यशाची पहिली अट

* गृहशोभिका टीम

आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द असेल तर वाट कितीही अवघड असली तरी तुम्ही त्यावरून सहज मार्गक्रमण करू शकता. एखादी तरुणी तेव्हाच यशस्वी होऊ शकते जेव्हा तिला तिच्या क्षमतेबद्दल पूर्ण माहिती असते आणि ती तिच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करते.

उद्योग क्षेत्रात पुरुषांसोबत काम करणे नेहमीच आव्हानात्मक असते. आता अधिकाधिक तरुणी स्वत:चा व्यवसाय सुरू करत आहेत. महिला-पुरुष दोघांचा प्रवास सुरुवातीला समान असतो, त्यासाठी दोघांनाही कुटुंबाची साथ आवश्यक असते. वडील किंवा पत्नी अथवा बहीण-भावंडांचा विरोध असल्यामुळे इच्छा असूनही घरातली मुलगी मात्र ते काम करू शकत नाही.

अशा परिस्थितीत तरुणींनी त्यांना काय करायचे आहे, ते समजून घ्यावे. अशा अनेक महिला आहेत ज्यांना काम करण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु त्यांना दीर्घकाळ काम करावे लागले तर त्यांचे पती किंवा मुले सहकार्य करत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना विचार करावा लागतो की, त्यांच्या आयुष्यात कुटुंब किंवा करिअर यांपैकी नेमके काय महत्त्वाचे आहे.

दुप्पट उत्पन्न

हेच कारण आहे की, आजच्या अनेक तरुणी ज्या चांगले कमावतात त्यांना लग्न करायचे नसते, जबाबदारी घ्यायची नसते. त्या त्यांच्या करिअरसाठी या सुखांचा त्याग करतात, कारण आजच्या जगात त्यांच्यासाठी कुटुंबापेक्षा आर्थिक ताकद जास्त महत्त्वाची असते. यासंदर्भातील निर्णय प्रत्येक तरुणीला स्वत:च घ्यावा लागतो. दुप्पट उत्पन्न त्यांना आयुष्यात भरपूर सुख देऊ शकते, हे त्यांना त्यांच्या पती आणि कुटुंबाला समजावून सांगावे लागते. अनेकदा त्या यात यशस्वी होतात तर अनेकदा त्यांना नोकरी सोडावी लागते.

व्यावसायिक कुटुंबातून जन्मलेल्या आणि व्यावसायिक कुटुंबातच लग्न झालेल्या मुलींना या समस्येला कमी सामोरे जावे लागते, कारण यशासाठी किती कष्ट करावे लागतात हे सासरच्या मंडळींना माहीत असते. त्यामुळेच आई, सासू, बहीण किंवा वहिनी त्यांना पाठिंबा देतात.

असे मिळेल यश

जे स्वत:चा व्यवसाय करत आहेत त्यांनी आताच निवृत्ती स्वीकारू नये. पुढे काम करत राहण्याचे ध्येय नेहमी डोळयासमोर ठेवावे. नवीन पिढी आणि जुनी पिढी यांच्यात समतोल राखणे आवश्यक असते. नवीन पिढी प्रत्येक काम वेगळया पद्धतीने हाती घेते. जुन्या पिढीतील महिलांची नावे माहिती हवीत.

स्वत:ची विचारधारा बदलली पाहिजे, जेणेकरुन बदलांना सामोरे जाता येईल, कारण नवीन पिढीसाठी अनेक गोष्टी बरोबर असतात तर काही गोष्टी जुन्या होऊन जातात. दोन्हींच्या मिश्रणातून मिळणारा परिणाम नेहमीच चांगला असतो.

लक्षात ठेवा की, यश हेच माणसाला आनंदी बनवते. कोणतेही काम करताना ते कसे करायचे आणि त्यातून किती आनंद मिळेल याचा विचार केला तर यश नक्कीच मिळेल. यश एका दिवसात कधीच मिळत नाही.

बदलला दृष्टिकोन

आज तरुणांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आहे. आपल्या देशात महिला अधिकारी पदावर असेल तर तिला खूप सन्मान मिळतो. म्हणूनच तर भारतीय राजकारणात ममता बॅनर्जी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यासारख्या महिला मोठया संख्येने आहेत. आज उद्योगक्षेत्रातही मोठया घराण्यातील महिला आहेत आणि नव्या पिढीतील मुलीही मोठया प्रमाणावर या क्षेत्राकडे वळत आहेत.

सामान्य महिलेप्रमाणे फॅशन, दागिने, खाद्यपदार्थ या सर्वांची आवड ठेवा. तुमचा स्त्रीवाद सोडू नका. संगीत ऐका, पुस्तके वाचा. पती आणि मुलांसोबत वेळ घालवा. सासरची आणि स्वत:च्या आई-वडिलांचीही तितकीच काळजी घ्या. २४ तास काम करत राहाणे, ही यशाची पहिली अट आहे.

अशा बना कुशल आणि यशस्वी

* पुष्पा भाटिया

एकाच वेळेला सगळी कामे करण्याच्या नादात आपण नैराश्याने ग्रस्त होऊ नये यासाठी या गोष्टींचा जीवनात अवश्य जरूर अवलंब करा :

प्रतिक्रिया द्यावी : जे काही आपल्या अवती-भोवती घडतंय, त्यासंबंधी आपली प्रतिक्रिया अवश्य व्यक्त करावी. सगळे काही गुपचूप रोबोटप्रमाणे स्वीकारू नये. बदलाच्या प्रक्रियेमुळे उत्पन्न आपल्या भावनांचा स्वीकार करावा. लक्षात ठेवा, आपल्या भावनांना तुमच्याहून चांगले अन्य कोणी समजू शकणार नाही.

क्षमतेहून अधिक काम करू नका : घर असो की ऑफिस चांगले बनण्याच्या फंदात पडू नका. लक्षात ठेवा जर आपण आपल्या क्षमतेहून अधिक काम केले तर आपल्याला कुठले मेडल तर मिळणार नाहीच. परंतु लोकांच्या अपेक्षा मात्र वाढतील. शिवाय होणाऱ्या चुकांचा परिणामही भोगावा लागेल. आजचा काळ टीम वर्कचा आहे.

पॉझिटिव विचार : चुकांना तुम्ही जबाबदार आहात ही भावना मनातून काढून टाका. अशाचप्रकारे ऑफिसमध्ये एखादा प्रोजेक्ट हातातून निघून गेला असेल तर, ‘‘हे काम मी करूच शकत नाही.’’ किंवा ‘‘मी या कामासाठी योग्यच नाही.’’ असे नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका.

निर्भय बना : अनेकदा आई-वडिलांकडून मिळालेल्या वर्तनाची मुळे एवढया खोलवर रुजलेली असतात की प्रौढ झाल्यावरही त्यांच्यापासून मुक्ती मिळणे अवघड होऊन जाते. काही महिला असमाधानी नात्यांना जीवनभर टिकवून ठेवतात कारण की त्यांना भीती वाटत असत की नाती तोडली तर समाजात त्यांची बदनामी होईल. परंतु सत्य तर हे आहे की आजच्या यंत्र युगात कुणालाही एवढी फुरसत नाही की जो दुसऱ्यांविषयी विचार करेल. सगळे आपापल्या जगात व्यस्त आहेत.

निसर्गाशी नाते जोडा : सकाळी सूर्योदयापूर्वी उठा आणि फिरायला जा. फिरण्यासाठी असे ठिकाण निवडा, जेथे हिरवळ असेल, नदी, तलाव, धबधबा, समुद्र व बगीचा असेल. अशा निसर्गरम्य ठिकाणी फिरल्यामुळे मेंदूला ताण-तणावापासून दिलासा मिळतो.

उपाय शोधा : समस्या कशीही असो, ती सहजतेने हाताळा. घाईगडबडीने समस्या अजून वाढते. धैर्याने प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा. त्या पैलूंचा विचार करावा, ज्यामुळे आपल्या समस्येवर उपाय मिळू शकेल.

दिनक्रम बदलावा : प्रत्येक दिवशी एकच एक काम केल्याने आपण थकला आहात, ऑफिसमध्येही कंटाळा अनुभवताहेत, तर मग काही दिवस बाहेर फिरून यावे किंवा परिवाराबरोबर पिकनिकला जावे. स्पा घ्या, पार्लरला जाऊन.

चांगल्या श्रोता बना : जर आपण दुसऱ्यांच्या बोलण्याशी सहमत नसाल तरीही निर्णय न घेता दुसऱ्यांचे बोलणे ऐका. तो काय म्हणतो ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्याला हे वाटायला हवे की तुम्ही त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत आहात.

जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त राहावे : आरोग्यासंबंधी कुठल्याही समस्येला दुर्लक्ष्य करू नका. आपले रुटीन चेकअप करत राहिल्यास आपण बऱ्याच समस्यांपासून वाचू शकाल.

शेवटी सर्व कामे केली जावू शकतात, परंतु सर्व कामे एकाच वेळेला केली जाऊ शकत नाहीत. स्त्री कुटुंबाची केंद्रही आहे आणि परिघही. तिला आई, पत्नी आणि वर्किंग वुमन बनण्याची गरज आहे, सुपर वुमन बनण्याची नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें