हृदयाला बंद होण्यापासून वाचवा

* डॉ. संजीव अग्रवाल, एचओडी आणि वरिष्ठ सल्लागार, हृदय विज्ञान, सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नवी दिल्ली

उत्पन्न वाढल्यामुळे लोकांची जीवनशैली बदलली आहे. ते जास्त आरामदायी जीवन जगू लागले आहेत. जीवनाच्या स्पर्धेत पुढे जाण्याच्या इर्षेने तणावाची पातळी वाढत चालली आहे. त्यातच गॅजेट्सच्या अतिवापराने शरीराची हालचाल जवळपास संपवून टाकली आहे. यामुळे भारतात हृदयरोगाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. आपल्या देशात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हृदयरोगामुळे होतात. सुरुवातीला या आजाराकडे वृद्धांना होणारा आजार म्हणून पाहिले जायचे. आता मात्र हा अतिशय वेगाने तरुणांचीही शिकार करत आहे.

आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवून हृदयरोगापासून स्वत:ला वाचवता येते. जर तुम्ही हृदयरोगाच्या जाळयात अडकला असाल तर घाबरू नका. यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केलेले उपचार फारच प्रभावी ठरत आहेत.

हृदयरोगाशी संबंधित प्रमुख समस्या

हृदयरोगाचा टका : मानवी हृदय मांसपेशींनी बनले आहे. त्याला सतत अन्न आणि ऑक्सिजनची गरज भासते. हृदयाला रक्त पोहोचवणाऱ्या धमन्या आकुंचन पावल्या असतील तर हृदयाच्या मांसपेशींना अन्न आणि ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या मृत होऊ लागतात. यामुळे हृदय कमकुवत होते आणि शरीराला पुरेशा प्रमाणात रक्तप्रवाह होऊ शकत नाही. त्यामुळे जीव जाण्याचा धोका वाढतो. या संपूर्ण प्रक्रियेला हार्टअटॅक म्हणजेच हृदयरोगाचा झटका येणे असे म्हणतात.

हृदयाचे अनियंत्रित ठोके : हृदयाचे अनियंत्रित ठोके हे हृदय बंद होण्याचे संकेत असू शकतात. सामान्य आणि निरोगी माणसासाठी हृदयाचे ठोके ६० ते ९० बीट प्रती मिनिट असतात, मात्र अनेकदा ते अनियंत्रित होऊ शकतात. हृदयाची धडधड प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास कार्डियक अरेस्ट किंवा हार्टअटॅक येऊ शकतो. अॅनिमिया हेही हृदयाच्या अनियंत्रित ठोक्यांसाठी कारणीभूत ठरू शकते, कारण यामुळे लाल रक्तपेशींची संख्या कमी झाल्यामुळे हृदयाला शरीरातुन रक्त पुरवठा मिळवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते, ज्यामुळे हृदयाची धडधड वाढते आणि लेफ्टवॅट्रिक्युलर हायपरट्रोफी (एलवीएच) हा गंभीर आजार होतो. यात हृदयाच्या मांसपेशींचा आकार वाढतो. यामुळे हृदय बंद पडणे किंवा लाल रक्तपेशी लवकर नष्ट होण्याचा धोका वाढतो. तणाव वाढल्यानेही हृदयाचे ठोके वाढतात.

कार्डियक अरेस्ट : कार्डियक अरेस्टमध्ये हृदय बंद झाल्याने रक्तप्रवाह पूर्णपणे बंद होतो. याला कार्डियकपलमोनरी अरेस्ट किंवा सर्क्युलेटरी अरेस्ट असे म्हणतात. जे लोक हृदयरोगाने त्रस्त आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबात हार्टअटॅकची समस्या आनुवंशिक आहे त्यांना कार्डियक अटॅकचा धोका जास्त असतो. अनेकदा सुदृढ माणूसही याच्या जाळयात ओढला जाऊ शकतो. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपानाचा अतिरेक हे या आजारास कारणीभूत ठरू शकतात.

हार्ट फेल्युअर : हार्ट फेल होणे ही एक गंभीर समस्या आहे. अशी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा हृदयाच्या मांसपेशींचे जास्तीत जास्त नुकसान होते, त्यामुळे त्या शरीरात पुरेशा प्रमाणात रक्तप्रवाह करू शकत नाहीत. वृद्धांमध्ये ही समस्या अधिक जाणवते. श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा आणि तळव्यांना सूज येणे, ही याची प्रमुख लक्षणे आहेत. हार्ट फेल्युअरचा अर्थ हृदय बंद पडणे किंवा हृदयाने कार्य करणे बंद केले असा होत नाही. याचा अर्थ असा की, हृदय रक्ताला योग्य पद्धतीने आणि जितकी गरज आहे तितके पंप करू शकत नाही. हे कोरोनरी हार्ट डिसिस, हृदयाचा व्हॉल्व म्हणजे झडपा किंवा मांसपेशींचे नुकसान होणे किंवा व्हायरसच्या संक्रमणामुळे होऊ शकते.

एनजाइना : एनजाइना म्हणजे हृदयविकाराचा दाह. छातीत दुखणे हे याचे सर्वात प्रमुख लक्षण आहे. एनजाइना आर्थोस्लोरोसिसद्वारे होतो. यामुळे हृदयात रक्ताचा प्रवाह कमी होतो. यात छाती, डावा हात, खांदा किंवा जबडा दुखू लागतो. शारीरिक श्रम करताना वेदना अधिक वाढतात. थोडासा आराम केल्यावर त्या कमी होतात. एनजाइनाची लक्षणे दिसू लागली असतील तर लगेचच हृदयरोग विशेषज्ञाचा सल्ला घ्या.

या संकेतांकडे गांभीर्याने पाहा

* छातीत अस्वस्थ वाटणे, छाती जड होणे.

* छातीत दुखण्यासह धाप लागणे.

* खूप जास्त घाम येणे.

* सतत चक्कर येणे, थकवा किंवा अशक्तपणा.

* खांदे सुन्न होणे.

* बोलताना जीभ अडखळणे.

हृदयासाठी आवश्यक टीप्स

खालील उपाय करून तुम्ही हृदयाला आजारी होण्यापासून वाचवू शकता :

* सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट्सचे कमीत कमी सेवन करा. तुमच्या आहारातून लाल मांस कायमचे वगळा, त्याऐवजी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.

* शारीरिक रूपात सक्रिय राहा, कारण शरीराच्या सततच्या हालचालींमुळे अतिरिक्त चरबी जळून जाते. कोलेस्टेरॉल आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

* ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवणे हा हार्टअटॅकपासून वाचण्याचा एक महत्त्वाचा उपाय आहे.

* धुम्रपान, दारू पिणे टाळा.

* हृदयरोग बराचसा अनुवंशिक आहे. ज्यांचे आईवडील, भावंडांना हृदयरोग आहे त्यांनी जास्त काळजी घेणे गरजेचे असते.

उपचाराचे नवीन तंत्रज्ञान

हृदयरोग हा आरोग्याशी निगडित एक गंभीर आजार समजला जातो. म्हणूनच असे उपाय करा ज्यामुळे तुम्ही याच्या जाळयात येण्याची भीती कमी होईल. त्यानंतरही जर हा आजार झालाच तरी घाबरू नका. आजकाल नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे जे जीवन वाचवणारे समजले जाते. म्हणूनच हृदयरोगाची लक्षणे ओळखून लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी

हृदयाच्या मांसपेशींना वाचवण्यासाठी अन्न आणि ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळणे सर्वाधिक गरजेचे असते. यासाठीच एंजिओप्लास्टी एक प्रभावी उपचार समजला जातो. याद्वारे हार्टअटॅकमुळे मरणाऱ्या लोकांची संख्या कमी करता येऊ शकते. सुरुवातीला रक्ताच्या गुठळया विरघळवण्यासाठी औषध दिले जात असे, पण ते त्या विशेष ठिकाणावर पोहोचण्याआधीच संपूर्ण शरीरात पसरत असे. यामुळे कधीकधी ब्लिडिंगची समस्या निर्माण होत असे. प्राथमिक एंजिओप्लास्टीमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेल्या गुठळया स्क्रीनवर पाहाता येतात. त्यांना काढून रक्तप्रवाह पुन्हा सुरू केला जातो. गरजेनुसार अत्याधुनिक एंजिओप्लास्टी केली जाते. यात धमन्यांमध्ये रक्ताचा प्रवाह सुधारण्यासाठी एक लवचिक नळी टाकली जाते. याव्यतिरिक्त बायपास सर्जरीही केली जाते.

ऐऑर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट

जर हृदयातील एखादा व्हॉल्व किंवा झडप योग्य प्रकारे काम करत नसेल तर ती बदलण्यासाठी सर्जरी अर्थात शस्त्रक्रिया गरजेची असते. ती व्हॉल्व बदलून तिच्या जागी कृत्रिम व्हॉल्व बसवली जाते.

हृदय प्रत्यारोपण

यात आजारी किंवा खराब झालेले हृदय बदलून त्या ठिकाणी निरोगी हृदय बसवले जाते. या प्रक्रियेचा उपयोग हार्ट फेल्युअरमुळे त्रस्त रुग्णांसाठी अंतिम उपचार म्हणून केला जातो. यासाठी त्या लोकांचे हृदय घेतले जाते ज्यांना ब्रेन डेथ म्हणून घोषित केले जाते. दात्याच्या शरीरातून काढल्यानंतर ६ तासांच्या आत हृदय प्रत्यारोपण करणे आवश्यक असते. अशी शस्त्रक्त्रिया यशस्वी होण्याची ३० टक्के शक्यता असते. डॉक्टरांच्या मते जीवनशैलीत बदल करणे सर्वात जास्त गरजेचे आहे, कारण त्याशिवाय कोणताही उपचार किंवा औषध प्रभावी ठरू शकत नाही.

हृदयाला बंद होण्यापासून वाचवा

* डॉ. संजीव अग्रवाल, एचओडी आणि वरिष्ठ सल्लागार, हृदय विज्ञान, सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नवी दिल्ली

उत्पन्न वाढल्यामुळे लोकांची जीवनशैली बदलली आहे. ते जास्त आरामदायी जीवन जगू लागले आहेत. जीवनाच्या स्पर्धेत पुढे जाण्याच्या इर्षेने तणावाची पातळी वाढत चालली आहे. त्यातच गॅजेट्सच्या अतिवापराने शरीराची हालचाल जवळपास संपवून टाकली आहे. यामुळे भारतात हृदयरोगाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. आपल्या देशात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हृदयरोगामुळे होतात. सुरुवातीला या आजाराकडे वृद्धांना होणारा आजार म्हणून पाहिले जायचे. आता मात्र हा अतिशय वेगाने तरुणांचीही शिकार करत आहे.

आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवून हृदयरोगापासून स्वत:ला वाचवता येते. जर तुम्ही हृदयरोगाच्या जाळयात अडकला असाल तर घाबरू नका. यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केलेले उपचार फारच प्रभावी ठरत आहेत.

हृदयरोगाशी संबंधित प्रमुख समस्या

हृदयरोगाचा टका : मानवी हृदय मांसपेशींनी बनले आहे. त्याला सतत अन्न आणि ऑक्सिजनची गरज भासते. हृदयाला रक्त पोहोचवणाऱ्या धमन्या आकुंचन पावल्या असतील तर हृदयाच्या मांसपेशींना अन्न आणि ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या मृत होऊ लागतात. यामुळे हृदय कमकुवत होते आणि शरीराला पुरेशा प्रमाणात रक्तप्रवाह होऊ शकत नाही. त्यामुळे जीव जाण्याचा धोका वाढतो. या संपूर्ण प्रक्रियेला हार्टअटॅक म्हणजेच हृदयरोगाचा झटका येणे असे म्हणतात.

हृदयाचे अनियंत्रित ठोके : हृदयाचे अनियंत्रित ठोके हे हृदय बंद होण्याचे संकेत असू शकतात. सामान्य आणि निरोगी माणसासाठी हृदयाचे ठोके ६० ते ९० बीट प्रती मिनिट असतात, मात्र अनेकदा ते अनियंत्रित होऊ शकतात. हृदयाची धडधड प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास कार्डियक अरेस्ट किंवा हार्टअटॅक येऊ शकतो. अॅनिमिया हेही हृदयाच्या अनियंत्रित ठोक्यांसाठी कारणीभूत ठरू शकते, कारण यामुळे लाल रक्तपेशींची संख्या कमी झाल्यामुळे हृदयाला शरीरातुन रक्त पुरवठा मिळवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते, ज्यामुळे हृदयाची धडधड वाढते आणि लेफ्टवॅट्रिक्युलर हायपरट्रोफी (एलवीएच) हा गंभीर आजार होतो. यात हृदयाच्या मांसपेशींचा आकार वाढतो. यामुळे हृदय बंद पडणे किंवा लाल रक्तपेशी लवकर नष्ट होण्याचा धोका वाढतो. तणाव वाढल्यानेही हृदयाचे ठोके वाढतात.

कार्डियक अरेस्ट : कार्डियक अरेस्टमध्ये हृदय बंद झाल्याने रक्तप्रवाह पूर्णपणे बंद होतो. याला कार्डियकपलमोनरी अरेस्ट किंवा सर्क्युलेटरी अरेस्ट असे म्हणतात. जे लोक हृदयरोगाने त्रस्त आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबात हार्टअटॅकची समस्या आनुवंशिक आहे त्यांना कार्डियक अटॅकचा धोका जास्त असतो. अनेकदा सुदृढ माणूसही याच्या जाळयात ओढला जाऊ शकतो. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपानाचा अतिरेक हे या आजारास कारणीभूत ठरू शकतात.

हार्ट फेल्युअर : हार्ट फेल होणे ही एक गंभीर समस्या आहे. अशी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा हृदयाच्या मांसपेशींचे जास्तीत जास्त नुकसान होते, त्यामुळे त्या शरीरात पुरेशा प्रमाणात रक्तप्रवाह करू शकत नाहीत. वृद्धांमध्ये ही समस्या अधिक जाणवते. श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा आणि तळव्यांना सूज येणे, ही याची प्रमुख लक्षणे आहेत. हार्ट फेल्युअरचा अर्थ हृदय बंद पडणे किंवा हृदयाने कार्य करणे बंद केले असा होत नाही. याचा अर्थ असा की, हृदय रक्ताला योग्य पद्धतीने आणि जितकी गरज आहे तितके पंप करू शकत नाही. हे कोरोनरी हार्ट डिसिस, हृदयाचा व्हॉल्व म्हणजे झडपा किंवा मांसपेशींचे नुकसान होणे किंवा व्हायरसच्या संक्रमणामुळे होऊ शकते.

एनजाइना : एनजाइना म्हणजे हृदयविकाराचा दाह. छातीत दुखणे हे याचे सर्वात प्रमुख लक्षण आहे. एनजाइना आर्थोस्लोरोसिसद्वारे होतो. यामुळे हृदयात रक्ताचा प्रवाह कमी होतो. यात छाती, डावा हात, खांदा किंवा जबडा दुखू लागतो. शारीरिक श्रम करताना वेदना अधिक वाढतात. थोडासा आराम केल्यावर त्या कमी होतात. एनजाइनाची लक्षणे दिसू लागली असतील तर लगेचच हृदयरोग विशेषज्ञाचा सल्ला घ्या.

या संकेतांकडे गांभीर्याने पाहा

* छातीत अस्वस्थ वाटणे, छाती जड होणे.

* छातीत दुखण्यासह धाप लागणे.

* खूप जास्त घाम येणे.

* सतत चक्कर येणे, थकवा किंवा अशक्तपणा.

* खांदे सुन्न होणे.

* बोलताना जीभ अडखळणे.

हृदयासाठी आवश्यक टीप्स

खालील उपाय करून तुम्ही हृदयाला आजारी होण्यापासून वाचवू शकता :

* सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट्सचे कमीत कमी सेवन करा. तुमच्या आहारातून लाल मांस कायमचे वगळा, त्याऐवजी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.

* शारीरिक रूपात सक्रिय राहा, कारण शरीराच्या सततच्या हालचालींमुळे अतिरिक्त चरबी जळून जाते. कोलेस्टेरॉल आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

* ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवणे हा हार्टअटॅकपासून वाचण्याचा एक महत्त्वाचा उपाय आहे.

* धुम्रपान, दारू पिणे टाळा.

* हृदयरोग बराचसा अनुवंशिक आहे. ज्यांचे आईवडील, भावंडांना हृदयरोग आहे त्यांनी जास्त काळजी घेणे गरजेचे असते.

उपचाराचे नवीन तंत्रज्ञान

हृदयरोग हा आरोग्याशी निगडित एक गंभीर आजार समजला जातो. म्हणूनच असे उपाय करा ज्यामुळे तुम्ही याच्या जाळयात येण्याची भीती कमी होईल. त्यानंतरही जर हा आजार झालाच तरी घाबरू नका. आजकाल नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे जे जीवन वाचवणारे समजले जाते. म्हणूनच हृदयरोगाची लक्षणे ओळखून लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी

हृदयाच्या मांसपेशींना वाचवण्यासाठी अन्न आणि ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळणे सर्वाधिक गरजेचे असते. यासाठीच एंजिओप्लास्टी एक प्रभावी उपचार समजला जातो. याद्वारे हार्टअटॅकमुळे मरणाऱ्या लोकांची संख्या कमी करता येऊ शकते. सुरुवातीला रक्ताच्या गुठळया विरघळवण्यासाठी औषध दिले जात असे, पण ते त्या विशेष ठिकाणावर पोहोचण्याआधीच संपूर्ण शरीरात पसरत असे. यामुळे कधीकधी ब्लिडिंगची समस्या निर्माण होत असे. प्राथमिक एंजिओप्लास्टीमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेल्या गुठळया स्क्रीनवर पाहाता येतात. त्यांना काढून रक्तप्रवाह पुन्हा सुरू केला जातो. गरजेनुसार अत्याधुनिक एंजिओप्लास्टी केली जाते. यात धमन्यांमध्ये रक्ताचा प्रवाह सुधारण्यासाठी एक लवचिक नळी टाकली जाते. याव्यतिरिक्त बायपास सर्जरीही केली जाते.

ऐऑर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट

जर हृदयातील एखादा व्हॉल्व किंवा झडप योग्य प्रकारे काम करत नसेल तर ती बदलण्यासाठी सर्जरी अर्थात शस्त्रक्रिया गरजेची असते. ती व्हॉल्व बदलून तिच्या जागी कृत्रिम व्हॉल्व बसवली जाते.

हृदय प्रत्यारोपण

यात आजारी किंवा खराब झालेले हृदय बदलून त्या ठिकाणी निरोगी हृदय बसवले जाते. या प्रक्रियेचा उपयोग हार्ट फेल्युअरमुळे त्रस्त रुग्णांसाठी अंतिम उपचार म्हणून केला जातो. यासाठी त्या लोकांचे हृदय घेतले जाते ज्यांना ब्रेन डेथ म्हणून घोषित केले जाते. दात्याच्या शरीरातून काढल्यानंतर ६ तासांच्या आत हृदय प्रत्यारोपण करणे आवश्यक असते. अशी शस्त्रक्त्रिया यशस्वी होण्याची ३० टक्के शक्यता असते. डॉक्टरांच्या मते जीवनशैलीत बदल करणे सर्वात जास्त गरजेचे आहे, कारण त्याशिवाय कोणताही उपचार किंवा औषध प्रभावी ठरू शकत नाही.

हृदयविकाराच्या झटक्यात एक तास कार्डियाक अरेस्टमध्ये

* डॉक्टर. वनिता अरोरा (कार्डियाक इलेक्ट्रोफिजियोलॉजिस्ट, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, साकेत, दिल्ली)

जेव्हा जीवन आणि मृत्यूचा प्रश्न येतो तेव्हा प्रत्येक सेकंदाची गणना होते. ही वेळ आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीने काय कारवाई करायची हे ठरवायचे असते. जेव्हा आपल्याकडे रुग्णासाठी सर्वोत्तम पर्याय निवडण्यासाठी एक तास असतो, तेव्हा आपण बरेच काही करू शकतो, परंतु जेव्हा कोणाचे प्राण वाचवण्यासाठी काही सेकंद शिल्लक असतात, तेव्हा ती वेगळी बाब असते. या दोन्ही परिस्थितींमध्ये, आपण उचललेले पाऊल खूप महत्वाचे आहे.

जीव वाचवण्यासाठी उपलब्ध असलेला सुवर्ण तास आणि सोनेरी सेकंद यातील फरक हार्ट अटॅक आणि अचानक कार्डियाक अरेस्टच्या बाबतीतही आहे.

आणीबाणीत सुवर्ण तास

सुवर्ण तास ही संकल्पना रुग्णांना गंभीर दुखापत किंवा इतर कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत लागू होते. यानंतर पहिला एक तास खूप महत्वाचा आहे, ज्यामध्ये योग्य उपचार आणि व्यवस्थापन रुग्णाचे किंवा त्याच्या शरीराचे अवयव खराब होण्यापासून वाचवू शकतात. जरी असे म्हणता येत नाही की कोणतीही पायरी एक स्ट्रीक सिद्ध होईल, परंतु जर रुग्णाला क्लेशकारक घटनेनंतर पहिल्या एका तासाच्या आत योग्य वैद्यकीय सेवा मिळाली तर त्याचे आयुष्य वाचण्याची शक्यता अनेक पटीने वाढते.

हृदयविकाराचा झटका आल्यास, बऱ्याचदा असा सल्ला दिला जातो की रुग्णाला तो आल्यानंतर पहिल्या एका तासाच्या आत आपत्कालीन काळजी घ्यावी. पण कार्डियाक अरेस्टच्या बाबतीत असे म्हणता येणार नाही.

हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्ट दरम्यान गोंधळ

हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा झटका यात फरक आहे. बहुतेक लोक हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्ट सारख्याच गोष्टी मानतात, तर दोघांमधील फरक समजून घेणे खूप महत्वाचे आहे. हृदयविकाराचा झटका आणि कार्डियाक अरेस्ट या दोन वेगवेगळ्या हृदय समस्या आहेत.

हृदयविकाराचा झटका : एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येतो जेव्हा त्याच्या हृदयापर्यंत ऑक्सिजन युक्त रक्ताचा योग्य प्रवाह नसतो, जिथून रक्त शरीराच्या इतर भागांमध्ये पंप केले जाते. हृदयविकाराच्या झटक्या दरम्यान, रक्त पंप करण्याची हृदयाची क्षमता अंशतः कमी होते. हृदयविकाराच्या झटक्यानंतरही हृदय रक्त पंप करत राहते, पण त्याची गती मंदावते. हृदयविकाराचा झटका आल्यास, एखादी व्यक्ती काही मिनिटे किंवा काही तासांपर्यंत जगू शकते आणि जगू शकते, परंतु यासाठी रुग्णाला शक्य तितक्या लवकर आपत्कालीन काळजी घेणे आवश्यक आहे कारण शरीराचे बरेच भाग आणि मेंदू आहेत रक्त परिसंवादाचा अभाव त्या अवयवांना गंभीर नुकसान होऊ शकतो. अशा परिस्थितीत, स्ट्रोक येऊ शकतो, अगदी अचानक कार्डियाक अरेस्ट देखील येऊ शकतो.

कार्डियाक अरेस्ट : प्रश्न उद्भवतो की कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय? कार्डियक अरेस्ट अचानक कोणत्याही इशारा किंवा चेतावणी चिन्हाशिवाय होऊ शकतो. कार्डियाक अरेस्टमुळे, रुग्णाचे हृदय काम करणे थांबवते, कारण अशा स्थितीत हृदयाच्या विद्युत प्रणालीमध्ये समस्या असते आणि पंपिंगची प्रक्रिया विस्कळीत होते. याचा परिणाम म्हणून, मेंदू आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्त प्रवाह पूर्णपणे थांबला आहे. काही सेकंदातच रुग्ण बेशुद्ध होतो आणि त्याची नाडी नाहीशी होते आणि पुढच्या काही मिनिटांत रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.

हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा झटका यातील फरक

हृदयविकाराचा झटका हृदयविकारासाठी जबाबदार असलेल्या अनेक कारणांपैकी एक आहे. खराब हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य, हृदयरोग, अतालता (अनियमित हृदयाचा ठोका) किंवा अनियमित हृदयाचा ठोका हे इतर अनेक घटकांपैकी आहेत जे हृदयाच्या विद्युत प्रणालीवर परिणाम करतात आणि कार्डियाक अरेस्ट होऊ शकतात.

कार्डियाक अरेस्टला फक्त सोनेरी सेकंद लागतात

हृदयविकाराच्या बाबतीत, जेथे रुग्णाचा परिचारक किंवा बचावकर्ता रुग्णाला रुग्णालयात नेण्याचा सुवर्ण तास असतो, कार्डियाक अरेस्ट झाल्यास, त्या व्यक्तीकडे फक्त काही महत्वाचे सेकंद असतात. अशा परिस्थितीत, कार्डियाक अरेस्टची लक्षणे ओळखणे आणि त्वरित कारवाई करणे फार महत्वाचे आहे.

जेव्हा एखाद्या व्यक्तीला कार्डियाक अरेस्ट येतो तेव्हा ताबडतोब रुग्णवाहिका बोलवावी आणि कार्डिओपल्मोनरी रीसिसिटेशन (सीपीआर) देखील करावे. सीपीआरमध्ये, रुग्णाच्या छातीवर तळहातांसह मजबूत दबाव तयार केला जातो. या दरम्यान प्रति मिनिट 120 कॉम्प्रेशन्सचा वेग असावा. रुग्णाला वैद्यकीय मदत मिळेपर्यंत हे केले पाहिजे.

हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा झटका या एकाच गोष्टी नाहीत आणि त्याच प्रकारे व्यवस्थापित केल्या जाऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत, या दोघांची संपूर्ण माहिती ठेवण्याची जबाबदारी आपली बनते, या दोन्ही परिस्थितींना अज्ञान आणि अज्ञानाची स्थिती देऊन निष्काळजी होऊ नये, विशेषत: कार्डियाक अरेस्टच्या बाबतीत, जिथे आपल्याला काही सोनेरी सेकंद घ्यावे लागतील जीव वाचवण्यासाठी.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें