गृहशोभिकेचा सल्ला

प्रश्न. मी माझ्या ४ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याची घडी नीट बसवू शकले नाही. माझ्या अडेलतट्टू स्वभावामुळे गोष्टी या थराला गेल्या की माझा घटस्फोट झाला. पतीपासून वेगळे झाल्यावर मला ही जाणीव झाली की मी आयुष्यात काय गमावले आहे. मला माझ्या चुकांचा आणि वागण्याचा खूप पश्चात्ताप होतोय. मी अनेकदा माझ्या पतीची माफी मागितली आहे. त्यांना म्हटले की मी दोषी आहे व माझ्या वागण्याची मला लाज वाटते. त्यांनी मला माफ करावे. पण ते म्हणतात की त्यांना माझ्याशी काहीही देणंघेणं नाही. त्यांना माझ्याशी बोलायचंही नाहीए. मी काय करू?

उत्तर. व्यक्तिगत परामर्श मराठी व्यक्तिगत सुलझन ऑनलाइन व्यक्तिगत सुलझन  लाइफस्टाइल आर्टिकल नए ज़माने की महिलाओं. विवाहित आयुष्यात तडजोड करण्याऐवजी तुम्ही संबंध तोडण्याचा निर्णय घेतलात. घटस्फोट हा अडचणींवरील उपाय नाही. घटस्फोट घेतल्यानंतर तुम्हाला पश्चात्ताप होत आहे. पण आता त्याने काहीच साध्य होणार नाहीए. एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुम्ही शांत डोक्याने विचार करायला पाहिजे होता. त्यामुळे तुम्हाला आता अपराधी वाटले नसते. पण आता जेव्हा तुम्ही घटस्फोट घेतलाच आहे तेव्हा पतीसमोर जाऊन क्षमा मागितल्याने किंवा रडण्याने काहीच होणार नाही.

प्रश्न. मी २० वर्षांची तरूणी आहे. मागच्याच वर्षी माझ्या वडिलांचं निधन झालं आहे. आता माझ्या आईला लवकरात लवकर माझे लग्न लावून द्यायचं आहे. तिचं म्हणणं आहे की मुलीचं लग्न शक्य तितक्या लवकर व्हावं. तिने दुबई स्थित एका मुलाशी माझ्या लग्नाबद्दल बोलणी केली आहे. हे माहीत असूनही की माझं एका मुलावर प्रेम आहे. मुलगा चांगला कमावता आहे आणि लग्नाच्या बाबतीतही तो पूर्णपणे गंभीर आहे. पण तो दुसऱ्या जातीचा आहे म्हणून घरातले या स्थळाला नाही म्हणत आहेत. असं काय करू की त्यांनी माझ्यावर लग्नासाठी जबरदस्ती करू नये.

उत्तर. फक्त मुलगा वेगळ्या जातीचा असल्यामुळे जर कुटुंबीय तुमच्या व तुमच्या प्रियकराच्या लग्नाला आक्षेप घेत असतील तर हे चुकीचं आहे. जर मुलामध्ये काही दोष नाही व तुम्ही त्याच्यासोबत आनंदी राहणार असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना समजावण्याचा प्रयत्न करा. आंतरजातीय विवाह तर सर्रास होतात हल्ली व समाजही त्यांना विरोध करत नाही.

प्रश्न. मी २६ वर्षांची विवाहित स्त्री आहे व ३ वर्षांच्या मुलाची आईपण आहे. लग्नाआधी मी नोकरी करत होते. पण लग्नानंतर वेगळ्या शहरात राहावे लागले, म्हणून नोकरी सोडावी लागली. आता मला असे वाटते की मी पुन्हा नोकरी करावी. माझ्या पतीला याबाबतीत सांगितलं. त्यांनी नकार दिला. कारण इथे आम्ही एकटे राहतो. त्यामुळे घरात कोणी अशी मोठी व्यक्ती नाहीए जी मूल सांभाळू शकेल व मुलाला पाळणाघरात ठेवण्याच्या ते पूर्ण विरोधात आहेत. याशिवाय त्यांचे असेही म्हणणे आहे की जर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम असू तर मला नोकरी करायची गरजच काय? मी कसं समजावू की आर्थिक बाबीसाठी नाही तर मला इच्छा आहे म्हणून नोकरी करायची आहे. जर आता २-४ वर्षं मी अशीच वाया घालवली तर माझे करिअर संपूनच जाईल. मी काय करू सांगा?

उत्तर. लग्नानंतर कौटुंबिक कारणामुळे मुलांच्या संगोपनासाठी बहुतांशी महिला नोकरी सोडतात आणि याचा त्यांना काहीच खेद नसतो. कारण गृहिणी असणं व मुलांचे संगोपन करणं हीच खरंतर पूर्णवेळ नोकरी आहे. दोन्हींचा एकत्र ताळमेळ बसवणं व खासकरून तेव्हा जेव्हा मुलांना सांभाळण्यासाठी घरात कोणी व्यक्ती नसेल तेव्हा तर हे खूपच अवघड असतं. पाळणाघरात मुलांना सोडण्याचा विषय असेल तर हल्ली एकतर चांगली पाळणाघरं मिळत नाहीत आणि मिळाली तरी तिथे मुलांची तितकीशी काळजी घेतली जात नाही, जितकी त्यांची आई घेते. जर तुम्हाला कुठलीही आर्थिक अडचण नसेल तर तुम्ही नोकरीचा हट्ट करायला नको. घरात अतिरिक्त वेळात तुम्ही एखादी आवड जोपासा किंवा शिकवण्या वगैरे करू शकता.

प्रश्न. माझ्या कुटुंबातील एका समस्येने मी त्रस्त आहे. माझ्या बहिणीच्या लग्नाला ६ महिने झाले असून तेव्हापासून माझे मेव्हणे बेरोजगार आहेत. त्यांना एक नोकरी मिळाली होती, पण दोनच महिन्यांत त्यांनी ती नोकरी सोडली कारण त्यांना त्यांच्या बॉसचे वागणे पटत नव्हते. त्यांचे म्हणणे असे की जिथं रूचेल तिथेच ते नोकरी करतील. स्वभाव खूपच हट्टी आहे व आम्ही मुलीकडचे असल्याकारणाने जावयाला काही सल्ला देणेही योग्य नसल्याने कृपया उपाय सुचवा. जेणेकरून कुटुंबासाठी नोकरी करावीच लागेल हे त्यांना पटेल. माझी विनंती आहे की माझं उत्तर एसएमएसने द्यावे. मी मासिक विकत घेऊ शकत नाही.

उत्तर. मुलीचं लग्न ठरवताना मुलाच्या लग्नाबद्दल तुम्ही काही चौकशी केली नसणार अन्यथा बेरोजगार मुलाशी लग्न लावले नसते. त्यावेळी स्थिती जी काही असेल पण आता तुम्ही मुलीकडचे असलात तरी नम्रतेने त्यांना समजावून सांगा. आता त्यांची जबाबदारी वाढली आहे व त्यामुळे एकजागी नोकरी करावी. त्यांच्या पालकांनाही त्यांना समजावायला सांगावे. सर्व मनासारखे मिळणार नाही. चांगली नोकरी मिळेपर्यंत नोकरी सोडू नये. मेहनत घेऊन स्वत:ला सिद्ध करावं. तुम्हाला एसएमएसने उत्तर पाठवणं शक्य नाही कारण मासिकातूनच उत्तरे दिली जातात.

आरोग्य परामर्श

डॉ. अनुजा सिंह, शांता आयव्हीएफ सेंटर, नवी दिल्ली

प्रश्न : माझं वय २७ वर्षं आहे आणि पतीचं ३० वर्षं आहे. आमच्या लग्नाला ५ वर्षं झाली आहेत. आमच्या सर्व तपासण्या नॉर्मल आल्या आहेत. पतीच्या शुक्राणूंची संख्याही जवळजवळ ९० दशलक्ष आहे. पण तरीही आम्हाला मूल होत नाही. आम्ही आयव्हीएफ तंत्रज्ञानाची मदत घेतली पाहिजे का?

उत्तर : काळजीचं काहीच कारण नाही. तुमच्या पतीच्या शुक्राणूंची संख्या चांगली आहे. त्यामुळे तुम्हाला आययूआय तंत्रज्ञानाच्या मदतीची गरज नाही. आयव्हीएफचा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे. याच्या मदतीने तुम्हाला संतती प्राप्त करून घेता येईल. पण त्यासाठी एखाद्या चांगल्या डॉक्टरची मदत घ्या.

प्रश्न : माझ्या लग्नाला २ वर्षं झाली आहेत. पण अजूनही मी गर्भवती राहू शकत नाही. तपासणीमध्ये माझा रिपोर्ट चांगला आहे. पतीच्या शुक्राणूंची संख्याही ३२ दशलक्ष आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही संख्या समाधानकारक आहे. पण तरीही मी गर्भवती राहू शकत नाही आहे. याचं कारण काय असू शकेल?

उत्तर : हो, तुमच्या पतीच्या शुक्राणूंची संख्या समाधानकारक आहे. तुमचे रिपोर्ट्सही नॉर्मल आहेत. त्यामुळे कोणत्याही निर्णयावर पोहोचण्याआधी तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही निराश न होता प्रयत्न करत राहा. गर्भवती होण्यासाठी अनुकूल स्थिती असणाऱ्या दिवसांत पतीशी संबंध नक्की बनवा. उदाहरणार्थ तुमची मासिक पाळी महिन्याच्या पहिल्या तारखेला आली असेल तर तुम्ही ८ ते २० तारखे दरम्यान संबंध ठेवा. त्यानंतरही गर्भधारणा न झाल्यास आययूआय तंत्रज्ञानाची मदत घ्या.

प्रश्न : मी २६ वर्षीय अविवाहिता आहे. माझी उंची ५ फूट ३ इंच आहे आणि वजन ७० किलो. ५ महिन्यांपूर्वी माझी पाळी आली नव्हती. पण पुढच्या महिन्यात पाळी आली. त्यानंतर १० दिवसांनी मी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवले. त्या महिन्यात माझी पाळी वेळेवर आली. पण आता पाळी उशिराने येत आहे. याचं कारण काय असू शकते? काहींनी मला सांगितलं की मी थायरॉइडची तपासणी करून घेतली पाहिजे. कृपया सांगा मी काय करू?

उत्तर :  अनियमित किंवा उशिराने पाळी येण्यामागे बरीच कारणं असू शकतात. तुम्ही लैंगिकदृष्ट्या सक्रिय असाल तर तुम्ही गर्भावस्थेबाबत तपासणी करून खात्री करून घेतली पाहिजे. याशिवाय अंडाशयातील सिस्ट किंवा पौलिसिस्टिक ओवरीजची तपासणी होण्यासाठी पॅलविक अल्ट्रासाउंड तपासणी होणं आवश्यक आहे. हे मासिक पाळी उशिराने येण्यामागचं कारण असू शकतं. अतिवजनाचाही परिणाम पाळीवर होऊ शकतो. तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन ६० किलो असलं पाहिजं. तुम्ही तुमचा आहार आणि जीवनशैलीमध्ये योग्य बदल करून वजन कमी केलं पाहिजे. यामुळे पाळी नियमित होण्यास मदत मिळेल.

प्रश्न : माझं वय ३८ वर्षं आहे. लग्नाला दहा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. पण अजूनही आई बनण्याचे सुख मला अनुभवता आलेलं नाही. डॉक्टरने मला सांगितलं की, माझं अंडाशय कमकुवत आहे. यामुळेच एकदा माझा ३ महिन्यांनतर गर्भपात झाला आहे. मी का करू?

उत्तर : या वयात गर्भधारणा करणं थोडं कठिण असते. तुमचा ३ महिन्यांचा गर्भपात झाला आहे. यावरून हेच सिद्ध होतं की तुमचं अंडाशय कशाचीही कमकुवत आहे. पण तुम्ही निराश होऊ नका. तुमच्य पतीमध्ये कशाचीही कमतरता नसेल तर तुम्ही एग डोनेशन तंत्रज्ञानाची मदत घेऊ शकता. दुसरी एखादी महिला म्हणजे तुमची बहिण किंवा वहिनी यांचे अंडाशय तुमच्या गर्भाशयात ट्रान्सप्लांट करता येऊ शकते. पण ती महिला विवाहित असावी आणि तिने बाळाला जन्म दिलेला असावा.

प्रश्न : माझं वय २८ वर्षं आहे. मी एका खाजगी कंपनीत काम करते. माझ्या पतीच्या वीर्यांमध्ये शुक्राणू नाहीत आहेत. कृपया सांगा मुलाला जन्म देण्यासाठी आम्ही काय करू?

उत्तर : तुमच्या पतीच्या शारीरिक रचनेची तपासणी करून घ्या. स्पर्म बँकमधून स्पर्म विकत घेऊन डोनर आयईयूचा पर्याय प्रभावी ठरू शकतो. कदाचित तुमच्या पतीचे स्पर्म कुठेतरी थांबत असतील. असं असेल तर यावरही उपचार शक्य आहे.

प्रश्न : मी मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करते. मी आणि माझे पती मुलाला जन्म देण्यासाठी तयार नाही. मी गर्भनिरोधक गोळ्या घेतो. मग आम्ही कंडोम वापरण्याची गरज आहे का?

उत्तर : गर्भनिरोधक गोळ्या किंवा इंजेक्शन नको असलेली गर्भधारणा टाळतात. पण यामुळे लैंगिक रोगांपासून संरक्षण मिळत नाही. कंडोमच्या वापराने नको असलेली गर्भधारणा तर टळतेच पण तुम्ही आणि तुमचा जोडिदार लैंगिक रोगांपासून सुरक्षित राहता.

माझ्या ओठांवर बारीक केस आहेत. केस नाहीसे करण्याकरिता काही उपाय सांगा?

प्रश्न

मी २५ वर्षीय युवती आहे. माझ्या ओठांवर बारीक केस आहेत, ज्यामुळे ओठ खूपच खराब दिसतात. केस नाहीसे करण्याकरिता काही उपाय सांगा. एखादा घरगुती उपाय असेल तर तो ही सांगा?

उत्तर

तुम्ही गव्हाच्या पिठात निरसे दूध मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. मग हे १० मिनिटे ओठांवर लावून ठेवा. सुकल्यावर हळूहळू  मसाज करत काढा. जर केस जास्त असतील तर ते ब्लिच करूनसुद्धा लपवले जाऊ शकतात. जर केस जास्त राठ असतील तर तुम्ही चॉकलेट वॅक्सिंग करून ते सहज काढू शकता.

जेव्हाही पतिसोबत शारीरिक संबंध ठेवते, तेव्हा मला माझ्या जननांगात खूप वेदना होतात.

प्रश्न:  मी २८ वर्षांची विवाहित महिला आहे. जवळपास ६ वर्षांपूर्वी       मला सिझेरियनने मुलगा झाला होता. आता जेव्हाही पतिसोबत शारीरिक संबंध ठेवते,  तेव्हा मला माझ्या जननांगात खूप वेदना होतात. त्या शरीरिक संबंध बनवल्यानंतर दीर्घकाळ मला त्रस्त करतात. यामागे काय कारण असू शकते?

उत्तर:आपल्याप्रमाणेच बऱ्याचशा महिला आई बनल्यानंतर      त्रासदायक सहवासाच्या समस्येतून जातात. ज्या महिलांची मुले नैसर्गिकरीत्या योनीमार्गातून जन्म घेतात आणि त्यात योनीमार्ग मोठा करण्यासाठी डॉक्टर प्रसूतीच्या वेळी अॅपीसिओरोमीचा चीर पाडतात. त्यातील १७ ते ४५ टक्के महिला आई बनल्यानंतर या त्रासातून जातात. उलट सिझेरियनने आई बनणाऱ्या २ ते १९ टक्के महिला अशा प्रकारचा त्रास असल्याचे सांगतात.

म्हणजेच याचा अर्थ असा की सिझेरियननंतर त्रासदायक संबंधाची समस्या कमी दिसते, परंतु ती असू शकते. यामागे योग्य कारण काय आहे, याबाबत केवळ अंदाजच लावला जाऊ शकला आहे. असे समजले जाते की काही महिलांमध्ये सिझेरियनच्या प्रक्रियेतून जाण्याची मानसिक द्विधावस्था पुढे जाऊन त्यांच्या मनात एवढी तीव्र चिंता निर्माण करते की त्यांना संबंधांची भीती वाटू लागते. त्यांचे मन विचार करू लागते की पुन्हा जर गरोदर राहिले, तर पुन्हा सिझेरियनमधून जावे लागेल आणि याच मानसिक द्विधावस्थेत त्यांचे मन सेक्सबाबत नकारात्मक होते.

अन्य मानसशास्त्रीय कारणंही समस्या निर्माण करतात. नुकत्याच आई बनलेल्या महिलांची जर रात्री झोप पूर्ण झाली नाही, व्यवस्थित आराम मिळाला, व्यवस्थित पोषण मिळाले नाही, एकमेकांसोबत प्रेमळ सहवालाची संधी मिळाली नाही, तसेच पतीसोबत संबंध ठेवण्याची इच्छा झाली नाही, तर अशी मन:स्थिती निर्माण होणे स्वाभाविक आहे.

सिझेरियननंतर जर टाक्यांत पू झाला, तर नंतर ते भरल्यानंतरही वरील टिश्यूमध्ये झालेल्या दुष्परिवर्तनामुळे महिलांना वेदना जाणवतात. काही महिलांमध्ये हार्मोनल समस्याही निर्माण होत. एस्ट्रोजन हार्मोनच्या कमतरतेमुळे योनीची नैसर्गिक स्निग्धता घटते. परिणामी, संबंध कष्टदायक होतात.

काही शारीरिक समस्या जसं की योनीद्वाराला आलेली सूज, मूत्रनलिकेला आलेली सूज, त्यावर उत्पन्न झालेली मांसाची गाठ, योनीद्वाराशी सलग्न बार्थोलिन ग्लँडमध्ये आलेली सूज किंवा गुदद्वाराला फिशर झाल्यानेही सहवास क्रीडेच्या वेळी त्रास होणे स्वाभाविक आहे. अशाच प्रकारे गर्भाशयाची सूज आणि एंडोमिट्रिओसिससारखे रोगही त्रास देतात.

शिवाय समस्या हीसुध्दा आहे की एकदा सुरुवातीला वेदना निर्माण झाल्यावर पुढे मनात शारीरिक संबंधाबाबत तणाव जाणवतो. केवळ स्पर्शानेही योनी भागातील पेशी संकुचित होतात, योनी संकुचित होते आणि संबंध बनवणे कठीण होते. समस्या एकदा सुरू झाल्यानंतर पुढे नेहमीच चक्रव्यूह बनते. जेव्हा जेव्हा पती-पत्नीला मिलनाच्या बंधनात अडकायची इच्छा असते, पत्नी वेदनेने तळमळते. सर्वप्रथम आपण एखाद्या योग्य स्त्रीरोग विशेषज्ञाला भेटून आपली अंतर्गत तपासणी करून घ्यावी. त्यामुळे समस्येच्या मूळ कारणाचे निदान होईल व आपण समस्येवर योग्य उपचार घेऊन त्यातून बाहेर पडू शकाल.

जर अंतर्गत एखादा विकार नसेल तर आपण आणि आपले पती दोहांनी दाम्पत्य मानसशास्त्रात निपुण एखाद्या विशेषज्ञाचा सल्ला घेणं योग्य ठरेल. आपसात प्रेमाचा सेतू असेल, तर सर्व समस्या कालांतराने दूर होतील. सहवासापूर्वी प्रणयक्रीडेला वेळ देणेही लाभदायक होऊ शकेल. त्यामुळे योनीची नैसर्गिक स्निग्धता वाढते, त्यामुळे संबंध सोपे होतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें