गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

मी ३० वर्षीय विवाहिता आहे. लग्नाला ६ वर्षे झाली आहेत. माझं माहेर आणि सासर कानपूरला जवळ-जवळच आहे. मी पती आणि एक वर्षाच्या मुलासोबत दिल्लीत राहते. जेव्हा मी १०-१५ दिवसांसाठी जाते, तेव्हा सासूची अशी इच्छा असते की मी माझा संपूर्ण वेळ त्यांच्यासोबतच घालवावा. माहेरी २-३ दिवस राहण्यावरही त्यांचा आक्षेप असतो. त्यांचं म्हणणं असतं की माहेर जवळच आहे ना मग तिथे राहायला जाण्यात काय अर्थ आहे. फक्त भेटून ये. पण इच्छा असूनही मला असं करता येत नाही. आई आणि भावंडांसोबत २-४ दिवस राहिल्याशिवाय समाधान होत नाही. माझे पती स्वत:च्या आईला काही बोलत नाहीत आणि मलाही.

पुढच्या महिन्यात माझ्या पुतणीचं लग्न आहे. लग्नाचं निमंत्रण आल्यापासून मी उत्साहात आहे की त्यानिमित्ताने नातेवाईकांची भेट होईल. पण मी तिथे जाऊन राहिल्याने परत सासू आकांडतांडव करेल याची भीती वाटते. सगळी मजाच निघून जाईल.

दादा-वहिनी आतापासूनच आग्रह करत आहेत की मी सर्वात पहिलं पोहोचलं पाहिजे. लग्नाची खरेदी माझ्यासोबतच करणार. इतक्या आग्रहाने बोलवत असल्यामुळे त्यांना नाही म्हणता येत नाही आहे आणि जास्त दिवसांसाठी गेले तर सासू वाद घालेल. काय करू कळत नाहीये. कृपया मार्गदर्शन करा.   

तुमचं माहेर आणि सासर जरी एका शहरात असलं तरी तुम्ही स्वत: दिल्लीला  राहता. त्यामुळे माहेरच्यांशीही कधीतरीच भेटणं होत असेल. अशावेळी तुम्ही २-४ दिवस माहेरी जाऊन राहात असाल तर तुमच्या सासूला हरकत असण्याचं कारण नाही. तुम्ही पूर्णवेळ सासरी घालवल्यानंतर माहेरून मात्र एका दिवसात परत ये हे सासूने सांगणं चुकीचं आहे.

तुमच्या सासूचा हा हट्ट तालिबानी आहे. तुमचे पती तुम्हा दोघींच्या वादात पडत नाहीत, तटस्थ राहतात. हे काही प्रमाणात योग्यही आहे. तुम्ही तुमच्या सासूला प्रेमाने समजावू शकता की तुमचं माहेर जवळच असलं तरीही तुम्ही दिल्लीला राहात असल्याने तिथे कधीतरीच जाणं होतं. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवावासा वाटतो.

तुमच्या दादा-वहिनीची त्यांच्या मुलीच्या लग्नाबाबत जी अपेक्षा आहे, त्यात तुम्ही त्यांना निराश करणं योग्य नाही. पती तुमच्यासोबत जास्त वेळ राहू शकत नसले तरीही तुम्ही तिथे जाऊन सहकार्य केलं पाहिजे.

माहेरासाठी इतकं करणं हे तुमच्या सासूला खटकू शकतं, त्या रागावू शकतात, आकांडतांडव करतील, पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. एकदा लग्न पार पडलं की तुम्ही त्यांना समजवू शकता. सासू-सुनांमध्ये अशाप्रकारचे वाद होतच असतात. शेवटी घरोघरी मातीच्या चुली.

मी २८ वर्षीय विवाहिता आहे. लग्नाला ९ वर्षे झाली आहेत. माझं वैवाहिक जीवन सुखी आहे. फक्त एकच त्रास आहे तो म्हणजे माझे पती खूप उधळपट्टी करतात. जराही पैसे वाचवत नाहीत. मी कित्तीतरी वेळा समजावण्याचा प्रयत्न केला आहे की आपण आपल्या मुलांसाठी पैसे वाचवले पाहिजेत. पण त्यांच्या कानात हवा जात नाही.

आज आमचा पगार चांगला आहे. पण उद्या मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या गरजा वाढतील. त्या आम्ही कशा पूर्ण करणार आहोत. याचाच विचार करून मी माहेरी गुपचूप एक खातं उघडलं आहे. त्यात थोडे-थोडे पैसे जमा करत असते.

अशाप्रकारे मी आतापर्यंत ९ लाख जमा केले आहेत. मुलांसाठी पैसे जमवण्याचं समाधान आहे. पण दुसऱ्या बाजूला ही भीतिही आहे की पतीपासून लपवून पैसे साठवण्यात मी काही चूक तर  करत नाहीये ना. त्यांना कळलं तर किती वाईट वाटेल.

माझे पती खूपच साधे आणि चांगले आहेत. त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ते माझ्यापासून काहीही लपवत नाहीत. मग मी त्यांच्यापासून ही गोष्ट लपवून त्यांचा विश्वासघात तर करत नाहीये ना. कृपया मला या अपराधीपणाच्या भावनेतून सोडवा.

तुमचा विचार अगदी योग्य आहे की उत्पन्न कितीही असलं तरीही भविष्यासाठी थोडीफार तरतूद केली पाहिजे. मुलांसाठी किंवा स्वत:साठीही काहीवेळा असा खर्च करावा लागतो ज्याचा विचार आपण आधी केलेला नसतो. अशा गरजा पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी केलेली बचत कामी येते. कदाचित तुमचे पती हे आज समजू शकत नाहीयेत. म्हणून तुमचं सांगणं मनावर घेत नाही आहेत. पण वेळेनुसार अनुभवाने त्यांना समज येत जाईल.

तुम्ही त्यांना न सांगता उघडलेल्या खात्याचाच प्रश्न असेल तर त्यात काहीही चुकीचं नाही. कारण तुम्ही चांगल्या उद्देशानेच हे पाऊल उचलत आहात. त्यामुळे तुम्ही अपराधीपणाची भावना बाळगू नका. पण तरीही त्यांचा मूड बघून तुम्ही त्यांना ही गोष्ट सांगू शकता. हे ऐकून त्यांना आनंदच होईल आणि तुम्ही त्यांना विश्वासात घेतलं नाही याचं दडपण तुमच्यावर राहणार नाही.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी २६ वर्षांची विवाहित महिला आहे. गेल्या वर्षीच लग्न झाले होते. लग्नानंतर लवकरच मी गरोदर राहिले. पण मला लवकर आई व्हायचं नव्हतं, म्हणून मी गर्भपात करून घेतला. आता मला भीती वाटते की मी भविष्यात गर्भधारणा करू शकेन की नाही. कृपया मला काय करावे ते सांगा?

डॉक्टरांच्या देखरेखीखाली केला गेलेला गर्भपात सामान्यत: सुरक्षित असतो आणि भविष्यात कोणतीही समस्या उद्भवत नाही. होय, काही प्रकरणांमध्ये, काही कारणास्तव गर्भपात चुकीच्या पद्धतीने केला गेला असेल आणि जर त्यास संसर्ग झाला असेल तर ही अडचणीची बाब असू शकते.

जर आपल्याला या नंतर कोणताही संसर्ग झाला नसेल किंवा कोणतीही समस्या येत नसेल तर आपण निश्चितपणे पुन्हा गर्भधारणा करू शकता. आपण मात्र महिला डॉक्टरांकडून आपले चेकअप केले तर बरे. मग गर्भधारणेचा विचार करा. कधीकधी गर्भपात करणेदेखील चुकीचे नसते परंतु जर आपण ते रुग्णालयातच केले असेल तर.

  • मी २३ वर्षांचा अविवाहित तरुण आहे. कंडोम न घालता मी २-३ महिलांशी शारीरिक संबंध बनवले आहेत. मला आता काही दिवसांपासून एक समस्या येत आहे. लैंगिक संबंधानंतर माझा खाजगी भाग जळ-जळ होण्यास सुरुवात होते. आतील त्वचा लाल होते आणि कधीकधी खाजही येते. मला सांगा मी काय करू?

आजच्या जीवनशैलीत सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे फार महत्वाचे आहे आणि कंडोम हा एक सोपा आणि स्वस्त पर्याय आहे. कंडोमसह सेक्स केल्याने संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. जसे आपण नमूद केले आहे की आपले २-३ स्त्रियांशी संबंध झाले होते, तर हे स्पष्ट आहे की यामुळे आपल्याला प्रोस्टेटिक संक्रमण किंवा एखाद्या प्रकारचे बुरशीजन्य संसर्ग झाला असेल.

आपल्याला लवकरच यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्यायला हवा आणि नक्कीच, भविष्यात सेक्स करताना कंडोम वापरण्यास विसरू नका. कंडोम हा केवळ संक्रमणापासून संरक्षण करण्यासाठीच नव्हे तर गर्भनिरोधकासाठीदेखील चांगला पर्याय आहे.

  • मी २६ वर्षांची अविवाहित मुलगी आहे. मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करते. कार्यालयाचे वातावरण ठीक आहे परंतु मी माझ्या एका सहकर्मीमुळे चिंतीत आहे. खरंतर तो मला व्हाट्सएपवर रात्रंदिवस संदेश पाठवत राहतो. तो रिप्लाय देत जा असे म्हणतो पण मला ह्याचा वैताग येतो. एकतर वेळेचा अभाव आणि दुसरे म्हणजे कामाचा ताण. त्याचे संदेश मर्यादेबाहेर नसले तरी वारंवार संदेशांमुळे मी अस्वस्थ होते. माझे लक्षदेखील कामात लागत नाही. त्या सहकाऱ्याशी माझ्या अधिकृत वर्तनावर ग्रहण लागावे अशी माझी इच्छा नाही, परंतु त्याने मला या प्रकारे त्रास द्यावा अशीसुद्धा माझी इच्छा नाही. मला सांगा मी काय करू?

आपल्याला जर त्या सहकाऱ्याने केलेले व्हाट्सएप संदेश आवडत नसतील तर आपण त्याला स्पष्टपणे नकार द्या. आपण असे म्हणू शकता की जर संदेश कामाशी संबंधित असेल तर ते ठीक आहे अन्यथा फालतू व्हाट्सएप करू नका. ऑफिसच्या वेळी व्हॉट्सअॅपवर वेळ घालवून त्याची प्रतिमा चुकीची होऊ शकते असेही आपण त्याला सांगू शकता आणि ही गोष्ट साहेबांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्या प्रगतीवर ग्रहण लागेल असेही आपण त्याला सांगू शकता.

तसे, त्याने पाठविलेल्या व्हॉट्सअॅप संदेशाकडे जर तुम्ही सतत दुर्लक्ष कराल आणि उत्तर देण्याचे टाळाल तर काही दिवसांनी तो स्वत: व्हाट्सएप करणे थांबवेल. यामुळे सापही मरेल व काठीही तुटणार नाही.

  • मी २१ वर्षांची अविवाहित तरुणी आहे. आम्ही घरात २ भावंडे आहोत. भावाच्या लग्नाला ३ वर्ष झाली आहेत. मला अजून पुढे शिकायचं आहे आणि माझ्या पालकांना याबद्दल काहीच हरकत नाही. समस्या भावजयीविषयी आहे, जी नेहमी सर्वांसमोर माझा अपमान करण्याचा प्रयत्न करीत असते. कधी-कधी तर मला खूप रडायला येतं. मला सांगा मी काय करू?

घरातल्या प्रत्येक सदस्याचे समान विचार किंवा कल्पना असणे शक्य नाही. जर आपल्या वहिनीचा स्वभावच असा असेल, तर मग तिच्याबद्दल काळजी करण्याची काय गरज आहे? आपल्याला अजून पुढचं शिक्षण घ्यायचे आहे, जर आपणास आपले भविष्य चांगले बनवायचे असेल तर उगीच दुसऱ्याच्या गोष्टींकडे लक्ष देण्यात काय उपयोग?

येथून पुढे जेव्हा-जेव्हा ती तुम्हाला अपमानित करण्याचा प्रयत्न करेल किंवा प्रत्येक गोष्टीत टोकेल तेव्हा तुम्ही तिला म्हणू शकता की वहिनी, मी तुमचा खूप आदर करते, माझ्या मनात तुमच्याबद्दल खूप सन्मान आहे. मला तुमच्याकडूनही आदर मिळेल अशी आशा आहे.

अभ्यासामधून थोडा वेळ काढून घरगुती कामात तिला मदत करण्याचा प्रयत्न करा. वहिनीबरोबर खरेदी करायला जा, तिच्यासाठी भेट म्हणून कधीतरी काही आणा. लवकरच आपण दोघीही चांगल्या मैत्रिणी व्हाल. वहिनीसोबत जुळवून ठेवणे म्हणजे आयुष्यभराची एक फिक्स्ड डिपॉजिट आहे. छोटया कुटुंबात आईनंतर वहिनीच एकटी अशी असते, जिच्याशी आपण लग्नानंतरही सर्व काही सामायिक करू शकतो. कोणत्याही परिस्थितीत वहिनीशी भांडण करू नका.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

  • मी २९ वर्षांची असून एका मुलीची आई आहे. आम्हाला आणखी २-३ वर्षं दुसरे मूल नको आहे. मी कॉपर टीबद्दल ऐकले आहे. माझ्या वहिनीने सांगितले की, ती लावल्यानंतर वां होण्याची भीती असते आणि सेक्सुअल लाईफवरही विपरित परिणाम होतो. हे खरे आहे का? कॉपर टी किती सुरक्षित आहे?

कॉपर टी इंग्रजी अक्षर टी या आकाराचे डिव्हाइस आहे. यात पुढच्या बाजूने धागा निघालेला असतो, जो अगदी सहजपणे व्हर्जायनामध्ये इंसर्ट केला जातो. कॉपर टी ६-७ वर्षांपर्यंत काम करू शकते. गर्भधारणा टाळण्यासाठी हा सोपा व उत्तम पर्याय आहे.

यामुळे वांझपण येत नाही आणि सेक्सुअल लाईफवरही विपरित परिणाम होत नाही. हे एक चांगले गर्भनिरोधक आहे पण, बहुसंख्य महिलांना याबाबत जास्त माहिती नसते आणि त्या ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवतात.

आशियात केवळ २७ टक्केच महिलाच आययूडी गर्भनिरोधक वापरतात. यावरून हे स्पष्ट होते की, जनजागृतीचा अभाव हे यामागचे कारण आहे. प्रत्यक्षात हे लावणे अतिशय सोपे आहे आणि जेव्हा गर्भधारणेची इच्छा होईल तेव्हा महिला ती सहजपणे काढूनही टाकू शकतात.

कॉपर टी लावणे व काढण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरकडेच जावे. बाजारात सहजपणे उपलब्ध असलेल्या कॉपर टीमुळे मासिक च्रकावर कोणताच दुष्परिणाम होत नाही.

  • मी २५ वर्षांची आहे. २-३ महिन्यांनंतर माझे लग्न होणार आहे. नवरा मनमोकळेपणाने वागणारा आणि रोमँटिक आहे. पण त्याने सांगितले की त्याला इंटरकोर्सआधी ओरल सेक्स अधिक आवडते. मला हे माहिती करून घ्यायचे आहे की, ओरल सेक्समुळे काही नुकसान तर होत नाही ना?

शारीरिक स्वच्छता म्हणजे हायजीनकडे लक्ष दिल्यास ओरल सेक्समुळे कुठलेच नुकसान होत नाही. उलट हे सेक्स आणखी मजेदार करते.

‘कामसूत्र’मध्येही ओरल सेक्स ही एक स्वाभाविक क्रिया असल्याचे म्हटले आहे आणि याच्या विविध आसनांबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली आहे.

अजिंठा, एलोरा लेण्यांमध्ये आजही अशा मूर्ती पहायला मिळतील ज्या नरनारीमधील या प्रक्रियेला नजाकतीने दाखवत याचे समर्थन करतात की, शेकडो वर्षांपूर्वीही ओरल सेक्स म्हणजे मुख मैथुनाचे वेड होते.

ओरल सेक्समध्ये सेक्स पार्टनरला आपल्या तोंडाच्या मदतीने सेक्सचे समाधान मिळवून द्यायचे असते. त्यासाठी पार्टनरचे सेक्स आर्गन तोंडात घ्यावे लागते. या क्रियेत तोंडाचा वापर करून एकमेकांच्या डोळयात पाहून ओरल सेक्स करणे फारच रोमांचक अनुभव असतो.

पण ओरल सेक्ससाठी एकमेकांची परवानगी असणे खूपच गरजेचे आहे.

  • मी २७ वर्षांची विवाहिता असून प्रायव्हेट कंपनीत नोकरी करते. पतीचा स्वत:चा व्यवसाय आहे. माझे पती सरळ स्वभावाचे असून माझ्यावर खूप प्रेमही करतात. पण गेल्या काही महिन्यांपासून ते माझ्यावर संशय घेऊ लागले आहेत. गुपचूप माझा मोबाइलही तपासून पाहतात. मला नवऱ्याला गमवायचे नाही. सांगा, मी काय करू?

प्रेमात संशय हा असा एक काटा आहे जो दु:ख तर देतोच सोबतच नात्यामध्ये तिरस्कार निर्माण करतो. संशयामुळे सुखी वैवाहिक जीवन उद्वस्त व्हायला वेळ लागत नाही.

तुमचे पती गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यावर संशय घेऊ लागले असतील तर हे स्पष्ट आहे की, पूर्वी सर्व व्यवस्थित होते पण आता कदाचित असे काही घडत असेल ज्यामुळे ते संशय घेऊ लागले असतील.

अशावेळी तुम्ही एकांतात पतीकडून यामागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण, एखादी गोष्ट मनातल्या मनात ठेवून कुढत बसण्याने समस्या सुटणार नाही, उलट दोघांमध्ये गैरसमजाची भिंत उभी राहील.

तुमचे पती सतत आणि गुपचूप तुमचा मोबाइल तपासून पाहत असतील तर एक गोष्ट स्पष्ट आहे की, तुम्ही गरजेपेक्षा जास्तवेळ मोबाइल पाहत असाल. पती असेल तर गरजेपुरताच मोबाइलचा वापर करा.

पतीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. सुख-दु:ख शेअर करा. तरीही पतीचे वागणे बदलत नसेल तर एखाद्या समुपदेशकाची मदत घेता येईल.

  • मी २३ वर्षांची तरुणी असून एका विवाहित पुरुषावर माझे प्रेम आहे. आमच्यामध्ये फिजिकल रिलेशनही आहे. तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि सांगतो की, आपण लग्न करूया. मी काय करू?

तुम्ही ज्या आगीशी खेळत आहात ती एकाच वेळी अनेक कुटुंबाना जाळू शकते. तुमचा तथाकथित प्रेमी तुम्हाला मुर्ख बनवत आहे. या नात्याला येथेच पूर्णविराम देऊन चांगले भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करणे, हेच योग्य ठरेल.

आता राहिली गोष्ट एका विवाहित पुरुषाशी लग्न करायची तर, कायद्यानुसार हे लग्न बेकायदेशीर ठरेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें