स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका!

* नम्रता पवार

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांमध्ये चतुरस्त्र अभिनेते भरत जाधव यांनी स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे. स्वतःचा एक प्रचंड मोठा चाहता वर्गही त्यांनी  निर्माण केला. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही त्यांनी पाऊल ठेवले. मराठी रंगभूमीवर ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘ऑल दि बेस्ट’, ‘आमच्या सारखे आम्हीच’ अशी अनेक नाटके त्यांनी गाजवली असून काहीतरी नावीन्यपूर्ण देण्याकडे भरत जाधव यांचा कायमच कल राहिला आहे. त्यामुळे यंदाही असेच काहीतरी नवीन घेऊन येण्यास भरत जाधव सज्ज झाले आहेत. काही वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट रोजी ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला होता. याच खास क्षणाचे औचित्य साधत भरत जाधव येत्या १५ ऑगस्ट रोजी नाट्यरसिकांसाठी ट्रिपल धमाका घेऊन येत आहेत. यात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग एकाच नाट्यगृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात हे प्रयोग होणार असून या दिवशी रसिकांना भरत जाधव यांच्या वेगवेगळ्या पात्रांची झलक अनुभवायला मिळणार आहे. यावेळी सकाळी ‘अस्तित्व’,  दुपारी ‘मोरूची मावशी’ तर सायंकाळी ‘पुन्हा सही रे सही’ या तीन नाटकांचे प्रयोग होणार आहेत. वैशिष्टय म्हणजे ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाचा ४४४४ वा प्रयोग यावेळी होणार असून या प्रयोगाला राज ठाकरे यांची उपस्थिती लाभणार आहे.

भरत जाधव आणि चिन्मयी सुमीत यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘अस्तित्व’ या नाटकाची निर्मिती भरत जाधव यांनी केली असून या नाटकाला महाराष्ट्र शासनचा व्यावसायिक नाटकासाठी सर्वोत्कृष्ट निर्मितीचा पुरस्कारही मिळाला आहे. तर भरत जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे. या नाटकाचे आतापर्यंत ५८ प्रयोग झाले आहेत. तर मोरूची मावशी या नाटकाने आतापर्यंत ८६२ प्रयोगांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे हा ट्रिपल धमाका प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

याबद्दल भरत जाधव म्हणतात, ” प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्याचा माझा प्रयत्न असतो. यावेळी १५ ऑगस्ट रोजी मी तीन वेगवेगळ्या धाटणीची नाटके नाट्यप्रेमींसाठी घेऊन आलो आहे. या नाटकांवर आणि माझ्या भूमिकांवर रसिकांनी भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळेच ही ऊर्जा मला मिळू शकते. ही तीनही  नाटके प्रेक्षकांसमोर घेऊन येताना मला प्रचंड आनंद होतोय. मला खात्री आहे, प्रेक्षक या तिन्ही नाटकांना प्रतिसाद देतील.”

हार्दिक जोशी झळकतोय ‘या’ चित्रपटात !

* नम्रता पवार

सध्या जोरदार चर्चेत असलेला, आगरी-कोळी भाषेचा जलवा दाखवणारा, ॲक्शनपट ‘बाबू’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अंकित मोहनच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच आता या चित्रपटातील एक सरप्राईस एलिमेंट समोर आला आहे. या चित्रपटात रांगड्या व्यक्तिमत्वाचा हार्दिक जोशी एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसत असून दाक्षिणात्य व्यक्तिरेखा साकारणारा हार्दिक या चित्रपटात प्रथमच नकारात्मक भूमिकेत आहे.

आपल्या या व्यक्तिरेखेबद्दल हार्दिक जोशी म्हणतो, ” वेगळ्या धाटणीची ही व्यक्तिरेखा असून प्रथमच मी नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. नेहमीच वेगवगळ्या भूमिका साकारण्याकडे माझा कल असतो. या भूमिकेबद्दल प्रेक्षकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. खूप छान वाटतेय, प्रेक्षक अशा भूमिकांमध्येही मला स्वीकारत आहेत, याचा विशेष आनंद आहे. सध्या माझ्या ‘बाबू’मधील व्यक्तिरेखेबाबत चित्रपटातही गोपनीयता आहे. मात्र हे रहस्य दुसऱ्या भागात उलगडणार असून ते जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. तर दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात, ” हार्दिकचे व्यक्तिमत्व भारदस्त आहे. त्यामुळे या भूमिकेत तो चपखल बसतो. अतिशय उत्तमरित्या त्याने ही व्यक्तिरेखा साकारली आहे. ‘बाबू’मध्ये आणखीही बरीच रहस्ये आहेत. जी दुसऱ्या भागात समोर येतील.”

समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे, संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.

‘तू भेटशी नव्याने’ मालिकेला प्रेक्षक पसंती

* सोमा घोष

वैविध्यपूर्ण आशय-विषय यामुळे काही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस अल्पावधीतच उतरतात. सध्या अशाच एका मालिकेची जोरदार चर्चा आहे, ही मालिका म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’. सोनी मराठी वाहिनीने आजवर अनेक चांगल्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. या मालिकांवर प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम केलं आहे. मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेच्या माध्यमातून पहिली एआय मालिका प्रेक्षकांसाठी आणली आणि अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली. अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री शिवानी सोनार यांची फ्रेश जोडी आणि प्रेमाचा विषय आगळ्यावेगळ्या पद्धतीनं मांडल्यामुळे ही मालिका प्रेक्षक पसंतीस उतरली आहे.

‘उत्तम कथा’, ‘माही आणि अभिमन्यू यांचा संवाद लाजवाब’, ‘आम्हांला खूप आवडते ही मालिका’, ‘उत्तम अभिनयाने नटलेली ही मालिका पाहण्याची उत्कंठा दिवसेंदिवस वाढतेय’. ‘एआयचा उत्तम वापर असलेली सर्वोत्कृष्ट मालिका’ अशा अनेक चांगल्या प्रतिकिया प्रेक्षकांकडून येतायेत.

अगदी सुरुवातीपासूनच या मालिकेला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालाय, याबद्दल सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर यांनी सांगितलं, ‘मालिकेला मिळणारं प्रेक्षकांचं प्रेम पाहून चांगलं काम करायला अजून उत्साह  मिळतो. पडद्यावरचे आणि पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ या सगळ्यांचीच खूप छान भट्टी जमून आली आहे.

‘तू भेटशी नव्याने’ या मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत असून मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. प्रिया मराठे आणि किशोरी आंबिये यांच्यामुळे मालिकेत सध्या रंजक वळण आलं आहे. त्यामुळे येत्या भागांमध्ये भरपूर नाट्य घडणार असून प्रेक्षकांचं मनोरंजन होणार आहे यात शंका नाही.

आयुष्यात पहिलं प्रेम कधीही विसरता येत नाही. त्या प्रेमाच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम असतात. याच आठवणींचा हळवा बंध घेऊन माही आणि गौरी या दोघांची प्रेमकथा या मालिकेत दाखवण्यात आली आहे. प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी ही नवीकोरी गोष्ट दोन काळांतल्या वेगळ्या शैलीत दिसत आहे. मालिकेचे दिग्दर्शक आणि निर्माते अजय मयेकर आहेत. सहनिर्माते  संदीप जाधव आहेत.

सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री ९.००वा. ही मालिका प्रसारित होते.

‘स्त्री 2′ मधील ‘आज की रात’ मधील तमन्ना भाटियाच्या जबरदस्त डान्स मूव्हचं प्रेक्षकांनी केलं कौतुक !

* सोमा घोष

पॅन-इंडिया स्टार तमन्ना भाटियाने आगामी हॉरर-कॉमेडी ‘स्त्री 2’ मधील ‘आज की रात’ गाण्यात तिच्या अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. रजनीकांत स्टारर ‘जेलर’ मधील ‘कावला’ आणि ‘अरनमानाई 4’ मधील ‘अचाचो’ यासारख्या हिट गाण्यांमध्ये तिच्या दमदार डान्स मूव्हसाठी ओळखली जाणारी तमन्ना आता ‘स्त्री 2′ मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मधुबंती बागची आणि सचिन-जिगर या डायनॅमिक जोडीने संगीतबद्ध केले आहे. विजय गांगुली यांनी कोरिओग्राफ केलेले, तमन्नाच्या डान्सने प्रेक्षकांना मोहित केलं आहे. या गाण्याने सोशल मीडियावर आधीच धुमाकूळ घातला आहे. हे अनेक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर देखील ट्रेंड करत आहे. हे गाणे यूट्यूबवर आल्यापासून चाहत्यांनी तमन्ना आणि तिच्या अभिनयाचे कौतुक केले आहे.

 

https://x.com/tgangeshwaran/status/1816110209074446404?s=46&t=oh8v5SeUB06-89–L_mXog

 

https://x.com/missb_fan/status/1816141848609710512?s=46&t=oh8v5SeUB06-89–L_mXog

 

“प्रत्येक वेळी तमन्ना बॉटल ग्रीन ड्रेसमध्ये येते तेव्हा तुम्हाला माहीत आहे की ती झगमगाट करणार आहे,” एक टिप्पणी वाचली, तर दुसरी टिप्पणी वाचली, “ती एका गाण्यासाठी चित्रपटात येते.. पण संपूर्ण चित्रपट चोरतो… Tammannah alwayz rockz.” एका युजरने लिहिले की, “ती फक्त तिच्या नितळ नृत्याने लाखो हृदयांचा नाश करणार आहे”.

तमन्ना फक्त तिच्या स्क्रीन प्रेझेन्सने कशी लक्ष वेधून घेते यावरही अनेकांनी कमेंट केली. वर्षानुवर्षे, अभिनेत्रीच्या पाऊलखुणा आकर्षित करण्याच्या क्षमतेमुळे ती चित्रपट निर्मात्यांसाठी एक आवडती निवड बनली आहे, ज्यांना वाटते की अभिनेत्री ही भाग्यवान आकर्षण आहे जी चित्रपटांना ब्लॉकबस्टरमध्ये बदलू शकते. ‘आज की रात’ च्या रिलीजने 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या स्त्री 2 च्या आसपासचा उत्साह वाढवला आहे. ‘स्त्री 2’ व्यतिरिक्त, तमन्नाच्या चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. ती ‘ओडेला २’, ‘वेद’ आणि ओटीटी मालिका ‘डेअरिंग पार्टनर्स’मध्ये दिसणार आहे.

‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत राजवीर आणि मयूरी यांचा लग्नसोहळा

* सोमा घोष

राजवीर आणि मयूरी यांचा लग्नसोहळा! ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ महाएपिसोड, रविवारी रात्री ८ वाजता सोनी मराठीवर.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील राजवीर तर अनेक तरुणींचा ‘ड्रीम बॉय’ बनलाय. पण या ‘ड्रीम बॉय’ची ‘ड्रीम गर्ल’ अर्थात मयूरी हे दोघं आपलं प्रेम एकमेकांकडे कधी व्यक्त करणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती. राजवीर आणि मयूरी यांच्यामध्ये आता प्रेमाची कबुली झाली आहे. प्रेमाच्या प्रवासाला आता सुरुवात झाली आहे. मालिकेत राजवीर आणि मयूरी यांच्या प्रेमाचा बहर प्रेक्षकांना पाहायला मिळतो आहे. मयूरी हीच बॉडीगार्ड असल्याचं राजवीरला समजलं आहे पण याबद्दल बाकी कोणालाही काही समजलेलं नाही. यामिनी या लग्नाच्या विरोधात आहे. राजवीर आणि मयूरी यांचं लग्न होऊ नये यासाठी तिने भरपूर प्रयत्न केले, पण आता राजवीर आणि मयूरी यांचे लग्न आता ठरलं आहे आणि आता यामिनीच्या हातातून परिस्थिती बाहेर गेली आहे. आजवर तिने राजवीरला मयूरीपासून लांब ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले. पण आता मयूरी आणि राजवीर एकत्र येणार आहेत आणि त्यांचं लग्न थाटामाटात होणार आहे. सराफ कुटुंबातलं हे लग्न नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे.

या लग्नात मेहंदी, हळद, संगीत आणि लग्नसोहळा असे सगळे कार्यक्रम पार पडणार आहेत. या सोहळ्यात काही विशेष व्यक्तिरेखा सहभागी होणार आहेत. ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतील शिवानी सोनार ही अभिनेत्री धमाल असे नृत्य करणार आहे. याव्यतिरिक्त मयूरी आणि राजवीर, मयूरी आणि संपूर्ण सराफ कुटुंब एकत्र नृत्य करणार आहेत. रविवार रात्री ८ वाजता महाएपिसोड मध्ये लग्नं प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून त्या आधीच्या सगळ्या भागात संगीत, हळद असे कार्यक्रम पाहायला मिळणार आहेत. आता हे लग्न व्यवस्थित पार पडेल का काही अडथळा येईल  हा मोठा प्रश्न असणार आहे. यामिनी काही शांत बसणार नाही. हे लग्न होऊ नये यासाठी ती काही-ना-काही हालचाल नक्की करणार. यामिनीने चक्क मयूरीचे अपहरण करण्याचा बेत आखला आहे. मयूरी यातून  स्वतःला कशी वाचवणार? शिवाय मयूरीला या लग्नात बॉडीगार्ड म्हणूनही वावरायचे आहे. ती हे सगळं कसं निभावून नेणार, हे पाहणं‌ उत्सुकतेचं ठरणार आहे. राजवीरला या सगळ्याची काही माहिती नाही. जर त्याला समजलं तर गोष्टी आणखी कठीण होऊन बसतील. लग्नानंतर राजवीर आणि मयूरी कशा प्रकारे आपला संसार करतील, हे  पाहणंही प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असेल.

‘अबोल प्रीतीची अजब काहाणी’ या मालिकेत हे सर्व प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे, पण आता आत्याच्या येण्याने राजवीर-मयूरीच्या या प्रेमकहाणीत अजून काय ट्विस्ट येणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. कारण आता लग्नसोहळा पार पडणार असून प्रेक्षक या लग्नासाठी फार उत्सुक आहेत.

पाहायला विसरू नका, ‘अबोल प्रीतीची अजब काहाणी’, लग्नसोहळा महाएपिसोड, रविवारी रात्री ८ वाजता सोनी मराठीवर.

आपल्या हलदीन गर्दी करायला येतेयं ‘दादल्या’

* नम्रता पवार

मयूर शिंदे दिग्दर्शित ‘बाबू’ चित्रपटातील टायटल सॉन्ग आणि ‘फ्युचर बायको’ ही जबरदस्त गाणी प्रदर्शित झाल्यानंतर आता ‘दादल्या’ हे भन्नाट गाणे संगीतप्रेमींच्या भेटीला आले आहे. मंगेश कांगणे यांचे बोल असणाऱ्या या गाण्याला रोहन-रोहन यांचे उत्स्फूर्त संगीत लाभले आहे. तर चंदन कांबळे यांनी आपल्या दमदार आवाजात हे गाणे गायले आहे. अंकित मोहन आणि मंदार मांडवकर यांच्यावर चित्रीत झालेले हे प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे आहे. हळदी समारंभ गाजवणाऱ्या या गाण्यातील हूक स्टेपही लवकरच ट्रेंडिंगमध्ये येईल.

Link : https://youtu.be/AmsU97AWVmc?si=lNKO6jWI4iEVJ9CN

या गाण्याबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात, ” कोळी आगऱ्यांची हळद म्हणजे तुफान धमाल असते. त्यामुळे या चित्रपटातही असे उत्साहाने भरलेले एखादे गाणे असायलाच हवे, असा अट्टाहासच होता. त्यामुसार ‘दादल्या’ गाणे आम्ही घेऊन आलो आहोत. या गाण्यात काही ठराविक स्टेप्स सोडल्या तर आम्ही नृत्यासाठी प्रत्येकाला मोकळीक दिली होती. त्यामुळे हे गाणे अतिशय कमाल चित्रित झाले आहे. त्यात रोहन-रोहनच्या जबरदस्त संगीताने यात अधिकच रंगत आणली आहे आणि या सगळ्याला जोड लाभली आहे ती गाण्याचे बोल आणि गायकाची. त्यामुळे पुढे आता हळदी संभारंभात हे गाणे आवर्जून वाजणार हे नक्की!”

श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली असून चित्रपटाचे लेखन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे, संजय खापरे, मंदार मांडवकर, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या २ ॲागस्टला ‘बाबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेचे ६०० भाग पूर्ण

* सोमा घोष

बयोच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास रेखाटणारी ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ ही सोनी मराठीवरील लोकप्रिय आणि मौलिक संदेश देणारी मालिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे. शिक्षणाच्या ध्यासाने कोकण ते मुंबई असा खडतर प्रवास करणारी बयो आता डॉक्टर होण्याच्या प्रवासात पुढची वाटचाल करते आहे. तिला आजवर वडिलांचा पाठिंबा आणि डॉ. विशालची साथ मिळाली.

आजवरच्या सगळ्या अडचणींना सामोरं जात बयोचा डॉक्टर होण्याचा प्रवास सुरू आहे. वडिलांसोबत ती गरजू रुग्णांची सेवा घरच्या घरी करू लागली होती, पण आता हॉस्पिटलमध्येच रुग्णांची सेवा‌ करून बयो आपले शिक्षणही घेते आहे.

मुंबईसारख्या स्वप्नांच्या नगरीत येऊन आपले स्वप्न पूर्ण करू पाहणारी बयो अनेक संकटांना सामोरी गेली. सोबतच वडिलांचा शोध आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी झटणारी बयोही आपण पहिली. ही भूमिका अभिनेत्री विजया बाबर चोख बजावते आहे. मालिकेने आता ६०० भागांचा टप्पा पार केला. या वेळी मालिकेतील सगळे कलाकार उपस्थित होते. इराची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋचा गायकवाडही उपस्थित होती. त्याशिवाय ६०० भागांचं निमित्त म्हणून लहानपणीच्या बयो आणि इरा यांनीही उपस्थिती लावली आणि एकत्र साजरा केला ६००वा भाग.

या वेळी अभिनेत्री विजया बाबर म्हणाली हा ६०० भागांचा टप्पा प्रेक्षकांच्या प्रेमाशिवाय पूर्ण करू शकलो नसतो. प्रेक्षकांचे प्रेम जर असेच पाठीशी राहिले तर आम्ही अजून जोमाने काम करू. मालिकेच्या संपूर्ण चमूने एकत्र येऊन हा महत्त्वपूर्ण  टप्पा साजरा केला आणि आनंद व्यक्त केला. आजवरचा बयोचा प्रवास खडतर होता, पण यापुढला तिचा प्रवास कसा असेल, हे मालिकेतल्या पुढल्या भागांत पाहायला मिळेल. इरा आणि बयो यांच्यामधील वाद पुढे आता काय वळण घेईल हेही आता आपल्याला मालिकेत पाहायला मिळेल आणि हे समजून घेण्यासाठी आपल्याला मालिका पाहावी लागेल.

या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पाहायला विसरू नका, ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ ही मालिका!

सोम. ते शनि. रात्री ८.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर.

अपारशक्ती खुराणा स्टारर ‘बर्लिन’ चा IIFM 2024 मध्ये होणार प्रीमियर

* सोमा घोष

अपारशक्ती खुरानाचा आगामी चित्रपट ‘बर्लिन’ हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये चर्चेत असताना आता या चित्रपटाचा मेलबर्नच्या प्रतिष्ठित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 15 व्या आवृत्तीत ऑस्ट्रेलियन प्रीमियर होणार आहे.

इंस्टाग्रामवर ही खास गोष्ट शेअर करताना अभिनेत्याने लिहिले #बर्लिनचा थरारक प्रवास सुरूच आहे! प्रतिष्ठित @iffmelbourne ✨#IndianFilmFestivalOfMelbourne च्या १५ व्या आवृत्तीत हा चित्रपट ऑस्ट्रेलियन प्रीमियरसाठी सज्ज आहे!

बर्लिन’ एका मूकबधिर तरुणाची कथा सांगणार आहे ज्याला गुप्तहेर म्हणून ब्युरोने अटक केली आहे. एक वेधक कथानक असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना कुतूहलाच्या रोलरकोस्टरवर नेण्याचे वचन देतो. अतुल सभरवाल दिग्दर्शित या चित्रपटात इश्वाक सिंग, राहुल बोस आणि कबीर बेदी यांच्याही भूमिका आहेत.

‘बर्लिन’ व्यतिरिक्त अपारशक्ती खुराना ‘स्त्री 2’ मध्ये दिसणार आहे ज्यामध्ये तो त्याच्या प्रेक्षकांची आवडती भूमिका ‘बिट्टू’ पुन्हा साकारताना दिसेल. तो सध्या लंडनमध्ये ‘बदतमीज गिल’साठी शूटिंग करत आहे ज्यामध्ये तो परेश रावल आणि वाणी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे. याशिवाय त्यांच्याकडे ‘फाइंडिंग राम’ नावाचा डॉक्युमेंटरीही आहे.

‘मी 20 वर्षांची मुलगी होते जी फॅशनसाठी माझ्या आवडीचे अनुसरण करत होती आणि डिझाइनर्सकडून कपडे उधार घेत होती!’ : सोनम कपूर

* सोमा घोष

बॉलीवूड स्टार सोनम कपूर, तिला आता भारतातील फॅशनची अंतिम प्रेरणा मानली जाते, तिने  कधीही स्टाइलची उच्च पुजारिन होण्याचा हेतू ठेवला नव्हता. एक प्रतिमा तयार करण्याची कोणतीही रणनीती नव्हती. त्यांनी फक्त त्यांच्या फॅशनच्या आवडीचे अनुसरण केले आणि भारतीय व पाश्चिमात्य डिझाइनर्सकडून कपडे उधार घेतले… आणि बाकी इतिहास आहे!

सोनम सांगते, “मी फक्त मला आवडणारे कपडे घालू इच्छित होते आणि ज्यांना मी ओळखत होते त्यांच्याकडून घेतले. हे फक्त मी स्वतःला पसंत असणे होते, जे मला माझ्या आईकडून मिळालेल्या शिक्षणाने आणि माझ्या फॅशनच्या आवडीने प्रभावित केले. मी आंतरराष्ट्रीय आणि भारतीय फॅशन डिझाइनर्सना तारे मानले कारण मी त्यांचे कौतुक करत होते. हे प्रतिमा प्रोजेक्ट करण्याबद्दल नव्हते; हे माझ्या फॅशनच्या खऱ्या प्रेमाबद्दल होते.”

ती पुढे म्हणते, “माझ्या लक्षात आले की लोक सहसा कपडे उधार घेत नाहीत, त्यामुळे मी उधार घेण्यास सुरुवात केली. सर्व वेळ सर्वकाही खरेदी करणे शहाणपणाचे नव्हते. मी खूप काही खरेदी केले, पण उधार घेणे अधिक व्यावहारिक होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर ही प्रथा सामान्य होती, परंतु भारतात नाही, त्यामुळे मी जे त्या वेळी बरोबर वाटले तेच केले. मी एक 20 वर्षांची मुलगी होते, फक्त फॅशनच्या आवडीचे अनुसरण करत होते, कोणत्याही रणनीतिक हेतूशिवाय.”

सोनम आता एक जागतिक फॅशन आयकॉन आहे आणि त्यांच्या अप्रतिम फॅशन सेंस आणि ब्रँड्सवर तिच्या व्यापक प्रभावासाठी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रशंसित केले आहे. तिच्या सतत उत्कृष्ट फॅशन निवडींनी त्यांना जगभरातील शीर्ष फॅशन ब्रँड्सच्या आवडींच्या यादीत नेले आहे.

ही सुंदर अभिनेत्री म्हणते, “कला, सिनेमा किंवा फॅशनच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची समृद्धी आणि विविधता प्रतिनिधित्व करणे हे एक विशेषाधिकार आहे. जगासमोर भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी परदेशात भेटलेल्या दक्षिण आशियाई लोकांनाही त्यांची संस्कृती सादर करायला आवडते आणि जेव्हा लोक ती ओळखतात आणि समजतात तेव्हा ती प्रशंसा करतात. संग्रहालये, रेड कार्पेट किंवा कोणतेही व्यासपीठ असो, मी भारतीय संस्कृतीची सुंदरता आणि समृद्धी प्रदर्शित करण्यासाठी प्रत्येक संधीचा फायदा घेते.”

‘बाबू नाय… बाबू शेठ’

* नम्रता पवार

बाबू नाय, बाबू शेठ म्हणत, अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश ‘बाबू’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा दणक्यात पार पडला. यावेळी कलाकारांनी चित्रपटातील व्यक्तिरेखांच्या पेहरावात आगरी बेंन्जोच्या तालावर खास कोळी स्टाईलने नृत्य करत दमदार एंट्री केली. तर ‘बाबू’नेही त्याच्या अनोख्या अंदाजात बाईकवरून भन्नाट एन्ट्री घेतली. यावेळी ‘बाबू’ची भूमिका साकारणाऱ्या अंकित मोहनचा एक वेगळाच स्वॅग पाहायला मिळाला. आपल्या कोळी बांधवांना, भगिनींना घेऊन तो ही या कोळी नृत्यात सहभागी झाला. या उत्साहाने भरलेल्या वातावरणात अंकितच्या २० फूट पोस्टरचे अनावरणही करण्यात आले. या भव्य सोहळ्यात चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, इतर टीमसह कोळी बांधवही सहभागी झाले होते.

प्रदर्शित झालेला ट्रेलर पाहून प्रेक्षकांची ‘बाबू’विषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. यात ‘बाबू’च्या आयुष्यातील प्रेम, शत्रु आणि सूडभावना, जबरदस्त ॲक्शन दिसत आहे. त्याच्या आयुष्यात नेमके काय होते, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणतात, ” मराठीत पहिल्यांदाच असा आगरी कोळी भाषेचा झणझणीपणा अनुभवायला मिळणार आहे. ९०च्या दशकातील ही कथा प्रेक्षकांना नोस्टॅल्जिक करणारी आहे तर तरूणाईला जुन्या काळातील प्रेमाचा अंदाज दाखवणारा हा चित्रपट आहे. यात प्रेम, मैत्री, दुरावा, शत्रुत्व, बदला, ॲक्शन अशा सगळ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे मनोरंजनाचे हे एक परिपूर्ण पॅकेज आहे.’’

श्री समर्थ कृपा प्रोडक्शन प्रस्तुत ‘बाबू’ या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू भोईर यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे. अंकित मोहन, नेहा महाजन, रुचिरा जाधव, स्मिता तांबे, संजय खापरे, श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या २ आगस्टला ‘बाबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें