आकर्षण आहे की प्रेम

* पूनम अहमद

३० वर्षीय अमित एका कंपनीत प्रोडक्ट मॅनेजर आहेत. युवावस्थेतील पहिल्या आकर्षणाबाबत बोलताना त्यांनी हसत सांगितले, ‘‘मी दहावीत होतो. ती माझ्यापेक्षा एका वर्षाने लहान होती. ती शाळेतल्या मुलींमध्ये खूपच लोकप्रिय होती आणि मीसुद्धा तिचा चाहता होतो. आज मला आठवत नाही की मला तिच्याबद्दल इतके आकर्षण का होते, मी तिची एक झलक पाहण्यासाठी धावतपळत शाळेत जात असे. एका नृत्य स्पर्धेत मला तिच्यासोबत नृत्य करायचे होते. मी खूपच खूश होतो. ही माझ्या पहिल्या रोमान्सची सुरुवात होती. जसे की त्या वयातील नाते टिकत नाही, आमचेही नाते लवकरच संपले. मला असे वाटायचे की मी तिच्यावर खूप प्रेम करतो, परंतु मला आश्चर्य वाटले कारण महिन्याभरातच माझ्या मनातून तिचा विचार निघून गेला होता. मी समजून गेलो की हे इन्फॅच्युएशन म्हणजे विरुद्धलिंगी आकर्षण होते.’’

तज्ज्ञांच्या मते, इन्फॅच्युएशन हे अत्यंत तीव्र पण थोडया काळासाठीचे प्रशंसक भाव असतात. याला आकर्षण, आसक्ति किंवा क्रश असेही म्हणतात.

मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशक अंशू जैन यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला त्या व्यक्तिसोबत राहण्याची तीव्र इच्छा होती. त्या व्यक्तिमुळे तुमचे विचार, झोप, दिनक्रम आणि खाण्याच्या सवयींवरही परिणाम होतो.’’

इन्फॅच्युएशन ब्रेन केमिस्ट्रीत जागा निर्माण करते. जिथे पुरुष सडपातळ, स्मार्ट महिलांकडे तर, महिला उच्चपदस्थ किंवा उच्चशिक्षित पुरुषांकडे आकर्षित होऊ शकतात. आधुनिक नात्यात बरेच बदल झाले आहेत. अंशूचे म्हणणे आहे की इन्फॅच्युएशनमध्ये अनेकदा आपल्याला वाटते की आपण प्रेमात पडलो आहोत, पण असे काहीच नसते. ते सहजपणे अगदी कधीही संपू शकते.

कसे ओळखावे

इन्फॅच्युएशन ओळखण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी विशेतज्ज्ञ काय टीप्स देतात, हे जाणून घेऊया :

२७ वर्षीय देविका शर्मा सांगतात की, ‘‘कॉलेजमध्ये एका अतिशय हुशार आणि सर्जनशील व्यक्तीबाबत मला खूपच आकर्षण वाटू लागले. मला त्याच्याशी संबंध ठेवण्याची इच्छा होती. मग अचानक तो माझ्यावर वर्चस्व गाजवू लागला. मला त्याच्याशी बोलण्याची जसजशी संधी मिळत गेली तसे माझ्या लक्षात आले की मला वाटत होते तसे त्यांच्यात  काहीच नव्हते. त्यानंतर त्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत मला काहीच वाटेनासे झाले. आमच्यात काहीही साम्य नव्हते. माझ्या मनात त्याच्याबद्दल ज्या भावना होत्या, त्या रातोरात नाहीशा ?ाल्या. खरंतर त्याने मला संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न केले. पण त्याच्यातील मा?ा इंटरेस्ट संपला होता.’’

सल्लागार, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रवी गुप्ता यांच्या मते, ‘‘आपल्या मेंदूत असलेल्या काही प्लेजर सेंटरमधून डोपामाइनचे जास्त प्रमाणात उत्पन्न झाल्यामुळे मनातील आकर्षणाप्रति असीम प्रेमाची भावना निर्माण होऊ लागते. त्याचवेळी सेरोटोनिनची पातळी, जी चांगल्या भावनांसाठी जबाबदार असते, ती कमी होऊ लागते. परिणामी, आपल्या भावनांमध्ये बरेच चढउतार दिसून येतात. प्रिय व्यक्ती जी काही प्रतिक्रिया देत असते, त्यानुसार मूड बदलू लागतो.’’

काय करावे

जेव्हा तुम्हाला एखाद्याबाबत आकर्षण वाटते तेव्हा तो खरोखरच कसा आहे, हे जाणून न घेताच तुम्ही त्याच्या व्यक्तिमत्त्वातील फक्त एखाद्याच भागाकडे पाहात असता. डॉक्टर रवी यांचं म्हणणं आहे, ‘‘आकर्षणाला प्रोत्साहन देऊ नका, आसक्तीमधून थोडेसे बाहेर पडा. यामुळे विरुद्ध लिंगी आकर्षणामागील योग्य तर्क तुमच्या लक्षात येईल.’’

प्रिय वाटणाऱ्या या व्यक्तींच्या नकारात्मक बाबीही तपासून पाहा. यांच्यातील उणीवांचा विचार करा. इव्हेंट मॅनेजर जयेश सांगतात, ‘‘शाळेत असताना मी माझ्या वर्गातील सर्वात सुंदर मुलीकडे आकर्षित झालो. मी तिच्या बाजूच्याच बाकावर काही दिवस बसत होतो. तिच्याशी बोलण्याची हिंमत जास्त करू    शकत नव्हतो. पण तिच्याकडे मी ओढला जात होतो.

‘‘एके दिवशी मी तिला मनातले सांगितले. तेव्हा मला समजले की तिचे दुसऱ्यावर प्रेम आहे आणि योग्य वेळ येताच ती त्याच्याशी लग्न करणार आहे. त्यावेळी मला एक धडा मिळाला की आपल्याला वाटणाऱ्या आकर्षणापासून दूर जाण्यासाठी शक्य तितका वेळ मित्र आणि कुटुंबासह घालवायला हवा. यामुळे तुम्हाला तुमच्या मनातील प्रिय व्यक्तिची ओढ सतावत नाही किंवा तिची आठवण काढायला जास्त वेळ मिळत नाही.’’

डॉक्टर अखिल श्रॉफ सांगतात, ‘‘तुमच्या मेंदूतील सेरोटोनिनची वाढलेली पातळी तुमच्या मन:स्थितीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. त्यासाठी भरपूर व्यायाम करा.’’

जेव्हा एखाद्या प्रति इन्फॅच्युएशन, जाणवते, तेव्हा त्या व्यक्तिला कृती आणि त्याच्या शब्दांकडे खूप लक्ष देतो. वारंवार त्याच्या सोशल मिडिया प्रोफाइलकडे पाहतो. मानसोपचारतज्ज्ञ पवन गोस्वामी सांगतात, ‘‘अशा वेळी त्या व्यक्तिपासून शारीरिक आणि वर्चुअली अंतर ठेवा. स्वत:ला त्या व्यकितपासून दूर ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे.’’

४० वर्षीय स्वाती भटनागर आपला अनुभव शेअर करताना सांगतात, ‘‘जेव्हा मी २८ वर्षांची होते तेव्हा माझ्या हँडसम कलीगच्या चेहऱ्यावरून माझी नजर हटत नसे. कामात लक्ष लागत नव्हते. मी लवकर ऑफिसला जायचे आणि त्याच्याशी बोलण्यासाठी निमित्त शोधायचे. मग एके दिवशी मला समजले की ज्याच्याबद्दल मला ओढ वाटतेय, तो विवाहित आहे. माझे हृदय दुखावले गेले. तेव्हा लक्षात आले की केवळ मीच त्याच्याकडे आकर्षित झाले होते.’’

तज्ज्ञ सांगतात की, भलेही तुम्हाला ज्याच्याबद्दल आकर्षण आहे तोही तुमच्याच प्रमाणे त्याच्या भावना व्यक्त करेल, पण त्याच्याशी प्रामाणिकपणा दाखवणे गरजेचे आहे. दोघांनीही या नात्यातील एकमेकांच्या उणीवा आणि चांगल्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.

डॉ. पवन यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘स्वत:च्या आत्मसन्मानाची काळजी घ्या. स्वत:वर प्रेम करा, स्वत:बद्दल चांगले वाटण्याचा अनुभव घेण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका.’’

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्राजक्ता देशमुख सांगतात, ‘‘जर तुम्ही दुसऱ्याबद्दल योग्य जास्तच विचार करत असाल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यास असमर्थ असाल तर स्वत:च्या विचारांवर गांभीर्याने लक्ष द्या. नोंदवही तयार करा. आपला उद्देश स्पष्टपणे लिहा. काहीसा असा दिनक्रम तयार करा की तुम्हाला या अनैच्छिक आकर्षणाबाबत विचार करायला वेळच मिळणार नाही.’’

आयुष्यात आनंदी राहण्यासाठी आणि प्रगती साधण्यासाठी काही गोष्टी मागे सोडून जाणेच चांगले असते. प्रेमाच्या मागे धावू नका, तर स्वत:ला असे बनवा जेणेकरून लोकांनाच तुमच्याजवळ यावेसे वाटेल.

तुम्हीही जर कोणासाठी असाच अनुभव घेत असाल तर निश्चितच आकर्षणाच्या जाळयात अडकले आहात.

* तुम्ही त्याचाच विचार करता आणि स्वतऱ्च्या कामावर लक्ष देणे तुमच्यासाठी कठीण होते.

* संपर्काचे कोणतेही साधन जसे की व्हॉट्सअॅप, इमेल असो किंवा फोन, त्या व्यक्तिशी संपर्क होताच तुम्ही उत्साहित आणि उत्तेजित होता.

* तुमची एनर्जी लेव्हल अतिशय वाढते. ना तुम्हाला झोप हवी असते ना जेवण.

* तुम्हाला तो परफेक्ट वाटतो. त्याच्यात काहीच कमतरता जाणवत नाही.

* त्याच्याजवळ राहणाऱ्यांबाबत तुम्हाला असूया वाटते.

* अपेक्षित असलेला प्रतिसाद त्याच्याकडून न मिळाल्यास तुम्हाला असुरक्षित वाटते. टेंशन येते.

* तुम्ही अस्वस्थ होता आणि कोणतीही रिस्क घ्यायला तयार असता.

सणांवर धर्माचा ताबा

* जगदीश पवार

हिंदूंचा सण, मुसलमानांचा सण, ख्रिस्तींचा सण आणि शिखांचा सण. हे सण धर्मात विभागले गेलेत. प्रत्येक धर्माचा सण वेगळा आहे. एका धर्माला मानणारे दुसऱ्याच्या सणाला महत्व देत नाहीत. धर्मांची तर गोष्टच वेगळी. एकाच धर्मात एवढे विभाजन आहे की एका धर्माचे असूनही ते सर्व उत्सव एकत्र साजरे करत नाहीत. एकाच धर्मात विविध धर्म आणि जातीचे छोटे-मोठे उत्सवही विभागले गेले आहेत.

हिंदूंचे सण मुसलमान, ख्रिस्तीय नव्हे तर खालच्या जातीचे समजले जाणारे हिंदूही साजरे करणे टाळतात. मुसलमानांमध्ये शिया वेगळे, सुन्नी वेगळे. ख्रिस्तींमध्ये कॅथलिक आणि प्रोटेस्टंट या दोघांचे संगीत वेगळे. प्रत्येक धर्मात भेदभाव, उच्चनीचता आहे. श्रेष्ठता आणि लहान-मोठयांची भावना आहे. हेच आपल्या सणांच्या विभाजनाचे वास्तव आहे. अर्थात सणांवर धर्माने पूर्णत: ताबा मिळवला आहे.

होळी-दिवाळीसारख्या सणांवर धर्माने असा काही ताबा मिळवलाय की सणांचे मूळ स्वरूपच बदलले आहे. सणांवर धर्मातील ढोंगी कर्मकांडे, दिखाऊपणा, तिरस्कार, भेदभाव आणि हिंसेचा प्रभाव पाहायला मिळतोय. धर्माने उत्सवांमध्ये कडवटपणा आणला आहे. वेगवेगळया समुदायात विभागलेल्या समाजात कटकारस्थाने करण्याची स्पर्धा सुरू झालीय. सणांचा गोडवा धर्माच्या वर्चस्वामुळे आंबट झालाय.

सणांवरील धर्माच्या ताब्यामुळे सामाजिक सलोखा, ऐक्य आणि सुसंवादाची दरी कमी होण्याऐवजी ती आणखी वाढली आहे. ऐक्य, समन्वय आणि एकजुटीचा संदेश देणाऱ्या सणांमध्ये माणसाची विभागणी झाली आहे. या विभागणीमुळेच आता सण हे सामाजिक एकजुटीचे पर्व म्हणून सिद्ध होऊ शकत नाहीत. सणांचे शास्त्रीय आणि मानसशास्त्रीय महत्व विसरून सर्वतोपरी धार्मिक, सांस्कृतिक बाबींचाच विचार केला जातो.

धार्मिक पात्रांना सणांशी जोडून कथा तयार केल्या आहेत. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला पांडवांचा जुगार खेळणे आणि राम लंका जिंकून आल्यावर आनंद साजरा करण्याच्या नावावरही कथा प्रचलित आहेत. अशाच प्रकारे होळीचा सण प्रल्हाद आणि होलिकेशी जोडला आहे.

धनत्रयोदशी, गोवर्धन पूजा, कृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र, दुगार्पूजा, छटपूजा हे सर्व धर्माशी जोडले आहेत. रक्षाबंधनाचा कोणत्याही देवी-देवतांशी संबंध नाही, तरीही पुजाऱ्यांनी राखी बांधण्याचा शुभमुहूर्त सांगण्याचा सर्वाधिकार आपल्याकडे सुरक्षित ठेवला, कारण लोक त्यांच्याकडे पवित्र मुहूर्त विचारायला यायला हवेत आणि सोबतच फळे, फुलं, मिठाई, वस्त्र आणि दानदक्षिणेची रोकड आणायला त्यांनी विसरू नये. दिवाळीत जुगार खेळणे ही प्रथा झालीय. धर्मग्रंथांचा दाखला देत सांगण्यात आले आहे की दिवाळीच्या रात्री कौरव, पांडव जुगार खेळले होते.

सण आता धर्माच्या व्यापाऱ्यांची अस्त्रे बनले आहेत. साहजिकच सणांच्या माध्यमातून द्वेष, भेदभाव अधिक दृढ केला जात आहे.

धर्माच्या नावावर पोट भरणाऱ्यांनी सणांवर कर्मकांडांची अशी काही पट्टी बांधली आहे की शुभ वेळ, मुहूर्त, विधी जाणून घेतल्याशिवाय लोक उत्सव साजरे करत  नाहीत. सणात पूजा, होमहवन करायलाच हवे असे मनावर ठसवण्यात आले, जेणेकरून पुजाऱ्यांची गरज भासेल आणि दानदक्षिणेच्या नावावर त्यांची दुकानदारी सुरू राहील.

दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या नावाखाली पुजाऱ्यांची मजा असते. लक्ष्मी अर्थात धनसंपत्तीच्या आगमनासाठी ते पूजा, मंत्रजाप करायला लावतात. मंदिरात जाऊन देवदर्शन घेणे, पूजेचा मुहूर्त, विधी करणे अनिवार्य आहे. यासाठी लोकांना पुजाऱ्याकडे जावेच लागते.

दिवाळी म्हणजे एकमेकांना भेटण्याचा, एकतेचा प्रमुख सण. हा सामुहिक उत्सव   आहे. तो वैयक्तिक नव्हे तर सामुहिक रुपात साजरा केला जातो. प्रत्येक सणाच्या आनंदात अंधविश्वासाचा अंधार पेरण्यात आला आहे. सणांमध्ये जुगार खेळणे, नशा करणे, ध्वनी व वायू प्रदूषणआणि धार्मिक, जातीय तेढ  निर्माण होणे हे धर्माच्या घुसखोरीमुळे  होते. धर्मच या सर्वांना प्रोत्साहन देतो.

धनाचे आगमन आणि समृद्धीच्या आशेने साजरा करण्यात येणाऱ्या दिवाळीच्या उत्सवाचे महत्व धनाशी संबंधित नाही, तर समाजातील एकता, प्रेम, सामंजस्य, ऐक्याशी याचा संबंध आहे.

समाजाला विभागणारा धर्म

धर्माच्या उत्सवांवरील ताब्यामुळे समाज विभागला गेला आहे. दिवाळी वैश्य, विजयादशमी क्षत्रिय, रक्षाबंधन ब्राह्मण आणि होळी शूद्रांमध्ये विभागण्यात आली आहे.

सणांना संकुचित धार्मिक श्रद्धेच्या मयार्दांमध्ये गुंडाळून संपूर्ण समाजाच्या एकतेत धर्म, जात, वर्ग यांचे अडथळे तयार करण्यात आले आहेत. यामुळे एकाच धर्माचे सर्व लोक तो सण साजरा करतील हे गरजेचे नाही. प्रेम, बंधुभाव कमी होत असून याचा दुष्परिणाम सणांच्या सोहळयावर झाला आहे.

सणांमागील प्रथेवर सर्वच जण विश्वास ठेवतील हे गरजेचे नाही. एखाद्याचा या प्रथा, परंपरेवर विश्वास नसेल तर निश्चितच मतभेद होतात. लंकेवर विजय मिळवल्यानंतर राम अयोध्येत परतल्याच्या आनंदाचे प्रतीक म्हणून दिवाळी साजरी केली जाते तर कुठे रावणाचे पूजकही आहेत, जे रामाला आपला आदर्श मानत नाहीत.

सणांमागील प्रथा-परंपरा धर्माशी जोडल्या गेल्याने समाजाच्या सर्व वर्गातील लोकांना एकत्र, एकमेकांशी जोडले गेल्यासारखे वाटत नाही. धर्माला प्रेम, शांतता, करुणेचे प्रतिक मानले असले तरी  प्रत्यक्षात धर्माने सामाजिक भेदभाव, शत्रूत्व, तिरस्कार, हिंसा वाढीस लावली.

सण जीवनात सुखद परिवर्तन घेऊन येतात. हर्षोल्हास व नाविन्याशी मेळ साधतात. म्हणूनच दिवाळीत कुटुंबासह स्वादिष्ट पक्वान्न आणि प्रकाशाच्या आनंदासह मित्र, नातेवाईकांसोबत असलेल्या संबंधांना अधिक ऊर्जादायी बनवा.

उत्सव सामूहिक हवेत. धर्म समाजाला विभागतो. त्यामुळेच उत्सवांवर धर्माने ताबा घेताच सामूहिक एकता लोप पावते. सर्व वर्गातील लोकांसह मिळून सण साजरे केल्याने सामाजिक एकता वृद्धिंगत होते.

सर्वांनी मिळून आनंद साजरा करावा, हीच सण साजरे करण्यामागची भावना आहे. मित्र, आप्त, शुभचिंतकांना भेटून प्रेम, आपुलकीच्या आनंदाचा अनुभव घेत उत्साही होण्याची उत्सव ही संधी आहे. तो चिंता, तणाव विसरायला लावून मनाला चैतन्य, आनंद, नव्या ऊर्जेची अनुभूती देतो.

जीवनात बदल करून आनंदी होण्याचे, शारीरिक आणि मानसिक आनंद मिळवण्यासाठी आपुलकीने आप्तांसोबत काही क्षण घालवण्याचे सण हे माध्यम आहे. सणांमुळे जीवनात येणारा उत्साह माणसाच्या जीवनात कायम राहतो. जीवनाला गती मिळते. जगण्यात सकारात्मकता येते. सणांचा हा सुगंध आयुष्यभर दरवळत राहतो.

उत्सव, पर्वांना माणुसकीतील ऐक्याचे प्रतीक मानले जाते. धर्माच्या संकुचित बंधनात बांधून भेदभावाची भिंत उभारण्याचे ते माध्यम नाही. सणांचा जन्म आपापसातील प्रेम, सुसंवाद, एकता, ऐक्य वृद्धिंगत करण्यासाठीच झाला होता. मात्र, धर्माच्या घुसखोरांनी सणांमधील सामुहिक एकता तोडण्याचे काम केले. सामाजिक, कौटुंबिक विभाजन का होत आहे, धर्मात द्वेष का पसरत आहे, सण सुसंवाद वाढीस लावण्यासाठी मदत का करत नाहीत, याचा आपण विचार करायला नको का?

अंध:कार दूर करणे हाच सणांचा उद्देश हवा. घर, कुटुंब, समाजात प्रेम, सद्भावना नसेल तर तो कसला उत्सव?

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें