* सोमा घोष

अदिती सारंगधर ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहे. तिने मागील २० वर्षांमध्ये अनेक मराठी चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अदितीला अभिनयाची आवड नव्हती. मात्र, काळाच्या ओघात तिचे आयुष्य आणि करिअर बदलत गेले आणि शेवटी अभिनयालाच तिने आपले सर्वस्व मानले. तिचे वडील दीपक सारंगधर हे डॉक्टर होते आणि आई शैला सारंगधर बँकेत अधिकारी पदावर काम करत  होत्या.

अदिती मराठी इंडस्ट्रीतली सर्वात प्रसिद्ध आणि जास्त मानधन मिळणारी अभिनेत्री आहे. तिला डेली सोपची राणी म्हटले जाते, कारण तिची कुठलीही मालिका कमीत कमी ४ वर्षे चालते. कसदार अभिनयासाठी ती खूप मेहनत घेते आणि स्वत:ला एक ब्रँड मानते, जो तिला स्वस्तात विकायचा नाही.

अभिनयाव्यतिरिक्त तिला कथ्थक आणि सालसा नृत्यही येते. करिअरच्या या यशस्वी प्रवासात काही मित्र-मैत्रिणींमुळे ती सुहासला भेटली, जो  इंजिनीअर होता. ती त्याच्या प्रेमात पडली आणि तिने लग्न केले. त्यांचा मुलगा अरिन ६ वर्षांचा आहे. सामाजिक विषयावरील तिचे ‘चर्चा तर होणारच’ हे विनोदी अंग असलेले सामाजिक विषयावरील नाटक खूपच प्रसिद्ध आहे. याचे प्रयोग ती मुंबईत करत आहे. यात ती एका सामाजिक कार्यकर्तीच्या भूमिकेत आहे. याशिवाय अदिती मराठी मालिका आणि चित्रपटही करत आहे.

अदितीला ‘गृहशोभिका’ खूप आवडते, कारण हे मासिक महिलांच्या समस्यांना ठामपणे मांडून त्यावर निर्भयपणे आपले विचार मांडते. ती सांगते की, तिची आईही हे मासिक वाचायची.

अभिनयात येण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली?

अभिनयात येण्याचा मी कधीच विचार केला नव्हता, कारण वयाच्या प्रत्येक टप्प्याबर माझे विचार बदलत गेले. लहान असताना वडिलांसोबत हॉटेलमध्ये जेवायला जायचे, तेव्हा वडील वेटरला टीप्स देताना बघून मला वेटरचे काम करायचे होते. थोडी मोठी झाल्यावर आणि विमानाने प्रवास करू लागल्यावर मला एअर होस्टेस म्हणजे हवाई सुंदरीचे काम आवडू लागले आणि मला तेच करायचे होते. महाविद्यालयात गेल्यावर जेव्हा मी मानसशास्त्राचा अभ्यास करू लागले तेव्हा माझी बाल मानसशास्त्रज्ञ बनण्याची इच्छा होती. महाविद्यालयात असताना रंगभूमीशी जोडले गेले आणि नाटकांमध्ये अभिनय करू लागले.

त्यामुळे एकपात्री प्रयोगाशी जोडले गेले. त्यावेळी माझ्या अभिनयाचे लोकांनी खूप कौतुक केले. यातूनच मला अभिनयची गोडी लागली. माझ्या कुटुंबातील कोणीही  अभिनयाच्या क्षेत्रातील नाही. सर्व डॉक्टर्स आणि इंजिनीअर्स आहेत. मी सुट्टीत वैद्यकीय किंवा विज्ञानाच्या सहलीला जायचे.

तुम्हाला संघर्ष किती करावा लागला?

मला कामासाठी कधीच संघर्ष करावा लागला नाही. गेले एक वर्ष मी माझ्या मुलासोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतला होता, पण त्यानंतरही मला चांगले काम मिळाले. प्रत्यक्षात कामासाठी संघर्ष करावा लागला नाही, पण मी ज्या टप्प्यावर येऊन पोहोचले आहे, तो टिकवून ठेवण्यासाठी मला कठोर परिश्रम करावे लागतात. त्यासाठी योग्य माणसे आजूबाजूला असणे आवश्यक असते, जेणेकरून मी योग्य काम निवडू शकेन. माझ्या आयुष्यात मी अनेकदा चुकीचे निर्णयही घेतले आहेत, मात्र ते चुकीचे असूनही मी त्याबद्दल फारसा विचार केला नाही आणि माझे शंभर टक्के देण्याचा प्रयत्न केला. मी पैशांच्या मागे धावत नाही, पण पैसे नसल्यास दु:खी होत नाही, जीवन जसे असेल त्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करते.

कोणत्याही कलाकाराने सातत्याने अभिनय करू नये. यामुळे त्याला स्वत:ला समजून घ्यायलाही वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत एखादा ब्रेक घेण्याची गरज असते, कारण डेली सोपमध्ये काम केल्याने कलाकाराच्या प्रतिभेत नावीन्य शिल्लक राहात नाही. कोणत्याही कलाकाराला डेली सोप नाईलाजाने करावी लागते. कोणाला कर्जाचा हप्ता भरण्यासाठी तर कोणाला अन्य काही कारणामुळे डेली सोप हा उत्तम पर्याय वाटत असतो. मी स्पॅनिश शिकण्याचा प्रयत्न करत आहे. बऱ्यापैकी शिकले आहे, पण पूर्ण करायला मला वेळ मिळत नाही. १० महिन्यांत मी माझी सर्व अर्धवट कामे पूर्ण केली आहेत.

तुम्हाला कौटुंबिक आधार कितपत मिळाला?

माझ्या कुटुंबातील सर्वजण शिक्षण क्षेत्रातील आहेत, त्यामुळे माझी अभिनयाची आवड पाहून त्यांना धक्काच बसला. तरीही जे काही काम करशील त्यात तुझे सर्वोत्तम द्यायला विसरू नकोस, असे त्यांनी मला सांगितले. त्यानंतर मी कामाला सुरुवात केली आणि माझ्या कामाचे कौतुक होताना पाहून त्यांना अभिमान वाटू लागला. अभिनेत्यापेक्षाही एक चांगली व्यक्ती बनणे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे, ज्यामध्ये मला चांगली झोप लागणे आवश्यक आहे, ज्यामुळे मी सुखाने झोपू शकेन. सुरुवातीला माझ्या वडिलांना माझे काम आवडत नव्हते, पण नंतर माझे काम झाल्यावर ते मला न्यायला गाडी घेऊन स्टेशनपर्यंत यायचे. माझ्या कुटुंबीयांनी मला घराबद्दल कधीच कोणताही तणाव येऊ दिला नाही. म्हणूनच मी प्रत्येक कामात दिलेला शब्द पाळून माझे १०० टक्के देऊ शकले. मी इथपर्यंत पोहोचण्याचे सर्व श्रेय माझ्या आई-वडिलांपासून ते माझ्या सासरच्या सर्वांना देते. माझ्या मुलाला माझे काम माहीत आहे, पण त्याने ते खूपच कमी पाहिले आहे. त्याला बाल रंगभूमी खूप आवडते. मी त्याला तिथे घेऊन जाते.

तुमचे आयुष्य बदलून टाकणारी मालिका कोणती?

‘वादळवाट’ ही मालिका, ज्यात मी प्रमुख भूमिकेत होते आणि ती मालिका साडेचार वर्षे चालली. या मालिकेमुळेच मी घराघरात ओळखले जाऊ लागले. यातील माझ्या कामाचे सर्वांनी कौतुक केले, त्यामुळे मला पुढे जाण्यास मदत झाली.

डिजिटल इंडियामुळे आजकाल मालिकांची रेलचेल वाढली आहे, त्याचा जरा अतिरेकच होत नाही का? तूम्ही त्याकडे कशा पाहतात?

इंडिस्ट्रीची प्रगती होत असून ती मोठी होत असल्याचे पाहून बरे वाटते, मात्र प्रगतीसोबतच काही चुकीच्या गोष्टीही येतात. त्यातून सावरत पुढे जाणे गरजेचे असते. हे खरे आहे की, सध्या कलाकारांना काम करण्याची जास्त संधी मिळत आहे.

तुम्ही कामासोबतच कुटुंबाची काळजी कशी घेता?

आम्ही दोघांनीही आमची जबाबदारी समान वाटून घेतली आहे. गरज पडल्यास तो घरात झाडूही मारतो आणि मी भांडी घासते. मी घराबाहेर अभिनेत्री असले तरी सकाळचा नाश्ता आणि चहा बनवून द्यायला मला आवडते. गरज भासल्यास सुहास मुलाला शाळेत पाठवतो आणि नाश्ताही बनवतो. बघायला गेल्यास हे नाते पती-पत्नीसोबतच एका चांगल्या जोडीदाराचेही आहे. हे नाते शेअर मार्केटसारखे असते जे कधी वर तर कधी खाली जाते.

तुमची प्रेमाची संकल्पना किती बदलली आहे?

प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आज पूर्णपणे बदलला आहे. तो वस्तूनिष्ठ झाला आहे. आजकाल लैंगिक आकर्षण जास्त वाढत आहे आणि प्रत्येकाला जास्त पैसे हवे आहेत. त्यामुळेच सध्या दिखाऊपणा वाढला आहे. कुठेही कोणाच्याही परवानगीची गरज भासत नाही. पूर्वी लपूनछपून भेटण्यात जी मजा यायची ती आता उरलेली नाही. ‘हम आपके है कौन’, ‘हम है राही प्यार के’ यासारखे चित्रपट जास्त आवडीचे झाले आहेत. पूर्वी प्रेमात एक ठेहराव असायचा आता तो दिसत नाही. याशिवाय आज लोकांमध्ये बांधिलकी आणि सहिष्णुता कमी होत चालली आहे.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...