‘‘महिलांनी नेहमीच विचारांवर ठाम राहावे’’ – अश्विनी कासार

* सोमा घोष द्य

सावळया रंगाची, रेखीव आणि कमनीय बांध्याची ३१ वर्षीय मराठी अभिनेत्री अश्विनी कासार मुंबईची आहे. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. वकिलीची इंटर्नशिप करत असताना तिला अभिनयाची संधी मिळाली आणि पहिल्याच प्रयत्नात तिची निवड झाली. तिच्या आईवडिलांनी तिला नेहमीच करिअर निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यांचा तिला नेहमीच पाठिंबा मिळाला. अश्विनीने २०१४ मध्ये अभिनयाला सुरुवात केली. तिची पहिली मराठी मालिका ‘कमला’ होती, ज्यामध्ये तिने कमलाची मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली आणि तिने अनेक पुरस्कारही मिळवले. त्यांनतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केले. अश्विनी ‘गृहशोभिका’ वाचते आणि यात प्रसिद्ध झालेले लेख तसेच कथा तिला मोठया प्रमाणावर प्रेरित करतात.

महाविद्यालयीन शिक्षण सुरू असल्यापासूनच अश्विनी सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रिय होती, तिने अनेक नाटकांमध्येही काम केले आहे. अभिनयाव्यतिरिक्त ती भरतनाट्यम् नृत्यांगनाही आहे. सोनी टीव्ही मराठीवरील ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेत ती एका आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, जी तिला तिच्या प्रत्यक्ष आयुष्याशी खूपच मिळतीजुळती वाटते. चला, तिच्या या प्रवासाबद्दल तिच्याकडूनच जाणून घेऊया.

या मालिकेत तुझी भूमिका काय आहे? ही मालिका तुझ्या वास्तविक आयुष्याशी किती मिळतीजुळती आहे?

मी अनुजा हवालदारच्या भूमिकेशी शारीरिक बनावटीच्या रूपात खूपच मिळतीजुळती आहे. जेव्हा मी कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला पाहाते तेव्हा त्यांच्यामध्ये मानसिक आणि शारीरिकदृष्टया सुदृढ राहाण्यासोबतच एक ठराविक ध्येय असल्याचेही पाहाते. त्यांचे ध्येय त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. ते नेहमीच काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांच्या सुदृढ शरीरातून त्यांची चपळता झळकते. मला वाचायला आणि लोकांसाठी काहीतरी करायला आवडते. याशिवाय, मी फिटनेस प्रेमी आहे आणि नेहमीच स्वत:ला सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करते. दररोज व्यायामासाठी वेळ काढते, कारण दैनंदिन जीवनात व्यायाम गरजेचा असतो. माझी प्रशिक्षक सिद्धी ढगे नसेल तर मी धावायला किंवा चालायला जाते.

तुला अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

कुटुंबातील कोणीही अभिनय क्षेत्रातले नाही, मी वकील आहे आणि ६ महिन्यांपासून प्रॅक्टिस करत होते. तेव्हा मला वाटले की, मी या क्षेत्रासाठी बनलेले नाही, कारण मी महाविद्यालयात असताना नृत्य आणि नाटक करायचे. मी भरतनाट्यम नृत्यांगनाही आहे. माझी एकंदरीत आवड अभिनयात होती, माझे करिअर काय असेल हे मला माहीत नव्हते. याबद्दल मी माझ्या आईवडिलांशी बोलले, त्यांनी खूपच पाठिंबा दिला. मी माझ्या आवडत्या क्षेत्रात करिअर करावे, असा सल्ला दिला. मी पुन्हा पुन्हा ऑडिशनला जाऊनही मला काम मिळत नव्हते आणि तरीही त्यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्याकडून आणि शिक्षणातून मला नेहमीच सकारात्मक ऊर्जा मिळाली.

तुला कुटुंबाचे सहकार्य कसे मिळाले?

माझे कुटुंब उच्च शिक्षित आहे, मी १५ सदस्यांसह एकत्र कुटुंबात राहाते. माझे आईवडील तसेच कुटुंबातील इतर मला नेहमीच पाठिंबा देतात. मला कधी, कोणीही रोखले नाही. माझ्या मते कुटुंबाचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो, कारण यश मिळाले, पण कुटुंब नाराज असेल तर त्या यशाला अर्थ उरत नाही. हे क्षेत्र अतिशय अनिश्चित असल्याने ते माझ्यासाठी थोडे चिंतेत असायचे. माझे वडील डॉ. उल्हास कासार शास्त्रज्ञ होते. आईचे नाव सीमा कासार असून बहीण डॉ. शरयू कासार शास्त्रज्ञ तर भाऊ मानस कासार दंतवैद्य आहे.

तुला पहिला ब्रेक कसा आणि कधी मिळाला?

मी उच्च न्यायालयात एका खटल्यासाठी काम करत होते. त्याचवेळी मला ‘कमला’ या मालिकेसाठी एका प्रॉडक्शन हाऊसमधून फोन आला. मी मुख्य भूमिकेत होते. ही मालिका विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध नाटकावर आधारित होती. फेसबुकवर माझा फोटो पाहिल्यानंतर मला ऑडिशनसाठी बोलावण्यात आले होते, पण तेव्हा मी माझ्या वकिलीच्या कामात व्यस्त होते आणि मला ऑडिशनला जायची इच्छा नव्हती. त्यांनी मला दुसऱ्यांदा  बोलावल्यावर मी गेले आणि माझी निवडही झाली. अनेकदा ऑडिशन दिल्यानंतर मला काम मिळाले. या क्षेत्रातील घराणेशाही मला कधीच समजली नाही आणि मी मराठी इंडस्ट्रीत माझ्यासमोर ती कधी पाहिलीही नाही, कारण मी नेहमीच स्वत:साठी स्वत: संघर्ष केला आहे.

तू संघर्ष किती केला?

मी माझ्या कुटुंबासह महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये राहाते आणि तेथूनच मला कामासाठी दूरवरचा प्रवास करावा लागतो. केवळ एक मालिका मिळून फारसा फरक पडणार नव्हता, कारण मला सिद्ध करून दाखवायचे होते की, मी एक चांगली अभिनेत्री आहे आणि त्यासाठी मला आणखी कामाची गरज होती. खरंतर कोणत्याही कलाकारासाठी वेगवेगळया भूमिका साकारण्यासाठीचा संघर्ष मोठा असतो. मी पहिल्या मालिकेत ‘कमला’ या आदिवासी मुलीची भूमिका साकारली. एका सत्य घटनेवर आधारित ही मालिका होती. अशा प्रकारे पहिल्या मालिकेत मी एक अशिक्षित मुलगी दुसऱ्यामध्ये शिक्षण घेतलेली पहिली मुलगी आणि आता आयपीएस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. पहिली मालिका ‘कमला’मधूनच मला ओळख मिळाली.

तुला हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची इच्छा आहे का?

मला हिंदी चित्रपटसृष्टीत काम करायचे आहे आणि ऑडिशनही द्यायचे आहे. हिंदी चित्रपटांमध्ये अंतर्गत दृश्यांची मागणी असेल तर त्यासाठी माझी काहीच हरकत नाही.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

औचित्य पाहून मी फॅशन करते. याशिवाय मी काहीही छान घालू शकते. मी खवय्यी आहे आणि माझी आई खूप छान स्वयंपाक करते. मी साधे जेवण बनवू शकते.

उन्हाळयात तुझ्या त्वचेची काळजी तू कशी घेतेस?

मी बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लोशन लावते. केसांच्या संरक्षणासाठी स्कार्फ घालते, त्यामुळे उन्हाळयात केसांचे उन्हापासून संरक्षण होते. उन्हाळयात हायड्रेट राहाणे आवश्यक असते, त्यासाठी मी लिंबू पाणी, कोकम सरबत इ. पीत राहाते.

सत्ता हाती आल्यास तू काय बदलू इच्छितेस?

मला सर्वांची विचारसरणी बदलायची आहे. होय, कारण ती कुटुंब, समाज आणि देश बदलू शकते आणि त्यामुळेच देश पुढे जातो.

तुला काही संदेश द्यायचा आहे का?

माझा संदेश असा आहे की, महिलांनी नेहमी त्यांच्या विचारांवर ठाम राहावे. जे काही काम त्यांना स्वत:साठी करायचे असेल ते त्यांनी करावे आणि त्यातूनच पुढे जावे.

आवडता रंग – जांभळा.

आवडता पोशाख – साडी.

आवडते पुस्तक – मृत्युंजय.

आवडता परफ्युम – वर्सासे.

आवडते पर्यटनस्थळ – जपान, केरळ.

वेळ मिळाल्यास – झोप, खाणे, वाचन.

जीवनातील आदर्श – स्वत:शी प्रामाणिक राहाणे.

सामाजिक कार्य – अनाथ मुलींसाठी काहीतरी करायचंय.

स्वप्नातील राजकुमार – वाचन, फिरण्याची आवड आणि महिलांचा आदर करणारा.

जीवन जगण्याचा मंत्र – काम करा आणि समाधानी राहा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें