सुखी वैवाहिक जीवनात मित्रांची भूमिका

* फातिमा खातून

अमर आणि रिनाचे नुकतेच लग्न झाले होते. लग्नाला फक्त ६ महिने उलटून गेले होते. सर्व सुरळीत सुरू होते. दोघेही लग्न आणि एकमेकांची सोबत यामुळे खूप आनंदी होते. मात्र, अचानक एक समस्या निर्माण झाली. ती कोणाला सांगता येत नव्हती की, कोणाचा सल्ला घेता येत नव्हता. अचानक आयुष्य बदलल्यासारखे वाटू लागले आणि वैवाहिक जीवनाचा सुरुवातीचा उत्साह थंडावला.

अमरचा विवाहित मित्र समीरला याबद्दल समजले. त्याने हातवारे करून अमरला विचारण्याचा प्रयत्न केला, पण अमरने काहीच उत्तर न दिल्याने एके दिवशी तो पत्नीसह अमरच्या घरी गेला. दोघांनीही अमर आणि रिनाला त्यांच्या समस्यांबद्दल मोकळेपणाने विचारले. त्यानंतर त्या दोघांनीही त्यांच्या समस्या उघडपणे सांगितल्या.

त्या ऐकून समीर आणि त्याची पत्नी हसली. त्यांनी सांगितले की, ते देखील या टप्प्यातून गेले आहेत. त्यांनी त्यावर कोणता उपाय शोधला, हे देखील त्यांनी सांगितले.

त्यांच्या सल्ल्यानुसार, अमर आणि रिनाने आपल्या समस्या सोडवल्या आणि काही दिवस गमावलेला सर्व आनंद त्यांच्या आयुष्यात पुन्हा आला. हे फक्त त्यांच्या मित्राच्या मैत्रीने आणि मदतीमुळे शक्य झाले.

एक पवित्र बंधन

लग्न हे २ जिवांमधील एक सुंदर आणि पवित्र बंधन आहे, जे एकमेकांवर मनापासून प्रेम करतात आणि आयुष्य एकत्र घालवू इच्छितात. परंतु, लग्न हे एक आव्हानात्मक आणि गुंतागुंतीचे नातं आहे, ज्यासाठी दोन्ही जोडीदारांकडून अविरत प्रेम आणि वचनबद्धता आवश्यक असते. जोडप्यांना आनंदी आणि निरोगी वैवाहिक जीवन टिकवून ठेवण्यास उपयुक्त ठरणाऱ्या घटकांपैकी एक म्हणजे मित्रांची मजबूत सोबत, जी प्रोत्साहन, सल्ला आणि मदत मिळवून देऊ शकते.

असे मित्र बना, जे वैवाहिक जीवनाचा रथ पुढे नेतील आणि तो पुढे नेत राहाण्यासाठी मदत करतील.

वैवाहिक जीवनात सोबत उभे राहाण्याचा प्रश्न येतो तेव्हा सर्व मित्र तयार होत नाहीत. काही मित्र वैवाहिक नातेसंबंधासाठी विषारी, नकारात्मक किंवा अगदी कुचकामी ठरू शकतात, तर काही एकनिष्ठ, सकारात्मक आणि मदत करणारे ठरू शकतात. वैवाहिक जीवन धोक्यात आणणारे किंवा धोक्यात घालणारे मित्र टाळा किंवा त्यांना मर्यादेत ठेवा.

गोपनीयतेचा आदर

विवाहित जोडप्यासाठी एका चांगल्या मित्राचे काही गुण असे असू शकतात : जे तुमचे लग्न आणि लग्नाचा आनंद साजरा करतात. ते वैवाहिक समस्या किंवा निर्णयांमध्ये हस्तक्षेप किंवा त्यावर चर्चा करत बसत नाहीत तर नि:पक्षपातीपणे सल्ला देतात.

ज्यांना तुमच्या वैवाहिक सुखाचा किंवा आनंदाचा हेवा वाटत नाही किंवा ते त्यावर टीका करत नाहीत.

असे मित्र ज्यांना तुमच्या वैवाहिक जीवनातील आव्हानं आणि अडचणींबद्दल सहानुभूती असते. जे तुमच्यातील वैवाहिक संघर्ष किंवा वादांचे प्रामाणिकपणे मूल्यांकन करतात. तुम्हाला दोष देत नाहीत किंवा निराश होऊ देत नाहीत.

व्यक्तिगत मैत्रीत समतोल साधणे

आजच्या युगात, व्यक्तिगत मैत्री वैवाहिक जीवनाबाहेरील आपली ओळख आणि आवड जपण्यासाठी महत्त्वाची ठरते. वैवाहिक संबंध आणि त्यातील समाधान वाढवण्यासाठी एखाद्या विवाहित जोडप्याशी मैत्री असणे देखील फायदेशीर ठरते. ही दोन विवाहित जोडप्यांमधील अशी मैत्री असते जी समान मूल्य, लक्ष्य यावर आधारीत असून एकमेकांच्या भावना समजून घेते. अशी मैत्री एकत्र येण्याची, शिकण्याची आणि एकत्र पुढे जाण्याची संधी देऊ शकते.

परंतु, जर एका जोडीदाराचे दुसऱ्यापेक्षा जास्त किंवा कमी मित्र असतील किंवा एखाद्या जोडीदाराच्या मित्रांचे दुसऱ्या जोडीदाराच्या मित्रांशी पटत नसेल तर. मात्र अशा मैत्रीत समतोल साधणे कठीण होऊ शकते. अशा मैत्रीत निखळ समतोल साधण्यासाठी काही टिपा :

* तुमच्या व्यक्तिगत आणि विवाहित जोडप्याच्या मैत्रीबद्दलच्या, तुमच्या अपेक्षा आणि प्राधान्यांबद्दल तुमच्या जोडीदाराशी संवाद साधा. यासंदर्भातील तुमची चर्चा प्रामाणिक, आदरयुक्त आणि लवचिक असावी.

* व्यक्तिगत आणि विवाहित जोडपे, अशा दोन्ही मैत्रीसाठी वेळ ठरवा. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी आणि तुमच्या संसारासाठी तसेच तुमचे मित्र आणि स्वत:साठी पुरेसा वेळ देत आहात, याची खात्री करा.

* नवीन जोडपे मित्र शोधा, जे तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराप्रमाणे समान मूल्यं, ध्येय आणि तशी कृती करणारे असेल. अशा प्रकारचे गट किंवा क्लबमध्ये सहभागी व्हा किंवा तुमच्या विद्यमान मित्रांना त्यांना ओळखत असलेल्या इतर जोडप्यांशी तुमची ओळख करून देण्यास सांगा.

सल्ला आणि मार्गदर्शन घ्या

कधीकधी जोडप्यांना त्यांच्या वैवाहिक जीवनात आव्हाने किंवा समस्यांना सामोरे जावे लागते, ज्या ते स्वत: सोडवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, विश्वासू मित्रांकडून सल्ला आणि मार्गदर्शन घेणे उपयुक्त तसेच आश्वासक ठरू शकते. विश्वासू मित्र हे असे मित्र असतात ज्यांच्या मनात वैवाहिक जीवनासाठीचे सर्वोत्तम हित असते, ज्यांना वैवाहिक समस्या हाताळण्याचा अनुभव आणि ज्ञान असते आणि जे वस्तुनिष्ठ तसेच नि:पक्षपाती दृष्टिकोन ठेवून सल्ला देऊ शकतात.

परंतु, विश्वसनीय मित्रांकडून सल्ला आणि मार्गदर्शन घेताना ते सावधगिरीने आणि विवेकबुद्धीने घेतले पाहिजे, कारण सर्व मित्र अचूक आणि उपयुक्त सल्ला देण्यास सक्षम नसतात. विश्वसनीय मित्रांकडून सल्ला आणि मार्गदर्शन मिळविण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वं असू शकतात :

* तुमचा कोणावर विश्वास आहे ते काळजीपूर्वक ठरवा. अशा मित्रांना टाळा ज्यांचे गुप्त हेतू, छुपे अजेंडा किंवा वैयक्तिक पूर्वग्रह असू शकतात. त्यांनी कोणत्याही बाबतीत दिलेला सल्ला तुमच्या नात्यावर परिणाम करू शकतो. तुमच्या लग्नाबद्दल अफवा पसरवणारे, गप्पा मारत बसणारे किंवा तुमची गुपितं सर्वत्र पसरवणारे मित्र टाळा.

* तुम्हाला तुमच्या मित्रांकडून काय हवे आहे ते आधीच ठरवा. त्यांनी ऐकावे, सहानुभूती दाखवावी, सल्ला द्यावा किंवा हस्तक्षेप करावा अशी तुमची इच्छा आहे का? त्यांनी तुमचे संभाषण खासगी ठेवावे किंवा त्याबद्दल इतरांना सांगावे, असे तुम्हाला वाटते का? त्यांनी याचा पाठपुरावा करावा की ते सोडून द्यावे असे तुम्हाला वाटते का? आपल्या अपेक्षा आणि मर्यादा स्पष्टपणे सांगा.

* वेगवेगळ्या कल्पना आणि दृष्टिकोनांसाठी मनमोकळेपणाने वागा. मित्रांचा सल्ला नाकारू नका. तुम्हाला तो आवडला नसला तरीही तो नाकारू नका किंवा वाद घालू नका.

विवाहित मित्रांची भूमिका

विवाहित मित्र असणेदेखील वैवाहिक नाते मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते, कारण ते वैवाहिक नातेसंबंधासाठी सकारात्मक आदर्श, प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊ शकतात. विवाहित मित्र वैवाहिक नातेसंबंधांसाठी सल्ला, अनुभव आणि तुलना करण्यासाठीचा स्त्रोत म्हणून देखील काम करू शकतात, कारण ते अनुभव, प्रशंसा आणि सुयोग्य टीका करू शकतात ज्यामुळे जोडप्यांना त्यांचे वैवाहिक जीवन सुधारण्यास आणि पुढे घेऊन जाण्यास मदत होऊ शकते.

काही असे मार्ग ज्याद्वारे विवाहित मित्र वैवाहिक नातेसंबंध मजबूत करू शकतात :

* ते निरोगी आणि यशस्वी वैवाहिक वर्तन आणि पद्धती जसे की संवाद साधणे, वादाचे निराकरण, आत्मीयता आणि सहकार्य दर्शवू शकतात. जोडपे त्यांच्या विवाहित मित्रांच्या उदाहरणांवरून शिकू शकतात आणि ती शिकवण त्यांच्या स्वत:च्या संसारात आचरणात आणू शकतात.

* ते त्यांच्या लग्नाची गोष्ट, अनुभव आणि धडे, चांगले आणि वाईट दोन्ही एकमेकांना सांगू शकतात. जोडप्यांना त्यांच्या विवाहित मित्रांच्या शहाणपणाचा आणि ज्ञानाचा फायदा होऊ शकतो आणि ते त्यांच्या वैवाहिक जीवनात समान चुका किंवा अडचणी टाळू शकतात.

* ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ शकतात आणि त्यांच्या वैवाहिक ध्येयांचा आणि स्वप्नांचा पाठपुरावा करू शकतात जसे की सहलीला जाणे, पालकत्व स्वीकारणे किंवा व्यवसाय सुरू करणे. ते एकमेकांना आनंद देऊ शकतात आणि आपल्या लग्नात एकमेकांचे यश, सुखाचा आनंद साजरा करू शकतात.

* ते त्यांच्या लग्नातील नवीन आणि रोमांचक पैलू जसे की, त्यांचा छंद, आवड किंवा नवनवीन कल्पनांचा शोध घेऊन एकमेकांना आव्हान देऊ शकतात आणि प्रोत्साहित करू शकतात. जोडपे त्यांच्या विवाहित मित्रांसोबत नवीन गोष्टींचा अनुभव घेत आपल्या लग्नाला एक आनंद सोहळा बनवू शकतात. लग्नाला नेहमीच नवे आणि आनंददायी ठेवू शकतात.

आनंदाचा उपभोग घ्या

– शोभा कटारे

माझ्या शेजारी राहणाऱ्या मीराला कशाचीच कमी नाहीये. सर्व काही तर आहे तिच्याकडे दोन दोन घरं, मोठमोठ्या गाड्या, भरपूर महागडे कपडे, दागिने. परंतु अलीकडे ती खूपच दु:खी दिसतेय, सर्व काही असून देखील ती आनंदी नाहीये. शेवटी अशी कोणती गोष्ट आहे, जी मिळताच ती आनंदी होईल. घरातील सर्व लोकं तिला समजून घेताहेत आणि शक्य तेवढे त्यावर उपाय करत आहेत. अलीकडच्या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक जण अशी गोष्ट शोधत आहे तर ती आहे आनंद आणि तो मिळवण्यासाठी सर्व काही करायला तयार आहेत. परंतु हे मिळविण्यात ते अयशस्वी होत आहेत. असं म्हटलं जातं की पैशाने सर्वकाही विकत घेतलं जाऊ शकतं परंतु कदाचित आनंद नाही. शेवटी कोणती आहे ती पद्धत वा मार्ग जे मिळवून तुम्ही आनंदी राहू शकता.

रहा निरोगी

जर आनंदी राहायचं असेल तर निरोगी राहणं गरजेचं आहे, कारण असं म्हटलं जातं की निरोगी शरीरानेच आनंदी राहू शकता. लक्षात ठेवा चांगलं आरोग्य पैशाने बनवता येत नाही परंतु एक चांगलं आरोग्य पैशाने कमावलं जाऊ शकतं आणि सोबतच आपल्या सर्व इच्छा, आकांक्षा आणि गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात.

यासाठी नियमित व्यायाम करणं, समतोल आहार घेणं आणि भरपूर ६ ते ७ तासाची झोप घेणं गरजेचे आहे. परंतु अलीकडच्या धावपळीच्या दिनचर्येमध्ये हे स्वीकारणं व करणं कठीण होत चाललंय. ज्यामुळे आपण कमी वयात देखील आजारी पडत आहोत आणि मनात असूनदेखील आनंदी राहू शकत नाहीत.

ओळखा आपला आनंद

सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीने आनंद मिळतो, जसं एखाद्याला चांगलं खाण्याने आनंद मिळतो, कोणाला चांगले कपडे घालण्याने, कोणाला फिरायला जाण्याने, तर कोणाला मंदिरात जाऊन सेवा करण्याने, कोणाला अभ्यास करण्याने, कोणाला कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याने, तर कोणाला संगीत ऐकल्याने, तर कोणाला पैसा कमविण्याने आणि स्वत:चा बँक बॅलन्स वाढवण्याने इत्यादी. आनंदी राहण्यासाठी सर्वात गरजेचं आहे की तुम्ही तुमचा आनंद ओळखा.

साजरे करा छोटे छोटे आनंद

अलीकडची तरुणाई मोठमोठी सुखं आणि आनंदाच्या शोधामध्ये फिरत असते, परंतु छोट्या छोट्या गोष्टींकडे ते लक्ष देत नाहीत. म्हणून आपण इथे बोलूया तोच आनंद जो आपल्या आजूबाजूलाच असतो परंतु ते त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून आपला आनंद ओळखण्याचा प्रयत्न करा.

शेवटी तुम्ही काय केल्याने, कोणत्या लोकांसोबत उठबस केल्याने, बोलल्याने तुम्हाला आनंद मिळतो, फोटोज क्लिक केल्याने, तुमच्या घराच्या बागेची देखभाल करण्याने, वा घर सजविल्याने, जेवण बनवल्याने त्या सर्व गोष्टींची तुम्ही स्वत: अनुभूती घ्या.

अनेकदा आपण सुखाच्यादेखील योजना बनवतो की मी असं करेन वा तसं करेन तेव्हा मला आनंद मिळेल, जसं जर मी पैसे साठवेन, नवीन घर विकत घेईन, नवीन कार घेईन तर मला आनंद मिळेल. परंतु आपण त्या आनंदाबाबत बोलतच नाही वा त्याकडे दुर्लक्ष करतो ज्या आपल्याला विनासायास मिळतात. तुम्ही नोकरदार आहात आणि अचानक तुम्हाला सुट्टी मिळाली, एखादी हरवलेली वस्तू अचानक सापडली, जुन्या कपड्यांमधून काही पैसे मिळाले, अचानक काही फ्री गिफ्ट मिळाले तर हे खूप आनंद देणारा आहे, ज्याला आपण आपल्या आनंदामध्ये समावेश करू शकत नाही म्हणून हे गरजेचं नाही की आपण आपला आनंद शोधण्यासाठी कुठे जावं. हे तर आपल्या आजूबाजूलाच असतं. फक्त गरज आहे तुम्ही ते वाटण्याची आणि उपभोगण्याची देखील.

समाधानी रहा

आनंदी राहण्यासाठी सर्वात गरजेचं आहे समाधानी राहणं. जर एखादी गोष्ट तुम्हाला मिळूनदेखील तुम्ही समाधानी नसाल तर तुम्ही नेहमी काही ना काही मिळवण्याच्या मागे राहाल आणि तुमचा वेळ असाच गमावून बसाल.

सकारात्मक रहा

आनंदी राहण्यासाठी तुमची विचारसरणी सकारात्मक ठेवा, दुसऱ्यांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. अनेकदा आपण दुसऱ्यांकडून जरा जास्तच अपेक्षा ठेवतो आणि जेव्हा ती पूर्ण होत नाही तेव्हा निराश आणि दु:खी होतो. खरंतर अनेकदा आपली ही निराशा आनंदावर हावी होते आणि आपण मनात असूनदेखील आनंदी राहू शकत नाही, जसं की त्यांनी आपल्या सोबत असं वागायला पाहिजे होतं, चांगलं जेवण बनवायला पाहिजे होतं, चांगलं गिफ्ट द्यायला पाहिजे होतं वगैरे वगैरे.

काही वेळ जिवलगांसोबत घालवा

अलीकडच्या धावपळीच्या दिनचर्येनंतर जेव्हा देखील मोकळा वेळ मिळतो तेव्हा आपण आपला मोबाईल घेऊन बसतो. आपला संपूर्ण वेळ या आभासी दुनियेमध्ये घालवतो, ज्यामुळे आपण पूर्ण जगाशी आणि लोकांशी जुळलेले राहतो परंतु आजूबाजूचं जग आणि जिवलगांपासून दूर राहतो. त्यामुळे कोणा दुसऱ्यासोबत वेळ घालवण्याची आपल्याला खूपच कमी संधी मिळते आणि आपल्याला एकटेपणा वाटतो.

जर आपण मनात आणलं तर हा एकटेपणा दूर करण्यासाठी आपला काही वेळ दुसऱ्यांना भेटणं, चेष्टा मस्करी, गप्पा मारण्यामध्ये घालवू शकतो आणि हा आनंद कायमचा आपल्या आठवणीत ठेवू शकतो.

शेअरिंगची सवय लावा

अलीकडे आपली असो वा तरुण पिढी स्वत:च्या मनातली गोष्ट असो वा एखादी समस्या ते एकमेकांसोबत शेअर करत नाहीत आणि मनातल्या मनात उदास राहतात आणि त्याचं समाधान स्वत: डिजिटल मीडियामध्ये शोधू लागतात. मग खरं खरं समाधान न मिळाल्यास त्रास होत राहतो. या गोष्टींमुळे अनेकदा आपल्याला निराशा वाटू लागते. यापासून वाचण्यासाठी एकमेकांसोबत तुमच्या गोष्टी शेअर करा. कदाचित तुम्हाला तुमच्या समस्येचा उपाय मिळेल, चिंता दूर होईल आणि तुम्हाला आनंद मिळेल.

मिनिमलिस्टिक लाईफस्टाईलचा स्वीकारा

मिनिमलिस्टीक लाईफस्टाईलचा अर्थ साधसुधं आयुष्य कोणत्याही चमकधमकी शिवाय कमीत कमी गोष्टींसोबत राहणं आणि खर्च कमी करणं.

या लाइफस्टाइलचा स्विकार करून तुम्हाला समजेल की कोणत्या गोष्टी शिवाय आपण राहू शकत नाही आणि कोणत्या गोष्टींची आपल्याला गरज आहे, कोणत्या गोष्टीची आपल्याला इच्छा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला या लाईफस्टाईलपासून शिकायला मिळतं, ते म्हणजे तुमची इच्छा आणि गरजांमध्ये फरक करणं, कारण काही गोष्टी आपण आपल्या गरजेसाठी पूर्ण करतो आणि काही आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करतो.

भावना शब्दात व्यक्त करा

अलीकडे आपण सर्वांनी स्वत:ला डिजिटल स्क्रीन समोर कैद केलं आहे. आपापसात भेटणं बंद केलं आहे. आपापसात गप्पा मारण्याऐवजी आपण मेसेज, व्हाट्सअप आणि फेसबुकचा आधार घेत आहोत. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी शब्दान ऐवजी इमोजी आणि शॉर्टमध्ये शब्दांचा वापर करत आहोत.

त्यामुळे प्रयत्न करा की रात्रीचे जेवण एकत्रित एका टेबलवर बसून खा म्हणजे एकमेकांशी संवाद साधता येईल, तुमच्या भावना शब्दांमध्ये व्यक्त करू शकाल तसंच तुमच्या मनातील गोष्टी एकमेकांसोबत शेअर कराल, जर कोणाला एखादी समस्या असेल तर ती सोडविण्यात एकमेकांना मदत कराल.

विवाहबाह्य संबंध ठेवणं सोपं नाही

* प्रियंका यादव

जेवणाच्या टेबलवर बसलेला जयंत कुठेतरी हरवला होता. तो काही खातही नव्हता. ते पाहून पत्नी अपूर्वाने त्याला विचारले, ‘‘कुठे हरवलास?’’

‘‘कुठेच नाही,’’ असं म्हणत जयंतने उत्तर देणं टाळलं.

खरंतर जयंत रियाचा विचार करत होता. रिया जयंतची मैत्रीण होती. तिचे त्याच्यासोबत २ वर्षांपासून संबंध होते. जयंतला अलीकडेच व्यवसायात तोटा झाला होता. त्यामुळे लग्न आणि विवाहबाह्य संबंध या दोन्ही गोष्टी कशा सांभाळायच्या, असा प्रश्न त्याला पडला होता. रिया पूर्णपणे जयंतवर अवलंबून होती. व्यवसायात झालेल्या तोट्यामुळे जयंतला आता रियाचा खर्च भागवता येत नव्हता. त्याने याबाबत रियाशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा उपयोग झाला नाही, कारण पुरुषांनी स्त्रियांच्या सर्व गरजा पूर्ण कराव्यात, असे तिचे मत होते.

रियाच्या अशा विचारसरणीमुळे जयंत त्रासला होता. आता त्याला रियासोबतचे संबंध तोडायचे होते, पण अडचण अशी होती की, रिया यासाठी तयार नव्हती. यातून सुटका कशी करून घ्यायची, या पेचात जयंत होता.

व्यावहारिक नाही आणि परवडणारेही नाहीत

विवाहबाह्य संबंध व्यावहारिक किंवा परवडणारेही नसतात. त्यात अनेक खर्च आणि अडचणी येतात. विवाहबाह्य संबंधांचे अनेक प्रकार आहेत. ज्या लोकांचे जोडीदार भावनिक नसतात, असे लोक आपल्या वैवाहिक जीवनाबाहेर भावना शोधतात. हे लोक अशा जोडीदाराच्या शोधात बाहेर पडतात ज्याच्याशी ते भावनिकरित्या जोडले जाऊ शकतील. या प्रकाराला इमोशनल अफेअर्स म्हणजेच भावनिक विवाहबाह्य संबंध असे म्हणतात.

जे लोक आपल्या वैवाहिक जीवनाला कंटाळले आहेत आणि असे लोक ज्यांना त्यांच्या आयुष्यात वेगळे काहीतरी हवे असते ते वन नाईट स्टँड म्हणजे एका रात्रीची संकल्पना स्वीकारतात. याशिवाय लोकांमध्ये सेक्स अॅडिक्ट अफेअर्सही असतात. अशी अफेअर्स सेक्स अॅडिक्ट लोक करतात. अशा लोकांसाठी, सेक्स सर्वकाही असते. काही लोक लव अॅडिक्ट अफेअर्सही करतात. असे अफेअर्स प्रेमाच्या आहारी गेलेले लोक करतात. त्यांच्यासाठी प्रेम खूप महत्त्वाचे असते. सुमितच्या लग्नाला २ वर्षे झाली आहेत, तरीही तो त्याची जुनी मैत्रीण प्रियाला विसरू शकलेला नाही. त्याला त्याची पत्नी आणि प्रेयसी दोघांसोबत संबंध ठेवायचे आहेत, पण अडचण अशी आहे की, तो आपल्या पत्नीसोबत दिल्लीत राहतो आणि त्याची मैत्रीण बंगळुरुमध्ये काम करते. दोन्ही नाती सांभाळणे त्याला अवघड झाले आहे.

तो सांगतो की, तो बंगळुरूला वारंवार येत असल्यामुळे त्याच्या पत्नीला त्याच्यावर संशय येऊ लागला आहे. आपला अनुभव कथन करताना तो विवाहबाह्य संबंधांपासून दूर राहण्याचा सल्ला देतो. दोन नाती एकत्र सांभाळणे सोपे नाही आणि त्याचा आनंद लुटण्यासाठी तुमच्याकडे भरपूर पैसा असायला हवा, असे त्याचे मत आहे.

लपवणं सोपं नाही

विवाहित असून अफेअर करणे सोपे नसते, कारण तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यापासून लपून ते करत असता. अशा परिस्थितीत तुमचे भांडे कधीही फुटू शकते. त्यावेळी तुम्ही ते कसे हाताळाल, याचा विचार आधीच करावा लागतो. वाणी प्रिया सांगते, ‘‘विवाहबाह्य वैवाहिक संबंध ठेवणे सोपे नाही, ते खूप धोकादायक असते. त्याचवेळी ते खूप महागडे ठरते. यामुळे तुमचे वैवाहिक जीवन धोक्यात येऊ शकते, शिवाय घटस्फोटही होऊ शकतो. पण जर तुम्हाला लग्न आणि अफेअर दोन्ही परवडत असेल तर तुम्ही विवाहबाह्य संबंध ठेवू शकता. जर तुमच्या वैवाहिक जीवनातील आकर्षण नाहीसे झाले असेल तर त्याबद्दल तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला.’’

राहुल प्रजापतीची मैत्रीण इशिता ३ महिन्यांची गरोदर आहे. आता ती त्याच्यावर लग्नासाठी जबरदस्ती करत आहे, पण राहुलचे आधीच लग्न झालेले आहे. पत्नीला घटस्फोट दिल्याशिवाय तो इशितासोबत लग्न करू शकत नाही. इशिता त्याच्यावर लग्न करण्यासाठी सतत दबाव टाकत आहे. राहुल आता त्या क्षणाला दूषणे देत आहे जेव्हा तो विवाहबाह्य संबंधात अडकला.

खिशावर भार

अर्जुन रामपाल आणि त्याची पत्नी मेहर जेसिया यांचा घटस्फोट होण्याआधीच अर्जुन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. दरम्यान त्याची मैत्रीण गरोदर राहिली. त्यानंतर त्याने मेहरला घटस्फोट दिला, आज तो आपल्या लिव्ह-इन जोडीदारासोबत लग्न न करताही आपले नाते निभावत आहे. तो श्रीमंत असल्याने असे करू शकला, पण जर तुम्ही श्रीमंत नसाल तर विवाहबाह्य संबंधामुळे तुमच्या खिशावर भार पडेल.

‘ग्लेडन’ अॅप भारतात २०१७ मध्ये आले. त्याचे ३० टक्के वापरकर्ते भारतीय आहेत. हे डेटिंग अॅप केवळ मुंबई, बंगळुरू, दिल्ली, कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांपुरतेच मर्यादित नाही तर मेरठ, भोपाळ, पाटणा यांसारख्या शहरातील लोकही त्याचा वापर करत आहेत. या अॅपवर २४ ते ३० वयोगटातील महिला पुरुषांचा शोध घेतात तर ३१ ते ४० वयोगटातील पुरुष हे महिला शोधतात. डेटिंग अॅप ग्लेडनच्या संशोधनात असे आढळून आले आहे की, 53 टक्के भारतीय महिला त्यांच्या पतीशिवाय इतर पुरुषांशी अनैतिक संबंध ठेवतात तर विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या पुरुषांची संख्या ४३ टक्के आहे.

आकडेवारी काय सांगते?

आकडेवारीवरून असे निदर्शनास आले आहे की, पुरुष स्त्रियांच्या तुलनेत अधिक विवाहबाह्य संबंध ठेवतात. आकडेवारीनुसार, अशा स्त्रियांची संख्या १२ टक्के तर पुरुषांची संख्या २८ टक्के आहे. सर्वेक्षणात, ७७ टक्के स्त्रियांनी मान्य केले की, त्यांचे वैवाहिक जीवन नीरस असल्याने त्यांचे विवाहबाह्य संबंध होते. ७२ टक्के महिलांना त्यांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल कोणतीही खंत नाही.

कारण काय आहे

दिल्लीतील रहिवासी आदिती यादव (नाव बदलले आहे) हिच्यासाठी समस्या उद्भवली जेव्हा मयांकला समजले की, आदितीचे विवाहबाह्य संबंध आहेत. त्याने या मागचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याला समजले की, तो आदितीला पाहिजे तसा वेळ देऊ शकत नाही. तो सांगतो की, विवाहबाह्य संबंधांची अनेक कारणे असू शकतात. तुम्ही ती ओळखणे आणि त्यावर विचार करणे महत्त्वाचे आहे.

झारखंड महिला हेल्पलाइन १८१ ‘अभयम’ने काही आकडेवारी सादर केली. त्यानुसार दर तासाला विवाहबाह्य संबंधांशी संबंधित एक प्रकरण नोंदवले गेले. २०१८ ते २०२२पर्यंत या हेल्पलाइनवर तक्रारी वाढू लागल्या. जिथे २०१८ मध्ये ३,८३७ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या तिथे २०२२ मध्ये ही आकडेवारी ९,३८२ वर पोहोचली. गेल्या ५ वर्षांत विवाहबाह्य संबंधांमध्ये अडीच पट वाढ झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.

लोकांमध्ये विवाहबाह्य संबंध असण्याची अनेक कारणं असतात. शारीरिक गरज, भावनिक ओढ नसणे, घरगुती हिंसाचार, संवादातील अभाव, जोडीदाराने दुर्लक्ष करणे, एकटेपणा, मुलांची जबाबदारी, लैंगिक गरज पूर्ण न होणे, लहान वयात लग्न होणे, विचारांमधील तफावत, जीवनातील प्राधान्यक्रम वेगवेगळे असणे, नात्यात रुक्षपणा, आकर्षणाचा अभाव, बिछान्यावर खराब कामगिरी, करिअरला महत्त्व इत्यादी अनेक कारणांमुळे जोडीदार विवाहबाह्य संबंधांकडे वळतात. परंतु या सर्वांमध्ये ‘शारीरिक गरज’ही सर्वाधिक समान बाब आहे.

कायदा काय सांगतो?

आयपीसी म्हणजे भारतीय दंड संहितेच्या कलम ४९७ नुसार जर एखाद्या विवाहित पुरुषाचे एखाद्या विवाहित स्त्रीशी शारीरिक संबंध असतील तर तिचा पती त्या पुरुषाविरुद्ध व्यभिचाराच्या नावाखाली गुन्हा दाखल करू शकतो. परंतु कोणीही स्वत:च्या पत्नीवर कोणतीही कारवाई करू शकत नाही किंवा ज्या पुरुषाचे विवाहबाह्य संबंध आहेत अशा पुरुषाची पत्नी त्या दुसऱ्या स्त्रीवर कोणतीही कारवाई करू शकत नाही.

भारतीय दंड संहितेचे कलम ४९७ स्त्रियांच्या प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करते. ते घटनेच्या कलम २१ चे उल्लंघन आहे. कलम ४९७ हे मनमानी करणारे आहे, कारण स्त्रीवर पुरुषाचे कायदेशीर सार्वभौमत्व मान्य करणे चुकीचे आहे.

पत्नी ही पतीची मालमत्ता नाही

विवाहबाह्य संबंधांमध्ये पैसा तर खर्च होतोच, शिवाय ते जास्त काळ लपवताही येत नाहीत. तुमच्या संबंधांबद्दल समजताच तुमचा जोडीदार तुमचे जीवन नकोसे करतो. अशा परिस्थितीत घटस्फोटाचा विचार केला तर ते तितकंसं सोपं होणार नाही. घटस्फोटानंतर तुम्हाला आर्थिक संकटातून जावे लागू शकते. तुम्ही श्रीमंत असाल तर ठीक, नाहीतर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.

प्रेरणा: आजारी पत्नीला कसे आधार द्यायचा

* पूनम अहमद

प्रेरणा: जेव्हा ३२ वर्षीय अनुजाला कळले की तिला घशाचा कर्करोग आहे, तेव्हा तिच्या पायाखालून जमीन सरकल्यासारखे वाटले. डॉक्टरांनी तिला कळवले तेव्हा तिच्या गालावरून अश्रू वाहत होते. आज, ती ऑफिसमधून एकटीच डॉक्टरकडे आली होती. बऱ्याच दिवसांपासून अनुजाला असे वाटत होते की तिला काहीतरी त्रास होत आहे. आज, अनुजाला तिचा पती शाश्वत तिच्यासोबत डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटला जावा असे वाटत होते, पण शाश्वत फोनवर म्हणाला, “काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. तू खूप घाबरत आहेस. फक्त आराम कर. मी तुला संध्याकाळी घरी भेटेन.”

अनुजाने काहीशा कठोर स्वरात विचारले, “संध्याकाळ की रात्री?”

डॉक्टरांनी अनुजाशी संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चर्चा केली आणि तिला धीर दिला, “चला उपचार सुरू करूया. केमोथेरपीमुळे सामान्य परिस्थिती पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे. त्यासाठी वेळ लागेल, पण आम्हाला ते लवकर कळले हे चांगले आहे.”

कर्करोगासारख्या आजाराचा उल्लेख आल्यावर कोणीही घाबरणे स्वाभाविक आहे. अनुजा डॉक्टरांच्या क्लिनिकमधून अश्रू पुसत बाहेर पडताच, एकीकडे तिच्या आजाराचे दुःख आणि दुसरीकडे शाश्वतची असंवेदनशीलता तिच्या मनाला चिरडून टाकत होती. तिने शांतपणे एक कॅब बुक केली आणि विचार करत राहिली. कॅबमध्ये तिच्या पतीबद्दल जितके जास्त विचार करत होती तितकीच ती अधिक नैराश्यात जात होती.

नात्यांमध्ये निष्काळजीपणा

अनुजा आणि शाश्वतचे लग्न दोन वर्षांपूर्वी झाले होते. दोघांनाही चांगल्या नोकऱ्या होत्या. ते अजूनही मुंबईत भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. हळूहळू अनुजाला जाणवले की शाश्वत थोडासा निश्चिंत आहे. त्याला नेहमीच मित्रांसोबत गप्पा मारणे आणि त्यांच्या सिगारेट-अल्कोहोलच्या मेळाव्यांमध्ये सहभागी होणे आवडते. कामावरून परतल्यानंतर, तो त्याच्या तीन मित्रांसोबत, रवी, सुजॉय आणि नितीनसोबत, कधी इमारतीच्या पार्किंग क्षेत्रात, तर कधी सोसायटीच्या बागेत बसून दारू पित असे. रात्री १० वाजेपर्यंत, त्यांच्या बायका फोन करत असताना सगळे उठायचे. हा जवळजवळ रोजचाच दिनक्रम होता.

अनुजाचे आईवडील डेहराडूनमध्ये राहत होते आणि शाश्वतचे दिल्लीत. अनुजा आणि शाश्वतच्या मुंबईतील एका बेडरूमच्या फ्लॅटमध्ये सर्वांना त्यांच्या भेटींमुळे अस्वस्थ वाटत होते, म्हणून सगळे एकमेकांशी संवाद साधत होते आणि २-४ दिवसांत निघून जात होते. बऱ्याचदा, अनुजा आणि शाश्वत लांब वीकेंडला भेटायला जायचे, पण आता अनुजाची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बिघडत होती. तब्येत बाजूला ठेवून, शाश्वतचा बेफिकीर स्वभाव अनुजाला जास्त त्रास देत होता. शाश्वत तिच्या शेजारी नसताना ती इतक्या गंभीर आजाराचा सामना कसा करेल याचा विचार करत तिचे डोळे पाणावले. घरी पोहोचल्यावर तिला शाश्वतची गाडी उभी असलेली दिसली. तिने आजूबाजूला पाहिले, पण तो सापडला नाही, म्हणून तिने त्याला हाक मारली, “तू कुठे आहेस?”

“या तिघांसह बागेच्या टेरेसवर.”

“घरी ये, मला थोडी काळजी वाटतेय.”

“काय झालं?”

“मी आत्ताच डॉक्टरांकडून आलो आहे. शाश्वत, लवकर ये,” असं म्हणत तिचा आवाज दाबला गेला.

“तू घरी आहेस की खाली?”

“मी तुझ्या गाडीजवळ आहे.”

“मी येतेय.”

जेव्हा शाश्वत आला तेव्हा अनुजा त्याच्या गाडीला टेकून उभी होती, खूप दुःखी दिसत होती. जेव्हा तो जवळ आला तेव्हा अनुजा म्हणाली, “वर ये, मी तुला सांगते.”

“मला फक्त इथे सांग, अनुजा, सगळं ठीक आहे ना?” ते माझी वाट पाहत आहेत.”

“नाही, काहीतरी ठीक नाहीये.”

“मला सांग?”

“बायोप्सी रिपोर्ट ठीक नाहीये. नक्कीच घशाचा कर्करोग आहे.” अनुजाच्या गालावरून काही अश्रू ओघळले. तिला घरी बसून शाश्वतला हे सांगायचे होते, पण तिला तिच्या मित्रांमध्ये जाण्याची घाई होती.

“अरे, ही भयानक बातमी आहे. आपण दुसऱ्या डॉक्टरला भेटू शकतो का ते पाहूया. तू जा आणि आराम कर, मी त्यांना लगेच सांगतो.”

“त्यांना फोनवर सांग.”

“मी येतोय,” आणि त्या रात्री शाश्वत पुन्हा निघून गेला, रात्री १० वाजताच परतला. तो परत आला तेव्हा अनुजा आधीच झोपली होती. आज ती मानसिकदृष्ट्या खचली होती. तिच्या पत्नीच्या गंभीर आजारानेही तिच्या सवयी बदलल्या नव्हत्या. अनुजा तिच्या आजाराचा आणि उपचारांचा सामना स्वतःहून करत राहिली. हळूहळू तिची कमजोरी इतकी वाढली की तिला नोकरी सोडावी लागली. त्यांचे दोन्ही पालक हे ऐकताच त्यांना भेटायला आणि सांत्वन देण्यासाठी येत असत. आजाराचा तो सुरुवातीचा टप्पा होता आणि बरे होण्याची पूर्ण आशा होती आणि त्यांच्यावर एक छोटी शस्त्रक्रियाही झाली होती. शाश्वत अजूनही रुग्णालयात शांतपणे राहत होता, पण तो घरी परतल्यानंतर, रात्री उशिरापर्यंत मित्रांसोबत फिरण्याचा तोच दिनक्रम चालू राहिला.

अनुजाने कडक आहाराचे नियम पाळले होते; ती मीठ खाऊ शकत नव्हती. तिला खूप हलके अन्न खावे लागत होते. घरकाम करणाऱ्यांना घरकामासाठी अतिरिक्त पैसे दिले जात होते, परंतु यावेळी अनुजाला आवश्यक असलेला भावनिक आधार मिळाला नाही. शाश्वतकडून, पण तिच्या काही मैत्रिणींकडून. कधी शाश्वत तिला केमोसाठी घेऊन जायचा, कधी त्याची मैत्रीण रेणूकडून. कधी अनुजाचे पालक त्यांच्यासोबत जायचे.

एका रात्री, बागेतून घरी परतताना, शाश्वतचा तोल गेला आणि तो रस्त्यावर पडला. तो खूप वेदनेने उभा राहिला, पण त्याला असे वाटले की तो तुटला आहे. तो खूप कष्टाने घरी पोहोचला. अनुजा आधीच कमकुवत आणि आजारी होती. शाश्वतला वेदनेत पाहूनही ती फार काही करू शकत नव्हती. शाश्वतने सुजॉयला फोन केला, त्याच्या वेदनांबद्दल सांगितले आणि त्याला डॉक्टरकडे घेऊन जाण्यास सांगितले. सुजॉयने संकोचून उत्तर दिले, “मित्रा, मी नुकताच परतलो आहे.” जर मी पुन्हा गेलो तर घरी त्रास होईल, पण काही हरकत नाही, मी लवकर तपासणी करून घेईन.”

सुजॉय घाईघाईने आला. त्यांनी ताबडतोब रुग्णालयात धाव घेतली आणि एक्स-रे काढला; हेअरलाइन फ्रॅक्चर होते. शाश्वतने त्याचे डोके घट्ट धरले. त्यानंतर, खूप कठीण काळ सुरू झाला. अनुजा शक्य तितके काम करत होती. शाश्वतचे मित्र दोन-तीन वेळा आले, नंतर फक्त त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. आता अनुजाचे पालक यायचे होते. शाश्वतने ऑफिसमधून सुट्टी घेतली होती, पण अपराधीपणाची भावना त्याला ग्रासू लागली होती. त्याला त्याच्या निष्काळजीपणाची लाज वाटली.

अनुजाची अवस्था पाहून त्याला लाज वाटली. त्याची पत्नी आजारी होती, त्याचे मित्र हरवत होते. एके दिवशी त्याने नितीनला फोनवर सांगितले, “तू गायब झाला आहेस मित्रा. मित्र आजारी असताना असे कोण करते?”

उत्तर आले, “तू मला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेस का? मित्रा, तुला तुझ्या पत्नीच्या आजाराची पर्वा नव्हती. आता आम्हाला सांगू नको मित्रा. बरे हो, आपण नंतर पार्टी करू.”

शाश्वतला फसवल्यासारखे वाटले. शाश्वतच्या मैत्रिणीच्या शब्दांनी तिला धडा शिकवला, पण त्यावेळी तिच्या पतीकडून भावनिक आधार न मिळाल्याने अनुजासाठी एक कटू आठवण राहिली.

अनेक पती नकळत शाश्वतसारख्या चुका करतात. जेव्हा त्यांची पत्नी आजारी असते तेव्हा ते आर्थिक जबाबदारी स्वीकारून आपले कर्तव्य पूर्ण झाल्याचे मानतात. पण पत्नीला तिच्या पतीचा सौम्य स्पर्श, त्याचा आधार आणि “सर्व काही ठीक होईल” असे काही प्रेमळ शब्दांची नितांत आवश्यकता असते. अनुजा यांना त्यावेळी अन्न, दागिने किंवा कपड्यांची गरज नव्हती; तिला फक्त तिच्या पतीच्या प्रेमाची आणि सहवासाची गरज होती.

सर्व पती नाहीत, परंतु काही पती त्यांच्या आजारपणात त्यांच्या पत्नींना सर्वात जास्त आवश्यक असलेला भावनिक आधार देण्याकडे दुर्लक्ष करतात.

जेव्हा रेखा यांनी गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया केली, तेव्हा ती देखील तीव्र वेदनांच्या क्षणी तिचा पती येऊन काही वेळ तिच्यासोबत बसण्याची वाट पाहत राहिली. ती स्पष्ट करते की रुग्णालयात असतानाही तिचा पती तिच्या जवळ असूनही तिच्यासोबत नव्हता. तो सतत फोनवर वेळ घालवत होता. त्या काळाची आठवण अजूनही तिला वेदना देते.

थेरपिस्ट अ‍ॅशले हडसन यांच्या मते, निरोगी नात्याची गुरुकिल्ली ही आहे: तुमच्या जोडीदाराच्या भावनिक गरजा समजून घेणे आणि त्यांना सुरक्षित वाटणे. सुख आणि दुःख येतात आणि जातात, परंतु पत्नी आयुष्यभर दुःख आणि वेदनेच्या क्षणांमध्ये तिच्या पतीची उपस्थिती आणि भावनिक आधार लक्षात ठेवते. ते एकाच वाहनाची दोन चाके आहेत हे विनाकारण नाही. जेव्हा ते आनंद आणि दुःखातून एकत्र चालतात तेव्हाच विवाहित जीवनाचे वाहन सुरळीत चालू शकते. या वाहनाचे इंजिन प्रेम आणि आधार आहे.

 

विवाहाचे सुख तेव्हाच जेव्हा पती-पत्नी असतील स्वतंत्र

* नसीम अंसारी कोचर

रिद्धिमा वरचेवर आजारी पडू लागली होती. मनोजसोबत तिचे लग्न होऊन ५ वर्षे झाली होती, पण सुरुवातीचे एक वर्ष सासरी व्यवस्थित राहिल्यानंतर तिचे हाल होऊ लागले. लग्नापूर्वी रिद्धिमा अनेक कलागुण असलेली एक सुंदर, आनंदी आणि निरोगी मुलगी होती, पण लग्नानंतर ती मनोजच्या कुटुंबात आल्यावर काही दिवसांतच तिला तिथे गुलामीत राहात असल्यासारखे वाटू लागले. तिची सासू खूपच फटकळ आणि रागीट स्वभावाची होती.

तिच्या प्रत्येक कामात सासू चूक दाखवत असे. शब्दशब्दावरून तिला रोखत असे. ती तिला घरातील सर्व कामे करायला लावायची आणि प्रत्येक कामात टोमणे मारायची, जसे तुझ्या आईने तुला हे शिकवले नाही, तुझ्या आईने तुला ते शिकवले नाही, तुझ्या घरात असे घडत असेल, इथे असे चालणार नाही, असे कडवट टोमणे मारून सासू तिचे मन दुखावत असे.

रिद्धिमा खूप स्वादिष्ट जेवण बनवायची, पण सासू आणि नणंदेला ते कधीच आवडले नाही. कधी जास्त मीठ झाले तर कधी जास्त तिखट झाले, असे बोलून सासू तिच्या जेवणात उणिवा शोधत असे. सुरुवातीला सासऱ्यांनी सुनेच्या कामाचे कौतुक केले, पण ते ऐकून पत्नीच्या भुवया उंचावल्यानंतर ते देखील रिद्धिमाच्या कामात चुका शोधू लागले.

आपल्या पत्नीवर अत्याचार होत असल्याचे रिद्धिमाचा पती मनोजला दिसत होते, पण आई-वडील आणि बहिणीसमोर तो गप्प बसत असे. रिद्धिमा स्वत:ला मनोजच्या घरातील बिनपगारी मोलकरणीशिवाय दुसरे काहीच समजत नव्हती. या घरात ती स्वत:च्या इच्छेने काहीही करू शकत नव्हती.

अशी विचारसरणी कशासाठी?

रिद्धिमाने तिची खोली तिच्या आवडीनुसार सजवायला घेतल्यास सासू रागाने सांगायची की, हे घर मी माझ्या कष्टाच्या पैशांतून बांधले आहे. त्यामुळे चुकूनही ते बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. मी जे काही सजवले आहे ते तसेच राहील.

रिद्धिमाच्या सासूने तिच्या वागण्यातून दाखवून दिले की, घर तिचे आहे आणि तिच्या इच्छेनुसार चालेल. इथे रिद्धिमा किंवा मनोजची आवड महत्त्वाची नाही. ५ वर्षांपासून सतत राग, तणाव आणि नैराश्याने ग्रासलेली रिद्धिमा अखेर रक्तदाबाची रुग्ण बनली. या शहरात तिचे माहेर नाही किंवा मैत्रिणीही नाहीत की, ज्यांच्या मदतीने ती तिच्या तणावातून काहीशी बाहेर पडू शकेल. तिचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. तिच्या डोक्यावरचे केस गळायला लागले आहेत. चेहऱ्यावर पुरळ आला आहे.

साजशृंगाराची हौस तर कधीच संपली आहे आणि आता तर ती अनेकदा एकच कपडे घालते. ती खरोखरंच मोलकरीण दिसायला लागली आहे. काम आणि तणावामुळे तिचा ३ वेळा गर्भपात झाला. त्यातच सासूच्या तोंडचे मूल होत नसल्याचे टोमणेही तिला सहन करावे लागतात. आता तर मनोजलाही तिच्याबद्दल काहीच वाटेनासे झाले आहे. जेव्हा त्याची आई घरात तणाव निर्माण करते तेव्हा त्याचा राग तो रिद्धिमावर काढतो.

परंपरेच्या नावाखाली शोषण

रिद्धिमाची मोठी बहीण कामिनी, जी लग्नानंतर तिच्या पतीसोबत दुसऱ्या शहरात राहाते. सासू, सासरे, नणंद आणि भावजय यांच्यापासून ती दूर असते. ती खूपच सुखी, समृद्ध आणि आनंदी आहे. ती प्रत्येक गोष्टीवर अगदी मनमोकळेपणाने हसते. कामिनी आयुष्याचा पुरेपूर आनंद घेत आहे. ती स्वत:च्या घराची आणि स्वत:च्या इच्छेची मालक आहे.

तिच्या कामात कोणी ढवळाढवळ करत नाही. ती तिच्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार घर सजवते. पतीही तिची आवड आणि कलात्मकता पाहून खूश आहे. ती तिच्या इच्छेनुसार मुलांचे संगोपनही करत आहे. या स्वातंत्र्याचाच परिणाम आहे की, वयाने मोठी असूनही कामिनी रिद्धिमापेक्षा तरुण आणि उत्साही दिसते.

खरं तर महिलांचे आरोग्य, सौंदर्य, कला आणि गुणांच्या विकासासाठी लग्नानंतर पतीसोबत वेगळ्या घरात राहणे चांगले. सासू, सासरे, नणंद, भावजय, दीर, यांनी भरलेल्या कुटुंबात स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. डोक्यावर सतत एक अदृश्य काठी असते. त्यांच्यावर घरकामाचे मोठे ओझे असते. कामाच्या ओझ्यासोबतच त्यांच्यावर नेहमीच पहारा असतो.

मुलांवर वाईट परिणाम

घरात अनेक सदस्य असल्यास वाढत्या वयाच्या मुलांना अधिक सल्ले दिले जातात. प्रत्येक व्यक्ती त्यांना आपापल्या परीने त्यांना योग्य-अयोग्य सांगत असतो. त्यामुळे मुलं संभ्रमात राहातात. त्यांना त्यांच्या विचारसरणीनुसार योग्य-अयोग्य ठरवता येत नाही. एकल कुटुंबात, फक्त आई-वडीलच असतात. ते मुलावर प्रेम करतात आणि त्यांना समजून घेतात, त्यामुळे मूल निर्णय घेताना गोंधळून जात नाही. योग्य आणि अयोग्य यातील निर्णय घेण्यास मूल सक्षम होते.

पण, जिथे सासू आणि सुनेचे एकमेकांशी नीट पटत नाही तिथे त्या दोघीही मुलांना एकमेकींविरुद्ध भडकावत राहतात. त्या त्यांच्या भांडणात लहान मुलांचा शस्त्र म्हणून वापर करतात.

याचा मुलांच्या कोमल मनावर, त्यांच्या विकासावर वाईट परिणाम होतो. असे दिसून आले आहे की, अशा घरातील मुले अतिशय संकुचित स्वभावाची, चिडचिडी, आक्रमक आणि हट्टी बनतात. त्यांच्यात समजूतदारपणा, बंधुता, प्रेम आणि सौहार्द यांसारख्या चांगल्या मानवी गुणांचा अभाव असतो. ती त्यांच्या वर्गमित्रांशीही नीट वागत नाहीत.

स्वत:चे घर म्हणजे खर्च कमी

पती-पत्नी स्वतंत्रपणे स्वत:च्या घरात राहात असल्यास, खर्च कमी झाल्याने कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूत होते. मनोजचेच उदाहरण घ्या, त्याला कधी मिठाई खावीशी वाटली तर त्याला केवळ स्वत:साठी आणि पत्नीसाठी नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी मिठाई खरेदी करावी लागते.

जर पत्नीसाठी साडी खरेदी करायची असेल तर आई आणि बहिणीसाठीदेखील खरेदी करावी लागते. पती कधीच पत्नीसोबत एकटा उपहारगृहात जेवायला किंवा चित्रपट बघायला जाऊ शकत नाही, कारण त्याला संपूर्ण कुटुंब सोबत घ्यावे लागते. याउलट कामिनी पती आणि दोन मुलांसोबत अनेकदा बाहेरगावी जाते. ते उपहारगृहात जाऊन हवे ते खातात, चित्रपट पाहातात आणि खरेदीसाठीही     जातात.

अशी अनेक घरं आहेत जिथे २ किंवा ३ भावांचे कुटुंब एकत्र राहाते. तिथे रोजच भांडणं होतात. घरी खायला आणायचे असल्यास ते केवळ स्वत:च्या मुलांसाठीच नाही तर भावाच्या मुलांसाठीही आणावे लागते. सर्वांना विचारात घेऊनच खर्च करावा लागतो. कुटुंबातील एकाची परिस्थिती बिकट असेल तर त्याला वाईट वाटू नये म्हणून दुसरा स्वत:वर जास्त खर्च करत नाही.

मनोरंजनाचा अभाव

साधारणपणे सासरी सुनेसाठी मनोरंजनाचे कोणतेही साधन नसते. त्या स्वयंपाकघर आणि शयनकक्षापुरत्याच मर्यादित असतात. घराचा टीव्ही दिवाणखान्यात ठेवला तरी त्या जागेवर सासू-सासरे आणि मुलांचा ताबा असतो. सुनेला तिच्या आवडीचा एखादा कार्यक्रम पाहायचा असेल तर ती पाहू शकत नाही.

पती-पत्नीला कधी एकटे कुठे जायचे असेल तर प्रत्येकाच्या डोळ्यात प्रश्न असतो की कुठे जात आहात? का जात आहात? कधी येणार? त्यामुळे बाहेर जाण्याचा उत्साह मावळतो.

सासरी सून आपल्या मैत्रिणींना घरी बोलावू शकत नाही किंवा त्यांच्यासोबत पार्टी करू शकत नाहीत. याउलट पती-पत्नी वेगळ्या घरात राहात असतील तर दोघेही आपल्या मित्र-मैत्रीणीना घरी बोलावू शकतात, पार्टी देऊ शकतात आणि मनमोकळेपणे त्याचा आनंद घेऊ शकतात.

जागेचा अभाव

विभक्त कुटुंबांमध्ये जागेची कमतरता नसते. एका बेडरूमच्या फ्लॅटमध्येही पुरेशी जागा उपलब्ध असते. कोणतेही बंधन नसते. मोकळ्या वेळेत ती दिवाणखाना किंवा बाल्कनी कुठेही निवांत बसू शकते; याउलट सासू- सासरे असल्यास सून तिच्याच घरात बंदिस्त असते. मुलांनाही त्यांच्या आजी-आजोबांमुळे अडकल्यासारखे वाटते, कारण ती खेळू लागल्यास किंवा त्यांनी मोठ्याने आवाज केल्यास त्यांना ओरडा खावा लागतो.

स्वातंत्र्य आनंद देते

जर पती-पत्नी एकत्र स्वतंत्र घरात राहात असतील तर प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक कामासाठी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळते. कोणावरही बंधने नसतात. वाटेल तिकडे फिरा. वाटेल ते बनवा आणि खा. स्वयंपाक करायचा कंटाळा आल्यास बाहेरून मागवा. हवे ते कपडे घाला.

सासू-सासरे सोबत राहात असल्यास नोकरदार  महिलांना त्यांचा मान राखून फक्त साडी किंवा पंजाबी ड्रेस घालावा लागतो. याउलट वेगळ्या राहाणाऱ्या महिला त्यांची आवड, सोय आणि फॅशननुसार जीन्स, टॉप, स्कर्ट, मिडी घालू शकतात. जर तुम्ही पतीसोबत घरी एकट्या असाल तर तुम्ही नाईट सूट किंवा सेक्सी नाईटीही घालू शकता.

नातेसंबंधावर वर्चस्व गाजवते जन्मकुंडली जुळवणूक

* मोनिका गुप्ता

रमा आणि मनोज यांच्या रोजच्या भांडणामुळे शेजारचे लोकही वैतागले. दोघांचे लग्न होऊन फक्त ३ वर्षे झाली आहेत आणि या ३ वर्षांत त्यांच्यात प्रेमापेक्षा फालतू मुद्द्यांवर जास्त वाद होतात. पब्लिक स्कूलमध्ये शिक्षिका असलेली रमा आणि सरकारी बँकेत मॅनेजर असलेला मनोज हे दोघेही कामावरून लवकर सुटतात, तरी दोघेही एकत्र वेळ घालवू शकत नाहीत.

खरंतर मनोज लवकर येऊनही घरी येत नाही. मित्रांसोबत बाहेर वेळ घालवतो. त्याची ही सवय रमाला अजिबात आवडत नाही. त्यामुळे रोज रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण होते. रविवारीही दोघेही कमी बाहेर फिरायला जातात, त्यामुळे त्यांच्यातील अंतर वाढू लागले. छोट्या-छोट्या गोष्टींवरून सुरू झालेली भांडणे त्यांच्या आयुष्यावर अधिराज्य गाजवत होती.

एके दिवशी रमाने शाळेतून सुट्टी घेतली पण ती मनोजचा टिफिन करण्यासाठी पहाटे उठली. रमा किचनमध्ये नाश्ता बनवत होती तेवढ्यात मनोज रमाकडे आला आणि म्हणाला, ‘‘मी आज नाश्ता घेऊन जाणार नाही.’’

या गोष्टीचा रमाला खूप राग आला. ती मनोजला म्हणाली, ‘‘तू बाहेरच राहतोस, बाहेरच खातो-पितोस, मग तू माझ्यासोबत का आहेस? मी सकाळी लवकर उठून नाश्ता बनवण्याच्या तयारीला लागले होते. तुला नाश्ता न्यायचा नव्हता तर तू मला रात्रीच सांगायचे होते.’’ असं म्हणत रमा रागाने किचनमधून तिच्या खोलीत गेली.

तेवढ्यात मनोजही खोलीत आला आणि रमावर ओरडायला लागला, ‘‘तुला छोट्या-छोट्या गोष्टी समजत नाहीत. मी लग्न का केलं तेच कळत नाही.’’

लग्नाचे नाव ऐकताच रमानेही उलट उत्तर द्यायला सुरुवात केली, ‘‘तुझे म्हणणे बरोबर आहे, मला माहित नाही तो कोणत्या प्रकारचा ज्योतिषी होता ज्याने आपली कुंडली पाहून ३६ पैकी ३२ गुण जुळवले होते. गुण तर आता पाहायला मिळत आहेत.’’

वर्चस्व गाजवते अंधश्रद्धा

जेव्हा तिची कुंडली मनोजच्या कुंडलीशी जुळवत होते त्या दिवसाला आजही रमा कोसते. दोघांच्या कुंडल्या पाहून ज्योतिषांनी कौतुकाचा वर्षाव केला.

ज्योतिषांनी रमाच्या आईला सांगितले होते, ‘‘तुझी मुलगी खूप आनंदी होईल. दोघांमध्ये ३२ गुण जुळले आहेत. या आधारावर दोघांचेही आपापसात चांगले जमेल.’’

पण असं काय झालं की दोघांनीही एकमेकांना कधीच समजून घेतलं नाही? धर्म कोणताही असो, लग्नाला एक वेगळेच महत्त्व आहे. पण हिंदू धर्मात जन्मकुंडली जुळवण्याबाबत इतका ढोंगीपणा होतो की तो इतर क्वचितच बघायला मिळतो.

किंबहुना दोन कुटुंबे एकत्र येणार असताना नुसत्या बोलण्याने नाती जुळत नाहीत. यामध्येही अंधश्रद्धा वरचढ आहे. असे म्हटले जाते की जर मुलगा किंवा मुलगी यांची कुंडली ज्योतिषी किंवा पंडित यांना दाखवली नाही आणि दोघांचे गुण जुळले नाहीत तर त्यांना भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. वास्तविक, हे सर्व ज्योतिषांनी पसरवलेले भ्रमाचे जाळे आहे, ज्यात दोन्ही यजमानांना अडकवून त्या दोघांचे खिसे खाली केले जातात.

जन्मकुंडलीच्या नावाखाली तुटणारी नाती

ज्योतिषांच्या मते, जन्मकुंडली दाखवल्याने नातेसंबंध मजबूत होण्यास आणि दोन कुटुंबांचे जुळण्यास मदत होते. पण कुंडली दाखवल्याने खरेच नातेसंबंध सुधारतात का? कुंडली जुळली तरीही नाती तुटतात आणि दोन कुटुंबांचे मिलनही अपूर्ण राहते. मुलगा आणि मुलगी दोघेही कितीही शिकलेले असले, एकमेकांसाठी कितीही परफेक्ट असले, गुण जुळले नाहीत किंवा त्यांच्या कुंडलीत काही दोष दिसला, तर तिथेच नाते तुटते.

हिंदू धर्मानुसार, जर एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे १८ पेक्षा कमी गुण जुळले तर ते एकमेकांसाठी परफेक्ट नाहीत. त्यांच्या वैवाहिक जीवनात नेहमीच अडचणी येतात. म्हणूनच ज्योतिषी आणि पंडित असे संबंध जोडण्यास मनाई करतात किंवा दोष दूर करण्यासाठी विविध उपाय सुचवतात किंवा असे म्हणा ना की स्वत:च्या भ्रमजालात अडकवतात. दोष आणि ग्रहांच्या नावावर ते लोकांना रोपांशी लग्ने लावायला सांगतात आणि पूजेच्या नावाखाली प्रचंड पैसा गोळा करून आपले खिसे भरतात.

बिग बॉसचे माजी स्पर्धक राहिलेले आणि राजकीय कुटुंबातील राहुल महाजन यांना सर्वजण ओळखतात. राहुल तिसऱ्यांदा नवरदेव बनले आहेत. त्यांचे पहिले लग्न श्वेता सिंगसोबत २००६ मध्ये संपूर्ण हिंदू रितीरिवाजाने झाले होते. पण त्यांचे पहिले लग्न अवघ्या २ वर्षांनी घटस्फोटात संपले. त्यानंतर राहुलने डिम्पी गांगुलीसोबत २०१० मध्ये राष्ट्रीय टेलिव्हिजनवर ‘राहुल दुल्हनिया ले जायेंग’ या रिअॅलिटी शोमध्ये दुसरे लग्न केले.

पण त्यांचे लग्नदेखील फक्त ४ वर्षे टिकले. राहुलने आता तिसरे लग्न केले आहे. २० नोव्हेंबर २०१८ रोजी राहुलने त्याच्यापेक्षा १८ वर्षांनी लहान कझिकिस्तानी मॉडेल नताल्या इलिनाशी लग्न केले. नताल्याशी लग्न करताना राहुलकडे कोणतीच कुंडली नव्हती. अशा परिस्थितीत राहुलचे हे लग्न पुढे टिकलं तर ज्योतिषांच्या तोंडावर ती मोठी चपराक असेल. पण इथे प्रश्न राहुलच्या तिसऱ्या लग्नाचा नसून त्याच्या आधीच्या दोन लग्नांचा आहे.

राहुलचे पहिले आणि दुसरे लग्न हिंदू रीतिरिवाजानुसार झाले, जिथे ज्योतिषांना बोलावले गेले, कुंडल्या जुळवल्या गेल्या, मंत्र पठण केले गेले, परंतु या सर्वांचा राहुल आणि त्याच्या माजी पत्नींच्या जीवनावर कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही आणि त्यांचे नाते कुंडलीच्या पानांपर्यंतच मर्यादित राहिले.

धर्मग्रंथानुसार

हिंदू धर्मात रामायण खूप वाचले जाते आणि त्याची पूजाही केली जाते. पण ज्या रामायणाची लोक पूजा करतात त्याच रामायणात सीता आणि राम अपूर्ण का राहिले? दोघांच्याही आयुष्यात एवढा त्रास का झाला? तर राम आणि सीता यांचा विवाह ऋषी आणि ब्राह्मणांच्या देखरेखीखाली झाला होता. या दोघांच्या कुंडलीत ३६ पैकी ३६ गुण जुळले असले तरी सीतेचे आयुष्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत संकटांनी भरलेलेच राहिले. सीतेला नवऱ्याचा जास्त सहवास मिळाला नाही.

सत्य हे आहे की कुंडली जुळवणे हा पंडित आणि ज्योतिषांनी निर्माण केलेला भ्रम आहे, ज्यात प्रत्येकजण अडकत आहे. जेव्हा आई-वडील आपल्या मुलांसाठी स्थळं शोधतात तेव्हा ते स्वत: मुला-मुलीसह कुटुंबातील सदस्यांना भेटतात. जर स्थळ आवडलं की ते मुला-मुलीला एकमेकांशी बोलायला देतात.

इथपर्यंत सर्व काही ठीक आहे. पण यापलीकडची प्रक्रिया कोणत्याही नव्या नात्यासाठी कठीण होऊन बसते. पुढील प्रक्रियेत कुंडली जुळवण्यासाठी ज्योतिषांना बोलावले जाते. कुंडली जुळली आणि गुण जुळले तर दोन्ही कुटुंब लग्नाच्या तयारीला लागतात. पण कुंडली जुळली नाही, काही दोष आढळला तर काय होईल?

जेव्हा मुलगा-मुलगी आणि त्यांचे कुटुंबिय एकमेकांना पसंत करतात, तेव्हा कुंडलीचा हा गोंधळ का? जरा विचार करा, इतके दिवस बोलल्यावर मुला-मुलींना एकमेकांबद्दल ओढ वाटू लागते. अशा परिस्थितीत नाते तुटले तर त्यांच्या मानसिक स्तरावर काय परिणाम होईल?

मात्र, ज्योतिषांच्या मते प्रत्येक दोषावर उपाय आहे. पण कशाचीच खात्री नाही. या भीतीमुळे लग्न तुटतात. जर कोणाला मंगळ दोष असेल तर त्याने मंगळ दोष असलेल्या व्यक्तीशीच लग्न करावे, असे केल्याने दोघांचेही आयुष्य सुखी राहते. पण जर मुलगी मंगळ दोष असलेली असेल आणि मुलगा नसेल तर लग्नानंतर आधी नवऱ्याचा मृत्यू होतो असे म्हणतात. यासाठी ज्योतिषांनी अनेक उपाय सांगितले आहेत जसे की प्राण्याशी विवाह, केळी किंवा पिंपळाच्या झाडाशी विवाह. लग्नापूर्वी मुलीला त्यांच्याशी लग्न करावे लागते. असे केल्याने मंगळ दोष दूर होतो. झाडाझुडपाशी लग्न केल्याने खरेच नवऱ्याचे आयुष्य वाढते का?

आज लोक या सर्व गोष्टींना इतके घाबरले आहेत की त्यांचा स्वत:वरचा विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे सर्वजण ज्योतिषांच्या तालावर नाचताना दिसतात. केवळ ग्रामीण लोकच या गोष्टींवर विश्वास ठेवतात असे नाही, तर सुशिक्षित लोकही या अंधश्रद्धेवर तितकेच विश्वास ठेवतात.

मंगळ दोषात किती तथ्य?

आज लोक आधुनिक झाले आहेत, पण केवळ त्यांच्या पेहरावामुळे. मानसिकदृष्ट्या लोक अजूनही अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकले आहेत. म्हणूनच आपण आपल्या दिवसाची सुरुवात कुंडली पाहून करतो. कोणतेही काम करण्यापूर्वी देवाचे स्मरण करतो आणि ज्योतिषाला हस्तरेषा दाखवतो. त्यामुळेच आज धर्माच्या नावाखाली त्यांचा धंदा फोफावत आहे.

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या लग्नाची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. जरी हे लग्न दोन प्रसिद्ध व्यक्तींमध्ये झाले असले तरी, लग्नात अंधश्रद्धा आणि ग्रहांच्या संदर्भात चर्चा झाल्यामुळे हे लग्न अधिक प्रसिद्ध झाले.

वास्तविक ऐश्वर्याच्या कुंडलीत मंगळ दोष होता. त्यांच्या साखरपुड्यानंतर जेव्हा ज्योतिषांनी कुंडली जुळवून पाहिल्या तेव्हा ऐश्वर्याच्या कुंडलीत मंगळ दोष आढळून आला. ऐश्वर्याच्या मंगळ दोषाची बातमी देशभर पसरली होती. ज्योतिषी आणि पंडितांनी सांगितले की हा विवाह यशस्वी होणार नाही. यासाठी ऐश्वर्याला मंगळ दोष दूर करावा लागेल. तिला अभिषेकशी लग्न करायचे असेल तर तिला पिंपळ किंवा केळीच्या झाडाशी लग्न करावे लागेल. ज्योतिषांनी असेही सांगितले की जर ऐश्वर्याने या उपायांशिवाय लग्न केले तर तिच्या वैवाहिक जीवनात दुर्भाग्य येईल आणि अशुभ होईल, ज्याचा परिणाम अभिषेकवर होईल.

या संपूर्ण प्रकरणावर प्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर स्वामी यांनी एका वृत्तपत्राला सांगितले होते की, ‘‘अभिषेक आणि ऐश्वर्या दोघेही माझ्याकडे सल्ल्यासाठी आले होते. मी दोघांनाही प्राचीन शिवमंदिरात पूजा करण्याचा सल्ला दिला होता.’’

या सर्व वादानंतर ऐश्वर्या आणि अभिषेकचे लग्न झाले. मात्र, ऐश्वर्याने झाडाशी लग्न केल्याचे सिद्ध होऊ शकले नाही. एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांना जेव्हा विचारण्यात आले की ऐश्वर्याने मंगळ दोष दूर करण्यासाठी झाडाशी लग्न केले आहे का, तेव्हा ते म्हणाले, ‘‘कुठे आहे ते ?ाड. कृपया मला दाखवा, ऐश्वर्याने एकदाच लग्न केले आहे आणि ती व्यक्ती म्हणजे मा?ा मुलगा अभिषेक बच्चन. जर तुम्ही अभिषेकला ?ाड मानत असाल तर ती वेगळी गोष्ट आहे.’’

मंगळ दोष दूर करण्यासाठी ऐश्वर्याने कोणत्याही प्रकारच्या ?ाडाशी लग्न केले नसल्याचे अमिताभ यांच्या वक्त्व्यावरून स्पष्ट ?ाले. याचा अर्थ मंगळ दोष असूनही ऐश्वर्या आणि अभिषेक त्यांच्या वैवाहिक जीवनात खूप आनंदी आहेत. ज्याप्रमाणे ज्योतिषांनी लग्नाच्यावेळी अशुभ होईल असे सांगितले होते, तसे आजपर्यंत काहीही ?ालेले नाही.

यातून एकच अर्थ निघतो की मंगळ असणे, हा दोष किंवा अशुभ नाही. ही एक अशी भीती आहे की लोक त्याखाली दबले जात आहेत आणि या भीतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न धर्माचे व्यापारी करत आहेत.

धर्माच्या नावाखाली चालणारा धंदा

हिंदू आपली कुंडली पंडित किंवा ज्योतिषाला दाखवतो. पण जरा विचार करा, जर तो पंडित दुसऱ्या धर्माचा अनुयायी असेल तर? धर्माच्या नावाखाली हा धंदा एवढा वाढला आहे की लोक आपली खरी ओळख लपवून या व्यवसायात उतरत आहेत. आज लोक इतके अंधश्रद्धाळू बनले आहेत की जीवन अधिक चांगले आणि साधे बनवण्याच्या लोभापोटी ते अशा लोभी भोंदूंची मदत घेत आहेत.

काही वर्षांपूर्वी दिल्लीतील हौजखास येथील अशाच एका बाबाचा व्यवसाय कोलमडला होता. वास्तविक हा बाबा लोकांचे भविष्य आणि कुंडली पाहत असे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या बाबाचे खरे नाव युसूफ खान होते. हा माणूस अनेक वर्षांपासून नाव बदलून हा व्यवसाय चालवत होता.

तुम्हाला असे अनेक बाबा सापडतील ज्यांना लिहिता-वाचता येत नसेल पण जन्मकुंडली आणि भविष्य कसे वाचावे हे चांगलेच माहीत असेल. कुंडली दाखवणे आणि जुळवणे हे फक्त हिंदू धर्मातच घडते, इतर कोणत्याही धर्मात, समाजात, संघटनेत किंवा जातीत अशी प्रथा नाही. त्यामुळे इतर धर्माचे लोकही या व्यवसायात सामिल होऊ लागले आहेत. आजच्या काळात अशा नाम बदलू ज्योतिषी आणि कुंडलीवर विश्वास ठेवणे सारखेच आहे

सिच्युएशनशिप आहे लेटेस्ट रिलेशनशिप टे्रंड

* गरिमा पंकज

बदलत्या काळानुसार लोकांच्या फॅशन आणि लाइफस्टाइल म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल तर झालाच, पण हा बदल नातेसंबंधातही होताना दिसत आहेत. आजची पिढी प्रत्येक गोष्टीत पुढे आहे. त्यांची विचारसरणी, शैली, पेहराव, जीवनशैली आणि राहणीमानातून त्यांच्यातील हे नावीन्य दिसून येते. पण, खेदाची गोष्ट म्हणजे त्यांनी प्रेम आणि रिलेंशनशिप म्हणजेच नातेसंबंधांच्या पद्धतीही बदलल्या आहेत.

काही वर्षांपूर्वीपर्यंत मुलगा, मुलगी किंवा पुरुष आणि स्त्री यांच्यात प्रेमाचा अर्थ वेगळा होता. नात्याची सुरुवात बोलण्यातून होत असे. त्यानंतर, मैत्री होणे, एकमेकांबद्दल आकर्षण आणि ओढ वाटणे, त्यानंतर फिरायला जाणे आणि प्रेमात पडणे, ही एक अतिशय नैसर्गिक आणि भावनिक गोष्ट होती. त्यानंतर दोघं लग्नाचं स्वप्नं पाहायचे आणि संपूर्ण आयुष्य एकत्र घालवायचे वचन द्यायचे. मग आई-वडिलांची ओळख करून देण्याची धडपड सुरू व्हायची. तो काळ असा होता जेव्हा लोक प्रेमासाठी काहीही करायला तयार असत आणि नाती भावनांनी विणलेली होती.

पण, आजच्या डिजिटल युगात सगळेच बदलू लागले आहे. वेगवान आधुनिक पिढीला सर्वकाही बदलण्याची आणि काहीतरी नवीन निवडण्याची सवय आहे. मोठया उत्साहाने विकत घेतलेला मोबाइल एक-दीड वर्षातच नकोसा वाटू लागतो. त्याला बाजूला ठेवून नवीन मोबाइल घेण्याची स्पर्धा सुरू होते. अशाच प्रकारे त्यांना नातीही बदलत राहण्याची सवय लागली आहे. आयुष्यभर एकच नातं कोण वाहून नेणार? कोणास ठाऊक, उद्या तुम्हाला आणखी सुंदर मुलगी भेटू शकते, उद्या तुम्हाला कोणीतरी अधिक शांत, श्रीमंत आणि हुशार मुलगा आवडेल. या कारणामुळेच आजची युवा पिढी नात्यातील कमिटमेंट म्हणजेच समर्पण टाळू लागली आहे.

रोमांचक अनुभव

लोकांना सर्वकाही झटपट हवे आहे आणि जेव्हा त्यांचे मन भरते तेव्हा ते लगेचच स्क्रोल करतात आणि पुढे जातात. डिजिटल युगामुळे आज अनेक पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे एकाच्या शोधात वेळ वाया घालवला जात नाही. त्यामुळेच आज रिलेशनशिपच्या ट्रेंडमध्ये बरेच बदल झाले आहेत. आज तरुणाईच्या नात्यात बांधिलकीचा अभाव दिसून येतो. त्यांनी सिच्युएशनशिप म्हणजे परिस्थितीजन्य बदल, या संकल्पनेचा अवलंब सुरू केला आहे.

जस्टिन टिम्बरलेक आणि मिला कुनिस यांचा ‘फ्रेंड्स विद बैनिफिट्स’ हा चित्रपट २०११ मध्ये आला आणि त्यासोबत ‘फ्रेंड्स विद बेनिफिट्स इन रिलेशनशिप’ ही संकल्पना तरुणाईमध्ये लोकप्रिय झाली. त्याच वर्षी, एश्टन कुचर आणि नताली पोर्टमॅन यांनीही तरुणांना नॉन-कमिटल नातेसंबंधांची चव चाखायला दिली, म्हणजेच जास्त ताण न घेता किंवा भावनाप्रधान न होता रोमान्स किंवा प्रेम संबंधांमध्ये पुढे जाणे.

हा एक नवीन आणि रोमांचक अनुभव होता. सार्वजनिक रुपात एखाद्या जोडप्याप्रमाणे एकत्र असल्याचे भासवायचे नाही किंवा कोणत्याही रोमँटिक गप्पा मारायच्या नाहीत, भावनिक ओढ नाही किंवा अन्य काही आपुलकी नाही, फक्त थेट संबंध ठेवायचे आणि जीवनाचा आनंद घेत राहायचा.

या नॉन कमिटल रिलेशनशिपचे नवे रूप नुकतेच समोर आले आहे. जेन, जेड आणि मिलेनियल्सने त्याच्या रोमँटिक संबंधांची व्याख्या करण्यासाठी इतर अनेक गोंधळात टाकणाऱ्या शब्दांमध्ये आपल्याला आणखी एक नवीन शब्द दिला आहे आणि तो म्हणजे सिच्युएशनशिप. हा शब्द २०१९ मध्ये चांगलाच लोकप्रिय झाला. रिअॅलिटी टीव्ही शो लव्ह आयलँडची स्पर्धक अलाना मॉरिसनने तिचा डेटिंगचा इतिहास उघड करण्यासाठी याच ‘सिच्युएशनशिप’ शब्दाचा वापर केला होता.

एक नवीन ट्रेंड

तरुण पिढीमध्ये रिलेशनशिपचा एक नवीन ट्रेंड खूप लोकप्रिय होत आहे आणि तो म्हणजे, सिच्युएशनशिप अर्थात परिस्थितीजन्य नाते, ज्यामध्ये नातेसंबंधात काहीही करण्याचे विशेषत: वचन, समर्पण असे कोणतेही दडपण नसते. जोपर्यंत सर्वकाही व्यवस्थित असते तोपर्यंतच नाते टिकते.

आज पुरुषांपासून ते महिलांपर्यंत सर्वच डेटिंग अॅप्स वापरत आहेत. लोक अविवाहित राहाणे पसंत करत आहेत आणि जर लग्नानंतरही एकमेकांशी नीट जमले नाही तर ते एकमेकांना झोलत बसण्याऐवजी वेगळे व्हायला ते मागेपुढे पाहात नाहीत. याचा अर्थ सर्वकाही अगदी स्पष्ट, रोखठोक असते. अशा नवीन ट्रेंडमध्ये आणखी एक संज्ञा खूप वेगाने लोकप्रिय होत आहे आणि ती म्हणजे सिच्युएशनशिप.

सिच्युएशनशिप म्हणजे काय?

‘सिच्युएशन’ आणि ‘रिलेशनशिप’ हे दोन  शब्द एकत्र करून सिच्युएशनशिप तयार झाली आहे. सिच्युएशनशिपमध्ये रोमँटिक आणि शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी दोघे एकत्र येऊ शकतात. दोघेही एकमेकांसोबत बाहेर जाऊ शकतात, बाहेर एकत्र जेवू शकतात. या नात्याला कोणतेही नाव दिले जात नाही. कधीकधी लोक एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी एकत्र येतात. या नात्यात एक जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला काहीही सविस्तरपणे न सांगता सोडून जाऊ शकतो.

सोप्या शब्दात, सिच्युएशनशिप हे एक अपरिभाषित नातं आहे, जिथे लोक एकत्र येतात, परंतु त्यांना एका व्यक्तीपुरतेच मर्यादित राहाणे किंवा बांधिलकी जपत बसणे  आवडत नाही. म्हणजेच, सिच्युएशनशिप ही एक अशी डेटिंग आहे जिथे दोन लोक कोणत्याही वचनाशिवाय किंवा समर्पणाशिवाय एकत्र राहातात. या नात्याबद्दल त्यांना कोणालाही सांगायचे नसते किंवा त्या नात्याला कोणतेही नाव द्यायचे नसते

एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी २ लोक एकत्र राहातात.

सिच्युएशनशिपमध्ये काहीही परिभाषित नसते. तुम्ही याला प्रवाहासोबत जाणे, असे म्हणू शकता. मन:स्थिती बदलली की जोडीदारही बदलतो, असे या नात्याचे तत्वज्ञान आहे. काही बाबतीत ते योग्य आहे तर काही बाबतीत ते अत्यंत चुकीचे आहे.

सिच्युएशनशिपमध्ये राहाणे का पसंत केले जाते?

नवी पिढी काहीही झाले तरी स्वत:च्या स्वातंत्र्याशी तडजोड करू इच्छित नाही. तरुणांना त्यांचे आयुष्य त्यांच्या इच्छेनुसार जगायचे आहे आणि स्वत:ला स्वतंत्र ठेवायचे आहे. वास्तविक, जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे लागते, ज्यामुळे तुमचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. लव्ह रिलेशनशिप म्हणजेच प्रेमाचे नातेसंबंध, हे एक जबाबदारीचे नाते आहे.

म्हणूनच, जेव्हा एखाद्या व्यक्तीला वचनबद्धता किंवा जबाबदारी यासारख्या गोष्टी टाळायच्या असतात तेव्हा तो सिच्युएशनशिपमध्ये राहाणे पसंत करतो, कारण यामध्ये जोडीदाराला कोणतेही वचन देण्याची किंवा समर्पणाची गरज नसते. यामध्ये दोघे फक्त प्रेम संबंधातील फायदे वाटून घेण्यासाठी एकत्र येतात.

याशिवाय, जेव्हा एखाद्याचा पहिल्या प्रेमात विश्वासघात होतो किंवा त्याला यश मिळत नाही, तेव्हा त्याला केवळ आनंद मिळवण्यासाठी सिच्युएशनशिपमध्ये यायला आवडते.

सिच्युएशनशिपचे फायदे

लवचिकता : सिच्युएशनशिपमध्ये लवचिकता असते, म्हणजे कोणतेही वचन देण्याची, दिखाव्याची किंवा एकमेकांना प्रश्न विचारण्याची आणि उत्तरे देण्याचीही गरज नसते. या अर्थाने ते चांगले आहे. आपण आपल्या इच्छेनुसार नातेसंबंध तयार करू शकतो. येथे बांधिलकीच्या दबावाशिवाय एकमेकांशी जोडले जाण्याचे स्वातंत्र्य आहे.

कमी दबाव : सिच्युएशनशिपमध्ये, तुमच्यावर कोणतेही ओझे नसते की तुम्हाला तेच करावे लागेल किंवा नातेसंबंध टिकवावे लागतील, म्हणजेच यामध्ये कोणावरही कोणत्याही प्रकारचे दडपण नसते. तुम्ही तुमच्या मर्जीने आणे स्वइच्छेने या नात्यात असता. तुम्ही तुमच्या जोडीदाराला काहीही न सांगता सोडून देऊ शकता. जीवनात इतर प्राधान्यक्रम असलेल्या व्यक्तींसाठी तसेच जे करिअर किंवा जीवनशैलीशी तडजोड करू इच्छित नाहीत किंवा इतर कोणामुळे जीवनाचा उद्देश किंवा जगण्याची पद्धत बदलू शकत नाहीत, त्यांना असे नाते हवेहवेसे वाटते.

तोटे : सत्य हे आहे की, एकत्र राहाण्याच्या दडपणापासून आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्यापासून दूर राहाता येत असल्यामुळे सिच्युएशनशिप खूप सुखद वाटत असली तरी, हा एक अत्यंत कठीण मार्ग आहे, ज्यावर काळजीपूर्वक न चालल्यास जखमी होण्याचा धोका असतो. समस्या तेव्हा येते जेव्हा यात गुंतलेल्या दोघांपैकी एकाच्या भावना गंभीर होऊ लागतात आणि त्याला वचनबद्धता, समर्पण हवेहवेसे वाटू लागते.

कुटुंब एकत्र येणे : एक भव्य कुटुंब जेवण तुमच्या भावनांना डिटॉक्स करेल

* कुमकुम गुप्ता

कुटुंब एकत्र येणे : आजकाल आपण सर्वजण खूप व्यस्त असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, ते एकतर ऑफिसमधील काम असते, घरी ताण असतो किंवा मुलांच्या शाळेतील आणि क्रियाकलापांचा गोंधळ असतो, तसेच रहदारी, बैठका, मोबाईल फोन आणि सोशल मीडिया. या गर्दीत, आपण सर्वात महत्वाची गोष्ट विसरत आहोत: आपले कुटुंब आणि नातेसंबंध.

एक काळ असा होता की सर्व भावंडे आपल्या आजी-आजोबांच्या घरी जमत असत. चुलत भाऊ, मामा आणि काका, सर्व नातेवाईक उपस्थित असत. आता परिस्थिती अशी आहे की वर्षानुवर्षे कोणीही कोणाला भेटत नाही. त्यांना फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर त्यांचे चुलत भाऊ आवडतात, पण ते प्रत्यक्षात कधी भेटले हे देखील त्यांना आठवत नाही.

नातेसंबंध एक औपचारिकता बनत चालले आहेत

“काकू, कसे आहात?”

“मी काय सांगू? आम्ही गेल्या दोन वर्षात एकमेकांना पाहिले नाही.”

“आपण कधी भेटू?”

“बघ, मुलांचे शिक्षण सुरू आहे, तुझ्या काकांचे ऑफिस आहे, आपण लवकरच भेटू. काळजी करू नकोस.”

आजकाल अशा गोष्टी खूप सामान्य आहेत. एक काळ असा होता की नातेवाईकांशिवाय सण अपूर्ण होते. आता, भावाचे लग्न असले तरी, लोक व्हिडिओ कॉलद्वारे उपस्थित राहतात. सर्व काही “पूर्ण करा आणि निघून जा” अशी मानसिकता बनली आहे. नात्यांमध्ये पूर्वी असलेली गोडवा आणि जवळीक ही केवळ औपचारिकता बनली आहे.

रक्ताचे नाते अतुलनीय आहे

आजकाल, लोक सोशल क्लब, गट आणि ऑनलाइन समुदायांना त्यांच्या नात्यांचे एकमेव सीमा मानू लागले आहेत. रोटरी, लायन्स किंवा राउंड टेबल सारख्या क्लबमध्ये सामील होणे ठीक आहे, परंतु तुमचे जग तिथेच आहे असे गृहीत धरणे हा एक गैरसमज आहे.

हे सर्व नाते वेळेवर आणि स्वार्थावर आधारित आहे. तुमचे नातेवाईक, त्यांची स्थिती काहीही असो, रक्त किंवा लग्नाने जोडलेले असतात आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तेच सर्वप्रथम त्यांच्यासोबत उभे राहतात. मैत्री ही एक गोष्ट आहे, पण कुटुंब आणि नातेवाईकांशी असलेले नाते खूप खोल असते. त्यांच्यामुळे भांडणे आणि मतभेद होऊ शकतात, पण गरज पडल्यास आपण त्यांच्यावर अवलंबून असतो. म्हणून, सोशल नेटवर्किंगच्या मागे लागून तुमचे खरे नाते विसरू नका. कृत्रिमतेशिवाय बांधलेले नातेच खरे मूल्य आहे.

अशा परिस्थितीत भव्य कौटुंबिक जेवण का महत्त्वाचे आहे

जेव्हा सर्वजण वर्षानुवर्षे भेटत नाहीत, तेव्हा नाते कमकुवत होते. जर मतभेद असतील तर ते सोडवण्यासाठी वेळ नसतो. जर प्रेम असेल तर ते व्यक्त करण्याची संधी नसते. अशा परिस्थितीत, भव्य कौटुंबिक जेवण किंवा दुपारचे जेवण हा एक असा प्रसंग असू शकतो जिथे सर्वजण एकाच टेबलावर एकत्र बसतात, जेवतात आणि मनापासून संवाद साधतात.

हे फक्त ‘जेवण’ नसते तर जुन्या आठवणींना उजाळा देते. जेव्हा सर्वजण एकत्र येतात तेव्हा ते बालपणीच्या आठवणींना उजाळा देतात आणि भावंडे एकमेकांना चिडवतात.

गुप्ता कुटुंब परंपरा

दिल्लीमध्ये राहणारे गुप्ता कुटुंबातील चार भावंडे वेगवेगळ्या शहरात राहतात: एक अमेरिकेत, एक पुण्यात, एक गुरुग्राममध्ये आणि चौथी बहीण दिल्लीत. पूर्वी, ते सर्वजण प्रत्येक सणाला एकत्र असायचे. पण गेल्या सहा वर्षांत, त्यांना एकही पूर्ण दिवस एकत्र घालवता आला नाही.

मग, मोठी बहीण सीमा हिला दर जूनमध्ये कुटुंब एकत्र येण्याची कल्पना सुचली. आता, सर्वजण कामावरून एक आठवडा सुट्टी घेतात आणि दरवर्षी भेटतात.

कधी मसुरीमध्ये, कधी गोव्यात, कधी घरी. जिथे सर्व १५-१६ लोक एकत्र बसतात, जेवतात, जुन्या गोष्टी ऐकतात आणि खूप मजा करतात.

सीमा म्हणते, “ही अशी वेळ असते जेव्हा आपण सर्वजण पुन्हा लहान मुले बनतो.”

ही फक्त भेट नसते, तर ती एक उपचारात्मक क्षण देखील असते.

जेव्हा आपण एखाद्या प्रिय व्यक्तीच्या शेजारी बसतो तेव्हा वर्षानुवर्षे थकवा वितळून जातो. जर कोणी विचारले की, “आपण कसे आहोत?” तर असे वाटते की कोणीतरी खरोखर जाणून घेऊ इच्छित आहे.

कौटुंबिक जेवणात पुढील गोष्टींबद्दल चर्चा भरलेली असते

कोण काय करत आहे, कोण कोणावर रागावले आहे, कोण कोणाला मिस करत आहे, आणि मग, या सर्वांमध्ये, हास्य, रडणे, विनोद आणि भरपूर प्रेम असते. हे एक भावनिक डिटॉक्स आहे.

एकत्र बसण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, संघर्ष सोडवण्यावर नाही

जर दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतील तर याचा अर्थ असा नाही की त्यांना कौटुंबिक मेळाव्यांपासून दूर ठेवले पाहिजे. आपण हे समजून घेतले पाहिजे की एखाद्या व्यक्तीचे सर्वांशी पटत नाही हे पूर्णपणे सामान्य आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की एखाद्या व्यक्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले पाहिजे.

कुटुंबात निश्चितच काही लोक असतात ज्यांना भेटणे आनंददायी असते आणि जे त्यांच्याशी बोलणे हलके वाटते.

पूर्वीच्या काळात, जेव्हा जास्त मुले असत आणि लग्ने लवकर होत असत, तेव्हा प्रत्येकजण नको असले तरी भेटत असे. अशा काळात, हृदयांमधील अंतर थोडे कमी होत असे.

जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा प्रत्येकावर त्यांचे मतभेद संपवण्यासाठी दबाव आणण्याची गरज नाही. कोणत्याही अपेक्षा किंवा जबरदस्तीशिवाय सर्वजण एकाच ठिकाणी असणे पुरेसे आहे. ही हळूहळू नातेसंबंध सुधारण्याची सुरुवात बनू शकते.

मुलांसाठी देखील एक धडा

आजकालची मुले त्यांच्या चुलत भावांनाही चांगले ओळखत नाहीत. त्यांना फक्त शाळेचे जग, मोबाईल गेम आणि नेटफ्लिक्स दिसते. पण जेव्हा त्यांना त्यांच्या आजीचा स्वयंपाक, त्यांच्या काकांचे विनोद, त्यांच्या मावशीचा राग आणि त्यांच्या मावशीचे लाड अनुभवतात तेव्हा त्यांना खऱ्या कुटुंबाच्या नात्याचा अर्थ समजतो.

नोकरी, अभ्यास किंवा लग्नानंतर लोक वेगवेगळ्या शहरात किंवा देशांमध्ये स्थायिक होतात. या अंतरामुळे आपल्या नात्यात एक प्रकारची दरी निर्माण झाली आहे. मुलांना त्यांच्या आजी-आजोबांच्या कथा माहित नसतात आणि प्रौढांना तरुण पिढीचा दृष्टिकोन समजून घेण्याची संधी मिळत नाही.

एक तारीख निश्चित करा

आठवडा किंवा सुट्टी. ते हॉटेलमध्ये असण्याची गरज नाही; घरीच मोठे जेवण आयोजित करा.

ग्रँड फॅमिली डिनरमध्ये काय वाढायचे

* आजीच्या काळातील खास पदार्थ, जसे की बटाटा पुरी, करी, पकोडे आणि खीर.

* प्रत्येक सदस्यासाठी एक आवडता पदार्थ : जर एखाद्या बहिणीला चायनीज आवडत असेल तर कॉर्न मंचुरियन घाला.

* मुलांसाठी काहीतरी खास : मॅकरोनी, पिझ्झा किंवा आईस्क्रीम.

हे जेवण फक्त पोटासाठी नाही, तर हृदयासाठी आहे, कारण दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण हे एकमेव मार्ग आहे जिथे सर्वजण कोणत्याही खास प्रसंगाशिवाय एकत्र येऊ शकतात.

नातेसंबंध सल्ला : ब्रेकअप ते लूकअप

* रजनी प्रसाद

नातेसंबंध सल्ला : “अरे, तो ब्रेकअप झाला.” आता, लोक अपरिहार्यपणे या ब्रेकअपबद्दल बोलतील. काही तुम्हाला स्पामध्ये जाऊन आराम करायला सांगतील, काही केस कापायला सांगतील, काही प्रवास करायला सांगतील आणि काही नवीन बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड शोधायला सांगतील. प्रत्येकाचे मत एक गोष्ट आहे आणि तुमचे दुःख वेगळे आहे.

दोन प्रौढांमधील प्रेमसंबंध हे लग्नापेक्षा किंवा प्रेमविवाहापेक्षा कमी नाही. दोघेही एकमेकांना जाणून घेऊन स्वतःच्या इच्छेने नातेसंबंधात प्रवेश करतात आणि म्हणूनच प्रेमसंबंध प्रेमविवाहासारखे वाटतात आणि परिणामी ब्रेकअप घटस्फोटासारखे वाटते.

पण इथे, ते या नात्यातील बिघाडासाठी इतरांना दोष देऊ शकत नाहीत, जसे की सहसा अरेंज्ड मॅरेजमध्ये होते. तुमच्या नात्यातील बिघाडाचे ओझे आणि जबाबदारी तुम्हाला सहन करावी लागते आणि या ओझ्याखाली, लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

स्वतःला दोष देणे. ब्रेकअपनंतर, लोक अनेकदा स्वतःला दोष देतात. ते असे मानतात, किंवा स्वतःला पटवून देतात की चूक फक्त त्यांचीच आहे. त्यांच्यात काहीतरी कमतरता किंवा दोष असावा ज्यामुळे त्यांचा जोडीदार त्यांना सोडून गेला. पण कथा फक्त स्वतःला दोष देऊन संपत नाही. बऱ्याचदा, लोक सतत स्वतःमध्येच दोष शोधतात, अगदी इतरांसमोर स्वतःला कमी लेखतात.

रिक्तपणाचे जीवन : एक शून्यता

एखाद्या व्यक्तीचे निधन स्वतःमध्येच एक पोकळी निर्माण करते. पण जेव्हा कोणी खास व्यक्ती निघून जाते तेव्हा ती तुमच्या आयुष्यात एक पोकळी निर्माण करते. ही पोकळी तुम्हाला असे वाटते की तुमचे जीवन फक्त एक पोकळी आहे. तुमच्या आयुष्यात कोणताही उत्साह किंवा उत्साह नाही.

खरं तर, आजच्या नातेसंबंधांमध्ये, एक जोडपे इतके गुंतलेले असते की ते एक प्रकारचे लग्न आहे. तुम्ही बराच वेळ एकत्र घालवला आहे. तुमच्या आवडी-निवडीच नाही तर तुमची दैनंदिन दिनचर्या, तुमचे जागरणाचे तास, तुमच्या झोपण्याच्या सवयी आणि इतर सर्व काही एकमेकांच्या देखरेखीखाली आणि लक्षाखाली आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्यातील अनेक योजना बनवल्या आहेत. तुम्ही भावनांपासून ते कपड्यांपर्यंत सर्व काही शेअर केले आहे. हे पूर्णपणे वैवाहिक नात्यासारखे आहे, कोणत्याही कायदेशीर मंजुरीशिवाय.

भावनिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या उपलब्ध आणि नेहमीच एखाद्यासाठी समर्पित राहण्यापासून वेगळे होणे खूप वेदनादायक असते. म्हणून, जेव्हा हे नाते तुटते तेव्हा जीवन कंटाळवाणे आणि निर्जीव होते आणि तुम्ही लग्न न करताही घटस्फोटित जीवन जगता.

खरं तर, ब्रेकअप आणि भावनिकदृष्ट्या घटस्फोट यात फारसा फरक नाही. घटस्फोट म्हणजे कायदेशीर कागदपत्रांद्वारे नातेसंबंध संपल्याची घोषणा, तर ब्रेकअप म्हणजे कोणत्याही कायदेशीर कारवाईशिवाय घटस्फोट.

ब्रेकअप आणि घटस्फोट यांच्यातील फरक

पण ब्रेकअपला घटस्फोट मानणे योग्य आहे का? नाही. ब्रेकअप आणि घटस्फोटात अनेक समानता आहेत, जसे की एका जोडीदारापासून वेगळे होणे, मानसिक त्रास, एकटेपणा आणि दुखावलेल्या भावना, तरीही ब्रेकअप तार्किक आणि वस्तुनिष्ठ दोन्ही प्रकारे घटस्फोटापेक्षा वेगळे आहेत. ब्रेकअप कायदेशीर गुंतागुंत, न्यायालयीन कार्यवाही, आर्थिक ताण, वकिलाचे शुल्क आणि मुले वेगळे होण्याची भीती यापासून मुक्त असतात.

ब्रेकअपमध्ये कुटुंबाचा हस्तक्षेप कमी असतो. घटस्फोटात, वेगळे होणे परस्पर सहमतीने असो वा नसो, कोर्टात आणि कोर्टाबाहेर दोन्ही पक्षांमध्ये भांडण होईल आणि कुटुंबेही त्यात सामील असतील.

घटस्फोटानंतरचे जीवन खूपच गुंतागुंतीचे असते. लोक तुमचे चारित्र्य, तुमचे विचार आणि तुमची जीवनशैली संशयाच्या नजरेने पाहतात. यामुळे आयुष्यात पुढे जाणे कठीण होते.

घटस्फोटात नेहमीच आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. तथापि, ब्रेकअपमध्ये सामान्यतः मानसिक त्रास असतो. ब्रेकअपमध्ये, वेगळे होणे सहसा परस्पर सहमतीने होते आणि ते फक्त एकाच जोडीदाराच्या संमतीने होते, तरीही ते घटस्फोटासारखे गुंतागुंतीचे नसते.

ब्रेकअपची वेदना घटस्फोटाइतकी दीर्घकाळ टिकणारी नसते. तसेच, जर तुमचे नाते लग्नापूर्वी संपले असेल, तर लग्नानंतर ते टिकण्याची शक्यता खूप कमी होती हे लक्षात घ्या.

हो, नाते तुटण्याची वेदना बराच काळ टिकते, परंतु घटस्फोटाइतकी जास्त काळ नाही, कारण ब्रेकअप हा हातावरच्या मेंदीसारखा असतो जो हळूहळू फिका पडतो. तथापि, घटस्फोट हा शरीरावरच्या टॅटूसारखा असतो, जो कायमचा त्याचा ठसा सोडतो.

म्हणून, ब्रेकअपला घटस्फोट समजू नका; त्याऐवजी, तुम्ही अवांछित कायमस्वरूपी टॅटू टाळला आहे याबद्दल निश्चिंत रहा आणि कदाचित म्हणूनच असे म्हटले जाते की घटस्फोटापेक्षा ब्रेकअप चांगले आहे.

स्वतःवर लक्ष केंद्रित करा

जर तुमचे ब्रेकअप झाले असेल, तर समजून घ्या की तुम्हाला स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याची आणखी एक संधी मिळत आहे. स्वतःवर लक्ष केंद्रित करा. आता, यावेळी, तुम्ही फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुमचे कौशल्य आणि प्रतिभा विकसित करा. तुमच्या आजूबाजूचे लोक काय म्हणत आहेत किंवा काय समजत आहेत याची काळजी करू नका. इतरांना बाजूला ठेवा आणि फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करा.

तुमचे मन भटकू देण्यापेक्षा स्वतःला व्यस्त ठेवणे चांगले. काही नवीन शिकत असले तरीही, काही क्रियाकलापांमध्ये व्यस्त रहा. बरेच लोक त्यांच्या ब्रेकअप दरम्यान अनेक कौशल्ये शिकतात, जसे की नृत्य शैली, भाषा, हायकिंग किंवा त्यांना जे हवे आहे. याचे कारण असे की, प्रथम, ते त्यांना व्यस्त ठेवते आणि दुसरे म्हणजे, जेव्हा आपण काहीतरी नवीन शिकतो तेव्हा आपण त्यावर अधिक लक्ष आणि वेळ देतो. आपले समर्पण आपल्याला निरुपयोगी कामे आणि गुंतागुंतींपासून मुक्त करते.

ब्रेकअपनंतर लोक ज्या दोन सर्वात मोठ्या चुका करतात त्या म्हणजे स्वतःला मर्यादित करणे आणि दुसरे म्हणजे, विलंब न करता नवीन नात्यात उडी घेणे.

स्वतःला वेगळे करू नका. ब्रेकअपनंतर, बरेच लोक स्वतःला सर्वांपासून वेगळे करतात. ते रात्रंदिवस एका कोपऱ्यात रडतात. ते त्यांच्या आरोग्याकडे आणि परिस्थितीकडे लक्ष देत नाहीत. ते सतत विचारांनी भरलेले असतात. हे अतिविचार इतके मानसिकदृष्ट्या त्रासदायक असू शकते की ते नैराश्य आणि चिंतेचे बळी बनतात.

म्हणूनच, अशा कठीण काळात एकटे न राहणे अत्यंत महत्वाचे आहे. तुमच्या कुटुंबासोबत, मित्रांसोबत आणि हितचिंतकांसोबत रहा. तुमच्या वेदना आणि समस्या त्यांच्यासोबत न डगमगता शेअर करा. जरी हे तुमचे दुःख त्वरित कमी करणार नसले तरी, ते काही प्रमाणात आराम देईल. त्यांचे शब्द, सल्ला आणि आधार तुम्हाला उतावीळ पावले उचलणे किंवा पुढील अडचणीत पडणे टाळण्यास मदत करेल.

निराशा आणि एकटेपणा

ब्रेकअपनंतर विचार न करता किंवा विचार न करता नवीन नातेसंबंधात घाई करणे ही एक मोठी चूक आहे. तुम्हाला अनेकदा असे लोक भेटतील जे तुम्हाला सांगतील, “जर कोणी गेला तर काय? नवीन जोडीदार शोधा.” पण सध्या ही विचारसरणी आणि हे मत दोन्ही चुकीचे आहे.

तुमच्या निराशेवर आणि एकाकीपणावर मात करण्यासाठी, तुम्हाला नवीन नात्यात अडकण्याची गरज नाही, तर स्वतःला बरे करण्याची गरज आहे.

तुम्हाला सध्या ज्याची गरज आहे ती नवीन जोडीदाराची नाही तर स्वतःची आहे. यावेळी नवीन नात्यात प्रवेश करणे तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी खूप चुकीचे ठरेल, कारण तुम्ही त्यांना तुमच्या आयुष्यात आणले असते जेणेकरून जुने विसरून जाता, जे फक्त एक उपयोग होते, प्रेम नाही. अशा प्रकारचे प्रेम जास्त काळ टिकणार नाही आणि तुमच्या दोघांसाठी फक्त वेदनाच देईल.

स्वतःला बळकट करण्याचा आणि अधिक आत्मविश्वास वाढवण्याचा हा काळ आहे. रडण्यासाठी दुसरा खांदा शोधण्याऐवजी तुम्हाला तुमचे अश्रू पुसून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची आवश्यकता आहे.

या दोघांची सर्वात मोठी चूक म्हणजे पुढे न जाणे. हृदयविकारानंतर बरेच लोक स्वतःला कायमचे वेगळे करतात. त्यांना वाटते की त्यांना आता दुसऱ्या जोडीदाराची गरज नाही.

ते पुन्हा दुखावले जाण्याच्या भीतीने किंवा त्यांच्या भूतकाळातील जोडीदाराच्या आठवणींमध्ये पूर्णपणे समर्पित राहण्याच्या इच्छेमुळे किंवा संपूर्ण जग खोटे आणि निरुपयोगी आहे आणि त्यांचे प्रेम समजणार नाही या विश्वासामुळे ते स्वतःला नातेसंबंधात बांधील नाहीत. यापैकी कोणतीही कारणे योग्य नाहीत. आयुष्यात असा एक वेळ येईल जेव्हा तुम्ही एकट्याने नव्हे तर जोडीदारासोबत पुढे जावे.

धाडस आणि शहाणपण

ब्रेकअपनंतर, स्वतःला विकसित करण्यासाठी वेळ काढा. जास्त भावनिक होण्याचे टाळा; परिपक्व दृष्टिकोन स्वीकारा आणि पुढे जा. लक्षात ठेवा की अयशस्वी नातेसंबंधाचा अर्थ असा नाही की तुमच्या आयुष्यात कोणतेही नाते टिकणार नाही. हे समजून घ्या की देवदासचे जीवन किंवा तुटलेल्या व्यक्तीचे जीवन हे जीवन नाही. म्हणून, धैर्य आणि समजुतीने, जोडीदारासोबत जीवन जगा.

ही वेदना तीव्र आणि क्रूर आहे. परंतु ती कमी करता येते आणि त्यावर मात देखील करता येते. तुम्हाला फक्त पुढे जाण्यासाठी वेळ आणि वेळ हवा आहे. येथे वेळ देणे म्हणजे त्यावर काम करणे. ब्रेकअपचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही सल्ला किंवा आधार घेण्यास तुम्ही मागेपुढे पाहू नये.

सल्ला किंवा मदत घेणे चुकीचे नाही किंवा ते लज्जास्पद नाही. लोक अनेकदा ब्रेकअपचा अनुभव घेणाऱ्यांची थट्टा करतात, त्यांना कमकुवत आणि असुरक्षित म्हणतात, जे पीडितेसाठी एक मोठी समस्या बनते. ते थट्टा होण्याची इतकी भीती बाळगतात की ते त्यांचे दुःख दाखवत नाहीत आणि त्याऐवजी गुदमरतात. म्हणून, हे समजून घ्या की जर तुम्हाला ब्रेकअपचा सामना करण्यास जास्त त्रास होत असेल, तर तो वाईट किंवा लज्जास्पद निर्णय नाही.

जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या भीती किंवा चिंतेशी झुंजत असाल, तर तज्ञांची मदत किंवा समुपदेशन घेणे हा वाईट किंवा लज्जास्पद निर्णय नाही, तर एक योग्य आणि महत्त्वाचा निर्णय आहे. लक्षात ठेवा, तुमचे शरीर आणि मन पूर्णपणे तुमचे आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी, तुम्ही इतरांच्या हास्याकडे किंवा टिप्पण्यांकडे लक्ष देऊ नये.

कौटुंबिक नातेसंबंध : सासू-सासरे – हे नाते अमूल्य आहे

* दीपिका शर्मा

कौटुंबिक नातेसंबंध : रोनित आणि नेहा यांचे लग्न २ वर्षांपूर्वी झाले. या नात्यामुळे ते दोघेही आनंदी होतेच, शिवाय त्यांचे कुटुंबही आनंदी होते. कारण ते एकमेकांना पसंत करत नव्हते, तर दोन्ही कुटुंबातील इतर सदस्यही एकमेकांचा आदर करत होते. विशेषतः, त्यांचे त्यांच्या सासू-सासऱ्यांशी चांगले संबंध होते. आदर आणि सन्मानासोबतच ते विनोदही करायचे.

खरं तर, ज्या नात्यात आपलेपणा आणि मैत्रीची भावना असते, तिथे घरात प्रेम आणि सुसंवाद आपोआप वाढतो. यातील सर्वात महत्त्वाचा संबंध म्हणजे पत्नी आणि पतीच्या आईचा.

ती सासू आहे, हिटलर नाही

अनेकदा काही मुली त्यांच्या पतीच्या आईचे नाव ऐकून डोके वर काढतात, कारण त्यांच्या मनात त्यांच्या सासूची प्रतिमा हिटलरसारखी असते. पण हे बरोबर नाही. पतीच्या आईला जीवनाचा एक महत्त्वाचा भाग मानले पाहिजे. तिचा आदर करणे आणि तिच्या मताचा आदर करणे हे नात्याचा पाया मजबूत करते. या नात्यामुळे सुनेला तिच्या सासरच्या घरात तसेच तिच्या पालकांमध्येही आरामदायी वाटते. जर संभाषणात सभ्यता आणि जवळीक असेल तर हे नाते एका खोल मैत्रीसारखे बनेल.

वेळोवेळी तिच्या आरोग्याबद्दल, आवडींबद्दल आणि अनुभवांबद्दल तिच्याशी बोलणे महत्वाचे आहे. यामुळे तिला असे वाटेल की तुम्ही तिचा मनापासून आदर करता. घरातील छोट्या छोट्या कामात तिला मदत करणे किंवा नवीन कामात तिचे मत घेणे, सण आणि कौटुंबिक प्रसंगी तिच्यासोबत वेळ घालवणे, या सर्व गोष्टी नात्यात गोडवा आणतात.

अशा प्रकारे मित्र बनवा

जर तिला एखाद्या गोष्टीत (जसे की जेवण, संगीत किंवा पार्टी) विशेष रस असेल तर तुम्ही तिच्याशी त्यात रस दाखवून लवकर संपर्क साधू शकता. कधीकधी त्यांच्यासोबत खरेदीला जाणे आणि त्याला वैयक्तिक भेट म्हणून ओळखणे देखील नाते अधिक घट्ट करते.

लहान पावले नात्यात खोली वाढवतात. हे देखील खरे आहे की प्रत्येक नाते नेहमीच गुळगुळीत आणि प्रेमळ नसते. कधीकधी संघर्ष होऊ शकतात. परंतु प्रतिकूल परिस्थितीत संयम आणि आदर राखला पाहिजे. यामुळे नात्यात कटुता येत नाही आणि नाते औपचारिकतेच्या पलीकडे जाऊन मैत्री आणि कुटुंबाचे मजबूत बंधन बनते.

आता जर आपण पत्नीच्या आईबद्दल, म्हणजेच तुमच्या सासूबद्दल बोललो तर तिलाही आईसारखा आदर आणि प्रेम दिले पाहिजे. भारतीय संस्कृतीत, सुनेला मुलाचा दर्जा दिला जातो. अनेकदा कुटुंबातील बाबींमध्ये सुनेचे मत घेतले जाते, ज्यामुळे तो कुटुंबाचा एक भाग असल्यासारखे वाटतो. अशा परिस्थितीत, सुनेचेही कर्तव्य आहे की ते मुलासारखे त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडतील. त्यांच्याकडून सल्ला घेणे, त्यांचे काळजीपूर्वक ऐकणे आणि त्यांच्या आवडी-निवडींची काळजी घेणे यामुळे नाते मजबूत होते. वेळोवेळी त्यांच्या आरोग्याबद्दल आणि सांत्वनाबद्दल विचारणे, त्यांच्याशी बोलणे त्यांना आपुलकीचे वाटते.

कधीकधी त्यांना आश्चर्यचकित केल्याने नात्यात गोडवा येतो. त्यांच्यासोबत बसून विनोद करणे, जुन्या गोष्टी ऐकणे किंवा त्यांना कुटुंबाच्या सहलीवर घेऊन जाणे, या सर्व गोष्टींमुळे त्यांना असे वाटते की ते केवळ सासरच्या लोकांचा भाग नाहीत तर मुलासारखे नातेसंबंधात आहेत.

लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

त्यांना दुर्लक्ष करू नका किंवा त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका.

त्यांची तुलना तुमच्या पतीशी किंवा तुमच्या आईशी करू नका.

तुमचे मत त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका.

वाद झाल्यास कठोर शब्द वापरू नका.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें