मला जे आवडणार ते घालणार

* गरिमा पंकज

अलीकडेच दिल्लीत एका नामवंत रेस्टॉरंटमध्ये एका महिलेला तिने साडी घातली होती म्हणून प्रवेश दिला गेला नव्हता. दिल्लीच्या अंसल प्लाझामधील अक्विला रेस्टॉरंटवर आरोप करत पीडिता अनिता चौधरीने फेसबुकवर एक व्हिडिओ टाकला ज्यात पाहू शकतो की कसं गेट मॅनेजरने त्या महिलेने साडी नेसली आहे म्हणून आतमध्ये जाण्यापासून रोखलं होतं.

अनिता चौधरीने जेव्हा स्टाफला विचारलं की साडी घालून येण्याची मनाई का आहे त्यावर कर्मचाऱ्याने उत्तर दिलं की साडीला स्मार्ट कॅज्युअलमध्ये मोडलं जात नाही आणि इथे फक्त स्मार्ट कॅज्यूअल घालूनच येण्याची परवानगी आहे.

यानंतर या मुद्दयावर खूपच चर्चा झाली. राष्ट्रीय महिला आयोगाने माहिती घेत दिल्ली पोलिसांना चिठ्ठी लिहिली. रेस्टॉरंटमध्ये या महिलेबाबत झालेल्या भेदभावाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संताप वाढला होता. साडी स्मार्ट कॅज्युअल नाही यावर कोणी ह्याला विचित्र गोष्ट म्हणू लागलं, तर कोणी यावर प्रश्न विचारू लागलं की जेव्हा ख्रिश्चन मुस्लीम देशातदेखील साडीवर बॅन नाही आहे तर मग भारतात अशी मानसिकता कशी होऊ शकते. खरंतर साडी आपला पारंपारिक पेहराव आहे.

नंतर रेस्टॉरंटच्या वतीने एक उत्तर देण्यात आलं की त्या महिलेने रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केलं होतं म्हणून हे पाऊल उचलावं लागलं आणि साडीला एक कारण बनवाव लागलं.

कारण कोणतही असो आपण कोणालाही सांगू शकत नाही की या ड्रेसमुळे तुम्हाला येथे प्रवेश दिला जाणार नाही. आपल्याला आपल्या पसंतीनुसार कपडे घालण्याचं स्वातंत्र आहे. खासकरून सार्वजनिक जागी अशाप्रकारे ड्रेसकोडबद्दल बोलणं चुकीचं आहे. मग कुठेही ड्रेस कोड लागू करणं चुकीचं आहे.

स्वत:च्या मर्जीने स्त्रियांनी का सजू नये

२०१७ साली लंडनच्या संसदेने स्त्रियांना त्यांच्या आवडीचा ड्रेस कोड नाही म्हणून काही कंपन्यांवर दंडित केलं होतं. लंडनच्या एका रिसेप्शनिस्टने उंच टाचांच्या सँडल वापरण्यास नकार दिला म्हणून ऑफिसमधून घरी पाठवण्यात आलं होतं. या दबावामुळे ड्रेस कोडला आव्हान देत याचिका दाखल करण्यात आली. लाखो लोकांनी यावर सह्या केल्या होत्या.

कपडे आणि इतर वस्तूंबाबत टीकाटिपणी आणि कोड भारतात अनेकदा दिसून येतो. मग ती मोठी टिकली असो, बॉडी हँगिंग वा ऑफ शोल्डर टॉप असो, फाटलेली जीन्स वा घुंगरू असलेली चप्पल वा आवाज करणाऱ्या हिल्स असो, लोकांच्या भुवया आपोआप उंचावतात. खासकरून मुलींच्या कपडयांतबाबत आणि मेकअपबाबत अनेकदा या गोष्टींवर चर्चा केली जाते. मुलींना घरातून लहानपणापासूनच शिकवलं जातं की हे घाल वा हे घालू नकोस. मोठं झाल्यावर त्यांना पूर्णपणे समाज शिकवू लागतो की त्यांनी काय घालायला हवं आणि काय नाही.

मनपसंत कपडे वापरण्याची सुट का नाही

छोटया शहरातील मुली जीन्स वापरणं तसंच ओढणीशिवाय कुठे बाहेर पडणं यासाठी कितीतरी लढाया लढल्या आणि हरल्या आहेत. २६ वर्षाची प्रियंका शर्मा सांगते, ‘‘त्यावेळी दिल्लीमध्ये ती नवीन होती. मैत्रिणींनी आग्रह केला म्हणून ती इंग्लिश वर्तमानपत्राच्या कार्यालयात सरोजिनीनगरमधून विकत घेतलेला मोठया गळयाचा टॉप घालून पोहोचली. थोडयाच वेळात एका सीनियर सहकारीने मला खोलीत बोलावलं. थोड औपचारिक बोलल्यानंतर मला वरपासून खालपर्यंत पहात ती गंभीरपणे म्हणाली की, काय आज कोणाला काम करू देणार नाहीस का?

‘‘मला काहीच समजलं नाही. ती सहकर्मी अजून थोडी गंभीर झाली. मला समजावत म्हणाली की तुला नाही माहित की या ऑफिसमधील लोकांची विचारसरणी काय आहे. ते तुला चुकीचं समजतील. म्हणून जा आणि जवळच्या मार्केटमधून एक ओढणी विकत घेऊन ये. तोपर्यंत माझा हा स्टॉल ओढून घे.

तिच्या केबिनमधून बाहेर पडल्यावर बराच वेळ मला हे समजलं नाही की केवळ तिचीच विचारसरणी संकुचित आहे का पूर्ण ऑफिसची वा समाजाची?’’

‘‘मी दुपट्टा विकत घेऊन आली परंतु तो घातला नाही. आतून खूप विचित्र आणि राग आला होता. थोडया वेळानंतर मी त्यांच्या केबिनमध्ये ऑफिसमध्ये जशी आली होती तशीच ओढणीविना गेली. यानंतर ती सीनियर स्त्री माझ्याशी कायम नाराज राहू लागली.’’

शरीर, विचार आणि तुमचा लुक

आपण स्वत:ला कशा प्रकारे दाखवता, स्वत:ला किती फीट ठेवता, एखाद्या परिस्थितीबाबत काय विचार करता आणि कुठे जाण्यासाठी कसे तयार होता, हे सर्व तुमच्या मर्जीवर अवलंबून असायला हवं, ना ही लोकांच्या सांगण्यावरून. ज्याप्रकारे तुमची विचारसरणी व बॉडी शेप कोणी बदलू शकत नाही तसंच तुमचा पेहराव व लुकवर कमेंट करण्याची वा दखल देण्याचा अधिकार त्यांना देता कामा नये आणि नाही या आधारावर तुमच्यासोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ शकतो. कपडे वा लुकच्या आधारावरती कोणालाही जज केलं जाऊ शकत नाही. तुमची मोठी टिकली तुमच्या अॅक्टिविस्ट होण्याचा पुरावा होऊ शकत नाहीत वा मिनी स्कर्ट /शोर्टस वा स्लीटेड गाऊन तुमच्या बिंदास होण्याची निशाणी मानली जाऊ शकत नाही.

पूर्वीच्या स्त्रियांचा पेहराव

जुन्या काळात पाहिल्यावर समजतं की पूर्वी स्त्रियांच्या शरीरावर खूपच कमी कपडे असायचे. इसवीसन ३ च्या शतकांपूर्वी मौर्य आणि शुंग राज वंशाच्या काळातील दगडाच्या मूर्ती सांगतात की तेव्हा स्त्री आणि पुरुष आयताकार कपडयाचा एक तुकडा शरीराच्या खालच्या भागात आणि एक वरच्या भागात वापरत असत.

गुप्त राजवंशाच्या दरम्यानदेखील म्हणजे सातव्या आणि आठव्या शतकाच्या दरम्यान स्त्रियांच्या छातीपर्यंत एक पट्टीसारखं वस्त्र असायचं जे त्या पाठीवर बांधत असत. त्या कमरेच्या खालचे कपडेदेखील वापरत असत.

स्त्रीची लज्जा कायमच चेहरा आणि शरीर झाकण्यासाठीच्या कृतीशी संबंधित राहिलेली नाहीए. भारतात हवापाणी याचं सर्वात मोठं कारण राहिलंय. लोकांनी फक्त तेच केलं जे त्यांना योग्य वाटलं. परंतु क्षेत्रीय विविधता खरोखरच खूप आश्चर्यकारक होत्या. दक्षिण भारतात अगदी जुन्या काळातदेखील काही स्त्रिया आपल्या शरीराचा वरचा भाग झाकत नसत. अनेकदा स्त्रिया सरळ साडीला पदर बनवायच्या.

हळूहळू भारतात इतर संस्कृतींशी संपर्क झाला तसा फॅशन आणि विचारांमध्येदेखील बदल झाला. कधी मुगल, कधी ग्रीक, कधी रोमन अरबी आणि कधी चीनी संस्कृतीच्या संपर्कात आल्यामुळे याचा परिणाम झाला.

पंधराव्या शतकात मुसलमान आणि हिंदू स्त्रिया वेगवेगळया प्रकारचे कपडे घालत असत. मुसलमान स्त्रिया अधिक कपडे घालत असत त्या स्वत:ला पूर्णपणे झाकत असत आणि त्यांच्या पेहेरावात अनेक भाग होते. सोळाव्या आणि सतराव्या शतकात या काळात जेव्हा भारतात मुगलांची सत्ता होती तेव्हा याचा परिणाम सरळसरळ दिसून येतो.

पुढे जाऊन सुप्रसिद्ध कवी रवींद्रनाथ टागोरांचे भाऊ सत्येंद्र्रनाथ टागोर यांची पत्नी ज्ञानदानंदिनी देवीने ब्लाउज, बंडी, कुर्ती आणि साडीसारख्या पेहरावाची फॅशन आणली होती. साडीच्या आतमध्ये ब्लाऊज वापरण्याची फॅशनदेखील त्या काळात जोरात होती. भारतात आज स्त्रिया आपल्या पेहरावाबाबत अधिक स्वतंत्र आहेत. तरीदेखील काळानुसार ड्रेस कोड बनवले जातात. कारण स्त्रियांना नियंत्रित करण्याचा आपला तथाकथित अधिकार समाजाला कायम ठेवायचा आहे. त्यांना कायमच त्यांच्या पेहरावाबाबत बंधने घालण्यात आली आहेत.

अश्लील कपडयांवर बंदी

सप्टेंबर २०१८ साली इटलीची ही बातमी सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाली होती की जेवढा छोटा ड्रेस तेवढाच त्यांना अधिक टॅक्स द्यावा लागणार. या बातमीनुसार इटलीमध्ये ज्या स्त्रिया छोटे आणि तंग कपडे घालून लग्न करायच्या त्यांना सभ्यता म्हणजे डिसेन्सी टॅक्स जास्त द्यावा लागायचा.

एक इटालियन पादरीने याची शिफारस केली होती त्याचं म्हणणं होतं की ज्यादेखील स्त्रिया छोटे आणि तंग कपडे घालून लग्न करतात त्यांनी अधिक टॅक्स द्यायला हवा. याव्यतिरिक्त व्हेनिसच्या ओरिगोचे फादर क्रिस्तियानो बॉबीनेदेखील सांगितलं होतं की चर्चमध्ये स्त्रियांच्या छोटया कपडयावर टॅक्स लावण्याचा रिवाज असायला हवा. यामुळे जेवढे छोटे कपडे असतील तेवढा अधिक टॅक्स स्त्रियांना द्यावा लागणार.

अशाप्रकारच्या टॅक्सची मागणी करणाऱ्या लोकांचं म्हणणं होतं की यानंतरदेखील स्त्रियांनी छोटे आणि अश्लील कपडयांवर बंदी आणता येईल. ज्या स्त्रिया चर्चसारख्या जागी अश्लील कपडे वापरतात त्यांच्यावर टॅक्स लावला जाईल, ज्यामुळे त्या हे सर्व काही करू शकणार नाही. धर्मगुरूंच असं म्हणणं होतं की चर्चमध्ये लग्नासाठी येणाऱ्या स्त्रिया आणि महिलांनी अशा प्रसंगी भडक जाऊन वापरण्यावर बंदी यायला पाहिजे.

हे पहिल्यांदाच नाही तर जेव्हा कोणती स्त्री आपल्या पेहरावाबाबत गुन्हेगार म्हणून उभं करण्यात आलं तेव्हा हे संकट आलं आहे. आपला समाज वर्षानुवर्षे स्त्रियाना हे समजावू लागला आहे की त्यांनी काय वापरायला हवं आणि काय नाही. समाजाचे तथाकथित ठेकेदार आणि धर्मगुरू स्त्रियांच्या पेहरावाबाबत टीका करत आपली नैतिक जबाबदारी समजतात. मग स्त्रिया घर चालवत असो वा मोहल्ला, कोणत्या रेस्टॉरंटमध्ये असो वा कोणत्या खेळात सहभागी होत असो अथवा आपल्या कॉलेजमध्ये वा ऑफिसमध्ये असो, आजूबाजूची अनेक जागरूक लोकं तिला समजावून अनुचित टिपण्या करण्यात मागे पुढे राहत नाही.

विरोध का

लोक मोठया राष्ट्रीय व सामाजिक विषयावर भलेही तोंड बंद करुन बसतील, कोणता गुन्हा होत असेल तर मूक बनून बसतील, स्त्रियांच्या सुरक्षेवर कोणीही बोलणार नाही, परंतु जेव्हा स्त्रियांच्या पेहरावबाबत गोष्ट येते तेव्हा सर्वांची तोंडे उघडली जातात. त्यांनी काय वापरायला हवं यावर सगळयांचे एकमत होतं. अलीकडेच नॉर्वेच्या स्त्री वॉलीबॉल टीमने युरोपियन बीच हॅन्ड्बॉल चॅम्पियनशिपमध्ये स्पेन विरुद्ध एका सामन्याच्या दरम्यान बिकनी बॉटमच्या जागी शॉर्ट्स वापरली असता, नॉर्वे फेडरेशनने या खेळाडूंना पाठिंबा दिला आणि म्हटलं की त्या दंड भरण्यासाठीदेखील तयार आहेत. युरोपियन हॅण्डबॉल फेडरेशनने टीमला योग्य कपडे न वापरण्यासाठी १५०० युरो जवळजवळ १,३०,००० रुपयांचा दंड केला होता.

टोकीयो २०२० मध्ये जर्मनीच्या महिला जिमनास्टनेदेखील बोडी कव्हरिंग युनितार्ड वापरला. महिला जिमनास्टचे कपडे पूर्ण शरीर झाकलेले नसतात तर पुरुष जिमनास्ट संपूर्ण शरीर झाकणारे कपडे वापरतात. या भेदभावाविरुद्ध या टीमने मोठया प्लॅटफॉर्मवर विरोध दर्शविला होता.

आसामची एक तरुणी एग्रीकल्चर प्रवेश परीक्षा देण्यासाठी पोहोचली. तिला परीक्षा हॉलमध्ये तिने शॉर्टस घातली होती म्हणून प्रवेश देण्यात आला नव्हता. जेव्हा तिने सांगितलं की अॅडमिट कार्डमध्ये असं काहीच लिहिलं नाही तेव्हा तिला सांगण्यात आलं की ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे. मुलीला पडद्याने पाय झोकून परीक्षा द्यावी लागली.

अलीकडेच एक व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे. बंगळुरूचा हा व्हिडिओ होता ज्यामध्ये रस्त्याने चालणाऱ्या माणसाने शॉर्ट घातलेल्या एका मुलीला म्हटलं की तिने भारतीय कायदे मानायला पाहिजेत आणि योग्य कपडे घालायला हवेत.

काही काळापूर्वी दिल्लीच्या गोल्फ क्लबने एका खास जातीच्या एका स्त्रीला प्रवेश दिला नव्हता. खरं तर स्त्रीने आपला पारंपरिक पेहराव केला होता. गेट कीपर्सने तिच्याशी गैरवर्तणूक केली आणि सांगितलं की ती एखाद्या मोलकरणीसारखी दिसत आहे, म्हणून तिला प्रवेश देता येत नाही.

शरीर झाकण्याचा सल्ला

अभिनेत्री श्रिया सरनला एका कायक्रमाच्या दरम्यान तिच्या ड्रेसबाबत काही लोकांनी विरोध दर्शविला वा म्हणायचं झाल्यास मॉरल पोलिसिंगचा सामना करावा लागला. तिच्या पेहरावाबाबत विरोध करण्यात आला. या कार्यक्रमात तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम करुणानिधी उपस्थित होते. अभिनेत्री विरुद्ध पोलिसात तक्रारदेखील दाखल करण्यात आली आणि त्यांनी हिंदू आणि तमिळ लोकांच्या भावना दुखावल्या म्हणून माफी मागावी लागली.

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीने आपली पत्नी हसिन जहानसोबत एक फोटो टाकला होता. फोटोमध्ये हसीन जहाने स्लीवलेस पेहराव केला होता. यानंतर सोशल मीडियावर लोकांनी तिला हिजाब वापरण्याचा, बुरखा घालण्याचा, शरीर झाकण्याचा सल्ला दिला होता

पेहराव वाईट का

अलीकडे बंगळुरूमधील एका कॅथलिक कॉलेजने प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थिनीला विज्ञानाचे डीनने कॅप्री वापरलेले पाहिलं, तेव्हा तिला कपडे बदलावे लागले. विद्यार्थिनीकडे कोणताच पर्याय नव्हता. तिने बाजारात जाऊन नवीन पॅन्ट विकत आणली, तेव्हा ती कॉलेजमध्ये जाऊ शकली.

मोनाली ठाकूर, नर्गीस फाखरी, दीपिका पादुकोण, करीना कपूर, मलायका अरोरासारख्या कितीतरी अभिनेत्रींना कपडयावरून ट्रोल करण्यात आलं आहे. अभिनेत्यांच्या फोटोवरून कधीच अशा कमेंट्स येत नाही परंतु अभिनेत्रिना मात्र येतात. देशात असे अनेक कॉलेजेस आहेत जिथे स्ट्रीक्त ड्रेसकोडच्या नावाखाली मुलींना गुडघ्याखाली कुर्ता वापरावा लागतो, लेगिंग्स व जीन्सवर बंदी आणलेली आहे. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एखाद्या माणसाला असं का वाटतं की दुसऱ्यांनी अमूक एक कपडे घालण्याची पद्धत शिकवायला हवी. प्रत्येक मनुष्य स्वत:ला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. तो काहीही घालू शकतो. त्याला वा त्याच्या घरच्यांना जर हा पेहराव वाईट वाटत नसेल तर मग दुसऱ्यांना सांगण्याचा हक्क कसा काय मिळाला?

लोक काय म्हणतील

* गरिमा पंकज

रात्री १० वाजता मायाच्या घरासमोर एक मोठी गाडी येऊन थांबली. स्लीव्हलेस टॉप व जीन्स परिधान केलेली माया दणादण तिच्या फ्लॅटच्या पायऱ्यावरून खाली उतरत होती. तेवढयात रुना आंटी समोर धडकली. रुना आंटी तिच्या आईची सर्वात जवळची मैत्रीण आहे. आपली जबाबदारी ओळखून तिने मायाला टोकले, ‘‘मुली, एवढया रात्री तू कुठे जात आहेस? लोक काय म्हणतील याचा विचार करा.’’

मायाने हसतच आंटीचा खांदा थोपटला आणि मग म्हणाली, ‘‘आंटी, मी ऑफिसला जात आहे. माझ्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी, माझी पत्रकाराची जबाबदारी पार पाडण्यासाठी. लोक काय म्हणतील याची मला कधीच चिंता नव्हती. माझं आपलं स्वत:चं आयुष्य आहे, मला स्वत:ची प्राधान्ये आहेत, माझी आपली स्वत:ची जगण्याची पद्धत आहे. याशी लोकांना काय देणे-घेणे? मी कधी लोकांना विचारले आहे का ते कधी आणि काय करीत आहेत म्हणून?’’

रुना आंटीला मायाकडून असे उत्तर अपेक्षित नव्हते. ती शांतपणे उभी राहिली आणि माया जीवनाला नवीन उद्देश देण्याच्या लालसेने पुढे गेली.

३२ वर्षीय माया दिल्लीत एकटीच राहते. रात्रीसुद्धा तिला बऱ्याचदा कामाच्या संदर्भात बाहेर जावं लागतं. रुना आंटी नुकतीच तिच्या सोसायटीत शिफ्ट झाली आहे.

प्रत्येक वेळी हटकणे

बहुतेकदा वडीलधारी मंडळी मायासारख्या मुलींना वेगवेगळया सूचना देतांना दिसतात. उदाहरणार्थ, ‘‘असे कपडे घालून तू कुठे जात आहेस? जरा विचार तर कर की लोक काय म्हणतील? अगं, इतक्या मुलांबरोबर तू एकटी का जात आहेस? तुला समाजाची काही पर्वा नाही का? क्लबमधील मुलांबरोबर नाचण्यात तुला लाज वाटली नाही? लोक काय म्हणतील याचाही विचार केला नाहीस? एवढया रात्री एकटी कुठे जात आहेस? एवढी मोठी झाली आहेस पण एवढाही विचार करत नाहीस की लोक काय म्हणतील.’’

लोकांचे काय घेऊन बसलात, जर मुलगी एकटीच राहत असेल तरी ते चिंतातुर, लिव्ह-इनमध्ये राहत असेल तरी ते कष्टी, मुलं होत नसेल तरी ते चिंतातुर, नोकरी करत असेल तरी त्यांना त्रास, मुलांबरोबर हसून गप्पा मारल्यात तरी त्यांना वैताग, रात्री उशीरा क्लबमध्ये गेलात तरी ते चिंतातुर, एवढेच काय तर नवरा असूनही परक्या पुरुषाकडे डोळे भरून पाहिलेत तरीसुद्धा त्यांना त्रास होतो.

समाजाची काळजी कशाला

लोकांची चिंता करू नका, कारण आपण मनुष्य आहोत, प्राणी नाहीत. आपण सर्वजण आपल्या स्वत:ची वेगळी ओळख आणि विचारसरणी घेऊन जन्माला आलो आहोत. आपण केवळ यासाठी जमावाचे अनुकरण करू शकत नाही, कारण समाजाला असे हवे आहे. आपल्या सर्वांची वेग-वेगळी स्वप्ने आहेत आणि ती पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा आपल्या सर्वांना अधिकार आहे.

आपण सर्वांना आनंदी ठेवू शकत नाही. आपण एखाद्याच्या नजरेत चुकीचे असाल तर याचा अर्थ असा नाही की प्रत्यक्षात तसे आहे. आपण प्रत्येकाच्या नजरेत योग्य असू शकत नाही, आपल्याकडे जास्त वेळ नाही, म्हणून कुणा दुसऱ्याच्या विचारसरणीनुसार जगण्यात आपला वेळ वाया घालवू नका.

पराभव केवळ आपलाच होईल. लक्षात ठेवा की आपल्या विजयाचे श्रेय घेण्यात लोक जरा ही वेळ गमावणार नाहीत परंतु आपल्या पराभवासाठी आपल्याच जबाबदार ठरवले जाईल. म्हणून ही भीती तुमच्या आयुष्यातून आणि तुमच्या मनातून काढून टाका की लोक काय म्हणतील.

प्रत्यक्षात कोणालाही तुमची काळजी नाही. लोकांच्या विचारसरणीनुसार चालूनही आपण जर कुठल्या अडचणीत अडकलात तरीही कोणी आपल्या मदतीसाठी पुढे येणार नाही. तुमची मदद तुम्हा स्वत:लाच करावी लागेल. तेव्हा इतर लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपणास जे काही करायचे आहे तेच करा.

जे लोक केवळ त्यांच्या हृदयाचे ऐकतात तेच यशस्वी होतात. जर आपण इतिहासाची पाने पालटून पाहिली तर आपल्याला आढळेल की कोणताही मनुष्य यशस्वी यासाठी झाला कारण त्याने त्याच्या स्वप्नांचा पाठलाग केला आणि कठोर परिश्रम घेतले.

हस्तक्षेप एक असह्य वेदना

जेव्हा आपण एखादे नवीन कार्य सुरू करणार असतो किंवा लोकांनी ठरवलेल्या निकषांपेक्षा काहीतरी वेगळं करणार असतो तेव्हा आपल्यातील बहुतेक लोक असा विचार करून घाबरायला लागतात की लोक काय म्हणतील. इथे ‘लोक’ या शब्दाचा अर्थ समाज आहे, ज्यास आपण एकत्र मिळून बनवले आहे. आपण समाजात एकत्र राहतो. बऱ्याच प्रकारे एकमेकांवर अवलंबूनही असतो. पण हे अवलंबन सकारात्मक अर्थाने असले पाहिजे. एक असे अवलंबन, जे एखाद्याच्या यशाचा मार्ग मोकळा करू शकेल, एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकेल. जिथे प्रत्येकजण एकमेकांच्या वाईट काळात हातभार लावू शकेल, जिथे ते एकमेकांचे दु:ख वाटून घेऊ शकतील आणि आनंदांना चौपट करु शकतील.

हे बऱ्याच वेळा पाहिले गेले आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या जीवनात यशस्वी होण्याची वेळ अगदी शिखरावर असते तेव्हाच काही संकुचित दृष्टिकोन असलेल्या लोकांच्या हस्तक्षेपाने त्या व्यक्तीची स्वप्ने धुळीस मिळतात. एक शल्य आयुष्यभर आपल्याला सतत बोचत राहते. काळ पुढे जातो, परंतु ते दु:ख त्या व्यक्तीच्या जीवनात घर करून राहते.

हस्तक्षेपाची मर्यादा निश्चित करा

आपल्या जीवनात लोकांच्या हस्तक्षेपासाठी एक मर्यादा निश्चित करा. आयुष्य तुमचं आहे. जर ध्येय तुमचे असेल तर निर्णयदेखील तुमचाच असावा. आपल्या भविष्याची चिंता आपले कुटुंब, मित्र आणि आपल्यापेक्षा जास्त इतर कुणालाही असू शकत नाही.

जरा विचार करा जेव्हा लोकांची पाळी येते तेव्हा ते त्यांच्या आयुष्यात तुमचा हस्तक्षेप स्वीकार करतात? नाही ना? तर मग तुम्ही का?

पुरुषप्रधान समाजाची विचारसरणी

वास्तविक, पुरुषप्रधान समाजातील पुरुष स्त्रीला आपली संपत्ती मानतात. त्यांना स्त्रियांना त्यांच्या नियंत्रणाखाली ठेवून स्वत:चा मार्ग चालवायचा आहे. त्यांना त्यांच्या जीवनाचे निर्माते व्हायचे आहे. ते महिलेच्या ‘लैंगिक शुद्धते’च्या नावाखाली निर्बंधांचे जाळे विणतात, त्यात अडकून महिला तडफडत राहतात. धार्मिक नेते या मानसिकतेचा फायदा घेण्यास चुकत नाहीत. ते वेगवेगळया प्रकारे स्त्री-विरोधी नियमकायदे आणि निर्बंधांची लांबलचक यादी जारी करून त्यांचा स्वार्थ साधत राहतात.

शिकल्या-सवरलेल्या मुलीदेखील अशा लोकांचे ऐकणे सुरू करतील तर एक वेळ असेही येऊ शकते की त्यांचा कोंडमारा होऊ लागेल. स्वातंत्र्याच्या मोकळया हवेत श्वास घेणे तर दूर मुली त्यांची ओळखदेखील गमावतील.

इभ्रतेच्या मक्तेदारांची वास्तविकता

धार्मिक आदेश, महिलांचे रक्षण आणि जातीची इभ्रत या नावांनी ध्वज उंचावणारे आणि गप्पा मारणारे हेच लोक स्त्रियांसाठी सर्वात मोठे संकट आहेत. राजस्थान आणि हरियाणामध्ये मोठया संख्येने गर्भाशयात मुलींना ठार मारणाऱ्या या लोकांसह महिला कशा सुरक्षित राहतील ही विचार करण्यासारखी बाब आहे. त्यांना बाहेरील पुरुषांच्या आधी त्यांच्याच स्वत:च्या घरातील लोकांकडून धोका आहे. कधी त्यांना गर्भाशयातच ठार मारणे, कधी प्रेम केल्याची शिक्षा म्हणून जीव घेणे, कधी फोन वापरल्याबद्दल दंड ठोठावणे, तर कधी गिधाडासारखी बारीक नजर ठेवून आपल्याच घरातील स्त्रियांना बेअब्रु करणे. स्त्रियांच्या श्वासांवर या इभ्रतीच्या मक्तेदारांचा असा पहारा आहे, जो मृत्यूपेक्षा कितीतरी हजार पटीने अधिक भयानक आणि वेदनादायक असतो.

आजही आपला समाज २ प्रकारच्या जीवन मूल्यांनी संचालित होत आहे. एक जीवन मूल्य वर्णद्वेष-पितृसत्तेद्वारे स्थापित आहे. हे पूर्णपणे अन्याय आणि असमानतेवर आधारित आहे. ज्यात उच्च जाती आणि पुरुषांची सत्ता स्थापित केली गेली आहे. महिलांच्या विरोधात आदेश जारी करणाऱ्यांचे सामाजिक जीवन याच मूल्यांमुळे संचालित होत आहे.

दुसरीकडे, संविधानाने प्रदान केलेली जीवन मूल्ये आहेत. या जीवन मूल्यांमध्ये आधुनिकता, स्वातंत्र्य समानता आहे. यांच्यामुळेच आज महिला आगेकूच करीत आहेत.

या नासले-कुजलेल्या, असमानतेवर आधारित सामाजिक मूल्यांना कसे उद्ध्वस्त करायचे आणि समानतेची मूल्ये कशी स्थापित करायची हे देशापुढे सर्वात मोठे आव्हान आहे.

बहुतेकदा मुलींनाच लोकांच्या म्हणण्या-बोलण्याची काळजी घ्यावी लागते. लोकांच्या प्रश्नभरल्या नजरा त्यांच्यावरच येऊन थांबतात. केवळ मुलींच्या आचरणावरून प्रश्न उद्भवतात. पण हे किती काळ? आपण पितृसत्तात्मक संरचना मोडून, समान हक्कांच्या मार्गावर पुढे जाण्याची वेळ आता आली आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें