‘‘शाळेत असल्यापासूनच अभिनयाची इच्छा’’ – विजया बाबर

* सोमा घोष

मृदू स्वभाव आणि सुंदर बांधा असलेली २३ वर्षीय विजया बाबर ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि मराठी रंगभूमीवरील कलाकार आहे. तिने नाटकातून अभिनयाला सुरुवात केली. मुंबईतील विजयाने अभिनयासोबतच म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले आहे. ती एक अतिशय आकर्षक तरुणी आहे आणि तिने ‘मिस मुंबई’ चा किताबही जिंकला आहे. ‘शिकस्त ए इश्क’ हे तिचे मराठी नाटक होते, ज्यात तिने खूप सुंदर अभिनय केला होता. त्यानंतर तिने ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत चंदाची भूमिका साकारली, जी प्रेक्षकांना खूप आवडली, पण कोविड काळातील लॉकडाऊनमुळे मालिका बंद झाली.   विजयाच्या यशात तिच्या भावा-बहिणींचा मोठा वाटा आहे, दोघेही इंजिनीअर आहेत, पण सुरुवातीपासून ते आतापर्यंत ते नेहमीच एकत्र असतात. विजयाच्या आईचे नाव नीलम बाबर तर वडिलांचे नाव आनंदा बाबर आहे. सध्या विजया सोनी मराठीवरील ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ मध्ये बयोची मुख्य भूमिका साकारत आहे. तिने खास ‘गृहशोभिका’सोबत गप्पा मारल्या. त्यातीलच हा काही मनोरंजक भाग…

ही भूमिका करण्यामागचे काही विशेष कारण आहे का?

यात मी बयोची भूमिका साकारत आहे, जी मूळची कोकणातील एका छोटया गावातली आहे. गावात रुग्णालय नसल्याने तिला डॉक्टर व्हायचे आहे. तिच्या आईचे स्वप्न आहे की, तिच्या मुलीने डॉक्टर व्हावे. मी मोठया बयोची भूमिका साकारत आहे. बयो एकटीच मुंबईत येते आणि वैद्यकीय महाविद्यायात प्रवेश     घेते, इथे आल्यानंतर तिला सावत्र आई-वडील भेटतात, जे आजारी आहेत आणि         त्यांच्या उपचाराची जबाबदारी तिने स्वीकारली आहे.

ही भूमिका तुझ्या वास्तव जीवनाशी किती मिळतीजुळती आहे?

ही भूमिका माझ्या वास्तव जीवनाशी मिळतीजुळती आहे, कारण मी लहानपणापासून अभिनयाचे स्वप्न पाहिले आहे. आज त्याच स्वप्नाच्या दिशेने माझा प्रवास सुरू झाला आहे. शाळेत असल्यापासूनच मला अभिनय करण्याची इच्छा होती. त्यामुळे शाळा-महाविद्यायात असल्यापासूनच मी रंगभूमीवर काम करू लागले. मी प्रायोगिक, मोनो अभिनय, स्किड्स इत्यादी सर्व प्रकारचा अभिनय केला आहे. प्रायोगिक नाटकातूनच मला अभिनयाची पहिली संधी मिळाली. मी स्वामी समर्थचे ७५० भाग पूर्ण केले. त्यानंतर मला ही मालिका मिळाली.

तुला अभिनयात येण्याची प्रेरणा कशी मिळाली?

माझ्या कुटुंबातील कोणीही अभिनय क्षेत्रातले नाही. टीव्ही पाहताना आणि शाळेत स्किड्स करताना अभिनय करण्याची इच्छा माझ्यात निर्माण झाली.

तुला कुटुंबाचा पाठिंबा किती मिळाला?

मी अभिनय करायचं ठरवलं तेव्हा सगळयांना एकत्र बसवून वर्षभराचा वेळ मागून घेतला. मला या क्षेत्रात ऑडिशन देऊन अभिनयाचा प्रयत्न करता यावा म्हणून मी हा वेळ मागितला होता. सर्वांनी ते मान्य केले, पण त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाले. त्यावेळी मी नुकतेच पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. मला माझी पहिली मालिका मिळाली, ती मी पूर्ण मेहनतीने केली, कारण अभिनय हेच माझो सर्वस्व आहे, मी पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरत आहे.

तुला किती संघर्ष करावा लागला? पहिला ब्रेक कसा मिळाला?

मी स्वत:ला भाग्यवान समजते, कारण जेव्हा मी रंगभूमीवर काम करत होते त्यादरम्यान इंडस्ट्रीमधील कोणीतरी माझ्या अभिनयाची दखल घेत मला अभिनयाची संधी दिली आणि ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मला चांगला ब्रेक मिळवून देणारी पहिली मालिका ठरली. या मालिकेतील माझे काम सर्वांना आवडले. त्यानंतर माझ्याकडे कामं येऊ लागली आणि मी बयोची भूमिका स्वीकारली. मला जास्त संघर्ष करावा लागला नाही, पण योग्य कथानक निवडणे हे माझ्यासाठी संघर्षाचे होते. पहिल्या मालिकेनंतर अनेक ऑफर्स आल्या, पण मी बयोची भूमिका निवडली, कारण ही भूमिका पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेवर आधारित कथा आहे.

तुला डॉक्टरच्या भूमिकेसाठी किती तयारी करावी लागली?

या मालिकेत मला मालवणी भाषा बोलायची आहे, ज्याचा मला काहीही अनुभव नाही. ही खूप अवघड भाषा आहे, मी अजूनही ती शिकत आहे. यात संवादानुसार काना – मात्रा बदलाव्या लागतात. मात्र सर्वजण यासाठी मला मदत करतात.

तुला कोणत्याही पात्रातून बाहेर पडून दैनंदिन जीवनात जगणे किती आवघड वाटते?

हे फार अवघड नाही, कारण मी रंगभूमीवर खूप काम केले आहे. मी सर्व नवीन कलाकारांना नाटकात काम करण्याचा सल्ला देते, जेणेकरून त्याद्वारे त्यांना अभिनयाचे पूर्ण ज्ञान मिळेल.

या भूमिकेमुळे तुझ्यात किती बदल झाले असे तुला वाटते?

या भूमिकेत खूप सहनशीलता आणि विश्वास आहे, ज्यामुळे मला खूप प्रेरणा मिळत आहे.

हिंदी चित्रपट आणि वेब सिरीजमध्ये काम करण्याची तुद्ब्रा इच्छा आहे का?

मला हिंदीत काम करण्याची खूप इच्छा आहे. रणवीर सिंग आणि रणवीर कपूरसोबत सहकलाकार म्हणून काम करण्याची माझी इच्छा आहे.

तू किती फॅशनेबल आणि खवय्यी आहेस?

लहानपणापासूनच मला फॅशन करायला आणि सगळयांसमोर नीटनेटके राहायला आवडते. मी कोणत्याही डिझायनरला फॉलो करत नाही, कारण आजकाल सोशल मीडियाचे जग खूप चांगले आहे, ज्यामध्ये खूप काही पाहायला मिळते. ट्रेंड फॉलो करण्याव्यतिरिक्त, मला आरामदायक कपडे घालायला आवडतात. माझे वॉर्डरोब रंगीत कपडयांनी भरले आहे.

मी खूप खवय्यी आहे, पण मी दोन वर्षांपासून घराबाहेर राहून अभिनय करत आहे. आता माझा सेट घराजवळ आहे, त्यामुळे मला रोज घरून जेवण येते, ही माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. मला आईच्या हातचे वरण, भात आणि वरून तुपाची धार असे जेवण खूप आवडते.

नवीन वर्षासाठीचा तुझा नवीन संकल्प कोणता?

वेगवेगळया भूमिका साकारण्याचे माझे स्वप्न आहे. नवीन वर्षात मला माझ्या करिअरमध्ये पूर्णपणे गुंतून जायचे आहे. मानसिकदृष्टया मला स्वत:ला समजावून सांगायचे आहे की, फक्त पैशांच्या मागे धावायचे नसते, आरोग्याला प्राधान्य देऊनच काम केले पाहिजे, कारण एखादी व्यक्ती कामात व्यस्त असते आणि स्वत:ची काळजी घेत नाही, जे योग्य नाही. याशिवाय मी बाहेरचे कमी खाते आणि वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करते. कामासोबतच आरोग्याची काळजी घेण्याचा ठाम निर्धारही मनामध्ये करावा लागतो आणि एकदा का निर्धार केला की मग त्यासाठी वेळ आपसूकच मिळतो.

आवडता रंग – मूड असेल त्यानुसार.

आवडता पोशाख – भारतीय आणि पाश्चात्य.

आवडता परफ्यूम – बाथ आणि बॉडी वर्कस्.
आवडते पर्यटन स्थळ – केदारनाथ, ग्रीस.

वेळ मिळाल्यास – कुटुंबासोबत वेळ घालवणे.

जीवनातील आदर्श – कुटुंबाची काळजी घेणे.

सामाजिक कार्य – सुदूर गावात चांगल्या रुग्णालयाची व्यवस्था करणे.

जीवन जगण्याचा मंत्र – स्वत:वर विश्वास ठेवा.

सत्ता मिळाल्यास – शिक्षणातील भेदभाव दूर करणे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें