विनाकारण सल्ला देऊ नका

* प्रीता जैन

सूची स्वत:साठी बाजारात एक ड्रेस घेत होती. अचानक तिला मागून कोणीतरी हाक मारली. सूचीने मागे वळून बघितलं तर ती रीमा होती. रीमाला तिथे पाहून तिचा मूड ऑफ झाला. कारण तिला माहीत होतं की, आता ती जबरदस्ती तिला योग्य ड्रेस निवडण्याच्या टीप्स देऊ लागेल, जसं काही तिला स्वत:ला खूप फॅशनची माहिती आहे. हा कसा घेतला, आता तर हा ट्रेंडमध्येच नाही आहे. वगैरे गोष्टी सांगून सांगून डोकं खाईल. ठीक आहे, मैत्री तर आहे, तर तोंडावरती नकारदेखील देऊ शकत नाही.

काळजी घे, ट्रेनमध्ये खाण्यापिण्याचं सामान व्यवस्थित ठेव १-२ पाण्याच्या बाटल्यादेखील ठेव, कुठेही स्टेशनवर उतरू नकोस, दिल्लीला आपण भेटूच, अजिबात काळजी करू नकोस.

हे सल्ले एखाद्या लहान मुलासाठी नसून ४५ वर्षांच्या विनीतासाठी होते. जी आपल्या माहेरी एकटी जात होती. मोठा भाऊ त्याच्याकडून तिच्या भल्यासाठीच सांगत होता, परंतु विनिताला हे ऐकून कधी हसू यायचं की कसं ते लहान मुलाप्रमाणे सतत समजावत राहतात, तर कधी कधी तिला कंटाळादेखील यायचा, मुलं असतात तेव्हा तर ती तिच्याकडे बघून हसू लागतात व नंतर पती तिला गरीब समजूनदेखील समजावून लागत.

ही गोष्ट फक्त एका दिवसाची नव्हती तर दररोजची होती. जेव्हा देखील दादा वा वहिनीचा फोन येतो तेव्हा इकडेतिकडच्या गोष्टी न करता ते विनिताला समजावत राहात की असं कर, तसंच  करू नकोस, ते तिकडे जाऊ नकोस, हे सामान हे खरेदी करू नकोस वगैरे वगैरे.

अशा प्रकारे दीपाची मोठी जाऊबाई रीनाजी तिच्यापेक्षा १-२ वर्षाने मोठी होती तीदेखील मुलांच्या संगोपनाबद्दल सांगत राहायची केवळ आजच नाही तर जेव्हादेखील तिचा फोन यायचा तेव्हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून सल्ले देत राहायची की सकाळी लवकर उठ, नाश्ता वा खाण्यात हेच बनव, घर अशाच पद्धतीने सजव, हे काम असं केलं जातं, हे काम तसंच केलं जातं, सर्वांसोबत असंच वाग तसंच वाग वगैरे वगैरे.

हे योग्य नाही

सुरुवातीला विनिता ऐकत राहायची परंतु आता तिलादेखील वाटू लागलं की आपण तर समवयस्क आहोत. तर इकडच्या तिकडच्या शिक्षण वा मनोरंजनाबद्दल बोलायचं झालं तर जास्त चांगलं किंवा असं होऊ शकतं का? विनिता ऐकत राहायची आणि जाऊ सुनवत राहायची. विनिता ऐकत राहायची ती कधीच सांगू शकत नव्हती वा तिच्या बोलण्यावरून आभासच व्हायचा नाही की तीदेखील एक गृहिणी व स्त्री आहे, जिला आपल्या जबाबदाऱ्या निभावणं खूप चांगल्या प्रकारे कदाचित तिच्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे.

असं फक्त विनिताच नाही तर आपल्या बाबतीतदेखील अनेकदा होतच असतं. अनेकदा लहानपणापासून ते अगदी मोठं होईपर्यंत कोणी ना कोणी, काही ना काही सुनवतच असतं आणि हळूहळू आपण ऐकण्यासाठी म्हणून ऐकत राहतो असं म्हणतो तसं आपण मांडू लावून ऐकू लागतो. जसं दाखवतो की आपल्याला आपण अगदी मन लावून ऐकत आहे. म्हणून प्रत्येक जण आपल्याला काही समजतच नाही असं मानून स्वताचा सल्ला वारंवार देऊ लागतो आणि अनेकदा होतच राहतं.

परंतु हे अजिबात योग्य नाही आहे, प्रत्येक वेळी कोणाला ना कोणाला सल्ला देत राहणं आणि प्रत्येक वेळी त्यांच ऐकणं हे योग्य नाही आहे. आयुष्य आहे तर ते जगण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या कुवतीनुसार काम करतच राहतात. अनेक लोक वयाबरोबरच एवढे समजूतदार आणि परिपक्व होत जातात की आपली कामं कशी करायची आणि कोणावरती ही विनाकारण अवलंबून रहायच नाही हे त्यांना माहितच आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही कामाबद्दल जाणून घेणं व एखादी माहिती द्यायची असेल तेव्हा इतर व्यक्तींना आवर्जून विचारायला हवं व त्यांचा सल्ला घ्यायला हवा. अशाप्रकारे स्वत:कडूनदेखील दुसऱ्या व्यक्तींना विनाकारण हे करता तेव्हाच सल्ला द्यायला हवा. जेव्हा समोरचा स्वत:हून मागायला येईल गरजेनुसार सल्ला देण्याची गरज असेल.

योग्य सल्ला

सल्ला देणाऱ्यापेक्षा तो सल्ला ऐकणाऱ्या व्यक्तीची चूक आहे. जे दुसऱ्यांना ऐकवत राहतात व अशा प्रकारचे वागत राहतात जसं काही समोरच्याला काही कळतच नाही. आम्ही हेदेखील नाही सांगत आहे की इतर व्यक्तींचा सल्ला ऐकायला व मानायला नको. उलट सांगण्याचं तात्पर्य हे आहे की असा सल्ला माना जो वास्तवात मानण्यालायक आहे, त्यामुळे तुमचं दररोज आयुष्य वा मग जीवनात नवीन दिशा मिळेल व ऐकल्यामुळे वा त्यावर अंमल केल्यामुळे मानसिक समाधान मिळण्याची शक्यता असेल, अन्यथा ‘ना’ ऐकण्याची तसंच ‘ना’ बोलण्याची सवय स्वत:मध्ये विकसित करणं खूप गरजेचं आहे.

प्रत्येक व्यक्तीचं वागणं व सवय वेगवेगळी असू शकते. काहींना व्यवस्थित, तर काही आपल्या व्यक्ती त्याच्या विकासात बाधकदेखील होऊ शकतात. उदाहरणासाठी जर आपण आपापसात समजून घेतलं नाही आणि इतरांना गरजेपेक्षा जास्त आपल्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू लागतात तेव्हा प्रभावहीन व श्रेष्ठ ही व्यक्तित्व होऊन जातात. स्वत:ची ओळख करून ठेवू लागतात.

आयुष्यात बरंच काही आपण समजतच मोठे होत राहतो. अनुभव व वेळ सर्वांना जगरहाटी शिकवते. तरीदेखील आईवडील व आपल्यापेक्षा मोठयांचा सल्ला तसेच त्यांनी सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित ऐकून त्यावर अंमल करायला हवं. समवयस्क फक्त दोन ते चार वर्षापेक्षा मोठयांचं योग्य मानले जात नाही. यामुळे तुमच्या व्यक्ती तुमचं व्यक्तिमत्त्व प्रभावहीन होऊ शकतो. त्यामुळे विनाकारण सल्ला व टोका टोकिपासून वाचा आणि स्वत:चं व्यक्तिमत्त्व आकर्षक व प्रभावशाली बनवा.

ज्येष्ठ देती फुकटचे सल्ले

* बीरेंद्र बरियार ज्योती

योगासनं करून माझा शुगर लेव्हल अगदी नॉर्मलला राहाते. गेली दोन वर्षं मी एलोपथी औषधं बंद केलेली आहेत. टीव्हीवर पाहून योगासनं स्वत:च करतो व मनसोक्त मिठाईसुद्धा यखातो, तरीही माझा शुगर लेव्हल नॉर्मलच राहाते.’

‘मी तर गेली चार वर्षं ब्लड प्रेशरची औषधंच बंद केली आहेत, किती दिवस औषधं घेत राहाणार. डौक्टर उगीचच औषधं देत राहतात. स्वत:च पुस्तकं वाचून होमिओपथिक औषधं घेत आहे. अजूनपर्यंत तरी कोणतीच अडचण आलेली नाही. डॉक्टरांनी तर अगदी हैराण करून सोडलं होतं की हे खाऊ नका ते खाऊ नका!’

‘खरंच जर डॉक्टरांनी औषधं सुचविली नाहीत, तर त्यांचा धंदा कसा काय चालणार? मी तर सांधेदुखीमुळे इतका हैराण झालो होतो की विचारूच नका. जेव्हा जेव्हा दुखणं वाढत असे तेव्हा डॉक्टर डझनभर औषधं खाण्यास सांगत. दुखण्यापेक्षा औषधं घेण्याचाच त्रास अधिक होता. एका आयुर्वेदिक तज्ज्ञाने अशी जडीबुटी दिली की गेले पाच महिने माझं दुखणं पार नाहीसं झालेलं आहे.’

‘‘अरे, सर्दीखोकला झाल्यावरसुद्धा डॉक्टर अॅण्टीबायोटिक्स, कफ सिरप व एलर्जीची औषधं देतात. याउलट होमिओपथीत काही अशी औषधं आहेत की ज्यांनी सर्दीखोकला झटपट ठीक केला जातो. मला असा काही त्रास होतो त्यावेळी पाच रुपयांत होमिओपथिक औषधं घेऊन मी स्वत:वर इलाज करतो. माझी मुलं व सुना व्यर्थ पैसे खर्च करत राहातात. साधी सर्दी व ताप आला तरी डॉक्टरचं औषध, कित्येक तपासण्या व औषधपाण्यावर हजारो रुपये खर्च करतात.’’

आयुष्य धोक्यात घालणारी वडीलमाणसं

बागांमध्ये, चौकाचौकांत जमलेले ज्येष्ठ नागरिक अशा प्रकारे चर्चा करताना आढळून येतात. सकाळी अथवा संध्याकाळी फेरफटका मारताना अथवा आपल्या बैठकांमध्ये आपले आजार व त्यावर आपण स्वत:च केलेले उपचार याविषयी ते बोलत असतात. आपापल्या तोकड्या अनुभवांतून योग, आयुर्वेद व होमिओपथीविषयी गैरसमज पसरवत असतात. असं करून ते आपलं उर्वरित आयुष्य तर धोक्यात घालतातच परंतु आप्तस्वकियांनाही अडचणीत आणतात. आपल्या अर्धवट वैद्यकीय ज्ञानाने कित्येक वृद्ध लोक आपल्या शरीरस्वास्थ्याशी खेळत आहेत.

अशा वृद्धांच्या नातेवाइकांशी चर्चा केल्यावर अशा कित्येक क्लेशदायक घटना समोर येतात. ठाण्यातील एक चार्टर्ड अकाउंटंट रामभाऊ जोशी सांगतात की, त्यांचे वडील गेली वीस वर्षं हाय ब्लडप्रेशरने त्रस्त आहेत. अनेक वेळा होमिओपथिक औषधांच्या नादाने औषधं खाणं बंद करतात व यामुळे दर सहा महिन्यांनी अथवा वर्षाने त्यांची तब्येत इतकी बिघडते की त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. गेल्या वर्षी तर ते कोमामध्ये जाता जाता वाचले.

इंडियन मेडिकल एसोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजयकुमार सांगतात की, असे ज्येष्ठ नागरिक जर वेळीच सावध झाले नाहीत, तर मोठ्या अडचणींत येऊ शकतात. शुगर आणि उच्च रक्तदाबाची औषधं अशी मध्ये मध्ये सोडल्यास त्याचे दुष्परिणाम किडनी, यकृत इत्यादी अवयवांवर दिसून येतात व ते अवयव आपलं काम सोडून देण्याची शक्यता वाढते. हा परिणाम हळूहळू दिसून येतो. ज्येष्ठ नागरिक हे लक्षात घेत नाहीत व स्वत:च मृत्युला निमंत्रण देतात.

जेव्हा योग कमी पडतो

योग व आयुर्वेद एलोपथीपुढे तोकडे पडल्याचं ताजं उदाहरण म्हणजे स्वत:ला योगाचे महागुरू समजणारे रामदेव बाबा यांचंच आहे. उपोषणास बसलेल्या रामदेव बाबांची तब्येत जेव्हा अत्यंत खालावली तेव्हा त्यांना एलोपथिक उपचारांना शरण जावं लागलं. का नाही त्यांनी डीहायड्रेशनपासून योगाच्या सहाय्याने आपली सुटका करून घेतली? त्यांना ग्लुकोज का द्यावं लागलं व एलोपथिक हॉस्पिटलमध्ये का भरती व्हावं लागलं? उपवासाच्या वेळी ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासाठी त्यांनी जडीबुटी का नाही खाल्ली? हॉस्पिटलला नेण्यास त्यांनी का मज्जाव नाही केला? तेथे जाऊन तेथील उपचारांनी माझी तब्येत अधिकच बिघडेल असं का सांगितलं नाही? याचा अर्थ सरळ आहे की ते जाणत होते की अशा परिस्थितीत एलोपथिक उपचारांशिवाय पर्याय नाही.

ठाण्यातील एक डॉक्टर तेजस्वी सांगतात, काही ज्येष्ठ नागरिक असा दावा करतात की त्यांचा होमिओपथी व आयुर्वेदावर पूर्ण विश्वास आहे, पण मग जेव्हा तब्येत फारच बिघडते तेव्हा ते एलोपथिक डॉक्टरकडे कशाला जातात? खरं तर असे लोक टीव्हीवर योग पाहून आणि स्वस्त होमिओपथिक व आयुर्वेदिक पुस्तकं वाचून पूर्णपणे गोंधळलेले असतात.

आता एका ज्येष्ठ नागरिकाचाच अनुभव ऐका. साहेब निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. एके दिवशी डायबिटिसची गोळी खाल्ल्यावरसुद्धा त्यांना असं वाटलं की अजूनही आपणास चक्कर येत आहे. त्यांनी पटकन कुठलंसं होमिओपथिक औषध खाल्लं. त्यानंतरही आराम न पडल्याने त्यांनी एलोपथीची आणखी एक गोळी खाल्ली. यामुळे त्यांची तब्येत अधिक बिघडली व ते बेशुद्ध पडले. घरच्यांना वाटलं की त्यांची शुगर कमी झाल्याने त्यांना चक्कर आली आहे म्हणून त्यांनी त्यांना शुद्धीवर आणून सरबत पाजलं. मग त्यांना ताबडतोब डॉक्टरकडे नेण्यात आलं. शुगर लेव्हल चेक केल्यावर साखरेचं प्रमाण ४० आढळल्याने डॉक्टर म्हणाले की त्यांना वेळेवर साखर देण्यात आली नसती व येथे आणण्यात आलं नसतं तर त्यांचं जगणं अशक्य होतं.

आपल्या जीवाशी खेळू नका

डोंबिवलीचे डॉ. राजीव कुमार सांगतात की, स्वत:च डॉक्टर बनणाऱ्याचं हेच दु:ख असतं. वाईट एवढंच आहे की, शिकलेसवरलेले लोकसुद्धा असं मान्य करतात की आयुर्वेदिक अथवा होमिओपथिक औषधांचे दुष्परिणाम होत नाहीत. या भ्रमातून लोकांनी बाहेर पडण्याची गरज आहे अन्यथा  स्वत:च आपल्या प्राणावर बेतून घेतील.

ठाण्यातील होमिओपथिक डॉक्टर उपेंद्रकुमार वर्मा सांगतात की, टोकाला जाऊन तुम्ही होमिओपथीला नकार देऊ शकत नाही. होमिओपथिकपासून मिळणारा आराम खूपच प्रभावी आहे. परंतु लोक जेव्हा एलोपथीची औषधं खाऊन कंटाळतात तेव्हा ते इकडे वळतात. जर एखाद्या शिकलेल्या तज्ज्ञ होमिओपथीकडून वेळेवर इलाज करून घेतला तर कोणत्याही रोगावर फायदाच दिसून येईल. आपल्या ज्येष्ठांना अर्धवट ज्ञानातून आपल्या कमजोर व आजारी शरीरावर उपाययोजना स्वत:च करण्यापासून परावृत्त केलं पाहिजे. तसंच आपल्या आजारावर आपणच केलेल्या अपुऱ्या उपायांचा फैलाव करणंही बंद केलं पाहिजे. ज्या गोष्टीची योग्य व पूर्ण माहिती नाही तिचा उपयोग आपल्यावर प्रयोग करण्यासाठी करू नये. हे त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबियासाठी योग्य ठरेल व आपल्या आयुष्यातील शेवटचा टप्पा ते यामुळे स्वस्थपणे व शांतपणे पार करू शकतील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें