नेटिकेट्सची काळजी घ्या

* पूनम अहमद

नेटिकेट्स हा शब्द नेट आणि एटीकेट्सने मिळून बनलेला आहे आणि याचा अर्थ आहे ऑनलाईन वागणुकीच्या नियमांचे पालन करणे. ज्याप्रमाणे वास्तविक जीवनात शिष्टाचार पाळणे आवश्यक असते तसेच नेटिकेट्स, ऑनलाइन शिष्टाचार न पाळल्यामुळेही आपण अडचणीत येऊ शकता.

अलीकडील एका डिजिटल अहवालानुसार आपण दररोज सुमारे ६ तास ४२ मिनिटे ऑनलाइन खर्च करतो. आपण आपल्या स्मार्टफोनवर, लॅपटॉपवर गप्पा मारण्यात, गेम्स खेळण्यात, फोटो काढण्यात, ते शेअर करण्यात अजूनही बरेच काही करण्यात व्यस्त राहतो. इतके ऑनलाईन असल्याने आमचे ऑनलाइन गोष्टींमध्ये व्यस्त राहणे स्वाभाविक आहे. असे बरेच लोक असू शकतात ज्यांना नेटिकेट्स माहित नसेल आणि बऱ्याच चुका करीत असतील. या टिपा त्यांच्याचसाठी आहेत :

* आपण ऑनलाइन बोलत असताना आपल्या भाषेची काळजी घ्या. असे समजू नका की कोणीही आपल्याकडे पाहत नाही तर आपण कसलीही भाषा वापरू शकता.

* लांबलचक गोष्टी करू नका. अर्थात महत्वाचेच बोला. व्यर्थ, कंटाळवाणे संभाषणे टाळा.

* ईमेल, गप्पा, मजकूर किंवा सोशल मीडिया पोस्टच्या टिप्पण्या असोत, पाठवणीचे बटण दाबण्यापूर्वी सर्व काही एकदा चांगल्या प्रकारे वाचा.

* ईमेल पाठविताना विषयाची ओळ तपासा. कामाशी संबंधित मेलसाठी ते आवश्यक आहे, कारण जर तुम्ही विषयाच्या ओळीत हाय लिहिले तर कदाचित ते अर्जंट मानले जाणार नाही आणि नंतर बघण्यासाठी सोडले जाईल.

* कुणाचेही खाजगी फोटो किंवा संभाषण सामायिक करू नका किंवा पोस्ट करू नका. यामुळे एखाद्याशी आपले संबंध खराब होऊ शकतात.

* ऑनलाइन जगात गती ची काळजी घ्या. ईमेल आणि संदेशांना वेळेवर प्रत्युत्तर द्या, जरी विषय अर्जंट नसेल, परंतु आठवड्यातून उत्तर अवश्य द्या. दुर्लक्ष करू नका.

* कोणालाही वारंवार मेल पाठवू नका. कोणालाही आपले मेल वाचण्यास भाग पाडू नका. हा असभ्यपणा आहे.

* शेअर करा, परंतु आपल्या वैयक्तिक जीवनाची प्रत्येक छोटीशी माहिती सामायिक करणे टाळा.

* गप्पा मारू नका, ज्या गोष्टींच्या सत्यतेबद्दल तुम्हाला पूर्णपणे विश्वास नसेल त्यांच्या कथा सांगू नका आणि बऱ्याच वेळा तुम्हाला काही सत्य माहित असेलही तरीही तुम्ही ते सामायिक करणे आवश्यक नाही.

* आपल्याला कितीही आवश्यक असले तरीही आपण वेबवरून फोटो चोरू नका. त्यांचे कॉपीराइट असू शकते आणि कोणीतरी त्यावर भरपूर प्रयत्न आणि वेळ खर्च केला असेल.

* टिप्पण्या लहान ठेवा, ऑनलाइन चर्चेच्यावेळी आपली बाब स्पष्टपणे ठेवत पोस्ट करा.

* एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. मित्र सूचीत जोडल्यानंतर मित्रता तोडणे म्हणजे अपमानास्पद होते. जोपर्यंत संबंध खूप खराब होत नाहीत तोपर्यंत मित्रता तोडू नका.

स्मार्टफोनचे व्यसन आहे वाईट

* ललिता गोयल

स्मार्टफोन आपल्या सगळयांच्या जीवनाचा एक अभिन्न अंग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण याच्यावर अवलंबून असतो, मग गोष्ट सकाळच्या अलार्मची असो, ऑनलाईन पेमेंटची, शॉपिंगची, बोअर झालं की संगीत ऐकणे किंवा चित्रपट बघणे, एखादा महत्वाचा मेल करायचा असो किंवा आपल्या मित्रांशी व नातेवाईकांशी कनेक्ट राहायचे असो. आपणा सगळयांचा पूर्ण संसार या लहानशा वस्तूत  सामावलेला आहे. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की या लहानशा वस्तूशी आपली ही जवळीक आपल्या दैनंदिन वर्तणुकीत कित्येक समस्यासुद्धा निर्माण करत आहे? जर तुम्ही स्मार्टफोनमधून महत्वाची माहिती काढू शकला नाहीत तर तुम्ही त्रासून जाता. जर तुमच्यापर्यंत मेसेज किंवा कॉल पोहोचत नसेल, तर तुम्ही बेचैन होऊ लागता. जर तुमच्याकडे प्रीपेड कनेक्शन असेल, तर स्मार्टफोनमध्ये बॅलेंस कमी होताच तुम्ही घाबरून जाता. कित्येक व्यक्तींमध्ये इंटरनेटचं स्पीडही टेन्शन वाढवतो.

फेसबुक वा अन्य सोशल नेटवर्किंग साईटवर स्वत:चा स्टेटटस अपलोड करू न कल्याने वा इतरांचा स्टेटस वाचू न शकल्यानेही अस्वस्थता जाणवते.

याव्यतिरिक्त काही लोकांना नेहमी आपला स्मार्टफोन हरवणार असल्याची भीती सतावत राहते. याचा अर्थ जर एक मिनिटही फोन त्यांच्या नजरेपासून दूर झाला तर ते बेचैन होऊ लागतात. आपला स्मार्टफोन हरवल्याच्या भीतिने त्यांच्या हृदयाची धडधड वाढते.

नोमोफोबिया नावाचा आजार

लोवा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये अलीकडेच लावलेल्या शोधानुसार स्मार्टफोन लोकांमध्ये नोमोफोबिया नावाचा आजार निर्माण करत आहे. या रोगाच्या व्यक्तीला सतत आपला मोबाईल हरवण्याची भीती वाटत राहते आणि कित्येकदा तर हा फोबिया माणसांवर एवढा वरचढ होतो की टॉयलेटमध्येसुद्धा ते आपला मोबाईल बरोबर घेऊन जातात आणि दिवसातून कमीतकमी ३० पेक्षा जास्त वेळा आपला फोन चेक करतात. प्रत्यक्षात त्यांना भीती वाटत असते की फोन घरी विसरलो तर त्यांचा एखादा महत्वाचा मेसेज किंवा कॉल मिस होईल आणि त्यांची हीच भीती त्यांच्या वर्तणूक आणि व्यक्तिमत्वातील बदलाचे कारण बनते. या भीतिने त्रस्त लोकांना वाटत राहते की फोनविना आपला सगळया जगाशी काहीच संपर्क राहणार नाही.

फोनविना जीवन अपूर्ण

लंडनमध्ये झालेल्या एका दुसऱ्या संशोधनात म्हटलं आहे की नोमोफोबिया आजच्या काळातली एक गंभीर समस्या आहे आणि यांच्या गांभीर्याला समजून घेण्यासाठी जवळपास १००० लोकांवर संशोधन झालं, ज्यात ६६ टक्के लोक म्हणाले की त्यांना आपला मोबाईल हरवण्याची भीती त्रास देत राहते. संशोधनात असंही दिसून आले की १८ ते २४ वर्षांमधील तरुणांमध्ये मोबाईलप्रति सर्वाधिक जवळीक आहे. या वयातील साधारणत: ७७ टक्के लोक मोबाईलविना एक मिनिटसुद्धा राहू शकत नाहीत. अशा लोकांना वाटतं की मोबाईलविना आपलं जीवन अपूर्ण आहे. ते याच्याशिवाय राहू शकणार नाहीत. संशोधनात असेही दिसून आले की नोमोफोबिया झालेली व्यक्ती दिवसातून कमीतकमी ३७ वेळा आपला मोबाईल चेक करते.

उपाय काय

मानलं की स्मार्टफोनचे टेक्निक तुम्हाला स्मार्ट आणि अपडेट ठेवते, पण त्याबरोबरच हे लक्षात ठेवायची गरज आहे की ही टेक्निक तुमची सुविधा बनण्याऐवजी डोकेदुखीचे कारण न बनो. मोबाईल फोनच्या या व्यसनातून बाहेर निघायला आवश्यक आहे की तुम्ही तुमच्या जीवनाचं काहीतरी ध्येय ठरवावं. स्वत:ला आपल्या आवडीच्या छंदात व्यस्त ठेवायचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये काम करताना फोन एरोप्लेन मोडवर ठेवा. असे केल्याने तुम्ही फालतू कॉल्स आणि मेसेजेसपासून दूर राहाल. आपल्या सगळया सोशल मिडिया अॅपचे नोटिफिकेशन बंद ठेवा. सोबतच फोनमध्ये फालतू अॅप्स ठेवू नका. यामुळे तुम्ही फोनवर अवलंबून राहणार नाही. काल्पनिक जगातले संबंध निभावण्याऐवजी खऱ्या जीवनातल्या मित्रांबरोबर वेळ घालावा. शक्य तितके स्वत:ला फोनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें