हातांची स्वच्छता का महत्त्वाची आहे

* सोनिया राणा

जेव्हापासून कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे, तेव्हापासून लोक हातांच्या स्वच्छतेकडे लक्ष देऊ लागले आहेत. पण हे फक्त कोविड-१९ बद्दल नाही. हात धुण्याबद्दल अनेकदा घरातील वडीलधारी मंडळी वेळोवेळी सल्ला देतात आणि खडसावत ही असतात की जेवण करण्यापूर्वी आणि नंतर बाहेरून घरात आल्यानंतर, बाहेरून आणलेल्या कोणत्याही वस्तूला हात लावल्यानंतर आणि शौचालयात गेल्यानंतर हात साबणाने चांगले धुतले पाहिजे.

कारण जेव्हाही आपण हात न धुता अन्न खातो तेव्हा आपल्या हातातील जंतू अन्नासोबत आपल्या शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे आपल्याला अन्न विषबाधेसह अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते.

अनेक आजार होऊ शकतात

हातांच्या स्वच्छतेच्या बाबतीत आपण कोविड-१९ सारख्या महामारीकडे क्षणभर दुर्लक्ष केले तरी ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. सौम्य विषाणूजन्य संसर्गापासून ते कॉलरापर्यंत असे अनेक रोग आहेत, जे तुमच्या दैनंदिन दिनचर्येत या छोटयाशा सवयीचा समावेश न केल्याने तुम्हाला आपल्या जाळयात अडकवू शकतात, जसे की डायरिया, गॅस्ट्रोएन्टेरिटिस, अतिसार, कॉलरा, टायफॉइड, हिपॅटायटीस ए आणि इ, कावीळ, एच १, एन १, सर्दी आणि खोकला.

हात स्वच्छ कसे ठेवायचे

हात धुण्याशी संबंधित जाहिरातींनी बाजार भरलेला आहे, वर्तमानपत्रांतून असो की मासिकांतून किंवा दूरचित्रवाणीवरील जाहिरातींमधून, आम्हाला हात व्यवस्थित कसे धुवावेत याची माहिती दिली जाते. मात्र गेल्या १ वर्षात या जाहिरातीच नव्हे तर बाजारात उपलब्ध सॅनिटायझर आणि हँड वॉशचे प्रमाणही वाढले आहे.

अशा परिस्थितीत आपण सर्वजण घरी असलो तर सतत साबणाने हात स्वच्छ करणे आणि घराबाहेर असलो तरी आता सॅनिटायझरने हात जंतूमक्त करणे गरजेचे झाले आहे. यामुळे तुम्ही कोविड-१९ महामारीपासून तर वाचालच पण इतर आजारांपासूनही तुम्ही स्वत:चे रक्षण करू शकाल. डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही असे म्हटले आहे की आपण आपले हात २० सेकंदांपर्यंत चांगले घासून धुवावेत.

ग्लोबल हँड वॉशिंग डे

हात धुण्याबाबत जनजागृती करण्यासाठी ‘ग्लोबल हँड वॉशिंग डे’ साजरा केला जातो. यूएनने २००८ पासून तो साजरा करण्यास सुरुवात केली होती आणि जेव्हा तो पहिल्यांदा साजरा केला गेला तेव्हा जगभरातील सुमारे १२० दशलक्ष मुलांनी आणि प्रौढांनी आपले हात धुतले होते. त्यानंतर तो दरवर्षी १५ ऑक्टोबरला साजरा केला जातो. २०२० मध्ये ‘हँड हायजिन’ ही त्याची थीम ठेवण्यात आली होती.

हाताचे आरोग्यदेखील महत्त्वाचे आहे

कोविड काळात हात धुणे खूप महत्वाचे झाले आहे. अशा परिस्थितीत हात धुण्यासोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे.

हात धुतल्यानंतर क्रीम लावा : हातांच्या वरच्या त्वचेवर नैसर्गिक तेल आणि मेण असते. वारंवार हात साबणाने धुतल्याने आणि सॅनिटायझर वापरल्याने ते कोरडे होतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी हात धुतल्यानंतर किंवा सॅनिटायझर वापरल्यानंतर मॉइश्चरायझर जरूर वापरा.

सुगंधित साबणाचा वापर कमी करा : कोरोना संसर्गाच्या काळात लोकांनी सुगंधी साबणाचा अधिक वापर सुरू केला आहे. म्हणून याचा कमीत कमी वापर करा, कारण ते फेसाचा जाड थर बनवते आणि नंतर जेव्हा तुम्ही हात चोळून धुता तेव्हा ते त्यांच्यातील नैसर्गिक तेलदेखील धुवून टाकते. असे सतत केल्याने हातांचे नैसर्गिक सौंदर्यदेखील खराब होऊ शकते.

हात फाटले असल्यास सॅनिटायर लावू नका : हाताची त्वचा फाटली असेल तर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर लावणे टाळा. हँड सॅनिटायझर लावल्याच्या काही वेळानंतर मॉइश्चरायझिंग क्रीम वापरता येते. रात्री झोपण्यापूर्वी हातांवर मॉइश्चरायझिंग क्रीम लावा आणि सुती कापडाच्या हातमोजेने २० मिनिटे हात झाकून ठेवा जेणेकरून त्यात ओलावा येईल.

सणांसाठी असे करा स्वयंपाकघर तयार

* भटनागर

सण-उत्सव म्हणजे भरपूर मौजमजा, खूप खायचे, नानाविविध पदार्थ बनवायचे आणि घरासह स्वत:ही सजायचे. अशा वेळी जेव्हा घराच्या स्वच्छतेबाबत बोलले जाते तेव्हा खास करून स्वयंपाकघर स्वच्छ करण्याकडे लक्ष द्यावे लागते. कारण, येथेच तर आपण आपल्या माणसांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांच्या आवडीचे पदार्थ बनविण्यासोबतच सणांवेळी विविध प्रकारचे पक्वान्न बनवून पाहुण्यांचेही स्वागत करतो. पण जर तुमचे स्वयंपाकघर स्वच्छ नसेल, तेथील वस्तू नीटनेटक्या लावलेल्या नसतील तर तुम्हाला सणांची लगबग सुरू झाली आहे असे वाटणारच नाही, शिवाय तुमच्याकडे आलेले पाहुणेही तुमचे स्वयंपाकघर पाहून नाक मुरडतील, याचा विचार तुम्ही केला आहे का? म्हणूनच यंदाच्या सण-उत्सवांवेळी तुम्ही तुमचे किचन म्हणजेच स्वयंपाकघरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या आणि त्याला सणांसाठी सज्ज करा. यासाठी माहिती करून घ्या काही सोप्या टिप्स :

सुरुवात करा स्वत:च्या स्वच्छतेपासून

स्वयंपाकघराच्या स्वच्छतेचा विचार करण्यापूर्वी आपण स्वत:च्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायला हवे, कारण दररोज घर आणि घराबाहेरील कामे करताना किटाणू आपल्या संपर्कात कधी येतात, हे आपल्या लक्षातही येत नाही. त्यातच ते दिसत नसल्यामुळे आपल्याला उगाचच असे वाटत असते की, आपले हात स्वच्छ आहेत. प्रत्यक्षात असे काहीच नसते.

जेव्हा आपण एखाद्या वस्तूला स्पर्श करतो किंवा हस्तांदोलन करतो तेव्हा त्या प्रत्येक वेळी आपण किटाणूंना आपल्या हातांवर येऊन बसण्याचे आमंत्रण देत असतो. यामुळे संसर्ग, अन्नातून विषबाधा होण्यासह बऱ्याचदा जिवावरही बेतू शकते. म्हणूनच थोडया थोडया वेळाने हात पाण्याने धुणे गरजेचे आहे. यामुळे तुम्ही आजारांपासून दूर राहण्यासोबतच सण-उत्सवांवेळी आपल्या माणसांचीही विशेष काळजी घेऊ शकाल.

वस्तू नीटनेटक्या ठेवा

कपाट सुंदर दिसण्यासोबतच त्यातील सामान पटकन मिळावे यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही ते व्यवस्थित लावून ठेवता त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातील वस्तूही नीट लावून ठेवा. अनेक महिलांना स्वयंपाकघरातील छोटयामोठया वस्तू कुठेही ठेवण्याची सवय असते. यामुळे दिसायला अत्यंत वाईट दिसते, शिवाय त्या उघडयावर राहिल्यामुळे त्यांच्यावर किटाणू जमा होण्याची शक्यताही खूपच वाढते. त्यानंतर अजाणतेपणी का होईना, पण जेव्हा आपण त्या वापरतो तेव्हा त्यावरील किटाणू आपल्या शरीरात जाऊन आपल्याला आजारी पाडू शकतात.

फूड क्लिप्सचा वापर करून खायच्या वस्तू ठेवा सुरक्षित

तुम्ही जे काही खाल ते आरोग्यदायी असण्यासोबतच दीर्घ काळापर्यंत ताजे रहावे, असे तुम्हाला वाटत नाही का? तुमची छोटीशी सवय स्नॅक्स तसेच अन्य पदार्थांना दीर्घकाळ ताजे ठेवण्याचे काम करेल. बऱ्याचदा असे पाहायला मिळते की, स्टोरेज बॉक्स नसल्यामुळे स्वयंपाकाची बरीच सामग्री उघडयावर ठेवावी लागते. त्यामुळे त्यात ओलावा निर्माण होऊन त्याला कीड लागू शकते. त्यामुळे ती वापरता येत नाही. म्हणूनच तुम्ही हर्ब्स, मसाले, बिस्किटे, वेफरची पाकीट अशा प्रकारच्या तुमच्या स्वयंपाकघरातील सामग्रीला फूड क्लिप लावून त्या हवाबंद तसेच सुरक्षित ठेवू शकता. विशेष करून सण-उत्सवांवेळी हे क्लिप्स खूपच उपयुक्त ठरतात. कारण या काळात पाहुण्यांची ये-जा सुरूच असते. अशा वेळी सतत पाकिटातून खाद्यपदार्थ बाहेर काढल्यामुळे ते खराब होण्याची शक्यता अधिक असते. क्लिप्स हवा किंवा ओलाव्याला पाकिटाच्या आत जाऊ देत नाहीत.

किचनमध्ये ठेवा मल्टी स्पेस असलेले कंटेनर

कोरोनामुळे यंदा लोकांच्या मनात भीती आहे. त्यामुळे सण-उत्सवांतील उत्साहावर काहीसे विरजण पडले आहे. पण कधीपर्यंत लोक आपल्या माणसांना भेटण्यापासून स्वत:ला रोखू शकतील? त्यामुळे भलेही नेहमीपेक्षा कमी असतील, पण आपली काही माणसे आपल्याला भेटायला येतीलच. तेव्हा त्यांच्यासाठी एका प्लेटमध्ये बिस्किटे, त्यानंतर दुसऱ्यात सुकामेवा असे एकेक पदार्थ घेऊन येण्याऐवजी तुम्ही सणांआधीच तुमच्या स्वयंपाकघरात मल्टी बॉक्स कंटेनर आणून त्यात स्नॅक्स ठेवा. या गोष्टीकडेही लक्ष द्या की, या कामासाठी तुम्ही जो कंटेनर वापरणार असाल तो वरून झाकून ठेवण्यासाठीचा पर्याय त्यात उपलब्ध असेल. यामुळे पाहुण्यांसमोर एक एक पदार्थ घेऊन जाण्याचे तुमचे कष्ट वाचतील, शिवाय स्नॅक्स खराब होण्याची शक्यताही कमी होईल.

मायक्रोव्हेवची घ्या विशेष काळजी

मायक्रोव्हेवने आपले जीवन अगदी सोपे केले आहे. यात जेवण बनविण्यासोबतच ते गरम करण्याची प्रक्रिया एवढी सोपी आहे की, आता तर तो प्रत्येक स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा घटक बनत चालला आहे. पण ज्या मायक्रोव्हेवला तुम्ही सुविधेचे चांगले साधन समजता तो योग्य प्रकारे स्वच्छ न केल्यास तुम्हाला आजारीही पाडू शकतो, हे तुम्हाला माहिती आहे का? जेव्हा आपण मायक्रोव्हेवमध्ये जेवण गरम करतो किंवा बनवतो तेव्हा त्याच्या आजूबाजूची जागा तसेच मायक्रोव्हेवची प्लेट अस्वच्छ होत असल्यामुळे त्यावर किटाणू जमा होतात, जे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतात..

स्पंज आणि सिंक नेहमीच ठेवा स्वच्छ

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, एका छोटयाशा स्पंजमध्ये तब्बल ५४ अब्ज बॅक्टेरियल सेल्स म्हणजे किटाणूंच्या पेशी असतात, ज्या स्पंजमुळे इतर वस्तूंमध्ये शिरून तुमचे आरोग्य बिघडवू शकतात. म्हणूनच स्पंज, किचनमधील कपडे तसेच सिंक हे गरम पाण्यात डिशवॉशर घालून दररोज स्वच्छ करा. यामुळे किटाणू नष्ट होऊन तुम्ही स्वयंपाकघरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देऊ शकता. या गोष्टीकडेही लक्ष द्या की, कपडे धुतल्यानंतर ते व्यवस्थित सुकवा. अस्वच्छ कपडयाने धुतलेली भांडी कधीच पुसू नका. तुमचा हा सुज्ञपणा तुमच्या आपल्या माणसांची खास काळजी घेण्यास उपयोगी ठरेल.

या जागा वरचेवर करा स्वच्छ

स्वयंपाकघरात अशा बऱ्याचशा जागा असतात ज्या जेवण बनविण्याच्या ठिकाणाच्या संपर्कात येत नाहीत. पण जेव्हा आपण त्यांना आपल्या हातांनी सतत स्पर्श करतो तेव्हा त्या किटाणूंच्या संपर्कात येतात. जसे की, दरवाजाची कडी, हँडल, नळ, फ्रीजचा दरवाजा इत्यादी. यामुळे किटाणू सर्वत्र पसरण्याची शक्यता अधिकच वाढते. म्हणूनच हे गरजेचे आहे की, ज्यावेळी तुम्ही हँडलला स्पर्श कराल त्या प्रत्येक वेळी हात स्वच्छ धुवा, जेणेकरून तुमच्यामुळे तुमच्या जेवणापर्यंत किटाणू पोहोचणार नाहीत.

छोटी छोटी साफसफाई ठेवेल किटाणूंपासून दूर

स्वयंपाकघरातील ओटा असो, गॅस, स्टोव्ह किंवा कचऱ्याचा डबा असो, या सर्वांचीच साफसफाई चांगल्या प्रकारे करण्याची गरज असते. गॅस किंवा स्टोव्हवर नेहमी जेवण बनविले जात असल्यामुळे त्यावर अन्नपदार्थ सांडून ते अस्वच्छ होतात. ओटयावर आपण भाज्या ठेवण्यापासून ते चपात्या लाटण्यापर्यंतची सर्व कामे करतो. त्यामुळे दररोज हे सर्व स्वच्छ, निर्जंतुक करणे गरजेचे आहे. यामुळे किटाणू मरण्यासोबतच तुमचे स्वयंपाकघरही स्वच्छ दिसेल.

निरोगी नात्यात स्वच्छतेचं महत्त्व

* लव कुमार सिंह

राणी आणि रजनी खास मैत्रिणी. दोघीही मध्यमवर्गीय, सुशिक्षित, उदार, सहिष्णू, मितभाषी, कुटुंबाची काळजी घेणाऱ्या, नवनवीन गोष्टी शिकण्यास इच्छुक.

फक्त दोघींमध्ये एकच अंतर. ते अंतर म्हणजे देह प्रेमाबाबतचं. एका छताखाली राहात असूनदेखील राणी आणि तिच्या पतीमध्ये शारीरिकसंबंध जुळण्यास खूप वेळ लागतो. महिने असेच निघून जातात.

इकडे रजनी आणि तिचा पती आठवड्यातून १-२ वेळा तरी शारीरिकसंबंध ठेवतात. राणी तर या संबंधांना घाणेरडंदेखील समजते, तर रजनी मात्र असा विचार करत नाही. दोघी एकमेकींमधल्या या अंतराच्या गोष्टी जाणून आहेत.

तुम्ही आता म्हणाल हे कसलं बरं अंतर? होय, हेच तर खूप मोठं अंतर आहे. काही दिवसांपूर्वी या एका अंतराने दोघी मैत्रिणींमध्ये अनेक अंतरं निर्माण केली होती.

या एका अंतरानेच राणी शरीर स्वच्छ ठेवण्यात संकोचली होती. एवढंच नाही तर, तिच्या पतीचीदेखील अशीच काहीशी अवस्था होती. त्याला त्याच्या व्यवसायातून फुरसत नव्हती. तो सतत गुटखादेखील चघळत असायचा.

सेक्स स्वच्छता शिकवतं

इकडे रजनी पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येक बाबतीत सतर्क होती. योग्य ताळमेळ, प्रेम, सुसंवाद आणि नियमित सहवासामुळे रजनीला याची जाणीव होती की एकांत, वेळ आणि सहवास मिळाल्यावर पती कधीही तिला मिठीत घेऊ शकतो. तो कधीही तिच्या कोणत्याही शरीराच्या भागाचं चुंबन घेऊ शकतो. कधीही दोघांच्या लैंगिक अंगांचं मीलन होऊ शकतं. अशा परिस्थितीत ती शरीराच्या आंतरिक स्वच्छतेबाबत बेपर्वा होऊ शकत नव्हती. रजनीकडून या प्रकारची कोणतीही प्रतिक्रिया तिच्या पतीलादेखील आंतरिकरित्या स्वच्छ ठेवण्यात मदत करायची.

या एका अंतरामुळे राणी तिचा देह आणि खानपानाबाबतदेखील निष्काळजी झाली होती. जेव्हा तुमचं शरीर न्याहाळणारं, देहाची स्तुती करणारं कोणी नसेल तर अनेकदा लग्नानंतर अशा प्रकारचा निष्काळजीपणा वागण्यात येतो. राणी याचं अगदी ठळक उदाहरण होती. अशाप्रकारे काळाबरोबरच तिने चरबीच्या अनेक थरांना जणू निमंत्रण दिलं होतं. इकडे रजनीचं स्वत:वर व्यवस्थित नियंत्रण होतं. त्यामुळे ती छान सडपातळ होती.

या अशा त्यांच्या अंतरामुळेच राणी एक दिवस डॉक्टरच्या समोर बसली होती. रजनीदेखील सोबत होती. राणीला जननेंद्रियाच्या भागात वेदनेची समस्या होती, जी बऱ्याच दिवसांपासूनची होती. डॉक्टरांनी सांगितलं की इन्फेक्शन आहे. शरीराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे इन्फेक्शन झाल्याचं सांगितलं. स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे अधिकच गंभीर समस्या निर्माण झाली होती.

राणीची ही गोष्ट रजनीच्या पतीलादेखील समजली होती. खरंतर तशी प्रत्येक गोष्ट रजनी आणि तिच्या पतीला तशी समजायचीच. दोघेजण यावर चर्चादेखील करायचे. रात्री जेव्हा रजनीने पती राजेशला ही गोष्ट सांगितली तेव्हा राजेश म्हणाला, ‘‘तू तुझ्या मैत्रिणीला समजवायला हवं की समागम ही वाईट गोष्ट नाहीए. मला असं नाही म्हणायचंय की अशी सर्व विवाहित लोक जी संबंध ठेवत नाहीत, ती शरीराच्या स्वच्छतेबाबत बेपर्वा राहात असतील. परंतु एक गोष्ट मी गॅरण्टीने सांगू शकतो की जर पतिपत्नी नियमितपणे समागम करत असतील तर दोघेही आपल्या शरीराच्या स्वच्छतेबाबत बेपर्वा राहू शकत नाहीत. म्हणजेच जर ते एकमेकांच्या सहवासात आनंद घेत असतील तर ते अधिक निरोगी आणि स्वच्छ राहातात.’’

सेक्स औषध आहे

राजेश अगदी बरोबर म्हणाला होता. खरंतर जेव्हा पतिपत्नींना ते एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांना शारीरिकरित्या लवकर जवळ यायचं असतं, याची जाणीव असते तेव्हा ते दोघेही स्वाभाविकपणे आपल्या शरीराच्या स्वच्छतेबाबत सचेत राहातात. यामुळे दोघांचं व्यक्तिमत्त्व दृढ होतं आणि दोघांमध्ये मधुर संबंधदेखील निर्माण होतात. तसंच अनेक रागांपासूनदेखील शरीर दूर राहातं. याउलट जी जोडपी शारीरिकसंबंधांबाबत उदासीन राहातात, ते त्यांच्या स्वच्छतेबाबतदेखील बेपर्वा असू शकतात.

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वैवाहिक जीवनात पतिपत्नीमध्ये शारीरिक संबंधाचे २ प्रमुख उद्देश्य असतात. पहिलं म्हणजे गर्भवती होणं आणि दुसरं म्हणजे आनंद मिळवणं. परंतु बारकाईने पाहाता सहवासामुळे अजून एक तिसरं उद्दिष्टदेखील साधता येतं. याला आपण असंदेखील म्हणू शकतो की जर पतिपत्नीमध्ये नियमित अंतराने शारीरिकसंबंध बनत असतील तर ते अधिक निरोगी असतात.

नक्कीच, पतिपत्नीमध्ये सेक्सला अनेक प्रकारचे त्रास दूर करण्याचं औषध असल्याचं सांगण्यात आलंय. सेक्सबाबत जगभरात खूप संशोधन करण्यात आलंय आणि केलं जातंय. विविध शोधानंतर जगभरातील तज्ज्ञांनी सेक्सचे फायदे अशाप्रकारे सांगितले आहेत.

* पतिपत्नींमध्ये नियमितपणे शारीरिकसंबंध निर्माण झाल्याने तणाव आणि ब्लडप्रेशर नियंत्रणात राहाण्यास मदत मिळते. तणाव कमी होतो; तेव्हा इतर अन्य रोगदेखील आजूबाजूला फिरकत नाहीत.

* आठवड्यातून १-२ वेळा केलेला सेक्स रोगप्रतिरोधकक्षमता वाढवितो.

* सेक्स खुद्द एक शारीरिक व्यायाम आहे आणि तज्ज्ञांनुसार अर्ध्या तासाचा सेक्स जवळजवळ ९० कॅलरीज कमी करतो म्हणजेच सेक्सच्या माध्यमातून वजन कमी करण्यासदेखील मदत मिळते.

* एका संशोधनानुसार जी व्यक्ती आठवड्यातून १-२ वेळा सेक्स करते त्यांच्यामध्ये हृदयविकाराची शक्यता खूपच कमी असते. कारण शारीरिक प्रेम हे एकप्रकारे भावनात्मक प्रेमाचं बाहेरचं रूप आहे, म्हणून जेव्हा आपण शारीरिक प्रेम करतो, तेव्हा भावनांचं घर म्हणजेच आपलं हृदय निरोगी राहातं.

* वैज्ञानिकांच्या मते सेक्स, फील गुडच्या अनुभूतीबरोबरच स्वसन्मानाची भावना वाढविण्यास सहाय्यक ठरतो.

* शारीरिकसंबध हे प्रेमाचं हार्मोन ऑक्सीटॉसिन वाढविण्याचं काम करतं; ज्यामुळे स्त्रीपुरुषाचं नातं मजबूत होतं.

* सेक्स शरीरातील अंतर्गत अशा उपजत पेनकिलर एण्डोर्फिसला उत्तेजन देतं, ज्यामुळे सेक्सनंतर डोकेदुखी, मायग्रेन आणि अगदी सांधेदुखीपासूनदेखील आराम मिळतो.

* वैज्ञानिकांच्या मते ज्या पुरुषांमध्ये नियमित अंतराने स्खलन (वीर्यपतन) होत असतं, त्यांच्यामध्ये वय वाढताच प्रोटेस्टसंबंधी समस्या वा प्रोटेस्ट कॅन्सरची शक्यता कमी होते. इथे नियमित अंतराने म्हणजे एका आठवड्यातून १-२ वेळा समागम करण्याशी आहे.

* झोप न येण्याचा त्रास हा सेक्समुळे कमी होतो; कारण सेक्स केल्यानंतर खूप छान झोप येते.

* समागम एक औषध आहे. औषधदेखील असं की ज्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. म्हणूनच पतिपत्नींनी निरोगी राहाण्यासाठी या औषधांचं नियमित अंतराने सेवन आवर्जून करायला हवं.

निरोगी राहायचे असेल, तर या सवयी लावा

* सोमा घोष

मुलांना अगदी सुरुवातीपासूनच साफसफाई आणि हायजीनबाबत सांगितले पाहिजे. ही सवय लहानपणापासूनच लावल्यास, ती मुलांच्या अंगवळणी पडते. केवळ मुलांनाच नव्हे, तर आईवडील दोघांनी अशी सवय स्वत:लाही लावून घेतली पाहिजे. साफसफाई व हायजीनमुळे अनेक आजारांपासून मुलांचे संरक्षण होते. उन्हाळा आणि पावसाळयात संक्रमणाचे आजार आपले डोके वर काढतात. अशावेळी या मोसमांत हायजीनची काळजी घेणे आवश्यक आहे.

एका सर्व्हेनुसार, भारतामध्ये ४७ टक्के मुले कुपोषणाची शिकार आहेत. याचे कारण म्हणजे, पोटातील इन्फेक्शन. पोटात सतत इन्फेक्शन झाल्यामुळे त्यांच्या शरीरातील पोषक तत्त्वे नष्ट होऊ लागतात. त्याचा परिणाम त्यांच्या डोक्यावर होतो. एवढेच नव्हे, पुअर हायजीनमुळे ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे.

मुंबईच्या एसआरव्ही हॉस्पिटलचे बालरोगतज्ज्ञ डॉ. विशाल बालदुवांच्या मतानुसार, निरोगी शरीरात नेहमीच निरोगी विचारांचा वास असतो आणि हे खरेही आहे. कारण हायजीन अनेक प्रकारचे असतात. त्यात खास आहेत, दात, नखे, केस आणि संपूर्ण शरीर.

साफसफाईशी संबंधित खालील टिप्स आईवडील मुलांना देऊ शकतात :

* जेव्हा मूल थोडेसे मोठे होईल, तेव्हा त्याला ब्रश आणि पेस्ट द्या. ब्रश करण्याची क्रियाही सांगा. सोबत तुम्हीही ब्रश करा. म्हणजे तुम्हाला पाहून, त्यालाही स्वत:हून ब्रश करण्याची इच्छा होईल. असे केले नाही, तर कमी वयात कॅविटी होण्याची शक्यता असते. कॅविटी हिरडयांपर्यंत गेल्यास, दुधाचे दात पडूनही नवीन येणाऱ्या दातांसाठी समस्या निर्माण होऊ शकते. त्याचप्रमाणे, काही मुले मोठी झाल्यानंतरही बाटलीने दूध पितात. अशावेळी दूध प्यायल्यानंतर त्यांना थोडे पाणी प्यायला दिले पाहिजे.

* नेल्स हायजीनबाबत मुलांना अवश्य सांगा. मुले धूळ-मातीत खेळतात. त्यामुळे त्यांचे हात व नखांच्या माध्यमातून जंतू त्यांच्या शरीरात प्रवेश करतात. घाणेरड्या हातांनी शरीर किंवा डोके खाजविल्याने फोड किंवा पुरळ येतो, याला स्कॅबिज इन्फेक्शन म्हणतात. जर एक दिवसाआड मुले नखे कापायचा कंटाळा करत असतील तर दोन दिवसांआड नखे कापा. मात्र, नखे कापताना मुलांना त्याचे फायदेही समजावून सांगा. त्याचप्रमाणे, जेवायला बसण्याअगोदर हात धुवायची सवय लावा.

पुअर हायजीनमुळे मुलांना अनेक आजार होतात. त्यामध्ये कॅविटी, टायफाइड, हगवण, हॅपेटाइटिस ए आणि इ हे कॉमन आहेत. याचा अर्थ, मुलांनी खेळण्यासाठी बाहेर जाऊ नये, असा नव्हे. त्यांना बाहेर जाऊ द्या, खेळू द्या. मात्र, घरात आल्यानंतर त्यांना अंघोळीची सवय लावा. नेहमी मेडिकेटेड साबणाचा वापर करा. उन्हाळा आणि पावसाळयात हायजीनची खास काळजी घ्या. जेणेकरून, आपले मूल योग्य सवयींमुळे नेहमी निरोगी राहील. जर आपले मूल निरोगी राहिले, तर त्याचा मानसिक विकासही उत्तमप्रकारे होईल.

पब्लिक स्पेसमध्ये हायजीन

संक्रमणामुळे पसरणाऱ्या आजारांच्या कचाटयात सापडण्याचा धोका घराबाहेर जास्त प्रमाणात असतो. खास करून तेव्हा, जेव्हा तुम्ही किंवा तुमची मुले सार्वजनिक शौचायलाचा वापर करता. आजकाल बाजारात अशी उत्पादने उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर करून तुम्ही पब्लिक स्पेसमध्ये हायजीनची काळजी घेऊ शकता. स्प्रेच्या रूपात मिळणाऱ्या उत्पादनांना कॅरी करणेही सोपे असते. पब्लिक स्पेसमध्ये शौचालयांचा वापर करण्यापूर्वी सीटवर स्प्रे फवारा आणि संक्रमणापासून स्वत:चा बचाव करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें