* मिनी सिंह

‘प्रेम करणे आणि निभावणे सोपे नसते’ हे सर्वांनाच माहिती आहे. आईवडील, नातेवाईक, समाज, जातीधर्माच्या सर्व भिंती लांघून एक होणे अवघड असते. तरीही या सर्व सीमा ओलांडून जे एकत्र येतात त्यांना सहजीवनाचा मार्ग सापडतोच. त्यावेळी त्यांना असे वाटते की, त्यांना ते सर्व काही मिळाले जे त्यांना हवे होते.

परंतु, संसाराची जबाबदारी खांद्यावर येऊन पडताच त्यांना लग्न म्हणजे एखादे कंटाळवाणे बंधन वाटू लागते. लग्नाआधीचेच जीवन बरे होते, उगाचच लग्नाच्या बेडीत अडकलो, अशी भावना त्यांच्या मनात घर करू लागते.

लग्नापूर्वीचे रुसवे-फुगवे, एकमेकांची समजूत काढणे हे नाटकी होते असे वाटू लागते. लग्नाच्या अवघ्या २-३ वर्षांतच त्यांच्या वैवाहिक नात्यातील गोडवा कमी होऊ लागतो. त्यामुळे मनात नसतानाही अखेर हे प्रेमी युगुल सर्वसामान्य पती-पत्नीसारखे जगू लागतात आणि अगदी लहानसहान गोष्टींवरूनही त्यांच्यात भांडणे सुरू होतात. पाहायला गेल्यास भांडण हेही प्रेमाचेच एक रूप असते आणि छोटे-मोठे वाद तर प्रत्येक नात्यात होतातच, पण जेव्हा ते विकोपाला पोहोचतात तेव्हा घटस्फोट घेण्याची वेळ येते आणि सर्व काही संपून जाते.

प्रिया आणि समीरसोबतही काहीसे असेच घडले. कुटुंब आणि समाजाचे वाईटपण स्वीकारून त्यांनी लग्न केले. वैवाहिक जीवनात प्रेमाचे रंग भरले, पण हळूहळू हे रंग फिकट होऊ लागले. त्यांना हे नाते कंटाळवाणे वाटू लागले. प्रेम वगैरे सर्व खोटे असते, असे वाटू लागले.

नात्यामध्ये जागवा रोमान्स

लग्नापूर्वी प्रेमी युगुल जीवाला जीव देतात. त्यांना एकमेकांची प्रत्येक गोष्ट बरोबर वाटते. लग्नानंतर मात्र त्याच सर्व गोष्टी त्यांना कंटाळवाण्या वाटू लागतात. याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही भांडण करून विभक्त व्हावे आणि त्यानंतर तुम्हाला याचा पश्चात्ताप व्हावा.

* पतीपत्नीत प्रेमाची नवी ऊर्जा जागवणे कठीण नाही, फक्त थोडासा बदल आणि समजूतदारपणा गरजेचा असतो. यामुळे तुमचा जोडीदार आनंदी होईल, सोबतच तुमच्या नात्यातही नवेपणा येईल. प्रेमाची बाग पुन्हा सुगंधित होईल. नाती निभावण्यासाठी असतात, छोटयाछोटया कारणांमुळे रागावून तोडण्यासाठी नसतात, ही गोष्ट पतीपत्नी दोघांनीही समजून घेणे गरजेचे असते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...