महिलांनी फोन हाताळताना दाखवावा स्मार्टनेस

* पारूल भटनागर

जोडीदार चार महिन्यापासून बिजनेस टूरवर गेला होता, यामुळे त्याची पत्नी रिताला खूप कंटाळा आला होता. त्याचबरोबर तिच्या शारीरिक गरजादेखील पूर्ण होत नव्हत्या. तेवढयात तिची मैत्रीण नेहाने तिला काही अशा साईट्स पाहण्याचा सल्ला दिला, ज्या पाहून तिला समाधान मिळू शकेल आणि झालं देखील असंच, आता दररोज ती त्या साईटवर जाऊ लागली. परंतु तिची चूक झाली की तिने काही लिंक उघडल्या होत्या की तिने त्या हिस्ट्री डिलीट केली नाही आणि नाही डाऊनलोड केलेले फोटो फोनमधून काढले. अशावेळी जेव्हा तिचा जोडीदार परत आला तेव्हा त्याने काही सर्च करण्यासाठी तिचा फोन उचलला तेव्हा त्याला खूपच आश्चर्य वाटलं. तिने खरं कारण सांगूनदेखील त्याने काहीच ऐकलं नाही आणि दोघांमध्ये भांडणं सुरू झालं. त्याने रीताला वाईट ठरवलं. रिताच्या छोटयाशा चुकीमुळे त्यांच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण झाला.

असं केवळ स्त्रियाच नाही करत, तर पुरुषदेखील करतात. उलट अशा प्रकारे गोष्टी पाहण्यांमध्ये पुरुष महिलांपेक्षा अधिक पुढे आहेत. परंतु त्यांना अधिक तांत्रिक माहिती असल्यामुळे ते वाचतात. ते घराबाहेर पडतेवेळी आपल्या काही गरजेच्या गोष्टी विसरू शकतात परंतु फोन कधीच नाही. म्हणून तर एक जुनी म्हण आहे जी त्यांच्याबाबत खूप प्रसिद्ध झाली आहे- एक विवाहित पुरुष सर्वकाही विसरू शकतो परंतु घरी मोबाईल नाही. मग अशावेळी तुम्ही तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुरुषांच्या मागे का राहावे.

जाणून घ्या, कसे तुम्ही स्वत:च्या फोनचा स्मार्टली वापर करू शकता

फोन नाही अॅप्सला करा लॉक

पुरुष खूपच हुशार असतात मग भलेही ते कायम त्यांचा फोन लॉक करून ठेवत असतील, परंतु स्वत:च्या जोडीदाराचा फोन त्यांना मोकळया पुस्तकांप्रमाणेच हवा असतो. जेव्हा ते उघडलतील तेव्हा कोणत्याही पासवर्डचा अडसर असता कामा नये. अशावेळी तुम्ही थोडा समजूतदारपणा दाखवा. भलेही त्यामध्ये अशा काही वाईट गोष्टी नसतील, तरीदेखील तुमचा फोन अॅप्स लॉक करून ठेवावा. यासाठी तुम्हाला साधारणपणे प्रत्येक अॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी ऑप्शनवर क्लिक करून त्या अॅपला लॉक करावं. यामुळे फायदा असा होईल की तुमचा जोडीदार तुमच्याशिवाय तुमचा फोन खोलू शकणार नाही. यामुळे तुम्हाला त्यातील तंत्रज्ञानाची माहिती तर मिळेल आणि तुम्ही निश्चिंतदेखील रहाल.

फोन का लॉक करू नये

अनेक लोकांची सवय असते की ते त्यांचा फोन लॉक करून ठेवतात कारण कोणी त्यांच्या मागे फोन उघडू नये. फोन लॉक करणं योग्य नाही आहे. कारण जर तुम्ही कुठेही जाते वेळी अपघात झाला वा कुठे जर तुमचा फोन विसरला तर फोन लॉक असल्यामुळे कोणीही तुमच्या कुटुंबियांना कळवू शकणार नाही.

क्लाऊडवर सेव्ह करा डाटा

एप्पल डिवाइसमध्ये आय क्लाऊड सुविधा असते, तर अँड्रॉईड स्मार्ट फोनमध्ये गुगल ड्राईव्ह अगोदरच इनबिल्ट असतो. याला क्लाऊड स्टोरेज म्हणतात. मोबाईलवर जो डेटा आपण सेव करतो त्याला डिजिटल माध्यम म्हणतात. परंतु जो डेटा आपण आय क्लाउड वा गुगल ड्राइव्हवर सेव करतो त्याला वर्चुअल माध्यम म्हणतात. यामध्ये डेटा तुमच्या फोनच्या लोकल ड्राइव्हमध्ये सेव्ह न होता दुसऱ्या कंपनीच्या सर्व्हवर सेव होतो. यामध्ये तुमच्या फोनची मेमरीदेखील जास्त भरत नाही आणि तुमचा डेटादेखील स्टोर होतो, ज्यामुळे तुम्हाला हवं तेव्हा, हवे तिथे खोलून पाहू शकता आणि तुम्हाला हवं त्याला पाठवू शकता. यामध्ये तुमचे फोटो, फाइल्स, व्हिडिओ काहीही सेव्ह करून ठेवू शकता. यासाठी तुम्हाला ईमेल आयडी आणि पासवर्डची गरज असते आणि इंटरनेटदेखील गरजेचं असतं.

हिस्ट्री डिलीट करण्याची सवय ठेवा

अनेकदा कार्यालयामध्ये जेव्हा आपण कोणाचा कम्प्युटर वापरतो तेव्हा त्यामधून कोणी पाहू नये की आपण काय सर्च केलं आहे यासाठी हिस्ट्री आवर्जून डिलीट करतो. कारण जेव्हादेखील तुम्ही गुगलवर काही देखील सर्च कराल तेव्हा हिस्ट्री आवर्जून डिलीट करा. यामुळे जर कोणी तुमचा फोन वापरला तर कोणाला हे  समजणार नाही की तुम्ही काय सर्च केलं आहे.

यासाठी जेव्हा तुम्ही गुगल पेज ओपन करता तेव्हा वरच्या दिशेने व खालच्या बाजूला डॉट्स बनलेले  असतात, ते तुम्ही क्लिक करा. तुम्हाला यामध्ये हिस्टरी ऑप्शन दिसेल. नंतर त्यावर क्लिक करून तुम्ही क्लियर ब्राऊजिंग डेटा वर क्लिक करा. यामुळे तुम्हाला लास्ट अवर ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्हाला जो डेटा डिलीट करायचा आहे तो करू शकतो.

एडल्ट साइट्स सबस्क्राईब करू नका

आज अनेक असे अॅप्स आहेत जे एडल्ट कंटेंट देतात. सोबतच तुम्हाला नेटवरदेखील अशा प्रकारचं अनेक साहित्य पाहायला मिळेल. असा वेळी जेव्हादेखील तुम्ही या साईट्सवर व्हिजिट्स कराल तेव्हा चुकूनदेखील सबस्क्राईब करू नका. कारण या बहाण्याने तुमची वैयक्तिक माहिती, इमेल आयडी, फोन नंबर त्यांच्यापर्यंत जातो, ज्यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.

अलाव ऑप्शन ओके करू नका

आपण शॉपिंग साइट्सवर विजिट करू वा अन्य कोणत्याही साइट्सवर, जेव्हादेखील आपण त्या साईट्स वरती जातो तेव्हा नोटिफिकेशनसाठी अलावू वा आणि डिसएग्रीचा ऑप्शन येतो, तेव्हा तुम्ही कधीही अलावूच्या ऑप्शनवर क्लिक करू नका. कारण यामुळे तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने नोटिफिकेशन यायला सुरुवात होते, ज्या तुम्हाला त्रासदायक ठरतात त्याबरोबरच यावर कोणाचही लक्ष जाऊ शकतं.

फोनमध्ये काहीही डाऊनलोड करू नका

अनेकदा आपल्याला सवय असते की आपण ज्यादेखील साईट्स खोलतो तेव्हा आपल्याला छान वाटतं आणि आपण त्या आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करून ठेवतो. तुम्हाला तुमची ही सवय सोडायला हवी, कारण यामुळे तुमच्या फोनच्या मेमरीवर परिणाम होण्याबरोबरच अनेकदा अशा अनेक गोष्टीदेखील सेव होतात ज्यामुळे फोन हॅन्ग होण्याचीदेखील शक्यता असते.

व्हाट्सअपला करा लॉक

व्हाट्सअप अलीकडे सर्वात जास्त चॅटिंग करण्यासाठीचं प्रचलित अॅप आहे. तुम्ही तो लॉक करून ठेवा. यामुळे तुमच्या चॅटिंग बॉक्सला तुमच्या संमतीशिवाय कोणीही खोलू शकणार नाही. यासाठी तुम्ही व्हाट्सअप ओपन करा नंतर वरच्या दिशेने डॉट्सवर क्लिक करून अकाउंटमध्ये प्रायव्हसीला क्लिक करा. यामध्ये तुम्ही लॉक ऑप्शन निवडू शकता आणि तुम्ही यामध्ये चॅटवर जाऊन तुमची चॅट हिस्ट्री डिलीट वा बॅकअपदेखील घेऊ शकता.

कसं कराल अँड्रॉइड फोनमध्ये फोटो हाइड

काही क्षण असे असतात जे आपल्याला आपल्या फोनमध्ये कैद करून ठेवायचे असतात. परंतु कोणी अनाहूतपणे आम्ही तुमचे फोटो खोलून पाहिले तर तुम्हाला लाजिरवाणं वाटू शकतं. अशा वेळी तुमच्याजवळ ऑप्शन असतो की तुमचे सर्व फोटो हाईड करून ठेवू शकता आणि जेव्हादेखील तुम्हाला वाटेल तेव्हा खोलून पाहू शकता.

यासाठी तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये ज्या फोटोला तुम्हाला हाईड करायचं असेल त्यावर क्लिक करा. नंतर वरच्या दिशेने दिसणाऱ्या डॉटस्वर क्लिक करून कम्प्रेसवर क्लिक  करा. आता फाइल नेम, फाईल लोकेशन ज्यामध्ये तुम्हाला फाइल कुठे सेव्ह करायचे आहे तिथे टाकून पासवर्ड सेट करा आणि सेव्ह करुन ठेवा.

या गोष्टींचीदेखील काळजी घ्या

* शॉपिंग साइट्सवर कधीही तुमचं कार्ड सेव्ह करून ठेवू नका.

* पासवर्ड कधीही फोनमध्ये सेव्ह करू नका.

* बँक डिटेल्स फोनमध्ये ठेवू नका.

* नेट बँकिंग कायम स्वत:च्या मोबाईलमधूनच करा.

* सामानाची यादी बनवून फोनमध्ये सेव्ह करून ठेवू शकता.

* तुमच्या पर्सनल इन्फॉर्मेशन फोनमध्ये सेव्ह करू नका.

* गरजेचा डेटा पासवर्ड प्रोटेक्टेड ठेवा.

स्मार्टफोनचे व्यसन आहे वाईट

* ललिता गोयल

स्मार्टफोन आपल्या सगळयांच्या जीवनाचा एक अभिन्न अंग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण याच्यावर अवलंबून असतो, मग गोष्ट सकाळच्या अलार्मची असो, ऑनलाईन पेमेंटची, शॉपिंगची, बोअर झालं की संगीत ऐकणे किंवा चित्रपट बघणे, एखादा महत्वाचा मेल करायचा असो किंवा आपल्या मित्रांशी व नातेवाईकांशी कनेक्ट राहायचे असो. आपणा सगळयांचा पूर्ण संसार या लहानशा वस्तूत  सामावलेला आहे. परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की या लहानशा वस्तूशी आपली ही जवळीक आपल्या दैनंदिन वर्तणुकीत कित्येक समस्यासुद्धा निर्माण करत आहे? जर तुम्ही स्मार्टफोनमधून महत्वाची माहिती काढू शकला नाहीत तर तुम्ही त्रासून जाता. जर तुमच्यापर्यंत मेसेज किंवा कॉल पोहोचत नसेल, तर तुम्ही बेचैन होऊ लागता. जर तुमच्याकडे प्रीपेड कनेक्शन असेल, तर स्मार्टफोनमध्ये बॅलेंस कमी होताच तुम्ही घाबरून जाता. कित्येक व्यक्तींमध्ये इंटरनेटचं स्पीडही टेन्शन वाढवतो.

फेसबुक वा अन्य सोशल नेटवर्किंग साईटवर स्वत:चा स्टेटटस अपलोड करू न कल्याने वा इतरांचा स्टेटस वाचू न शकल्यानेही अस्वस्थता जाणवते.

याव्यतिरिक्त काही लोकांना नेहमी आपला स्मार्टफोन हरवणार असल्याची भीती सतावत राहते. याचा अर्थ जर एक मिनिटही फोन त्यांच्या नजरेपासून दूर झाला तर ते बेचैन होऊ लागतात. आपला स्मार्टफोन हरवल्याच्या भीतिने त्यांच्या हृदयाची धडधड वाढते.

नोमोफोबिया नावाचा आजार

लोवा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये अलीकडेच लावलेल्या शोधानुसार स्मार्टफोन लोकांमध्ये नोमोफोबिया नावाचा आजार निर्माण करत आहे. या रोगाच्या व्यक्तीला सतत आपला मोबाईल हरवण्याची भीती वाटत राहते आणि कित्येकदा तर हा फोबिया माणसांवर एवढा वरचढ होतो की टॉयलेटमध्येसुद्धा ते आपला मोबाईल बरोबर घेऊन जातात आणि दिवसातून कमीतकमी ३० पेक्षा जास्त वेळा आपला फोन चेक करतात. प्रत्यक्षात त्यांना भीती वाटत असते की फोन घरी विसरलो तर त्यांचा एखादा महत्वाचा मेसेज किंवा कॉल मिस होईल आणि त्यांची हीच भीती त्यांच्या वर्तणूक आणि व्यक्तिमत्वातील बदलाचे कारण बनते. या भीतिने त्रस्त लोकांना वाटत राहते की फोनविना आपला सगळया जगाशी काहीच संपर्क राहणार नाही.

फोनविना जीवन अपूर्ण

लंडनमध्ये झालेल्या एका दुसऱ्या संशोधनात म्हटलं आहे की नोमोफोबिया आजच्या काळातली एक गंभीर समस्या आहे आणि यांच्या गांभीर्याला समजून घेण्यासाठी जवळपास १००० लोकांवर संशोधन झालं, ज्यात ६६ टक्के लोक म्हणाले की त्यांना आपला मोबाईल हरवण्याची भीती त्रास देत राहते. संशोधनात असंही दिसून आले की १८ ते २४ वर्षांमधील तरुणांमध्ये मोबाईलप्रति सर्वाधिक जवळीक आहे. या वयातील साधारणत: ७७ टक्के लोक मोबाईलविना एक मिनिटसुद्धा राहू शकत नाहीत. अशा लोकांना वाटतं की मोबाईलविना आपलं जीवन अपूर्ण आहे. ते याच्याशिवाय राहू शकणार नाहीत. संशोधनात असेही दिसून आले की नोमोफोबिया झालेली व्यक्ती दिवसातून कमीतकमी ३७ वेळा आपला मोबाईल चेक करते.

उपाय काय

मानलं की स्मार्टफोनचे टेक्निक तुम्हाला स्मार्ट आणि अपडेट ठेवते, पण त्याबरोबरच हे लक्षात ठेवायची गरज आहे की ही टेक्निक तुमची सुविधा बनण्याऐवजी डोकेदुखीचे कारण न बनो. मोबाईल फोनच्या या व्यसनातून बाहेर निघायला आवश्यक आहे की तुम्ही तुमच्या जीवनाचं काहीतरी ध्येय ठरवावं. स्वत:ला आपल्या आवडीच्या छंदात व्यस्त ठेवायचा प्रयत्न करा. ऑफिसमध्ये काम करताना फोन एरोप्लेन मोडवर ठेवा. असे केल्याने तुम्ही फालतू कॉल्स आणि मेसेजेसपासून दूर राहाल. आपल्या सगळया सोशल मिडिया अॅपचे नोटिफिकेशन बंद ठेवा. सोबतच फोनमध्ये फालतू अॅप्स ठेवू नका. यामुळे तुम्ही फोनवर अवलंबून राहणार नाही. काल्पनिक जगातले संबंध निभावण्याऐवजी खऱ्या जीवनातल्या मित्रांबरोबर वेळ घालावा. शक्य तितके स्वत:ला फोनपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें