* ऋतु वर्मा

श्वेता आजकाल प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट मनाला लावून घेते. कोरोनाच्या काळात दिवसभर घरात कोंडून घेतल्याने तिचे मन निराश राहत असे. आता कोरोनाचा काळ संपत आला आहे, पण श्वेताच्या मनात अशा निराशेने घर केले आहे की आता प्रत्येक गोष्टीवर पती आणि मुलांना झिडकारणे श्वेताच्या आयुष्यातील सामान्य बाब झाली आहे. परिणामी पती आणि मुले श्वेतापासून दूर राहू लागले आहेत.

मनीषाची गोष्ट वेगळी आहे. नवनवीन पदार्थ, ब्युटी ट्रीटमेंट आणि घराचा प्रत्येक कोपरा चकाचक करणं हा सर्व मनीषाच्या दिनचर्येचा भाग होता. मात्र लग्नाला ४ वर्षे उलटूनही मूल न झाल्याने ती खूप निराश झाली. शेजारी-पाजारी आणि नातेवाईकांनी वारंवार विचारपूस केल्याने मनीषा चिडचिडी झाली होती.

आता ती तिच्या पती आणि सासू-सासऱ्यांच्या प्रत्येक छोट्या-छोटया गोष्टीवर प्रतिक्रिया देते. तिच्या आयुष्याची चमक हरवल्यासारखं तिला वाटत होतं. आता ती फक्त आयुष्य ढकलत आहे.

गौरवच्या कंपनीत कपात सुरू झाली आहे. गेल्या ३ महिन्यांपासून तो एका अज्ञात भीतीमध्ये जगत आहे. घरखर्चावर तो सतत टोकाटाकी करत राहतो. त्याची पत्नी पूनमला आता गौरवला कसे सामोरे जावे हे समजत नाही. दोघांमध्ये गुदमरल्यासारखी स्थिती आहे जी कधीही बॉम्बप्रमाणे फुटू शकते.

नीतीची समस्या काहीशी वेगळी आहे. मुलीला जन्म दिल्यानंतर गेल्या ५ महिन्यांपासून नीतीने पार्लरचे तोंडही पाहिले नाही. तिचे रखरखीत कोरडे झाडूपासारखे केस, वाढलेल्या डोळयांच्या भुवया आणि वरचे ओठ हे सर्व तिला त्रासदायक वाटत आहे.

नीतीच्या म्हणण्यानुसार, ‘‘मी स्वत: माझा चेहरा आरशात पाहण्यास घाबरते, माझ्या मनात एका विचित्र न्यूनगंडाच्या भावनेने घर केले आहे.’’

नीतीला आपली मुलगी शत्रू असल्यासारखे वाटू लागले होते.

आजच्या काळात ही चिडचिड, एकटेपणा, नैराश्य दिवसेंदिवस वाढतच आहे. आयुष्यात कधी कोणता अपघात होईल हे कोणालाही ठाऊक नसते. पण जीवनातील आनंदावर चिडचिडेपणाचा ब्रेक लावू नका. काही छोटे-छोटे बदल करून तुम्ही स्वत:ला स्थिर आणि शांत करू शकता.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...