* रितू वर्मा

बरखा जेव्हा लग्नानंतर तिच्या सासरी आली तेव्हा खूप आनंदी होती. तिला तिची ननंद श्रेयाच्या रूपात एक खूप चांगली मैत्रीण मिळाली होती. बरखाच्या या नवीन घरात फक्त श्रेया एक अशी होती जी तिची प्रत्येक गोष्ट ऐकत होती आणि आपल्या घरातल्यांच्या खाजगी गोष्टीदेखील बरखाला सांगत होती.

जेव्हा श्रेयाने बरखाला एका विवाहित पुरुष्याशी स्वत:चे संबंध असल्याबद्दल सांगितलं तेव्हा बरखाला तिला अडवायचं होतं, परंतु श्रेया म्हणाली, ‘‘वहिनी प्रेम तर प्रेम असतं, तुमचीदेखील लग्नापूर्वी कितीतरी प्रेम प्रकरणं होती याबद्दल मी कोणाला तरी बोलले का?’’

बरखा गप्प बसली. नंतर जेव्हा बरखाच्या कुटुंबीयांना श्रेयाच्या अफेअरबाबत बरखाला अगोदर माहिती होतं हे समजलं तेव्हा तिला सगळयांकडून खूप सुनावण्यात आलं.

अनुची आई सिंगल मदर आहे. ती घर बाहेर सर्वकाही सांभाळते आणि अनुच्या प्रत्येक गरजा पूर्ण करते. परंतु अनु जेव्हा स्वत:च्या मर्जीने काही करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिच्या आईची बडबड सुरू होते, ‘‘मी एकटी कमावती आहे, पूर्ण आयुष्य तुझ्यासाठी स्वाहा केलंय, परंतु तरीदेखील तू मनमानी करू लागली आहेस.’’

‘‘मला आनंदी राहण्याचा वा स्वत:च्या मर्जीने काम करण्याचा कोणताही हक्क नाही आहे,’’ अनु आपल्या आईच्या या सवयीला कंटाळली आहे.

अनुच्या बोलण्यावरून असं वाटतं की आईने तिला सांभाळून तिच्यावर उपकारच केले आहेत.

प्रियाचे पती पंचाल जेव्हा मनात येतं तेव्हा प्रियाकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा इच्छा होते तेव्हा प्रियाशी प्रेमाने बोलतात. प्रिया काही बोलली तर पंचाल एकच म्हणत असतात की, ‘‘प्रिया, माझं वर्कप्रेशर यासाठी जबाबदार आहे.’’

पंचाल स्वत:ला असं सादर करतात की अनेकदा प्रियाला स्वत:ला वाईट वाटतं.

जर सखोलपणे विचार केला तर अशी लोकं आपल्या घरकुटुंबात अगदी सहजपणे मिळतील. अशी लोकं प्रत्येक नातं स्वत:च्या मनाप्रमाणे साकारण्यात विश्वास ठेवतात. त्यांना समोरच्याच्या दु:खाशी, भावनांशी काहीच घेणं देणं नसतं. त्यांचं घेणं देणं असतं फक्त स्वत:शी. अशी लोकं नात्यांना अशा प्रकारे फोडणी देतात की हळूहळू ती पोकळ होतात.

‘‘मी सर्वकाही करतो वा करते.’’

‘‘माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणून तुम्ही माझ्यापासून दूर जाता.’’

‘‘लोकं मला फक्त कामासाठी जवळ करतात.’’

‘‘मी तर तुला माझं सर्वस्व मानतेय.’’

अशा प्रकारे कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुम्ही अगोदरदेखील ऐकल्या असतील. त्यांना कशाप्रकारे जोडून तोडून स्वत:च्या फायद्यासाठी वापरतात हे लोकांना चांगलंच माहिती आहे.

तुम्हालाच बोलण्याची संधी देणं : तुमच्या आजूबाजूला जर कोणी असं जवळचं असेल तर नक्कीच सावध व्हा. मॅन्युपुलेटर अधिकाधिक तुम्हाला बोलण्याची संधी देतात कारण जेवढं तुम्ही बोलाल तेवढेच तुमच्या मनातील रहस्य खोलाल. ते तुमची प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकतात, तुम्हाला अशी खास जाणीव करून देतात की त्यांना तुम्ही आपले समजून तुमच्या आयुष्यातील काही खास गोष्टी शेअर करता. ज्या नंतर तुमच्यावर भारी पडू शकतात.

तुमच्या अगदी जवळचं असणं : अशा व्यक्ती तुमच्या जवळ येण्यासाठी काही त्यांच्या खास गोष्टीदेखील शेअर करू शकतात. ते तुम्हाला हा विश्वास देण्याचा प्रयत्न करत राहतात की ते तुमच्यावर किती विश्वास ठेवत आहेत. जर तुम्ही त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवून रहात असाल तर ते असं वागतील की जसं काही तुम्ही त्यांच्यावर खूप अन्याय करत आहात. तुमच्या व्यतिरिक्त त्यांच्यासाठी कोणतीही व्यक्ती अधिक महत्त्वपूर्ण नाहीए.

विक्टीम कार्ड खेळणं : मॅनीपुलेटिव्ह लोकं अगोदर काही चुका करतात आणि जर तुम्ही त्यांना याबाबत जाब विचारला तर ती लोकं असं वागतात की जशी चूक त्यांनी नाही तुम्ही त्यांच्यासोबत केली आहे. त्यांच्याकडून जे काही झालं आहे ते अनाहूतपणे झालं आहे आणि परंतु तुम्हीच वारंवार प्रश्न करून त्यांना त्रास देत आहात आणि कमीपणा दाखवत आहात. शेवटी असं वाटू लागतं की तुम्ही चुकीचे आहात आणि तुम्हीच त्यांची माफी मागण्यासाठी गयावया करू लागता.

पॅसिव्हअग्रेशन : मॅन्युपुलेटिव्ह व्यक्तींची एक खास ओळख अशी असते की ते चुकूनही समोरून अटॅक करत नाहीत. जर तुमची एखादी गोष्ट त्यांना आवडली नाही वा तुम्ही त्यांचं काही ऐकलं नाही तर ते निघून जातात आणि तुम्ही मनात आणूनदेखील त्यांच्याशी बोलू शकत नाही आणि हेदेखील जाणू शकत नाही की त्यांच्या डोक्यात काय चालू आहे. अशी लोकं एक वेगळाच पॉवर गेम खेळतात. या पॉवर गेममध्ये ते गप्प बसून स्वत:चा राग व्यक्त करतात. पॅसिव अग्रेशन नात्यांच्या गणितासाठी अधिक त्रासदायक असतं. हे गप्प बसणं एवढं तणावात्मक असतं की समोरची व्यक्ती स्वत:लाच दोषी समजून यांच्यासमोर      झुकते.

तुम्ही असे तर नव्हता : जर तुमचं एखादं काम त्यांच्या हिशेबानुसार तुम्ही केलं नाही वा त्यांची गोष्ट ऐकली नाही तर ते वारंवार तुम्हाला ही जाणीव करून देतात की तुम्ही किती बदलले आहात व बदलली आहे. ही गोष्ट वारंवार पुढे केली जाते की तुम्ही स्वत: त्यांच्यावर संशय घेऊ लागले आहात. तुम्हाला वाटू लागतं की नक्कीच तुमच्यामध्ये काहीतरी नकारात्मक बदल झाले आहेत, जे त्यांच्यासाठी त्रासदायक आहेत.

कटू गोष्टी मस्करीच्या गाळणीत टाकणं : हा मॅन्युपुले टीव्ह लोकांचा एक अनोखा गुण असतो की कटू आणि तिखट बोलून ते वर असं बोलतात की, ‘‘अरे मी तर मस्करी करत होतो वा करत होती. तुला खरं वाटलं तर मी काय करू?’’

समोरच्याच मन दुखावण्यात त्यांना एक असीम आनंद मिळतो. परंतु ते मन दुखावूनदेखील त्यातून सहजपणे बाहेर पडतात.

अशी लोकं मित्रमंडळी वा जोडीदाराच्या रूपात तुमच्या आजूबाजूला नक्कीच असतील. यासाठी गरज आहे त्यांच्या या गोष्टी व कृत्याने स्वत:ला दोषी समजू नका. तुम्ही तुमच्या जागी अगदी बरोबर आहात. त्यांच्या हिशोबाने स्वत:ला बदल बदलण्यासाठी त्यांना सांगा. नात्यांना तडजोडीने नाही तर समजूतदारपणे आणि प्रेमाने साकारलं जातं.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...