ना सासर तुरूंग ना तुम्ही कैदी

* अनुराधा गुप्ता

प्रेम विवाह असो किंवा ठरवून केलेले लग्न, प्रत्येक मुलीच्या मनात सासर विषयी थोडी भीती असतेच. अनेकदा तर ही भीती काळजीचे रूप धारण करते. पण समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा मुलीच्या मनात सासरच्यांविषयी नकारात्मक दृष्टीकोन तयार होऊ लागतो. अशा स्थितीत कुठलाही आधार नसतानाही मुलगी भावी सासरच्यांमंडळींमध्ये उणिवा शोधू लागते.

मॅरेज काऊंसेलर डॉ. वीरजी शर्मा सांगतात, ‘‘मुलींमध्ये सासरबद्दल भीती असणे स्वाभाविक आहे. पण अनेकदा ही भीती इतकी वाढते की मुलगी स्वत:च काही कल्पना रचून असा विचार करून ठरवून टाकते की सासरचे त्या स्थितीत तिच्यासोबत कसे वागू शकतील. जास्तीत जास्त मुली नकारात्मक विचारच करतात. याची दोन कारणे असू शकतात. पहिले की मुलीला सासरच्या सर्व सदस्यांचे स्वभाव माहीत असावेत व दुसरे हे की होणाऱ्या सासरच्यांबद्दल तिला काहीही माहीत नसावे.’’ दोन्हीही परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारच्या चिंता तिला घेरून टाकतात. अशा काही चिंतांमधून कसा मार्ग काढावा यासाठी काही उपाय…

स्वत:ला व्यक्त न करू शकण्याची भीती

हे तर स्पष्टच आहे की सासरची जागा आणि माणसे दोन्ही मुलीसाठी अनोळखीच असतात. अशावेळी प्रत्येक मुलीला सासरच्या कुठल्याही सदस्याकडे आपल्या इच्छा, समस्या आणि भावना व्यक्त करण्यासाठी संकोच वाटतो. उदाहरण म्हणून एका नववधूचा चेहरा पाहण्याच्या विधीबद्दल बोलायचे झाले तर या विधिमध्ये काही कमतरता आहेत तर काही लाभसुद्धा आहेत. त्यातील लाभ हा आहे की घरातील नवी सदस्य झालेल्या नववधूला भेटण्याची, ओळख करून घेण्याची संधी सर्व नातेवाईकांना मिळते, तर उणीव अशी की दमलेली वधू लोकांच्या त्या गर्दीत स्वत:ला असुरक्षित समजू लागते.

या विधीव्यतिरिक्त असेही काही प्रसंग येतात, जेव्हा मुलगी तिच्या मनातील भावना सासरच्यांसमोर व्यक्तही करू शकत नाही आणि निराशेसह त्यांच्या म्हणण्यानुसार मान डोलावत राहते. डॉ. वीरजी याबाबत सांगतात, ‘‘लग्नाच्या सुरूवातीच्या दिवसात ही समस्या प्रत्येक मुलीला असते. पण ही काही कायमस्वरूपी नसते. पहिली बाब म्हणजे आपल्या मनातील बोलणे हा काही गुन्हा नाही. जर योग्य पद्धतीने आपले म्हणणे सर्वांसमोर मांडले तर सर्वजण त्याला पाठिंबा देतात. सासरच्यांसमोर हळूहळू खुलण्याचा प्रयत्न मुलीला स्वत:लाच करावा लागतो. यात तिला कोणी मदत करू शकत नाही.’’

स्वातंत्र्य हिरावले जाण्याची भीती

लग्नाआधी प्रत्येक मुलीच्या मनात हा प्रश्न नेहमी येतोच की लग्नानंतरही सासरी माहेरच्याप्रमाणे स्वातंत्र्य मिळेल का? डॉ. वीरजी सांगतात, ‘‘लग्न नव्या नात्यांचे मिलन आहे. बंधन नाही. नव्या नात्यांच्या काही अपेक्षाही असतात आणि त्या पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण नात्यांचे बंध एकमेकांना समजून आणि एकमेकांच्या अपेक्षा पूर्ण केल्यानेच घट्ट होतात. ही जबाबदारी फक्त मुलीचीच नसते. सासरचेही मुलीच्या आवडी निवडीचा विचार करतात म्हणून स्वत:ला सासरी कैदी समजू नये.’’

अनेकदा मुलींना याबाबत सतत भीती वाटत असते की सासरी आवडीचे जेवण, कपडे, फिरणे या सर्वांवर बंधने आणली जातील. इतकंच नव्हे तर काही करण्याआधी सासू सासऱ्यांची परवानगी घ्यावी लागेल आणि मोठ्यांची परवानगी घ्यायला हरकत काय आहे? माहेरीसुद्धा मुली काही करण्याआधी आईवडिलांना विचारतातच आणि हे फक्त मुलींबद्दलच नाही तर प्रश्न अधिक अनुभव आणि कमी अनुभव असण्याचा आहे. सासू सासऱ्यांना मुलीपेक्षा अधिक अनुभव असतो. एखाद्या अनुभवावरूनच ते एखादे काम काम कर अथवा नको करू असे म्हणत असतील तरी यात तुमचे भलेच आहे. ही बाबही लक्षात ठेवा, जर सुनेने तिच्या निर्णयांमध्ये सासरच्यांना सहभागी करून घेतले तरच तेसुद्धा प्रत्येक कामात तिच्या मताला महत्त्व देतील.

घरातील काही नियम असतात त्यांना अनाठायी म्हणणे चुकीचे ठरेल. नियमांचे पालन केल्याने जीवनशैली शिस्तप्रिय बनते. हे नियम घरातील प्रत्येक सदस्यासाठी सारखेच असतात. म्हणून हे वैयक्तिक पातळीवर घेऊ नये. अशाच प्रकारे सासर म्हणजे तुरूंग आहे व प्रत्येक वेळी तिथल्या कैदेतून बाहेर पडण्याचा विचार करू नये. कारण हा विचार जर केलात तर तुम्हाला सून म्हणून सासरी कधीच स्वत:ची जागा निर्माण करता येणार नाही.

कुटुंबातील व्यक्तींच्या हस्तक्षेपाची काळजी

‘भांड्याला भांडे लागणारच’ ही म्हण गृहस्थ जीवनाला अगदी साजेशी आहे. कुटुंब एका व्यक्तीने बनत नाही तर अनेक व्यक्ती एकत्र आल्याने कुटुंब बनते. ज्या घरात ४-५ लोक असतात, तिथे परस्परांमध्ये सल्लामसल्लत करूनच प्रत्येक काम केले जाते. याला हस्तक्षेप समजण्याची चूक करू नये. कधी असेही होऊ शकते की तुमच्या सल्ल्याविरोधात काही निर्णय घेतले जातील, पण त्यात इतर कुटुंबीयांची सहमति असू शकेल. याला कुटुंबीयांचा हस्तक्षेप म्हणू शकत नाही. जेव्हा मुली माहेरी असतात, तेव्हा आईवडिलांनी घेतलेल्या हरकती त्यांना हस्तक्षेप वाटत नाहीत. कारण तिथे त्यांचे नाते भावनात्मक असते. सासरच्यांशी भावनात्मक रितीने जोडण्यात थोडा वेळ लागतो. म्हणून त्यांची प्रत्येक बाब हस्तक्षेप वाटतो.

पण अनेकदा सासरी काही लोक नव्या सुनेवर वचक ठेवण्यासाठी तिच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करतात. अशा लोकांपासून थोडे अंतर ठेवावे. जर सासूसासऱ्यांची गोष्ट असेल तर त्यांच्यात आणि तुमच्यात एक सीमा रेषा आखावी. त्यांचे जे बोलणे सहज सोपे वाटेल ते ऐकले जाऊ शकते, ते जरूर ऐकावे. पण जे स्विकारार्ह नसेल तर आदराने त्यांना स्पष्ट नकार द्यावा.

अनैच्छिक जबाबदाऱ्या पेलण्याचे ओझे

नव्या नात्यांसोबत नव्या जबाबदाऱ्याही सांभाळाव्या लागतात हे स्विकारा. पण काही नाती मनापासून सांभाळण्यास थोडा त्रास होतो. अशा नात्यांमध्ये संबंधित जबाबदाऱ्या जोपासणे ओझे वाटू लागते. विशेषत: नणंद आणि जाऊ यांच्यातील कडू गोड नात्यांच्या गोष्टींनी कल्पनांनी मुली आधीच भांबावलेल्या असतात. उरलीसुरली कसर टीव्हीवरील सासूसुनांच्या भाडणांच्या आणि घरगुती वादाच्या मालिकांनी भरून काढलेली असते. मग मुलींच्या मनात नणंद, जाऊ व सासूच्या त्याप्रमाणे प्रतिमा निर्माण झालेल्या असतात.

पण वास्तविक ही नाती निभावणे इतकेही कठिण नसते. हे स्पष्टच आहे की पतिशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा उत्साह मुलींमध्ये असतो. पण सासरच्या सदस्यांबद्दल मात्र तो नसतो आणि नकारात्मक विचार चांगल्यालाही वाईट बनवू शकतात. नणंद, जाऊ आणि सासू सासरी नव्या सुनेसाठी सर्वात जास्त महत्त्वाच्या ठरू शकतात. ही नाती रूसव्या-फुगव्यांची आहेत खरी, पण ही नसतील तर गृहस्थ जीवन फिके आहे.

जीवनशैली बदलण्याची भीती

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर एका नव्या बदलाचा सामना करावा लागतो. लग्नानंतर स्त्रिया आणि पुरूष दोघांच्याही आयुष्यात अनेक बदल घडून येतात. पण मुलींना लग्नाआधीच याबद्दल खूप भीती असते. याचे मुख्य कारण आहे वडिलांचे घर साडून पतिच्या घरी जाणे. सर्व घरातील नियम कायदे वेगळे असतात, राहणीमान वेगळं असतं. यामध्ये स्वत:ला सामावून घेणे प्रत्येक मुलीसाठी अवघड असतं.

घरात एका वेगळ्या वातावरणातून आलेल्या नव्या सूनेसोबत ताळमेळ बसवणं सासरच्यांसाठीही सोपं नसतं. आपल्या घरातील वातावरणामध्ये सुनेला सामावून घेणं हे सासरच्यांसाठीही एक आव्हान असतं. पण उभय पक्षांनी जर सोबत मिळून पुढे पाऊल टाकलं तर हे बदल चांगले वाटू लागतात.

अशाचप्रकारे सासर आणि सासरच्यांशी संबंधित अनेक बाबी असतात, ज्या लग्नाच्या आधीच मुलींना नकारात्मक विचार करायला भाग पाडतात. पण अशा नकारात्मक विचारांनी नव्या नात्यांची सुरूवात केली तर वाईट परिणामच दिसतात. म्हणून सकारात्मक विचार करावा. मग तुम्हाला अशक्य परिस्थितीमध्येही प्रकरणे सोडवण्याचा मार्ग मिळेल आणि सासरच्या प्रत्येक सदस्यांसोबत ताळमेळ बसवणे सोपे होऊन जाईल.

विवाह व्यवस्थापनाचे ५ नियम

* सुमन बाजपेयी

एखादी कंपनी चालवणे म्हणजे लग्न मॅनेज करण्यासारखे असू शकते. ऐकायला हे विचित्र वाटेल. पण जर आपण विचार केला तर दोघांमध्ये साम्य दिसून येईल. तर मग आपला व्यवसाय किंवा व्यावसायिक लाईफसारखे वैवाहिक जीवन मॅनेज करण्यात काय हरकत आहे?

जसे की आपण एखादा व्यवसाय चालविण्यासाठी अर्थसंकल्प तयार करता, लोकांना कामे सोपवता, त्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करता, बक्षिसे देता. तशाच प्रकारे वैवाहिक जीवनातही बजेट तयार करावे लागते, एकमेकांना कामे दिली जातात, जबाबदाऱ्या वाटून दिल्या जातात, जोडीदारास प्रोत्साहन दिले जाते, वेळोवेळी प्रेम व्यक्त करण्यासाठी भेटवस्तू देऊन हे दाखविले जाते तो/ती त्याच्या आयुष्यात किती महत्त्वाचा आहे.

वाढत्या व्यवसायासारखा याचा विचार करा

कोणालाही त्याच्या विवाहित जीवनाची तुलना व्यवसायाशी करणे आवडत नाही. असे केल्याने, संबंधातून प्रेमाचा अंत होऊ लागतो. पण लग्नातदेखील अपेक्षा आणि मर्यादा कंपनीसारख्याच असतात. आर्थिक जबाबदाऱ्या, आरोग्यविषयक लाभ आणि नफा मार्जिन हे वैवाहिक नात्यातही पाहिले जाऊ शकते. जर आपण आपले नातेसंबंध एका वाढत्या व्यवसायाप्रमाणे बघत असाल, ज्यात भविष्यातील योजना असतात, तर आपले वैवाहिक जीवन देखील ग्रो करू शकते.

आपल्याला भावनिक संसाधने तयार करण्यासाठी, आर्थिक स्थिरता वाढविण्यासाठी आणि अनपेक्षित परिस्थितींचा सामना करण्यासाठी वैकल्पिक योजना बनवण्यास वेळ हवा असतो. हीच गोष्ट व्यवसायावरदेखील लागू होते, ज्यामध्ये केवळ योग्य रितीने डिझाइन केलेल्या योजना लक्ष्य गाठायला मदत करतात.

भागीदारी करार आहे

सरळ शब्दात सांगायचे तर, लग्न जणू एका प्रकारची भागीदारी आहे असे समजा, जी तुम्हाला यशस्वी करायची आहे. विवाह समुपदेशक दिव्या राणा म्हणते की ध्येय ठेवा आणि ते एका टीमप्रमाणे पूर्ण करण्यास सहमती दर्शवा. लक्षात ठेवा की सर्वात यशस्वी भागीदारी प्रत्येक भागीदाराची सर्वोत्तम आणि अद्वितीय वैशिष्ट्ये वापरते. तुमच्यातील एक जण आर्थिक व्यवहार हाताळण्यात तज्ज्ञ असू शकतो तर दुसरा योजना आखण्यात. आपण एकमेकांच्या या वैशिष्ट्यांचा तसाच आदर केला पाहिजे ज्याप्रमाणे व्यवसायातील भागीदार आपापसात करतात.

मानसशास्त्रज्ञ अनुराधा सिंह यांचा असा विश्वास आहे की आपले वैवाहिक जीवन एखाद्या खासगी कंपनीसारखे चांगल्या संप्रेषणासह चालविणे आणि ते यशस्वी करण्याची इच्छा ठेवणे खूप महत्वाचे आहे. एक चांगला व्यावसायिक आपल्या कर्मचाऱ्याचा सन्मान करतो आणि त्याची काळजी घेतो, म्हणूनच कर्मचारी त्याचा आदर करतात आणि अपेक्षेपेक्षा जास्त काम करतात.

कामाची नैतिकता महत्त्वपूर्ण आहे

भले तो व्यवसाय असो की लग्न, दोघेही कार्य नीतिवर चालत असतात. दोघांमध्येही गुंतवणूक करावी लागते. आपण आपले पोर्टफोलिओ ज्या पद्धतीने व्यवस्थापित करता त्याच प्रकारे लग्नामध्येदेखील आपल्याला आपल्या संबंधांचे पोर्टफोलिओ व्यवस्थापित आणि अद्ययावत करावे लागत असतात.

जर आपण आपल्या आवडत्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम करू शकत असाल तर समान वैचारिक नीति आपल्या लग्नाला लागू होत नाही का? गोष्ट आश्चर्यकारक वाटू शकते, परंतु आपण आपल्या कारकीर्दीत जे यश आणि कौशल्य प्राप्त केले आहे तेच वैवाहिक जीवनात हस्तांतरित करा. त्यानंतर आपण ज्याप्रकारे आपली कंपनी उभी केली त्याचप्रकारे आपण एक मजबूत कुटुंब तयार करण्यास सक्षम असाल.

अहंकार दूर ठेवा

विवाह असो किंवा व्यवसाय, दोहोंमध्ये जर अहंकार डोके वर काढू लागला तर व्यवसाय कोसळतो आणि विवाहामध्ये संघर्ष किंवा विभक्तता येते. म्हणूनच असे मानले जाते की योग्यरित्या चालविला जाणारा व्यवसाय योग्यरित्या चालणाऱ्या लग्नासारखाच आहे. दोघेही त्यांच्या खेळाडूंचा अहंकार वाढू देत नाहीत.

अहंकार हा एक असा आवेग आहे, जो दाम्पत्याला त्यांच्या स्वार्थातून बाहेर येण्यास आणि एकमेकांप्रति पूर्णपणे समर्पित होण्यास प्रतिबंधित करतो, भले ते जोडपे एकमेकांना खूप प्रेम आणि आदर देण्याची इच्छा ठेवत असेल तरी. याचप्रमाणे, व्यवसाय अपयशी होण्याचे मुख्य कारण म्हणजे अहंकारच असतो, कारण मालकास तो त्याच्या अधीनस्थांशी योग्य वागणूक देण्यात किंवा त्यांच्या समस्या समजून घेण्यापासून प्रतिबंधित करतो.

वचनबद्धता महत्वाची आहे

विवाह असो किंवा व्यवसाय, दोन्ही ठिकाणी सहकार्य आवश्यक आहे. जर दोन्ही ठिकाणी कोणतीही तडजोड झाली नाही तर अयशस्वी होण्यास जास्त वेळ लागत नाही. तडजोडीबरोबरच संवाद हा एक असा आधार आहे, जो दोघांनाही यशस्वी बनवतो.

एकमेकांना बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी दोघांनीही स्वत:ला सुधारण्यावर लक्ष्य केंद्र्रित केले पाहिजे. संवादाव्यतिरिक्त, लग्न निभवण्यासाठी वचनबद्धतादेखील आवश्यक घटक आहे, अगदी तसेच जसे ते व्यवसाय चालविण्यासाठी आवश्यक असते. जिथे कोणतीही वचनबद्धता नसते तेथे जोडप्यांमध्ये ना विश्वास असेल, ना समर्पणाची भावना आणि ना जबाबदारीची जाणीवही.

त्याचप्रमाणे, जर व्यवसायात कोणतीही वचनबद्धता नसेल तर बॉस त्याबद्दल चिंता करणार नाही, किंवा त्यात सुधारणा करण्यासाठी कठोर परिश्रम करणार नाही. अशा परिस्थितीत हा व्यवसाय जास्त काळ टिकू शकणार नाही. तशाच प्रकारे वैवाहिक जीवनही याच्या अभावाने एका जागी येऊन थांबेल आणि पती-पत्नी दोघांसाठीही एकमेकांची साथ ही कोणत्याही शिक्षेपेक्षा कमी असणार नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें