स्वयंपाकघरात दडलेले आरोग्याचे रहस्य

* मोनिका अग्रवाल

जेवण बनवण्यात वापरले जाणारे मसाले लहानसहान आजारांमध्येसुद्धा उपयोगी पडू शकतात. कसे या जाणून घेऊ.

लिंबू

कच्चे लिंबू व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सचा खजिना मानले जाते. हे व्हिटॅमिन सीचे उत्तम स्रोत आहेत. यात व्हिटॅमिन सीचे भरपूर प्रमाण असल्याने याचे सेवन करणे इन्फेक्शनमध्ये लाभदायक असते. अस्थमा, टॉन्सिलायटिस आणि गळा खराब होणे यावर लिंबाचे सेवन केल्याने आराम मिळतो. लिंबू पाण्यात असलेला लिंबाचा रस, हायड्रोक्लोरिक अॅसिडच्या निर्मितीत वाढ करतो, जो पचनासाठी आवश्यक असतो.

लिंबू पाण्याने रक्तदाब आणि ताण कमी होतो. लिव्हरसाठी टॉनिक म्हणून काम करतो.

डायरीयासारख्या आजारांमध्येसुद्धा परिणामकारक असतो. हे एक ब्लिचिंग एजंट आहे, जे चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळतो आणि डाग नाहीसे होतात.

आले

आल्याला महाऔषधसुद्धा म्हणतात. हे ताजे आणि सुके दोन्ही स्वरूपात वापरले जाते. यात आयर्न, कॅल्शियम, आयोडीन, क्लोरीन आणि व्हिटॅमिन व इतर अनेक पौष्टीक पदार्थ असतात. जर मॉर्निंग सिकनेसने त्रस्त असलेली एखादी गर्भवती महिला याचे सेवन करत असेल तर आल्याचा फायदा नक्कीच होईल.

हे पचनसंस्थेला मजबूत करते. आल्यासोबत ओवा, सैंधवमीठ, लिंबाचा रस एकत्र करून खाल्ल्यास पचनक्रिया चांगली राहते. याच्या सेवनाने पोटात गॅस धरत नाही. आंबट ढेकर येणे बंद होते. सर्दीपडसे, डोकेदुखी आणि मासिकपाळीत हे घेतल्याने फायदा होतो. आले खाल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

ओवा

नियमित ओवा खाल्ल्यास पचनशक्ती चांगली राहते. पोटदुखी, अॅसिडिटी झाल्यास बरे वाटते. हवे असल्यास ओवा ५ मिनीटे चावा आणि मग गरम पाणी प्या. ओवा, सेंधव मीठ, हिंग आणि सुका आवळा किसून समसमान प्रमाणात मधासोबत सकाळ संध्याकाळ चाटण घेतल्यास आंबट ढेकर येणे थांबते. डोके दुखत असेल तर ओवा खाल्ल्याने बरे वाटते.

खाजखुजली होत असलेल्या जागेवर ओवा बारीक करून त्याचा लेप लावा. कान दुखत असेल तर ओव्याच्या तेलाचे काही थेंब कानात टाकल्याने बरे वाटते. ओवा कानाच्या इन्फेक्शनलाही दूर ठेवण्यात सहाय्य्क ठरतो. पाण्यासोबत ओवा सकाळ संध्याकाळ घेतल्याने अस्थमासारखे आजार बरे होतात.

मुलाच्या पोटात जंत झाल्यास अर्धा ग्राम ओवा आणि काळे मीठ मिसळून पाण्यासोबत दिल्यास लाभ होतो. डोक्यात उवा झाल्यास चमचा तुरटी आणि २ चमचे ओवा बारीक करून एक कप चहात मिसळून केसांच्या मुळांना रात्री झोपताना लावा. सकाळी केस धुवा, उवा मरून जातील.

मोठा वेलदोडा

मोठया वेलदोडयाला काळा वेलदोडा, लाल वेलदोडा या नावानेसुद्धा ओळखले जाते.  याला मसाल्याची राणीसुद्धा म्हटले जाते. हा नियमित खाल्ल्यास हृदयाचे आरोग्य चांगले राहते. रक्त गोठण्याच्या क्रियेला कमी करते. श्वासासंबंधित गंभीर आजार असेल तर हे खाल्ल्याने लाभ होतो. याने फक्त युरीनेशनच सुधारत नाही तर किडनीशी संबंधित आजार दूर होतात. याचे सेवन केल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो.

हा तणाव आणि थकवा दूर पळवतो, इतकेच नाही तर यामुळे शरीरातील बॅक्टेरियल, व्हायरल इन्फेक्शनसुद्धा दूर होते. यात पोटॅशियमची मात्रा भरपूर प्रमाणात असते.

तोंडाची जळजळ दुर्लक्ष नको

* डॉ. शांतनु जरादी, डेंन्टज डेंटल केयरचे चिकित्सक

तोंडाची जळजळ फक्त जास्त मसालेदार आहार खाल्ल्यानेच होत नाही, तर याची इतरही अनेक कारणं आहेत.

मग या जाणून घेऊया तोंडाची जळजळ आणि त्याच्यावरील उपायांबद्दल :

दातांची स्वच्छता : दातांच्या स्वच्छतेकडे लक्ष न दिल्यास तोंडाची जळजळ, कोरडेपणा, तोंडातील अल्सर यासांरखी लक्षणं दिसतात. तोंडाच्या स्वच्छतेसाठी नियमित ब्रशिंग फार जरूरी आहे.

पोषणाचा अभाव : शरीरात व्हिटॅमिन, लोह आणि खनिजांची कमतरताही या समस्येचं कारण ठरू शकते. म्हणून असा आहार घ्या, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे घटक असतील.

आजार : मधुमेह आणि थायरॉइडने ग्रस्त असलेल्या लोकांनाही ही समस्या असते.

अतिसंवेदनशीलता : एलर्जीने ग्रस्त असलेल्या लोकांनाही एखाद्या खाद्यपदार्थामुळे या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.

हार्मोनल असंतुलन : हार्मोनल समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांमध्येही याची लक्षणे दिसून येतात. रजोनिवृत्त स्त्रियांमध्येही हार्मोनचं असंतुलन आढळून येतं, त्यामुळे त्यांच्या तोंडात लाळेच्या कमीमुळे जळजळ होण्याची समस्या उद्भवते.

औषधांचं सेवन आणि उपचार : रेडिएशन आणि कीमो थेरेपीसारखे उपचार करणाऱ्यांना या समस्येला सामोरे जावं लागतं. म्हणून कोणतंही औषध घेण्यापूर्वी याविषयी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

व्यसनाची सवय : धूम्रपान आणि व्यसनदेखील तोंडाच्या जळजळीचं कारण ठरतात. विशेष म्हणजे मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये ही समस्या पाहायला मिळते. अशा लोकांना तोंडाच्या जळजळीसह पोट आणि छातीतही जळजळ होण्याची समस्या असते.

तोंडाच्या जळजळीवर उपचार

तोंडाच्या जळजळीकडे दुर्लक्ष करू नका. त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि या गोष्टींकडे लक्ष द्या.

* धुम्रपान करू नका.

* आम्लीय पेय आणि मद्य सेवन करू नका.

* आपल्या आहारात पौष्टिक घटक जसं की डाळी, फायबरयुक्त अन्न, मोसमी फळं इत्यादींचा समावेश करा.

* जास्तीत जास्त पातळ पदार्थांचं सेवन करा. लक्षात ठेवा की पातळ पदार्थ गरजेपेक्षा अधिक गार नसावेत.

* ब्रशिंगची योग्य पद्धत जाणून घ्या.

* आपला डेंचर फिक्स ठेवा.

* मसालेदार आणि जास्त गरम खाद्य पदार्थांचं सेवन करणं टाळा.

* विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस बिन मसालेदार आहाराचं सेवन करा.

* आयुष्यभर जर स्वादिष्ट आणि पौष्टिक खाण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तोंडाच्या आरोग्याशी निगडित या गोष्टींचा आजपासून अवलंब करा.

Diwali Special: दीवाळीत काय खावे आणि काय खाऊ नये

* नीरा कुमार

सणाच्या हंगामात स्वत:ला कसे निरोगी ठेवावे जेणेकरुन वजन वाढू नये आणि जीवनशैलीशी संबंधित कोणताही आजार होणार नसेल. उदाहरणार्थ, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग इ. यासाठी खालील गोष्टी लक्षात घेऊन खाणेपिणे महत्वाचे आहे, तरच तुम्ही निरोगी असाल :

गोडधोडबरोबर तडजोड नाही

* दिवाळीच्या वेळी मिठाईच्या गुणवत्तेवर आपण विश्वास करू नये कारण खवा, तूप आणि इतर पदार्थ कसे वापरले गेले आहेत हे आपल्याला माहिती नसते. मिष्टान्न आकर्षक बनविण्यासाठी मुबलक प्रमाणात फूड कलर वापरला जातो. अशा परिस्थितीत खूप जलद बनणारे मिष्टान्न घरीच बनवण्याचा प्रयत्न करा.

* जर एवढाही वेळ नसेल तर काजूबादाम वगैरे भाजून घ्या. मध आणि चाटमसाला घालून सर्व्ह करावे.

* लाडू, बर्फी, खूप साऱ्या चॉकलेट्सचा सुगंध आणि चवीबद्दल नुसता विचार करूनच तोंडाला पाणी येते. म्हणून ते तयार करण्यासाठी नाचणी, ज्वारी आणि बाजरी निवडा. एकतर यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, दुसरे म्हणजे कमी कॅलरी असते. यामध्ये गोड घालण्यासाठी गुळाचे चुरण, देशी खांडसरी इत्यादींचा वापर योग्य असतो. चवीनुसार थोडे कमीच घालावे.

* साखरेच्या जागी सिंथेटिक स्वीटनर्सचा वापर केला जाऊ शकतो परंतु याचे प्रमाणदेखील नियंत्रणात ठेवा. सिंथेटिक स्वीटनर्स मोठया प्रमाणात सेवन केल्यावर त्याचे दुष्परिणामदेखील होतात.

* दिवाळीत मिठाई, खीर, कस्टर्ड वगैरे बनवण्यासाठी फक्त टोन्ड केलेले दूध वापरा. यामध्ये सोया दुधाचा वापर हा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये, प्रथिने अधिक आढळतात आणि फायबरदेखील असते, परंतु कॅलरी कमी असतात.

* मिठाई वाफेमध्येही शिजवून बनवता येते. जसे बाष्प संदेश, वाफवलेली बर्फी इत्यादी.

* जर तुम्ही खीरपुडी बनवत असाल तर त्यात साखरेऐवजी गोड फळांचा रस किंवा खजूर, खारीक पावडर आणि मंजीर घाला.

शेवटी, आपल्या मिष्टान्नाच्या चवीवर थोडे नियंत्रण ठेवा. मिठाईऐवजी फळे खा, कोशिंबीर खा. घरी येणाऱ्या पाहुण्यांना फळांचा चाट द्या, ग्रीन टी, नारळाचे पाणी प्यायला द्या. या व्यतिरिक्त लिंबू सरबत बनवा. त्यात काही सिया बिज घाला. मिष्टान्नामध्ये थोडे मध घाला. चव आणि आरोग्य दोन्ही अबाधित ठेवेल.

चवीबरोबरच आरोग्यदेखील

* नाश्ता असो, लंच किंवा डिनर असो, कचोरी, पकौडी इत्यादी खोल तळलेल्या गोष्टींपासून अंतरच ठेवा. त्याऐवजी चवदार रोटी किंवा पराठा कमी तेलाने बनवा.

* जर तुम्हाला कोफ्ता खायचा असेल तर नक्की खा, ग्रेव्ही तेल काढण्याचा प्रयत्न करा आणि १-२ कोफ्त्यांमध्येच पूर्ण चव घ्या. घरात कोफ्ते बनवत असाल तर आप्पा पात्रात २ छोटे चमचे तेलात सुमारे ११-१२ कोफ्ते बनवा, ग्रेव्हीमध्येही १-२ छोटे चमचेच तेल वापरा. चव तीच पण पद्धत वेगळी आहे.

* आतिथ्य करण्यासाठी न्याहारीला मुरमुरे, भेळपुरी, भाजलेले सोयाबीन, फळांचा चाट, भाजलेले मखाणे इत्यादी बरेच काही आहे ज्यांना नवीन पद्धतीने केले जाऊ शकते व कौतुक मिळवता येऊ शकते.

* खोल तळलेल्या गोष्टी जसे समोसे, करंज्या इत्यादी भाजलेदेखील जाऊ शकतात. यामुळे तेलाचे प्रमाण कमी लागेल आणि चवदेखील भरपूर असेल.

तेला-तुपाची योग्य निवड योग्य तेल-तूप वापरणे फार महत्वाचे आहे. चांगल्या प्रतीचे मोहरी तेल, राईस ब्रेन ऑइल किंवा गायीच्या तुपाचा वापर करावा. याशिवाय आवश्यक तेवढेच वापरा. आपण एकदा डीप फ्राय केलेल्या तेलामध्ये पुन्हा-पुन्हा तळणे टाळावे.

भरपूर पाणी प्या, मॉर्निंग वॉक करा आणि काही व्यायाम अवश्य करा. जर आपण कोणतेही औषध घेत असाल तर ते वेळेत घ्यावे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें