मेकअप काढण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

* गृहशोभिका टीम

मेकअप योग्य प्रकारे न काढल्याने त्वचेचे नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही योग्य आणि सुरक्षित पद्धतीने मेकअप काढणे खूप महत्त्वाचे आहे. मेकअप काढण्यासाठी बदामाचे तेल वापरणे चांगले. बदामाच्या तेलात असे अनेक पोषक घटक आढळतात जे त्वचेसाठी आवश्यक असतात.

बदामाच्या तेलामध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड आणि अँटी-ऑक्सिडंट आढळतात जे अतिनील किरणांचा प्रभाव कमी करण्यात आणि वृद्धत्वाची लक्षणे दूर करण्यात मदत करतात. अशा परिस्थितीत मेकअप काढण्यासाठी बदामाचे तेल वापरणे खूप फायदेशीर ठरेल.

शेवटी बदामाचे तेलच का?

मेकअप काढण्यासाठी, तुम्हाला नेहमी काहीतरी हवे असते जे मेकअप लवकर काढून टाकेल आणि तुमचा चेहरा स्वच्छ करेल. आय-लाइनर आणि मस्करा स्वच्छ करण्यासाठी थोडी अधिक काळजी घ्यावी लागेल. अशा परिस्थितीत, हे महत्वाचे आहे की आपण जी क्रीम किंवा लोशन वापरत आहात ते सुरक्षित असले पाहिजे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने बदाम तेल हा एक उत्तम पर्याय आहे.

बदाम तेल वापरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचे रसायन नसते. त्यामुळे त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही.

बदामाचे तेल वापरण्याचे दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे मेकअप केल्यानंतर चेहऱ्यावरील ओलावा निघून जातो. अशा परिस्थितीत बदामाचे तेल चेहऱ्याला पोषण देण्याचे काम करते.

या दोन कारणांशिवाय, जर तुम्हाला मुरुम आणि मुरुमांची समस्या असेल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

कसे वापरायचे?

बदामाच्या तेलाने मेकअप काढणे खूप सोपे आहे. सर्वप्रथम तुमच्या तळहातात बदामाचे तेल चांगल्या प्रमाणात घ्या. याने तुमच्या चेहऱ्याला नीट मसाज करा. तुमच्या डोळ्यांना आणि त्यांच्या आजूबाजूला हलक्या हाताने मसाज करा. त्यानंतर कापसाचा एक मोठा तुकडा गुलाब पाण्यात बुडवून पिळून घ्या. यानंतर, संपूर्ण चेहरा पूर्णपणे पुसून टाका.

या गोष्टींकडेही विशेष लक्ष द्या :

  1. जर तुम्ही वॉटरप्रूफ मस्करा लावला असेल तर डोळ्यांना मसाज करण्यासाठी जास्त तेल वापरा.
  2. चेहऱ्यावरून मेकअप काढल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

प्रत्येक त्वचेसाठी उपयुक्त सेन्सीबायो जेल फेसवॉश

– पारुल भटनागर

जर गोष्ट चेहऱ्यासंबंधित असेल तर कोणत्याही स्त्रीला याबाबतीत तडजोड करायची नसते, कारण चेहऱ्याचे सौंदर्य हे आपले एकूणच सौंदर्य वाढवण्याचे काम जे करत असते. मग भले आपण कोणताही पोशाख घातला तरी तो नेहमी आपल्या चेहऱ्याला शोभतो. पण जर चेहरा निस्तेज आणि निर्जीव असेल, तो हायड्रेट नसेल, तर तुम्ही कितीही चांगले मेकअप केले किंवा आउटफिट घातले तरी ते तुम्हाला अजिबात शोभणार नाहीत. अशा वेळी आपण फक्त मनातल्या मनात हाच विचार करून त्रस्त होता की चेहऱ्यावर कोणती ब्युटी ट्रीटमेंट करावी किंवा कोणते ब्युटी प्रोडक्ट लावावे, ज्यामुळे चेहरा स्वच्छ तर व्हावाच शिवाय त्वचेवर ओलावा ही टिकून राहावा. अशा परिस्थितीत बायोडर्माचे सेन्सीबायो जेल moussant तुमच्या त्वचेसाठी जादूसारखे काम करेल. चला तर मग याविषयी जाणून घेऊया :

आपली त्वचा हळूवारपणे स्वच्छ करा

त्वचेवर जितकी तिखट उत्पादने लावली जातात तितकीच त्वचेची आर्द्रता कमी होऊ लागते. पण आज बाजारात इतकी सौंदर्य उत्पादने आपल्यासमोर आहेत की आपल्या त्वचेची समस्या आपल्यासमोर असूनही आपल्याला सौंदर्य उत्पादने योग्य प्रकारे निवडता येत नाहीत. त्यामुळे त्वचा निस्तेज होण्यासोबतच नैसर्गिक सौंदर्यही गमावू लागते. अशा परिस्थितीत बायोडर्माचे सेन्सीबायो जेल moussant तुमची त्वचा हळुवारपणे स्वच्छ करून त्वचेला जास्त काळ हायड्रेट ठेवण्याचे काम ही करते. हे संवेदनशील त्वचेसाठीदेखील अतिशय सुटेबल आहे. म्हणजेच ते लावल्यानंतर त्वचेवर किंवा डोळयांत कोणत्याही प्रकारची जळजळ होत नाही.

ते विशेष का आहे

यामध्ये अशा काही खास घटकांचा वापर करण्यात आला आहे, जे त्वचेच्या समस्या दूर करतात. त्वचेसाठी ते कोणत्याही पोषणापेक्षा कमी नाहीत, ज्यामुळे हे काही वेळा लावल्यानंतर त्वचेला चमक येते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की त्यातील व्हिटॅमिन ई ची उपस्थिती, जी त्वचेचे कोलेजन तयार होण्यास मदत करण्याबरोबरच त्वचा तरुण दिसण्यासाठी ही काम करते. शिवाय त्वचेतील निरोगी बॅक्टेरिया, जे त्वचेला पर्यावरणाच्या हानीपासून वाचवण्याचे काम करतात, अशा परिस्थितीत त्यातील प्रीबायोटिक्स त्वचेला पोषण देऊन त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त त्यातील अँटीऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेला फ्री रॅडिकल्स आणि यूव्ही किरणांपासून वाचवण्याचे काम करतात. ते शक्तिशाली अँटीएजिंग म्हणून देखील कार्य करतात. अशा परिस्थितीत त्यात ते सर्व घटक समाविष्ट आहेत, जे त्वचेला कोणतीही हानी न पोहोचवता त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. ते त्वचेचा बाह्य थर स्वच्छ करून डाग ही कमी करतात, तसेच सेबम स्राव काढून टाकतात. त्याचा साबणमुक्त फॉर्म्युला त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवतो.

संवेदनशील त्वचेला विशेष काळजी का आवश्यक आहे

२०१९ मध्ये फ्रंटियर ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार ६०-७० टक्के महिलांची त्वचा संवेदनशील असते. त्यामुळे त्वचेवर लालसरपणा, कोरडेपणा, खाज सुटण्याची समस्या सर्वाधिक दिसून येते, कारण संवेदनशील त्वचा नाजूक असल्याने ती प्रदूषण, तणाव आणि मेकअपपासून स्वत:चे संरक्षण जास्त करू शकत नाही आणि जर अशी त्वचा तिखट आणि केमिकल्स असलेल्या प्रोडक्ट्सच्या जास्त संपर्कात आली तर त्वचा कोरडी होऊन तिची स्थिती अजून खराब होऊ शकते. अशा त्वचेची सौम्य सौंदर्य उत्पादनांनी काळजी घेणे आवश्यक असते. अशा परिस्थितीत हा सौम्य जेल फेसवॉश, ज्याचा साबण मुक्त फॉर्म्युला त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम न करता त्वचा गुळगुळीत करण्याचे काम करते. याची खास गोष्ट म्हणजे हे त्वचेतील फक्त घाण काढून टाकते, त्वचेचे नैसर्गिक तेल नाही.

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे जेल moussant नॉन कॉमेडीक आणि सुगंध मुक्त आहे. म्हणजेच त्यामुळे छिद्रे बंद होत नाहीत, तसेच त्यामुळे त्वचेवर कोणत्याही प्रकारची अॅलर्जी, जळजळ होत नाही. सकाळी आणि संध्याकाळी याचा वापर केल्याने तुम्ही काही आठवडयांतच तुमच्या चेहऱ्यावर उत्तम परिणाम पाहू शकता.

डीएएफ कॉम्प्लेक्स

त्याचे डीएएफ कॉम्प्लेक्स अशा सक्रिय घटकांनी मिळून बनलेले आहे जे संवेदनशील त्वचेची सहनशीलतेची क्षमता वाढवण्याचे काम करते. त्यात कोको ग्लुकोसाइडसारखे सक्रिय घटक आहेत, जे फोमिंग एजंटचे कार्य करण्यासह नैसर्गिक असते. ज्यामुळे त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही. म्हणजेच ते प्रत्येक त्वचेसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.

या गोष्टीही लक्षात ठेवा

* नेहमी सौम्य असलेली सौंदर्य उत्पादने वापरा.

* त्वचेची क्लिंजिंग आणि मॉइश्चरायझिंग करणे सुनिश्चित करा.

* त्वचेची बाहेरून काळजी घेण्यासोबतच त्वचा आतूनही निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे, खनिजे समृद्ध आहार घ्या.

* संवेदनशील त्वचा असलेल्यांनी टॉवेलने त्वचा स्वच्छ करण्याऐवजी फेशियल क्लिनिंग वाइप्सने त्वचा स्वच्छ करण्याचा प्रयत्न करावा.

बायोडर्माचं अँटी एक्ने सेबियम फेस वॉश

* पारुल भटनागर

समस्यामुक्त त्वचा ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण असं असलं तरी कधी तेलकट त्वचा तर कधी त्वचेवर मुरुमं येण्याची समस्या उद्भवते, जे चेहऱ्याचे सौंदर्य आणि तजेलपणा नाहीसे करण्याचे काम तर करतातच शिवाय त्यांच्यामुळे त्वचेवर खूप जळजळ आणि खाज सुटते. अगदी इतके की कधीकधी ती सहन करणेदेखील कठीण होते. ही समस्या तशी तर कोणत्याही ऋतूत उद्भवू शकते, परंतु उन्हाळयात तेलकट त्वचा आणि त्यावर मुरुमांची समस्या अधिक दिसून येते, कारण उन्हाळयात त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी सेबेशियस ग्रंथी अधिक सेबम तयार करू लागतात, ज्यामुळे मुरुमं होतात. अशा परिस्थितीत तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.

तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचेची कारणे कोणती?

आज तेलकट त्वचेची समस्या सामान्य झाली आहे. तेलकट त्वचेमध्ये लिपिड पातळी, पाणी आणि चरबीचे प्रमाण खूप जास्त असते आणि जेव्हा सेबेशियस ग्रंथी आवश्यकतेपेक्षा जास्त सेबम तयार करू लागतात तेव्हा मुरुमं, ब्रेकआउट्स, व्हाईटहेड्स आणि ब्लॅकहेड्सच्या समस्या उद्भवतात आणि ब्रेकआउट्समुळे सेबम त्वचेच्या मृत पेशींसह छिद्रे अवरोधित करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करते, ज्यामुळे त्वचेची स्थिती आणखी बिघडते. दुसरीकडे कॉम्बिनेशन त्वचेत कपाळ, नाक आणि हनुवटी यांसारख्या टी-झोनमधील तेल ग्रंथी अतिक्रियाशील होतात, तर उर्वरित चेहरा सामान्य आणि कोरडा असतो. त्यामुळे अशा त्वचेचे संतुलन न राहिल्याने अशा त्वचेला इजा होण्याची भीती अधिक असते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्याची विशेष गरज आहे.

  • तेलकट त्वचा असण्याचे एक कारण अनुवांशिकदेखील आहे, ज्यामुळे सेबेशियस ग्रंथी नेहमी जास्त सक्रिय होऊन जास्त सेबम तयार करतात, ज्यामुळे मुरुमं होतात.
  • हायपरकेराटिनायझेशन आणि बॅक्टेरियाचा प्रसार, तारुण्यादरम्यान सुरू झालेल्या हार्मोनल क्रियाकलापांचा परिणाम म्हणून सेबमचे जास्त उत्पादन करते, ज्यामुळे त्वचा अधिक तेलकट आणि चमकदार दिसू लागते, तसेच निरोगी सेबमपेक्षा तिची रचना वेगळीदेखील असते, ज्यामुळे ती अधिक जाड असल्याने तिला कूपातून बाहेर येण्यास अडचण होते. यामुळे कॉमेडम होण्याचा धोका वाढतो.
  • हायपरकेराटीनायझेशनमध्ये त्वचेच्या पेशींची झपाटयाने होणारी वाढ छिद्रे अडकवून सेबमला बाहेर पडण्यास प्रतिबंध करते, जे कॉमेडोमचे कारण बनते, ज्यामुळे त्याच्या सभोवतालची त्वचा पिगमेंट नजर येऊ लागते.
  • मुरुमांच्या जीवाणूंच्या वाढीसाठी सेबम पोषक म्हणून कार्य करते, ज्यामुळे कॉमेडोम लाल मुरुमांमध्ये बदलतो आणि जळजळ व वेदना होतात.
  • काहीवेळा मोठी छिद्रे, ज्यांचे कारण वय आणि जुने ब्रेकआउट असतात, ज्यामुळे त्यात जास्त तेल तयार होऊ लागते. अशा स्थितीत छिद्रे आकुंचन पावणे शक्य नसले तरी त्वचेची विशेष काळजी घेऊन त्यावर बऱ्याच अंशी नियंत्रण ठेवता येते.
  • अनेकवेळा आपण इतरांचे बघून किंवा मग विचार न करता आपल्या त्वचेवर चुकीचे स्किन केयर प्रोडक्ट्स वापरतो, ज्यामुळे त्वचा अधिक तेलकट होते, ज्यामुळे मुरुमांसह त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत जेव्हा पण तुम्ही पुरळ आणि कॉम्बिनेशन स्किनचे स्किन केअर उत्पादने वापरता तेव्हा तुमच्या त्वचेचा प्रकार लक्षात ठेवणे आवश्यक आहे. अशी त्वचा असलेल्यांसाठी लाइटवेट मॉइश्चरायझर आणि जेल आधारित क्लिन्झर वापरणे अधिक योग्य आहे.

काय आवश्यक आहे

सूर्य टाळा : खरं तर सूर्याची हानिकारक किरणं त्वचा कोरडी करतात. अगदी तेलकट त्वचेलाही मॉइश्चरायझरची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत सेबेशियस ग्रंथी अधिक सक्रिय होते, ज्यामुळे अधिक सेबम तयार होते आणि त्वचेवर डाग पडतात. इतकेच नाही तर त्वचेच्या कोरडेपणामुळे हे त्वचेच्या मृत पेशी नैसर्गिकरित्या बाहेर पडण्यापासून रोखण्याचे काम करते, ज्यामुळे सेबम छिद्र्रांमधून बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे शक्यतो कडक सूर्यप्रकाशात बाहेर जाणे टाळा आणि जर बाहेर गेलातच तर शरीर झाकून ठेवा.

 नियमित ट्रीटमेंट फॉलो करा : कोणत्याही उपचाराचा त्वचेवर तात्काळ परिणाम होत नाही, तर नियमित उपचारांसोबतच त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे जसे की दिवसा आणि रात्री स्वच्छतेचे नियम पाळण्याबरोबरच औषधोपचार घेणे. असे केल्याने तुम्हाला ५-६ आठवडयांत परिणाम दिसू लागतील.

मुरुमांना हात लावू नका : जर तुम्हाला मुरुमं होण्याबरोबरच वेदना ही होत असतील तर ही स्थिती बरीच गंभीर आहे. त्यामुळे चिडचिड होत असताना पिंपल्सला हात लावू नका, कारण याने संसर्ग पसरण्यासोबतच डाग पडण्याची ही भीती असते.

क्लिंजिंग इज मस्ट-बायोडर्माचे सेबियम फेस वॉश : कॉम्बिनेशनमुळे तेलकट त्वचेची गोष्ट असो किंवा मग मुरुम-प्रवण त्वचेची, क्लिंजिंग ही एक अतिशय महत्त्वाची प्रक्रिया आहे. अशा परिस्थितीत केवळ क्लिंजिंग करणेच नव्हे तर योग्य क्लिंजर वापरण्याची ही गरज आहे. त्यामुळे बायोडर्माचे सेबियम फेस वॉश, जे चेहऱ्यावरील घाण काढून टाकण्याबरोबरच सीबमचे जास्त उत्पादन रोखण्यासाठी तसेच छिद्रे अडकण्यापासून रोखण्यासाठी सौम्य क्लिंजर म्हणून काम करते. यामुळे त्वचा हळूहळू समस्यामुक्त होऊ लागते. ते त्वचा कोरडी होऊ देत नाही.

त्यातील झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेट एपिडर्मिस साफ करून आणि सेबम स्राव कमी करून डाग कमी करण्यास मदत करते. तसेच, त्याचा साबणमुक्त  फॉर्म्युला त्वचेची पीएच पातळी संतुलित ठेवण्याचे काम करते. हे अप्लाय केल्यानंतर काही दिवसांतच तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागेल. तर मग आता तेलकट आणि पुरळ त्वचेला म्हणा बाय.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें