*  डॉ. मुनीष पॉल

आईने जेव्हा समजावलं होतं की मनगटावर काढलेल्या टॅटूमुळे तुला मनस्ताप सोसावा लागेल तेव्हा तू दुर्लक्ष केलं होतंस. मात्र जेव्हा ४ वर्षांनंतर एका आंतरराष्ट्रीय एअरलाइन्समध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली तेव्हा मात्र हा टॅटू करिअरच्या आड तर येणार नाही ना याचीच चिंता सतावू लागलीय.

असो, अशी चिंता सतावणारे तुम्ही काही एकटेच नाही आहात. गेल्या काही वर्षांत टॅटू भारतीय युवा संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनलाय.

अनेक त्वचा तज्ज्ञ तर चेतावनी देतात की टॅटू पूर्णपणे काढणं शक्य नाहीए. कारण हा स्थायी असतो, त्याला काढून टाकणं खूपच कठीण आहे. परंतु काही सर्जन असेदेखील आहेत, जे टॅटू पूर्णपणे काढण्याची गारंटी देतात. टॅटू काढण्याच्या अनेक पद्धती आहेत, ज्या खरोखरंच परिणामकारक आहेत. यामध्ये सर्वप्रथम टॅटूचा आकार त्याची जागा, घाव भरून येण्याची व्यक्तिगत समस्या, टॅटू कसा बनविण्यात आला होता आणि टॅटू त्या जागी किती वर्षं काढला आहे याचा विचार केला जातो. उदाहरण द्यायचं तर जर टॅटू एखाद्या अनुभव आर्टिस्टकडून काढून घेतला असेल, तर तो काढून टाकणं अधिक सहजसोपं होतं. कारण त्याने वापरलेले रंग त्वचेच्या समान स्तरावर समान पद्धतीने भरले गेलेले असतात. जुन्या टॅटूपेक्षा नवीन टॅटू हटवणं अधिक कठीण होऊ शकतं.

टॅटू काढण्याच्या प्रक्रियेचा विकास

तुम्ही जर ५ वर्षांपूर्वी टॅटू काढण्याचा विचार केला असता तर त्यावेळची प्रक्रिया खूपच वेदनामय, अधिक महागडी आणि १०० टक्के परिणामकारक असेलच याची खात्री देणारी नव्हती. परंतु आता लेझर तंत्रज्ञान इतकं आधुनिक झालंय की हा उपाय खूपच सुरक्षित आणि आरामदायक बनलाय. याबरोबरच याच्या परिणामाबद्दल अगोदरच आपण अनुमानदेखील वर्तवू शकतो.

टॅटू हटविणे वा त्यापासून सुटका करण्यामागे बरीचशी कारणं असू शकतात. टॅटूसंबंधित काही गोष्टींचं ओझं वा लग्नासाठी वा नोकरीसाठी किंवा इतर कोणतंही कारण असो लेझर तंत्रज्ञानाने टॅटू मिटवणं अतिशय सुरक्षित आहे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...