– गरिमा पंकज

दिल्लीत नुकत्याच घडलेल्या एका घटनेकडे लक्ष द्या. शाहदरातील विवेक विहार परिसरात ९ वर्षीय मुलीची भाडेकरू छेड काढायचा. निरागस मुलीला हे समजतच नव्हते की तिच्यासोबत काय घडत आहे. तिला ते आवडत नव्हते, पण काही समजतही नव्हते. एके दिवशी जेव्हा वर्गात टीचरने गुड टच आणि बॅड टचबाबत सविस्तर सांगितले, तेव्हा मुलीच्या ते लक्षात आले आणि तिने तिच्यासोबत जे घडले त्याची माहिती दिली. तिने सांगितले की त्यांच्या घरातील भाडेकरू काका तिला कुठेही हात लावतात, जे तिला आवडत नाही. ही गोष्ट पोलिसांपर्यंत गेली. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी भाडेकरूला अटक केली. अशाप्रकारे एक मोठी दुर्घटना घडण्यापासून टळली.

ईस्ट दिल्लीतील शाळांमध्ये ऑगस्ट, २०१८ पासून जानेवारी, २०१९ पर्यंत बलात्कार आणि विनयभंगाच्या २०९ घटना समोर आल्या. मुलांसोबत लैंगिक शोषणाच्या घटना घरात, बाहेर, शाळेत, शेजारीपाजारी कुठेही घडू शकतात. काही मुले तर अशी असतात जी लैंगिक अत्याचारानंतर लाजेने किंवा मार मिळेल या भीतिने कोणाला काहीही सांगत नाहीत. बहुसंख्य घटनांमध्ये शोषण करणारी व्यक्ती तिच असते जिच्यावर मुलाच्या घरातल्यांचा पूर्ण विश्वास असतो. सुमारे ३० टक्के गुन्हेगार बाहेरचे असतात आणि ६० टक्के कुटुंबातील मित्र, बेबीसीटर, शिक्षक किंवा शेजारी असतात.

भारत सरकारने केलेल्या सर्वेक्षणानुसार मुलांसोबत लैंगिक गैरवर्तनाच्या घटना मुख्यत्वे ५ आणि १२ वर्षांच्या वयात घडतात. त्यावेळी ते आपली वेदना सांगू शकण्याइतके सक्षम नसतात, कारण प्रेम आणि शोषण यात फरक करण्याची समज या वयात नसते. यामुळेच मुलांच्या बाबतीतील बहुतांश गुन्हे समोर येत नाहीत आणि ते सिद्धदेखील होऊ शकत नाहीत. यामुळे गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढत जाते.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...