लग्नापूर्वी या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष

* रेणू गुप्ता

मुंबईतील एका पीजीमध्ये राहणारी सोनम तिच्या रूममेट मोहनाला म्हणाली, ‘‘अगं, जेव्हापासून पप्पांनी मला निर्वाणीचे सांगितले आहे की, या वर्षाच्या अखेरीस तुला सजलसोबत लग्न करावे लागेल तेव्हापासून मी खूप गोंधळून गेले आहे. सजल आणि मी डेटिंग करत आहोत, पण मला अजूनही १०० टक्के खात्री नाही की, मी त्याच्यासोबत आनंदी राहीन.’’

‘‘माझी पण अशीच अवस्था आहे. काल, आई मला सांगत होती की, तू आता २७ वर्षांची झाली आहेस. चांगली कमावती आहेस, एकदा का तू लग्न केलेस की, मी माझ्या जबाबदारीतून मोकळी होईन.’’

‘‘लग्नाचा नुसता विषय निघाला तरी मला भीती वाटते. मी कधीकधी मनुजसोबत डेटवर जाते, पण सध्या आमच्यात लग्नाबद्दल काहीही बोलणी सुरू नाहीत. मला कळत नाही की, काय करावे,’’ मोहना म्हणाली.

लग्नानंतर, पती-पत्नीच्या आयुष्यात खोलवर बदल होतात. ‘मी’ ही विवाहपूर्व संकल्पना ‘आपण’ मध्ये रूपांतरित होते, पण, लग्न करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणींसाठी ‘मी’ ते ‘आपण’ असा प्रवास सोपा नसतो. विशेषत: जे बराच काळ एकटे राहातात त्यांच्यासाठी तो अधिक अवघड असतो. जर वैवाहिक नातेसंबंधात प्रवेश करणाऱ्या अविवाहित मुलींनी लग्नापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले तर मात्र त्या नि:संशयपणे यशस्वी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या वैवाहिक जीवनाचा पाया रचण्यात यशस्वी होतील.

डेटिंग

लग्नापूर्वी तरुणीने तिच्या भावी पतीला अनेकदा भेटले पाहिजे. त्याच्यासोबत भरपूर वेळ घालवला पाहिजे. जर तो लांब राहात असेल आणि हे शक्य नसेल तर फोन किंवा चॅटद्वारे त्याला पूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून ती हे समजून घेऊ शकेल की, तो पती म्हणून तिच्या सुयोग्य, तार्किक अपेक्षा पूर्ण करू शकेल का?

मुलीला त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, स्वभावाबद्दल आणि चारित्र्याबद्दल खात्री असली पाहिजे की, तो तिच्या अपेक्षेनुसार खरोखरच तिचा सुयोग्य पती ठरेल.

भावना

यशस्वी वैवाहिक जीवनासाठी जोडप्यांमधील परस्पर प्रेम ही पहिली अट आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला, त्याच्या सर्व क्षमता आणि कमकुवतपणासह, तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणून स्वीकारण्यास तयार आहात का? तुम्हाला त्याच्यावर इतके प्रेम आहे का, की तुम्ही त्याच्याशिवाय आनंदी जीवनाची कल्पनाही करू शकत नाही? तुमचे हृदय त्याच्यासाठी धडधडते का? त्याच्याशिवाय तुम्हाला अस्वस्थ वाटते का? जेव्हा तो तुमच्या नजरेआड होतो तेव्हा तुम्हाला एक अवर्णनीय शून्यता जाणवते का?

जर या प्रश्नांची उत्तरे तुमच्यासाठी ‘हो’ असतील तर तुम्ही तुमच्या नात्यातील या सर्वात महत्त्वाच्या भावनेबद्दल आत्मविश्वास बाळगू शकता आणि त्या व्यक्तीशी लग्न करू शकता.

विश्वास

एकमेकांवर अढळ विश्वास, ही यशस्वी लग्नाची गुरुकिल्ली आहे. म्हणून, लग्नाचे पाऊल उचलण्यापूर्वी, तुमच्या दोघांमध्ये विश्वास आहे, याची खात्री करा. एकमेकांवरील विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया आहे. यामुळे नाते मजबूत होते. केवळ परस्पर विश्वासच जोडप्यामध्ये एक मजबूत नाते निर्माण करू शकतो. त्याशिवाय हे नाते फुलू शकत नाही. वैवाहिक नात्यात या भावनेची उपस्थिती खोली गाठू शकत नाही, त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या जोडीदारावर आंधळेपणाने अवलंबून राहू शकता.

चांगल्या समन्वयासाठी आणि परस्पर आदरासाठी परस्पर विश्वास आवश्यक आहे. तो नसल्यास असुरक्षितता आणि संशयाची भावना निर्माण होऊ शकते, जी तुमच्या नात्यासाठी नुकसानदायक ठरू शकते.

जवळीक

आनंदी आणि समाधानकारक नातेसंबंधासाठी जवळीक, ही एक पूर्वअट आहे. वैवाहिक नातेसंबंधातील जवळीक जोडीदारांमधील भावनिक संबंध मजबूत करते. जोडप्यांमधील जवळीक एकमेकांवरील विश्वास वाढवते, ज्यामुळे परस्पर समज वाढते आणि पती-पत्नी जवळ येतात.

जवळीक मजबूत आणि निरोगी लैंगिक संबंधांना प्रोत्साहन देते, जे एका परिपूर्ण विवाहाचा पाया रचते. परस्पर जवळीक निर्माण करण्यासाठी दोन्ही जोडीदारांकडून नियमित प्रयत्नांची आवश्यकता असते. जवळीकता ऋणानुबंध मजबूत करते आणि संघर्ष चांगल्या प्रकारे हाताळण्यास दोघांनाही मदत करते. म्हणून, लग्न करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या जोडीदाराशी अगदी सहजतेने निरोगी जवळीक निर्माण करू शकता का, याची खात्री करा.

वचनबद्धता

कमिटमेंट अर्थात वचनबद्धता म्हणजे तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सर्व परिस्थितीत त्याच्या पाठीशी उभे राहाल. सुख असो किंवा दु:ख, तुम्ही त्याला कधीही सोडणार नाही. वचनबद्धता म्हणजे आयुष्यभर एकमेकांवरील प्रेम टिकवून ठेवण्याचे वचन म्हणजे वचनबद्धता.

तुम्ही आयुष्यभर मानसिक, शारीरिक, भावनिक आणि आध्यात्मिकरित्या तुमच्या जोडीदाराशी वचनबद्ध राहू शकाल का, हे पाहाण्यासाठी लग्न करण्यापूर्वी तुम्ही थोडे आत्म-विश्लेषण करा.

थोडे ऐका, थोडे बोला

निरोगी वैवाहिक जीवनासाठी संवाद महत्त्वाचा आहे. जर एखाद्या वादग्रस्त विषयावर तुमच्या जोडीदारासमोर तुमच्या भावना उघडपणे व्यक्त करण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही तुमचा राग रोखू शकता. मन दुखावले जाण्यापासून वाचू शकता.

वैवाहिक नात्यात, जोडीदाराने त्यांच्या भावना स्पष्टपणे व्यक्त करताना संकोच बाळगू नये, कारण जोपर्यंत तुम्ही जोडीदाराला तुमच्या मनात काय आहे, ते सांगत नाही तोपर्यंत त्याला तुमच्या गरजा, वेदना, विचार किंवा दृष्टिकोन समजणार नाही. यामुळे तुमच्यात मतभेद निर्माण होतील. याउलट संवादामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या दृष्टिकोनातून कोणतीही समस्या हाताळण्यास मदत होईल.

संयम आणि क्षमा

वैवाहिक जीवनात, संघर्ष, मतभेद, भांडणे आणि वाद स्वाभाविक आहे, कारण दोन्ही जोडीदारांच्या संगोपनाच्या पद्धती, मूल्ये, तत्त्वे आणि कौटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळ्या असतात. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये हे संघर्ष आणि मतभेद सोडवण्यासाठी आवश्यक असलेला संयम आणि सहनशीलता आहे का, याचा विचार लग्नापूर्वीच केला पाहिजे. तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये एकमेकांच्या किरकोळ चुका आणि कमतरता सहन करण्याची आणि त्याकडे दुर्लक्ष करण्याची क्षमता आहे की नाही, हे जाणून घेतले पाहिजे, कारण सहिष्णुतेच्या अभावामुळे, किरकोळ वाददेखील हिंसक वळण घेतात, ज्यामुळे वैवाहिक नात्यासारख्या गोड नात्याचे नुकसान होते.

तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकमेकांच्या छोट्या-मोठ्या चुका माफ करण्याची संधी मिळाली पाहिजे, जर असे नसेल तर नात्यात कटुता आणि राग वाढतो आणि दोन्ही जोडीदारांमध्ये अंतर येऊ लागते. म्हणूनच, तुमच्यामध्ये आणि तुमच्या जोडीदारामध्ये एकमेकांप्रती संयम आणि क्षमाशीलता आहे की नाही, हे जाणून घ्या.

परस्पर आदर

वैवाहिक जीवनात प्रवेश करणाऱ्या दोन्ही जोडीदारांमधील परस्पर आदर, ही यशस्वी लग्नासाठी एक महत्त्वाची अट आहे. म्हणूनच, जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम ही भावना तुमच्या नात्यात प्रबळ आहे की नाही, हे जाणून घ्या. तुमच्या जोडीदाराबद्दलचा आदर तुम्हाला आयुष्यातील कोणत्याही संघर्ष, मतभेद किंवा वादावर सहज मात करण्यास मदत करेल.

जर नात्यात गैरवापर किंवा अनादर असेल तर तुम्ही नात्याला लग्नात रूपांतरित करण्यापासून दूरच राहिले पाहिजे.

मैत्री

लग्नातील स्थिरतेसाठी पती-पत्नीमध्ये मैत्री आवश्यक आहे. यशस्वी वैवाहिक जीवनासाठी ती एक महत्त्वाची अट आहे. वैवाहिक नात्यात मैत्रीचा सुगंध नि:संशयपणे नात्यात गोडवा आणि ताजेपणा आणतो, नाते कंटाळवाणे किंवा नीरस होण्यापासून रोखतो आणि बंध मजबूत करतो.

म्हणूनच, लग्नापूर्वी, तुमच्या नात्यात मैत्री आहे की नाही, याचे आत्मपरीक्षण करा. जर मैत्री असेल तर ती तुमच्या वैवाहिक जीवनात प्रवेश करण्यासाठीचा हिरवा कंदील समजा आणि जर ती तुमच्या नात्यात हरवली असेल तर तुम्हाला ती तुमच्या नात्यात घेऊन येण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी तुमच्या नात्याला आणखी थोडा वेळ द्यावा लागेल. लक्षात ठेवा, जर लग्नाचा पाया निरोगी मैत्रीवर रचला गेला असेल तर त्यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.

निरोगी नाती व्यक्तिमत्त्वाचा आरसा

* शोभा कटारे

अलीकडे आपण आपल्या आरोग्याबाबत खूपच जागरूक राहतो. यासाठी आपण चांगलं खाणपिणं, पोषण, फिटनेस, ऑरगॅनिक उत्पादनं आणि पर्यावरणाकुल प्रथांवर अधिक लक्ष देतो. परंतु आपण कधी अस्वस्थ म्हणजेच बिघडलेल्या नात्यांबद्दल विचार केला आहे का? बिघडलेले वा वाईट नातेसंबंधदेखील आपल्या आरोग्यासाठी फास्ट फूड आणि प्रदूषणाप्रमाणे हानिकारक असू शकतात. बिघडलेली नाती आपल्याला बेचैन, उदास, घाबरवून टाकण्याची अनुभूती देऊ शकतात, सोबतच मानसिकरित्या आजारी आणि कमकुवतदेखील बनवू शकतात. नाती आपल्या जन्मापासून मरणापर्यंत आपल्यामध्ये राहतात. नाती आपले आई-बाबा, कुंटुंबिय, सहकारी, मित्र इत्यादींपासून सुरू होतात. यापैकी प्रत्येक नातं आपल्याला मदत करू शकतं आणि आपल्याला समृद्ध आणि चांगली व्यक्ती बनू शकतं, सोबतच आपल्याला आनंद देऊ शकतात. अस्वस्थ नाती कधीच यापैकी कोणत्याही भावनांना पाठिंबा देऊ शकत नाहीत.

आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण आपल्या भावनिक आणि मानसिक आरोग्याला अशा प्रकारे सुरक्षित ठेवावं ज्या प्रकारे आपण आपल्या शारीरिक आरोग्याला सुरक्षित ठेवतो.

खरंतर निरोगी आणि अस्वस्थ नातीं आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक आरसादेखील असतात. काही नाती तर आपल्याला जन्म घेताच मिळतात जसं की आईबाबा, भाऊबहीण, मावशी वा आत्या इत्यादी जे आपल्याला स्वीकारावे लागतात, परंतु काही नाती जसं की पतीपत्नी, मैत्री, शेजारी, ऑफिस सहकारी इत्यादीमध्ये जी नाती बनतात ती एक तर आपल्या मर्जीने वा आवडीने बनतात. हा, एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती की नाती बनवणं खूपच सोपं असलं तरी ती सांभाळणं वा साकारणं देखील एक कला आहे. हे कोणीही व्यक्तीसोबत घेऊन जन्म घेत नाही तर त्यावेळी काळाबरोबरच ती शिकली जातात.

कोणत्याही व्यक्तीचं यश फक्त त्याची आर्थिक परिस्थिती वा करिअरने ठरत नाही, तर हे देखील बघितलं जातं की त्याचे मित्र, नातेवाईकांशी संबंध कसे आहेत. जर नाती निरोगी असतील तर त्याला एक यशस्वी व्यक्ती मानलं जातं आणि जर तो बिघडलेल्या नात्यांसोबत राहत असेल तर त्याची मोजदाद एक अयशस्वी आणि वाईट माणसाच्या रूपात केली जाते. म्हणून निरोगी आणि बिघडलेली नाती आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक आरसा देखील असतो.

निरोगी नात्यांसाठी काही गोष्टी मदतनीस ठरतात :

चांगले श्रोता बना

दीर्घकाळपर्यंत नातं चांगलं ठेवण्यासाठी गरजेचं आहे की तुम्ही एक श्रोता व्हा म्हणजेच दुसऱ्यांच्या गोष्टी देखील ऐका, स्वत:चंच सुरू करू नका आणि नेहमी हे पाहिलं जातं की ज्या लोकांना फक्त स्वत:चेच सांगण्याची सवय असते त्यांच्यापासून लोक दूर राहतात, तर जी लोकं शांतपणे इतरांच्या गोष्टी ऐकतात त्यांच्यावर सगळेच प्रेम करतात आणि दीर्घकाळपर्यंत त्यांच्याशी जोडले जातात.

अपेक्षा कमीत कमी असाव्यात

नाती तेव्हाच घट्ट होतात जेव्हा अपेक्षा कमीत कमी असतील. अनेक नाती फक्त यासाठी तुटतात की आपण त्यांच्याकडून गरजेपेक्षा जास्त अपेक्षा ठेवू लागतो आणि सतत आपल्या तक्रारींचा पेटारा खोलून बसतो, तसंच हे देखील विसरून जातो की आपण त्यांना काय दिलंय? कसं वागलो आहोत? इत्यादी. निरोगी नात्यांमध्ये नेहमीच देण्याची सवय ठेवा. अपेक्षेची सवय जेवढी कमी असेल नाती तेवढीच जास्त सुंदर आणि दीर्घकाळपर्यंत राहतील.

नात्यांच्या चांगल्या बॉण्डींगसाठी वेळ काढा

आजच्या धावपळीच्या लाईफस्टाईलमध्ये वा जीवनशैलीमध्ये नात्यांसाठी वेळ काढणं थोडं कठीण होत चाललंय. नातं कोणतंही असो चांगल्या बॉण्डिंगसाठी वेळ देणं गरजेचं आहे कारण एकमेकांना समजून घेणं सोपं जावं अन्यथा वाद आणि भांडणं होण्याची शक्यता असते कारण अनेकदा कोणत्याही नात्यांमध्ये हे ऐकलं जातं की पहा जेव्हा गरज लागली तेव्हा फोन केला वा आला. आता भेटायला वेळ मिळाला वा आता आठवण आली आमची वगैरे वगैरे. या सर्वांपासून वाचण्यासाठी आणि चांगल्या नात्यासाठी तुमच्या धावपळीच्या जीवनशैलीमधूनदेखील आवर्जून वेळ काढा.

यूज अँड थ्रो पासून दूर रहा

कोणत्याही निरोगी नात्यासाठी हे गरजेचे आहे की फक्त कामासाठीच नाही तर नेहमी प्रत्येकवेळी आपल्या प्रियजनांच्या संपर्कात रहा. जर तुम्ही तुमच्या मित्र नातेवाईकांची फक्त कामाच्यावेळी आठवण काढत असाल तर समजून जा की, तुमचं हे नातं जास्त काळपर्यंत टिकणार नाहीये. यामुळे लोकांना वाटू लागतं की तुम्ही स्वार्थी आहात आणि फक्त कामाच्या वेळीच इतरांची आठवण काढता. नाती युज अँड थ्रोच्या श्रेणीत येत नाही. म्हणून फक्त कामासाठी नाही तर नेहमी तुमच्या प्रियजनांच्या संपर्कात रहा. यासाठी खास सणउत्सव जसं की सणवार, नवीन वर्ष, बर्थडे एनिवर्सरी इत्यादीवेळी थोडा वेळ काढून शक्य असेल तर भेटा अन्यथा फोन आठवणीने करा आणि त्यांना शुभेच्छा द्या यामुळे नात्यांमध्ये नेहमी मधुरता राहते.

प्रशंसा करा

प्रशंसा सर्वांनाच आवडते म्हणून प्रशंसा करण्यात कोणत्याही प्रकारचा कंजूषपणा करू नका. हा त्यांच्यासाठी एक मानसिक खुराक असू शकतो. जेव्हा देखील तुमच्यासाठी कोणी काही चांगलं केलं, तुमचं वैयक्तिक, कौटुंबिक वा व्यावसायिक जीवनात यश मिळवलं तर त्यांची प्रशंसा आवर्जून करा. प्रत्येकाला स्पेशल फील होणं आवडतं, म्हणून कधी कधी ही संधी देत राहा. असं केल्याने नात्यांना तणावापासून दूर ठेवता येतं.

इगो दूर ठेवा

जर एखाद्या कारणामुळे नात्यांमध्ये कडवटपणा वा दुरावा आला, भांडण झालं असेल तर तुमच्या इगोला आड येऊ देऊ नका. नात्यांना पुन्हा बनवणं वा जोडणं, भांडण दूर करण्यामध्ये उशीर करू नका. अगोदरच तुम्ही या गोष्टींमध्ये पडू नका. पहिलं पाऊल उचलून तुमच्या समजूतदारपणाचा परिचय द्या आणि नात्यांना निरोगी बनवा.

तुलनेपासून दूर रहा

अनेकदा प्रत्येक नात्यांमध्ये हे पाहिलं जातं की प्रत्येक वेळी आपण तुलना करत राहतो. आपण मी का असं करू, आम्ही का असं करायचं, त्यांनी देखील असं केलं नाही तर मग आम्हीच का करायचं. त्यांनी आपल्याला नाही बोलवलं तर आपण का बोलवायचं वगैरेवगैरे काही असेच प्रश्न आपल्याला विनाकारण त्रास देत असतात म्हणून कोणत्याही नात्याला निरोगी ठेवण्यासाठी तुलना करू नका. तुम्ही तेच करा जे तुम्हाला करायचं आहे आणि समोरच्याला व्यवहार वा देण्याघेण्याची तुलना करू नका. तेव्हाच तुम्ही नात्यांना निरोगी ठेवू शकाल.

तंत्रज्ञानाची मदत घ्या

आजच्या डिजिटल युगात टेक्नॉलॉजी आपल्या दररोजच्या आयुष्याचा एक भाग बनली आहे. अगदी आपण आपल्या स्मार्ट फोनने सोशल मीडिया आणि व्हिडिओ कॉल करून आपल्या जवळच्यांशी जोडले जाण्यावरती खूप विश्वास ठेवू लागलोय. अॅडव्हान्स टेक्नॉलॉजीने आपल्या जिवलगांसोबत जोडणं पूर्वीपेक्षा अधिक सहजसोपं झालंय, म्हणून जर खास प्रसंग जसं की बर्थ डे, अॅनिव्हर्सरी वा एखाद्या सणावारी तुमचे मित्र, कुटुंबियांशी कनेक्ट वा जोडले जाण्यासाठी टेक्नॉलॉजीची मदत घ्या.

ईर्षेच्या भावनेपासून दूर राहा

नातं कोणतंही असो जर तुम्ही इर्षेच्या भावनेपासून दूर राहिला तर नक्कीच ते नातं चांगलं राहील. तणावरहित आणि सुंदर होईल कारण अनेकदा पाहिलं जातं की जेव्हा देखील आपण एखाद्या परिचित, नातेवाईक वा एखादा मित्र अथवा भाऊबहिणीकडे काही चांगलं असलं, जसं की त्यांच्याकडे नवीन कार आली वा नवीन घर विकत घेतलं, चांगली नोकरी लागली वा त्यांचा मुलगा अभ्यासात चांगला असेल तर आपल्याला जळफळाट वा इर्षा होऊ लागते की यांच्याकडे सगळं का चांगलं झालंय, ज्यामुळे आपण विनाकारण बेचैन राहतो वा होत असतो. मग उगाचच आपण त्यांचं अभिनंदन करतो आणि खोटी प्रशंसा देखील करतो, परंतु खूपच दु:खी मनाने आणि ही भावना आपल्याला मानसिकरित्या आजारी देखील करू शकते.

जेव्हा नात्यात एखादा असा क्षणही येतो

* शोभा कटारे

नाती एका दिवसात बनत नाहीत आणि तुटतही नाहीत. ही एक दीर्घ प्रक्रिया आहे. जर तुमच्या दोघांमध्ये प्रेम आणि चांगला समन्वय असेल तर नात्यातील समस्या सोडवता येतात. जरी काही तक्रार असली तरी ती एकमेकांशी बोलून आणि ऐकून सोडवता येते.

आतल्या आत गुदमरून जाणे, प्रत्येक छोट्या गोष्टीवरून वाद घालणे आणि भांडणं करणे हे कोणत्याही नात्यासाठी, विशेषत: वैवाहिक नात्यासाठी घातक ठरू शकते. अनेकदा असे घडते की, जेव्हा नात्यात रुक्षपणा येतो तेव्हा तुमचा जोडीदार ज्या प्रकारे हसतो किंवा एखादा विनोद सांगतो किंवा तुमच्यावर टिप्पणी करतो तेव्हा तुम्हाला ते त्रासदायक वाटू शकते. म्हणूनच नात्यात थोडीशी गंमत करणे आवश्यक आहे, पण ही गंमत अंतहीन भांडणात बदलू नये याची काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे.

राहुल आणि सुनीता यांचा दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता, पण आता दोघांनाही एकमेकांसोबत राहाणे कठीण होत चालले आहे, कारण सुनीताच्या ज्या गोष्टी आणि सवयी लग्नापूर्वी राहुलला आवडत होत्या, त्या आता त्याला आवडत नाहीत.

सुनीतालाही राहुलबद्दल असेच वाटते, ज्यामुळे त्यांच्यात छोट्या गोष्टींवरूनही वाद आणि भांडणं होतात. त्यामुळे त्यांना एकमेकांसोबत राहाणे कठीण झाले आहे. अचानक नात्यात रुक्षपणा आला आहे. नाते पुढे न्यायचे की तोडायचे, याचा ते विचार करत आहेत.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि वेळेच्या कमतरतेमुळे, अनेक जोडप्यांमध्येही असेच घडत आहे. काही काळानंतर, नात्यात रुक्षपणा येऊ लागतो ज्यामुळे तणाव निर्माण होतो आणि दोघेही ब्रेकअप म्हणजे तुटण्याच्या दिशेने वाटचाल करतात. आजकाल, याला ‘मोमेंट’ म्हणजेच असाही एक क्षण, असे म्हणतात.

असाही एक क्षण, म्हणजे काय

‘मोमेंट’ अर्थात असाही एक क्षण म्हणजे नाते तुटण्यापूर्वीचा एक धोक्याचा इशारा, तो जर वेळीच ओळखला नाही तर त्याचा तुमच्या नात्यावर परिणाम होऊ शकतो. मग नाते वाचवणे थोडे कठीण होऊ शकते.

लग्न स्वत:च्या मर्जीने असो, म्हणजे प्रेमविवाह असो किंवा ठरवून केलेले लग्न असो, दोन्ही परिस्थितींमध्ये जोडप्याला एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो, कारण लग्नापूर्वी आणि लग्नाच्या पहिल्या काही वर्षांत किंवा दिवसांमध्ये आपण एकमेकांसोबत घालवलेला वेळ चांगला असतो. त्यानंतर आपण गुलाबी रंगाच्या चष्म्यातून नात्याकडे पाहातो आणि त्याचवेळी आपण ‘तुम्ही कोण आहात’ यावर लक्ष केंद्रित करतो, म्हणजेच तुम्ही कोण आहात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहातो, पण जसजसा वेळ जातो तसतसे आपण एकमेकांच्या सवयी आणि वर्तनाशी परिचित होतो.

मग काही गोष्टी असह्य होतात. त्यानंतर आपण ‘तुम्ही काय आहात’ यावर लक्ष केंद्रित करू लागतो, म्हणजेच आपल्याला कळते की तुम्ही काय आहात? मग आपल्याला आपल्या जोडीदाराच्या काही गोष्टी, सवयी आणि वागणे आवडत नाही. त्यामुळे आपल्याला त्याच्याशी जुळवून घेण्यात अडचणी येऊ लागतात. त्यानंतर हळूहळू नात्यात रुक्षपणा येऊ लागतो.

मग त्या जोडप्याला असे वाटू लागते की, जर हे असेच चालू राहिले तर नाते जास्त काळ टिकवणे खूप कठीण होऊ शकते, कारण ते रोजची भांडणं, वाद आणि मारामारीमुळे अस्वस्थ होऊ लागतात आणि ते टाळू इच्छितात, कारण यामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ लागतो, ज्यामुळे अनेकदा ब्रेकअप होतो म्हणजे नाते तुटते.

जर तुम्हाला त्या क्षणी तुमचे नाते तुटण्यापासून वाचवायचे असेल तर तुम्ही या गोष्टी अवलंबू शकता :

चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा

जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत बराच काळ राहाता तेव्हा अशी परिस्थिती येते जेव्हा तुम्हाला एकमेकांबद्दल, एकमेकांच्या सवयी किंवा वागणुकीतील काहीतरी आवडत नाही. अशावेळी चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आणि वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करणे चांगले ठरेल, तरच तुम्ही कोणत्याही नात्यात कोणत्याही अडचणीशिवाय पुढे जाऊ शकता.

एकमेकांशी बोला

तुमच्या व्यस्त आयुष्यातून थोडा वेळ काढा आणि समोरासमोर बसून एकमेकांचे ऐका. समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तडजोड करा, जेणेकरून तुम्ही वाद आणि भांडणांपासून दूर राहू शकाल आणि तुमचे नाते दीर्घकाळ टिकवून ठेवू शकाल.

योग्य निर्णय घ्या

कधीकधी नात्यात अशी परिस्थिती उद्भवते जिथे आपण इच्छा असूनही एकमेकांशी जुळवून घेऊ शकत नाही आणि मग काळानुसार तणाव वाढत जातो. अशावेळी, नातेसंबंध काळजीपूर्वक पुढे नेऊ इच्छित असाल किंवा पूर्णपणे मागे हटू इच्छित असाल तर सुज्ञ निर्णय घेणे हाच सर्वोत्तम पर्याय आहे.

चूक मान्य करा

कोणताही वाद टाळण्यासाठी आणि नाते निरोगी ठेवण्यासाठी, आपली चूक मान्य करणे हा एक चांगला पर्याय आहे. हे नाते सुधारण्यासाठी मदत करते, सोबतच नाते दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी, एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टींवर प्रतिक्रिया देण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करणे खूप महत्वाचे आहे. यामुळे एकमेकांबद्दलची ओढ वाढते.

सीमा निश्चित करा

विशिष्ट वेळेनंतर, वैवाहिक नात्यात प्रत्येक छोट्या गोष्टीत हस्तक्षेप केल्याने अनेकदा गुदमरल्यासारखे वातावरण निर्माण होते. हे टाळण्यासाठी आणि निरोगी नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी, सीमा निश्चित करणे महत्त्वाचे आहे. यासाठी एकमेकांना स्पेस म्हणजे जागा देणे आणि प्रत्येक संभाषणात हस्तक्षेप करणे टाळणे गरजेचे आहे.

योग्य सल्ला घ्या

तुमचे नाते वाचवण्यासाठी, एखाद्या समुपदेशकासोबत किंवा जवळच्या मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत बसा आणि तुमचे नाते कसे वाचवायचे, याबद्दल सल्ला घ्या. हे लोक तुमचे लक्ष अशा काही गोष्टींवर केंद्रित करू शकतात ज्यांचा तुम्ही विचारही करू शकत नाही, यासाठी शक्य तितके प्रयत्न करा. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. नाते टिकवण्याचे फायदे काय आहेत आणि तुटण्याचे तोटे काय आहेत, याचा विचार करा.

चाळीशीनंतर एक नवी सुरुवात: पुरुषांसोबतच्या आनंदी मैत्रीचा प्रवास

* शिखा जैन

चाळीशीनंतरची मैत्री: चाळीशीनंतर स्त्रियांच्या आयुष्यात अनेक बदल घडतात. मुले मोठी होतात, करिअरमध्ये स्थिरता येते, हार्मोन्समध्ये बदल होतात आणि सामाजिक संबंधांची कमतरता जाणवते. या वयात स्त्रिया अनेकदा एकाकी पडतात आणि त्यांची मुले त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागतात. मुलांनाही त्यांच्या आईची तितकीशी गरज भासत नाही. घरी काही शिजवले असेल तरच ते खातात किंवा बाहेरून जेवण मागवतात. आई मायक्रोवेव्हसारखी होऊन जाते, ज्यातून गरजेनुसार अन्न बाहेर काढायचे आणि मग बंद करायचे. हीच ती वेळ असते जेव्हा स्त्रियांना भावनिक आणि मानसिक आधाराची सर्वाधिक गरज असते. अशा परिस्थितीत, कोणताही पूर्वग्रह न ठेवता ऐकून घेणारी आणि समजून घेणारी खरी मैत्रीण तुमची सर्वात मोठी ताकद बनते.

ती मैत्रीण स्त्रीच असली पाहिजे असे नाही. तुमची इच्छा असल्यास तुम्ही पुरुष मित्रही बनवू शकता. त्यात काहीच गैर नाही. खरं तर, महिलांसाठी पुरुषांशी मैत्री करणे त्यांच्या सामाजिक जीवनासाठी, करिअरसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हे नवीन समज आणि परिपक्वतेचे वय आहे. या वयातील मैत्री साधारणपणे अधिक समजूतदार, घट्ट आणि आधार देणारी असते.

जिथे मैत्री केवळ वेळ घालवण्यासाठी नसते, तर परस्पर आधार आणि विश्वासासाठी असते. म्हणून, पुरुषांना नकार देण्याऐवजी, तुम्ही त्यांच्याशी मैत्री वाढवण्यासाठी आणि एक घट्ट नाते निर्माण करण्यासाठी या पद्धती आणि गुणांचा अवलंब करू शकता:

तुमचा दृष्टिकोन बदलल्यास तुमची विचारसरणी बदलेल

तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फक्त महिला मित्रच बनवू शकता, तर ते चुकीचे आहे. ४०-४५ ते ६० या वयात, या वयातील मैत्रीसुद्धा साचेबद्ध होते. गप्पा मारण्याव्यतिरिक्त तुम्ही त्यांच्याशी काय बोलणार? दिवसभर त्याच त्याच कंटाळवाण्या संभाषणांना तुम्ही दोघेही कंटाळलेले असता.

तुम्हाला तुमच्या पतीचे विचार माहीत असतात. तो काय बोलतो, त्याचे मित्र, सगळं काही तुम्हाला माहीत असतं. तुमचा नवरा बँकेत असतो आणि त्याचे मित्रही बँकेतच असतात, आणि बँकेतल्या गप्पा आता कंटाळवाण्या वाटू लागतात. पण जेव्हा एखादा नवीन पुरुष येतो, तेव्हा तो त्याच्या मित्रमंडळींबद्दल बोलतो. उदाहरणार्थ, जर तुमची एखाद्या प्राध्यापकाशी मैत्री झाली, तर तो तुम्हाला कॉलेजमधले किस्से सांगेल. तुमच्या गप्पा ताज्या वाटतात.

पहिले पाऊल उचला, वाट पाहू नका

जर तुम्हाला एखादा पुरुष मित्र बनवायचा असेल, तर त्यात काही गैर नाही, पण तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. एकत्र चहा पिण्याचे आमंत्रण किंवा मनापासून बोललेले शब्द एखाद्याला तुमच्या जवळ आणू शकतात. मैत्रीसाठी वयाची गरज नसते, तर पुढाकाराची गरज असते.

तुमच्या आवडीनिवडींना मैत्रीचा स्रोत बनवा

जर तुम्हाला नाटक बघायला, वाचायला, पुस्तक प्रदर्शनांना भेट द्यायला, संगीताचा आनंद घ्यायला किंवा प्रवास करायला आवडत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तुमच्यासारख्याच आवडीनिवडी दुसऱ्या कोणामध्ये आहेत, जरी तो फक्त एक कौटुंबिक मित्र असला तरी, तुम्ही त्यांच्याशी बराच वेळ बोलू शकता. जर तुमच्या आवडीनिवडी जुळल्या, तर तुमच्यासाठी एक नवीन मैत्री वाट पाहत असू शकते.

पण तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. जर तुम्हाला असा कोणी भेटला, तर ‘या वयात मी पुरुष मित्र कसा बनवू?’ असा विचार करून स्वतःला दूर ठेवू नका. ही केवळ एक भीती आहे. पण जर तुम्ही अशी मैत्री केली, तर तुम्हाला त्याचा खूप आनंद मिळेल, कारण तुमच्या संभाषणाचे विषय खूप सारखे असतील आणि तुम्हाला एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेता येईल.

मैत्रीला गांभीर्याने घेणारा मित्र हवा आहे का?

एका विशिष्ट वयानंतर, स्त्रियांना असा जोडीदार हवा असतो, ज्याच्यासोबत त्या मैत्री करू शकतील आणि विश्वास ठेवू शकतील. जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला सांगते की ती त्याला तिचा जिवलग मित्र मानते, तेव्हा तिचा अर्थ असा असतो की तो तिच्यासाठी खरोखरच खास आहे. ती तिच्या जोडीदाराकडूनही तीच अपेक्षा करते. तिला तिच्या जोडीदाराच्या भावनाही तितक्याच प्रामाणिक असाव्यात असे वाटते. प्रौढ स्त्रियांना वचनबद्धतेपासून दूर राहणारे पुरुष आवडत नाहीत. हेच या वयातील पुरुषांनाही लागू होते; त्यांना एक खरा जोडीदार हवा असतो, केवळ वेळ घालवण्यासाठी नाही. म्हणून, पुरुष असो वा स्त्री, तुम्ही कोणासोबतही नातेसंबंधात आलात, तर ते गांभीर्याने घ्या.

फ्लर्टिंग, सेक्स नाही

चाळीशीनंतरच्या या कंटाळवाण्या वर्षांमध्ये, फ्लर्ट करा. सेक्स करू नका. शारीरिक आकर्षणाऐवजी मानसिक आकर्षणावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या शब्दांनी त्यांना आव्हान द्या, त्यांच्या स्वप्नांबद्दल आणि कल्पनांबद्दल बोला. जेव्हा दोन व्यक्ती मानसिकरित्या जोडल्या जातात, तेव्हा ते आकर्षण लैंगिक संबंधांपेक्षा खूप खोल आणि अधिक काळ टिकणारे असते.

पण ज्यांना आपल्या मर्यादा माहित आहेत, तेच फ्लर्टिंगचा आनंद घेऊ शकतात. तुम्ही हे फक्त चांगला वेळ घालवण्यासाठी आणि चांगल्या संभाषणासाठी करत आहात, हे तुमच्या मनात स्पष्ट असले पाहिजे. जेव्हा तुम्ही आतून स्पष्ट असता, तेव्हा तुमचे वर्तनही तेच संकेत देते.

फ्लर्टिंगला एक खेळ समजा, जिथे एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेणे आणि चांगले वाटणे हा मुख्य उद्देश असतो. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुमचे सामाजिक वर्तुळ अधिक उत्साही होते.

मैत्रीसाठी हलकासा स्पर्श किंवा खांद्यावर हात ठेवणे ठीक आहे, पण चुकीचा संदेश देणारी जवळीक टाळा.

नेहमी ‘आदरपूर्वक अंतर’ ठेवा, जेणेकरून तुम्ही फक्त संभाषणाचा आनंद घेत आहात हे स्पष्ट होईल.

नवीन पुरुष मित्र कसे बनवावेत आणि मित्र बनल्यास त्याच्याशी कसे बोलावे?

एखाद्या पुरुषाशी संपर्क साधणे आणि मैत्री सुरू करणे ही एक कला आहे, ज्यामध्ये आत्मविश्वास आणि सहजता महत्त्वाची आहे. येथे काही व्यावहारिक टिप्स आणि संपर्क साधण्याची कौशल्ये दिली आहेत:

उदाहरण १ –

जर तुम्ही रेस्टॉरंटमध्ये असाल—”इथली मखनी डाळ खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही ती यापूर्वी खाल्ली आहे का?”

उदाहरण २ –

एखाद्या कार्यक्रमात—”वक्त्याने ज्या गुंतवणुकीबद्दल सांगितले त्याबद्दल तुमचे काय मत आहे?”

उदाहरण ३ –

पुरुषांना अनेकदा सल्ला द्यायला किंवा त्यांचे ज्ञान वाटायला आवडते. संभाषण सुरू करण्याचा हा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे.

“मी एक नवीन गॅझेट/उपकरण विकत घेण्याचा विचार करत आहे. तुम्हाला त्याबद्दल काही कल्पना आहे का?”

“माझ्याकडे ४ तोळे सोनं आहे; भाव वाढत आहे. मी ते आता विकावं का?”

उदाहरण ४ –

एकदा संभाषण सुरू झाल्यावर, त्यांच्या एखाद्या गोष्टीबद्दल त्यांचे कौतुक करा आणि स्वतःची ओळख करून द्या.

“तुमचा दृष्टिकोन खूप तर्कशुद्ध आहे, तुमच्याशी बोलून छान वाटलं. तसं, मी [तुमचं नाव] आहे.”

उदाहरण ५ –

आजकाल फेसबुक किंवा लिंक्डइनवरही मैत्री सुरू करता येते.

त्यांच्या एखाद्या पोस्टवर विचारपूर्वक कमेंट करा.

जेव्हा ते प्रतिसाद देतील, तेव्हा त्यांच्या इनबॉक्समध्ये एक छोटा संदेश पाठवा, “तुमची पोस्ट खूप माहितीपूर्ण होती, मला या विषयात रस आहे.”

संभाषणाचे मैत्रीत रूपांतर कसे करावे?

पहिल्या भेटीनंतर जर तुम्हाला ती व्यक्ती मनोरंजक वाटली, तर दुसऱ्या भेटीसाठी पायाभरणी करा:

“या विषयांवर तुमच्याशी बोलून मला खूप आनंद झाला, मला आशा आहे की आपण पुढच्या वेळी पुन्हा यावर चर्चा करू शकू.”

जर तुम्हाला सोयीस्कर वाटले, तर नंबरची देवाणघेवाण करा किंवा सोशल मीडियावर कनेक्ट व्हा.

वैवाहिक नातं कधी प्रेम कधी तक्रार

* रिटा गुप्ता

रमोला आणि अक्षतच्या प्रेम विवाहाला जवळजवळ ४ वर्षे झाली होती. दोघांना एक छोटी मुलगी होती, परंतु असं वाटत होतं की दोघांमधलं प्रेम कापरासारखं उडून गेलंय. दोघेही तापट होते. त्यांचं भांडण कधीही, कोणत्याही जागी सुरू व्हायचं. जेव्हा दोघे रागात असायचे तेव्हा त्यांना याची देखील जाण नसायची की ते कोणासमोर भांडत आहेत. जेव्हा ते एकमेकांवर दोषारोप करत होते तेव्हा मुलगी त्यांच्याकडे घाबरून बघत राहायची.

एकदा रमोलाची आई मुलीच्या घरी आली होती. सतत दोघांच्या सवयीनुसार तिच्यासमोर देखील वाद होऊ लागले. जास्त वाद तर घरगुती कामांवरून होत होते. रमोलादेखील नोकरीला होती. त्यामुळे तिला वाटत होतं की अक्षतने तिला मदत करावी. परत अक्षत थोडा मनमौजी होता. त्याला जेव्हा वाटायचं तेव्हा तो मदत करायचा, नाही तर नाही.

त्यांच्या घरी कलहाच्या वातावरणाने घाबरून रमोलाची आई एकदिवशी म्हणाली, ‘‘जर तुमचं पटत नसेल तर तुम्ही वेगळे व्हा. जबरदस्तीने एकमेकांसोबत राहून दुखी राहू नका. मुली वरतीदेखील याचा वाईट परिणाम होतोय.’’

‘‘परंतु अगोदर हा विचार करा की एकमेकांच्या कोणत्या चांगल्या गोष्टी पाहून तुम्ही दोघांनी प्रेम विवाह केला होता. आम्हाला तर वाटलं होतं की तुम्ही एकमेकांना पसंत करत असाल, परंतु तुम्हा दोघांच्या वागण्यावरून तर असं वाटत नाहीये. अशावेळी वेगळं होणंच चांगलं आहे.’’

छोट्या छोट्या गोष्टींवरती भांडण

इथे दोघांचे स्वभाव सारखेच असल्यामुळे आणि संयोगाने त्यांचं पटल्यामुळे अनेकदा एक नव्या जोडप्यांमध्ये कोणी एक रागीट स्वभावाचा असतो. हे रागीट वागणं कोणाचंही असू शकतं. असे वागणूक असणारे दुसऱ्यांवरती हावी होतात. छोट्या छोट्या गोष्टींवरती त्यांचा पारा चढतो. अशी लोकं आपल्या जोडीदाराबाबत खूपच कटू होतात. प्रेम, आदर, संवेदनशीलता यांच्या शब्दकोशात नसतेच जणू.

रम्या आणि संदीपचं लग्न ४-५ वर्ष जुनं झालं होतं. रम्या सुशिक्षित तरुणी होती परंतु सासरच्या इच्छेचा मान ठेवत तिने नोकरी केली नाही आणि एकत्र कुटुंबात ताळमेळ साधण्याचा प्रयत्न करू लागली. संदीप तर खूपच रागीट होता. एकुलता एक असल्यामुळे तो लाडवलेला देखील होता. सतत कधी खाण्याचे ताट उडवून द्यायचा, तर कधी पार्टीमध्ये जायला तयार असलेल्या रम्याला कुरूप म्हणायचा. त्यावर रम्याची सासू म्हणाली, ‘‘पुरुष आहे ना, त्याचा हक्क आहेच तुझ्यावर. आपल्या बायकांच्या आयुष्यात सहन करणंच लिहिलंय.’’

रम्याने स्वत:च्या वागण्याने खूपच प्रयत्न केला की संदीप समजून घेईल की ती त्याच्या पायातली वहाण नाहीये. परंतु संदीपचा यावर काहीच परिणाम झाला नाही. शेवटी रम्याने शांतपणे नोकरीसाठी बायोडेटा पाठवायला सुरुवात केली आणि नोकरी लागल्यावरती कोणाची परवानगी न घेता ती जाऊ लागली. आत्मविश्वासासोबतच ती प्रतिकार करायला देखील शिकली.

लग्नाचा पाया

काही मनोरुग्ण असे देखील असतात ज्यांना क्षणात संशय आणि नाराजीचा दौरा पडतो आणि मग ते सगळं ओकून टाकल्यावर पश्चाताप करत राहतात आणि माफी देखील मागू लागतात. अनेकदा मॅरेज कौन्सिलर व मानसोपचार तज्ञांना भेटल्यावर देखील समस्याचं समाधान मिळतं. अशा प्रकारे प्रत्येक जोडप्याच वेगळं समीकरण असतं. सर्वांचीच गोष्ट एकमेकांपेक्षा वेगळी असते.

लग्नाचा पाया आपापसातील प्रेम आणि ताळमेळावरती टिकलेला असतो. दोन लोकं मग ते पूर्वपरिचित असो वा सर्वदा अपरिचित जेव्हा एकत्रित राहू लागतात तेव्हा सुरुवातीला त्रास होतो. अनेकदा लग्नाच्या काही वर्षानंतर देखील प्रेमाचा ज्वर उतरतो, तेव्हा पार्टनर एक वेगळ्याच रूपात दिसू लागतो. म्हणून म्हटलं जातं की एवढे देखील कटू होऊ नका की लोक थूकतील आणि एवढे देखील गोड होऊ नका की ते तुम्हाला गिळून टाकतील.

पती-पत्नीचे नाते: पती-पत्नीने कायद्याचे नव्हे, तर आपल्या मनाचे ऐकावे

* प्रतिनिधी

पती-पत्नीचे नाते: गेल्या ७५ वर्षांत विवाह, घटस्फोट आणि कौटुंबिक हिंसाचारावर कायदे लागू करण्यात आले आहेत, परंतु समाजाने अजूनही ते स्वीकारलेले नाहीत. याचा परिणाम असा होतो की, आपण जुन्या काळात जगत आहोत असे मानून पुरुष अजूनही स्त्रियांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या या नवीन कायद्यांचा आधार घेताना स्त्रिया हे विसरतात की, त्यांचा लढा पतींविरुद्ध नसून समाजाविरुद्ध असायला हवा. उलट, त्या आपल्या पतींनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात.

हुंडा प्रकरणात अडकलेल्या सत्तरीतील एका जोडप्याला, त्यांच्या सुनेने कोणताही पुरावा नसताना ते खोटे बोलत असल्याच्या केलेल्या आरोपांपासून सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. खरं तर, तरुण विवाहित स्त्रिया जेव्हा कौटुंबिक न्यायालय, महिला कक्ष किंवा राज्य न्यायालयात तक्रार दाखल करतात, तेव्हा प्रत्येक प्रकरणात हेच घडत असते. या स्त्रियांच्या दुःखाचे कारण सामाजिक आहे. त्यांना माहित आहे की, पती सोडून गेल्यानंतर जर त्या गुपचूप माहेरी परतल्या, तर त्यांचे भाऊ-बहिणी आणि समाज त्यांना जगू देणार नाहीत. त्यामुळे, त्या खोट्या कहाण्या रचतात आणि अशा कायद्यांचा आधार घेतात, जे त्यांच्या संरक्षणासाठी बनवले गेले होते, पण आता समाजात संरक्षणासाठी त्यांना निमित्तं पुरवतात.

जेव्हा आई-वडिलांना सांगितले जाते की, कमी हुंडा आणल्याबद्दल त्यांच्या पतींना छळले जाते, मारहाण केली जाते आणि हिणवले जाते, तेव्हा आपल्या विवाहित मुलीला घरातून हाकलून देण्याचे धाडस त्यांच्यात उरत नाही. हे कायदे म्हणजे खरंतर अशा मुलीसाठी माहेरी परत येण्याच्या चाव्या आहेत, जिने आपल्या पतीशी भांडण केले आहे.

आजही, हिंदू धर्म आणि समाज हे स्वीकारायला तयार नाहीत की, लग्नाच्या सात दिवसांनंतर, सात वर्षांनंतर किंवा सतरा वर्षांनंतर पती-पत्नी एकमेकांपासून इतके कंटाळू शकतात की त्यांना वेगळे राहण्याची इच्छा होते. अशा परिस्थितीत पतीचे घर सोडून गेलेल्या स्त्रीकडे समाज तुच्छतेने पाहतो. यातून सुटका करून घेण्यासाठी, पत्नी घरगुती हिंसाचार, हुंडा आणि क्रूरता यांसारखी कारणे देतात.

ही समस्या विशेषतः मध्यमवर्गात अधिक प्रमाणात आढळते, जिथे घटस्फोटाचे प्रकरण अनेकदा मिटत नाही. पतीला सोडून गेलेल्या स्त्रीला, मुले असोत वा नसोत, ती कमावत असूनही नोकरी मिळवणे कठीण जाते. ७६ वर्षे उलटूनही समाजाला हे सत्य अजूनही समजलेले नाही की, १९५५ मध्ये लागू केलेले हे कायदे दुर्मिळ घटनांसाठी आहेत, प्रत्येक वैवाहिक समस्येवरचा उपाय नाहीत.

तक्रार दाखल करणाऱ्या स्त्रीला माहीत असते की, या कायद्यांनुसार गुन्हा दाखल केल्यास समेट होण्याची सर्व शक्यता संपुष्टात येईल, पण तिला हेही माहीत असते की, जर तिने हे आरोप केले नाहीत, तर तिचे आई-वडील आणि भावंडे तिला आश्रय देणार नाहीत. तक्रार करणे हाच तिचा तात्काळ उपाय असल्याचे दिसते.

जर समाज उदारमतवादी असता, जो या कायद्यांचा खरा उद्देश होता, तर वैवाहिक वादांना सामान्य तडजोड मानले गेले नसते आणि पती किंवा पत्नी यांपैकी कोणालाही दोषी मानले गेले नसते. समाज नेहमीच पत्नीला दोषी मानतो. नवीन कायदे काही काळासाठी पत्नीसाठी पडद्यासारखे काम करतात.

सेक्सशिवाय वैवाहिक जीवन निरस

शाहाना परवीन

मित्रांनो, सेक्स ही एक नैसर्गिक आणि निरोगी क्रिया आहे ज्यामध्ये दोन प्रौढ व्यक्तींच्या संमतीने शारीरिक संबंध प्रस्थापित होतात. लग्नानंतर, पती-पत्नीमध्ये घडणारी ही एक महत्त्वाची घटना आहे, जी दोन व्यक्तींना जवळ आणते. मूल जन्माला घालण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आणि जोडीदाराला आनंद तसेच शांतता मिळवून देते.

कोणत्याही विवाहित जोडप्यासाठी सेक्स हा चांगला आणि उपयक्त मानला जातो. त्याचवेळी, तो जबरदस्तीने करणे देखील योग्य मानले जात नाही. इथे आपण पती-पत्नी आणि लैंगिक संबंधांबद्दल बोलत आहोत. जेव्हा एखादी मुलगी लग्न करून दुसऱ्या कुटुंबात जाते तेव्हा तिच्यासाठी सर्व काही पूर्णपणे नवीन आणि अनोळखी असते. तिला तिथे काय कसे वागावे, हेच सूचत नाही. अशा परिस्थितीत, तिच्या जीवनसाथीने तिला प्रोत्साहन दिले आणि मदत केली तरच ती नवीन घरात जुळवून घेऊ शकते.

पती-पत्नीच्या नात्यात विश्वास आणि जवळीक महत्त्वाची असली तरी, विशेषत: लग्नानंतर लैंगिक संबंधदेखील खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. सेक्स ही एक अशी प्रक्रिया आहे, जी फक्त पती-पत्नीच्या संमतीनेच योग्य मानली जाते. पतीने कधीही आपल्या पत्नीला लैंगिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करू नये आणि पत्नीनेही कधीही असे करू नये.

यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली

केवळ आपणच नाही तर अनेक डॉक्टर आणि वैद्यांचा असा विश्वास आहे की, सेक्सशिवाय जीवन बेचव आहे आणि खरं तर ते तसंच आहे. आपण असे अनेक पती- पत्नी पाहिले असतील, ज्यांचे वैवाहिक जीवन केवळ लैंगिक संबंध ठेवण्यातील अडचणी आणि असंतोषामुळे उद्ध्वस्त झाले आहे. आजकाल वातावरण खूप बदलले आहे.

पूर्वी या विषयावर बोलणे शक्य नव्हते, लोक संकोच करायचे, पण आज भारतीय समाजात सेक्सबद्दल मोकळेपणा सतत वाढत आहे, यात शंका नाही. लोकही सेक्स करण्यात आणि सेक्सची इच्छा व्यक्त करण्यात संकोच करत नाहीत. तरीही, अनेक लोकांसाठी ते एखाद्या निषिद्ध गोष्टीपेक्षा कमी नाही. आजही अनेक तरुण, मग ते पुरुष असोत किंवा महिला, लैंगिकतेबद्दल उघडपणे चर्चा करू शकत नाहीत. मनातल्या इच्छा मनातच साठवून ठेवल्या जातात. बऱ्याचदा यामुळे गैरसमजही निर्माण होतात. निरोगी लैंगिक संबंध ठेवण्यात सर्वात मोठा अडथळा म्हणजे एकमेकांशी स्वेच्छेने न बोलणे किंवा एकमेकांशी बोलू न शकणे आणि दुसरी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जीवनासाठी लैंगिक संबंध का महत्त्वाचे आहेत, या विषयाबद्दल ज्ञान कमी असणे.

सहवास किंवा संभोग कशाला म्हणतात?

लैंगिक संबंधांना संभोग, मैथुन किंवा सहवास असेही म्हणतात. या प्रक्रियेत, पुरुषाचे लिंग मादीच्या योनीत प्रवेश करते, ज्यामुळे ती गर्भवती होते आणि मूल जन्माला येते. याला अनेक नावांनी ओळखले जाते, जसे की संभोग, योनी मैथुन, काम क्रीडा, रती क्रीडा इ.

वेगवेगळ्या सजीव प्रजातींनुसार समागम किंवा संभोग वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकतो. इतिहासाकडे पाहिल्यास तुम्हाला आढळेल की, प्राचीन काळापासून लैंगिक संभोगाचा मुख्य उद्देश मुलांची उत्पत्ती आणि संगोपन हा मानला जात आहे. यामुळे, वंश पुढे नेण्यावर खूप भर देण्यात आला.

निरोगी लैंगिक संबंधांसाठी, या गोष्टी लक्षात ठेवा :

शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाणे : मित्रांनो, निरोगी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी, तुमच्या जोडीदाराच्या शारीरिक आणि मानसिक भावना समजून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण जर जोडीदार शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ असेल तर तो त्याच्या जोडीदाराला लैंगिक सुख देऊ शकणार नाही आणि जर तो सेक्ससाठी मानसिकदृष्ट्या तयार नसेल तर तो तुम्हाला साथ देऊ शकणार नाही.

भावनिक संबंध आणि विश्वास निर्माण करा : पती -पत्नीमध्ये लैंगिक संबंध लगेच होऊ नयेत, प्रथम दोघांनीही एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, एकमेकांना जाणून घेतले पाहिजे आणि एकमेकांवर प्रेम केले पाहिजे, पतीला त्याच्या नववधूबद्दल माहिती असली पाहिजे, जसे की, तिला काय आवडते आणि काय आवडत नाही? पत्नीला सेक्स करायला कसे आवडेल किंवा त्याला सेक्स करायला कसे आवडेल, याबद्दल पतीने आपल्या पत्नीशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे.

लक्षात ठेवा की, पती-पत्नीमध्ये लाज नसावी, तुम्ही जितके मोकळेपणाने बोलाल तितका तुम्ही सेक्सचा आनंद घेऊ शकाल. पतीने आपल्या पत्नीवर विश्वास दाखवावा आणि तिला असे वाटावे की, आता पती प्रत्येक दु:खात तिच्यासोबत आहे. ज्या जोडप्यांनी पूर्वी कोणतेही संभाषण केलेले नाही त्यांच्यामध्ये सेक्स करताना खूप संकोच असतो.

पत्नीवर दबाव आणू नका, तिला आरामात राहू द्या : काही पती घाई करतात. त्यांना सर्वकाही लगेच हवे असते. यामुळे जोडीदाराच्या मनात भीती निर्माण होते आणि ती तिच्या इच्छेशिवाय स्वत:ला तिच्या जोडीदाराला अर्पण करते. यामुळे, दोघांनाही आनंद मिळत नाही आणि सेक्स नीरस, कंटाळवाणा होतो.

पतीने कधीही पत्नीला असे सांगू नये की, हेच जीवन आहे, आपण फक्त यासाठी लग्न केले आहे, सेक्स हेच सर्वस्व आहे. पती-पत्नीमध्ये लैंगिक संबंधांपेक्षाही एकमेकांच्या भावना आणि समस्या समजून घेणे आणि एकमेकांना आधार देणे महत्त्वाचे आहे.

सेक्स ही स्पर्धा नाही : जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी लग्न करते तेव्हा आपण अनेकदा ऐकले आहे की, मुलगा आणि मुलगी यांच्याभोवती जमा झालेले मित्र आणि मैत्रिणी वधू आणि वरांना सांगतात की, पाहूया कोण जिंकते, मुलगा की मुलगी?

त्यांना कोणीतरी समजावून सांगावे की, ही स्पर्धा नाही, किंवा हा जिंकण्याचा किंवा हरण्याचा खेळ नाही, ज्यामध्ये एक हरेल आणि दुसरा जिंकेल किंवा जो जिंकेल त्याला बक्षीस दिले जाईल. जर मुला-मुलीच्या मनात अशा प्रकारची स्पर्धा असेल तर ते दोघेही त्याचा आनंद घेऊ शकणार नाहीत आणि त्यांना विनाकारण अनेक समस्या आणि ताणतणावाचा सामना करावा लागेल. सेक्स ही अशी परीक्षा नाही जिथे तुम्हाला गुण मिळतील किंवा मुलाखत होईल.

जर हे आपोआप होऊ दिले तर ते शरीर आणि मन दोघांनाही आराम तर देतेच, सोबत आनंद देखील देते.

फोरप्ले : आजच्या सुशिक्षित तरुणांना हे चांगलेच माहिती आहे की, सेक्सपूर्वीच्या प्रक्रियेला फोरप्ले म्हणतात. यामध्ये सेक्स करण्यापूर्वी शारीरिक स्पर्श, चुंबन आणि शरीराला स्पर्श करणे समाविष्ट आहे. येथूनच सेक्स सुरू होतो. आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे कोणाकडेही वेळ नाही, तिथे फोरप्ले ही एक निरुपयोगी प्रक्रिया आहे असे अनेक लोक मानतात. यामुळे फक्त वेळ वाया जातो, असे त्यांना वाटते.

ग्रामीण भागात याला निर्लज्जपणाचे नावही देण्यात आले आहे. तिथे, महिला डोक्यावर पदर घेऊन पलंगावर किंवा जमिनीवर झोपलेली असते आणि पती तिच्याशी काहीही करतो तरी ती एक शब्दही उच्चारू शकत नाही. अशा परिस्थितीत पत्नीला कामोत्तेजना कशी मिळेल? ती सेक्सला फक्त उपभोगाचे आणि गरजेचे साधन मानून पतीची साथ देत राहाते.

मोकळेपणाने बोला : पती-पत्नी एकमेकांशी बोलल्याशिवाय त्यांना एकमेकांबद्दल काहीही माहिती होणार नाही. लग्नाच्या पहिल्या रात्री, दोघांनीही एकमेकांशी उघडपणे आणि स्वेच्छेने प्रत्येक विषयावर बोलले पाहिजे, जे त्यांच्या भविष्यासाठी खूप महत्वाचे आहे. पतीने आपल्या पत्नीला विचारावे आणि सांगावे आणि पत्नीने पतीला लैंगिक संबंधांबद्दल विचारावे आणि सांगावे. पती-पत्नीला काय आवडते? त्यांनी ते ऐकले आहे का? सेक्स म्हणजे नक्की काय? आपापसात या सर्व गोष्टींवर चर्चा केल्यानंतर जर तुम्ही दोघांनी एकमेकांच्या इच्छा लक्षात घेऊन सेक्स केला तर दोघांनाही समान आनंद मिळेल, अन्यथा दोघेही कंटाळून झोपून राहातील आणि सेक्स एक ओझे बनेल.

लैंगिक शिक्षण : लैंगिकतेबद्दलची आपली बहुतेक माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी असते. चांगल्या पुस्तकांमधून आणि तज्ज्ञाकडून लैंगिक संबंध, त्याच्या पद्धती, पुनरुत्पादन आणि लैंगिक संक्रमित रोग (एसटीडी) याबद्दल सखोल ज्ञान मिळवले पाहिजे. जर पती-पत्नीला लैंगिक संबंधांबद्दल एखादी भीती किंवा चिंता वाटत असेल तर त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सेक्स नंतर काय करावे : सेक्स नंतर काय करावे, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अनेक महिला सेक्स केल्यानंतर लगेच उठतात आणि थेट स्नानगृहात जाऊन अंघोळ करतात. हे फक्त महिलाच करतात असे नाही तर काही पुरुषांमध्येही ही सवय दिसून आली आहे. हे सर्व बरोबर नाही.

सेक्स केल्यानंतर लगेच उठू नये तर एकमेकांशी बोलून आपले अनुभव सांगावेत आणि पुढे कसे जायचे हे ठरवावे, जेणेकरून दोघेही अधिक आनंद घेऊ शकतील.

सुखी वैवाहिक जीवनात मित्रांची भूमिका

* फातिमा खातून

अमर आणि रिनाचे नुकतेच लग्न झाले होते. लग्नाला फक्त ६ महिने उलटून गेले होते. सर्व सुरळीत सुरू होते. दोघेही लग्न आणि एकमेकांची सोबत यामुळे खूप आनंदी होते. मात्र, अचानक एक समस्या निर्माण झाली. ती कोणाला सांगता येत नव्हती की, कोणाचा सल्ला घेता येत नव्हता. अचानक आयुष्य बदलल्यासारखे वाटू लागले आणि वैवाहिक जीवनाचा सुरुवातीचा उत्साह थंडावला.

अमरचा विवाहित मित्र समीरला याबद्दल समजले. त्याने हातवारे करून अमरला विचारण्याचा प्रयत्न केला, पण अमरने काहीच उत्तर न दिल्याने एके दिवशी तो पत्नीसह अमरच्या घरी गेला. दोघांनीही अमर आणि रिनाला त्यांच्या समस्यांबद्दल मोकळेपणाने विचारले. त्यानंतर त्या दोघांनीही त्यांच्या समस्या उघडपणे सांगितल्या.

त्या ऐकून समीर आणि त्याची पत्नी हसली. त्यांनी सांगितले की, ते देखील या टप्प्यातून गेले आहेत. त्यांनी त्यावर कोणता उपाय शोधला, हे देखील त्यांनी सांगितले.

त्यांच्या सल्ल्यानुसार, अमर आणि रिनाने आपल्या समस्या सोडवल्या आणि काही दिवस गमावलेला सर्व आनंद त्यांच्या आयुष्यात पुन्हा आला. हे फक्त त्यांच्या मित्राच्या मैत्रीने आणि मदतीमुळे शक्य झाले.

एक पवित्र बंधन

लग्न हे २ जिवांमधील एक सुंदर आणि पवित्र बंधन आहे, जे एकमेकांवर मनापासून प्रेम करतात आणि आयुष्य एकत्र घालवू इच्छितात. परंतु, लग्न हे एक आव्हानात्मक आणि गुंतागुंतीचे नातं आहे, ज्यासाठी दोन्ही जोडीदारांकडून अविरत प्रेम आणि वचनबद्धता आवश्यक असते. जोडप्यांना आनंदी आणि निरोगी वैवाहिक जीवन टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरणाऱ्या घटकांपैकी एक म्हणजे मित्रांची मजबूत सोबत, जी प्रोत्साहन, सल्ला आणि मदत मिळवून देऊ शकते.

असे मित्र बना, जे वैवाहिक जीवनाचा रथ पुढे नेतील आणि तो पुढे नेत राहाण्यासाठी मदत करतील.

वैवाहिक जीवनात सोबत उभे राहाण्याचा प्रश्न येतो तेव्हा सर्व मित्र तयार होत नाहीत. काही मित्र वैवाहिक नातेसंबंधासाठी विषारी, नकारात्मक किंवा अगदी कुचकामी ठरू शकतात, तर काही एकनिष्ठ, सकारात्मक आणि मदत करणारे ठरू शकतात. वैवाहिक जीवन धोक्यात आणणारे किंवा धोक्यात घालणारे मित्र टाळा किंवा त्यांना मर्यादेत ठेवा.

गोपनीयतेचा आदर

विवाहित जोडप्यासाठी एका चांगल्या मित्राचे काही गुण असे असू शकतात : जे तुमचे लग्न आणि लग्नाचा आनंद साजरा करतात. ते वैवाहिक समस्या किंवा निर्णयांमध्ये हस्तक्षेप किंवा त्यावर चर्चा करत बसत नाहीत तर नि:पक्षपातीपणे सल्ला देतात.

ज्यांना तुमच्या वैवाहिक सुखाचा किंवा आनंदाचा हेवा वाटत नाही किंवा ते त्यावर टीका करत नाहीत.

असे मित्र ज्यांना तुमच्या वैवाहिक जीवनातील आव्हानं आणि अडचणींबद्दल सहानुभूती असते. जे तुमच्यातील वैवाहिक संघर्ष किंवा वादांचे प्रामाणिकपणे मूल्यांकन करतात. तुम्हाला दोष देत नाहीत किंवा निराश होऊ देत नाहीत.

व्यक्तिगत मैत्रीत समतोल साधणे

आजच्या युगात, व्यक्तिगत मैत्री वैवाहिक जीवनाबाहेरील आपली ओळख आणि आवड जपण्यासाठी महत्त्वाची ठरते. वैवाहिक संबंध आणि त्यातील समाधान वाढवण्यासाठी एखाद्या विवाहित जोडप्याशी मैत्री असणे देखील फायदेशीर ठरते. ही दोन विवाहित जोडप्यांमधील अशी मैत्री असते जी समान मूल्य, लक्ष्य यावर आधारीत असून एकमेकांच्या भावना समजून घेते. अशी मैत्री एकत्र येण्याची, शिकण्याची आणि एकत्र पुढे जाण्याची संधी देऊ शकते.

परंतु, जर एका जोडीदाराचे दुसऱ्यापेक्षा जास्त किंवा कमी मित्र असतील किंवा एखाद्या जोडीदाराच्या मित्रांचे दुसऱ्या जोडीदाराच्या मित्रांशी पटत नसेल तर. मात्र अशा मैत्रीत समतोल साधणे कठीण होऊ शकते. अशा मैत्रीत निखळ समतोल साधण्यासाठी काही टिपा :

* तुमच्या व्यक्तिगत आणि विवाहित जोडप्याच्या मैत्रीबद्दलच्या, तुमच्या अपेक्षा आणि प्राधान्यांबद्दल तुमच्या जोडीदाराशी संवाद साधा. यासंदर्भातील तुमची चर्चा प्रामाणिक, आदरयुक्त आणि लवचिक असावी.

* व्यक्तिगत आणि विवाहित जोडपे, अशा दोन्ही मैत्रीसाठी वेळ ठरवा. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी आणि तुमच्या संसारासाठी तसेच तुमचे मित्र आणि स्वत:साठी पुरेसा वेळ देत आहात, याची खात्री करा.

* नवीन जोडपे मित्र शोधा, जे तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराप्रमाणे समान मूल्यं, ध्येय आणि तशी कृती करणारे असेल. अशा प्रकारचे गट किंवा क्लबमध्ये सहभागी व्हा किंवा तुमच्या विद्यमान मित्रांना त्यांना ओळखत असलेल्या इतर जोडप्यांशी तुमची ओळख करून देण्यास सांगा.

सल्ला आणि मार्गदर्शन घ्या

कधीकधी जोडप्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात आव्हाने किंवा समस्यांना सामोरे जावे लागते, ज्या ते स्वत: सोडवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, विश्वासू मित्रांकडून सल्ला आणि मार्गदर्शन घेणे उपयुक्त तसेच आश्वासक ठरू शकते. विश्वासू मित्र हे असे मित्र असतात ज्यांच्या मनात वैवाहिक जीवनासाठीचे सर्वोत्तम हित असते, ज्यांना वैवाहिक समस्या हाताळण्याचा अनुभव आणि ज्ञान असते आणि जे वस्तुनिष्ठ तसेच नि:पक्षपाती दृष्टिकोन ठेवून सल्ला देऊ शकतात.

परंतु, विश्वसनीय मित्रांकडून सल्ला आणि मार्गदर्शन घेताना ते सावधगिरीने आणि विवेकबुद्धीने घेतले पाहिजे, कारण सर्व मित्र अचूक आणि उपयुक्त सल्ला देण्यास सक्षम नसतात. विश्वसनीय मित्रांकडून सल्ला आणि मार्गदर्शन मिळविण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वं असू शकतात :

* तुमचा कोणावर विश्वास आहे ते काळजीपूर्वक ठरवा. अशा मित्रांना टाळा ज्यांचे गुप्त हेतू, छुपे अजेंडा किंवा वैयक्तिक पूर्वग्रह असू शकतात. त्यांनी कोणत्याही बाबतीत दिलेला सल्ला तुमच्या नात्यावर परिणाम करू शकतो. तुमच्या लग्नाबद्दल अफवा पसरवणारे, गप्पा मारत बसणारे किंवा तुमची गुपितं सर्वत्र पसरवणारे मित्र टाळा.

* तुम्हाला तुमच्या मित्रांकडून काय हवे आहे ते आधीच ठरवा. त्यांनी ऐकावे, सहानुभूती दाखवावी, सल्ला द्यावा किंवा हस्तक्षेप करावा अशी तुमची इच्छा आहे का? त्यांनी तुमचे संभाषण खासगी ठेवावे किंवा त्याबद्दल इतरांना सांगावे, असे तुम्हाला वाटते का? त्यांनी याचा पाठपुरावा करावा की ते सोडून द्यावे असे तुम्हाला वाटते का? आपल्या अपेक्षा आणि मर्यादा स्पष्टपणे सांगा.

* वेगवेगळ्या कल्पना आणि दृष्टिकोनांसाठी मनमोकळेपणाने वागा. मित्रांचा सल्ला नाकारू नका. तुम्हाला तो आवडला नसला तरीही तो नाकारू नका किंवा वाद घालू नका.

विवाहित मित्रांची भूमिका

विवाहित मित्र असणेदेखील वैवाहिक नाते मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते, कारण ते वैवाहिक नातेसंबंधासाठी सकारात्मक आदर्श, प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊ शकतात. विवाहित मित्र वैवाहिक नातेसंबंधांसाठी सल्ला, अनुभव आणि तुलना करण्यासाठीचा स्त्रोत म्हणून देखील काम करू शकतात, कारण ते अनुभव, प्रशंसा आणि सुयोग्य टीका करू शकतात ज्यामुळे जोडप्यांना त्यांचे वैवाहिक जीवन सुधारण्यास आणि पुढे घेऊन जाण्यास मदत होऊ शकते.

काही असे मार्ग ज्याद्वारे विवाहित मित्र वैवाहिक नातेसंबंध मजबूत करू शकतात :

* ते निरोगी आणि यशस्वी वैवाहिक वर्तन आणि पद्धती जसे की संवाद साधणे, वादाचे निराकरण, आत्मीयता आणि सहकार्य दर्शवू शकतात. जोडपे त्यांच्या विवाहित मित्रांच्या उदाहरणांवरून शिकू शकतात आणि ती शिकवण त्यांच्या स्वत:च्या संसारात आचरणात आणू शकतात.

* ते त्यांच्या लग्नाची गोष्ट, अनुभव आणि धडे, चांगले आणि वाईट दोन्ही एकमेकांना सांगू शकतात. जोडप्यांना त्यांच्या विवाहित मित्रांच्या शहाणपणाचा आणि ज्ञानाचा फायदा होऊ शकतो आणि ते त्यांच्या वैवाहिक जीवनात समान चुका किंवा अडचणी टाळू शकतात.

* ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ शकतात आणि त्यांच्या वैवाहिक ध्येयांचा आणि स्वप्नांचा पाठपुरावा करू शकतात जसे की सहलीला जाणे, पालकत्व स्वीकारणे किंवा व्यवसाय सुरू करणे. ते एकमेकांना आनंद देऊ शकतात आणि आपल्या लग्नात एकमेकांचे यश, सुखाचा आनंद साजरा करू शकतात.

* ते त्यांच्या लग्नातील नवीन आणि रोमांचक पैलू जसे की, त्यांचा छंद, आवड किंवा नवनवीन कल्पनांचा शोध घेऊन एकमेकांना आव्हान देऊ शकतात आणि प्रोत्साहित करू शकतात. जोडपे त्यांच्या विवाहित मित्रांसोबत नवीन गोष्टींचा अनुभव घेत आपल्या लग्नाला एक आनंद सोहळा बनवू शकतात. लग्नाला नेहमीच नवे आणि आनंददायी ठेवू शकतात.

आनंदाचा उपभोग घ्या

– शोभा कटारे

माझ्या शेजारी राहणाऱ्या मीराला कशाचीच कमी नाहीये. सर्व काही तर आहे तिच्याकडे दोन दोन घरं, मोठमोठ्या गाड्या, भरपूर महागडे कपडे, दागिने. परंतु अलीकडे ती खूपच दु:खी दिसतेय, सर्व काही असून देखील ती आनंदी नाहीये. शेवटी अशी कोणती गोष्ट आहे, जी मिळताच ती आनंदी होईल. घरातील सर्व लोकं तिला समजून घेताहेत आणि शक्य तेवढे त्यावर उपाय करत आहेत. अलीकडच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक जण अशी गोष्ट शोधत आहे तर ती आहे आनंद आणि तो मिळवण्यासाठी सर्व काही करायला तयार आहेत. परंतु हे मिळविण्यात ते अयशस्वी होत आहेत. असं म्हटलं जातं की पैशाने सर्वकाही विकत घेतलं जाऊ शकतं परंतु कदाचित आनंद नाही. शेवटी कोणती आहे ती पद्धत वा मार्ग जे मिळवून तुम्ही आनंदी राहू शकता.

रहा निरोगी

जर आनंदी राहायचं असेल तर निरोगी राहणं गरजेचं आहे, कारण असं म्हटलं जातं की निरोगी शरीरानेच आनंदी राहू शकता. लक्षात ठेवा चांगलं आरोग्य पैशाने बनवता येत नाही परंतु एक चांगलं आरोग्य पैशाने कमावलं जाऊ शकतं आणि सोबतच आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात.

यासाठी नियमित व्यायाम करणं, समतोल आहार घेणं आणि भरपूर ६ ते ७ तासाची झोप घेणं गरजेचे आहे. परंतु अलीकडच्या धावपळीच्या दिनचर्येमध्ये हे स्वीकारणं व करणं कठीण होत चाललंय. ज्यामुळे आपण कमी वयात देखील आजारी पडत आहोत आणि मनात असूनदेखील आनंदी राहू शकत नाहीत.

ओळखा आपला आनंद

सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीने आनंद मिळतो, जसं एखाद्याला चांगलं खाण्याने आनंद मिळतो, कोणाला चांगले कपडे घालण्याने, कोणाला फिरायला जाण्याने, तर कोणाला मंदिरात जाऊन सेवा करण्याने, कोणाला अभ्यास करण्याने, कोणाला कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याने, तर कोणाला संगीत ऐकल्याने, तर कोणाला पैसा कमविण्याने आणि स्वत:चा बँक बॅलन्स वाढवण्याने इत्यादी. आनंदी राहण्यासाठी सर्वात गरजेचं आहे की तुम्ही तुमचा आनंद ओळखा.

साजरे करा छोटे छोटे आनंद

अलीकडची तरुणाई मोठमोठी सुखं आणि आनंदाच्या शोधामध्ये फिरत असते, परंतु छोट्या छोट्या गोष्टींकडे ते लक्ष देत नाहीत. म्हणून आपण इथे बोलूया तोच आनंद जो आपल्या आजूबाजूलाच असतो परंतु ते त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून आपला आनंद ओळखण्याचा प्रयत्न करा.

शेवटी तुम्ही काय केल्याने, कोणत्या लोकांसोबत उठबस केल्याने, बोलल्याने तुम्हाला आनंद मिळतो, फोटोज क्लिक केल्याने, तुमच्या घराच्या बागेची देखभाल करण्याने, वा घर सजविल्याने, जेवण बनवल्याने त्या सर्व गोष्टींची तुम्ही स्वत: अनुभूती घ्या.

अनेकदा आपण सुखाच्यादेखील योजना बनवतो की मी असं करेन वा तसं करेन तेव्हा मला आनंद मिळेल, जसं जर मी पैसे साठवेन, नवीन घर विकत घेईन, नवीन कार घेईन तर मला आनंद मिळेल. परंतु आपण त्या आनंदाबाबत बोलतच नाही वा त्याकडे दुर्लक्ष करतो ज्या आपल्याला विनासायास मिळतात. तुम्ही नोकरदार आहात आणि अचानक तुम्हाला सुट्टी मिळाली, एखादी हरवलेली वस्तू अचानक सापडली, जुन्या कपड्यांमधून काही पैसे मिळाले, अचानक काही फ्री गिफ्ट मिळाले तर हे खूप आनंद देणारा आहे, ज्याला आपण आपल्या आनंदामध्ये समावेश करू शकत नाही म्हणून हे गरजेचं नाही की आपण आपला आनंद शोधण्यासाठी कुठे जावं. हे तर आपल्या आजूबाजूलाच असतं. फक्त गरज आहे तुम्ही ते वाटण्याची आणि उपभोगण्याची देखील.

समाधानी रहा

आनंदी राहण्यासाठी सर्वात गरजेचं आहे समाधानी राहणं. जर एखादी गोष्ट तुम्हाला मिळूनदेखील तुम्ही समाधानी नसाल तर तुम्ही नेहमी काही ना काही मिळवण्याच्या मागे राहाल आणि तुमचा वेळ असाच गमावून बसाल.

सकारात्मक रहा

आनंदी राहण्यासाठी तुमची विचारसरणी सकारात्मक ठेवा, दुसऱ्यांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. अनेकदा आपण दुसऱ्यांकडून जरा जास्तच अपेक्षा ठेवतो आणि जेव्हा ती पूर्ण होत नाही तेव्हा निराश आणि दु:खी होतो. खरंतर अनेकदा आपली ही निराशा आनंदावर हावी होते आणि आपण मनात असूनदेखील आनंदी राहू शकत नाही, जसं की त्यांनी आपल्या सोबत असं वागायला पाहिजे होतं, चांगलं जेवण बनवायला पाहिजे होतं, चांगलं गिफ्ट द्यायला पाहिजे होतं वगैरे वगैरे.

काही वेळ जिवलगांसोबत घालवा

अलीकडच्या धावपळीच्या दिनचर्येनंतर जेव्हा देखील मोकळा वेळ मिळतो तेव्हा आपण आपला मोबाईल घेऊन बसतो. आपला संपूर्ण वेळ या आभासी दुनियेमध्ये घालवतो, ज्यामुळे आपण पूर्ण जगाशी आणि लोकांशी जुळलेले राहतो परंतु आजूबाजूचं जग आणि जिवलगांपासून दूर राहतो. त्यामुळे कोणा दुसऱ्यासोबत वेळ घालवण्याची आपल्याला खूपच कमी संधी मिळते आणि आपल्याला एकटेपणा वाटतो.

जर आपण मनात आणलं तर हा एकटेपणा दूर करण्यासाठी आपला काही वेळ दुसऱ्यांना भेटणं, चेष्टा मस्करी, गप्पा मारण्यामध्ये घालवू शकतो आणि हा आनंद कायमचा आपल्या आठवणीत ठेवू शकतो.

शेअरिंगची सवय लावा

अलीकडे आपली असो वा तरुण पिढी स्वत:च्या मनातली गोष्ट असो वा एखादी समस्या ते एकमेकांसोबत शेअर करत नाहीत आणि मनातल्या मनात उदास राहतात आणि त्याचं समाधान स्वत: डिजिटल मीडियामध्ये शोधू लागतात. मग खरं खरं समाधान न मिळाल्यास त्रास होत राहतो. या गोष्टींमुळे अनेकदा आपल्याला निराशा वाटू लागते. यापासून वाचण्यासाठी एकमेकांसोबत तुमच्या गोष्टी शेअर करा. कदाचित तुम्हाला तुमच्या समस्येचा उपाय मिळेल, चिंता दूर होईल आणि तुम्हाला आनंद मिळेल.

मिनिमलिस्टिक लाईफस्टाईलचा स्वीकारा

मिनिमलिस्टीक लाईफस्टाईलचा अर्थ साधसुधं आयुष्य कोणत्याही चमकधमकी शिवाय कमीत कमी गोष्टींसोबत राहणं आणि खर्च कमी करणं.

या लाइफस्टाइलचा स्विकार करून तुम्हाला समजेल की कोणत्या गोष्टी शिवाय आपण राहू शकत नाही आणि कोणत्या गोष्टींची आपल्याला गरज आहे, कोणत्या गोष्टीची आपल्याला इच्छा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या लाईफस्टाईलपासून शिकायला मिळतं, ते म्हणजे तुमची इच्छा आणि गरजांमध्ये फरक करणं, कारण काही गोष्टी आपण आपल्या गरजेसाठी पूर्ण करतो आणि काही आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करतो.

भावना शब्दात व्यक्त करा

अलीकडे आपण सर्वांनी स्वत:ला डिजिटल स्क्रीन समोर कैद केलं आहे. आपापसात भेटणं बंद केलं आहे. आपापसात गप्पा मारण्याऐवजी आपण मेसेज, व्हाट्सअप आणि फेसबुकचा आधार घेत आहोत. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दान ऐवजी इमोजी आणि शॉर्टमध्ये शब्दांचा वापर करत आहोत.

त्यामुळे प्रयत्न करा की रात्रीचे जेवण एकत्रित एका टेबलवर बसून खा म्हणजे एकमेकांशी संवाद साधता येईल, तुमच्या भावना शब्दांमध्ये व्यक्त करू शकाल तसंच तुमच्या मनातील गोष्टी एकमेकांसोबत शेअर कराल, जर कोणाला एखादी समस्या असेल तर ती सोडविण्यात एकमेकांना मदत कराल.

विवाहबाह्य संबंध ठेवणं सोपं नाही

* प्रियंका यादव

जेवणाच्या टेबलवर बसलेला जयंत कुठेतरी हरवला होता. तो काही खातही नव्हता. ते पाहून पत्नी अपूर्वाने त्याला विचारले, ‘‘कुठे हरवलास?’’

‘‘कुठेच नाही,’’ असं म्हणत जयंतने उत्तर देणं टाळलं.

खरंतर जयंत रियाचा विचार करत होता. रिया जयंतची मैत्रीण होती. तिचे त्याच्यासोबत २ वर्षांपासून संबंध होते. जयंतला अलीकडेच व्यवसायात तोटा झाला होता. त्यामुळे लग्न आणि विवाहबाह्य संबंध या दोन्ही गोष्टी कशा सांभाळायच्या, असा प्रश्न त्याला पडला होता. रिया पूर्णपणे जयंतवर अवलंबून होती. व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे जयंतला आता रियाचा खर्च भागवता येत नव्हता. त्याने याबाबत रियाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग झाला नाही, कारण पुरुषांनी स्त्रियांच्या सर्व गरजा पूर्ण कराव्यात, असे तिचे मत होते.

रियाच्या अशा विचारसरणीमुळे जयंत त्रासला होता. आता त्याला रियासोबतचे संबंध तोडायचे होते, पण अडचण अशी होती की, रिया यासाठी तयार नव्हती. यातून सुटका कशी करून घ्यायची, या पेचात जयंत होता.

व्यावहारिक नाही आणि परवडणारेही नाहीत

विवाहबाह्य संबंध व्यावहारिक किंवा परवडणारेही नसतात. त्यात अनेक खर्च आणि अडचणी येतात. विवाहबाह्य संबंधांचे अनेक प्रकार आहेत. ज्या लोकांचे जोडीदार भावनिक नसतात, असे लोक आपल्या वैवाहिक जीवनाबाहेर भावना शोधतात. हे लोक अशा जोडीदाराच्या शोधात बाहेर पडतात ज्याच्याशी ते भावनिकरित्या जोडले जाऊ शकतील. या प्रकाराला इमोशनल अफेअर्स म्हणजेच भावनिक विवाहबाह्य संबंध असे म्हणतात.

जे लोक आपल्या वैवाहिक जीवनाला कंटाळले आहेत आणि असे लोक ज्यांना त्यांच्या आयुष्यात वेगळे काहीतरी हवे असते ते वन नाईट स्टँड म्हणजे एका रात्रीची संकल्पना स्वीकारतात. याशिवाय लोकांमध्ये सेक्स अॅडिक्ट अफेअर्सही असतात. अशी अफेअर्स सेक्स अॅडिक्ट लोक करतात. अशा लोकांसाठी, सेक्स सर्वकाही असते. काही लोक लव अॅडिक्ट अफेअर्सही करतात. असे अफेअर्स प्रेमाच्या आहारी गेलेले लोक करतात. त्यांच्यासाठी प्रेम खूप महत्त्वाचे असते. सुमितच्या लग्नाला २ वर्षे झाली आहेत, तरीही तो त्याची जुनी मैत्रीण प्रियाला विसरू शकलेला नाही. त्याला त्याची पत्नी आणि प्रेयसी दोघांसोबत संबंध ठेवायचे आहेत, पण अडचण अशी आहे की, तो आपल्या पत्नीसोबत दिल्लीत राहतो आणि त्याची मैत्रीण बंगळुरुमध्ये काम करते. दोन्ही नाती सांभाळणे त्याला अवघड झाले आहे.

तो सांगतो की, तो बंगळुरूला वारंवार येत असल्यामुळे त्याच्या पत्नीला त्याच्यावर संशय येऊ लागला आहे. आपला अनुभव कथन करताना तो विवाहबाह्य संबंधांपासून दूर राहण्याचा सल्ला देतो. दोन नाती एकत्र सांभाळणे सोपे नाही आणि त्याचा आनंद लुटण्यासाठी तुमच्याकडे भरपूर पैसा असायला हवा, असे त्याचे मत आहे.

लपवणं सोपं नाही

विवाहित असून अफेअर करणे सोपे नसते, कारण तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यापासून लपून ते करत असता. अशा परिस्थितीत तुमचे भांडे कधीही फुटू शकते. त्यावेळी तुम्ही ते कसे हाताळाल, याचा विचार आधीच करावा लागतो. वाणी प्रिया सांगते, ‘‘विवाहबाह्य वैवाहिक संबंध ठेवणे सोपे नाही, ते खूप धोकादायक असते. त्याचवेळी ते खूप महागडे ठरते. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन धोक्यात येऊ शकते, शिवाय घटस्फोटही होऊ शकतो. पण जर तुम्हाला लग्न आणि अफेअर दोन्ही परवडत असेल तर तुम्ही विवाहबाह्य संबंध ठेवू शकता. जर तुमच्या वैवाहिक जीवनातील आकर्षण नाहीसे झाले असेल तर त्याबद्दल तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला.’’

राहुल प्रजापतीची मैत्रीण इशिता ३ महिन्यांची गरोदर आहे. आता ती त्याच्यावर लग्नासाठी जबरदस्ती करत आहे, पण राहुलचे आधीच लग्न झालेले आहे. पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय तो इशितासोबत लग्न करू शकत नाही. इशिता त्याच्यावर लग्न करण्यासाठी सतत दबाव टाकत आहे. राहुल आता त्या क्षणाला दूषणे देत आहे जेव्हा तो विवाहबाह्य संबंधात अडकला.

खिशावर भार

अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया यांचा घटस्फोट होण्याआधीच अर्जुन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. दरम्यान त्याची मैत्रीण गरोदर राहिली. त्यानंतर त्याने मेहरला घटस्फोट दिला, आज तो आपल्या लिव्ह-इन जोडीदारासोबत लग्न न करताही आपले नाते निभावत आहे. तो श्रीमंत असल्याने असे करू शकला, पण जर तुम्ही श्रीमंत नसाल तर विवाहबाह्य संबंधामुळे तुमच्या खिशावर भार पडेल.

‘ग्लेडन’ अॅप भारतात २०१७ मध्ये आले. त्याचे ३० टक्के वापरकर्ते भारतीय आहेत. हे डेटिंग अॅप केवळ मुंबई, बंगळुरू, दिल्ली, कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांपुरतेच मर्यादित नाही तर मेरठ, भोपाळ, पाटणा यांसारख्या शहरातील लोकही त्याचा वापर करत आहेत. या अॅपवर २४ ते ३० वयोगटातील महिला पुरुषांचा शोध घेतात तर ३१ ते ४० वयोगटातील पुरुष हे महिला शोधतात. डेटिंग अॅप ग्लेडनच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, 53 टक्के भारतीय महिला त्यांच्या पतीशिवाय इतर पुरुषांशी अनैतिक संबंध ठेवतात तर विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पुरुषांची संख्या ४३ टक्के आहे.

आकडेवारी काय सांगते?

आकडेवारीवरून असे निदर्शनास आले आहे की, पुरुष स्त्रियांच्या तुलनेत अधिक विवाहबाह्य संबंध ठेवतात. आकडेवारीनुसार, अशा स्त्रियांची संख्या १२ टक्के तर पुरुषांची संख्या २८ टक्के आहे. सर्वेक्षणात, ७७ टक्के स्त्रियांनी मान्य केले की, त्यांचे वैवाहिक जीवन नीरस असल्याने त्यांचे विवाहबाह्य संबंध होते. ७२ टक्के महिलांना त्यांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कोणतीही खंत नाही.

कारण काय आहे

दिल्लीतील रहिवासी आदिती यादव (नाव बदलले आहे) हिच्यासाठी समस्या उद्भवली जेव्हा मयांकला समजले की, आदितीचे विवाहबाह्य संबंध आहेत. त्याने या मागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याला समजले की, तो आदितीला पाहिजे तसा वेळ देऊ शकत नाही. तो सांगतो की, विवाहबाह्य संबंधांची अनेक कारणे असू शकतात. तुम्ही ती ओळखणे आणि त्यावर विचार करणे महत्त्वाचे आहे.

झारखंड महिला हेल्पलाइन १८१ ‘अभयम’ने काही आकडेवारी सादर केली. त्यानुसार दर तासाला विवाहबाह्य संबंधांशी संबंधित एक प्रकरण नोंदवले गेले. २०१८ ते २०२२पर्यंत या हेल्पलाइनवर तक्रारी वाढू लागल्या. जिथे २०१८ मध्ये ३,८३७ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तिथे २०२२ मध्ये ही आकडेवारी ९,३८२ वर पोहोचली. गेल्या ५ वर्षांत विवाहबाह्य संबंधांमध्ये अडीच पट वाढ झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.

लोकांमध्ये विवाहबाह्य संबंध असण्याची अनेक कारणं असतात. शारीरिक गरज, भावनिक ओढ नसणे, घरगुती हिंसाचार, संवादातील अभाव, जोडीदाराने दुर्लक्ष करणे, एकटेपणा, मुलांची जबाबदारी, लैंगिक गरज पूर्ण न होणे, लहान वयात लग्न होणे, विचारांमधील तफावत, जीवनातील प्राधान्यक्रम वेगवेगळे असणे, नात्यात रुक्षपणा, आकर्षणाचा अभाव, बिछान्यावर खराब कामगिरी, करिअरला महत्त्व इत्यादी अनेक कारणांमुळे जोडीदार विवाहबाह्य संबंधांकडे वळतात. परंतु या सर्वांमध्ये ‘शारीरिक गरज’ही सर्वाधिक समान बाब आहे.

कायदा काय सांगतो?

आयपीसी म्हणजे भारतीय दंड संहितेच्या कलम ४९७ नुसार जर एखाद्या विवाहित पुरुषाचे एखाद्या विवाहित स्त्रीशी शारीरिक संबंध असतील तर तिचा पती त्या पुरुषाविरुद्ध व्यभिचाराच्या नावाखाली गुन्हा दाखल करू शकतो. परंतु कोणीही स्वत:च्या पत्नीवर कोणतीही कारवाई करू शकत नाही किंवा ज्या पुरुषाचे विवाहबाह्य संबंध आहेत अशा पुरुषाची पत्नी त्या दुसऱ्या स्त्रीवर कोणतीही कारवाई करू शकत नाही.

भारतीय दंड संहितेचे कलम ४९७ स्त्रियांच्या प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करते. ते घटनेच्या कलम २१ चे उल्लंघन आहे. कलम ४९७ हे मनमानी करणारे आहे, कारण स्त्रीवर पुरुषाचे कायदेशीर सार्वभौमत्व मान्य करणे चुकीचे आहे.

पत्नी ही पतीची मालमत्ता नाही

विवाहबाह्य संबंधांमध्ये पैसा तर खर्च होतोच, शिवाय ते जास्त काळ लपवताही येत नाहीत. तुमच्या संबंधांबद्दल समजताच तुमचा जोडीदार तुमचे जीवन नकोसे करतो. अशा परिस्थितीत घटस्फोटाचा विचार केला तर ते तितकंसं सोपं होणार नाही. घटस्फोटानंतर तुम्हाला आर्थिक संकटातून जावे लागू शकते. तुम्ही श्रीमंत असाल तर ठीक, नाहीतर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें