विवाहाचे सुख तेव्हाच जेव्हा पती-पत्नी असतील स्वतंत्र

* नसीम अंसारी कोचर

रिद्धिमा वरचेवर आजारी पडू लागली होती. मनोजसोबत तिचे लग्न होऊन ५ वर्षे झाली होती, पण सुरुवातीचे एक वर्ष सासरी व्यवस्थित राहिल्यानंतर तिचे हाल होऊ लागले. लग्नापूर्वी रिद्धिमा अनेक कलागुण असलेली एक सुंदर, आनंदी आणि निरोगी मुलगी होती, पण लग्नानंतर ती मनोजच्या कुटुंबात आल्यावर काही दिवसांतच तिला तिथे गुलामीत राहात असल्यासारखे वाटू लागले. तिची सासू खूपच फटकळ आणि रागीट स्वभावाची होती.

तिच्या प्रत्येक कामात सासू चूक दाखवत असे. शब्दशब्दावरून तिला रोखत असे. ती तिला घरातील सर्व कामे करायला लावायची आणि प्रत्येक कामात टोमणे मारायची, जसे तुझ्या आईने तुला हे शिकवले नाही, तुझ्या आईने तुला ते शिकवले नाही, तुझ्या घरात असे घडत असेल, इथे असे चालणार नाही, असे कडवट टोमणे मारून सासू तिचे मन दुखावत असे.

रिद्धिमा खूप स्वादिष्ट जेवण बनवायची, पण सासू आणि नणंदेला ते कधीच आवडले नाही. कधी जास्त मीठ झाले तर कधी जास्त तिखट झाले, असे बोलून सासू तिच्या जेवणात उणिवा शोधत असे. सुरुवातीला सासऱ्यांनी सुनेच्या कामाचे कौतुक केले, पण ते ऐकून पत्नीच्या भुवया उंचावल्यानंतर ते देखील रिद्धिमाच्या कामात चुका शोधू लागले.

आपल्या पत्नीवर अत्याचार होत असल्याचे रिद्धिमाचा पती मनोजला दिसत होते, पण आई-वडील आणि बहिणीसमोर तो गप्प बसत असे. रिद्धिमा स्वत:ला मनोजच्या घरातील बिनपगारी मोलकरणीशिवाय दुसरे काहीच समजत नव्हती. या घरात ती स्वत:च्या इच्छेने काहीही करू शकत नव्हती.

अशी विचारसरणी कशासाठी?

रिद्धिमाने तिची खोली तिच्या आवडीनुसार सजवायला घेतल्यास सासू रागाने सांगायची की, हे घर मी माझ्या कष्टाच्या पैशांतून बांधले आहे. त्यामुळे चुकूनही ते बदलण्याचा प्रयत्न करू नकोस. मी जे काही सजवले आहे ते तसेच राहील.

रिद्धिमाच्या सासूने तिच्या वागण्यातून दाखवून दिले की, घर तिचे आहे आणि तिच्या इच्छेनुसार चालेल. इथे रिद्धिमा किंवा मनोजची आवड महत्त्वाची नाही. ५ वर्षांपासून सतत राग, तणाव आणि नैराश्याने ग्रासलेली रिद्धिमा अखेर रक्तदाबाची रुग्ण बनली. या शहरात तिचे माहेर नाही किंवा मैत्रिणीही नाहीत की, ज्यांच्या मदतीने ती तिच्या तणावातून काहीशी बाहेर पडू शकेल. तिचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. तिच्या डोक्यावरचे केस गळायला लागले आहेत. चेहऱ्यावर पुरळ आला आहे.

साजशृंगाराची हौस तर कधीच संपली आहे आणि आता तर ती अनेकदा एकच कपडे घालते. ती खरोखरंच मोलकरीण दिसायला लागली आहे. काम आणि तणावामुळे तिचा ३ वेळा गर्भपात झाला. त्यातच सासूच्या तोंडचे मूल होत नसल्याचे टोमणेही तिला सहन करावे लागतात. आता तर मनोजलाही तिच्याबद्दल काहीच वाटेनासे झाले आहे. जेव्हा त्याची आई घरात तणाव निर्माण करते तेव्हा त्याचा राग तो रिद्धिमावर काढतो.

परंपरेच्या नावाखाली शोषण

रिद्धिमाची मोठी बहीण कामिनी, जी लग्नानंतर तिच्या पतीसोबत दुसऱ्या शहरात राहाते. सासू, सासरे, नणंद आणि भावजय यांच्यापासून ती दूर असते. ती खूपच सुखी, समृद्ध आणि आनंदी आहे. ती प्रत्येक गोष्टीवर अगदी मनमोकळेपणाने हसते. कामिनी आयुष्याचा पुरेपूर आनंद घेत आहे. ती स्वत:च्या घराची आणि स्वत:च्या इच्छेची मालक आहे.

तिच्या कामात कोणी ढवळाढवळ करत नाही. ती तिच्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार घर सजवते. पतीही तिची आवड आणि कलात्मकता पाहून खूश आहे. ती तिच्या इच्छेनुसार मुलांचे संगोपनही करत आहे. या स्वातंत्र्याचाच परिणाम आहे की, वयाने मोठी असूनही कामिनी रिद्धिमापेक्षा तरुण आणि उत्साही दिसते.

खरं तर महिलांचे आरोग्य, सौंदर्य, कला आणि गुणांच्या विकासासाठी लग्नानंतर पतीसोबत वेगळ्या घरात राहणे चांगले. सासू, सासरे, नणंद, भावजय, दीर, यांनी भरलेल्या कुटुंबात स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते. डोक्यावर सतत एक अदृश्य काठी असते. त्यांच्यावर घरकामाचे मोठे ओझे असते. कामाच्या ओझ्यासोबतच त्यांच्यावर नेहमीच पहारा असतो.

मुलांवर वाईट परिणाम

घरात अनेक सदस्य असल्यास वाढत्या वयाच्या मुलांना अधिक सल्ले दिले जातात. प्रत्येक व्यक्ती त्यांना आपापल्या परीने त्यांना योग्य-अयोग्य सांगत असतो. त्यामुळे मुलं संभ्रमात राहातात. त्यांना त्यांच्या विचारसरणीनुसार योग्य-अयोग्य ठरवता येत नाही. एकल कुटुंबात, फक्त आई-वडीलच असतात. ते मुलावर प्रेम करतात आणि त्यांना समजून घेतात, त्यामुळे मूल निर्णय घेताना गोंधळून जात नाही. योग्य आणि अयोग्य यातील निर्णय घेण्यास मूल सक्षम होते.

पण, जिथे सासू आणि सुनेचे एकमेकांशी नीट पटत नाही तिथे त्या दोघीही मुलांना एकमेकींविरुद्ध भडकावत राहतात. त्या त्यांच्या भांडणात लहान मुलांचा शस्त्र म्हणून वापर करतात.

याचा मुलांच्या कोमल मनावर, त्यांच्या विकासावर वाईट परिणाम होतो. असे दिसून आले आहे की, अशा घरातील मुले अतिशय संकुचित स्वभावाची, चिडचिडी, आक्रमक आणि हट्टी बनतात. त्यांच्यात समजूतदारपणा, बंधुता, प्रेम आणि सौहार्द यांसारख्या चांगल्या मानवी गुणांचा अभाव असतो. ती त्यांच्या वर्गमित्रांशीही नीट वागत नाहीत.

स्वत:चे घर म्हणजे खर्च कमी

पती-पत्नी स्वतंत्रपणे स्वत:च्या घरात राहात असल्यास, खर्च कमी झाल्याने कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूत होते. मनोजचेच उदाहरण घ्या, त्याला कधी मिठाई खावीशी वाटली तर त्याला केवळ स्वत:साठी आणि पत्नीसाठी नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी मिठाई खरेदी करावी लागते.

जर पत्नीसाठी साडी खरेदी करायची असेल तर आई आणि बहिणीसाठीदेखील खरेदी करावी लागते. पती कधीच पत्नीसोबत एकटा उपहारगृहात जेवायला किंवा चित्रपट बघायला जाऊ शकत नाही, कारण त्याला संपूर्ण कुटुंब सोबत घ्यावे लागते. याउलट कामिनी पती आणि दोन मुलांसोबत अनेकदा बाहेरगावी जाते. ते उपहारगृहात जाऊन हवे ते खातात, चित्रपट पाहातात आणि खरेदीसाठीही     जातात.

अशी अनेक घरं आहेत जिथे २ किंवा ३ भावांचे कुटुंब एकत्र राहाते. तिथे रोजच भांडणं होतात. घरी खायला आणायचे असल्यास ते केवळ स्वत:च्या मुलांसाठीच नाही तर भावाच्या मुलांसाठीही आणावे लागते. सर्वांना विचारात घेऊनच खर्च करावा लागतो. कुटुंबातील एकाची परिस्थिती बिकट असेल तर त्याला वाईट वाटू नये म्हणून दुसरा स्वत:वर जास्त खर्च करत नाही.

मनोरंजनाचा अभाव

साधारणपणे सासरी सुनेसाठी मनोरंजनाचे कोणतेही साधन नसते. त्या स्वयंपाकघर आणि शयनकक्षापुरत्याच मर्यादित असतात. घराचा टीव्ही दिवाणखान्यात ठेवला तरी त्या जागेवर सासू-सासरे आणि मुलांचा ताबा असतो. सुनेला तिच्या आवडीचा एखादा कार्यक्रम पाहायचा असेल तर ती पाहू शकत नाही.

पती-पत्नीला कधी एकटे कुठे जायचे असेल तर प्रत्येकाच्या डोळ्यात प्रश्न असतो की कुठे जात आहात? का जात आहात? कधी येणार? त्यामुळे बाहेर जाण्याचा उत्साह मावळतो.

सासरी सून आपल्या मैत्रिणींना घरी बोलावू शकत नाही किंवा त्यांच्यासोबत पार्टी करू शकत नाहीत. याउलट पती-पत्नी वेगळ्या घरात राहात असतील तर दोघेही आपल्या मित्र-मैत्रीणीना घरी बोलावू शकतात, पार्टी देऊ शकतात आणि मनमोकळेपणे त्याचा आनंद घेऊ शकतात.

जागेचा अभाव

विभक्त कुटुंबांमध्ये जागेची कमतरता नसते. एका बेडरूमच्या फ्लॅटमध्येही पुरेशी जागा उपलब्ध असते. कोणतेही बंधन नसते. मोकळ्या वेळेत ती दिवाणखाना किंवा बाल्कनी कुठेही निवांत बसू शकते; याउलट सासू- सासरे असल्यास सून तिच्याच घरात बंदिस्त असते. मुलांनाही त्यांच्या आजी-आजोबांमुळे अडकल्यासारखे वाटते, कारण ती खेळू लागल्यास किंवा त्यांनी मोठ्याने आवाज केल्यास त्यांना ओरडा खावा लागतो.

स्वातंत्र्य आनंद देते

जर पती-पत्नी एकत्र स्वतंत्र घरात राहात असतील तर प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक कामासाठी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य मिळते. कोणावरही बंधने नसतात. वाटेल तिकडे फिरा. वाटेल ते बनवा आणि खा. स्वयंपाक करायचा कंटाळा आल्यास बाहेरून मागवा. हवे ते कपडे घाला.

सासू-सासरे सोबत राहात असल्यास नोकरदार  महिलांना त्यांचा मान राखून फक्त साडी किंवा पंजाबी ड्रेस घालावा लागतो. याउलट वेगळ्या राहाणाऱ्या महिला त्यांची आवड, सोय आणि फॅशननुसार जीन्स, टॉप, स्कर्ट, मिडी घालू शकतात. जर तुम्ही पतीसोबत घरी एकट्या असाल तर तुम्ही नाईट सूट किंवा सेक्सी नाईटीही घालू शकता.

एकमेकांशी बोलणे खूप महत्वाचे आहे

* गृहशोभिका टीम

प्रत्येक वैवाहिक जीवनात एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये स्थिरता येते. जर तुम्ही दोघेही तुमचे विचार शेअर करत नसाल तर त्यामुळे तुमचे नाते हळूहळू कमकुवत होते. जुन्या आठवणी, ह्रदयविकाराच्या भावना आणि हट्टीपणा ही नात्यातील अंतराची सर्वात मोठी कारणे आहेत.

पण असे असूनही,  जर तुम्ही तुमच्या समस्यांबद्दल एकमेकांशी बोलून तुमच्यातील गैरसमज आणि अंतर कमी करू शकता. कसे ते आम्ही तुम्हाला सांगतो.

रागावर नियंत्रण ठेवा : रागाच्या भरात काहीही बोलू नका आणि बोलण्यापूर्वी नेहमी विचार करावा कारण जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला असे काही बोलले की ज्यामुळे त्याला वाईट वाटत असेल तर त्याचा तुमच्या नात्यावरही परिणाम होऊ शकतो. रागाच्या भरात असे काहीही बोलू नये ज्यामुळे तुमच्या पार्टनरला त्रास होईल. त्यामुळे नेहमी रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या जोडीदाराचा दृष्टिकोन समजून घ्या : जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा तुम्ही फक्त तुमच्याबद्दलच विचार करता पण असे केल्याने तुमच्या नात्यात अंतर वाढू शकते. तुमच्या वाईट वागण्याचा तुमच्या जोडीदारावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशावेळी जोडीदाराशी तुमच्या समस्यांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करा आणि एकमेकांचे मुद्दे समजून घ्या जेणेकरून नात्यातील कटुता दूर होईल.

तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला : नेहमी तुमच्या पार्टनरशी तुमच्या समस्यांबद्दल बोलण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तो किंवा ती तुम्हाला तुमच्या समस्येचे निराकरण करण्यात मदत करू शकेल. जर तुम्ही तुमचे मन बोलले नाही तर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कधीही संपर्क साधू शकणार नाही. जर तुमचा पार्टनर कमी बोलणाऱ्यांपैकी असेल तर तुम्हाला त्याला समजून घेणे आवश्यक आहे, असे केल्याने त्याला चांगले वाटेल.

जोडीदाराला वेळ द्या : व्यस्त जीवनशैलीमुळे लोक एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत,  त्यामुळे त्यांच्यातील अंतर वाढते. त्यामुळे त्यांना दीर्घ सुट्टी घेऊन जोडीदाराशी बोलण्याची गरज आहे. असे केल्याने दोघांना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल, ज्यामुळे त्यांचे प्रेम वाढेल.

नकारात्मक गोष्टींऐवजी सकारात्मक गोष्टी बोला : एका संशोधनानुसार असे मानले जाते की सकारात्मक विचारसरणी असलेल्या जोडप्यांमध्ये नकारात्मक विचारसरणी असलेल्या जोडप्यांपेक्षा अधिक मजबूत नातेसंबंध असतात. तुमच्या नात्याबद्दल नेहमी चांगल्या गोष्टींचा विचार करा आणि एकमेकांबद्दल नेहमी सकारात्मक भावना ठेवा. हे तुमचे नाते अधिक घट्ट करेल आणि ते तुटण्यापासून रोखेल. जर तुम्ही सकारात्मक विचार ठेवाल तर तुमच्यात प्रेम टिकून राहील.

जेव्हा मैत्रीण करेल महागड्या मागण्या

* पारुल भटनागर 

कोणत्या वयात मैत्री करावी हे सांगता येत नाही आणि मग त्या क्षणापासून आयुष्य इतके सुंदर होऊन जाते की, आपल्या या मित्रासाठी आपण चंद्र-तारे तोडण्याच्या गप्पा मारू लागतो, कारण विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण वाढते.

या नात्यात तुम्ही एकमेकांना समजून घेता, एकमेकांसोबत चांगले क्षण घालवता, एकमेकांच्या भावनांचा आदर करता. प्रत्येक गोष्ट एकमेकांसोबत शेअर करता, एकमेकांना मदत करता.

पण जेव्हा तुमचा जोडीदार या नात्याच्या आडून हळूहळू तुमच्याकडून महागडया भेटवस्तूंची मागणी करू लागतो तेव्हा तुम्ही थोडे सावध राहणे गरजेचे असते, जेणेकरून ही मैत्री तुमच्या खिशाला जड होणार नाही आणि तुमच्या जोडीदाराचा खरा चेहरा तुमच्या समोर येईल.

चला तर मग, जाणून घेऊया प्रेयसीने मागणी केल्यावर काय करावे आणि काय लक्षात ठेवावे…?

फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्रीदिनी

अंगठीची मागणी

भेटवस्तू मोठी असो किंवा छोटी, तीच चांगली असते जी मागून घेतलेली नसते तर मनापासून दिली जाते. नुकतेच तुम्ही त्याला ब्रँडेड शॉपिंग करून दिले असेल, पण आता जर तो पुन्हा येत्या फ्रेंडशिप डेला तुमच्याकडे अंगठीची मागणी करत असेल तर त्याला सांगा की, यावेळी मी अंगठी तेव्हाच देईन जेव्हा तूसुद्धा या खास दिवशी मला अंगठी देशील आणि ती स्वत:च्या हातांनी माझ्या बोटात घालशील.

त्याने होकार दिला तरच त्याला अंगठी भेट द्या, कारण यात कोणतेही नुकसान नाही, पण जर त्याने स्पष्टपणे नकार दिला तर तुम्हीही लाज न बाळगता नकार द्या, कारण मैत्री एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूंनी असावी लागते.

आयफोनचा हट्ट

तुम्ही दोघांनी खरेदीला जायचे ठरवले असेल आणि ही योजना आखण्याचे संपूर्ण श्रेय तुमच्या मैत्रिणीला जात असेल, कारण तिनेच तुम्हाला खरेदीला जाण्यासाठी भाग पाडले असेल तर थोडे सावध व्हा, कारण खरेदी म्हणजे तुमच्या खिशावर भार पडणे.

मी पैसे आणि कार्ड आणायला विसरले, त्यामुळे आता तू तुझ्या कार्डने पैसे दे, मी नंतर पैसे देईन, असे सांगून तिने तुमच्याकडून आयफोन घेण्याचा आग्रह धरला तर वेळीच हुशारीने वागा. मीही कार्ड आणले नाही, त्यामुळे स्मार्टफोन घेऊन देऊ शकत नाही, असे तिला स्पष्टपणे सांगा. तुम्ही पैसे भरलेत तर समजून जा की, तुमच्या खिशाला अळा बसायला सुरुवात झाली आहे. भलेही तुमचा नकार ऐकल्यावर ती तुमच्यावर थोडीशी नाराज होईल, पण तरीही तिच्या नाराजीकडे फारसे लक्ष देऊ नका, कारण पैशांच्या जोरावर कोणतेही नाते फार काळ टिकू शकत नाही.

सर्व गरजांसाठी तुमच्यावरच अवलंबून

मैत्री  झाल्यापासून प्रत्येक गरज पूर्ण करण्यासाठी ती जर तुमच्यावर अवलंबून असेल तर समजून जा की, तुमच्यासोबत तिने केवळ पैशांसाठी नाते जोडले आहे. जसे की, कधी फोन रिचार्ज, कधी कॅबचे बिल, कधी महागड्या उपहारगृहात जाण्याची हौस, अगदी प्रेमाच्या जोरावर दरमहा तुमच्याकडून खर्चासाठी मोठी रक्कम वसूल करणे.

जर तुमच्या मैत्रिणीची ही सवय झाली असेल तर आधी तिला प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करा. तरीही तिला समजत नसेल तर हे नाते तोडणेच योग्य ठरेल, अन्यथा तुमच्या पैशांची लूट होईल, कारण हा तिचा स्वार्थ असेल प्रेम नसेल.

लक्ष द्या

शोऑफ टाळा : बरीच मुले मैत्रिणीवर रुबाब झाडण्यासाठी कधी तिला स्वत:कडील पैसे दाखवतात तर कधी महागड्या उपहारगृहात घेऊन जातात. त्यामुळे ती प्रियकराला श्रीमंत समजून लुटायला लागते, पण हेच पुढे त्याच्या त्रासाचे कारण ठरते, कारण तिच्या रोजच्या अवास्तव मागण्या पूर्ण करणे शक्य नसते. त्यामुळे सुरुवातीपासूनच नात्यात शोऑफला थारा देऊ नका, जेणेकरून भविष्यात हे नाते ओझे बनणार नाही.

तिलाही संधी द्या : प्रेम खरे आहे की, हा सगळा पैशांचा खेळ आहे, याची परीक्षा घ्यायची असेल तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीलाही खर्च करण्याची संधी द्या. प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन ती पैसे देत असेल तर तिला रोखू नका, कारण यामुळे तिचे खरे रूप तुमच्या समोर येणार नाही. त्यासाठी तुम्ही उपहारगृहात जाऊ शकता. बिल आल्यावर घाईत पर्स आणायला विसरलो, असे सांगून तिच्याकडून बिलाचे पैसे काढू शकता.

मी पैसे दिले तर बिघडते कुठे? असे विचारत तिने आनंदाने पैसे दिले तर समजून जा, तुमचे नाते थोडे तरी खरे आहे. याउलट बिल भरल्यावर ती काहीशी नाराजीने तुमच्याशी बोलली तर समजून जा की, तिला फक्त तुमच्या पैशांवर मजा मारायची आहे.

तुमची कमाई फक्त तुमची आहे : कदाचित तुमचे कुटुंब सधन असेल आणि तुम्हीही चांगली नोकरी करत असाल तर याचा अर्थ असा नाही की, तुमच्या मैत्रिणीने विचार न करता फक्त तुमची कमाई वाया घालवावी. कधी, कुठे आणि किती खर्च करायचा, हे तुम्हीच ठरवायला हवे. चांगला कमावतोस तरीही इतका कंजूषपणा कशाला? असे तुमची मैत्रीण विचारत असेल तर तिला सांगा की, हा कष्टाचा पैसा आहे आणि जेव्हा गरज असते तेव्हाच मी तो खर्च करतो. मी जे कमावले आहे ते उडवून दिले तर माझ्या भविष्याचे काय? असा थेट प्रश्न विचारून स्वत:ची भूमिका मांडा. यामुळे तिच्या लक्षात येईल की, तुम्हाला तिच्यावर पैसे खर्च करायला लावणे तितकेसे सोपे नाही.

गरज समजून घ्या : मैत्रीण म्हटले म्हणजे ती पैसे उकळणारच किंवा प्रत्येकवेळी तुमच्याकडून पैसे उकळण्यासाठीच ती एखादी मागणी करत असेल, असा समज करून घेणे चुकीचे आहे. कधी-कधी गरजेपोटी तिला तुमच्याकडून काहीतरी मागावे लागू शकते. अशावेळी तुम्ही त्याबद्दल तिला लगेच बोलू नका, तर तिचे म्हणणे ऐकून घ्या आणि गरज समजून घ्या. हीदेखील तुमची जबाबदारी आहे.

तुम्हाला वाटत असेल की, तिची मागणी न्याय्य आहे आणि ती तुमच्या खिशाला परवडणारी असेल तर तिला मदत करा, कारण गरजेच्यावेळी तुम्ही तिच्याकडे पाठ फिरवलीत तर मजबूत नात्यासाठी ते योग्य ठरणार नाही.

आजन्म टिकावं नातं

* ओ. डी. सिंह

पतीपत्नी एकमेकांसोबत गोड क्षणांचं सुख तर अनुभवतातच, पण कडवटपणादेखील एखाद्या आव्हानासारखा त्यांना एकमेकांसोबत मैत्रीपूर्ण वातावरणात राहण्याची प्रेरणा देतो. विवाहपद्धतीविना हे जग एक तमाशा बनून राहिलं असतं. मात्र विवाहाने स्त्री पुरुषाच्या संबंधांना समाजात एक स्थायी स्थान दिलं आहे. पाश्चिमात्य देशात आधी ओळख मग प्रेम आणि मग लग्न होत असे, पण आपल्याकडे आधी लग्न आणि मग प्रेम व्हायचं. उत्तर भारतात अजूनही दोन अनोळखी कुटुंबांमध्ये मुलामुलींचं लग्न जुळतं. मात्र अलीकडे होणाऱ्या बुहतांश लग्नांमध्ये मुलंमुली एकमेकांना आधीपासूनच ओळखू लागतात. आपापसांत प्रेम होतं की नाही हे जरूरी नाही, प्रेमविवाहांना प्राधान्यही दिलं जाऊ लागलं आहे.

नातं टिकावं आनंदाने

लग्न कोणाचंही असो, कुठेही असो, एक गोष्ट तर नक्की आहे की मुलामुलीने एकमेकांना ओळखणं फार गरजेचं आहे. कारण आपलं आयुष्य प्रेमाने एकत्र आणि दिर्घ काळ टिकवायचं असतं. आयुष्यात आनंद काही बाहेरून येत नाही. दोघांनी मिळून मिसळून एकमेकांच्या भावनेची कदर करीत सर्व कामं पूर्ण करायची असतात शिवाय हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा ही दोघांची इच्छा असेल. घरातील कोणत्याही कामाची जबाबदारी कोणा एकाची नसते. ही गोष्ट वेगळी आहे की सवलतीसाठी आपण काही कामं वाटून घ्यावीत. काळानुरूप बदल घडू लागला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पती ही गोष्ट समजू लागले आहेत.

भांडणाचं कारण

मतभेदाच्या कारणांवर जर नजर टाकली तर असं दिसून येईल की अनेक प्रकरणांमध्ये एक तर एकमेकांच्या कुटुंबांवरून भांडणं होतात किंवा पती पत्नीच्या आयुष्यात कोणी दुसरी वा दुसरा येतं. लग्नानंतर पत्नीला आडनाव तर पतीचंच लावावं लागतं. मात्र आता काही पत्नी माहरेचं आडनावही रिटेन करतात. अनेक कुटुंबांमध्ये असं पाहायला मिळतं की मुलगा आपल्या आईवडिलांशी मोकळेपणाने आपल्या पत्नीच्या आवडी नावडी विषयी सांगू शकत नाही. उलट प्रत्येकवेळी तो पत्नीलाच गप्प करतो. अशावेळी जर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तरच पुढे काही होऊ शकेल. कोणत्याही परिस्थित आधी पती पत्नीचं नातं विश्वसनीय असायला हवं, तेव्हाच वातावरण चांगलं बनतं आणि मुलावर चांगले संस्कार होतात.

असंही पाहण्यात येतं की आईवडिल जुन्या युगातील लग्नाशी मुलांच्या लग्नाची तुलना करतात, जे की चांगलं नाही. आधी भांडणं होण्याचे प्रसंगच येत नव्हते. पतीला देव समजलं जायचं, त्याने जो निर्णय घेतला तोच पत्नीला मान्य असायचा. पण आता युग बदललं आहे. मुली शिकून सवरून चांगल्या नोकऱ्या करत आहेत आणि भरपूर पैसा कमवत आहेत. पती पत्नीचं नातं रक्ताचं नातं नसूनही आयुष्यात फार महत्त्वाचं ठरतं. मात्र जे लोक या नात्याचं महत्त्व न समजून घेता, याला खेळ समजतात, एकमेकांच्या भावनेला ठेच पोहोचवतात, त्यांच्याइतका महामूर्ख कोणीच नसेल आणि तिथे कुटुंब उध्वस्त होण्याची वेळ येणं तर स्वाभाविकच आहे.

सावत्र नाते निरूपयोगी नसतात

* दीपा पांडे

मनोजच्या मनातला राग दिवसेंदिवस वाढत चालला होता. गेली १० वर्षे त्याने आजोळी घालवले होते. इथे आल्यावर आपल्या वडिलांना सावत्र आईवर प्रेमाचा वर्षाव करताना आणि २ लहान सावत्र भावांचे लाड करतांना पाहणे त्याच्यासाठी खूप कठीण होते. तो १६ वर्षांचा किशोर आहे. मागील काही दिवसांत नानीचे निधन झाल्यानंतर तो बऱ्याच वर्षांनंतर आपल्या घरी परतला आहे.

पण घरात दुसऱ्या स्त्रीचा आणि तिच्या मुलांचा हक्क त्याला सहन होत नव्हता. त्याच्या मामाच्या गावी प्रत्येकजण त्याला सावत्र आईपासून सावध राहावे लागेल असे बजावत असे. बिचारे माताहीन मूल. सावत्र आई ती सावत्रच राहील. या गोष्टींनी त्यांच्या मनात घर केले. परिणामी तो सावत्र आईच्या प्रत्येक गोष्टीचा उलट विचार करत असे, धाकट्या भावांना कारण नसतांना मारहाण व्हायची.

एके दिवशी त्याच्या वडिलांनी याबद्दल त्याला फटकारले असता त्याने वडिलांच्या पलंगावर रॉकेल शिंपडून पेटवून दिले. त्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही, परंतु सर्वजण अवाक् झाले.

४० वर्षीय अविवाहित अलकाने ज्या विधुराशी लग्न केले त्याची पत्नी कर्करोगाने ग्रस्त होऊन ४ मुलांना सोडून देवाघरी गेली. घरात १०, १२ आणि १४ वर्षांच्या मुली व ५ वर्षांच्या मुलाव्यतिरिक्त वृद्ध आई-वडीलही होते.

अलकाकडून सगळयांना खूप अपेक्षा होत्या. पण २ मोठया मुली त्यांच्या सावत्र आईच्या प्रत्येक कामात व्यर्थ टीका टिपण्णी करत असत.

लहान मुलगा तिच्या मांडीत येऊन लपण्याचा क्षण वगळता अलकाला आपण लग्नाला होकार का दिला हे समजत नव्हते.

पूर्वग्रह ठेवू नका

सावत्र आईवर लिहिलेल्या कथांमधली सिंड्रेला किंवा राखीसारखी पात्रे अनेकदा आपल्या बालमनामध्ये अचेतनपणे विद्यमान असतात. काही नातेवाईक किंवा शेजारी त्याला आपले सल्ले देऊन जणू आगीत तेल टाकण्याचे काम करतात.

नवीन नातेसंबंधांचे महत्त्व समजून घ्या

तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या दुसऱ्या लग्नाचे महत्त्व समजून घ्या. या नवीन नातेसंबंधाच्या फायद्यांकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ, नवीन आई आल्याने घराची चोख व्यवस्था, घरातील लहान मुलाचे योग्य संगोपन, घरातील वृद्धांच्या तब्येतीची काळजी घेणे यासारख्या गोष्टी अगदी सहजपणे घडू लागतात. घराची आर्थिक व्यवस्था, सुरक्षा या बाबी दुर्लक्षित करता येणार नाहीत.

ज्येष्ठांचा दृष्टीकोन समजून घ्या

स्वत:ला वडिलांच्या जागी ठेवा आणि त्यांच्यासाठी हे नाते किती महत्त्वाचे आहे याचा विचार करा. उद्या तुम्हीसुद्धा तुमच्या ध्येयापोटी घरापासून दूर जाल किंवा मग याच घरात तुमच्या गृहस्थीत रमून जाल. त्यावेळी आजचा निर्णय योग्य वाटेल.

भावनिक होऊ नका

घरातील तुमच्या आईची वस्तू दुसरी स्त्री वापरताना पाहून किंवा वडिलांना नवीन नातेसंबंध जोडताना पाहून भावूक होऊ नका. असा विचार करा की घरातील नवीन सदस्य त्याचे जुने घर सोडून आणि तुमच्यातील सर्वांची उपस्थिती स्वीकारून स्वत:ला साचेबद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे, मग त्याला देखील कंफर्ट होण्याची संधी द्या.

वर्तमान स्वीकारा

जे समोर आहे तेच सत्य आहे. पालकही त्यांच्या नवीन नात्याला महत्त्व देतील, भूतकाळाला कोण पकडू शकला आहे.

पूर्वी संयुक्त कुटुंबात मोठया संख्येने सदस्य असल्यामुळे विधवा, विधुर किंवा आजीवन कुंवाऱ्या व्यक्ती यांच्या सुखसोयींमध्ये कोणतीही घट होत नव्हती. ते आपले जीवन आरामात जगत असत. त्यांना आर्थिक, सामाजिक किंवा वेळेवर जेवण, आजारपणात सेवेचा लाभ अशा कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळायच्या.

आता जेव्हा विभक्त कुटुंबांमुळे तुमची अपूर्ण गृहस्थी सांभाळणे कठीण होते तेंव्हा व्यक्ती पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेते. अशा वेळी मुलांनीही नातेसंबंधांचे महत्त्व समजून ते मनापासून स्वीकारावे अशी अपेक्षा केली जाते.

दूरवर बसलेले नातेवाईक आपली घरगृहस्थी सोडून कायमचे येऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत मुलांनीही सत्याचा स्वीकार करून आपले भविष्य सुधारण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

भांडणामुळे नात्यात दुरावा येणार नाही

* पारुल भटनागर

पती-पत्नी हे एकमेकांचे जीवनसाथी तसेच एकमेकांचे मित्र असतात. पण दोघेही एकाच छताखाली एकमेकांसोबत राहत असले तरी अनेक गोष्टींमध्ये त्यांचे विचार जुळत नाहीत. कधी त्यांचा स्वभाव वेगळा असतो, कधी त्यांची राहणीमान एकमेकांशी जुळत नाही, त्यामुळे त्यांच्यात भांडणे सुरू होतात तर कधी छोट्या छोट्या गोष्टीवरून हे भांडण इतके वाढते की नाते तुटण्यापर्यंत मजल जाते.

अशा वेळी नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी एकमेकांच्या सवयींकडे दुर्लक्ष करून किंवा त्यांच्यावर चिडून जाण्याऐवजी परस्पर समंजसपणाने आणि प्रेमाने ते अंगिकारण्याची गरज आहे.

नात्यात प्रेम टिकावे म्हणून असे घडते, अन्यथा हा वाद नात्यात दुरावा कधी निर्माण होईल, हे कळत नाही. समायोजन कसे करायचे ते जाणून घेऊया :

बेडवर टॉवेल सोडण्याची सवय

ही सवय कुणालाही चांगली नसली तरी आता तुम्ही काय करू शकता. जर तुमच्या जोडीदाराने अंघोळीनंतर ओला टॉवेल बेडवर सोडला तर भांडण करण्याऐवजी तुम्ही त्यांना प्रेमाने समजून घ्या की माझ्या प्रिये, जर तुम्ही दररोज ओला टॉवेल अंथरुणावर सोडला तर तुम्हाला टिकून राहून बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. टॉवेलमधील ओलावा. त्यामुळे अंथरुणातील ओलावा यामुळे आजारी पडण्याची शक्यता आहे.

त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी ही सवय बदला. असे होऊ शकते की आपले प्रेम असे समजून घेणे कार्य करेल कारण कधीकधी भांडणाऐवजी, प्रेम ही अशी गोष्ट आहे जी प्रियजनांची सर्वात वाईट सवय बदलते. तरीही जोडीदारात सुधारणा होत नसेल तर बेडवरून टॉवेल उचलून योग्य ठिकाणी ठेवा कारण हेच चांगल्या नात्याचे वैशिष्ट्य आहे.

तुम्हाला स्टायलिश कपडे आवडत असतील तर

आजचे युग तरतरीत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला स्टायलिश दिसावे असे वाटते. पण तुमच्या जोडीदाराला तुम्हाला स्टायलिश कपड्यांमध्ये पाहायला आवडेलच असे नाही. तुम्हाला ते सिंपल लूकमध्ये किंवा पारंपारिक पोशाखांमध्ये जास्त आवडते. अशा परिस्थितीत जर तुम्ही त्यांच्याशी रोज स्टायलिश कपडे घालण्यावरून वाद घालत असाल तर आपापसात दुरावा निर्माण होईल.

तुम्ही फक्त त्यांच्या आवडीचे पोशाख न घालता, सोबतच त्यांना प्रेमाने समजून घेण्याचा प्रयत्न केलात, स्टायलिश कपडे घालण्यात काही नुकसान नाही, असा तुमचा प्रणय आकर्षून घेण्याचा प्रयत्न केला तर बरे, पण आज प्रत्येकजण काळासोबत चालत आहे. स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी. जोडीदाराला समजलं तर चांगलं नाहीतर मागे स्टायलिश कपडे घालून हा छंद पूर्ण करू शकता.

पण त्यालाही आपली चूक कळेल आणि एकमेकांशी भांडण होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही त्याला हळूहळू समजून घेण्याचा प्रयत्न करणेही महत्त्वाचे आहे.

नवऱ्याला इंग्रजी चित्रपटांची आवड असते तेव्हा

दोन्ही जोडीदारांच्या सवयी जुळल्या तर यापेक्षा चांगले काय असू शकते. पण तसे केले नाही तर प्रॉब्लेम पुरेसा आहे, पण तरीही एकमेकांच्या सवयी आनंदाने अंगीकारणे आवश्यक आहे. प्रवीण प्रमाणेच इंग्लिश सिनेमे बघण्याची खूप आवड होती, पण त्याची पत्नी दीप्तीला सिरियल्स आणि हिंदी सिनेमे आवडायचे, त्यामुळे दोघेही कधीच टीव्ही बघायला बसले नाहीत आणि त्याचवेळी दोघांमध्ये वाद व्हायचे.

अशा परिस्थितीत प्रवीणने आपल्या पत्नीच्या आवडीचा चित्रपट बसून पाहण्याचे मन कधीच बनवले नाही, पण दीप्तीने विचार केला की हे किती दिवस चालेल, त्यामुळे मलाही इंग्रजी चित्रपटांची आवड निर्माण करावी लागेल. हळू हळू ती प्रवीणसोबत इंग्लिश चित्रपट बघू लागली आणि मग हळू हळू मजा घेऊ लागली. यासोबतच चित्रपटाच्या मस्तीसोबतच दोघेही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊ लागले. सर्व जोडीदारांनी एकमेकांना सारखे समजून घेतल्यास नात्यात गोडवा येण्याबरोबरच परस्पर समंजसपणाही विकसित होतो.

बाहेर फिरायला जायला आवडत नाही

हे शक्य आहे की तुमच्या जोडीदाराला त्याची सुट्टी घरी घालवण्याची सवय आहे आणि तुम्ही त्याच्या अगदी उलट आहात याचा अर्थ तुम्हाला बाहेर जाणे आवडते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या जोडीदाराला कुठेतरी जाण्यासाठी पटवून द्या की मूड आणि मन दोन्ही फ्रेश होण्यासोबतच त्याच दिनक्रमातून बदलही होतो.

अशा परिस्थितीत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्यासाठी स्वतःला बुक करा, पूर्ण तयारी करा. तुमच्या या प्रयत्नामुळे तुमच्या जोडीदारामध्ये रोमिंगचा थोडा छंद निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु प्रयत्न आणि मन वळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.

तरीही तुम्हाला मेहनत करून काही फायदा नाही असे वाटत असेल तर तुम्ही एकटे किंवा मित्रांसोबत बाहेर फिरायला जा कारण तुमच्या जोडीदारावर जबरदस्ती करून काही फायदा नाही. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या जोडीदाराला जबरदस्तीने आउटिंगला घेऊन जाल, पण हे आउटिंग मजेशीर नसून शिक्षेसारखे दिसेल.

बोलण्याची प्रतिक्रिया देण्याची सवय

काही जोडीदारांना अशी सवय असते की ते काही न बोलता लहानसहान गोष्टींवर रागावू लागतात किंवा प्रतिक्रिया देऊ लागतात, त्यामुळे त्यांच्यातील तणाव वाढतो आणि नाते कमकुवत होऊ लागते आणि त्याचा परिणाम हळूहळू नात्यावर पडतो. अशा स्थितीत नात्याचा पाया मजबूत करण्यासाठी पती-पत्नी दोघांपैकी एकाला जोडीदाराची प्रतिक्रिया आल्यावर गप्प राहण्याची सवय लावणे आवश्यक आहे, अन्यथा अनावश्यक वादविवाद नात्याला आठवडा बनवण्याचे काम करतील. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही नेहमी गप्प राहा, पण जेव्हा जोडीदार शांत होईल तेव्हा समजून घ्या की अशा प्रकारे तुमची प्रतिक्रिया तुमच्या व्यक्तिमत्त्वाला बिघडवते तसेच आम्हाला एकमेकांपासून दूर घेऊन जाते, त्यामुळे स्वतःला शांत ठेवायला शिका. तुमच्या या गोष्टींचा तुमच्या जोडीदारावर परिणाम होण्याची शक्यता आहे, अन्यथा तुमचे मौन हा या समस्येवरचा उपाय आहे.

बोलत असताना

टोकाटोकी कोणालाही आवडत नाही. पण जर तुमचा जोडीदार तुम्हाला प्रत्येक लहानसहान गोष्ट सांगतो की तुम्ही हे काम नीट केले नाही, तर तुम्ही हे कसे करू शकता, तुम्हाला माहित नाही, तुम्ही स्वयंपाकघरात काय काम केले ते घाण करण्यासाठी आणि माझ्यासाठी काम फक्त वाढवले. अशा परिस्थितीत जर तुम्ही त्याच्याबद्दलच्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया दिली तर प्रत्येक वेळी प्रकरण भांडणात बदलेल. तुम्ही त्याला प्रेमाने समजून घेतलेले बरे की फक्त व्यत्यय आणूनच सर्व काही समजले पाहिजे असे नाही तर गोष्टीही प्रेमाने सोडवता येतात आणि प्रत्येक वेळी व्यत्यय आणणे कुणालाही वाईट वाटू शकते आणि तुमची व्यत्यय आणण्याची सवय तोडण्याचा प्रयत्न करा. हळूहळू सुधारण्यासाठी.

यावरून असे होऊ शकते की तो खरोखर तुमच्या भावनिक बोलण्याने स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही सुधारला नाही तर तुम्ही त्याच्याशी थोडावेळ कमी बोलू लागता कारण काहीवेळा नात्यात काही अंतर राखून त्याला चूकीची जाणीव करून द्यावी लागते.

घरच्या जेवणासारखे

प्रत्येक व्यक्तीची स्वतःची आवड असते. कुणाला घरात राहायला आवडते, कुणाला बाहेर जायला आवडते, कुणाला घरातच खायला आवडते, तर कुणाला बाहेरच आवडते. अशा परिस्थितीत असे होऊ शकते की तुमच्या जोडीदाराला घरचे जेवण आवडते आणि तुम्हाला बाहेरचे, त्यामुळे एकमेकांशी भांडण्याऐवजी तुम्ही दोघांनी हे मान्य केले पाहिजे की जर आठवड्यातून 6 दिवस घरचे जेवण बनवले जाईल, तर एक दिवस आपण बाहेर जाऊ. अन्न खाणार. त्यामुळे दोघांचे प्रकरणही कायम राहणार असून, यामुळे अनावश्यक भांडणेही टळू शकतात.

जोडीदाराला दाढी ठेवण्याची आवड असावी

आपला जोडीदार देखणा दिसावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण प्रत्येक मुलाला स्वतःला कसे ठेवायला आवडते याची स्वतःची सवय असते. काहींना साध्या कपड्यात राहायला आवडतं, तर काहींना खूप कडक राहायला आवडतं. कुणाला दाढी करायला आवडत असेल तर कुणी अनेक दिवस दाढी न करता करावी. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोज दाढी करण्यास अडथळे आणत राहिलात तर तुम्ही स्वतः नाराज व्हाल आणि तुमचा पार्टनरदेखील तुम्हाला चिडवू लागेल. त्याची ही सवय तुम्ही आनंदाने स्वीकारली तर बरे. पण स्वतःला टिपटॉप ठेवणे थांबवू नका.

 

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें