* ओ. डी. सिंह

पतीपत्नी एकमेकांसोबत गोड क्षणांचं सुख तर अनुभवतातच, पण कडवटपणादेखील एखाद्या आव्हानासारखा त्यांना एकमेकांसोबत मैत्रीपूर्ण वातावरणात राहण्याची प्रेरणा देतो. विवाहपद्धतीविना हे जग एक तमाशा बनून राहिलं असतं. मात्र विवाहाने स्त्री पुरुषाच्या संबंधांना समाजात एक स्थायी स्थान दिलं आहे. पाश्चिमात्य देशात आधी ओळख मग प्रेम आणि मग लग्न होत असे, पण आपल्याकडे आधी लग्न आणि मग प्रेम व्हायचं. उत्तर भारतात अजूनही दोन अनोळखी कुटुंबांमध्ये मुलामुलींचं लग्न जुळतं. मात्र अलीकडे होणाऱ्या बुहतांश लग्नांमध्ये मुलंमुली एकमेकांना आधीपासूनच ओळखू लागतात. आपापसांत प्रेम होतं की नाही हे जरूरी नाही, प्रेमविवाहांना प्राधान्यही दिलं जाऊ लागलं आहे.

नातं टिकावं आनंदाने

लग्न कोणाचंही असो, कुठेही असो, एक गोष्ट तर नक्की आहे की मुलामुलीने एकमेकांना ओळखणं फार गरजेचं आहे. कारण आपलं आयुष्य प्रेमाने एकत्र आणि दिर्घ काळ टिकवायचं असतं. आयुष्यात आनंद काही बाहेरून येत नाही. दोघांनी मिळून मिसळून एकमेकांच्या भावनेची कदर करीत सर्व कामं पूर्ण करायची असतात शिवाय हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा ही दोघांची इच्छा असेल. घरातील कोणत्याही कामाची जबाबदारी कोणा एकाची नसते. ही गोष्ट वेगळी आहे की सवलतीसाठी आपण काही कामं वाटून घ्यावीत. काळानुरूप बदल घडू लागला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पती ही गोष्ट समजू लागले आहेत.

भांडणाचं कारण

मतभेदाच्या कारणांवर जर नजर टाकली तर असं दिसून येईल की अनेक प्रकरणांमध्ये एक तर एकमेकांच्या कुटुंबांवरून भांडणं होतात किंवा पती पत्नीच्या आयुष्यात कोणी दुसरी वा दुसरा येतं. लग्नानंतर पत्नीला आडनाव तर पतीचंच लावावं लागतं. मात्र आता काही पत्नी माहरेचं आडनावही रिटेन करतात. अनेक कुटुंबांमध्ये असं पाहायला मिळतं की मुलगा आपल्या आईवडिलांशी मोकळेपणाने आपल्या पत्नीच्या आवडी नावडी विषयी सांगू शकत नाही. उलट प्रत्येकवेळी तो पत्नीलाच गप्प करतो. अशावेळी जर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तरच पुढे काही होऊ शकेल. कोणत्याही परिस्थित आधी पती पत्नीचं नातं विश्वसनीय असायला हवं, तेव्हाच वातावरण चांगलं बनतं आणि मुलावर चांगले संस्कार होतात.

असंही पाहण्यात येतं की आईवडिल जुन्या युगातील लग्नाशी मुलांच्या लग्नाची तुलना करतात, जे की चांगलं नाही. आधी भांडणं होण्याचे प्रसंगच येत नव्हते. पतीला देव समजलं जायचं, त्याने जो निर्णय घेतला तोच पत्नीला मान्य असायचा. पण आता युग बदललं आहे. मुली शिकून सवरून चांगल्या नोकऱ्या करत आहेत आणि भरपूर पैसा कमवत आहेत. पती पत्नीचं नातं रक्ताचं नातं नसूनही आयुष्यात फार महत्त्वाचं ठरतं. मात्र जे लोक या नात्याचं महत्त्व न समजून घेता, याला खेळ समजतात, एकमेकांच्या भावनेला ठेच पोहोचवतात, त्यांच्याइतका महामूर्ख कोणीच नसेल आणि तिथे कुटुंब उध्वस्त होण्याची वेळ येणं तर स्वाभाविकच आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...