झंप्पीचे ७ फायदे

* गरिमा

सुंदरशा  झंप्पीत नाती बदलण्याची क्षमता असते. ही गोष्ट वेगळी आहे की या मागे एखादे कटकारस्थान अथवा राजकारण नसावे. बऱ्याच काळापूर्वी राहुल गांधी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची झंप्पी खूप चर्चेत होती. संसदेच्या मान्सून सत्रात अविश्वास प्रस्तावादरम्यान राहुल गांधी यांनी पीएम नरेंद्र मोदी यांना जादूची झंप्पी दिली. राहुलने भाषणानंतर अचानक मोदींच्या आसनाजवळ जात त्याची गळाभेट घेतली. हे वेगळे की या घटनेचे नंतर राजकारण होऊ लागले.

दोन्ही नेत्याच्या या झंप्पीने २०१३ मधील एका पार्टीत शाहरुख आणि सलमान यांच्या झंप्पीची आठवण करून दिली. या झंप्पीने चित्रपट अभिनेता शाहरुख खान आणि सर्वांना आवडणारा सलमान खान यांच्यातील ५ वर्षापूर्वीचा कडवटपणा नाहीसा केला होता.

तुम्ही जेव्हा एखाद्याची गळाभेट घेता, तेव्हा समोरच्याला आपुलकी आणि कोणत्याही परिस्थितीत साथ देण्याचा संदेश देत असता. तुम्ही दोघे या एकमेकांच्या जवळ आले आहात असे तुम्हाला जाणवते. यामुळे नाते तर दृढ होतेच शिवाय इतर अनेक प्रकारचे फायदेही असतात.

फक्त मिठी मारणे किंवा गळाभेट घेणे हे पुरेसे नाही. अमेरिकेत अनोळखी लोकांना भेटल्यावरही हसून ‘तुम्ही कसे आहात’ असे विचारण्यात येते. अशा लहानसहान गोष्टींमधून चागली भावना निर्माण होते आणि दोघांच्या चेहऱ्यावर हास्य पसरते. आजच्या जगात प्रत्येक माणूस व्यस्त आणि त्रासलेला आहे. पण अशा लहानसहान प्रयत्नांनी थोडसा दिलासा मिळतो.

या, जाणून घेऊ की शारीरिक आणि मानसिक आरोग्यसाठी गळाभेट घेणे किती आवश्यक आहे :

ताण कमी होतो : जेव्हा एखादा मित्र वा परिवारातील सदस्य एखाद्या दु:खातून जात असेल तर त्याला मिठी मारा. अशाप्रकारे एखाद्याचा स्पर्श करत धीर देण्याने त्या व्यक्तीवर असलेला ताण कमी होतो.

आजारांपासून सुरक्षित राहणे : ४० वयाने  मोठे असलेल्या माणसांवर केलेल्या एका अभ्यासामध्ये संशोधकांना असे आढळले की अशा व्यक्ती ज्यांना उत्तम सपोर्ट सिस्टीम होती ते कमी आजारी पडले. एवढेच नाही अशा व्यक्ती आजारी पडल्या तरीही त्यांना कमी त्रास झाला.

हृदयाचा निरोगीपणा : गळाभेट घेणे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठीसुद्धा चांगले असते. एका अभ्यासात संशोधकांनी २०० माणसांच्या एका समूहाला दोन भागात विभाजित केले. पहिल्या समूहात रोमँटीक जोडीदार होते, ज्यांनी आधी १० मिनिटे एकमेकांचे हात धरले आणि नंतर २० सेकंद बसून राहिले. असे आढळले की पहिल्या समूहातील लोकांच्या रक्तदाबाची पातळी आणि हार्ट रेट दुसऱ्या समूहापेक्षा जास्त कमी आढळले. एक उत्तम नाते तुमच्या निरोगी आरोग्यासाठीसुद्धा आवश्यक आहे.

भीती कमी होणे : वैज्ञानिकांना असे आढळले की एखाद्या आपल्या माणसाचा प्रेमाच्या स्पर्शची जाणीव कमी मानसिक बळ असणाऱ्या व्यक्तींच्या मनात चिंता आणि भीतीची भावना कमी करते. वयस्कर माणसंच नाही, एखाद्या मूल मानवा टेडीबेअरसारख्या वस्तूचीसुद्धा गळाभेट खूपच प्रभावशाली असते.

संवादाचे माध्यम : बहुतांश संवाद अथवा संभाषण करून किंवा चेहऱ्यावरील हावभावाने व्यक्त होतात. पण गळाभेट घेणे संवाद साधण्याचा असा एक मार्ग आहे जो प्रत्येक व्यक्तीला कळतो. या कृतीमुळे आपण समोरच्या व्यक्तीला अशी जाणीव करून देतो की तो एकटा नाही आहे, आपण त्याच्या पाठीशी आहोत.

आत्मसन्मान वाढवतो : लहानपणी आईवडिलांचे आपल्याला कुशीत घेणे आपल्या हेच सांगायचे की आपण त्यांच्यासाठी किती महत्वाचे आणि आवडते आहोत. अशा प्रकारे जेव्हा मित्र आणि नातेवाईक किंवा जोडीदार गळाभेट घेतो तेव्हासुद्धा आपल्या मनाला दिलासा मिळतो. आपल्याला आपण म्हत्वाचे असल्याची जाणीव होते. आपला आत्मविश्वास वाढतो.

चांगल्या प्रकारे जगण्यासाठी दिवसातून कमीतकमी ४ वेळा तरी मिठी मारणे आवश्यक असते. चांगल्या वाढीसाठी दिवसभरातून १२ वेळा मिठी मारणे गरजेचे आहे. भारतातील मोठया शहरांमध्ये आणि इतर मोठया देशांमध्ये जसे अमेरिका वगैरेमध्ये लोकांना या जाणिवेपासून वंचित राहावे लागते. ते व्यस्त आयुष्य जगत असतात. वेगळे आणि एकटे राहतात, जेव्हा की जितके आपण इतरांची गळाभेट घेणे शिकू तितकाच आपल्या जास्त आनंद आणि आरोग्य प्राप्त होईल.

अखेर भारत चीनपेक्षा मागे का आहे?

* प्रतिनिधी

भारतातील महिलांना चीनपेक्षा जास्त चिनी म्हणजे साखरेच्या दराची चिंता असते. प्रत्यक्षात चीनचा धोका आणि स्पर्धा आपल्या डोक्यावर सतत थैमान घालून नाचत असते.

तसे तर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपला कार्यकाळ रूसचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्याप्रमाणे अमर्यादित ठेवला आहे, पण सध्या तरी ते आपला देश आणि जगाच्या नजरेत खलनायक ठरलेले नाहीत. जेव्हा की, तुर्कीचे रजब तय्यब एर्दोगन आणि रूसचे अध्यक्ष पुतीन अशाच प्रकारच्या परिवर्तनासाठी लोकशाहीचे हत्यारे आणि जगासाठी धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

पुतीन यांच्या अगदी विरोधी अशी शी जिनपिंग यांची ओळख एक अत्यंत सौम्य आणि साधासरळ नेता अशी आहे. जे मालक कमी आणि संरक्षक जास्त वाटतात. चीनची धोरणेही अशीच आहेत. शी जिनपिंग यांच्या रस्ते आणि बेस्ट योजनांचे लक्ष्य सर्व देशांना एकाच मार्गाने जोडण्याचे आहे. ते बऱ्याच देशांना आवडले आहे, कारण बरेच एकाकी पडलेले देश आणि मोठया देशांच्या दूरवर पसरलेल्या भागांमधून हे मार्ग जाऊ लागले आहेत.

शी जिनपिंग यांनी मागच्या ३ दशकांमध्ये सरकारी सवलतींचा लाभ घेऊन धनाढय चिनी लोकांच्या आर्थिक नाडया आवळायला सुरुवात केली आहे. चीनमध्येही अंबानी आणि अदानींची कमतरता नाही. ज्यांनी केवळ ओळखी आणि खात्यांमध्ये हेरफेर करून पैसे कमावले आहेत आणि कम्युनिस्ट म्हणजे साम्यवादी देशात कॅपिटॅलिस्ट म्हणजे भांडवलदारशाहीची मजा लुटत आहेत. अलिबाबा कंपनीच्या जॅक मा यांचे उदाहरण सर्वात मोठे आहे, ज्यांचे पंख नुकतेच छाटण्यात आले आहेत.

चिनी नेते आता पुन्हा एकदा पक्षीय राजवट आणण्याच्या प्रयत्नात आहेत, जी योग्य सिद्ध होईल की नाही, हे आताच सांगता येणार नाही. हे मात्र नक्की की, गरम डोक्याचे का होईना, पण कट्टरपंथीय माओत्सेतुंग यांनीच चीनला जुन्या परंपरांमधून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक जुनी गोष्ट उद्धवस्त करून टाकली होती. त्यानंतर जो चीन उदयाला आला तो संपूर्ण जगासाठी आव्हान ठरला आहे.

चीन आपल्या सैन्यालाही अधिक सक्षम करत आहे आणि आपली विमाने, जहाज, विमानवाहू नौका निर्मितीचे काम करत आहे. भारताला घाबरवण्यासाठी चीन पश्चिमी देशांच्या मदतीने भारतीय सीमेजवळ विमानतळ आणि रस्त्यांचे जाळे निर्माण करत आहे.

शी जिनपिंग यांच्या चीनमुळे अमेरिका भीतीच्या सावटाखाली आहे. म्हणूनच ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारतासोबत मिळून करार करण्यात आला आहे. या चारही देश एकजुटीने चीनचा सामना करू शकतील, हाच यामागील उद्देश आहे. परंतु, या चारही देशांना ठाम विश्वास आहे की, ते चीनला आपले तंत्रज्ञान, सामर्थ्य, कुटनीतीद्वारे घाबरवू शकत नाहीत.

शी जिनपिंग यांचा कम्युनिस्ट पक्ष तेच काम करत आहे जे आता काँग्रेस राहुल गांधींच्या पुढाकाराने करत आहे. जोपर्यंत या देशातील प्रत्येक सर्वसामान्य माणूस पोटभर जेवत नाही आणि त्याला सर्व जनता सारखीच आहे, याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्याची मदत देशाच्या प्रगतीसाठी होणार नाही.

अलिबाबा किंवा अदानी अथवा अंबानी हे कोणत्याही देशाच्या प्रगतीचा पाया बनू शकत नाहीत. ते असे परजीवी आहेत की, जे सर्वसामान्य जनतेच्या धमन्यांमधील रक्त शोषून घेत आहेत. आपले मंदिर, हिंदू-मुस्लीम नीतीही काहीशी अशीच आहे. शी जिनपिंग या सर्वांपासून वेगळे दिसत आहेत. पण हो, एक मजबूत चीन भारतासाठी सतत धोकादायक ठरेल जोपर्यंत आपण त्याच्याइतके भक्कम होत नाही. सध्या तरी आपल्याकडील सर्व भांडवल पंतप्रधानांच्या स्वप्नातील संसद परिसर आणि राम मंदिरासाठी वापरले जात आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें