* डॉ. यतीश अग्रवाल

प्रश्न : मी ४५ वर्षांची गृहिणी आहे. माझा नवरा कपडयांचा एक मोठा व्यापारी आहे आणि तो माझ्यापेक्षा ४ वर्षांहून मोठे आहेत. आमचा २२ वर्षांचा १ मुलगा आणि १९ वर्षांची १ मुलगी आहे. काही काळापूर्वीच फॅमिली डॉक्टरांच्या सांगण्यावरून आम्ही सर्वांनी आमची युरिन, मल आणि रक्ताच्या चाचण्या करून घेतल्या, इतर सर्व अहवालांमध्ये तर कुठली काही कमतरता नव्हती, परंतु आम्हां सर्वांमध्ये व्हिटॅमिन-डी फारच कमी प्रमाणात मिळालं. आमचे खाणे-पिणे चांगले आहे, घरात हिरव्या भाज्या आणि फळे रोज येतात, प्रत्येकजण ते आनंदाने खातात, परंतु तरीही आमच्या शरीरात व्हिटॅमिन डी कमी आहे. कदाचित असे तर नाही की हा चाचणी अहवालच चुकीचा असावा? निरोगी राहण्यासाठी आपल्याला दररोज किती प्रमाणात व्हिटॅमिन डी आवश्यक असते? त्याची पूर्तता करण्यासाठी आपण कोण-कोणते साधे उपाय करू शकतो? शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो?

उत्तर : गेल्या एका दशकात देशाच्या विविध भागात व्हिटॅमिन डीची पातळी तपासण्यासाठी बरेचसे मोठे अभ्यास झाले आहेत. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की निरोगी दिसणाऱ्या सामान्य लोकांमध्ये केल्या गेलेल्या या विस्तृत अभ्यासात ५० ते ९४ टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची पातळी असमाधानकारक आढळून आली आहे. आपल्या कुटुंबातदेखील ही कमतरता मिळणे यासाठी अनैसर्गिक म्हटले जाऊ शकत नाही.

तपासणी केल्यावर भारतीय लोकांमध्ये व्हिटॅमिन डीच्या या कमतरतेमागील अनेक कारणे आढळली आहेत. बहुतेक भारतीय शाकाहारी आहेत आणि शाकाहारी आहार, ज्यामध्ये भाज्या, कडधान्य (डाळी), अन्न, फळे यांचा समावेश आहे, व्हिटॅमिन डीच्या बाबतीत हे अत्यंत कमकुवत आहे. अशा प्रकारे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डीचा सर्वात मोठा नैसर्गिक स्त्रोत म्हणजे शरीराच्या यंत्रणेद्वारे स्वत:च त्याचे उत्पादन करणे. जेव्हा सूर्याची अतिनील प्रकाश किरणे आपल्या त्वचेला वेधून त्यात असलेल्या ७ डायहायड्रोकोलेस्ट्रॉलवर आपला प्रभाव टाकतात तेव्हा त्याच रासायनिक प्रक्रियेद्वारे आपल्या शरीरात व्हिटॅमिन डी ३ तयार होतो. हे खरं आहे की आपल्या देशावर सूर्य देवाची पूर्ण कृपा आहे, परंतु वाढत्या वायू प्रदूषणामुळे अल्ट्राव्हायोलेट प्रकाश किरणे आपल्या त्वचेपर्यंतचा प्रवास पूर्ण करू शकत नाहीत. दुसरे म्हणजे, आमचा गव्हाळी सावळा रंग, जो त्यामध्ये असलेल्या मेलेनिन रंगद्रव्यामुळे आहे, उरलेल्या अतिनील प्रकाश किरणांना आत प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करतो. तिसरे, आपल्या जीवनशैलीत आपल्याला उघडया उन्हात उठा-बसायलाही वेळ मिळत नाही.

शाकाहारी लोकांसाठी दूध, दही, तूप, लोणी, पनीर आणि खुंबी तर मांसाहारींसाठी अंडयातील पिवळे बलक, मासे आणि डुकराचे मांस हे व्हिटॅमिन डी ३ चे नैसर्गिक स्त्रोत आहेत. परंतु शरीराची व्हिटॅमिन डी ३ ची दैनंदिन गरज पूर्ण करण्यासाठी व्हिटॅमिन डी ३ चे पूरक आहार घेणे नेहमी आवश्यक असते.

शरीरातील व्हिटॅमिन डीची मुख्य उपयोगिता हाडांमध्ये कॅल्शियम साठा करून ठेवण्यात आहे. यामुळे हाडे मजबूत होतात. शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांमध्ये साठलेला कॅल्शियम कमी होतो, ज्यामुळे मुलांमध्ये रिकेट्सची समस्या उद्भवते आणि प्रौढांमध्ये हाडे कमकुवत होतात.

प्रश्न : सामाजिक अंतर, मुखवटा घालणे आणि वेळोवेळी हात धुणे यासारख्या खबरदाऱ्या घेण्याव्यतिरिक्त कोविड १९पासून सुरक्षित राहण्यासाठी आपण काय-काय उपाय करू शकतो? अशा काही युक्त्या आहेत काय ज्याद्वारे आपण आपल्या शरीराची शक्ती वाढवू शकतो? काही होमिओपॅथी डॉक्टर म्हणतात की ऑर्सीनिक आणि कॅफर औषधे घेतल्यास आपण स्वत:मध्ये कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती विकसित करू शकतो. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर असे काही व्हिडिओदेखील चालू आहेत की दिवसभर गरम पाणी, ग्रीन टी, आले, दालचिनी, वेलची आणि तुळसीचा चहा पीत राहिल्याने कोरोना विषाणू जवळ येत नाही. या सर्व गोष्टींमध्ये किती सत्य आहे?

उत्तर : लॉकडाऊन असूनही शक्य तितके शरीर आणि मन स्वस्थ व तंदुरुस्त ठेवण्याच्या सर्व सामान्य उपायांकडे लक्ष द्या. घराच्या छतावर, बाल्कनीमध्ये किंवा खोलीतच उठता-बसतांना साधे व्यायाम करा. रात्री ७-८ तासांची झोप घ्या. निरोगी संतुलित आहार घ्या..

अशी काही कामे करत राहा की मन प्रसन्न आणि आल्हाददायक राहील. घरामध्ये खेळले जाणारे खेळ, टीव्हीवरील विनोदी चित्रपट आणि मालिका, मुले व कुटुंबियांसह मनातील गोष्ट, घरातील वनस्पतींची काळजी घेणे यासारख्या छोटया-छोटया गोष्टींनी मन निरोगी ठेवू शकता. नेहमीच टीव्हीवर कोविड १९शी संबंधित नकारात्मक बातम्या पाहत राहणे अजिबात चांगले नाही.

घरात कोणी धूम्रपान करत असेल तर त्यावर बंदी घाला. जर तुम्हाला अल्कोहोलची आवड असेल तर ते घेऊ नका. हे ते सुपरिचित उपाय आहेत, ज्याद्वारे शरीराची अंतर्गत बायोकेमिस्ट्री निरोगी राहते आणि ज्याचा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अर्थात इम्युनिटीवरदेखील अनुकूल परिणाम होतो.

जिथपर्यंत होमिओपॅथ डॉक्टरांच्या दाव्यांची बाब आहे, तर आतापर्यंत त्यांचे कोणतेही वैज्ञानिक पुष्टीकरण झालेले नाही. म्हणून त्यांच्यापासून काही फायदा होत असेल हे सांगणे कठीण आहे. जिथपर्यंत दिवसभर गरम पाणी, ग्रीन टी, आले, दालचिनी, वेलची आणि तुळसीचा चहा पिण्याचे उपाय आहेत, त्यांच्या बाजूनेही कोणतेही ठोस पुरावे तर उपलब्ध नाहीत, परंतु जर कोणाची इच्छा असेल तर ते अवलंबण्यात काही नुकसानदेखील नाही.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...