* अनु जायस्वाल, फादर डायरेक्टर वैदिक सूत्र वेलनेस सेंटर

वर्षा ऋतूत जर तुमचे खाणेपिणे बरोबर असेल तर तुम्ही डिहायड्रेशन, डायरिया, घाम, थकवा येणे, भूक न लागणे, उलटया, हीट स्ट्रोक, अन्नातून विषबाधा यासारख्या समस्यांपासून दूर राहू शकता.

या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील पदार्थ समाविष्ट करू शकता :

सॅलड

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि लाईकोपिन असल्याने पौष्टिक घटकांचे हे पॉवरहाऊस फळ आणि भाजी दोन्हीमध्ये गणले जाते. एका टोमॅटोत ३५ ते ४० कॅलरी असतात, पण हा दिवसात ४० टक्के व्हिटॅमिन सी आणि २० टक्के विटामिन ए ची गरज पूर्ण करू शकतो.

टोमॅटोचे आणखीसुद्धा अनेक फायदे आहेत. लाईकोपिनसारखे अँटीऑक्सिडंट असल्याने हा अनेक प्रकारच्या कँसरच्या लढयात मदत करतो. संशोधनात असे आढळते की लाईकोपिन एलडीएल अथवा वाईट कोलेस्ट्रॉलपासून सुरक्षित ठेवते, ज्यामुळे हृदयरोगाची शक्यता कमी होते.

काकडी सॅलडच्या स्वरूपात जास्त वापरली जाते. यात पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास सहाय्य करते. अल्सरच्या उपचारातसुद्धा काकडीचे सेवन आरामदायक ठरते. पेपर अथवा काळी मिरी यातसुद्धा बीटा कॅरोटीनसारखे अँटीऑक्सिडंट असते, जे प्रतिकारशक्ती बळकट करते आणि फ्री रॅडिकल्समुळे  होणारे नुकसान कमी करते. पण काही आजार जसे मुतखडयात  टोमॅटोचे सेवन डॉक्टरांना विचारूनच करावे.

फळं

या ऋतूत अनेक लो कॅलरी फळं उपलब्ध असतात, ज्यात फायबर, कॅल्शियम व इतर महत्वाच्या पौष्टिक घटकांचे योग्य प्रमाण उपलब्ध असते. हे शरीरात पाण्याचे प्रमाण कायम ठेवते. या ऋतुतील फळं जसे कलिंगड, लिची, काकडी, टरबूज, संत्री, अंगूर वगैरे याचे सेवन लाभदायक असते. सोडियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी ने परिपूर्ण असलेले कलिंगड शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते.

ज्यूस

चिपचिप्या उन्हाळयात शरीराला पाण्याची जास्त गरज असते, म्हणून पेयपदार्थांचे सेवन जास्त करायला हवे, जेणेकरून शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळेल आणि तुम्हाला कंटाळवाण्या दुपारी उत्साही वाटेल. म्हणून तुमच्या आहाराच्या यादीत ज्यूससुद्धा समाविष्ट करा. लिंबू पाण्यापेक्षा उत्तम अन्य कोणता ज्यूस नाही. संत्री, मोसंबी यासाख्या फळांचे रससुद्धा तुम्ही घेऊ शकता. शहाळयाच्या पाण्यात अनेक आवश्यक खनिजे असतात, जे शरीराला हायड्रेटेड ठेवतात. हे पोटॅशियमचे  उत्तम स्रोत आहे.

भाज्या

आहारात त्या त्या हंगामी भाज्या जसे दुधी भोपळा, भेंडी, कारले, लालभोपळा, टोमॅटो, काकडी आणि मिरची अवश्य समाविष्ट करा. दुधीभोपळयात कॅलरी कमी आणि फायबर आणि पाणी जास्त असते. लो कॅलरी असल्याने ही भाजी खाल्ल्याने लठ्ठपणा वाढण्याचा धोका नसतो. कारल्यात तांबे, लोह आणि पोटॅशियम असते. याचे सेवन केल्यास शरीरातील रक्तशर्करा आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रणात राहते. कारले शरीरात क्षाराचा प्रभाव वाढवते, ज्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.

लाल भोपळयात लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम यासारखे घटक असतात. कच्च्या लाल भोपळयाचा रस शरीरातील विषारी घटकांना बाहेर टाकतो. अॅसिडिटी कमी करण्यातसुद्धा हा फारच लाभदायक असतो.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...