उन्हाळ्यात सुंदर त्वचेची राणी व्हा

* गृहशोभिका टीम

उन्हाळ्याच्या हंगामात चेहऱ्यावर घाम येणे, त्वचा निस्तेज होणे, त्वचा टॅन होणे, उष्णतेवर पुरळ उठणे अशा अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत त्वचेची नियमित काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अनेकवेळा सकाळी आरशासमोर उभं राहिल्यावर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमच्या त्वचेकडे जास्त लक्ष दिलेलं नाही आणि त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, ब्लॅकहेड्स, टॅनिंग इत्यादी दिसू लागतात.

डॉ. अपर्णा संथानम, त्वचा तज्ज्ञ, ITC चार्मिस म्हणतात, “त्वचा हा आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे ज्याला वर्षभर उन्हाळा, पावसाळा आणि थंडी सहन करावी लागते. अशा स्थितीत त्वचेची योग्य काळजी घेणे, संतुलित आहार घेणे, व्यायाम करणे इ. हे काम अवघड नाही. त्यासाठी आधी योग्य नियोजन करावे लागते, त्यात त्वचेनुसार ब्रँडेड उत्पादन निवडणे, त्याचा त्वचेवर होणारा परिणाम पाहणे आणि बजेटची काळजी घेणे आवश्यक असते. काही टिपा तुम्ही फॉलो करू शकता :

संघटित रहा

तुमच्या त्वचेच्या सर्व समस्यांची यादी तयार करा. उदाहरणार्थ, रंगद्रव्य, गडद डाग, पुरळ, त्वचेचा प्रकार इ. यानंतर त्याची त्वचा समजून घेणे आवश्यक आहे जेणेकरून उत्पादनाचा वापर त्यानुसार करता येईल. व्हिटॅमिन सी असलेले उत्पादन निवडणे अधिक सुरक्षित आहे. ही उत्पादने डाग आणि कोरडेपणा दूर करून त्वचेला एकसमान टोन बनवतात. तसेच, ते निस्तेज त्वचेला नवीन चमक देतात.

त्वचेच्या गरजा समजून घ्या

त्वचेचा प्रकार जाणून घेतल्यानंतर, आपण सहजपणे योग्य उत्पादन खरेदी करू शकता. ही एक सोपी पद्धत आहे जी तुम्ही घरी बसून करू शकता. सकाळी उठल्यानंतर, आपल्या त्वचेला स्पर्श केल्यानंतर कसे वाटते ते ओळखा. या हंगामात हलके हायड्रेटेड उत्पादने, जे चिकट नसतात, निवडले जाऊ शकतात. यामध्ये सीरम हा उत्तम पर्याय आहे. ज्यांना मुरुमांची समस्या आहे त्यांनी सॅलिसिलिक ऍसिड असलेली उत्पादने निवडावी. हायड्रॉलिक अॅसिड असलेली उत्पादने कोरड्या त्वचेसाठी फायदेशीर असतात.

बहुउद्देशीय उत्पादन निवडा

काही उत्पादने फक्त एकच उद्देश देतात, तर त्वचेची काळजी घेणारी उत्पादने अष्टपैलू असावीत. उदाहरणार्थ, मॉइश्चरायझरऐवजी सीरम खरेदी करा. सीरम हे एक अष्टपैलू उत्पादन आहे जे त्वचेला हायड्रेट आणि टवटवीत करते तसेच ते मऊ बनवते. सीरममध्ये असलेले लहान रेणू त्वचेमध्ये खोलवर प्रवेश करतात जेथे चेहर्यावरील क्रीम किंवा मॉइश्चरायझर पोहोचू शकत नाही.

बजेटची काळजी घ्या

त्वचेसाठी कोणतेही उत्पादन खरेदी करण्यासाठी जाताना नेहमी तुमचे बजेट लक्षात ठेवा. तुमच्या त्वचेनुसार चांगले उत्पादन कमी किमतीत खरेदी करा. यासाठी तुम्ही ऑनलाइन सर्च करूनदेखील शोधू शकता. प्रीमियम आणि प्रभावी त्वचेची काळजी घेणारी क्रीम या हंगामात खरेदी करणे आवश्यक आहे.

सकारात्मक विचार ठेवा

तुम्ही निवांत आणि आनंदी असता तेव्हाच त्वचेला चांगले पोषण मिळते. त्वचेचे बाह्य सौंदर्य आतून येते. म्हणूनच नेहमी सकारात्मक विचार ठेवा आणि संतुलित आहार घ्या, ज्यामध्ये हंगामी फळे आणि भाज्या विशेष आहेत. उष्णतेमध्ये अधिकाधिक पाणी किंवा द्रवपदार्थाचे सेवन करणे आवश्यक आहे कारण उष्णतेमध्ये घाम आल्याने शरीरातील पाणी बाहेर पडते, एअर कंडिशनरमध्ये जास्त वेळ राहिल्यास थंड हवा शरीरातील आर्द्रता शोषून घेते. त्वरीत, ज्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ लागते आणि त्वचेवर लवकर सुरकुत्या दिसू लागतात.

घरगुती उपाय

उन्हाळ्यात त्वचेची काळजी इतर ऋतूपेक्षा जास्त करावी लागते. म्हणूनच काही घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत –

असे दिसून आले आहे की आपण उन्हाळ्यात जे फळे किंवा भाज्या खातात ते आपल्या चेहऱ्यासाठी सर्वोत्तम असतात. उदाहरणार्थ, पिकलेल्या पपईचा एक पॅक, त्यात अर्धा कप पपईचा लगदा, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा मध आणि एक चमचा मुलतानी माती पावडर मिसळा आणि 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा, नंतर धुवा.

उन्हाळ्यात टोमॅटोचा पॅक लावणेदेखील खूप चांगले आहे. टोमॅटोमध्ये फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन सी असल्यामुळे त्वचा सुधारण्यासोबतच मुरुम, डाग, सुरकुत्या इत्यादीही कमी होतात. या पॅकसाठी २ चमचे टोमॅटोचा लगदा, २ चमचे दही आणि २ चमचे लिंबाचा रस मिसळून पेस्ट बनवा. 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवा. चेहऱ्याचा रंग फुलतो.

समर-स्पेशल : उन्हाळ्यातही गरजेचे आहे मॉइश्चरायझर

* मोनिका गुप्ता

बदलत्या मोसमनुसार त्वचेवरही अनेक बदल पहायला मिळतात. त्वचेत होणाऱ्या बदलांना पाहून आपण कॉस्मेटिकची निवड करतो. जसे की हिवाळयात मॉइश्चरायझरचा वापर भरपूर केला जातो. मात्र उन्हाळा येताच त्याचा वापर कमी होतो. उन्हाळयात त्वचा चिपचिपित होण्याच्या भीतीने बहुतेक महिला मॉइश्चरायझरचा वापर बंद करतात. पण खरोखरच उन्हाळयात मॉइश्चरायझरचा वापर बंद करायला हवा का? नाही, मुळीच नाही. उन्हाळा असो किंवा हिवाळा याचा वापर त्वचेसाठी खूपच गरजेचा आहे.

चला, जाणून घेऊया, उन्हाळयात मॉइश्चरायझरचा वापर गरजेचा का आहे :

तज्ज्ञांच्या मते, ‘‘बहुसंख्य महिलांना असे वाटते की, उन्हाळयात मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिपचिपित होते. त्यामुळेच उन्हाळयात याचा वापर त्या टाळतात. प्रत्यक्षात तापमान वाढल्यानंतर मॉइश्चरायझर त्वचेसाठी आणखी गरजेचे होते. विशेष करुन त्यांच्यासाठी ज्या एसीत खूप वेळ असतात.’’

त्वचा रुक्ष असल्यास

उन्हाळा सुरू होताच त्वचेवर उन्हाचा परिणाम दिसू लागतो. हा मोसम स्वत:सोबत स्विमिंग आणि वॉटर स्पोर्ट्ससारखी मौजमजाही घेऊन येतो. रखरखीत ऊन, स्विमिंग पूलमधील पाण्यात असलेल्या क्लोरीनसारख्या घटकांच्या संपर्कात आल्यामुळे त्वचा खराब होऊ लागते. विशेष करून तेव्हा ज्यावेळी तिची योग्य काळजी घेतली जात नाही. योग्य काळजी घेतल्यास त्वचेला हानिकारक गोष्टींपासून वाचवता येईल.

जेव्हा प्रखर उन्हाचा होतो कहर

उन्हाळयातील प्रखर ऊनाचे चटके त्वचेला जाळत असतात. यामुळे सनबर्न, टॅनिंगसारखे स्किन प्रॉब्लेम होतात. अशा वेळी सनस्क्रीनचा वापर त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतो. पण त्वचेच्या देखभालीसाठी एवढेच पुरेसे नाही. सनस्क्रीननंतर त्वचेला चांगल्या प्रकारे मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा मुलायम होते. उन्हाळयात तुम्ही मॉइश्चरायझर बेस्ड सनस्क्रीनचाही वापर करू शकता.

केमिकलपासून वाचण्यासाठी

उन्हाळा सुरू होताच आपण खूप सारे बेत आखतो. जसे की, कधीतरी वॉटरपार्कला फिरायला जायचे, पूल पार्टी करायची किंवा मुलांसोबत स्विमिंग क्लास करायचा. पण आपण हे विसरतो की स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन नावाचे केमिकल मिसळले जाते, जे त्वचेसाठी हानिकारक असते. तुम्ही जर स्विमिंग पूलमध्ये जास्त वेळ घालवला असाल तर आपले शरीर चांगल्या प्रकारे स्वच्छ करा. त्वचा स्वच्छ केल्यानंतर मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. ते त्वचेच्या खोलवर जाऊन तिला पोषण देते. ते त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवते.

उन्हाळयात रुक्ष त्वचा

बहुतांश महिलांना असे वाटते की, उन्हाळयात त्वचा कोरडी होत नाही. पण हा त्यांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात उन्हाळयात त्यांचा वेळ जास्त करुन ऊन, स्विमिंग पूल, एअर कंडीशनिंगमध्ये जातो. काही जणी अशा ब्युटी प्रोडक्ट्सचा उपयोग करतात ज्यात क्लोरीनची मात्रा जास्त असते. त्यामुळे त्यांची त्वचा शुष्क आणि निर्जीव दिसू लागते. हे टाळण्यासाठी त्वचेला सौम्य आणि मुलायम बनवणारे प्रोडक्ट वापरायला हवेत. जसे की दररोज मॉइश्चरायझरचा वापर त्वचेसाठी उपयोगी ठरतो. यात त्वचा मुलायम होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुणधर्म असतात, जे त्वचेला रुक्ष, कोरडी होण्यापासून वाचवतात आणि तिला उजळ बनवतात. त्वचा विशेषज्ज्ञही मॉइश्चरायझर वापण्याचा सल्ला देतात, कारण हे त्वचेवर सुरक्षा कवच तयार करुन तिला किटाणू आणि अन्य हानिकारक गोष्टींपासून वाचवते.

जेव्हा असेल ओपन पोर्सची समस्या

चांगल्या, सुदृढ त्वचेसाठी क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग खूपच गरजेचे असते. महिलांना असे वाटत असते की, उन्हाळयात घामामुळे त्यांची त्वचा ओलसरच राहणार. पण घामामुळे त्वचेतील छिद्र उघडतात. त्यांना पुन्हा बंद करण्यासाठी टोनर वापरणे गरजेचे असते आणि टोनरनंतर मॉइश्चरायझर वापरल्यामुळे त्वचा खुलते.

जेव्हा त्वचेतून येईल जास्त घाम

उन्हाळयाच्या मोसमात त्वचा तेलकट होऊ शकते, पण याचा असा अर्थ होत नाही की त्वचेला मॉइश्चरायझरची गरज नसते. प्रत्यक्षात उन्हाळयाच्या मोसमात जास्त घाम येत असल्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते. उकाडा आणि उन्हामुळे त्वचेतील पाणी निघून जाते. अशावेळी त्वचेला हायड्रेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आणि पाण्याच्या जास्त प्रमाणात जेवण जेवणे एवढयावरच अवलंबून राहू नका. उलट योग्य मॉइश्चरायझरचा उपयोग करायला हवा, जो त्वचेतील मॉइश्चरचे प्रमाण कायम ठेवेल.

मॉइश्चरायरचा वापर कसा करावा?

उन्हाळयात मॉइश्चरायझरचा वापर कधी करावा हे माहिती करुन घेणेही गरजेचे आहे :

* अंघोळीनंतर मॉइश्चरायझरचा वापर नक्की करा. तो बॉडी हायड्रेड करतो व त्वचेतील ओलावा कायम ठेवतो. खूप घाम येत असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर आणि टोनरचाही वापर करू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें