विवाह बंधन प्रेम बंधन

* शैलेंद्र सिंग

जे व्हॅलेंटाइन डेला केवळ प्रेमाच्या अभिव्यक्तीशी जोडतात, त्यांना त्याचा खरा अर्थ कळत नाही. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमासोबतच लग्नाशीही जोडला जातो. रोममधील तिसऱ्या शतकातील सम्राट क्लॉडियसचा त्याच्या कारकिर्दीत असा विश्वास होता की लग्न केल्याने पुरुषांची शक्ती आणि बुद्धिमत्ता कमी होते. म्हणूनच त्याने आपल्या सैनिकांना आणि अधिकाऱ्यांना लग्न न करण्याचे फर्मान काढले. संत व्हॅलेंटाइनने याला विरोध केला आणि सैनिक आणि अधिकाऱ्यांना लग्न करण्याचा आदेश दिला. याचा राग येऊन क्लॉडियसने त्याला १४ फेब्रुवारी २६९ रोजी फाशीची शिक्षा सुनावली. त्यांच्या स्मरणार्थ लोकांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात केली.

व्हॅलेंटाईन डे आणि लग्न यांच्यातील नाते लक्षात घेऊन आता भारतातील तरुणांनीही व्हॅलेंटाइन डे हा विवाह दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे कट्टरतावादी विचारसरणीला चोख प्रत्युत्तर मिळाले आहे.

कट्टरवाद्यांनी व्हॅलेंटाइन डेवर कितीही टीका केली तरी प्रेम करणाऱ्यांसाठी या दिवसाचे महत्त्व कमी होण्याऐवजी वाढतच आहे. 2015 मध्ये होणाऱ्या लग्नांच्या तारखांवर नजर टाकली तर बहुतांश विवाह व्हॅलेंटाईन डेलाच होत आहेत. हा दिवस हॉटेल्स, मॅरेज हॉल, ब्युटी पार्लर आणि मॅरेज गार्डनच्या बुकिंगमध्ये सर्वाधिक व्यस्त असतो. याचे कारण म्हणजे आपण सामान्य वागणुकीत उदारमतवादी राहू लागलो आहोत. अनेक लोक साजरे करत असलेले प्रत्येक सण आपण साजरे करू लागलो आहोत. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की सण हे आता कोणत्याही विशिष्ट धर्माचे गुणधर्म राहिलेले नाहीत. लोकांनी व्हॅलेंटाईन डे, चायनीज नववर्ष, ख्रिसमस, ईद, दिवाळी आदी सण एकत्र साजरे करण्यास सुरुवात केली आहे. या कारणास्तव, सामान्य प्रथा मागे टाकून लोकांनी व्हॅलेंटाईन डेला लग्न करण्यास सुरुवात केली आहे.

विशेष दिवस बनवायचा आहे

रितिका म्हणते, “मला माझ्या लग्नाचा दिवस खास बनवायचा होता. मला वाटले की लग्नाचा दिवस आयुष्यभर स्पेशल बनवायचा असेल तर व्हॅलेंटाईन डेलाच लग्न का करू नये. यामुळे दरवर्षी एक वेगळ्या प्रकारची अनुभूती येत राहील. वैवाहिक जीवनाच्या यशामध्ये प्रेम आणि रोमान्स सर्वात महत्वाची भूमिका बजावतात. व्हॅलेंटाईन डेला लग्न करणे हा नेहमीच एक अनुभव असेल. जेव्हा जेव्हा आपण लग्नाचा वाढदिवस साजरा करतो तेव्हा एक विशेष भावना येत राहते.

आनंदी बाजार

गेल्या काही वर्षांपासून व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेम व्यक्त करण्यासाठी बाजारात विविध प्रकारची उत्पादने येऊ लागली आहेत, जी नातेसंबंधांना रोमँटिक बनविण्याचे काम करतात. हॉटेल्समध्ये राहायला, फिरायला किंवा जेवायला गेलात तर तिथली सजावट वेगळ्या प्रकारची असते. यामुळे रोमान्सची अनुभूती येते. मासिके, वर्तमानपत्रे आणि टीव्हीपासून इतर सर्व ठिकाणी फक्त आणि फक्त प्रेम आणि रोमान्सचे वातावरण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दागिन्यांपासून कपड्यांपर्यंत काहीही खरेदी करायला गेलात तर व्हॅलेंटाईन डेच्या भरपूर ऑफर्स येतात. एकूणच या दिवशी बाजारपेठ आनंदाने भरलेली असते.

लग्नाचा दिवस व्हॅलेंटाईन डे झाला

व्हॅलेंटाईन डे ला लग्नाचा सहावा वाढदिवस साजरा करत असलेले अर्पित आणि पारुल श्रीवास्तव म्हणतात, “व्हॅलेंटाईन डे ला लग्न करून आम्ही प्रेमाचे बंधन लग्नात बांधण्याचे काम केले आहे. या दिवशी लग्नाचा वाढदिवस साजरा करून आम्हाला खूप छान वाटते. प्रेमाची गाठ बांधण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही. या दिवशी, संपूर्ण जग आपल्यासोबत प्रेमाचे हे प्रतीक साजरे करते.” लॅक्मे ब्युटी सलूनच्या संचालिका ऋचा शर्मा म्हणतात, “आम्हाला व्हॅलेंटाईन डेलाच वधूच्या मेकअपसाठी जास्तीत जास्त बुकिंग मिळतात. गेल्या काही वर्षांपासून हा ट्रेंड हळूहळू वाढत आहे. विवाहित जोडप्यांनी व्हॅलेंटाईन डेवर थीम पार्ट्या आयोजित करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे या दिवशी मेकअप करणार्‍यांची संख्या वाढते.

आता समाजात प्रथा मोडत आहेत. लोकांना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगायचे असते. त्यांना त्यांच्या जीवनात कोणत्याही धर्माला किंवा दिखाऊपणाला स्थान द्यायचे नाही.

व्हॅलेंटाईन डे हा पाश्चिमात्य संस्कृतीचा दिवस मानून त्याला ज्या पद्धतीने विरोध केला गेला तो चुकीचा होता. लोकांनी व्हॅलेंटाइन डेला लग्नाचा दिवस बनवून हे सिद्ध केले आहे. या लोकांनीही कट्टरतावादी लोकांना आणि त्यांच्या विचारसरणीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. काळाशी सुसंगत राहणे ही काळाची गरज आहे. अशा दिवसात, ज्या दिवशी संपूर्ण जग आनंद साजरा करते, आपणही त्यात सहभागी व्हायला हवे. धर्माचा दिखाऊपणा आपण यापासून दूर ठेवला पाहिजे जेणेकरून सर्व प्रकारचे लोक एकत्र साजरे करू शकतील.

काही वर्षांपूर्वीपर्यंत या दिवशी मुला-मुलींना रस्त्यावर, उद्याने, सिनेमागृह आणि इतर ठिकाणी एकत्र उभे राहणे अवघड होते. काही धर्मांधांनी या दिवशी शुभेच्छापत्रांची विक्रीही होऊ दिली नाही. शहर व समाज सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस व प्रशासनाला स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था करावी लागली. पण आता समाजाने कट्टरतावादी विचारसरणीला बगल देत व्हॅलेंटाईन डेला लग्नाचा दिवस बनवून सामाजिक मान्यता दिली आहे. लखनऊच्या अनिता मिश्रा याविषयी सांगतात, “अनेक देशांमध्ये आपली विचारसरणी रूढिवादी मानली जाते. आपल्या देशाने ज्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे स्वीकारला आहे, त्यातून एक नवा विचार आला आहे. यावरून आपला देश आणि आपली विचारसरणी परंपरावादी नसल्याचे स्पष्ट होते. आपल्या समाजाने व्हॅलेंटाईन डे हा कौटुंबिक आणि प्रेमदिन म्हणून प्रेमाच्या कक्षेतून बाहेर काढून साजरा करण्याचे मोठे काम केले आहे. यावरून आपण परंपरावादी शक्तींना मागे टाकून विचार करून पुढे जात आहोत हे दिसून येते.

कौटुंबिक दिवस म्हणून नवीन ओळख

समाजशास्त्रज्ञ डॉ. दीपमाला सचान म्हणतात, “लग्न आणि प्रेमाचे नाते एकमेकांना पूरक आहे. अशा परिस्थितीत प्रेमाची व्याख्या करणारा दिवस हा लग्नाचा दिवस ठरवून तरुणाईने केलेली सुरुवात खूप अर्थपूर्ण आहे. समाजही ते स्वीकारत आहे. येत्या काही दिवसांत ते अधिक प्रचलित होईल. त्यामुळे धर्मांधतेच्या नावाखाली व्हॅलेंटाईन डेला विरोध करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळत आहे. समाजात धर्मांधता पसरवणाऱ्यांना कुठेही थारा नसल्याचे लोकांनी सांगितले आहे.

व्हॅलेंटाईन डेला प्रेमाशी जोडून पूर्वी ज्या पद्धतीने प्रचार केला गेला, त्यातून तरुणांमध्ये वेगळा संदेश गेला. मुलींना इम्प्रेस करण्याचा हा प्रकार त्याला समजला. आता त्याला फॅमिली डेच्या रूपाने स्थान मिळाले आहे. व्हॅलेंटाईन डेला लग्न लावून हा दिवस कौटुंबिक दिवस म्हणून ओळखण्याचे काम तरुणांनी केले आहे. त्यामुळे समाजात व्हॅलेंटाइन डेची नवी ओळख निर्माण झाली आहे. याचा विरोध करणाऱ्यांनाही आता हे समजू लागले आहे. त्यामुळेच व्हॅलेंटाइन डेला विरोध करण्याच्या घटना वर्षानुवर्षे कमी होऊ लागल्या आहेत. व्हॅलेंटाईन डेला विरोध करणारे केवळ प्रतिकात्मक निषेधापुरते निषेध करण्यापुरते मर्यादित आहेत.

जीवघेणी ठरतेय अंधश्रद्धा

* पद्मा अग्रवाल

इला पेशाने इंजीनिअर आहे. सकाळी वर्तमानपत्रातील मथळयांवर वरचेवर नजर मारून राशीभविष्य पाहण्यास ती विसरत नाही आणि मग त्यात काय लिहिले आहे त्यावरूनच तिचा मूड तयार होतो किंवा बिघडतो. राशीभविष्यात जर प्रिय व्यक्तिशी तणाव निर्माण होईल, असे असल्यास ती कधी पती तर कधी इतरांवर रागावते. तुमचे ग्रह शुभ परिणाम देणार आहेत, असे लिहिलेले असल्यास दिवसभर आनंदाची बातमी ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहात, घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला त्याच्याशी जोडत असते.

कुहू काळया रंगाचा गाऊन घालून आत्याच्या मुलाच्या लग्नाला गेली होती. सर्वांनी खूपच छान असे म्हणत तिला खुश केले. पण आत्याच्या जावेला तिने परिधान केलेला काळा रंग अजिबात आवडला नाही. ती सर्वांसमोर खोचकपणे बोलली, ‘‘लग्नाला आली आहेस, दुखवटयाला नाही, मग काळा गाऊन का घातलास.’’

कुहूच्या डोळयात पाणी आले. आत्या सर्व सावरून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या जावेच्या डोळयात प्रचंड राग होता.

जीवनावरील संकट

एकविसाव्या शतकात, अंधश्रद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या लोकांसाठी एक आव्हान आहे. अंधश्रद्धेमुळे बुराडी कांडात हसत्याखेळत्या ११ लोकांचे कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले. याआधी महाराष्ट्रातील हसनैन वरेकर कांडात एकाच कुटुंबातील १४ जणांना मृत्यूच्या दाढेत ढकलले होते.

अंधश्रद्धेचे मूळ कारण पुजाऱ्यांचा प्रचार आहे, जो आता इंग्रजीत विज्ञानाच्या सोबतीने भविष्याची भीती दाखवत चांगले वर्तमान मिळवून देण्याचा दावा नेत्यांप्रमाणे करत आहे. उद्या काय होईल, कोणालाच माहिती नसते. आपल्या मनाप्रमाणे घडावे यासाठी लोक कोणीही सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागायला तयार होतात.

अंधश्रद्धा ही अज्ञानाची, भीतिची, निराशेची आणि खेदाची बाब आहे की ज्यामुळे सुशिक्षित लोकही वास्तावाकडे दुर्लक्ष करून अंधश्रद्धेच्या जाळयात अडकतात. अंधश्रद्धेचा प्रसार पुजाऱ्यांपेक्षा त्यांचे भक्तच अधिक करतात.

टीव्ही चॅनेल्स आणि सोशल मिडिया ही दोन्ही अंधश्रद्धेची मुळे मजबूत करण्यात गुंतले आहेत. ते अंधश्रद्धा पसरवण्याचे शक्तिशाली माध्यम बनले आहे.

हा संदेश १० लोकांना फॉरवर्ड करा…मनातली इच्छा पूर्ण होईल, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या साइट्सवर अशा संदेशांचा पूर आला आहे.

कधी गणपतीने दूध पिण्याची, तर कधी रात्री कुणी वेणी कापत असल्याची बातमी, जगात आपल्या देशाची प्रतिमा मलिन करीत आहे. कधी दिवसानुसार कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे याचा आदेश दिला जातो. आपण चंद्रावर पोहोचलो आहोत, परंतु महिला करवा चौथला चंद्र पाहण्यासाठी नटूनथटून दिवसभर उपवास करतात.

काही दिवसांपूर्वी वडिलांचा व्यवसाय चांगला चालावा यासाठी १३ वर्षांच्या मुलीला ६८ दिवस उपवास करायला लावले. व्यवसायाचे तर माहीत नाही, पण यामुळे मुलीला मात्र जीव गमवावा लागला.

कायदेशीर गुन्हा

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणासंदर्भातही आपल्या देशात अंधश्रद्धा आहेत. ग्रहण काळात स्वयंपाक करणे, खाणे, पूजा आदी निषिद्ध मानले जाते. ग्रहणानंतर वाराणसी, हरिद्वार इत्यादी ठिकाणी स्नानासाठी लोकांची गर्दी होते. एलडस हक्सले यांनी अशीच गर्दी बघून सांगितले होते की ‘‘सूर्याला राहूपासून मुक्त करण्यासाठी जितके लोक जमतात, तितक्याच मोठया संख्येने शत्रूच्या तावडीतून भारताला मुक्त करण्यासाठी भारतीय जमू शकत नाहीत.’’

ही टिप्पणी आपल्यासाठी त्रासदायक असली तरी हे सत्य आहे आणि त्याचे कारण पुजाऱ्यांनी प्रचाराची मर्यादा ओलांडणे हे आहे.

मुलाचा जन्म, लग्न असो, गृहप्रवेश किंवा भूमिपूजन, लोक शुभमुहूर्त काढण्यासाठी पुजाऱ्यांकडे धाव घेतात. पुजारी सर्वात आधी आपली सोय पाहून त्यानंतरच शुभमुहूर्त सांगतात. विशेष धातू किंवा रत्नांची अंगठी घालणं, मंतरलेलं ताईत घालणं, जादूटोणा, घर बनविताना काळी हंडी टांगणं अशा अनेक अंधश्रद्धा पूर्वीप्रमाणेच त्यांची पकड घट्ट करीत आहेत.

टीव्ही वाहिन्यांवरील जाहिराती लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करीत आहेत, जसे की गोरे बनविण्याची क्रीम.

अलाहाबाद उच्च न्यायालयानेही आपल्या निकालात असे म्हटले आहे की तंत्रमंत्र, जादूटोणा, ताईत, प्रार्थना आणि धर्मावरील विश्वासाचा अतिरेक कायदेशीर गुन्हा आहे, परंतु कोर्टाचे म्हणणे कोण ऐकतो?

पुजाऱ्यांनी तयार केलेला प्रपंच

अंधश्रद्धा हा देशाच्या विकासात अडथळा ठरत आहे. यामुळे लोक आर्थिक आणि सामाजिक शोषणाला बळी पडत आहेत. हे विज्ञान युग आहे. अशावेळी  टीव्हीवरील वाहिन्यांवर ‘नजर सुरक्षा कवच’, ‘सिद्धमाला’, ‘सिद्ध रिंग’, ‘धनप्राप्ती यंत्र’ आदींचा धंदा अंधश्रद्धेच्या नावाखाली चालविला जात आहे.

जादूटोणा, भूतप्रेत, चेटूक, तंत्रमंत्र हे केवळ दुर्बल मेंदूतून जन्माला येते. प्रत्येक घटनेमागे एक कारण असते.

काही अंधश्रद्धांमागे वैज्ञानिक कारणंही दिली जाऊ लागली आहेत, जी सुशिक्षितांना मूर्खाप्रमाणे वागायला भाग पाडतात. तसे तर हा पूर्वनियोजित व्यवसायाचाच एक भाग आहे.

दरवाजावर लिंबूमिरची टांगा, लिंबातील सायट्रिक अॅसिड कीटकनाशकाचे काम करते, जे कीटकांना आत येण्यापासून रोखते.

कुंडली जुळविणे हा फक्त पुजाऱ्यांनी थाटलेला प्रपंच आहे. मंगळ दोष निवारणाचा उपायही अंधश्रद्धाच आहे. फिल्मी जगतातील शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या रायसारख्या विश्वसुंदरीसह आपला मुलगा अभिषेक बच्चन याचे लग्न लावून देण्यापूर्वी ऐश्वर्याने वडाच्या झाडासोबत फेरे घेणे हे अंधश्रद्धेचेच ज्वलंत उदाहरण आहे.

ही अंधश्रद्धा व्यवसायाचा भाग आहे. जसे पोथी-पुराणात असायचे तसे आता नेट व टीव्हीद्वारे होते. मात्र साधू, पुजाऱ्यांना दान देणे, त्यांचे रक्षण करणे कायम आहे.

धर्माच्या नावाखाली अवैज्ञानिकता

एमबीए पदवीधर असलेली ५० वर्षांची अस्खलित इंग्रजी बोलणारी फरजाना हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून हैदराबादमधील दर्ग्यात राहत आहे.

तिचा ठाम विश्वास आहे की तिचे कुटुंब तिच्यावर काळी जादू करीत आहे. दर्ग्यात राहिल्यामुळे ती या जादूपासून वाचेल.

मल्टी नॅशनल कंपनीत काम करणाऱ्या २८ वर्षीय अंजलीचे एका मुलावर प्रेम होते. पण आईला त्यांचे नाते मान्य नव्हते. त्यासाठी ती तांत्रिकाला शरण गेली.

तांत्रिक प्रत्येक वेळी मनगटावर धागा बांधण्याच्या बदल्यात तिच्या आईकडून ५ हजार रुपये घेत असे. त्याचे म्हणणे होते की तिने आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्न केल्यास भविष्यात तिच्यावर खूप मोठे संकट ओढवेल. या धाग्याच्या प्रभावामुळे ती तिच्या आवडीच्या मुलासोबत लग्न करू शकणार नाही.

काही दिवसांनंतर अंजलीने धागा काढून फेकून दिला व आपल्या आवडीच्या मुलासोबत लग्न केले. आता ती खूप आनंदात आहे.

‘वशीकरण’ वेबसाइट चालविणारे कोणत्याही समस्येचे समाधान करू असा दावा करतात. तेथील तथाकथित ज्योतिषाशी मी फोनवर संपर्क साधला, तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही आधी आमच्या खात्यात पैसे जमा करा, त्यानंतर इ-मेलद्वारे समस्या सांगून तुम्ही अपॉइंटमेंट घेऊ शकता.’’

मी प्रेसमध्ये काम करते, असे सांगताच त्यांनी लगेच फोन कट केला.

प्रशासनातील लोकच धर्माच्या नावाखाली अवैज्ञानिक धोरणांत गुंतले आहेत, त्यामुळे समाजातील परिवर्तनाची प्रक्रिया मंदावणार, हे निश्चित आहे.

छळ व हत्या

बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये आजही ‘चेटकीण’ या  नावाखाली महिलांचा छळ व हत्या केल्याच्या बातम्या येतच असतात.

रायपूरचे डॉ. दिनेश मिश्र पेशाने नेत्र विशेषज्ज्ञ आहेत. गावकऱ्यांशी संपर्क साधल्यामुळे त्यांच्या लक्षात आले की छत्तीसगडमधील काही लोक ज्यांना ओझा असे म्हटले जाते, ते भोळयाभाबडया गावकऱ्यांना आपल्या शब्दांच्या जाळयात अडकवून त्यांच्याकडून पैसे उकळतात. त्यांना फसवितात. त्यांनी सांगितलेकी त्यांच्याकडे सतत तक्रार यायची की गावात एखाद्या महिलेला ‘चेटकीण’ ठरवून तिला छळले जाते. सोबतच तिचे गावातील अन्नपाणी बंद करून तिला समाज आणि गावाबाहेर काढले जाते. यामुळे गावात अनेकदा तणावाचे वातावरण निर्माण होते.

डॉ. मिश्र यांचे प्रयत्न आणि शिफारशींमुळे झाडणे, जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवून एखाद्याला वाळीत टाकणे याला अपराध ठरविण्यात आले.

डॉ. दिनेश मिश्र अंधश्रद्धेविरोधात ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’द्वारे गावागावांत जाऊन लोकांमध्ये जनजागृतीचे महत्त्वाचे काम करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत सुमारे १,३५० सभा घेतल्या आहेत.

त्यांच्याच अथक परिश्रमांमुळे २००५ मध्ये ‘छत्तीसगड जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ तयार करण्यात आला. त्याअंतर्गत अशा प्रकरणांमध्ये ३ वर्षांची शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.

२००७ मध्ये त्यांच्या सामाजिक योगदानासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

अंधश्रद्धेरूपी व्यवसायाची भूमी ही राजकीय पाठिब्यांच्या खतामुळे भरभराटीस येते. या दोघांच्या हातमिळवणीमुळे मिळणारा नफा राजकारणी आणि प्रसारमाध्यमे आपापल्या स्वार्थासाठी स्वत:ला हवा तसा वापरतात.

‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चे संस्थापक नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर हा प्रश्न गंभीर झाला आहे की सरकार अंधश्रद्धेविरूद्ध कठोर कायदे का करीत नाही?

विज्ञानाला देवाप्रमाणे सादर करणारे अमेरिका, ब्रिटन हे युरोपीय देश असोत, जादू, तंत्रमंत्राला कुप्रथा म्हणविणारे अरब देश असोत अथवा आपल्याच देशात जादूटोणा, चमत्कार किंवा मनातली इच्छा पूर्ण करणारे असोत, प्रत्येक ठिकाणी अशा लोकांची मोठी जमातच पाहायला मिळते.

ती कॅन्सरसारख्या आजारांना बरे करण्यासोबतच लग्न, प्रेम, व्यवसायात भरभराट, एखाद्याला वश करणे, शत्रूचा नाश करणे इत्यादींसाठी त्यांचे नेटवर्क देशातील प्रत्येक राज्यात, शहर आणि खेडयात चालवत आहे. सोबतच आता हा व्यवसाय ऑनलाइनही करीत आहेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें