* प्रीता जैन

सूची स्वत:साठी बाजारात एक ड्रेस घेत होती. अचानक तिला मागून कोणीतरी हाक मारली. सूचीने मागे वळून बघितलं तर ती रीमा होती. रीमाला तिथे पाहून तिचा मूड ऑफ झाला. कारण तिला माहीत होतं की, आता ती जबरदस्ती तिला योग्य ड्रेस निवडण्याच्या टीप्स देऊ लागेल, जसं काही तिला स्वत:ला खूप फॅशनची माहिती आहे. हा कसा घेतला, आता तर हा ट्रेंडमध्येच नाही आहे. वगैरे गोष्टी सांगून सांगून डोकं खाईल. ठीक आहे, मैत्री तर आहे, तर तोंडावरती नकारदेखील देऊ शकत नाही.

काळजी घे, ट्रेनमध्ये खाण्यापिण्याचं सामान व्यवस्थित ठेव १-२ पाण्याच्या बाटल्यादेखील ठेव, कुठेही स्टेशनवर उतरू नकोस, दिल्लीला आपण भेटूच, अजिबात काळजी करू नकोस.

हे सल्ले एखाद्या लहान मुलासाठी नसून ४५ वर्षांच्या विनीतासाठी होते. जी आपल्या माहेरी एकटी जात होती. मोठा भाऊ त्याच्याकडून तिच्या भल्यासाठीच सांगत होता, परंतु विनिताला हे ऐकून कधी हसू यायचं की कसं ते लहान मुलाप्रमाणे सतत समजावत राहतात, तर कधी कधी तिला कंटाळादेखील यायचा, मुलं असतात तेव्हा तर ती तिच्याकडे बघून हसू लागतात व नंतर पती तिला गरीब समजूनदेखील समजावून लागत.

ही गोष्ट फक्त एका दिवसाची नव्हती तर दररोजची होती. जेव्हा देखील दादा वा वहिनीचा फोन येतो तेव्हा इकडेतिकडच्या गोष्टी न करता ते विनिताला समजावत राहात की असं कर, तसंच  करू नकोस, ते तिकडे जाऊ नकोस, हे सामान हे खरेदी करू नकोस वगैरे वगैरे.

अशा प्रकारे दीपाची मोठी जाऊबाई रीनाजी तिच्यापेक्षा १-२ वर्षाने मोठी होती तीदेखील मुलांच्या संगोपनाबद्दल सांगत राहायची केवळ आजच नाही तर जेव्हादेखील तिचा फोन यायचा तेव्हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून सल्ले देत राहायची की सकाळी लवकर उठ, नाश्ता वा खाण्यात हेच बनव, घर अशाच पद्धतीने सजव, हे काम असं केलं जातं, हे काम तसंच केलं जातं, सर्वांसोबत असंच वाग तसंच वाग वगैरे वगैरे.

हे योग्य नाही

सुरुवातीला विनिता ऐकत राहायची परंतु आता तिलादेखील वाटू लागलं की आपण तर समवयस्क आहोत. तर इकडच्या तिकडच्या शिक्षण वा मनोरंजनाबद्दल बोलायचं झालं तर जास्त चांगलं किंवा असं होऊ शकतं का? विनिता ऐकत राहायची आणि जाऊ सुनवत राहायची. विनिता ऐकत राहायची ती कधीच सांगू शकत नव्हती वा तिच्या बोलण्यावरून आभासच व्हायचा नाही की तीदेखील एक गृहिणी व स्त्री आहे, जिला आपल्या जबाबदाऱ्या निभावणं खूप चांगल्या प्रकारे कदाचित तिच्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे.

असं फक्त विनिताच नाही तर आपल्या बाबतीतदेखील अनेकदा होतच असतं. अनेकदा लहानपणापासून ते अगदी मोठं होईपर्यंत कोणी ना कोणी, काही ना काही सुनवतच असतं आणि हळूहळू आपण ऐकण्यासाठी म्हणून ऐकत राहतो असं म्हणतो तसं आपण मांडू लावून ऐकू लागतो. जसं दाखवतो की आपल्याला आपण अगदी मन लावून ऐकत आहे. म्हणून प्रत्येक जण आपल्याला काही समजतच नाही असं मानून स्वताचा सल्ला वारंवार देऊ लागतो आणि अनेकदा होतच राहतं.

परंतु हे अजिबात योग्य नाही आहे, प्रत्येक वेळी कोणाला ना कोणाला सल्ला देत राहणं आणि प्रत्येक वेळी त्यांच ऐकणं हे योग्य नाही आहे. आयुष्य आहे तर ते जगण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या कुवतीनुसार काम करतच राहतात. अनेक लोक वयाबरोबरच एवढे समजूतदार आणि परिपक्व होत जातात की आपली कामं कशी करायची आणि कोणावरती ही विनाकारण अवलंबून रहायच नाही हे त्यांना माहितच आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही कामाबद्दल जाणून घेणं व एखादी माहिती द्यायची असेल तेव्हा इतर व्यक्तींना आवर्जून विचारायला हवं व त्यांचा सल्ला घ्यायला हवा. अशाप्रकारे स्वत:कडूनदेखील दुसऱ्या व्यक्तींना विनाकारण हे करता तेव्हाच सल्ला द्यायला हवा. जेव्हा समोरचा स्वत:हून मागायला येईल गरजेनुसार सल्ला देण्याची गरज असेल.

योग्य सल्ला

सल्ला देणाऱ्यापेक्षा तो सल्ला ऐकणाऱ्या व्यक्तीची चूक आहे. जे दुसऱ्यांना ऐकवत राहतात व अशा प्रकारचे वागत राहतात जसं काही समोरच्याला काही कळतच नाही. आम्ही हेदेखील नाही सांगत आहे की इतर व्यक्तींचा सल्ला ऐकायला व मानायला नको. उलट सांगण्याचं तात्पर्य हे आहे की असा सल्ला माना जो वास्तवात मानण्यालायक आहे, त्यामुळे तुमचं दररोज आयुष्य वा मग जीवनात नवीन दिशा मिळेल व ऐकल्यामुळे वा त्यावर अंमल केल्यामुळे मानसिक समाधान मिळण्याची शक्यता असेल, अन्यथा ‘ना’ ऐकण्याची तसंच ‘ना’ बोलण्याची सवय स्वत:मध्ये विकसित करणं खूप गरजेचं आहे.

प्रत्येक व्यक्तीचं वागणं व सवय वेगवेगळी असू शकते. काहींना व्यवस्थित, तर काही आपल्या व्यक्ती त्याच्या विकासात बाधकदेखील होऊ शकतात. उदाहरणासाठी जर आपण आपापसात समजून घेतलं नाही आणि इतरांना गरजेपेक्षा जास्त आपल्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू लागतात तेव्हा प्रभावहीन व श्रेष्ठ ही व्यक्तित्व होऊन जातात. स्वत:ची ओळख करून ठेवू लागतात.

आयुष्यात बरंच काही आपण समजतच मोठे होत राहतो. अनुभव व वेळ सर्वांना जगरहाटी शिकवते. तरीदेखील आईवडील व आपल्यापेक्षा मोठयांचा सल्ला तसेच त्यांनी सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित ऐकून त्यावर अंमल करायला हवं. समवयस्क फक्त दोन ते चार वर्षापेक्षा मोठयांचं योग्य मानले जात नाही. यामुळे तुमच्या व्यक्ती तुमचं व्यक्तिमत्त्व प्रभावहीन होऊ शकतो. त्यामुळे विनाकारण सल्ला व टोका टोकिपासून वाचा आणि स्वत:चं व्यक्तिमत्त्व आकर्षक व प्रभावशाली बनवा.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...