लग्नापूर्वी या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष

* रेणू गुप्ता

मुंबईतील एका पीजीमध्ये राहणारी सोनम तिच्या रूममेट मोहनाला म्हणाली, ‘‘अगं, जेव्हापासून पप्पांनी मला निर्वाणीचे सांगितले आहे की, या वर्षाच्या अखेरीस तुला सजलसोबत लग्न करावे लागेल तेव्हापासून मी खूप गोंधळून गेले आहे. सजल आणि मी डेटिंग करत आहोत, पण मला अजूनही १०० टक्के खात्री नाही की, मी त्याच्यासोबत आनंदी राहीन.’’

‘‘माझी पण अशीच अवस्था आहे. काल, आई मला सांगत होती की, तू आता २७ वर्षांची झाली आहेस. चांगली कमावती आहेस, एकदा का तू लग्न केलेस की, मी माझ्या जबाबदारीतून मोकळी होईन.’’

‘‘लग्नाचा नुसता विषय निघाला तरी मला भीती वाटते. मी कधीकधी मनुजसोबत डेटवर जाते, पण सध्या आमच्यात लग्नाबद्दल काहीही बोलणी सुरू नाहीत. मला कळत नाही की, काय करावे,’’ मोहना म्हणाली.

लग्नानंतर, पती-पत्नीच्या आयुष्यात खोलवर बदल होतात. ‘मी’ ही विवाहपूर्व संकल्पना ‘आपण’ मध्ये रूपांतरित होते, पण, लग्न करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ‘मी’ ते ‘आपण’ असा प्रवास सोपा नसतो. विशेषत: जे बराच काळ एकटे राहातात त्यांच्यासाठी तो अधिक अवघड असतो. जर वैवाहिक नातेसंबंधात प्रवेश करणाऱ्या अविवाहित मुलींनी लग्नापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले तर मात्र त्या नि:संशयपणे यशस्वी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या वैवाहिक जीवनाचा पाया रचण्यात यशस्वी होतील.

डेटिंग

लग्नापूर्वी तरुणीने तिच्या भावी पतीला अनेकदा भेटले पाहिजे. त्याच्यासोबत भरपूर वेळ घालवला पाहिजे. जर तो लांब राहात असेल आणि हे शक्य नसेल तर फोन किंवा चॅटद्वारे त्याला पूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ती हे समजून घेऊ शकेल की, तो पती म्हणून तिच्या सुयोग्य, तार्किक अपेक्षा पूर्ण करू शकेल का?

मुलीला त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, स्वभावाबद्दल आणि चारित्र्याबद्दल खात्री असली पाहिजे की, तो तिच्या अपेक्षेनुसार खरोखरच तिचा सुयोग्य पती ठरेल.

भावना

यशस्वी वैवाहिक जीवनासाठी जोडप्यांमधील परस्पर प्रेम ही पहिली अट आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला, त्याच्या सर्व क्षमता आणि कमकुवतपणासह, तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणून स्वीकारण्यास तयार आहात का? तुम्हाला त्याच्यावर इतके प्रेम आहे का, की तुम्ही त्याच्याशिवाय आनंदी जीवनाची कल्पनाही करू शकत नाही? तुमचे हृदय त्याच्यासाठी धडधडते का? त्याच्याशिवाय तुम्हाला अस्वस्थ वाटते का? जेव्हा तो तुमच्या नजरेआड होतो तेव्हा तुम्हाला एक अवर्णनीय शून्यता जाणवते का?

जर या प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी ‘हो’ असतील तर तुम्ही तुमच्या नात्यातील या सर्वात महत्त्वाच्या भावनेबद्दल आत्मविश्वास बाळगू शकता आणि त्या व्यक्तीशी लग्न करू शकता.

विश्वास

एकमेकांवर अढळ विश्वास, ही यशस्वी लग्नाची गुरुकिल्ली आहे. म्हणून, लग्नाचे पाऊल उचलण्यापूर्वी, तुमच्या दोघांमध्ये विश्वास आहे, याची खात्री करा. एकमेकांवरील विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया आहे. यामुळे नाते मजबूत होते. केवळ परस्पर विश्वासच जोडप्यामध्ये एक मजबूत नाते निर्माण करू शकतो. त्याशिवाय हे नाते फुलू शकत नाही. वैवाहिक नात्यात या भावनेची उपस्थिती खोली गाठू शकत नाही, त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या जोडीदारावर आंधळेपणाने अवलंबून राहू शकता.

चांगल्या समन्वयासाठी आणि परस्पर आदरासाठी परस्पर विश्वास आवश्यक आहे. तो नसल्यास असुरक्षितता आणि संशयाची भावना निर्माण होऊ शकते, जी तुमच्या नात्यासाठी नुकसानदायक ठरू शकते.

जवळीक

आनंदी आणि समाधानकारक नातेसंबंधासाठी जवळीक, ही एक पूर्वअट आहे. वैवाहिक नातेसंबंधातील जवळीक जोडीदारांमधील भावनिक संबंध मजबूत करते. जोडप्यांमधील जवळीक एकमेकांवरील विश्वास वाढवते, ज्यामुळे परस्पर समज वाढते आणि पती-पत्नी जवळ येतात.

जवळीक मजबूत आणि निरोगी लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देते, जे एका परिपूर्ण विवाहाचा पाया रचते. परस्पर जवळीक निर्माण करण्यासाठी दोन्ही जोडीदारांकडून नियमित प्रयत्नांची आवश्यकता असते. जवळीकता ऋणानुबंध मजबूत करते आणि संघर्ष चांगल्या प्रकारे हाताळण्यास दोघांनाही मदत करते. म्हणून, लग्न करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या जोडीदाराशी अगदी सहजतेने निरोगी जवळीक निर्माण करू शकता का, याची खात्री करा.

वचनबद्धता

कमिटमेंट अर्थात वचनबद्धता म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सर्व परिस्थितीत त्याच्या पाठीशी उभे राहाल. सुख असो किंवा दु:ख, तुम्ही त्याला कधीही सोडणार नाही. वचनबद्धता म्हणजे आयुष्यभर एकमेकांवरील प्रेम टिकवून ठेवण्याचे वचन म्हणजे वचनबद्धता.

तुम्ही आयुष्यभर मानसिक, शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिकरित्या तुमच्या जोडीदाराशी वचनबद्ध राहू शकाल का, हे पाहाण्यासाठी लग्न करण्यापूर्वी तुम्ही थोडे आत्म-विश्लेषण करा.

थोडे ऐका, थोडे बोला

निरोगी वैवाहिक जीवनासाठी संवाद महत्त्वाचा आहे. जर एखाद्या वादग्रस्त विषयावर तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही तुमचा राग रोखू शकता. मन दुखावले जाण्यापासून वाचू शकता.

वैवाहिक नात्यात, जोडीदाराने त्यांच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करताना संकोच बाळगू नये, कारण जोपर्यंत तुम्ही जोडीदाराला तुमच्या मनात काय आहे, ते सांगत नाही तोपर्यंत त्याला तुमच्या गरजा, वेदना, विचार किंवा दृष्टिकोन समजणार नाही. यामुळे तुमच्यात मतभेद निर्माण होतील. याउलट संवादामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या दृष्टिकोनातून कोणतीही समस्या हाताळण्यास मदत होईल.

संयम आणि क्षमा

वैवाहिक जीवनात, संघर्ष, मतभेद, भांडणे आणि वाद स्वाभाविक आहे, कारण दोन्ही जोडीदारांच्या संगोपनाच्या पद्धती, मूल्ये, तत्त्वे आणि कौटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळ्या असतात. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये हे संघर्ष आणि मतभेद सोडवण्यासाठी आवश्यक असलेला संयम आणि सहनशीलता आहे का, याचा विचार लग्नापूर्वीच केला पाहिजे. तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये एकमेकांच्या किरकोळ चुका आणि कमतरता सहन करण्याची आणि त्याकडे दुर्लक्ष करण्याची क्षमता आहे की नाही, हे जाणून घेतले पाहिजे, कारण सहिष्णुतेच्या अभावामुळे, किरकोळ वाददेखील हिंसक वळण घेतात, ज्यामुळे वैवाहिक नात्यासारख्या गोड नात्याचे नुकसान होते.

तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांच्या छोट्या-मोठ्या चुका माफ करण्याची संधी मिळाली पाहिजे, जर असे नसेल तर नात्यात कटुता आणि राग वाढतो आणि दोन्ही जोडीदारांमध्ये अंतर येऊ लागते. म्हणूनच, तुमच्यामध्ये आणि तुमच्या जोडीदारामध्ये एकमेकांप्रती संयम आणि क्षमाशीलता आहे की नाही, हे जाणून घ्या.

परस्पर आदर

वैवाहिक जीवनात प्रवेश करणाऱ्या दोन्ही जोडीदारांमधील परस्पर आदर, ही यशस्वी लग्नासाठी एक महत्त्वाची अट आहे. म्हणूनच, जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम ही भावना तुमच्या नात्यात प्रबळ आहे की नाही, हे जाणून घ्या. तुमच्या जोडीदाराबद्दलचा आदर तुम्हाला आयुष्यातील कोणत्याही संघर्ष, मतभेद किंवा वादावर सहज मात करण्यास मदत करेल.

जर नात्यात गैरवापर किंवा अनादर असेल तर तुम्ही नात्याला लग्नात रूपांतरित करण्यापासून दूरच राहिले पाहिजे.

मैत्री

लग्नातील स्थिरतेसाठी पती-पत्नीमध्ये मैत्री आवश्यक आहे. यशस्वी वैवाहिक जीवनासाठी ती एक महत्त्वाची अट आहे. वैवाहिक नात्यात मैत्रीचा सुगंध नि:संशयपणे नात्यात गोडवा आणि ताजेपणा आणतो, नाते कंटाळवाणे किंवा नीरस होण्यापासून रोखतो आणि बंध मजबूत करतो.

म्हणूनच, लग्नापूर्वी, तुमच्या नात्यात मैत्री आहे की नाही, याचे आत्मपरीक्षण करा. जर मैत्री असेल तर ती तुमच्या वैवाहिक जीवनात प्रवेश करण्यासाठीचा हिरवा कंदील समजा आणि जर ती तुमच्या नात्यात हरवली असेल तर तुम्हाला ती तुमच्या नात्यात घेऊन येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी तुमच्या नात्याला आणखी थोडा वेळ द्यावा लागेल. लक्षात ठेवा, जर लग्नाचा पाया निरोगी मैत्रीवर रचला गेला असेल तर त्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.

लग्नासाठी योग्य वय काय आहे

* रेणू गुप्ता

‘‘शेफाली, आजकाल तू खूप शांत आणि उदास दिसत आहेस. काही समस्या आहे का?’’ शेफालीची जवळची मैत्रीण, मनदीप, जिचे नुकतेच लग्न झाले होते, तिने शेफालीला विचारले.

‘‘नाही, नाही, काहीच नाही.’’

‘‘मला खरं वाटत नाही, काहीतरी आहे जे तुला त्रास देत आहे. तू आता पूर्वीसारखी बडबड करत नाहीस. नेहमीच कुठेतरी हरवल्यासारखी आणि उदास राहातेस. तू आता माझी ती पूर्वीची सतत बोलणारी आणि मोठ्याने हसणारी मैत्रीण राहिली नाहीस. मला सांग काय झालं? अगं, मी तुझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. कुणाच्या प्रेमात तर पडली नाहीस ना?’’

मनदीपने शेफालीला थोडेसे चिडवत विचारले. तेव्हा ती मोठ्याने म्हणाली, ‘‘अगं, हेच तर दु:ख आहे, की मी असे काहीही केले नाही. हे माझे पीएचडीचे पहिले वर्ष आहे आणि माझी आजी माझे लग्न लावण्यासाठी माझ्या वडिलांच्या मागे लागली आहे, पण सध्या मी लग्नासाठी अजिबात तयार नाही.’’

‘‘म्हणून मी माझ्या वडिलांना आणि आजीला स्पष्टपणे सांगितले की, आधी मी माझी पीएचडी पूर्ण करेन, नंतर चांगली नोकरी मिळवेन. त्यानंतरच मी लग्न करेन. लग्नापूर्वी मला स्वत:च्या पायावर उभे राहायचे आहे आणि हेच कारण आहे की माझे वडील आणि आजी घरात नेहमीच वाद घालतात.’’

‘‘तुझे बरोबर आहे, लग्नानंतर मुलींवर इतक्या जबाबदाऱ्या येतात की, त्या स्वत:साठी काहीही विचार करू शकत नाहीत. माझ्याकडे बघ, पदवीनंतर मी इंटिरियर डिझायनिंगचा अभ्यास करावा आणि इंटिरियर डिझायनर व्हावे, स्वतंत्र व्हावे, माझी स्वत:ची ओळख असावी अशी माझी खूप इच्छा होती, पण माझे वडील हृदयरोगी असल्याने, मला वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी लग्न करावे लागले.

‘‘आता आयुष्य घरकाम आणि स्वयंपाकापुरते मर्यादित आहे. माझा पती महिन्यातून २० दिवस कामानिमित्त घराबाहेर असतो, त्यामुळे मला कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. माझे वृद्ध सासरेही आमच्यासोबत राहातात. त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मी तुला इतक्या लवकर लग्नाच्या जाळ्यात अडकण्याचा सल्ला कधीच देणार नाही. स्वावलंबी असणे खूप महत्वाचे आहे. आयुष्य फक्त एकदाच मिळते.

‘‘लग्नाचे वय झाले, म्हणून लग्न करू नकोस. मी माझ्या अनुभवातून शिकले की जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार असाल तेव्हाच लग्न करावे.’’

शेफालीच्या घरी बसून त्या दोघी मैत्रिणी गप्पा मारत होत्या, तेवढ्यात अचानक त्यांची आणखी एक मैत्रीण, यंग इंडिया सायकॉलॉजिकल सोल्युशन्सची संस्थापक आणि संचालिका डॉ. सीमा शर्मा तिथे आली आणि त्यांची चर्चा सुरूच राहिली. डॉक्टर सीमा यांनी दोन्ही मैत्रिणींना काही प्रश्न विचारले आणि त्यांना सांगितले की जर या प्रश्नांची उत्तरे हो असतील तर तुम्ही लग्नासाठी तयार आहात, असे निश्चितपणे समजू शकता.

तर आता आम्ही तुम्हाला डॉ. सीमा यांनी त्यांना कोणते प्रश्न विचारले ते सांगतो :

तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहात का?

लग्नापूर्वी प्रत्येक मुलीने आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असले पाहिजे. तुम्ही आनंदी जीवन तेव्हाच जगू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या मूलभूत गरजा तसेच आरामदायी आणि सुंदर जीवनासाठी आवश्यक असलेल्या गरजा स्वत: पूर्ण करू शकाल. आजच्या सामाजिक रचनेत, लोक दिवसेंदिवस अधिकाधिक स्वार्थी होत चालले आहेत. प्रत्येकाला स्वत:साठी आणि स्वत:च्या आनंदासाठी जगायचे असते. म्हणूनच, मुलींना आनंदी आणि समाधानी जीवन जगावे, यासाठी आर्थिक स्वातंत्र्य खूप महत्वाचे आहे. त्यांनी त्यांच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पतीवर अवलंबून राहू नये.

डॉ. सीमा म्हणाल्या की, आजही पुरुषी अराजकता आणि स्वार्थी मानसिकतेमुळे अनेक पतीना त्यांच्या मालमत्तेवर आणि पैशांवर एकाधिकारशाही हवी असते आणि त्यामुळेच ते त्यांच्या पत्नीलाही त्यापासून दूरच ठेवतात.

म्हणूनच प्रत्येक मुलीने तिच्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार शिक्षण घेऊन यशस्वी करिअर घडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, जेणेकरून ती कधीही कोणावर अवलंबून राहाणार नाही आणि स्वत:च्या बळावर आनंदी जीवन जगू शकेल.

घराच्या आत आणि बाहेर तुमच्या बहुआयामी जबाबदाऱ्या पार पाडण्यास तुम्ही तयार आहात का?

लग्नानंतर तरुणींवर अनेक जबाबदाऱ्या येतात. आजही, तथाकथित लिंग समानतेच्या या युगात, घर सुरळीत चालवण्याची जबाबदारी घरातील महिलेची मानली जाते. याशिवाय मुलांचे संगोपन, त्यांना शिक्षण देणे, सामाजिक बांधिलकी पूर्ण करणे इत्यादी जबाबदारी पत्नीवर असते. म्हणून, जेव्हा तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहात, तेव्हाच लग्नाला होकार द्या.

तुमचे आणि तुमच्या जोडीदाराची मूल्यं आणि स्वप्नं सारखी आहेत का?

लक्षात ठेवा, लग्न म्हणजे फक्त प्रेमसंबंध, मेणबत्तीच्या प्रकाशात जेवण आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण नाही. प्रत्यक्षात, लग्न ही अशी भागीदारी आहे ज्यामध्ये तुम्ही लग्नानंतर तुमच्या जोडीदारासोबत तुमचे आर्थिक व्यवहार, ध्येये, मुलांचे संगोपन करण्याची पद्धत, जीवनाकडे पाहाण्याचा तुमचा दृष्टिकोन, जीवनमूल्ये समजून घेता. म्हणूनच, जेव्हा तुम्ही तुमच्या भावी जोडीदारासोबत हे सर्व चांगल्या प्रकारे समजून घेता तेव्हाच लग्न करा. या सर्व मुद्द्यांवर तुमचे तुमच्या जोडीदाराशी एकसारखे मत असणे गरजेचे नाही, परंतु तुमच्या स्वप्नांचा आधार एकच असणे महत्त्वाचे आहे.

जोडीदारासोबत सकारात्मक जवळीक साधण्यासाठी तुम्ही तयार आहात का?

यशस्वी लग्नाची पहिली अट म्हणजे परस्पर मोकळेपणा आणि नातेसंबंधातील जवळीकता. जवळीकता म्हणजे केवळ निरोगी लैंगिक संबंध नसून, पती-पत्नीमधील खोल भावनिक जवळीक होय.

परस्पर भावनिक जवळीक हा यशस्वी वैवाहिक जीवनाचा पाया आहे. म्हणून लग्न करण्यापूर्वी, तुमच्या जोडीदारासोबत निरोगी सकारात्मक जवळीक साधण्यासाठी तुम्ही तयार आहात, याची खात्री करा.

तुमच्या आणि तुमच्या भावी जोडीदारामध्ये चांगली समज आहे का? तुम्ही तुमच्या जोडीदाराची जीवनमूल्ये, तत्त्वज्ञान, स्वभाव, चांगल्या प्रकारे समजून घेता आणि ओळखता का?

तुम्हाला तुमचे संपूर्ण आयुष्य तुमच्या जोडीदारासोबत घालवावे लागते. अनेक आव्हानात्मक परिस्थितींना एकत्र तोंड द्यावे लागते. म्हणूनच, जर परस्पर समजूतदारपणा असेल तर जीवनातील कठीण आव्हानांना तोंड देणे तुमच्यासाठी तुलनेने सोपं होईल.

तुम्ही तुमच्या आणि तुमच्या जोडीदारातील कमतरतांबद्दल सहज चर्चा करू शकता का?

जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर तुम्ही लग्नासाठी तयार आहात, कारण अशा परिस्थितीत तुमच्या दोघांमध्ये एक बंध निर्माण होतो. समन्वय साधण्यात अडचण येण्याची शक्यता कमी असते.

तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला आरामदायी वाटते का?

तुमच्या भावी जोडीदारासोबत तुमच्या आरामदायकतेचे महत्त्व ओळखा. त्याच्यासमोर तुम्ही आरामदायी आहात की अस्वस्थ आहात? जर तुम्हाला त्याच्यासोबत कोणत्याही प्रकारची अस्वस्थता वाटत असेल, त्याच्यासमोर तुमच्या मनात कोणत्याही प्रकारची नकारात्मक भावना येत असेल, तुम्हाला चिंता किंवा अस्वस्थ वाटत असेल तर हे धोक्याचे लक्षण आहे. त्यामुळे लग्नाचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही आणखी थोडा वेळ घ्यावा.

तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवायला आवडते का?

जर उत्तर हो असेल तर याचा अर्थ असा की, तुम्ही आता त्याच्याशी लग्न केले पाहिजे, पण जर उत्तर नाही असेल तर याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या नात्याला जास्त वेळ दिला पाहिजे. जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा कंटाळा आला असेल, मानसिकदृष्ट्या थकवा जाणवत असेल किंवा चिडचिड होत असेल तर ते चांगले नाही. जर तुम्हाला या नात्यात कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास होत असेल तर ते धोक्याचे लक्षण आहे. अशावेळी तुम्ही लग्न करण्याच्या तुमच्या निर्णयावर पुनर्विचार करावा.

लग्नाकडून तुमच्या अपेक्षा वास्तववादी आहेत का?

तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की, तुमच्या भावी जोडीदारासोबतचा तुमचा वैवाहिक प्रवास नेहमीच आनंदी राहाणार नाही. या प्रवासादरम्यान, तुम्हाला काही कटू, अनुभव येऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या जीवनाची चव काहीशी कडू होईल. तुमच्या वैवाहिक जीवनात फक्त आनंदाचे क्षणच येणार नाहीत. कधीकधी, काही परिस्थितीत, तुमच्या जोडीदाराची वागणूक तुम्हाला निराश करू शकते.

अशावेळी जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही या आव्हानात्मक परिस्थितींना हसून आणि कोणतीही चिंता न करता तोंड देऊ शकता तर याचा अर्थ असा की, तुम्ही आता लग्नासाठी पूर्णपणे तयार आहात.

तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला मूल हवे आहे का?

जर तुम्ही आणि तुमचा होणारा पती सहमत असाल की, तुमच्या आयुष्यात योग्यवेळी एक मूल येईल, सोबतच जर लग्नानंतर तुमच्या दोघांनाही मुलाच्या संगोपनाची जबाबदारी वाटून घेण्यास काही हरकत नसेल तर याचा अर्थ असा की, तुम्ही आता लग्न करू शकता. जर तुम्हाला मूल हवे असेल पण तुमच्या जोडीदाराला ते नको असेल तर तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल पुन्हा विचार करावा लागेल.

लग्नानंतर तुमच्या जोडीदाराच्या स्वभावात मोठा बदल होईल अशी तुम्हाला अपेक्षा आहे का?

जर या प्रश्नाचे उत्तर हो असेल तर ते चांगले लक्षण नाही. तुम्हाला तुमच्या भावी पतीला त्याच्या आहे त्या स्वभावासह स्वीकारावे लागेल, पण जर तुम्हाला वाटत असेल की, हे तुमच्यासाठी शक्य नाही तर तुम्हाला तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा लागेल. लक्षात ठेवा, कोणत्याही माणसाचा मूळ स्वभाव, चारित्र्य आणि व्यक्तिमत्व बदलता येत नाही, पण जर तुमच्यामध्ये तुमच्या जोडीदाराला त्याच्या उणिवा, कमतरता आणि कमकुवतपणासह स्वीकारण्याची क्षमता असेल तर याचा अर्थ असा की, तुम्ही लग्नाचा निर्णय घेऊ शकता.

पती-पत्नीचे नाते: पती-पत्नीने कायद्याचे नव्हे, तर आपल्या मनाचे ऐकावे

* प्रतिनिधी

पती-पत्नीचे नाते: गेल्या ७५ वर्षांत विवाह, घटस्फोट आणि कौटुंबिक हिंसाचारावर कायदे लागू करण्यात आले आहेत, परंतु समाजाने अजूनही ते स्वीकारलेले नाहीत. याचा परिणाम असा होतो की, आपण जुन्या काळात जगत आहोत असे मानून पुरुष अजूनही स्त्रियांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या या नवीन कायद्यांचा आधार घेताना स्त्रिया हे विसरतात की, त्यांचा लढा पतींविरुद्ध नसून समाजाविरुद्ध असायला हवा. उलट, त्या आपल्या पतींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात.

हुंडा प्रकरणात अडकलेल्या सत्तरीतील एका जोडप्याला, त्यांच्या सुनेने कोणताही पुरावा नसताना ते खोटे बोलत असल्याच्या केलेल्या आरोपांपासून सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. खरं तर, तरुण विवाहित स्त्रिया जेव्हा कौटुंबिक न्यायालय, महिला कक्ष किंवा राज्य न्यायालयात तक्रार दाखल करतात, तेव्हा प्रत्येक प्रकरणात हेच घडत असते. या स्त्रियांच्या दुःखाचे कारण सामाजिक आहे. त्यांना माहित आहे की, पती सोडून गेल्यानंतर जर त्या गुपचूप माहेरी परतल्या, तर त्यांचे भाऊ-बहिणी आणि समाज त्यांना जगू देणार नाहीत. त्यामुळे, त्या खोट्या कहाण्या रचतात आणि अशा कायद्यांचा आधार घेतात, जे त्यांच्या संरक्षणासाठी बनवले गेले होते, पण आता समाजात संरक्षणासाठी त्यांना निमित्तं पुरवतात.

जेव्हा आई-वडिलांना सांगितले जाते की, कमी हुंडा आणल्याबद्दल त्यांच्या पतींना छळले जाते, मारहाण केली जाते आणि हिणवले जाते, तेव्हा आपल्या विवाहित मुलीला घरातून हाकलून देण्याचे धाडस त्यांच्यात उरत नाही. हे कायदे म्हणजे खरंतर अशा मुलीसाठी माहेरी परत येण्याच्या चाव्या आहेत, जिने आपल्या पतीशी भांडण केले आहे.

आजही, हिंदू धर्म आणि समाज हे स्वीकारायला तयार नाहीत की, लग्नाच्या सात दिवसांनंतर, सात वर्षांनंतर किंवा सतरा वर्षांनंतर पती-पत्नी एकमेकांपासून इतके कंटाळू शकतात की त्यांना वेगळे राहण्याची इच्छा होते. अशा परिस्थितीत पतीचे घर सोडून गेलेल्या स्त्रीकडे समाज तुच्छतेने पाहतो. यातून सुटका करून घेण्यासाठी, पत्नी घरगुती हिंसाचार, हुंडा आणि क्रूरता यांसारखी कारणे देतात.

ही समस्या विशेषतः मध्यमवर्गात अधिक प्रमाणात आढळते, जिथे घटस्फोटाचे प्रकरण अनेकदा मिटत नाही. पतीला सोडून गेलेल्या स्त्रीला, मुले असोत वा नसोत, ती कमावत असूनही नोकरी मिळवणे कठीण जाते. ७६ वर्षे उलटूनही समाजाला हे सत्य अजूनही समजलेले नाही की, १९५५ मध्ये लागू केलेले हे कायदे दुर्मिळ घटनांसाठी आहेत, प्रत्येक वैवाहिक समस्येवरचा उपाय नाहीत.

तक्रार दाखल करणाऱ्या स्त्रीला माहीत असते की, या कायद्यांनुसार गुन्हा दाखल केल्यास समेट होण्याची सर्व शक्यता संपुष्टात येईल, पण तिला हेही माहीत असते की, जर तिने हे आरोप केले नाहीत, तर तिचे आई-वडील आणि भावंडे तिला आश्रय देणार नाहीत. तक्रार करणे हाच तिचा तात्काळ उपाय असल्याचे दिसते.

जर समाज उदारमतवादी असता, जो या कायद्यांचा खरा उद्देश होता, तर वैवाहिक वादांना सामान्य तडजोड मानले गेले नसते आणि पती किंवा पत्नी यांपैकी कोणालाही दोषी मानले गेले नसते. समाज नेहमीच पत्नीला दोषी मानतो. नवीन कायदे काही काळासाठी पत्नीसाठी पडद्यासारखे काम करतात.

विवाहाचे सुख तेव्हाच जेव्हा पती-पत्नी असतील स्वतंत्र

* नसीम अंसारी कोचर

रिद्धिमा वरचेवर आजारी पडू लागली होती. मनोजसोबत तिचे लग्न होऊन ५ वर्षे झाली होती, पण सुरुवातीचे एक वर्ष सासरी व्यवस्थित राहिल्यानंतर तिचे हाल होऊ लागले. लग्नापूर्वी रिद्धिमा अनेक कलागुण असलेली एक सुंदर, आनंदी आणि निरोगी मुलगी होती, पण लग्नानंतर ती मनोजच्या कुटुंबात आल्यावर काही दिवसांतच तिला तिथे गुलामीत राहात असल्यासारखे वाटू लागले. तिची सासू खूपच फटकळ आणि रागीट स्वभावाची होती.

तिच्या प्रत्येक कामात सासू चूक दाखवत असे. शब्दशब्दावरून तिला रोखत असे. ती तिला घरातील सर्व कामे करायला लावायची आणि प्रत्येक कामात टोमणे मारायची, जसे तुझ्या आईने तुला हे शिकवले नाही, तुझ्या आईने तुला ते शिकवले नाही, तुझ्या घरात असे घडत असेल, इथे असे चालणार नाही, असे कडवट टोमणे मारून सासू तिचे मन दुखावत असे.

रिद्धिमा खूप स्वादिष्ट जेवण बनवायची, पण सासू आणि नणंदेला ते कधीच आवडले नाही. कधी जास्त मीठ झाले तर कधी जास्त तिखट झाले, असे बोलून सासू तिच्या जेवणात उणिवा शोधत असे. सुरुवातीला सासऱ्यांनी सुनेच्या कामाचे कौतुक केले, पण ते ऐकून पत्नीच्या भुवया उंचावल्यानंतर ते देखील रिद्धिमाच्या कामात चुका शोधू लागले.

आपल्या पत्नीवर अत्याचार होत असल्याचे रिद्धिमाचा पती मनोजला दिसत होते, पण आई-वडील आणि बहिणीसमोर तो गप्प बसत असे. रिद्धिमा स्वत:ला मनोजच्या घरातील बिनपगारी मोलकरणीशिवाय दुसरे काहीच समजत नव्हती. या घरात ती स्वत:च्या इच्छेने काहीही करू शकत नव्हती.

अशी विचारसरणी कशासाठी?

रिद्धिमाने तिची खोली तिच्या आवडीनुसार सजवायला घेतल्यास सासू रागाने सांगायची की, हे घर मी माझ्या कष्टाच्या पैशांतून बांधले आहे. त्यामुळे चुकूनही ते बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. मी जे काही सजवले आहे ते तसेच राहील.

रिद्धिमाच्या सासूने तिच्या वागण्यातून दाखवून दिले की, घर तिचे आहे आणि तिच्या इच्छेनुसार चालेल. इथे रिद्धिमा किंवा मनोजची आवड महत्त्वाची नाही. ५ वर्षांपासून सतत राग, तणाव आणि नैराश्याने ग्रासलेली रिद्धिमा अखेर रक्तदाबाची रुग्ण बनली. या शहरात तिचे माहेर नाही किंवा मैत्रिणीही नाहीत की, ज्यांच्या मदतीने ती तिच्या तणावातून काहीशी बाहेर पडू शकेल. तिचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. तिच्या डोक्यावरचे केस गळायला लागले आहेत. चेहऱ्यावर पुरळ आला आहे.

साजशृंगाराची हौस तर कधीच संपली आहे आणि आता तर ती अनेकदा एकच कपडे घालते. ती खरोखरंच मोलकरीण दिसायला लागली आहे. काम आणि तणावामुळे तिचा ३ वेळा गर्भपात झाला. त्यातच सासूच्या तोंडचे मूल होत नसल्याचे टोमणेही तिला सहन करावे लागतात. आता तर मनोजलाही तिच्याबद्दल काहीच वाटेनासे झाले आहे. जेव्हा त्याची आई घरात तणाव निर्माण करते तेव्हा त्याचा राग तो रिद्धिमावर काढतो.

परंपरेच्या नावाखाली शोषण

रिद्धिमाची मोठी बहीण कामिनी, जी लग्नानंतर तिच्या पतीसोबत दुसऱ्या शहरात राहाते. सासू, सासरे, नणंद आणि भावजय यांच्यापासून ती दूर असते. ती खूपच सुखी, समृद्ध आणि आनंदी आहे. ती प्रत्येक गोष्टीवर अगदी मनमोकळेपणाने हसते. कामिनी आयुष्याचा पुरेपूर आनंद घेत आहे. ती स्वत:च्या घराची आणि स्वत:च्या इच्छेची मालक आहे.

तिच्या कामात कोणी ढवळाढवळ करत नाही. ती तिच्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार घर सजवते. पतीही तिची आवड आणि कलात्मकता पाहून खूश आहे. ती तिच्या इच्छेनुसार मुलांचे संगोपनही करत आहे. या स्वातंत्र्याचाच परिणाम आहे की, वयाने मोठी असूनही कामिनी रिद्धिमापेक्षा तरुण आणि उत्साही दिसते.

खरं तर महिलांचे आरोग्य, सौंदर्य, कला आणि गुणांच्या विकासासाठी लग्नानंतर पतीसोबत वेगळ्या घरात राहणे चांगले. सासू, सासरे, नणंद, भावजय, दीर, यांनी भरलेल्या कुटुंबात स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. डोक्यावर सतत एक अदृश्य काठी असते. त्यांच्यावर घरकामाचे मोठे ओझे असते. कामाच्या ओझ्यासोबतच त्यांच्यावर नेहमीच पहारा असतो.

मुलांवर वाईट परिणाम

घरात अनेक सदस्य असल्यास वाढत्या वयाच्या मुलांना अधिक सल्ले दिले जातात. प्रत्येक व्यक्ती त्यांना आपापल्या परीने त्यांना योग्य-अयोग्य सांगत असतो. त्यामुळे मुलं संभ्रमात राहातात. त्यांना त्यांच्या विचारसरणीनुसार योग्य-अयोग्य ठरवता येत नाही. एकल कुटुंबात, फक्त आई-वडीलच असतात. ते मुलावर प्रेम करतात आणि त्यांना समजून घेतात, त्यामुळे मूल निर्णय घेताना गोंधळून जात नाही. योग्य आणि अयोग्य यातील निर्णय घेण्यास मूल सक्षम होते.

पण, जिथे सासू आणि सुनेचे एकमेकांशी नीट पटत नाही तिथे त्या दोघीही मुलांना एकमेकींविरुद्ध भडकावत राहतात. त्या त्यांच्या भांडणात लहान मुलांचा शस्त्र म्हणून वापर करतात.

याचा मुलांच्या कोमल मनावर, त्यांच्या विकासावर वाईट परिणाम होतो. असे दिसून आले आहे की, अशा घरातील मुले अतिशय संकुचित स्वभावाची, चिडचिडी, आक्रमक आणि हट्टी बनतात. त्यांच्यात समजूतदारपणा, बंधुता, प्रेम आणि सौहार्द यांसारख्या चांगल्या मानवी गुणांचा अभाव असतो. ती त्यांच्या वर्गमित्रांशीही नीट वागत नाहीत.

स्वत:चे घर म्हणजे खर्च कमी

पती-पत्नी स्वतंत्रपणे स्वत:च्या घरात राहात असल्यास, खर्च कमी झाल्याने कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूत होते. मनोजचेच उदाहरण घ्या, त्याला कधी मिठाई खावीशी वाटली तर त्याला केवळ स्वत:साठी आणि पत्नीसाठी नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी मिठाई खरेदी करावी लागते.

जर पत्नीसाठी साडी खरेदी करायची असेल तर आई आणि बहिणीसाठीदेखील खरेदी करावी लागते. पती कधीच पत्नीसोबत एकटा उपहारगृहात जेवायला किंवा चित्रपट बघायला जाऊ शकत नाही, कारण त्याला संपूर्ण कुटुंब सोबत घ्यावे लागते. याउलट कामिनी पती आणि दोन मुलांसोबत अनेकदा बाहेरगावी जाते. ते उपहारगृहात जाऊन हवे ते खातात, चित्रपट पाहातात आणि खरेदीसाठीही     जातात.

अशी अनेक घरं आहेत जिथे २ किंवा ३ भावांचे कुटुंब एकत्र राहाते. तिथे रोजच भांडणं होतात. घरी खायला आणायचे असल्यास ते केवळ स्वत:च्या मुलांसाठीच नाही तर भावाच्या मुलांसाठीही आणावे लागते. सर्वांना विचारात घेऊनच खर्च करावा लागतो. कुटुंबातील एकाची परिस्थिती बिकट असेल तर त्याला वाईट वाटू नये म्हणून दुसरा स्वत:वर जास्त खर्च करत नाही.

मनोरंजनाचा अभाव

साधारणपणे सासरी सुनेसाठी मनोरंजनाचे कोणतेही साधन नसते. त्या स्वयंपाकघर आणि शयनकक्षापुरत्याच मर्यादित असतात. घराचा टीव्ही दिवाणखान्यात ठेवला तरी त्या जागेवर सासू-सासरे आणि मुलांचा ताबा असतो. सुनेला तिच्या आवडीचा एखादा कार्यक्रम पाहायचा असेल तर ती पाहू शकत नाही.

पती-पत्नीला कधी एकटे कुठे जायचे असेल तर प्रत्येकाच्या डोळ्यात प्रश्न असतो की कुठे जात आहात? का जात आहात? कधी येणार? त्यामुळे बाहेर जाण्याचा उत्साह मावळतो.

सासरी सून आपल्या मैत्रिणींना घरी बोलावू शकत नाही किंवा त्यांच्यासोबत पार्टी करू शकत नाहीत. याउलट पती-पत्नी वेगळ्या घरात राहात असतील तर दोघेही आपल्या मित्र-मैत्रीणीना घरी बोलावू शकतात, पार्टी देऊ शकतात आणि मनमोकळेपणे त्याचा आनंद घेऊ शकतात.

जागेचा अभाव

विभक्त कुटुंबांमध्ये जागेची कमतरता नसते. एका बेडरूमच्या फ्लॅटमध्येही पुरेशी जागा उपलब्ध असते. कोणतेही बंधन नसते. मोकळ्या वेळेत ती दिवाणखाना किंवा बाल्कनी कुठेही निवांत बसू शकते; याउलट सासू- सासरे असल्यास सून तिच्याच घरात बंदिस्त असते. मुलांनाही त्यांच्या आजी-आजोबांमुळे अडकल्यासारखे वाटते, कारण ती खेळू लागल्यास किंवा त्यांनी मोठ्याने आवाज केल्यास त्यांना ओरडा खावा लागतो.

स्वातंत्र्य आनंद देते

जर पती-पत्नी एकत्र स्वतंत्र घरात राहात असतील तर प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक कामासाठी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळते. कोणावरही बंधने नसतात. वाटेल तिकडे फिरा. वाटेल ते बनवा आणि खा. स्वयंपाक करायचा कंटाळा आल्यास बाहेरून मागवा. हवे ते कपडे घाला.

सासू-सासरे सोबत राहात असल्यास नोकरदार  महिलांना त्यांचा मान राखून फक्त साडी किंवा पंजाबी ड्रेस घालावा लागतो. याउलट वेगळ्या राहाणाऱ्या महिला त्यांची आवड, सोय आणि फॅशननुसार जीन्स, टॉप, स्कर्ट, मिडी घालू शकतात. जर तुम्ही पतीसोबत घरी एकट्या असाल तर तुम्ही नाईट सूट किंवा सेक्सी नाईटीही घालू शकता.

लग्नासाठी उत्सुक तरूणांचे कोण ऐकणार?

* भारत भूषण श्रीवास्तव

२३ डिसेंबर २०२३ रोजी मोक्षदा एकादशीच्या दिवशी विष्णूसह इतर देवी-देवता नीट उठलेही नव्हते, तोच खाली जमिनीवर असलेले तरुण अविवाहित आरडाओरड करू लागले की, आता जर तुम्ही खरोखरंच जागे झाले असाल तर आमचे लग्न लावून द्या. तुम्ही जर हे करू शकत नसाल तर नैतिक जबाबदारी स्वीकारा आणि पदाचा राजीनामा द्या, अशी मागणीही या तरुणांनी केली.

भारत भूमीतील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर येथे सकाळीच सुमारे ५० अविवाहित, वराची वेषभूषा करून घोड्यावर स्वार झाले होते. बँड, लग्नाच्या मिरवणुकीसह हे अविवाहित डीएम ऑफिस म्हणजे जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या दिशेने नवरदेव मोर्चा घेऊन निघाले होते.

आजकाल, विष्णुजींना जगात जास्त काम आहे, ते पालनकर्ते असल्याने कदाचित लग्नासारख्या क्षुल्लक प्रश्नांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. म्हणूनच भजन आणि आरती गाऊन त्यांना याचसाठी जागे केले जाते की, हे भगवंता उठ आणि विश्वाच्या शुभ कार्यांसह लग्न लावून दे. जी प्रत्येक अविवाहित तरुणाची रोजगारानंतरची दुसरी सर्वात मोठी इच्छा असते. या तरुणांनी शहाणपण दाखवत लग्न पार पाडण्यासाठी कलियुगात पृथ्वीवरील विष्णूचे प्रतिनिधी असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

निवेदनाऐवजी जाहिरात आवश्यक

या अविवाहित तरुणांचे दयनीय रडगाणे वरच्यापर्यंत पोहोचले असेल, अशी आशा कमीच आहे. खालच्या देवांबद्दल, बोलायचे झाल्यास ते फक्त मनातल्या मनात हसून केवळ निवेदनच स्वीकारू शकतात. जर कोणी थोडेसेही संवेदनशील असेल तर निदर्शनास आणून देईल की, हे बंधूंनो, मला निवेदन देण्याऐवजी जाहिरातीची मदत घ्या. माझ्यावर किंवा देवावर विसंबून राहू नका, अन्यथा तुमचे संपूर्ण आयुष्य फक्त वधू शोधण्यातच खर्ची पडेल आणि तुम्ही या नश्वर जगाला अविवाहित म्हणूनच सोडून जाल.

हा सल्लाही त्यांच्या मनात कुठेतरी दडला असेल की, खरा पुरुष असशील तर पृथ्वीराज बनून तुझ्या संयोगिताला घेऊन येशील. सोलापुरातील नवरदेव मोर्चा पाहून लोक आस्थेने आणि आश्चर्याने बघतच राहिले होते, हे तुमच्याही कानावर आले असेलच ना?

काहींना या अविवाहित वऱ्हाडींबद्दल कमालीची सहानुभूती होती, पण त्यांनाही हा प्रश्न पडला होता की, जर तो वरचा या अभागी तरुणांचे ऐकत नसेल तर आम्ही पामर काय करू शकणार? आम्ही कसेबसे आमचे लग्न केले आणि अजूनही ते बोलत आहोत. या वेड्या लग्नाळूंना कोण समजावणार की भावा, संसाराच्या भानगडीत पडू नकोस, पश्चातापच करायचा असेल तर तो लाडूची चव न चाखता कर.

समजावू शकत नाही आणि वाचवूही शकत नाही

हे देखील एक मनोवैज्ञानिक तत्त्व आहे की, आत्महत्येला प्रवृत्त झालेल्या आणि लग्न करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला ब्रह्मादेखील समजावू शकत नाही आणि वाचवूही शकत नाही, कारण जे भाग्यात असते तेच घडते. आता या लग्नाळूंबद्दल बोलायचे तर, तुलसीदासांनी खूप आधीच स्पष्ट केले आहे की, ज्यांना भगवंत दारुण दु:ख देतो त्यांची बुद्धी आधीच भ्रष्ट करतो.

पादचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत नवरदेवांच्या मोर्चात रस घेतला, तेव्हा त्यांना समजले की, या बिचाऱ्यांना मुली अजिबात मिळत नाहीत आणि ज्यांना त्या कशाबशा मिळतात, त्या या विवाहोच्छुक तरुणांना कुजलेल्या आंब्यासारखे नाकारतात, कारण त्यांच्याकडे रोजगार नाही.

सोलापुरातील हे दृश्य पाहून कदाचित काहीना तो प्राचीन काळ आठवला असेल जेव्हा मुली तोंडातून चकार शब्दही काढू शकत नव्हत्या आणि आई-वडील ज्याच्या गळ्यात बांधायचे त्यालाच सर्वस्व मानून त्याच्यासोबत सावित्री बनून आयुष्य व्यतीत करायच्या. बेरोजगार तर दूरचीच गोष्ट, मुलगा लंगडा, पांगळा, आंधळा किंवा काणा असला तरी ‘जन्मोजन्मी हाच पती मिळो,’ अशी प्रार्थना करत त्या वटसावित्रीचा उपवास करत आणि पुढील प्रत्येक जन्मासाठी त्याचेच बुकिंग करून ठेवत.

काळ बदलला आहे

पण, आता काळ आणि मुली दोन्ही बदलले आहे. मुली सुशिक्षित, हुशार, स्वाभिमानी आणि जागरूक झाल्या आहेत. त्यामुळेच आता त्यांना ऐऱ्यागैऱ्या कोणाच्याही गळ्यात बांधले जाऊ शकत नाही. पूर्वी मुलींना गाय म्हटले जायचे. आयुष्यभर त्या त्याच खुंटीला बांधून पडलेल्या असायच्या. आई-वडीलच त्यांना असे बांधून ठेवायचे. पण, आता मुलींनी स्वत:च स्वत:चा जोडीदार शोधायला सुरुवात केली आहे. अर्थात त्या कोणावरही अवलंबून नसल्याने स्वत:साठी योग्य वर शोधू लागल्या आहेत. स्वत:च्या पायावर उभ्या आहेत.

बेरोजगार जोडीदार हा त्यांचा शेवटचा प्राधान्यक्रमही नाही, त्यामुळेच सोलापुरातील अविवाहित तरुणांचा मोर्चा हा प्रत्यक्षात बेरोजगारीविरोधातील मोहीम आहे, हे समजून घेतले पाहिजे, ज्या अंतर्गत वधूच्या वेशात सरकारकडून नोकरी किंवा नोकरीची मागणी केली जात आहे. असे मोर्चे देशाच्या प्रत्येक भागात पाहायला मिळतात, जिथे या लग्नाळू तरुणांचे दु:ख ओसंडून वाहताना दिसते.

स्वस्तातला तमाशा नाही

कर्नाटकातील ब्रह्मचारिगलू पदयात्रेत, असेच दु:ख मंड्या जिल्ह्यातील तरुणांनी मार्च महिन्यात व्यक्त केले होते. सोलापुरात ज्याला अविवाहित नवरदेवांचा मोर्चा असे संबोधले गेले त्याला कर्नाटकात ब्रह्मचारीगलू पदयात्रा म्हटले गेले. या पदयात्रेत सुमारे ६० अविवाहित तरुणांनी १२० किलोमीटरचा प्रवास करून चामराजनगर जिल्ह्यातील महादेश्वर मंदिर गाठले. तेव्हा सर्वांनी हे मान्य केले होते की, ही कोणतीही स्वस्तातली पदयात्रा किंवा प्रसिद्धीसाठीचा स्टंट नाही. खरंतर या तरुणांना नोकरी नाही. काही तज्ज्ञांनी दिला असा निष्कर्ष काढला होता की, या अविवाहित तरुणांना चांगली नोकरी नाही आणि मुळात हे पदयात्री शेतकरी कुटुंबातील आहेत.

या समस्येचा दुसरा पैलू असा समजला की, नव्या युगातील मुलींना लग्नानंतर गावात राहायचे नाही आणि आता शेती हा तोट्याचा व्यवसाय झाला आहे, ज्यामध्ये आर्थिक सुरक्षितता नाही, त्यामुळे मुलींसोबत मुलींचे पालकही धोका पत्करायला तयार नाहीत.

केवळ कर्नाटकातीलच नाही तर प्रत्येक भागातील शेतकऱ्यांचे मुलगे आपली शेती सोडून शहरांकडे धाव घेत आहेत. ते गावातील नोकरांना जेवढा पगार देतात त्यापेक्षा कमी पैशांत शहरात छोटी-मोठी नोकरी करतात, जेणेकरून त्यांच्या लग्नात कोणतेही अडचण येऊ नये.

मुलींना अशी मुलं आवडत नाहीत

याला दुजोरा देताना मंड्या येथील शेतकऱ्याचा मुलगा कृष्णा यानेही मीडियाला सांगितले की, आतापर्यंत सुमारे ३० मुलींनी त्याला नाकारले आहे. कारण माझ्याकडे कमी शेती आहे त्यामुळे माझी जास्त कमाई होत नाही.

ही एक गंभीर समस्या आहे. याबद्दल सोलापूरच्या ज्योती क्रांती परिषदेचे प्रमुख रमेश बारस्कर, ज्यांच्या बॅनरखाली अविवाहित तरुणांच्या  मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, ते सांगतात की, महाराष्ट्रातील प्रत्येक गावात २५ ते ३० वर्षे वयोगटातील १०० ते १५० मुलं अविवाहित आहेत.

एकत्र येत आहेत अविवाहित तरुण

हरियाणातील अविवाहित तरुण देखील या आणि तत्सम मागण्या मांडत आहेत, पण कुठूनही तोडगा निघताना दिसत नाही आणि भविष्यातही तशी कोणतीच शक्यता दिसत नाही. चांगली गोष्ट अशी की, सर्वत्र असे तरुण रस्त्यावर जमा होत आहेत. त्यांच्या कौमार्याबाबत त्यांच्यात कुठलाही न्यूनगंड नाही. ही समस्या फार गंभीर बनत चालली आहे असे दिसते, पण त्याबाबत कोणीही गांभीर्य दाखवत नाही.

एका अंदाजानुसार, देशात सुमारे ५ कोटी ६३ लाख तरुण अविवाहित आहेत. त्यापैकी मुलींची संख्या केवळ २ कोटी ७ लाख आहे. मुलींची कमी होणारी संख्या आणि लिंग गुणोत्तर वाढणे हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे, पण महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि मध्य प्रदेशातील जे तरुण संघटित पद्धतीने आंदोलन करत आहेत ते बेरोजगार, अर्धवट बेरोजगार आणि शेतकरी कुटुंबातील आहेत. चांगली नोकरी किंवा रोजगार मिळाला तर लग्नासाठी मुलगीही मिळेल, असा विश्वास त्यांना आहे. वरचा ऐकत नसल्यामुळेच ते खालच्याकडे विनवणी करत आहेत.

२०२५ सालचा मान्सून : या पावसाळ्यात पतीसोबत काम वाटून घ्या, प्रेम वाढवा…

* सोनिया राणा

मान्सून २०२५ : प्रत्येक ऋतूनुसार स्वयंपाकघरात मसाले, डाळी आणि भाज्या अपडेट करणे, स्वयंपाकघर स्वच्छ करणे अशी अनेक कामे आहेत जी मोजली जात नाहीत. ‘स्वयंपाकघराचे काम फक्त महिलांचे आहे आणि त्यासाठी खूप वेळ लागतो…’ असा विचार करून कोणीही त्यांना मदत करायला पुढे येत नाही. सर्वप्रथम, महिला स्वतः महिलांचे काम नाकारतात.

पण आता वेळ आली आहे की महिलांनी घरकामातही त्यांच्या पतींना जबाबदारी द्यावी. शेवटी, पती बेडवर किंवा सोफ्यावर झोपून कधीपर्यंत चहा आणि पकोड्याचा ऑर्डर देत राहणार आणि तुम्ही ते एकटेच सहन करत राहणार?

पावसाळा आला आहे आणि त्यासोबतच ओलावा, ओलसरपणा, बुरशी आणि स्वयंपाकघरात झुरळे आणि कीटकांसारखे बिनबोभाट पाहुणे येतात.

ओल्यापणामुळे डाळी खराब होऊ नयेत, मसाले सुगंधित राहतील आणि भाज्या कुजू नयेत यासाठी व्यवस्था करणे सोपे काम नाही.

आता, क्रिकेटच्या हंगामात जेव्हा नवऱ्याला वेळेवर चहा हवा असेल तेव्हा त्याला चहाच्या पानांच्या डब्यात आणि वेलची कुठे आहे हे माहित नसावे का?

जोडीदाराला मदतीचा हात द्या

पतीसाठी उपयुक्त टिप्स :

  • स्वयंपाकघर जमिनीपासून कपाटापर्यंत खोलवर स्वच्छ करा.
  • जुने मसाले आणि डाळी फेकून द्या आणि नवीन खरेदीची यादी बनवा.
  • डाळी आणि मसाले हवाबंद डब्यात भरा, जेणेकरून ओलावा राहणार नाही.
  • भाज्या एकत्र खरेदी करा आणि एकत्र पावसाचा आनंद घ्या.

आणि हो, जर तुमचा नवरा म्हणतो की त्याला हे सर्व माहित नाही, तर तुम्ही हसून म्हणाल, “मग ते शिकण्याचा प्रयत्न करा… लग्न म्हणजे फक्त एकत्र जगण्याचे आणि मरण्याचे वचन नाही, तर ते घर एकत्र स्वच्छ करण्याचा आणि स्वच्छ करण्याचा करार आहे आणि मग हे घर फक्त महिलेचे नाही. त्यात राहणाऱ्या सर्वांची जबाबदारी आहे की ते एकत्र काम करावे.

तर तुम्ही मान्सून मिशन हसबंड सुरू करण्यास तयार आहात का?

वैवाहिक नात्यात संपूर्ण सत्य सांगणे आवश्यक नाही

* शिखा जैन

तुम्ही तुमच्या जोडीदाराशी पूर्णपणे एकनिष्ठ आहात असे म्हणू शकता का? सत्य बोलण्याची किंमत कधी चुकवावी लागली आहे का? तुमच्या जोडीदारासोबत तुमचे सर्व गुपिते शेअर करणे तुम्हाला महागात पडले आहे का? तुमच्या खोट्या बोलण्यामुळे नव्हे तर तुमच्या सत्य बोलण्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या भावना कधी दुखावल्या आहेत का आणि तुम्हाला खरे बोलल्याबद्दल पश्चात्ताप झाला आहे का?

रहीमचा एक अतिशय प्रसिद्ध दोहा आहे –

रहीम म्हणतो की जर विश्वास तुटला तर विश्वास परत मिळवता येत नाही.

जर ते तुटले तर ते पुन्हा जोडता येत नाही; जर जोडले तर गाठ होईल.

म्हणजेच प्रेमाचा धागा कधीही तुटू नये, कारण जर तो एकदा तुटला तर तो पुन्हा कधीच जोडला जात नाही आणि जरी जोडला तरी त्यात एक गाठ राहते. जर हा धागा नवीन लग्नाचा असेल तर तो तुटण्याची किंवा गाठ पडण्याची शक्यता जास्त असते, कारण सुरुवातीला तो थोडा कच्चा असतो. नात्यांचे गाठोडे बाहेरून दिसत नसतील पण ते मनात राहतात आणि आयुष्यभर त्रास देत राहतात.

दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, बऱ्याचदा खरे बोलण्याची आपली सवय आपल्या चांगल्या नात्यात अशी दरी निर्माण करते जी कधीही भरून निघू शकत नाही.

असो, नवरा-बायकोमधील नाते कधी बर्फाचे असते तर कधी आगीचे. कधी तो आनंदाचा काळ असतो तर कधी दुःखाचा, पण या नात्याचे बंधन जितके मजबूत असते तितकेच ते नाजूक असते. विश्वासाने विणलेला आणि प्रेमाने भिजलेला हा धागा श्रद्धेवर टिकलेला आहे. असा विचार करून, तुम्ही तुमच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधाची गोष्ट तुमच्या जोडीदारासोबत शेअर करता.

पण तुमच्या जोडीदाराला हे कळताच, त्याला तुमच्या प्रामाणिकपणाचा अभिमान वाटत नाही, पण तुमच्या मागील प्रेमसंबंधाबद्दल जाणून घेतल्याने दोघांमध्ये दरी निर्माण होते आणि बंध कमकुवत होऊ लागतो. त्याच वेळी, तुम्ही स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न करू शकता की आता असे काहीही घडत नाही, परंतु नकळत दोघांमध्ये दरी निर्माण होते. जे भरणे कठीण होते.

सत्य लपवण्यामागील कारण काय आहे?

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार, लोक अनेकदा खोटे बोलतात कारण त्यांना त्यांच्या जोडीदाराच्या भावना दुखावायच्या नसतात. हे खोटे बोलण्यामागे सुरक्षिततेची आणि संरक्षणाची भावना असते, ज्याचा उद्देश नातेसंबंध मजबूत आणि आनंदी करणे आहे.

मानसशास्त्रज्ञ रॉबिन डनबर यांनी असेही म्हटले आहे की खोटे बोलल्याने भावना दुखावल्या जात नाहीत, ज्यामुळे नातेसंबंध स्थिर आणि गोड राहण्यास मदत होते. पण हे देखील महत्त्वाचे आहे की खोट्याचा नकारात्मक परिणाम होऊ नये आणि सत्याला नेहमीच महत्त्व दिले पाहिजे.

कधीकधी आपण आपल्या जोडीदारावर इतके प्रेम करतो की आपण त्याच्या भावना दुखावण्याचा विचारही करू शकत नाही आणि कधीकधी सत्य इतके कटू असते की आपल्याला माहित असते की समोरच्या व्यक्तीला ते आवडणार नाही आणि ते आपल्यासाठी फायदेशीर ठरणार नाही, त्यामुळे आपल्यातील तणाव वाढेल. याचा विचार करून, लोक त्यांच्या जोडीदारांना संपूर्ण सत्य सांगत नाहीत.

सत्य कोणत्या गोष्टींमध्ये लपलेले आहे?

एखाद्याच्या माजी प्रेमीबद्दल बोलण्यापूर्वी माणूस १० वेळा विचार करतो. यामुळे विश्वास तुटण्याचे प्रमाण वाढते. जर तुमचा जोडीदार मालकीचा असेल तर सत्य सांगणे महागात पडू शकते.

एखाद्याच्या मृत्यू किंवा अपघातासारख्या गंभीर घटनेबद्दल माहिती द्यायची असेल तर थोडे खोटे बोलून मनोबल वाढवता येते.

जर एखाद्याच्या आवडीनिवडी तुमच्या जोडीदारावर परिणाम करत असतील, तर तुमच्या जोडीदाराला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला खोटे बोलावे लागू शकते.

जर एखाद्याला त्याच्या भावना योग्यरित्या कशा व्यक्त करायच्या हे माहित नसेल तर तो खोटे बोलू शकतो.

जर एखाद्याला स्वतःला बरे वाटायचे असेल तर तो खोटे बोलू शकतो.

तुमच्या पालकांच्या घराबद्दल सर्व काही सांगणे आवश्यक नाही. बऱ्याचदा, चांगल्यासाठी सांगितल्या जाणाऱ्या गोष्टींसाठी, आयुष्यभर टोमणे ऐकावे लागतात की तुमचे कुटुंबातील सदस्य असेच आहेत. मग मी तुम्हाला अशी कोणतीही गोष्ट किंवा त्यांची कमकुवतपणा माझ्या तोंडून का सांगू?

बहुतेक बायका त्यांच्या पतींना त्यांच्या लांबलचक खरेदी यादीबद्दल सांगत नाहीत. एवढेच नाही तर आजही ५०% पती असे आहेत ज्यांना त्यांच्या पत्नीच्या खरेदीबद्दल माहिती नसेल.

बऱ्याचदा नात्यात संघर्ष टाळण्यासाठी खोटे बोलले जाते. जेव्हा तुमच्या जोडीदाराने विचारलेल्या प्रश्नामुळे तुम्ही खूप अस्वस्थ होता, तेव्हा खोटे बोलणे हे सर्वात सोपे काम वाटते.

सगळं सांगायची काय गरज आहे?

किशोरावस्थेत, आपण सर्वजण प्रेमाने वेडे असतो. पण खूप कमी नाती फुलतात आणि या वयात लग्नाच्या टप्प्यावर पोहोचतात आणि मग तुम्ही आयुष्यात पुढे जाता आणि लग्न करण्याचा निर्णय घेता. हे खरं आहे पण जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे गेला असाल तर त्या जुन्या समस्या उलगडून तुमच्या जोडीदाराला हे सांगण्याचा काय अर्थ आहे? आता तुम्ही हे प्रकरण खूप मागे सोडले आहे, म्हणून ते विसरून जा जणू काही हे सर्व तुमच्यासोबत घडलेच नाही आणि मग तुमच्या जोडीदाराला हे सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

कधीकधी सत्य हानिकारक असू शकते

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप आनंदी असते तेव्हा त्याला असे वाटते की त्याने आपल्या जोडीदारापासून काहीही लपवू नये परंतु ही प्रामाणिकपणा प्रत्येकवेळी काम करत नाही. तुमचा जोडीदार हे सत्य ऐकण्यास तयार आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही, आणि तो किंवा ती त्यावर कशी प्रतिक्रिया देईल हेही तुम्हाला माहीत नाही. यामागील तुमचे हेतू चांगले असू शकतात पण त्यामुळे तुमच्या नात्यात मोठी दरी निर्माण होऊ शकते.

एखाद्या उदात्त कारणासाठी सांगितलेले खोटे हे अशा सत्यापेक्षा जास्त स्वीकार्य असते जे निष्फळ ठरते किंवा ज्याच्यामुळे कोणाला दुःख किंवा हानी होऊ शकते. विशेषतः एखाद्याला मदत करण्यासाठी किंवा जीव वाचवण्यासाठी सांगितलेले खोटे हे सत्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त अचूक असते.

तरीही अंतिम उत्तर असे असेल की तुम्ही तुमचे नातेसंबंध एक्सप्लोर करावेत. एक, दोन, दहा वेळा प्रयत्न करा आणि तुम्हाला कसा अनुभव मिळतो ते पहा. यानंतर, तुमच्याकडे पुढचा मार्ग कोणता घ्यायचा हे स्वतः ठरवण्याची ताकद असेल. जर तुम्हाला सत्य लपवायचे असेल तर त्याची जबाबदारी घ्या आणि जर तुम्हाला सत्य सांगायचे असेल तर जर त्यामुळे नात्यात संघर्ष निर्माण होत असेल तर तुम्हाला ते कसे हाताळायचे हे देखील माहित असले पाहिजे.

लग्नाआधी मुलगा किंवा मुलगी अचानक मरण पावली तर काय?

* सोमा घोष

लग्न : एकुलती एक मुलगी पूनमच्या लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. १५ दिवसांनी तिचे लग्न डॉक्टर आलोकशी होणार होते. ती खूप आनंदी होती आणि तिने खूप खरेदीही केली होती. तिला आनंद होता की तिचे लग्न तिच्या प्रिय जोडीदार आलोकशी होणार आहे, ज्याला ती गेल्या १० वर्षांपासून ओळखत होती.

ती ऑफिसला जाताना दररोज आलोकशी बोलत असे, ज्यामध्ये ती तिच्या दिवसभराच्या नियोजनाबद्दल चर्चा करत असे, पण जेव्हा एका सकाळी आलोकचा फोन आला नाही तेव्हा पूनम काळजीत पडली.

तिने आलोकला खूप वेळा फोन केला. त्याचा फोन वाजत होता पण कोणीही उचलत नव्हते. मग तिने आलोकच्या आईवडिलांना आणि बहिणीला फोन केला. कोणीही फोन उचलत नव्हते. पूनमला काहीतरी गडबड आहे असे वाटू लागले. तिने तिच्या आईला फोन केला आणि कळले की सर्वजण आलोकसोबत हॉस्पिटलमध्ये गेले आहेत. तीही तिच्या वडिलांसोबत तिथे जाणार होती.

ऑफिसमधून सुट्टी घेऊन पूनम घरी पोहोचली तेव्हा तिला कळले की तिचा होणारा पती आलोकला साप चावला आहे.

रात्री, जेव्हा तो त्याच्या क्लिनिकमधून निघत होता, तेव्हा अचानक त्याला त्याच्या पायाला काहीतरी चावल्याचे जाणवले. त्याला वाटले की त्याला मुंगी चावली आहे, पण जेव्हा तो उलट्या करू लागला, अस्वस्थ झाला आणि बेशुद्ध पडला तेव्हा सर्वजण घाबरले आणि त्याला रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी सांगितले की तो क्रेट चावला होता, ज्यावर उपचार करण्यात आले आणि ७ दिवसांनी आलोक बरा झाला आणि काही दिवसांनी त्याचे पूनमशी लग्न झाले.

दक्षता जीव वाचवते

खरंतर, कुटुंबातील सदस्यांच्या सतर्कतेमुळे आलोकला वेळेवर उपचार मिळाले, ज्यामुळे तो बरा झाला. सर्पदंश तज्ञ डॉ. सदानंद राऊत म्हणतात की आलोकला वाचवता आले कारण त्याच्या कुटुंबातील सदस्य वेळेवर रुग्णालयात पोहोचले, त्यामुळे त्याला अँटीव्हेनम देऊन आणि व्हेंटिलेटरवर ठेवून वाचवता आले. जर थोडासा उशीर झाला असता तर त्याला आपला जीव गमवावा लागला असता, कारण त्याला चावणारा साप खूप विषारी असतो, ज्यामध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो.

डॉक्टर पुढे म्हणतात की, क्रेट्स बहुतेकदा रात्रीच्या अंधारात उंदरांची शिकार करण्यासाठी बाहेर पडतात.

हा साप झोपलेल्या व्यक्तीवरून जातो आणि जर तो थोडासाही हालचाल करतो किंवा बाजू बदलण्याचा प्रयत्न करतो तर साप चावतो. हा क्रेट बहुतेकदा मध्यरात्री १२ ते पहाटे ५ च्या दरम्यान चावतो. त्याच्या चाव्याची फारशी लक्षणे दिसत नाहीत, जास्त सूज येत नाही किंवा रक्तस्त्राव होत नाही. अशा परिस्थितीत लोक मुंगी किंवा उंदीर चावल्याचे गृहीत धरतात आणि भूतविद्या किंवा आयुर्वेदिक औषधांचा अवलंब करतात, ज्यामुळे रुग्णाला वाचवणे कठीण होते. यामध्ये, रुग्णाला प्रथम उलट्या होतात, नंतर बेशुद्ध होतात, कोमात जातात आणि नंतर त्याचा मृत्यू होतो.

शोकाचे वातावरण

इथे पूनमला तिचा नवरा मिळाला, पण नीलिमासोबत असे घडले नाही. लग्नाच्या दोन दिवस आधी तिचा होणारा नवरा गिरीश अचानक हृदयविकाराच्या झटक्याने वारला. त्याच्या मृत्यूच्या आदल्या रात्री, संपूर्ण कुटुंब लग्नाचा आनंद साजरा करत होते. गिरीशदेखील सर्वांसोबत नाचत आणि गात होता, परंतु त्याचा आनंद त्याला महागात पडला. रात्री झोपलेला गिरीश सकाळी उठू शकला नाही आणि जेव्हा त्याला रुग्णालयात नेण्यात आले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्याला हृदयविकाराचा झटका आला आहे आणि त्याला मृत घोषित केले. सर्वांचे चेहरे दुःखाने आणि वेदनेने भरलेले होते. कोणाचे सांत्वन करावे आणि कसे करावे हे कोणालाही समजत नव्हते. ज्या हॉटेलमध्ये लग्नाचे समारंभ होणार होते, तिथे शोककळा पसरली.

खूप मोठा धक्का बसल्यासारखे वाटते

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका गावातील रहिवासी शिवमशी मोहिनीचे लग्न गेल्या वर्षी निश्चित झाले होते. लग्नाची मिरवणूक कृष्णाबाग कॉलनीतील लग्नगृहात येणार होती. हाथरसमध्ये भात विधीच्यावेळी, शिवम नाचत असताना पडला आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. जेव्हा वधूच्या कुटुंबाला शिवमच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा जणू काही त्यांच्यावर वीज कोसळली. जेव्हा मोहिनीचे लग्न ठरले तेव्हा तिला मोठी स्वप्ने पडली. शिवमच्या मृत्यूची बातमी ऐकल्यानंतर मोहिनीची तब्येत बिघडली. त्याने खाणे बंद केले. धक्का इतका आहे की सर्वात खोल गोष्ट म्हणजे ती कोणाशीही बोलत नव्हती. तिच्या हातावरील मेहंदी पाहून ती ओरडायची की तीही शिवमकडे जाईल. मोहिनीचे वडील बानी सिंग एका बूट कारखान्यात मजूर म्हणून काम करून फक्त १२ हजार रुपये कमवतात. त्याने ओव्हरटाईम करून मोहिनीच्या लग्नासाठी पैसे गोळा केले. जमीनही गहाण ठेवून पैशांची व्यवस्था करण्यात आली. या अपघातामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये शोककळा पसरली.

लग्नाआधी अचानक घडणारा अपघात हा प्रत्येकासाठी धक्कादायक असतो, पण पालकांना त्यातून बाहेर पडणे जितके कठीण असते तितकेच लग्नाच्या बंधनात अडकणाऱ्या मुली किंवा मुलासाठी ते अधिक कठीण असते.

तज्ञांचे मत जाणून घ्या

याबद्दल मानसशास्त्रज्ञ रशीदा कपाडिया म्हणतात की, लग्नाच्या काही दिवस आधी जर मुलगा किंवा मुलगी अचानक मृत्युमुखी पडली तर तो एक मोठा धक्का असतो. लग्नाआधी जर एखाद्याचा मृत्यू झाला तर संपूर्ण कुटुंब मुलीसाठी ते अशुभ मानू लागते आणि नंतर तिचे लग्न करणे कठीण होते. मुलीचे दुःख क्वचितच लोकांना समजते.

लग्नाआधी मुलीच्या अचानक मृत्यूला कुटुंबातील सदस्य गांभीर्याने घेणार नाहीत, परंतु जर मुलगा मुलीवर प्रेम करत असेल आणि ती मेली तर त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि बऱ्याचदा मुलगा नंतर कोणत्याही मुलीशी लग्न करण्यास नकारही देतो, कारण लग्न ही त्यांच्या नात्याची एक नवीन सुरुवात असते. अशा परिस्थितीत, त्यांना पुन्हा नवीन जीवन सुरू करण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे:

  • बऱ्याचदा एखादा मुलगा किंवा मुलगी नैराश्यात जाऊ शकते किंवा काही वाईट सवयींना बळी पडू शकते. अशा परिस्थितीत, त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये किंवा मित्रांमध्ये राहणे महत्वाचे आहे जेणेकरून त्यांना त्यांचा आधार मिळत राहील.
  • पीडित व्यक्ती एकटी राहू नये याची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी असली पाहिजे. एकटेपणा हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा असतो. आतापर्यंत त्याला आधार देणाऱ्या आणि त्याच्यासोबत राहणाऱ्या व्यक्तीने त्याच्याशी बोलत राहावे आणि त्याच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा. या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येत परत येण्यासाठी स्वतःला ३० दिवसांपेक्षा जास्त वेळ देऊ नका. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, मग ते घरकाम असो, व्यायाम असो, नोकरी असो किंवा व्यवसाय असो, आणि तुमच्या जुन्या दिनचर्येचे पालन करत रहा.
  • आरोग्याकडे लक्ष द्या, संतुलित आहार घ्या, जंक फूड टाळा, कारण हा कोणत्याही मुलाच्या किंवा मुलीच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा असतो, जो कालांतराने बरा होतो, परंतु मानसिक संतुलन सर्वात जास्त बिघडते, ज्यामुळे शारीरिक समस्या उद्भवतात.
  • यावेळी, बहुतेक तरुणांनी त्यांच्या चुलत भावंडांची किंवा चांगल्या मित्रांची मदत घ्यावी, कारण बऱ्याचदा अशा कमकुवत मानसिक अस्थिरतेमध्ये, त्यांच्या आजूबाजूचे चुकीचे लोक त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवू लागतात, जे सुरुवातीला चांगले वाटते, परंतु नंतर घातक ठरू शकते.

रशिदा तिच्या अनुभवाबद्दल सांगते की, बऱ्याच वेळा असे दिसून आले आहे की मुलाच्या मृत्यूनंतर, दोन्ही कुटुंबे आनंदाने मुलीचे लग्न त्याच्या मोठ्या किंवा लहान भावाशी काही दिवसांनी करतात, कारण लोक लग्नाची तयारी अनेक महिने किंवा वर्षे आधीच सुरू करतात. पालक त्यावर मोठा पैसा खर्च करतात. अशा परिस्थितीत, मुलीला मुलाशी जुळवून घेण्यास थोडी अडचण येते.

जर एखाद्या मुलीचा लग्नाआधीच मृत्यू झाला तर त्या मुलाचे लग्न तिच्या मोठ्या किंवा धाकट्या बहिणीशी केले जाते, परंतु हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा कुटुंबात अविवाहित मुलगी किंवा मुलगा असेल. आजच्या कुटुंबांमध्ये हे करणे शक्य नाही, कारण बहुतेक मुले किंवा मुली त्यांच्या पालकांची एकुलती एक मुले असतात. शिवाय, आजकाल मुलीची किंवा मुलाची संमती ही देखील मोठी गोष्ट आहे.

अशाप्रकारे, लग्नाआधी मुलाचा किंवा मुलीचा मृत्यू होणे ही एक मोठी दुर्घटना असते, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब तसेच मुलगा आणि मुलगी दोघांनाही मानसिक समस्यांमधून जावे लागते. अशा परिस्थितीत, संयम आणि मानसिक शांतीने पुढे जाण्याची गरज आहे, ज्यामध्ये कुटुंबाचा आधार खूप महत्वाचा आहे, जेणेकरून मुलगा किंवा मुलगी त्या अपघातातून बाहेर पडू शकेल.

वैवाहिक नातेसंबंधात संपूर्ण सत्य सांगणे आवश्यक नाही

* शिखा जैन

तुम्ही म्हणू शकता की तुम्ही तुमच्या जोडीदाराशी पूर्णपणे एकनिष्ठ आहात? खरे बोलण्याची किंमत मोजावी लागली असे कधी घडले आहे का? तुमचे प्रत्येक रहस्य तुमच्या जोडीदारासोबत शेअर करणे तुमच्यासाठी महाग झाले आहे का? तुमच्या खोट्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावना दुखावल्या आहेत का, सत्य नाही आणि तुम्हाला ते सत्य बोलल्याचा पश्चाताप होतो का?

रहीमची अतिशय प्रसिद्ध जोडी आहे

जर विश्वासात तडा गेला तर विश्वास परत मिळवता येत नाही, असे रहिमचे म्हणणे आहे. जे तुटले आहे ते पुन्हा जोडता येत नाही; म्हणजेच प्रेमाचा धागा कधीच तुटू नये कारण तो एकदा तुटला की पुन्हा जोडता येत नाही आणि जोडला तरी एक गाठ कायम राहते. जर हा धागा नवीन लग्नाचा असेल तर तो तुटण्याची किंवा त्यात गाठ पडण्याची शक्यता जास्त असते, कारण सुरुवातीला तो थोडा कच्चा असतो. नात्याच्या गाठी बाहेरून दिसत नसतात, पण त्या मनात राहतात, जी आयुष्यभर आपल्यासोबत राहतात.

दुसऱ्या शब्दांत, कधीकधी सत्य बोलण्याच्या आपल्या सवयीमुळे आपल्या चांगल्या नातेसंबंधांमध्ये अशी दरी निर्माण होते की ती कधीही भरून निघू शकत नाही. असो, नवरा-बायकोचे नाते कधी बर्फाचे असते तर कधी आगीचे असते. कधी सुखाचा तर कधी दु:खाचा, पण या नात्याचा धागा जसा नाजूक आहे तितकाच घट्ट आहे. विश्वासाने विणलेला आणि प्रेमाने भिजलेला हा धागा विश्वासावर टिकून आहे. असा विचार करून तुम्ही तुमच्या लग्नापूर्वीच्या अफेअरचे तपशीलही तुमच्या जोडीदारासोबत शेअर करता.

पण ही गोष्ट जोडीदाराला कळताच त्याला तुमच्या प्रामाणिकपणाचा अभिमान वाटत नाही, तर आधीच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर दोघांमध्ये दरी निर्माण होते आणि बंध कमकुवत होऊ लागतात. त्याचवेळी मनापासून पटवून द्या की आता तसे काही नाही, तर नकळत दोघांमध्ये दुरावा निर्माण होतो. जे भरणे कठीण होते.

सत्य लपवण्यामागचे कारण काय?

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, लोक अनेकदा खोटे बोलतात कारण त्यांना त्यांच्या जोडीदाराच्या भावना दुखावण्याची इच्छा नसते. खोटे बोलण्यामागे सुरक्षितता आणि संरक्षणाची भावना असते, ज्याचा उद्देश नातेसंबंध मजबूत आणि आनंदी करणे हा आहे.

मानसशास्त्रज्ञ रॉबिन डनबर यांनी असेही म्हटले आहे की खोटे बोलल्याने भावना दुखावत नाहीत, ज्यामुळे नातेसंबंध स्थिर आणि गोड राहण्यास मदत होते. पण खोट्याचा नकारात्मक प्रभाव पडू नये आणि सत्य नेहमी महत्त्वाचे ठेवले पाहिजे हेही महत्त्वाचे आहे.

कधी कधी आपल्या जोडीदारावरचं प्रेम इतकं असतं की जोडीदार त्याच्या/तिच्या भावना दुखावण्याचा विचारही करू शकत नाही आणि कधी कधी सत्य इतकं कटू असतं की समोरच्याला ते आवडणार नाही आणि त्यातून काही फायदा होत नाही आम्ही फक्त वाढवू. असा विचार करून लोक आपल्या पार्टनरला संपूर्ण सत्य सांगत नाहीत.

सत्य कोणत्या बाबतीत लपलेले आहे?

आपल्या माजी बद्दल बोलण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. यामुळे विश्वास गमावण्याचे प्रमाण जास्त आहे. जर तुमचा जोडीदार मालक असेल तर सत्य सांगणे कठीण होऊ शकते.

एखाद्याचा मृत्यू किंवा अपघातासारख्या गंभीर घटनेची माहिती द्यावी लागली तर थोडे खोटे बोलून मनोबल वाढवता येते.

एखाद्याच्या आवडी-निवडीचा जोडीदारावर परिणाम होत असेल तर जोडीदाराला खूश करण्यासाठी पांढरे खोटे बोलावे लागते.

जर एखाद्याला आपल्या भावना योग्यरित्या कसे व्यक्त करावे हे माहित नसेल तर तो खोटे बोलू शकतो.

जर एखाद्याला स्वतःला बरे वाटायचे असेल तर तो खोटे बोलू शकतो.

आपल्या आईच्या घराबद्दल सर्व काही सांगणे आवश्यक नाही. बऱ्याच वेळा चांगल्यासाठी सांगितलेल्या गोष्टींसाठी आयुष्यभर टोमणे ऐकावे लागतात की तुमचे कुटुंबीय असे आहेत. मग अशा गोष्टी किंवा त्यांच्या कमकुवतपणा तोंडातून का सांगता?

बहुतेक बायका त्यांच्या पतींना त्यांच्या विस्तृत खरेदी सूचीबद्दल सांगत नाहीत. एवढेच नाही तर आजही ५०% नवरे आहेत ज्यांना त्यांच्या पत्नीच्या खरेदीची माहिती नाही.

नात्यातील भांडणे थांबवण्यासाठी अनेकदा खोटे बोलले जाते. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या काही प्रश्नामुळे अधिक चिंतित होतात, तेव्हा खोटे बोलणे ही सर्वात सोपी गोष्ट वाटते.

सगळं सांगायची काय गरज?

पौगंडावस्थेत, आपण सर्वजण प्रेमाने वेडलेले असतो. पण या वयात फार कमी नातेसंबंध लग्नापर्यंत पोहोचतात आणि मग तुम्ही आयुष्यात पुढे जा आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे सुद्धा खरे आहे, पण जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात आधीच पुढे गेला आहात, तेव्हा ते मृतदेह खोदून तुमच्या जोडीदाराला हे सांगण्यात काय अर्थ आहे. आता तुम्ही हे प्रकरण खूप मागे सोडले आहे, म्हणून हे सर्व विसरून जा की हे सर्व तुमच्यासोबत कधीच घडले नाही, मग हे तुमच्या जोडीदाराला सांगण्याचा प्रश्नच येत नाही.

कधीकधी सत्य हानिकारक असू शकते

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप आनंदी असते तेव्हा त्याला वाटते की त्याने आपल्या जोडीदारापासून काहीही लपवू नये, परंतु प्रत्येकवेळी हा प्रामाणिकपणा कामी येत नाही. तुमचा जोडीदार हे सत्य ऐकण्यास तयार आहे की नाही हे तुम्हाला माहीत नाही किंवा तो किंवा ती यावर काय प्रतिक्रिया देईल हे तुम्हाला माहीत नाही. यामागे तुमचा हेतू चांगला असू शकतो, परंतु यामुळे तुमच्या नात्यात मोठी दरी निर्माण होऊ शकते.

उदात्त हेतूने बोललेले खोटे असे खोटे बोलण्यापेक्षा जास्त स्वीकार्य असते ज्याचे कोणतेही परिणाम नसतात किंवा एखाद्याला वेदना किंवा हानी पोहोचवते. विशेषतः एखाद्याला मदत करण्यासाठी किंवा एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी बोललेले खोटे सत्यापेक्षा अनेक पटींनी चांगले असते.

तरीही, अंतिम उत्तर तुमच्या नातेसंबंधांचे परीक्षण करणे असेल. एक, दोन, दहा प्रसंगी त्याची चाचणी घ्या आणि तुम्हाला काय अनुभव येतो ते पहा. पुढे कोणता मार्ग अवलंबायचा हे स्वतः ठरवण्याची ताकद तुमच्यात असेल. जर तुम्हाला सत्य लपवायचे असेल तर त्याची जबाबदारी घ्या आणि जर तुम्हाला खरे सांगायचे असेल, तर त्यामुळे जर नात्यात कलह निर्माण झाला तर त्याला कसे सामोरे जायचे हे देखील कळले पाहिजे.

विवाह ही एक भागीदारी आहे, एकमेकांची मालकी नाही

* ललिता गोयल

“अहो, काय घातले आहेस? तुला माहित आहे मला तू साडी नेसलेली आवडत नाही.”

“मी तुला अर्ध्या तासापूर्वी फोन केला, तू कॉल का उचलला नाहीस? अर्ध्या तासानंतर उत्तर का दिलेस?”

रेस्टॉरंटमध्ये गोलगप्पा खावासा वाटतो पण समोरच्या माणसाला चाट खायची इच्छा होते.

“तुझ्या कोणत्या मित्राशी बोलत होतास? मला तो अजिबात आवडत नाही.

तुमचा बॉस तुम्हाला ऑफिसमध्ये उशीर होण्यापासून का थांबवतो?”

हे संभाषण दोन लोकांमधील आहे जे काही काळानंतर लग्न करण्याचा विचार करत आहेत.

या गोष्टी तुम्हाला छोट्या वाटतील पण भविष्यात या छोट्या गोष्टी खूप मोठ्या होतील असे वाटत नाही का?

वरील संभाषणावरून, तुम्हालाही असे वाटत नाही का की ते दोघेही एकमेकांवर नियंत्रण ठेवण्याचा किंवा एकमेकांचे गुरु बनण्याचा प्रयत्न करत आहेत?

लग्नाचा निर्णय हा कोणाच्याही आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय मानला जातो. आज जर तुम्ही स्वतःसाठी योग्य जोडीदार निवडला नाही तर तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे आयुष्य बिघडू शकते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्रश्नांबद्दल सांगणार आहोत, जे विचारल्याने तुम्हाला लग्नाचा निर्णय घेता येईल. लग्नाआधी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत या विषयांवर चर्चा केली नाही तर भविष्यात तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.

एकमेकांना जाणून घेण्याची ही प्रक्रिया लग्नाआधी सुरू व्हायला हवी, मग तुमचा लव्ह मॅरेज असो की अरेंज्ड मॅरेज.

खरे तर पती-पत्नी ही जीवनाच्या वाहनाची दोन चाके आहेत. दोघांनाही एकत्र चालावे लागते आणि एकमेकांना आधार द्यावा लागतो, अशावेळी दोघांपैकी कोणाला वाटत असेल की तो समोरच्याला बेड्या ठोकू शकतो, त्याच्यावर वर्चस्व गाजवू शकतो, त्याचा मालक होऊ शकतो, तर हे पूर्णपणे चुकीचे आहे. एकमेकांशी बोलण्यावर बंधने घातल्याने तुम्ही फक्त तुमचेच नुकसान कराल आणि तुमचे नाते विनाशाच्या उंबरठ्यावर आणाल.

तुम्हाला तुमच्या भावी वैवाहिक जीवनात कोणताही संघर्ष नको असेल तर लग्नाआधी तुमच्या जोडीदाराशी या प्रश्नावर नक्कीच चर्चा करा आणि तुम्हाला त्याच्याशी लग्न करायचे आहे की नाही याची पूर्ण चाचणी घ्या?

जाणून घ्या तुमचा भावी जीवनसाथी तुमचा खरा जोडीदार असेल की तुमचा सन्मान?

दोघांपैकी कोणीही इतर कोणावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणार नाही.

तुमचे भावी वैवाहिक जीवन चांगले जावे असे वाटत असेल, तर लग्न करण्यापूर्वी हे स्पष्ट करा की एकमेकांवर कोणाचे नियंत्रण राहणार नाही. दोघांच्याही स्वतःच्या इच्छा आहेत, स्वतःच्या आवडी आहेत, स्वतःची स्वप्ने आहेत. दोघेही एकमेकांच्या इच्छा आणि स्वप्नांचा आदर करतील. जेणेकरून त्यांच्या नात्यात मोकळा श्वास घेता येईल आणि नात्यात गुदमरणार नाही.

दोन्ही भागीदारांची स्वतःची मते असू शकतात

दोघांनाही हे लक्षात ठेवावे लागेल की कोणत्याही मुद्द्यावर किंवा समस्येवर दोघांचे स्वतःचे मत असू शकते. अशा वेळी कोणाच्याही बोलण्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी समोरच्या व्यक्तीचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकून त्याच्या बोलण्याचा आदर केला पाहिजे.

दोन्ही भागीदारांची स्वतःची निवड असेल

जर तुम्ही तुमच्या पार्टनरला त्याच्या कपड्यांबद्दल प्रतिबंधित केले तर ते तुमच्या नात्यात मोठी चूक ठरू शकते. तुमच्या जोडीदाराला कसे कपडे घालायचे हे एकट्याने ठरवू द्या जेणेकरुन त्याला कधीही तुमच्यासोबत गुदमरल्यासारखे वाटणार नाही आणि त्याला असे वाटणार नाही की त्याला स्वतःचे जीवन किंवा पर्याय नाही. जर तुमच्यापैकी कोणीही असे वागले तर समजून घ्या की तो तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचा किंवा तुमचा मालक बनण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुमचे नाते भविष्यात टिकू शकणार नाही.

स्वतःला बरोबर आणि इतरांना चुकीचे दाखवायची सवय नाही का?

“तुम्ही अशा आणि अशा कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक का केली? जर तुम्हाला समजत नसेल, तर तुम्ही असे का करता?

प्रत्येक गोष्टीत दोष शोधण्याची सवय

“तुम्ही बेडशीट नीट घातली नाही, खूप सुरकुत्या आहेत, तुम्हाला गाडी नीट कशी चालवायची हे माहित नाही, कशा प्रकारची साफसफाई केली गेली आहे, सर्व काही घाण आहे, कोणत्या प्रकारचे अन्न तयार केले आहे.”

प्रकृतीवर नियंत्रण ठेवणाऱ्या जोडीदाराला खूप वाईट सवय असते की तो समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक कामात काही ना काही उणिवा शोधत राहतो आणि काम नीट करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकत राहतो आणि समोरच्याला कोणत्याही कामासाठी सक्षम समजत नाही.

बारकाईने लक्ष ठेवण्याची सवय

जर तुमच्या भावी जोडीदाराने तुम्हाला सांगितले की तुम्ही कधी, कुठे आणि कोणासोबत जात आहात? जर तो वारंवार फोन करून तुमच्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवत असेल तर हे तुमच्या नात्यासाठी योग्य नाही. हे त्यांचे तुमच्यावर नियंत्रण ठेवण्याचे लक्षण आहे.

परस्पर आदर

तुमची आर्थिक स्थिती, शिक्षण, गुण किंवा नोकरी यामुळे तुमचा भावी जोडीदार तुमच्या मित्रांसमोर आणि ओळखीच्या लोकांसमोर तुमच्याकडे तुच्छतेने पाहत असेल तर याचा अर्थ असा होतो की तो तुमचा आदर करत नाही आणि भविष्यात तो वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करेल.

वैवाहिक जीवनात दोन भिन्न स्वभावाची माणसे एकत्र येतात, अशावेळी दोन्ही बाजूंनी सहकार्य आणि एकमेकांचा आदर हा सुखी वैवाहिक जीवनाचा मूळ मंत्र असतो, परंतु अनेक वेळा एका जोडीदाराचा स्वभाव दुसऱ्यावर नियंत्रण ठेवण्याचा असतो, जे नात्यासाठी अजिबात योग्य नाही. नात्यातील जोडीदारांपैकी एकाला दुस-याला दडपून टाकायचे असेल, तर नाते जास्त काळ टिकणे कठीण होऊन जाते किंवा नात्यात गुदमरून राहावे लागते. जर तुमच्यापैकी एकाचा स्वभाव नियंत्रित असेल तर समजून घ्या की समोरची व्यक्ती तुम्हाला त्याच्या नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि भविष्यातही असेच करेल.

जर तुम्हाला लग्नानंतर तुमच्या जोडीदारासोबत शांततेने राहायचे असेल, तर लग्न करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जोडीदाराशी काही मुद्द्यांवर चर्चा केली पाहिजे.

एकमेकांची करिअरची उद्दिष्टे जाणून घ्या

तुमच्या करिअरच्या बाबतीत तुमचा पार्टनर किती सपोर्टिव्ह आहे हे जाणून घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कारण जर तुमचे करिअर त्याच्यासाठी महत्त्वाचे नसेल तर भविष्यात तो तुमच्यावर वर्चस्व गाजवेल आणि तुम्हाला तुमच्या करिअरसाठी तडजोड करावी लागू शकते.

तुम्ही एकटे राहाल की कुटुंबासह?

लग्नाआधी केवळ तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबाविषयीच नाही तर तुमच्या जोडीदाराच्या त्यांच्याशी असलेल्या बॉन्डिंगबद्दलही जाणून घेणं खूप गरजेचं आहे. लग्नानंतर तुमच्या जोडीदाराला त्याच्या कुटुंबासोबत राहायचे आहे की त्याला नवीन घरात जायचे आहे? लग्नापूर्वी अशा प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे अन्यथा भविष्यात दोघांमध्ये तेढ निर्माण होऊ शकते.

कुटुंब नियोजनाबाबतही स्पष्ट व्हा

जर लग्नानंतर जोडीदारांपैकी एकाला पालक बनायचे नसेल तर आधीच चर्चा करा कारण लग्नानंतर या मुद्द्यावर समजूतदारपणा नसल्यामुळे दोघांमध्ये मतभेद होऊ शकतात. त्यामुळे लग्नाआधी तुम्ही दोघांनी या विषयावर चर्चा केलेली बरी.

एकंदरीत, लग्नानंतर सर्व काही नवीन आहे, त्यामुळे लग्न करण्यापूर्वी, तुम्हाला हे नीट समजून घ्यावे लागेल की तुम्ही स्वतःच्या इच्छेचे मालक होऊ शकत नाही किंवा जोडीदारावर तुमची इच्छा लादू शकत नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें