* प्रतिनिधी

मी २५ वर्षीय अविवाहित तरुण आहे. माझ्या मोठ्या भावाच्या मेव्हणीवर माझे प्रेम आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. मुलगीही लग्नासाठी तयार आहे. एवढेच नव्हे, तर तिच्या घरच्यांचाही या लग्नाला काही विरोध नाही. पण माझी आई या लग्नाच्या ठाम विरोधात आहे. याला मजबूत कारणही आहे.

खरे म्हणजे माझी वहिनी (मुलीची बहीण) खूप उग्र आणि घमेंडखोर स्वभावाची आहे. तिने कधीही आपल्या पतीला आणि ना ही घरातील कुठल्याही सदस्याला मानसन्मान दिला. माझ्या वहिनीने घरातील लहानांनाही कधी जिव्हाळा दाखवला नाहीए. तिला फक्त आणि फक्त स्वत:ची काळजी आहे. ती आपल्या मनाप्रमाणे वागते.

याच कारणामुळे माझा दादा आणि आई-वडिलांचा विरोध असतानाही, ती एका खासगी कंपनीत खूपच खालच्या पातळीवरील नोकरी करू लागलीय. त्यामुळे घरातील काम व मुलांची जबाबदारी आईवर येऊन पडली आहे. माझी आई म्हणते की जर मोठ्या बहिणीने आमच्या नाकीनऊ आणले आहेतच. रोज घरात भांडणं करते, अशा वेळी तिच्या बहिणीशी लग्न केलेस, तर दोघी बहिणी मिळून घराची दुर्दशा करतील, हे मला कळले पाहिजे. मी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की मोठ्या बहिणीचा स्वभाव असा आहे, याचा अर्थ छोटी बहीणही कडक स्वभावाची असेल, असे काही नाही. छोट्या बहिणीचा स्वभाव खरोखरंच मोठ्या बहिणीपेक्षा वेगळा आहे. ती खूप सरळसाधी असून तिला जबाबदारीची जाणीव आहे.

मी खूप समजावूनही घरातले लोक तयार होत नाहीएत. मी काय करू? मला तिच्याशी लग्न करायचे आहे, पण दुसऱ्या बाजूला कुटुंबीयांनी परवानगी द्यावी, अशीही माझी इच्छा आहे. कृपा करून काहीतरी उपाय सांगा.

मी त्या मुलीला जेवढे जाणले आहे, ती आपल्या बहिणी(वहिनी)सारखी मुळीच नाहीए, पण ही गोष्ट मी कुटुंबीयाना समजावू शकत नाहीए. आई हट्टाला पेटली आहे की कुठल्याही मुलीशी (मग भले ती सुंदर नसली तरी) माझे लग्न लावून       देणार, पण या मुलीशी मुळीच नाही. मी काय करू?

घरच्यांनी तुमची वहिनी म्हणजेच मुलीच्या मोठ्या बहिणीचे वागणे पाहिले आहे. त्यांना जो वाईट अनुभव  मिळाला, त्यामुळे त्यांना असे लग्न त्या घरात करून देण्यास भीती वाटतेय. जर त्यांच्या बाजूने विचार केला, तर ते आपल्या जागी योग्यच आहेत.

तुमचे म्हणणे आहे की ती मुलगी (आपली प्रेयसी) आपल्या बहिणीसारखी नाहीए, तर तुम्हाला कळले पाहिजे की, लग्नापूर्वीच्या आणि लग्नानंतरच्या जीवनात खूप फरक असतो. विवाहाच्या पूर्वीचे जीवन काल्पनिक असते. तिथे प्रेयसी आणि  प्रियकर स्वत:ला एकमेकांसमोर उत्तम दर्शवण्याचाच प्रयत्न करतात. खरे गुणदोष तर लग्नानंतर कळतात. म्हणून लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी चांगल्याप्रकारे विचार करा. मनाबरोबरच मेंदूचेही ऐका. लग्न हा जीवनाचा महत्त्वाचा निर्णय आहे, जो रिटेक होत नाही.

जर तुम्हाला मुलीमध्ये काही वाईट गुण दिसत नाहीत, तर घरातील मंडळींना समजावण्याचा प्रयत्न करा. त्यांना समजावा की दुसरी मुलगी जिची ते निवड करतील, ती चांगली आणि साधी असेलच, हे जरूरी नाही. त्यामुळे त्यांनी तुमच्या पसंतीकडे दुर्लक्ष करू नये. जर ते तुमचे म्हणणे ऐकत नसतील, तर एखाद्या नातेवाइकाची किंवा कौटुंबिक मित्राची मदत घेऊ शकता. पण लक्षात ठेवा, या लग्नाच्या चांगल्या-वाईट परिणामांना आपण जबाबदार असाल.

मी एक सुशिक्षित गृहिणी आहे. लग्नाला ८ वर्षे झाली आहेत. २ गोंडस मुले आहेत. पती खूप प्रेम करणारे आणि काळजी घेणारे आहेत. मी हरप्रकारे आनंदी आहे, पण मनाच्या एका कोपऱ्यात एक सल लपून राहिला आहे. त्यामुळे मी दु:खी होते.

खरे तर शाळा-कॉलेजमध्ये मी खूप हुशार विद्यार्थिनी होते. लहानपणापासून माझी इच्छा होती की शिक्षण पूर्ण झाल्यावर एखादी नोकरी किंवा एखादा व्यवसाय करेन, पण कॉलेजमधून बाहेर पडताच लग्न झाले. मग २ मुलांची देखभाल आणि घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये एवढी व्यस्त झाले की मनातील इच्छा मनातच राहिली. मला सारखे वाटत राहते की गृहिणीचे काम हे काय काम आहे? हे तर अशिक्षित आणि कमी शिकलेल्या बायकाही चांगल्याप्रकारे करतात. माझे शिक्षण आणि उच्चशिक्षित असल्याचा काय फायदा? मी काय करू?

आपण एक कुशल गृहिणी आहात. आपण कुशलतापूर्वक घरकुटुंबाची जबाबदारी पार पाडत आणि मुलांची चांगली देखभाल करत आहात, ही कमी महत्त्वाची गोष्ट नाहीए. तुम्ही असे का समजता की गृहिणी बनून राहिल्यास आपले शिक्षण वाया जातेय. असे म्हणतात की एका स्त्रीने शिक्षण घेतल्याने संपूर्ण कुटुंब आणि समाजाचे कल्याण होते. त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्यांना कमी समजू नका.

जर आपल्याला खंत वाटत असेल की गृहिणीच्या कर्तव्यामुळे आपण काही खास करू शकला नाहीत, तर आपण घरबसल्या ट्युशन इ.चे काम करू शकता. यामुळे आपण आपल्या शिक्षणाचा सदुपयोगही कराल शिवाय आपल्याला मानसिक समाधानही मिळेल. एखादी एनजीओ वगैरेही जॉइन करू शकता.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...