेचं आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...